सत्य काय आहे?.. एक  असा मार्ग ज्यावर दुख्खा:पासून मुक्त असा निर्भेळ आनंद आहे !
डिसेंबर २०११

'आयुष्याचे सत्य काय आहेयाकडे लक्ष देणे म्हणजे सत्संग.
काय आहे जीवनाचे सत्य?

सत्य हे आहे कि पंचेंद्रिय ही बहिर्मुख आहेत. बाहेरच्या जगाबद्दलचे आकर्षण खूप जास्त आहे आणि अंतरंगाबद्दलचे खूप कमी. हे जीवनातले  निखळ सत्य आहे.
आपल्याला या बाहेरच्या जगाच्या ओढीपासून मुक्ती हवी आहे कारण जेवढे तुम्ही बाहेरच्या आकर्षणाच्या आहारी जाता तेवढा त्यापासून काहीच लाभ होत नाही, पण तरीही ते सोडून देणे खूप अवघड जाते. हे आयुष्याचे प्रथम सत्य आहे.
जेंव्हा तुम्ही या प्रलोभनांच्या  आहारी जाता, तेंव्हा काय होते तुम्हाला त्यापासून दुख्ख: मिळते. तुम्ही सुखाची अपेक्षा करून त्याच्या पाठीमागे  जाता आणि पदरी शेवटी निराशाच पडते.
तुम्ही सगळ्यांनी हे अनुभव केले आहे कि नाही? आपली सर्व इंद्रिये बहिर्मुख जातात, काहीतरी पाहण्यासाठी, काहीतरी ऐकण्यासाठी, कशाचातरी वास घेण्यासाठी, कशाचातरी स्पर्श अनुभवण्यासाठी  किंवा कशाचीतरी चव घेण्यासाठी!
आता जर तुम्ही या इच्छा आकांक्षांच्या मागे जात राहिलात तर तुम्हाला समाधान मिळते का? थोड्या काळासाठी मिळतही असेल पण परत लागलीच तुम्ही अस्वस्थ होता.
हे दुसरे सत्य आहे. .. तुम्हाला क्षणिक समाधान मिळते पण ते टिकत नाही आणि तुम्ही पुन्हा बेचैन होऊन जाता. प्रत्येक वेळेस तुम्ही कुठलीतरी कामना पूर्ण करण्यासाठी जाता आणि अशांत होता आणि क्षणोक्षणी  हि बेचैनी वाढत जाते आणि शेवटी  तुमच्यामध्ये नीरसता, उदासीनता येत जाते

 तुमच्यापुढे सुग्रास अन्न ठेवले आहे पण तुम्हाला ते खाण्याची वासना होत नाही. तुमच्या घरी कर्णमधुर संगीताच्या खूप CD असतात, पण तुम्हाला त्या ऐकण्यामध्ये रस नसतो. तुम्ही विवाहित असता पण तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर शरीरसुखाची  कामना नसते. तुमच्या कपाटामध्ये खूप सुंदर वस्त्र असतात, पण तुम्हाला ती परिधान karaychi   इच्छा नसते.

अनुत्साह  आणि उदासीनता या सातत्याने  ऐहिक इच्छापूर्तीच्या मागे धावल्याने निर्माण झालेल्या  अस्वस्थतेतून जन्म घेतात.  
हे एक दुष्टचक्र आहे.  
एक आकर्षण निर्माण झाले, तुम्ही त्याच्या मागे लागलात आणि त्यामधून तुम्हाला क्षणिक समाधान आणि आनंद मिळाला आणि नंतर तुम्ही परत अस्वस्थ झालात.  मग त्या गोष्टीमधला आनंद निघून गेला पण ती बेचैनी मात्र तशीच राहिली. मग तो बेचैनी वाढत वाढत गेली आणि त्यातूनच नैराश्य आणि उदासीनता आली.
लोक प्रेक्षणीय स्थळे बघण्यासाठी जातात. काही  जण म्हैसोर संग्रहालय बघायला गेले, तिथे त्यांनी फक्त हॉटेल मध्ये जाऊन काहीतरी खाल्ले आणि नंतर विचार केला " या संग्रहालयात बघण्यासारखे काय आहे, जाऊ देत"! ते खरे तर इतक्या लांबून संग्रहालय बघयला आले होते, पण त्यांनी तिथे काहीच बघितले नाही.
काही लोक बंगलोर  पासून  पार वैश्नोदेविपर्यंत गेले, आजूबाजूचे पर्वत बघितले, देवळापर्यंत जाणारी  भक्तांची रांग  बघितली  आणि दर्शन घेताच परत आले. त्यांना त्यामध्ये रसाच उरला नाही.
जेंव्हा मनामध्ये अशांतता असते, तेंव्हा कोणत्याही गोष्टीचा आस्वाद घेता येत नाही. हा मानवी आयुष्यातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे..
सर्व  गोष्टींबद्दल  एक प्रकारची अरुचीपरावृत्ती   निर्माण होते, पण तरीही ती सोडून देते कठीण असते. एकदा अरुची निर्माण झाल्यावर ते सोडून देणे सोप्पे असते तरी ठीक आहे, पण अस्वस्थता असूनही ते सोडून देणे जमत नाही.
अशा परिस्थितीत काय कराल? अंतर्मुखी व्हा...स्वताच्या अंतरामध्ये डोकावून पहा.
आता अंतर्मुख कसे वायचे? इथेच सर्वजण अडकून पडलेले असतात... ना अंतर्मुख होता येत  ना बाहेरच्या जगाबद्दल रस उरलाय  --
ना   घर का ना घाट का !
या जगातले तर काही आनंद देत नाही पण तरीही चित्त  ध्यान धारणेमध्ये लागत नाहीये..
अशा अवस्थेत काय करावे..हे आकर्षण कसे बदलायचे.....मोठ्ठा प्रश्न आहे.
माझ्याकडे उत्तर नाहीये.. फक्त प्रश्न आहे !
खरे तर हे उत्तर तुमच्या आतूनच यायला पाहिजे ..जसे बीज पेरल्यानंतर त्यापासून रोपटे येते जे नंतर वृक्षामध्ये बदलते, उमलत जाते आणि नंतर त्याला फळे लागतात. हे बीज पेरण्याची प्रक्रिया म्हणजेच सत्संग.
हे बीज कसे पेरायचे? प्रथम जमीन तयार करायची, नंतर नांगरणी करायची; म्हणजेच आयुष्याचे सत्य काय आहे याची जाणीव करून घेणे, हे समजून घ्या कि इंद्रिये हि बहिर्मुख असतात. त्यांचा बाहेरच्या आकर्षण जास्त असते आणि याच्यामुळे समाधानाचा अनुभव करता येत नाही. क्षणिक आनंद मिळतोही पण तो अस्वस्थता घेऊन येतो आणि शेवटी उदासीनतेकडे घेऊन जातो.
अर्धे काम तर तिथेच होऊन जाते जेंव्हा आपण हे सत्य ओळखतो आणि समजून घेतो. बहुतेकांना ये सत्य जाणून घेण्याची इच्छा नसते. पण याचा सामना करणे आवश्यक आहे. सत्संगाचा अर्थ आहे, ' जीवनाचे सत्य काय आहे, ते समजून घेणे.'
यानंतर, प्रलोभनाना कसे जिंकून घ्यायचे?
एका आकर्षणापासून दूर होण्यासाठी  दुसरे त्याहून मोठे आकर्षण असणे जरुरी आहे; मगच लहानमोठी प्रलोभने गळून पडतील.
पहिला मार्ग आहे तो ध्यान, ज्ञान आणि सेवेचा. जेंव्हा एकाद्याला यामध्ये आनंद मिळू लागेल, तेंव्हा ऐहिक आनंदाच्या गोष्टींचे   आकर्षण कमी होऊ लागेल.
दुसरे म्हणजे जेंव्हा  एखाद्या कामासाठी एकचित्त आणि समर्पित वृत्ती असेल, त्याही वेळेस हे आकर्षण कमी होऊ लागेल.

