प्रत्येकाला योगदान देण्याची संधी दिली गेली पाहिजे


बंगलोर आश्रम, फेब. ०९ 

श्री श्री रवी शंकर आश्रमात संध्याकाळी ८:३० वाजता विशालाक्षी मंडपमध्येच सत्संग साठी  आले. वेलान्गांनी या तमिळ नाडूतील एका छोट्या गावाला भेट देऊन आले होते. इंडिअन प्रिस्त कोन्ग्रेस च्या १००० रोमन कॅथोलिक धर्मगुरूंशी संवाद साधतानाच्या अनुभवाबद्दल बोलत होते.(विस्डम ब्लोग वर पत्ता दिलेला आहे) तेंव्हा एक छोटी मुलगी उठली आणि श्री श्री ना म्हणाली की तिच्या गावात आर्ट ऑफ लिविंग चे केंद्र नाही, त्याचमुळे आर्ट ऑफ लिविंगचे कार्यक्रम होत नाहीत. हे सांगितल्यावर टी रडायला लागली. त्यांनी तिला आश्वासन दिले की लौकरच तिथे केंद्र सुरु होईल. त्या मुलीची आई उभी राहिली आणि म्हणाली " आमच्याकडे जे आहे त्यातून एक जागा खरेदी करायची आहे जेणेकरून तेथे आर्ट ऑफ लिव्हिंगचे केंद्र उभे करता येईल.
ते म्हणाले " तुम्ही भावनिक होऊन जे आहे ते देऊ शकत नाही, कारण मी ते तसे घेणार नाहीit . या केंद्रासाठी खूप लोकांचे थोडे थोडे योगदान पाहिजे. पूर्वीच्या बऱ्याच लोकांनी हे सांगितले आहे. सुरुवातीला मी जेंव्हा केनडा ला गेलो तेंव्हा तिथे केंद्र नव्हते, एक माणूस माझ्याकडे एका आणि म्हणाला " श्री श्री, माझे संपूर्ण आयुष्य बदलले आहे. माझ्याकडे १५००० डॉलर आहेत आणि मला हे सगळे वापरून आर्ट ऑफ लिव्हिंग चे केंद्र उभे करायचे आहे." मी त्याला नकार दिला आणि म्हणालो, " मला आर्ट ऑफ लिव्हिंग चा आश्रम उभारायची काहीही घाई नाही. जर तुझा आग्रहाच असेल तर १००० डॉलर दे आणि जर अजूनही काही द्यायचे असेल तर, २००० डॉलर दे पण त्यापेक्षा जास्त नाही. प्रत्येकाला योगदान द्यायची संधी दिली पाहिजे.

ज्या क्षणी तुमचा केंद्रस्थानी याल, तुम्हाला सगळीकडेच देवत्व दिसेल


कोलकाता  (भारत), फेब. १२
शिव रात्रीला रुद्र पूजेचा आधी श्री श्री रवी शंकर शिव आणि शिवरात्रीचा खऱ्या अर्थाबद्दल बोलले. 
आपण शिव तत्वाबद्दल थोडेसमजून घेऊयात. अगदी थोडेसेच कळू शकते.  बुद्धी संतुष्ट आणि आतील चेतना जागृत असली पाहिजे. संपूर्ण  समाधानासाठी वैज्ञानिकता आणि  अध्यात्मिक ज्ञान या दोन्हीची गरज असते. देवत्व शोधण्यासाठी खूप लांब..तीर्थयात्रेला जायची गरज नसते. तुम्ही जिथे आहात तिथे तुम्ही देव पाहू शकला नाहीत तर तुम्हाला इतर कुठेही देव दिसणार नाही. जिथे मन लय पावेते तेथे शिव आहे. जिथे आहात तिथे संपूर्ण राहा. ज्या क्षणी तुम्ही तिथे असता, स्व केंद्रित असता, तिथेच तुम्हाला सगळीकडे देवत्व दिसते. हे ध्यान आहे. भगवान शिव च्या अनेक नावापैकी एक नाव आहे विरुपाक्ष - म्हणजे ज्याला आकार तर नाही पण तो पाहू शकतो. सगळीकडे हवा आहे हे आपल्याला माहित आहे आणि आपण ती आपण अनुभवू  शकतो. पण जर हवासुद्धा तुम्हाला अनुभवू शकली तर काय होईल? आपल्या सभोवताली अवकाश आहे, आपल्याला कळते. पण जर अवकाश सुद्धा आपल्याला ओळखायला लागले तर? असे होते. फक्त आपल्याला माहित नाही. वैज्ञानिकांना हे माहित आहे आणि ते त्याला सापेक्षतेचा सिद्धांत असे म्हणतात. जो पाहतो आणि जे पाहतो त्या दोघांवरही परिणाम होतो.  देवत्व तुमचा चहुबाजुना आहे आणि ते तुम्हाला पाहत आहे.  त्याला आकार नाही.  ते आकार विरहित अस्तित्व आणि लक्ष्य आहे.  तोच द्रष्टा, दृष्टी आणि दृश्य आहे. हे आकार विरहित देवत्व म्हणजेच शिवा. फक्त जागरूक होऊन या शिव तत्वाचा अनुभव घेणे म्हणजेच शिव रात्री.