माझ्या माहितीचे एक गणिताचे प्राध्यापक होते . ते रस्त्यातून चालताना स्वत:शीच बोलायचे, हातवारे करायचे आणि मनातल्या मनात गणिते सोडवायचे. लोक त्यांना वेद समजायचे. कधी कधी ते नादात आपल्या घरासमोरून पुढे निघून जायचे आणि मग त्यांच्या घरातली माणसे त्यांना बोलावून घेऊन यायची.
ते गणितामध्ये इतके बुडून जायचे कि घरदार, अन्नपाणी याची  त्यांना पर्वा नसायची. त्यांनी गणितातल्या एक नाव्वीन शाखेचा शोध लावला आणि त्यावर पुस्तकही लिहिले. इतके ते गणित प्रेमी  होते.
अशाच प्रकारचे काही शास्त्रज्ञ आहेत ज्यांना तहह, भूक यांची पर्वा नसते. जेंव्हा त्यांच्या विश्वात एखादा नवीन शोध लागतोत्यावेळेस त्या शोधाचा जनक असलेला शास्त्रज्ञाने  त्यामध्ये संपूर्णपणे स्वत:ला वाहून घेतले असते आणि जगातल्या इतर कुठल्याही  गोष्टींचे  त्यांचे आकर्षण संपून जाते.

आणि तिसरे म्हणजे, ज्ञानाचा   लगाम लावणे. जसे अपघाताच्या भीतीने गाडीला ब्रेक लावतो. म्हणूनच अधूनमधून वैराग्याचे ब्रेक लावले, तर तुम्चाय्वर  बाहेरच्या प्रलोभांनाचा प्रभाव  पडणार नाही.
हे सर्व करूनही जरा तुम्हाला तहान-भूक लागली, झोप आली किंवा काही बघण्याची तीव्र इच्छा झालीतर असे समजा कि इंद्रिये त्यांच्या स्वभावधर्मानुसार काम करत आहेत आणि मी या सर्वांपासून वेगळा आहे आणि शांत रहा.  
इन्द्रिये आपापल्या  गुणधर्म नुसार कार्य करणार  हे नैसर्गिक आहे . त्यामुळेस्वत:ला दोष देण्यापेक्षास्वत:ला अलिप्त आणि मुक्त, निवांत व्हा.
इंद्रियसुख हे प्रयत्नपूर्वक मिळवावे लागते पण निर्भेळ आनंद हा विनाप्रयत्न विश्रामातून, ध्यानामधून मिळतो. ध्यानातून मिळालेला आनंद हा प्रयत्नातून मिळालेल्या आनंदापेक्षा कितीतरी पतीने जास्त असतो.
कशापासुनही आनंद मिळवण्यासाठी काही प्रयत्न करावा लागतो. अशा प्रकारे, पाचपैकी कोणत्याही एका इंद्रीयापासून मिळालेल्या  सुखामुळे उर्जेचा (शक्तीचा) अपव्यय होतो आणि दमणूक होते कारण इथे कष्ट करावे लागतात. काही (काम) करण्यातून मिळालेले सुख हे कमी दर्जाचे आहे पण काहीही करता (ध्यानातून ) मिळालेला आनंद हा असीम,  उच्च  प्रतीचा आहेध्यानातून मिळालेल्या गाढ विश्रांतीमुळे शरीर सजग बनतेत्यामध्ये उर्जा  निर्माण होते आणि अस्वस्थता नाहीशी होते.
त्यामुळे, जेंव्हा  आपली अस्वस्थता शिगेला पोचते, तेंव्हा आपण ध्यान  करून त्यापासून मुक्ती मिळवू शकतो. हे अत्यंत महत्त्वाचे आहे

सत्य काय आहे? असा मार्ग कि ज्यावर दुखा:पासून मुक्त असा निखळ आनंद आहे. असा निखळ आनंद प्राप्त करणे, ज्यामध्ये अस्वस्थता आणि उदासीनतेचा अंश नसेल, हि आंतरिक ओढ आहे. हा पाठपुरावा करणे हीच अध्यात्मिक पृच्छा (ओढ) आहे आणि जो हा पाठपुरावा करतो, त्यालाच 'साधक' म्हणतात.
याबद्दल बोलणे आणि ऐकणे सोप्पे आहे, पण ते आचरणात आणणे खूप अवघड आहे, पण ते अशक्यही नाही. ज्याच्या मनात अशी इच्छा जागृत झाली आहे, त्यासाठी हे अजिबात अवघड नाही. त्याच वेळेस  (खरी) प्रार्थना होते.
जेंव्हा माणूस तहानलेला असतो, त्यावेळेस  तो  याचना  करतो  कि  ' कृपा करून मल थोडे पाणि द्या'. त्याच कळकळीने अशा प्रकारच्या शांतीची मनाला ओढ लागली पाहिजे - तती एक गोष्ट प्राप्त करण्याची उत्कट आकांक्षा ,  ज्यामध्ये बाकी सर्व काही मिळून जाईल. जो अशा या प्रबळ इच्छेने भारला गेला आहेतोही एक 'साधकआहे.  
आता, अशी शंका घेत बसू नका कि ' मी साधक आहे किंवा नाही? मला अशी काही उत्कटता नाही, मी सहज इथे येऊन बसलो आहे'.
असे मानून चला कि तुम्ही साधक आहात. मान्य करा कि तुमच्यामध्ये काही प्रमाणात आकर्षण आहे आणि ते आता कमी होते आहे. काही वर्षांपूर्वी ज्या प्रकारे तुम्ही या प्रलोभानांमध्ये गुंतला होतात, आताही तसेच आहे का? नाही ना?
 ज्ञान आणि वेळानुसार हे आकर्षण कमी होत जाते. त्यासाठी ज्ञान आणि वेळ, दोन्हीची गरज आहे. जसे हे आकर्षण सरते, तसे मन शांत होत जाते आणि जेंव्हा  हि शांती मिळते, त्याच वेळेस तुम्हाला ईश्वरप्राप्ती होते.



© The Art of Living Foundation
The Art of living

आपल्याला कशाची गरज आहे तर आंतरिक समृद्धीची आणि बाह्य कृतीशीलतेची

मंगळवार, ऑगस्ट १०, २०१०

ऑगस्ट ५,२०१०,वोबुर्ण,मेसेच्युसेट्स, युएसए
तुम्ही काय करता जेव्हा गर्दीत अडकता? (प्रेक्षक यादी सांगतात) तुम्ही देवाला सच्च्या मनाने ती दूर करण्यासाठी प्रार्थना करू शकता. तुम्ही गाडीत गाणे ऐकण्याचा आनंद घेऊ शकता. तुम्ही बाहेर जाण्याचा जवळचा मार्ग घेऊ शकता. तुम्ही एकतर गर्दीचा आनंद घेऊ शकता किंवा श्लोक म्हणू शकता. आता काय करू नये? तक्रार. हे थांबवा आणि तुम्ही तुमचा उत्साह कायम ठेवू शकाल. आपण या जगात या उत्साहासकटच येतो पण वाटेत तो कुठेतरी हरवतो. आपण जसजसे मोठे होत जातो, आपण सकारात्मतेकडून नकारात्मतेकडे जातो. तर या ट्राफिक जॅमकडे बटणे दाबण्याच्या परीक्षेसारखे बघा. 

प्रत्येक घटना ही
विवेकात खोलवर जाण्याची एक संधी असते. एखादी  अप्रिय घटना कुठेतरी आपल्या जन्मासोबत आलेल्या ज्ञानाला बाहेर काढते. सकारात्मक किंवा नकारात्मक, प्रत्येक घटनेमुळे हेच होते.  जर घटना आपल्यावर  प्रबळ झाली, आपण भावना आणि बुद्धिमत्ता हरवून बसतो. मग आपल्याला मदतीची गरज भासते. इथेच समन्वय येतो. आपण एकत्र बसतो आणि गातो आणि भार हलका होतो. प्रत्येकाने आयुष्यात थोडा वेळ ध्यान करण्यासाठी काढायला हवा. यालाच सत्संग, सत्याबरोबर राहणे म्हणतात. आयुष्यात सत्याचा सामना करत राहा. काहीच क्षण शांती, स्थिरता, आणि मजबुती आणू शकतात. 
लोकांना वाटत हे सगळा कंटाळवाणं आहे. त्यांना वाटत ज्ञान हे फार गंभीर आहे. मी म्हणतो ज्ञानाबरोबर जा आणि मजा तुमच्याबरोबर येईल,पण मजेच्या मागे जाल तर कष्ट तुमच्या मागे येतील. आत्मज्ञान तुम्हाला हलके आणि लहान मुलांप्रमाणे बनवतो. आंतरिक उत्साह आणतो. हेच अध्यात्म होय.

अनुभव करा की सगळं ठीक आहे. सगळं ठीक होईल. तेंव्हाच आपण आत जाऊन ध्यान करू शकतो. तुम्ही जेव्हा ध्यान करता, सगळं ठीक रहाते. जेव्हा तुम्ही ध्यानातून बाहेर येता तेव्हा तुम्हाला काहीच दिसत नाही. तुम्ही आयुष्यातल्या, जगातल्या समस्येप्रती सजग होता. तुम्ही ह्यासाठी काहीतरी केले पाहिजे. ध्यान हे स्वतःशी हास्य आहे आणि सेवा दुसर्यांच्या चेहेर्यावर हास्य आणते. तर पहिले तुम्ही आंत जायला हवय "सगळं ठीक आहे" या भावनेमध्ये. हे जाणून घ्या की तुम्ही सुरक्षित आहात आणि आणि तुमची काळजी घेतली जात आहे. हा विश्वास यायला हवा. हेच ध्यान आहे.

मग जेव्हा तुम्ही बाहेर येता, तेंव्हा काम करताना काय चूक आहे हे तुम्ही जाणू शकता आणि त्यावर काम करू शकता. हे सगळं कर्तव्य समजून करू नका. हे कर्तव्य म्हणून नाही तर तुमचा सहज स्वभाव असल्यासारखे करा. जर तुम्ही कर्तव्य समजलात तर त्यात सुंदरता नसेल. सेवा करा आणि हसत राहा. हसा आणि सेवा करा. सहसा आपण सेवेत हसत नाही. लोक त्रासून जातात आणि दुसर्यांना सेवेच्या नावाखाली त्रास देतात. आणि
जे लोक आनंदात असतात ते सेवा करीत नाही! दोन्ही प्रकारचे लोक एकाच पायावर चालतात. तुम्हाला दोन्ही गुणांची गरज आहे, आंतरिक ऐश्वर्य आणि बाहेरील कृतिशीलता.
The Art of living
ओगस्ट  १४
श्री श्रीं बरोबर च्या सत्संगामधून

प्रश्न: गुरुजी  मी पहिल्यांदा आश्रमामध्ये येत आहे आणि येथे येऊन मला खूप आनंद होत आहे. मला अस वाटत कि तुम्हीच मला येथे घेऊन आला आहात. आपण आपल्या सार्वजनिक दैनंदिन जीवनामध्ये काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टीना सामोरे जात असतो आणि काही वेळा आपण या मार्गावरून बाजूला हटतो. मी दररोज ध्यान, योग व प्राणायाम करतो. मी जेव्हा एकांतामध्ये असतो तेव्हा स्वतःकडे पाहायला व सात्विक गुण आत्मसात करण्यासाठी खूप सोपे जाते. सर्वांतर्फे माझा एक प्रश्न आहे कि जीवनामध्ये चांगल्या व वाईट गोष्टींचा सामना करीत असता सात्विक गुण, पवित्रता अंगी कशा जोपासायच्या?
श्री श्री : याबद्दलची जागरुकताच ती घेऊन येयील.ध्यान करा, सुदर्शन क्रिया करा सत्संगला जा आणि चांगल्या लोकांच्या संगती मध्ये राहा. ते सर्व घडेल. 


प्रश्न: गुरुजी गुरु आणि सत्गुरू यामधील फरक काय?
श्री श्री: सत हे फक्त गुरूच्या आधी जोडले गेले आहे. दोन्ही मध्ये काही फरक नाही. ते फक्त एक नाव आहे, दोन्ही एकच आणि सारखे आहेत. 


प्रश्न: भगवत्गीतेमध्ये धर्म आचरत असताना ४ पायऱ्या सांगितल्या आहेत. सत्य, नियमांचे पालन, सात्विकता, दया. मी शेतकीय विभागामध्ये सुपर्वाझेर म्हणून कामाची देखरेख करीत असताना माझ्या खालच्या सहकार्यांवर मी कामाच्या तणावामुळे (औद्योगिक क्षमता आणि उत्पादन वाढवण्यामुळे) दया दाखवू शकत नाही. 
श्री श्री: जे दुखी: आहेत त्यांचाशी दया दाखवावी, पण जे उद्धट आणि काम चुकारपणा करतात त्यांचाशी कडक वागले पाहिजे कुणाचा प्रामाणिकपणा न दुखावता.मित्रता, दया, सुख, उदासीनता:या चार गुणांपैकी :एक उच्च ध्येय्य गाठण्यासाठी सर्वजण एक करू शकता, उदासीनतेचा अभ्यास करायची जरुरी आहे किवा व्यवस्थित समजण्याची गरज आहे. . 

प्रश्न: गुरुजी मी एस प्लस केला आहे. मी दोन वर्षानंतर आश्रमामध्ये येत आहे आणि मी इथे काही दिवसांपासून आहे, मला आता आश्रम सोडून जावेसे वाटत नाही. मी माझ्या घरच्या जबाबदाऱ्या आणि इथे रहायची इच्छा यामध्ये साधर्म्य कसे साधू?
श्री श्री: दोन्ही कर. तुला दोन्न्हींची घरच्या जबाबदाऱ्या आणि इथे राहून सेवा करायची इच्छा यांची सांगड आणि काळजी  घेता आली पाहिजे.




The Art of living


नवरात्री : स्रोतापर्यंतचा प्रवास

नवरात्रीचा सण प्रार्थना आणि आनंदाने अश्विन आणि चित्र महिन्याच्या सुरुवातीला साजरा केल्या जातो. हा अवधी  स्वतःला समजण्याची आणि स्वतःकडे परतायची वेळ आहे. ही परिवर्तनाची वेळ आहे, प्रकृती जुने टाकून नवे धारण करते, प्राणी शीतनिद्रेत जातात आणि वसंतामध्ये नवीन जीवन सुरु होते.


वैदिक शास्त्राप्रमाणे, गोष्ट वारंवार निर्माण होण्यासाठी आपल्या मूळ आकारात जाते. ही रचना एकरेषीय नाही तर चक्रीय आहे. सर्व काही पुनर्निर्माण होत असते, कायापालटाची एक निरंतर प्रक्रिया. तरीपण, मानवी मन या निरंतर चक्राहून मागे पडते आहे. नवरात्री हा मन पुन्हा सोत्राकडे मागे नेण्याचा उत्सव आहे.
शक्ती माता ही फक्त बुद्धीदेवता नाही तर भ्रांतीदेवता म्हणूनही ओळखली जाते; ती नुसतीच लक्ष्मीदेवता नाही तर क्षुधादेवता (भूक) आणि तृष्णादेवता (तहान) पण आहे. सृष्टीच्या या रचनेत शक्तीचे हे रूप जो जाणतो तो सखोल समाधी अवस्थेत जातो. हे जुन्या पश्चिमेतील धार्मिक संघर्षाला उत्तर आहे.  ज्ञानाद्वारे, निष्काम कर्माद्वारे आणि समर्पणाद्वारे अद्द्वैत सिद्धी प्राप्त केली जाऊ शकते. 
काली ही प्रकृतीची सगळ्यात भयानक अभिव्यक्ती आहे. प्रकृती हे सुंदरतेचे प्रतिक आहे, तरीपण त्याचं भयंकर स्वरूप आहे. दोन विरुद्ध गोष्टींचा स्वीकार करताना मनात पूर्ण स्वीकृती येते आणि मन शांत ठेवते.  

नवरात्री हा वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करणारा सण म्हणून जरी साजरा केला जात असला तरी, मूळ लढाई ही वाईट आणि चांगल्याची नाही. वैदिक दृष्टीकोनातून बघितले गेले तर, संपूर्ण सत्याचा स्पष्ट द्वंद्वावर विजय आहे. अष्टावक्राच्या शब्दात सांगायचे तर एका छोट्या लाटेचा समुद्रापासून आपली ओळख लपवण्याचा हा प्रयत्न आहे, पण काही फायदा नाही. 

तीन बीजभूत गुणांना आपल्या भव्य ब्रम्हांडाची स्त्री शक्ती मानले जाते. नवरात्री दरम्यान देवीची पूजा केल्याने, तीन गुणांचे संतुलन होते आणि वातावरणातील सत्व वाढते. 