बऱ्याच वेळा उत्सव साजरा करताना जागरुकता नसते. उत्सव साजरा करत असताना गाढ विश्रांती घेणे आणि जागरूक राहणे म्हाजेच शिव रात्री. जेन्वा तुमचा समोर काही अडचण येते तेंव्हा तुम्ही जागरूक असता. जेंव्हा सर्वकाही व्यवस्थित असते, तेंव्हा आपण निवांत असतो; शिव रात्रीला आपण जागरूक राहून विश्रांती घेतो. असे म्हणतात की जेंव्हा बाकी सगळे झोपलेले असतात तेंव्हा योगी जागा असतो. एका योगी पुरुषासाठी प्रत्येक दिवस हा शिव रात्री सारखा असतो. भगवान शिवाबद्दल आदी शंकराचार्यानी एक कविता लिहिली आहे. (श्री श्री त्या कवितेतील काही ओळी म्हणतात)

आद्यंतहीनम - असा की ज्याला शेवट आणि सुरुवात नाही. सर्वदा - तो भोलेनाथ आहे ( सगळ्याचा निरागस राजा) जो सगळीकडे सगळ्या वेळी आहे. आपल्याला असे वाटते की भगवान शिवा म्हणजे तो कुठेतरी दुसरीकडे  गळ्यात साप घालून बसला आहे, शिवा तो आहे की ज्याचात सगळ्यांनी जन्म घेतला आहे, जो सगळ्यांना या क्षणी समेऊन घेतो. जे दिसते ते सगळे त्याचेच रूप आहे.
He permeates the entire creation. तो अजन्म आहे आणि कधी मृत्यू होत नाही.He is eternal.
तो चेतनेचा चौथे रूप आहे, तुर्यावस्था, ध्यानस्थ  अवस्था, की जे जागे होण्याच्या, गाढ झोपेच्या आणि स्वप्नावास्थेच्या पलीकडे आहे.


तो अद्वैत चेतना आहे की जे सगळीकडे आहे. म्हणून शिव पूजा करण्यासाठी तुम्ही स्वतःच शिवा मध्ये विलीन झाले पाहिजे. शिव बनून शिवा ची पूजा केली पाहिजे. चिदानंद रुप - फक्त आनंद रुपी अशी चेतना आहे.
तपो योग गम्य - जो ताप आणि योगाच्या मदतीने जाणून घेता येईल. वेद मधील माहितीचा मदतीने शिव तत्वाचा अनुभव घेता येऊ शकतो. शिवोहम  (मी शिव आहे ), शिवा केवलोहम (फक्त शिवाच आहे )हि स्थिती मिळवता येते. शिवरात्री हा आनद आणि समाधान अनुभव करायचा दिवस आहे.योग शिवाय शिवाचा अनुभव होऊ शकत नाही. योग म्हणजे फक्त आसने नव्हेत तर शिव तत्वाचा अनुभव जो ध्यान, प्राणायाम बरोबर येतो. जेंव्हा ते आतून "वाव" असा आनंद  देते.

शंभो हा शब्द पण तेथूनच उगम पावला आहे - देवत्व किती सुंदर आहे ते जाणून घेणे, निर्मिती आणि स्वत्व! सर्व निर्मितींमध्ये एकाच चेतना असणे हा एक चमत्कारच आहे.  याचा पेक्षा मोठा चमत्कार की असू शकतो. एकच अनेक कसे असू शकतो? हि शिवरात्रीची अनेकातून एका कडे जाण्याची रूढी एकमेव आहे. ध्यान आणि योग हे त्यासाठी जरुरी आहे. ध्यानाशिवाय मन कधीच शांत होऊ शकत नाही. शिवरात्रीला ध्यान, भजन हे सगळे उत्सवाचाच एक भाग आहे. प्रत्येक जन मनापासून सहभागी होतो. प्रत्येकाने गायले पाहिजे. सगळ्या कारणाचे कारण शिव आहे. ज्याच्यामुळे सर्व आहे – झाडे वाढणे, सूर्योदय, वर वाहणे...... प्रत्येक घटनेमागे शिव आहे - ज्याचामुळे सर्व होते आणि ज्याचाशिवाय काहीच होत नाही. पंचमुख, पंचतत्त्व – शिवला पाच मुख आहेत- पाणी, हवा, पृथ्वी, आग आणि अवकाश! या पाच तत्वांना समजून घेणे म्हणजे तत्त्व ज्ञान. आणि मग शिवाची अष्टमुर्तीच्या रुपात पूजा केली जाते(आठ रूपे)– मन, बुद्धी, अहंकार हे समाविष्ट आहेत. हे दोन्ही शिवाचे सरूप आणि अरूप रूपे आहेत. शिवाची प्रार्थना म्हणजे शिव तत्त्वात सामावून जाणे आणि काही चांगल्याची इच्छा करणे. कशाची इच्छा करावी? मोठ्या मनाने संपूर्ण जगासाठी चांगले मागावे, कोणीच दुक्खी नसावे, ‘सर्वे  जनः सुखिनो भवन्तु .’ या मुहूर्तावर एक संकल्प करा.ते असे आहे की जे सारखे सारखे तुमाचाकडे येते,श्वासासारखे, हृदयातील धड धाडी सारखे. आणि असा संकल्प जेंव्हा तुम्ही देवत्वाला समर्पण करता, तो नक्कीच पूर्ण होईल.