हा आत नेणारा प्रवास आपल्या नकारात्मक कर्मांना नष्ट करतो. नवरात्री हा उत्सव आहे भाव आणि प्राणाचा जो एकटाच महिषासुर (जडता), शुंभ - निशुम्भ (गर्व आणि लज्जा) आणि मधु - कैटभ (तृष्णा आणि घृणा चे तीव्र रूप) यांना नष्ट करू शकतो. ते पूर्णपणे एकमेकांच्या विरुद्ध असले तरी परस्परपूरक आहेत. जडता, आत खोलवर असलेली नकारात्मकता, आग्रह (रक्ताबीजासुर), अनुचित तर्क (चंड - मुंड), आणि नीट पाहू न शकणारी दृष्टी (धूम्रलोचन) या सगळ्यावर मात करायला जीवन शक्ती उर्जा, प्राण आणि शक्ती वाढवायला लागेल. 

साधक उपवास, प्रार्थना, मौन आणि ध्यान या द्वारे खऱ्या स्रोत्राकडे परतू शकतो. रात्र म्हणतात कारण ती नवीन जीवन आणते. हे आपल्या अ अस्तित्वाच्या तीन स्तरावर समाधान देते - शारीरिक, सूक्ष्म,आणि कारण. उपवास शरीरातील दुषित द्रव्य काढतो, मौन वाचा शुद्ध करतो आणि अशांत मनाला शांत करतो, आणि ध्यान स्वत्वात नेतो.

ज्या तीन बीजभूत गुणांपासून ब्रह्मांड बनले आहे त्या गुणांना वाढवण्यासाठी नवरात्रीचे नऊ दिवस संधी आहे. जरी आपल्या आयुष्यावर तीन गुणांचा प्रभाव आहे, तरी आपण त्यांवर क्वचितच ओळखतो किंवा विचार करतो. नवरात्रीचे पहिले तीन दिवस तमोगुण म्हणून  संबोधले जातात, पुढचे तीन दिवस रजोगुण आणि शेवटचे तीन दिवस सत्त्वगुण. आपली चेतना तमो आणि रजो गुणा द्वारे  प्रवास करते आणि शेवटच्या तीन दिवसात सत्वगुणाद्वारे  बहरते. जेव्हा हे सत्व आयुष्यात वाढते तेंव्हा साहजिकच विजय होतो. दहाव्या दिवशी ह्या ज्ञानाचे सार विजयादशमी म्हणून सन्मानिले जाते आणि साजरी केले जाते.

जरी संसाराचे सूक्ष्म दर्शन या विश्वातच आहे, त्याचा मानलेला वेगळेपणा हाच वादाचे कारण आहे. ज्ञानी व्यक्तीसाठी, पूर्ण जगताची निर्मिती सजीव आहे आणि ज्या प्रमाणे लहान मुले सगळ्यात जीवन बघतात त्याचप्रमाणे तो सगळ्यातच जीवन बघतो. पृथ्वी माता किंवा शुद्ध चेतना यांनीच स्वतः सगळी  रूपे आणि सगळी नावे व्याप्त केली आहेत. प्रत्येक रुपात आणि नावात देवत्व ओळखणे हाच नवरात्रीचा उत्सव आहे. म्हणूनच, जीव आणि प्रकृतीच्या सगळ्या पैलूंचा सन्मान करणाऱ्या विशेष पूजा शेवटच्या तीन दिवसात साकारल्या जातात.

The Art of living

" मान्य करा की तुम्ही आपल्या क्षमतांपासून अनभिज्ञ आहात"

बुधवार, ऑगस्ट, २०१०
प्रश्न : आपण आपल्या सत्संगात आलेल्या लोकांना काय म्हणायचे जे विविध गुरूंचे ज्ञान घेऊन येतात?
श्री श्री रविशंकर: ऐका आणि जाऊ द्या. त्यांच्या सोबत चर्चा करण्यात गुंतू नका. प्रत्येकाला आपले मत मांडू  द्या. महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतः चिंतन करणे.


प्रश्न : काम आणि आयुष्य यात संतुलन कसे साधायचे?
श्री श्री रविशंकर: तुम्ही सायकलवर कसे संतुलन साधता? तिथे "कसे" हे नसते. तुम्ही फक्त करा.


प्रश्न : मी ध्यानाचा "सगळे  ठीक आहे" हा अनुभव, ध्यानातून मिळणारी शांती कशी टिकवून ठेवू शकतो?
श्री श्री रविशंकर: तुम्ही रात्री कसे झोपता? तुम्ही सगळा सोडून देता.तुम्ही जेव्हा उठता तेव्हा ताजे तवाने असता आणि तुमच्यात परिस्थितीचा सामना करण्यासाठी उर्जा आणि गतिशीलता येते, तसेच ध्यानासोबत पण आहे. तुम्ही जर ध्यान केले नाही तर याच्या विपरीत अनुभव येईल.


प्रश्न : मी जेंव्हा अडचणीतून जातो तेंव्हा मी परिस्थितीचा शिकार होत आहे या भावनेच्या चक्रातून कसे बाहेर पडू? 
श्री श्री रविशंकर: जेंव्हा तुम्हाला हे लक्षात आले त्याच क्षणी तुम्ही त्या चक्रातून बाहेर पडला आहात.  तुम्हाला हे जाणवत आहे की हे मनाचे खेळ आहेत आणि हे पुन्हा पुन्हा होत राहणार आहे. ही जाणीव तुम्हाला काळासोबत येईल.आणि हे जेव्हा होईल, तेव्हा आनंदी आणि कृतज्ञ राहा. कल्पना करा तुम्ही ५ -१० वर्षांपूर्वी कुठे होता. तुम्ही किती बदलला? तेव्हा पासून आता परिस्थिती किती बरी झाली आहे. तुमचं लक्ष यावर केंद्रित करा. जितके आपण कृतज्ञ होऊ तितकी आयुष्यात कृपा राहील.
मजेची पहिली पायरी ही आराम करणे आहे. तुम्हाला उद्याची चिंता आणि महत्वाकांक्षा थकवत आहेत. कालचा क्रोध आणि घृणा मनात अडकून राहत आहेत. त्याच प्रकारे बेचैनी उत्साह कमी करते. दीर्घ विश्रांतीमध्ये तुम्हाला सगळे मजेशीर वाटत राहील.


प्रश्न : मी जास्त शिस्तबद्ध कसा होऊ शकतो?
श्री श्री रविशंकर: तुम्हाला शिस्तबद्ध का व्हायचे आहे? तुम्ही आनंदी राहाल? हे तुमची योग्यता वाढवेल? तुमचे आकारात राहण्याचे प्रेम किंवा आजारी पडण्याची भीती तुम्हाला शिस्तबद्ध  ठेवेल. प्रेम, भीती, आणि लोभ शिस्त  लावतो. जर कुणी तुम्हाला म्हणाले की आयुष्यात शिस्तीत राहण्यासाठी तुम्हाला १ करोड मिळतील तर तुम्ही तसे नक्की कराल.


प्रश्न : मी तुमची उपस्थिती आपल्या दैनंदिन आयुष्यात कशी अनुभवू शकतो?
श्री श्री रविशंकर:तुम्ही अगोदरच अनुभवता आहे ना?


प्रश्न : आपल्या प्रिय व्यक्तीच्या जाण्याचे नुकसान कसे सहन करावे?
श्री श्री रविशंकर: जेव्हा प्रिय व्यक्ती  जाते तेव्हा सहन करा. त्या क्षणासोबत राहा. कालच तुम्हाला त्या यातनांमधून बाहेर काढेल. त्यासाठी तुम्ही काही "करू" शकत नाही. ज्ञानात राहा.


प्रश्न: कलेचा काही उच्च उद्देश आहे का?
श्री श्री रविशंकर: कलेला काही उद्देश नाही. ती आनंदाची अभिव्यक्ती आहे. दर्शकासाठी कला सांत्वना आणि आराम देते. निर्मात्यासाठी ही एक अभिव्यक्ती आहे.


प्रश्न: मला जेव्हा काही मिळवायचे असते तेंव्हा मला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मी काय करू?
श्री श्री रविशंकर: जे तुमच्या मनात असते तेच प्रकट होते. तुम्ही स्वतःला काहीही छाप देऊ नका.त्याची गरज नाही. मान्य करा की तुम्ही स्वतःच्या गुणांना ओळखत नाही. तुम्ही नेहमी अडचणीत असता असा विचार करत असाल, पण असा विचार करणे तुम्हाला नकारात्मक दिशेकडे घेऊन जाइल. फक्त हे जाणून घ्या की तुम्हाला जे हवे आहे ते नक्की होईल.


प्रश्न: कष्ट आणि क्रोध या पासून कसे मुक्त व्हावे?
श्री श्री रविशंकर : सुदर्शन क्रिया करा, श्वास घ्या, ध्यान करा, गा. आयुष्यात थांबण्यामध्ये काही अर्थ नाही, चालत राहा. काल काय घडले यासाठी आजचा दिवस वाया घालवू नका. जागे व्हा आणि म्हणा, " या सगळ्यावर मात  करण्यासाठी मी शूर आणि धैर्यवान आहे." दुसर्यांच्या क्रोधासाठी, त्यांना शांत करायला सगळ्या  युक्त्या करायला हव्यात. मग देवावर सोडा. शिकवा आणि दुर्लक्ष करा. त्यांना काही वेळ द्या. क्षमा मग आणि लोक घृणा करणार  नाही. ते करतात ते केवळ अजाणतेपणी.


प्रश्न: आपल्याला गरजेपेक्षा जास्त मिळालेले आहे असे जाणवले तर कसे होईल आणि ते गमावण्याची भीती वाटत असेल तर?
श्री श्री रविशंकर : कृतज्ञ आणि प्रार्थनेत राहा. हे जाणून घ्या की ज्याने तुम्हाला हे दिले आहे त्याला तुमची काळजी आहे आणि ते परत घेऊन नाही जाणार. सेवा करा. तुम्ही या समाजाला परत काय देउ शकता यावर तुमचे लक्ष केंद्रित करा. हे देवाला परत देण्यासारखे झाले. नकारात्मक विचारांनी असुरक्षितता, शंका मनात येतात, ओम नमः शिवायचा जप करा. तेच तुम्हाला सरळ मार्गावर ठेवेल. भूतकाळाला आपले नशीब माना आणि भविष्यकाळाला मुक्त इच्छा. जे घडायचे आहे ते घडणार आहे. आपण अगदी उलटे करतो. जे मूर्ख लोक असतात ते भूतकाळाला इच्छा समजतात आणि भविष्याला नशीब. यामुळे तुमचे वर्तमानकाळ दुखी बनते.
ओम नमःशिवाय कित्येक हजारो वर्षांपासून आहे. पाच तत्व या मंत्राने संबोधित केली जातात आणि मंत्रातला प्रत्येक स्वर त्या पाच तत्वांना संबोधतो. उदारणार्थ, ओम ही जीवन शक्ती किंवा दैवीशक्ती आहे. जपाने अंतरात्म्याला उर्जा मिळते. हे खूप शक्तिशाली आहे आणि ह्याचा जप रोज करायला हवा. हे नैराश्य दूर करते. हे करून बघा. तुम्हाला जेंव्हाही उदास वाटते तेव्हा ओम नमः शिवाय म्हणले की नकारात्मकता दूर होते.


प्रश्न:तुमचा पालकांना काय सल्ला आहे?
श्री श्री रविशंकर: घोडेस्वारी जमली पाहिजे! जेव्हा तुम्ही घोड्याच्या पाठीवर बसता, त्यासोबत पुढे जायला हव.तुम्हाला घोड्याच्या हालचाली सोबत तुम्हालाही हालचाल करावी लागते नाही तर पाठीला त्रास होतो. पालकांना घोडेस्वारी सारखीच कसरत करावी लागेल. कधी मुलांसाठी कडक व्हावे लागेल कधी सैल सोडावे लागेल. ज्याप्रमाणे लगाम कधी खेचावे लागतात कधी सोडावे लागतात त्याचप्रमाणे हे आहे. मुलांना जाणून घ्या आणि हळू हळू मार्गदर्शन करा.  कधी कधी शिस्त दाखवावी कधी कधी  मोकळीक ही द्यावी.


प्रश्न: तुम्ही मला सांगाल माझ्यासाठी योग्य व्यवसाय काय आहे?
श्री श्री रविशंकर:याची निवड मी तुमच्यावर सोडतो आणि आशीर्वाद देतो.


प्रश्न: मी आयुष्यातील नकारात्मक चाक्रांमधून कसे बाहेर पडू?
श्री श्री रविशंकर: तुम्हाला एकदा ती चक्रे लक्षात आली की तुम्ही तेंव्हाच त्यातून बाहेर पडलेले असता.


प्रश्न: तुम्ही म्हणता की निवड आमची आणि आशीर्वाद तुमचे. मला कसे समजेल की मी योग्य निवड केली आहे?
श्री श्री रविशंकर: वेळ सांगेल. पण ते आशीर्वादासोबत आले असेल तर ते जास्त चांगले असेल.


प्रश्न: मी स्वतःमध्ये शक्ती कशी शोधू?
श्री श्री रविशंकर: आराम करा आणि तुमचं मन योग्य जागी असू द्या.तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आरामाची गरज आहे. तुम्ही जर विचार केला की "मी खूप काम केले आहे" तर ते कंटाळवाणे ठरेल.फक्त जाणून घ्या की जे करण्यासाठी तुमचा जन्म झाला आहे ते करण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ आणि उर्जा मिळेल.
The Art of living

जन्माष्टमी

ओगस्ट २२, २०११  

भगवान कृष्णाचा जन्मदिवस म्हणजे जन्माष्टमी. सत्याचे दृश्य आणि अदृश्य पैलुंमधील उत्तम संतुलन म्हणजे जन्माष्टमी; दृश्य भौतिक जग आणि अदृश्य अध्यात्मिक क्षेत्र. 
कृष्णाचा अष्टमीचा जन्म अध्यात्म आणि भौतिक अशा दोन्हीवरील प्रभुत्व दाखवतो. तो एक उत्कृष्ट शिक्षक आहे आणि अध्यात्मिक प्रेरणा आहे तसेच एक हुशार राजकारणी पण आहे. एका बाजूला, तो योगेश्वर (योगाचा देव - प्रत्येक योगीला ती अवस्था हवी असते) आणि दुसऱ्या बाजूला तो एक खोडकर चोर आहे. 
कृष्णाचा आणखी एक गुण म्हणजे तो संतांपेक्षाही पवित्र आहे आणि तरीसुद्धा तेव्हडाच खोडकर व्यापारी पण आहे! त्याचा स्वभाव म्हणजे दोन टोकांमधील समतोल आहे - म्हणूनच बहुतेक कृष्णाच्या व्यक्तिमत्वाचा थांग लागू शकत नाही. बाहेरच्या जगासाठी अवधूत हा वेडेपणा आहे आणि भौतिक माणूस, राजा,  राजकारणी हे अध्यात्मिक जगासाठी वेडेपणा आहे. पण कृष्ण द्वारकाधीश आहे आणि योगेश्वर पण आहे.
कृष्णाची शिकवण आपल्याला आजच्या काळातही उपयोगी आहे म्हणजे ते तुम्हाला भौतिक जगात हरवू देणार नाही आणि पूर्णपणे विरक्तही बनवणार नाही. ते तुमच्या आयुष्याला उजाळा देते, एका थकलेल्या आणि ताणाखाली असलेल्या व्याक्तीत्वापासून ते स्व केंद्रित आणि गतिशील व्यक्तीत्वापर्यंत.  कृष्ण आपल्याला कौशल्यपूर्ण समर्पण शिकवतो. गोकुळाष्टमीचा उत्सव आपल्याला विरुद्ध पण परस्पर पूरक गोष्टी आयुष्यात घ्यायला शिकवतो आणि तुमच्या आयुष्यात त्या प्रत्यक्ष उतरवायला शिकवतो.
म्हणूनच जन्माष्टमी साजरी करण्याचा प्रामाणिक मार्ग म्हणजे की तुम्हाला दोन्ही भूमिका करायच्या आहेत हे जाणून घेणे — या ग्रहावरची एक जबाबदार व्यक्ती आणि त्याच वेळी हे समजून घेणे की तुम्ही सर्व घटनांच्या वर आहात, स्पर्श न केलेले ब्राह्मण. तुमच्या आयुष्यात थोडे अवधूत आणि थोडे सक्रीय असणे हेच जन्माष्टमी साजरी करण्यामागचे महत्व आहे.



The Art of living 

ध्यान म्हणजे मन नसणे

जुलै २९, २०११ 

 (प्रिय वाचक जुलै २९ ला गुरुजींनी दिलेले उरलेले ज्ञान तुम्हाला थोड्याच वेळात उपलब्ध करून दिले जाईल)

प्रश्न : प्रिय गुरुजी, जेंव्हा तुम्ही असे म्हणता की मी शरीरापासून वेगळा आहे ते मला समजते, पण जेंव्हा तूम्ही म्हणता की मी मनापेक्षा वेगळा आहे ते मला समजत नाही.  मी माझ्या मनापासून कसा वेगळा आहे?
श्री श्री रवि शंकर: ओकेआता तू तुझे विचार आहेस की विचार तुझे आहेत? मन म्हणजे विचार. विचार येतात आणि जातात. तर खूप विचार येतात आणि खूप विचार जातात. खूप तुम्हाला पटतात आणि खूप नाही पटत. आणि जे विचार पटतात तेच तुम्हाला काही काळाने पटत नाहीत. नाही का? तुम्ही बसा   आणि तुमचे विचार लिहून काढा. नंतर तुमच्या असे लक्षात येईल की, ' ओह, मी तोच माणूस आहे का ज्याने हा विचार केला?'  तुम्ही आश्चर्य कराल, बरोबर? तर, त्या प्रकारे तुम्ही तुमच्या विचारांपासून वेगळे आहात. विचार येतात आणि जातात पण ते तुमच्या मध्ये येतात आणि तुमच्या मधेच जातात. ते आकाशातील ढगांसारखे आहे. पण जेंव्हा खूप विचार असतात, ते इतके ढगाळ असते, तुम्हाला असे वाटते की, 'ओह, आकाश म्हणजे ढग'. पण जर तुम्हाला स्वच्छ आकाश म्हणजे माहित असेल, मोकळ्या आकाशाचे काही क्षण, तर तुम्ही पाहाल, 'ओह आकाश हे ढगांच्या पलीकडे आहे, फक्त ढग नाही' आणि तीच साधनेमधील सुंदरता आहे. अगदी पहिल्या सुदर्शन क्रियेमध्ये काय होते? अगदी पहिल्यांदा तुम्ही कशाही शिवाय काही क्षण अनुभवता. काही क्षण; त्याने तुमची ढगाळलेली सजगता जागृत केली. तुम्ही ढग म्हणजेच आकाश असा विचार करता, पण तुम्हाला छोटे भोक मिळाले, आणि तुम्ही काळ्या ढगांच्या मागचे निळे आकाश तुम्ही बघू शकलात, बरोबर? हा तुमचा अनुभव नाही का? आता तुम्ही मागे वळून बघा की पहिले शिबीर करण्याच्या आधी, पहिले ध्यान किंवा सुदर्शन क्रिया करायच्या आधी तुम्ही काय होता? तुम्ही त्या आधी काय होता? तुम्ही आता काय आहात? तुमच्यापैकी किती जण दहा वर्ष आधीच्या माणसापेक्षा खूप वेगळे आहेत? (खूप जण हात वर करतात.) पहा, हेच दाखवते की तुमचे विचार म्हणजे तुम्ही नाही. दहा वर्ष पूर्वीच्या व्यक्तीचा जो काही विचार करता ते म्हणजे फक्त विचाराचा एक गठ्ठा आहे, मन. पण तुम्हाला थोडा अवकाश मिळाला, मनाच्या बाहेर मन नसण्याचा अवकाशाची झलक मिळाली जिथे आपण आहोत ; आणि ध्यान म्हणजे मन नसणे. पण कधी कधी ढग परत येतात आणि विचार येतात आणि ते जातात आणि त्यांच्यामध्ये कौशल्याने तुम्ही स्वतःशी केंद्रित राहता.

आत्म शक्ती (स्वतःची शक्ती) ही कुठल्याही आकारात आणि रुपात खूप शक्तिशाली आहे.


बेंगलोर आश्रम जुलै ३१, २०११ 


प्रश्न: नकारात्मक विचार कसे टाळावेत?
श्री श्री रवि शंकर: नकारात्मक विचार, तुम्हाला त्यांना का टाळायचे आहे? त्यांना येऊ देत आणि जाऊ देत. टाळणे म्हणजे तुम्ही त्यांना धरून ठेवायचा प्रयत्न करत आहात. जर ते आले तर म्हणा, ' ओह, तुम्ही आलात, हाय, बाय बाय', आणि ते जातात.
 
प्रश्न: जय गुरुदेव! पिरॅमिड मध्ये ध्यान करणे इतर जागी ध्यान करण्यापेक्षा काही वेगळे आहे का?
श्री श्री र
वि शंकर: पिरॅमिड हे बाह्य वातावरण आहे. पण फक्त पिरॅमिड मधेच चांगले ध्यान होईल असे नाही! घुमटामध्ये सुद्धा चांगले ध्यान होऊ शकते आणि मोकळ्या आकाशाखाली आणखी चांगले ध्यान होऊ शकते. म्हणून तुमची आत्म शक्ती ही इतर आकार आणि रुपांपेक्षा अधिक शक्ती शाली आहे. तुम्हाला माहिती आहे, आकार आणि रूप हे प्रभावापुरते मर्यादित आहेत पण मंत्राचे आवाज त्यापेक्षा अधिक आहेत. मंत्र आकार आणि रूपापेक्षा अधिक प्रभाव टाकू शकतात आणि त्याहीपेक्षा मूक उपस्थिती महत्वाची आहे. हे सगळे जेंव्हा ध्यान असेल तेंव्हाच परिणामकारक असते.
 
प्रश्न: श्रोत्यांमधील एकानी हा प्रश्न विचारला. नीट ऐकू शकले नाही.
श्री श्री रवि शंकर: तुम्ही अध्यात्मात आहात याची तुमचे मित्र मजा उडवतात का? हो, तुम्ही फक्त हसा आणि म्हणा, ' तुम्ही किती मोठ्या गोष्टीला मुक्त आहात हे तुम्हाला माहित नाही.' त्यांना सांगा, 'तसेही तुम्ही या गोष्टी पळणार आहातच; ही फक्त वेळेची गोष्ट आहे', तुम्ही त्यांना सांगा. ' पाच वर्षांत तुम्ही या ज्ञानासाठी याल आणि आम्ही यात अग्रभागी आहोत', त्यांना सांगा,'या सगळ्याची सुरुवात करणारा मी आहे, आम्ही पहिल्यांदा चव घेतो आणि जे उरते ते तुम्ही घेता'. जर कोणी तुमची गम्मत करत असेल, तुम्ही फक्त हसा, तुमचे हास्य हरवू नका. त्यांना सांगा थांबा, थांबा, हा फक्त काही वर्षांचा प्रश्न आहे; तुम्ही पण हेच कराल. त्यांना सांगा की तुम्हाला उष्टे खायची सवय आहे; त्यांना सांगा, ' मी चांगले अन्न घेत आहे
The Art of living

आयुष्य आणि गुरु अविभाज्य आहेत



गुरुजींचे गुरु पौर्णिमेच्या दिवसाचे  प्रवचन 
मोन्त्रिअल, १५ जुलै  २०११ : 

आयुष्य आणि गुरु अविभाज्य आहेत. तुमचे आयुष्य गुरु तत्व आहे. तुमच्या आयुष्यावर एक प्रकाश झोत टाका. ज्ञान जे तुमच्या आयुष्यातून उजळेल - तुम्ही आदर दिला पाहिजे, आणि त्यालाच गुरूचा आदर म्हणतात.  हे पहा, आयुष्याने तुम्हाला इतक्या गोष्टी शिकवल्या आहेत - तुम्ही काय चुकीचे केले आणि काय बरोबर केले, आणि तुम्ही तुमच्या आयुष्यावर प्रकाश टाकला नाही, तर गुरु तिथे नसतो.  तुमच्या आयुष्याकडे बघा आणि आयुष्याने दिलेल्या ज्ञानाचा आदर करा. त्यालाच गुरूचा आदर म्हणतात. तुम्ही माझ्याबरोबर आहात का? हे काहीतरी महत्वाचे आहे.

आयुष्य आणि गुरु अविभाज्य आहेत. तुम्ही आयुष्यावर प्रकाश टाकता, आणि जेंव्हा ज्ञान असते, ज्ञानाचा आदर करा. ज्ञान हेच गुरुतत्त्व आहे. तर, तुमच्यामध्ये गुरु तत्व आहे, ज्ञान आहे. प्रत्येकामध्ये ज्ञान आहे.  त्यावर प्रकाश टाका. आयुष्यात ज्ञान म्हणजे पाहत आहे; ज्ञान आले आहे;ज्ञानाचा आदर करा. आपण जेंव्हा ज्ञानाचा आदर करणे थांबवतो तेंव्हा अंधार येतो, तेंव्हा  पौर्णिमेचा चंद्र नसतो, तिथे चंद्रच नसतो. चंद्र म्हणजे मन आणि आणि जेंव्हा तो ज्ञानाने पूर्ण भरलेला असतो तेंव्हा गुरु पौर्णिमा असते. त्यामुळे जेंव्हा तुम्ही आयुष्याने काय शिकवले त्याचा आदर केलात तर प्रत्येक दिवस तुमच्यासाठी गुरु पौर्णिमा असू शकते.

बऱ्याच वेळा आपण आपले तोंड दुसरीकडे फिरवतो, डोळे बंद करतो आणि आपल्या इच्छा गिळून टाकतो. मला हे, हे, हे आणि हे हवे आहे - ज्ञानाचा मान न ठेवता आपण इच्छा गिळून टाकतो.  हे पहा, देणाऱ्याने तसेही दिले आहे, त्याने तुम्हाला खूप काही दिले आहे. पहिली गोष्ट ही की ज्ञानाचा आदर ठेवा, दुसरी गोष्ट अशी की या गुरु पौर्णिमेला तुम्हाला दिली गेलेली भेट वापरा.  तुम्हाला खूप आशीर्वाद दिले गेले आहेत. तुम्हाला जे आशीर्वाद मिळाले आहेत त्यांचा वापर करा आणि तुम्हाला अजून मिळेल. त्देणारा न दमात देत आहे आणि तुमच्याकडून काही ओळख पण नकोय आणि तुम्हाला असे भासवतो की ते तुमचेच आहे.  देणारा देतो आणि तुम्हाला अशी भावना देतो की ते तुम्ही मिळवले आहे. देणाऱ्याला अंत नाही, आणि देण्याने तो दमणार पण नाही, देणारा देतो;  अनंत तुम्हाला भरपूर देत राहतो, आणि आपल्याला जे मिळाले आहे ते आपण चांगल्यासाठी वापरले पाहिजे.

तुम्हाला एक चांगले भाषण दिले आहे; ते चांगल्यासाठी वापरा. तुमचे भाषण तक्रारींसाठी, आरोपांसाठी, वाईट गोष्टी बोलण्यासाठी वापरू नका. तुम्हाला उत्तम बुद्धी दिली आहे, बुद्धी वापरा. लोक बुद्धी वापरण्यामध्ये इतका कंजूसपणा का करतात ते मला कळत नाही.   तुम्हाला वाईन माहित आहे, ती जेवढी जुनी होईल तेवढी चांगली आणि महाग होत जाते. मी असे  ऐकले आहे, वाईन कधी घेतली नाही. त्याच प्रमाणे बुद्धी वापरा ती चांगली होत जाईल. आपण ते जेव्हडे चांगल्यासाठी वापरू, तेव्हडी ती जास्त तरतरीत होत जाईल. काळजी करू नका. तुम्ही असा विचार करू नका की बुद्धी वापरल्याने कमी होईल. ती न वापरल्याने, ती कमी होईल. तुमची बुद्धी चांगल्यासाठी वापरा. तुमचा आवाज सुस्वर असेल, तर चांगल्यासाठी वापरा. तुमच्या शरीरात ताकद आहे, सेवा करा.  तर, आपल्याला जे काही दिले गेले आहे, ते चांगल्यासाठी वापरा. जेंव्हा मी चांगल्या वापरासाठी म्हणतो, तेंव्हा ते स्वतःसाठी नाही तर समाजासाठी, जगासाठी वापरा. देवत्व जगात राहते. तर जगाची सेवा करणे म्हणजे देवत्वाची पूजा आहे.

ज्ञानाचा आदर केल्याने आयुष्याचा स्तर उंचावतो. आणि तुम्हाला हे दोन जेंव्हा लक्षात येईल तेंव्हा तुम्ही कृतज्ञ होता आणि जेंव्हा तुम्ही कृतज्ञ होता, भावनांनी पूर्ण, तेंव्हा ते अनंताला भावते. एवढेच  !

हे जाणून घ्या की प्रत्येकामध्ये गुरु आहे आणि ज्ञानाचा प्रकाश देतो आहे, तिथे आरती करा, तिथे आत असलेल्या गुरु साथी. आरती करणे म्हणजे काय? परमानंद, अशा परमानंदामध्ये ज्ञानाबरोबर जाणे, आयुष्याने आपल्याला काय दिले आहे त्यावर प्रकाश टाकणे. सत्य काय आणि असत्य काय? बरोबर काय आणि चूक काय? आपण जे बरोबर नाही ते का निवडले, ते करायला आपल्याला कशाने भाग पडले आणि बरोबर काय आणि चूक काय? हे तुम्हाला कुणाला विचारायला नको. तुमच्या आतले काहीतरी तुम्हाला सांगते. हो की नाही? आत काहीतरी टोचते, हे चुकीचे आहे. त्याचा आदर करा, आदर करा! तुम्ही ऐकत आहात? सगळे?

हे खूप सोप्पे आहे, तरी गहन आहे.

तुम्हाला माहिती आहे, धार्मिक असणे आणि धार्मिकता न दाखवणे ही एक सुंदर गोष्ट आहे. जर कोणी तुम्हाला भेटवस्तू दिली आणि भेटवस्तू दिल्याची भावना दिली, तर ती भेट आहे? बघ, मी तुला भेट देतो आहे, मी तुला भेट देतो आहे. दहा वेळा कोणीतरी सांगते आणि हातात चोकलेट देते, तुम्ही काय म्हणता? तुझ्याकडेच ठेव, मला नको. त्याचप्रमाणे जेंव्हा धार्मिक असूनही आपण धार्मिकता दाखवत नाही; मी बरोबर आहे, मी बरोबर आहे. धार्मिकता दाखवणे राग आणते, निराशा आणते आणि या ना त्या दृष्टीने चुकीचे ठरवते. एका दृष्टीने तुम्ही बरोबर असाल. दुसऱ्या दृष्टीने तुम्ही चूक असता. तुम्ही माझ्याबरोबर  आहात ना? याचा काही अर्थ आहे का? बरोबर असणे आणि धार्मिकता न दाखवणे, शुद्ध असणे आणि त्याचा अभिमान नसणे, दयाळू असणे आणि त्याचे प्रदर्शन न मांडणे - मी काय म्हणत आहे ते तुम्हाला दिसते आहे का?  हुशार असणे आणि ' पहा मी किती हुशार आहे' असा बाजा न वाजवणे - त्यातला रस निघून जातो, बरोबर, तुम्ही काय म्हणता? हुशार असणे आणि स्वाभाविक असणे, अगदी स्वाभाविक, साधे, साधेपणा; कधी कधी  मूर्ख बनायला पण तयार असणे. हे खूप सुंदर ज्ञान आहे. तुमचे आयुष्यच हे तुमच्याकडे आणते आणि तुमच्या आयुष्यात दाखवते. तुमच्या आयुष्यावर चिंतन करा, परत परत आणि परत आणि परत आणि परत. खूप छान!

खोलीच्या शेवटी लांब इकडे तिकडे करणाऱ्या लोकांकडे पाहून, श्री श्री म्हणाले:

काही लोक असतात की जे सारखे वर खाली जात असतात, त्यांना माहित नसते की कुठे जायचे किंवा काय करायचे. तिथेच आपल्याला मार्गदर्शक लागतो, एक गुरु, काही लोक त्याच रस्त्यावरून वर खाली करत असतात, दार कुठे आहे हे माहित नसते , आणि कुठून आत जायचे ते माहित नसते. पहा, आजूबाजूच्या लहान लहान गोष्टी नीट पहिल्याने सुद्धा किती टरी शिकायला मिळते.

एका संताबद्दल एक गोष्ट आहे; मला वाटते संत रामदासांची . ते पहाटे एका गावातून चालत निघाले होते आणि एक बाई, तिच्या झोपडीच्या बाहेर समोर झाडत होती, आणि ती म्हणाली, 'राम उठ, अजून किती वेळ झोपणार आहेस?', तिने तिचा आत झोपलेल्या मुलाला हाक मारली. एक तरुण मुलगा, ज्याचे पण नाव राम होते. जेंव्हा त्या संताने ते ऐकले , ज्याचे नाव राम होते, तो लगेच म्हणाला, ' अरे, कोणीतरी मला जागे व्हायला सांगत आहे'. असे म्हणतात की त्याच क्षणी तो खरोखरच जागा झाला. म्हणाला, 'वाह!', खरच तो इतका उत्साहित झाला. ते म्हणाले, त्यानंतर मी कधी झोपलोच नाही, मी इतका तरतरीत झालो, माझे मन सारखे भूतकाळ आणि भविष्यकाळात जाऊन उसळत होते'.

त्याला कोणीही सांगितले नाही, की तू हे केले पाहिजेस, तू ते केले पाहिजेस आणि मान तुला असे फिरवू शकते. आपले मान त्याची स्वतःची माया बनवते, स्वतःचे जग बनवते, त्याचा स्वतःचा बुडबुडा आणि आपण स्वतःच्याच बुडबुड्यात फिरत राहतो. आपण सगळे जग आपल्याच चष्म्यातून पाहत असतो आणि सगळे तसेच मनात असतो. याला विपर्याय म्हणतात.

विपर्याय म्हणजे रंगवलेली दृष्टी, बरोबर नसलेली दृष्टी. तर गुरु तत्व किंवा ज्ञान असा प्रकाश आहे की ज्याने तुम्ही खरच जागे होता अनो पाहता - ओह, हे असेच आहे!

मला एक सांगा, तुमच्यापैकी किती जणांना असे वाटले की तुमची मते चुकलेली आहे?

पहा, बऱ्याच वेळा तुमचे निर्णय चुकले आहेत पण तुम्ही जेंव्हा निर्णयात होता, तुम्ही विचार केलात की या गोष्टी अशाच आहेत - तो बुड बुडा आहे ज्यात आपण असतो, गुरु तत्व म्हणजे बुड बुड्यातून बाहेर येणे, स्वतःच्या आयुष्यावर प्रकाश टाकणे,  गुरु तत्व म्हणजे त्या बुड बुड्या मधून बाहेर येणे, स्वतःच्या आयुष्यावर प्रकाश टाकणे, आयुष्याने दिलेल्या ज्ञानावर प्रकाश टाकणे. हे पहा. मग आपण पाहतो की आपले निर्णय अधिकाधिक बरोबर होत जातात. आता ९०% निर्णय चुकीचे असतील आणि १०% बरोर, हे खरेतर उलटे झाले पाहिजे. ९०% बरोबर आणि १०% चूक, २% किंवा ३% किंवा १०% चुकणे ठीक आहे.
१. तुमचे स्वतःचे आयुष्य तुमचा गुरु आहे.
२. आयुष्य आणि गुरु अविभाज्य आहेत. हे लहान मुलांच्या शाळेतील शिक्षकांसारखे नाही- तुम्ही काहीतरी शिकता आणि जाता आणि बस्स, पण आयुष्य आणि गुरु अविभाज्य आहे.
३. तुमच्या आयुष्यातील ज्ञान तुमचा गुरु आहे. आयुष्यावर प्रकाश टाका आणि त्यानेच ज्ञान येते.
४.देणाऱ्याने तुम्हाला भरपूर दिले आहे आणि देत आहे, त्याचा चांगला वापर करा. आपण आपल्या क्षमतांचा जेव्हडा चांगला वापर करू तेवढे जास्त आपल्याला मिळत जाते.
५. ज्ञानाचा आदर करा. तुम्हाला माहिती आहे, ज्ञान, त्याचा आदर करा कारण गुरु आणि ज्ञान अविभाज्य आहेत आणि आयुष्य आणि ज्ञान अविभाज्य असावेत. कधी कधी आपण आपले आयुष्य ज्ञानाशिवाय घालवतो. मग तिथे गुरु तत्व नसते. तुम्ही गुरूचा आदर करत नाही. समजले. ते सदगुरू आहे.
६. धार्मिक राहा आणि धार्मिक पणा दाखवू नका. धार्मिकपणा दाखवणे तुम्हाला या ना त्या मार्गाने चूक ठरवतो आणि राग आणि निराशा आणतो. तसेच चांगले असण्याचे पण आहे. जर तुम्ही असे म्हणाल की मी चांगला आहे तर तुम्ही असा विचार करता की बाकीचे वाईट आहेत. ‘मी खूप चांगला आहे’ ते दु:खी  भाव आणते. जे लोक स्वतः खूप चांगले आहेत असा विचार करतात ते स्वतः वाईट आहे असा विचार करणार्यांपेक्षा आनंदी असतात. जे लोक स्वतःला वाईट समजतात, ते काळजी करत नाहीत, पण जर कोणी म्हणेल की ' मी चांगला आहे', तर ते विचार करतात, ' हे माझ्याबरोबर काय होत आहे'. तर मी जर असा विचार केला, ' मी खूप चांगली आहे', माझा चांगुलपणा दाखवणे मला दु:खी बनवू शकते. माझा धार्मिकपणा दाखवणे मला रागिट बनवते. चांगले राहा आणि चांगुलपणा दाखवू नका. इतरांना त्याबद्दल बोलू देत; तुम्ही स्वतःच स्वतःचा बाजा वाजवू नका. दयाळू राहा पण दयाळूपणा दाखवू नका.

आपल्याला हेच करायचे आहे - परत आणि परत परत या गोष्टी गोळा करायच्या आहेत, आणि आपल्या बुद्धीने परत परत शोषून घ्यायचे आहे. हाच सत्संग आहे. सत्संग म्हणजे सत्याबरोबर असणे, हुशारी बरोबर असणे, तुमच्या आत असलेल्या ज्ञानाबरोबर असणे. तुमच्या आतील सत्याबरोबर हात मिळावा, समजले?

देणारा देऊन दमला नाही. तो देऊन कधी दमात नाही आणि ते तुमचेच आहे अशी भावना तुम्हाला देतो. तो दयाळूपणे तुम्हाला देत आहे आणि तुम्हाला त्याचा अभिमान वाटेल अशी भावना देत आहे, ' अरे पहा, हे माझे आहे'. खरेतर, तुमचे काहीच नाही. पण देणारा असा देतो की तुम्हाला घेतल्यासारखे वाटत पण नाही. काय? देणारा असे देतो की ते तुमचेच आहे असे तुम्हाला वाटते, तुम्ही घेतले पण नाही, तोच मोठेपणा आहे आणि तीच सुंदरता आहे.

त्याचप्रमाणे, त्या बाईचे स्वतःच्या मुलाला उद्देशून ओरडणे त्या संताला जागे करू शकले आणि आत्मसाक्षात्कार होऊ शकला, तेच होते - बाई म्हणाली: ' राम तू किती उशीरपर्यंत झोपणार आहेस, जागा हो. कधीपर्यंत झोपणार आहेस?', उठ आणि तिथूनच रामदास स्वामींचा प्रवास सुरु झाला. तुम्ही जागे होण्यासाठी निसर्ग तुम्हाला खूप साऱ्या संधी देत आहे, तुम्ही कधीपर्यंत झोपणार आहात, तुम्ही तुमचे मन कधीपर्यंत  वापरत बसणार आहात का, का, का, का. तक्रार करणारे, रडणारे ओरडणारे मन, जागे व्हा, आयुष्य खूप कमी आहे. या कमी वेळात आयुष्याचा मन ठेवा! ते इतके अनमोल आहे. तुमची कौशल्ये आणि संसाधने , जी तुमच्या दाराशी आली आहेत यांचा चांगला वापर करा. तुमच्याकडे जे आहे त्याचा चांगला वापर करा, तुमचा आवाज, तुमची बुद्धी. कुणी कौतुक करो अथवा ना करो, तुम्ही गा.