आपण सुद्धा निसर्गाची पूजा करतो. देवत्व पृथ्वीवर सगळीकडे आहे. झाडे, पर्वत, नद्या, पृथ्वी आणि मनुष्यप्राणी यांना मान दिल्याशिवाय पूजा कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. सगळ्यांचा सन्मान करणे म्हणजेच दक्षिणा. द म्हणजे देणे आणि दक्षिणा म्हणजे जे आपल्याला स्वच्छ करेल अशा वस्तू देणे. ज्या देण्याने तुमची पापकर्मे नाहीशी होतील. कुठलीही पूजा दक्षिणेशिवाय अपूर्ण आहे. समाजात जेंव्हा आपण कौशल्याने, कुठल्याही प्रकारे मान विचलित होऊ न देता वागतो तेंव्हा सर्व नकारात्मक भावना, जसे की राग, चिंता, दुख्ख नाश होतात. मी असे म्हणेन की तुमचे ताण, चिंता आणि दुक्खे मला दक्षिणा म्हणून द्या. आणि हे कसे होईल? तर साधनेमुळे, सेवा आणि सत्संग.

आतल्या भवन आणि विश्वासाच्या समुद्रात जाण्यासाठी बुद्धीची बोट करा!

श्रीमंती म्हणजे फक्त पैसा असणे नव्हे

७ मार्च २०११ : 
श्री श्री  रवि शंकर : श्रीमंती म्हणजे फक्त पैसा असणे नव्हे. तुमच्याकडे बँकेत भरपूर पैसे असतील, भरपूर दौलत असेल पण जर ताण असेल पण जर त्याचा तुम्हाला ताण येत असेल, त्रास होत असेल तर कोणीही तुम्हाला श्रीमंत म्हणू शकणार नाही. श्रीमंती म्हणजे  भरपूर पैसे नव्हे, तर  आयुष्यातील उदारता ओळखणे, त्याला महत्व देणे, आयुष्याचा सन्मान करणे. माणसामधला विश्वास त्याची श्रीमंती दाखवतो. श्रीमंती तुम्हाला कशासाठी हवी आहे? आत्मविश्वास वाढवणे..बरोबर? पण जर त्यामुळे कमजोरी वाढत असेल तर त्या श्रीमंती चा काहीही उपयोग नाही, जर श्रीमंतीमुळे आजारपण वाढले असेल तर ती श्रीमंती नाही, श्रीमंती जर भांडणाचे कारण बनत असेल तर ती श्रीमंती नाही, बरोबर! ज्ञान म्हणजेच श्रीमंती, विद्या म्हणजे श्रीमंती, आरोग्य म्हणजे श्रीमंती, आत्मविश्वास म्हणजे श्रीमंती, मुल्ये म्हणजे श्रीमंती. जर तुमच्यामध्ये विश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता, कुठलीही परिस्थिती सांभाळू शकता, ती श्रीमंती आहे. 

प्रश्न: गुरुजी  मला एक जाणवले की लोकांना प्रेम देता येते पण ते घ्यायचे कसे ते कळत नाही. मग आत जे इतके प्रेम आहे त्याचे की करायचे? गुरुजी मागणी आणि पुरवठा यांचा ताळ - मेळच राहत नाही. 
श्री श्री  रवि शंकर: हो, मी आधीच या बद्दल बोललो आहे; खूप लोकांना माहिती नाही की प्रेम घ्यावे कसे. कोणीतरी येते आणि म्हणते की मी तुझावर प्रेम करतो, आणि इतके प्रेम करतो.. थोड्या वेळाने तुम्हाला वाटते की कान बंद करून घ्यावे आणि म्हणवे की हे माझासाठी खूप जास्त होते आहे, मला पळून जाऊन द्या, कारण काही जण प्रेमात आरामदायक नसतात आणि आपण कधीच आपल्या स्वतःच्या आत डोकावून पाहत नाही. आपण की आहोत हे आपण ओळखलेच नाहीये. आपण प्रेम नावाच्या पदार्थापासून बनलो आहोत हे आपल्याला माहीतच नाहीये. जेंव्हा आपण स्वताशी जोडलेले नसतो तेंव्हा दुसऱ्याशी मोकळेपणाने जोडले जाऊ शकत नाही. म्हणून जेंव्हा कोणी तुमच्या जवळ यायचा प्रयत्न करतो तेंव्हा तुम्हाला कसेसे होते, कारण तुम्ही स्वतःशी जोडलेले नसता. त्यामुळे तुम्हाला कळत नाही की प्रेम घ्यावे कसे, म्हणूनच एक म्हण आहे,"डुकराला मोती चारू नका". आधी प्रेमाला योग्य तो आदर द्या आणि जे त्याचा आदर करत नाहीत त्यांना ते देऊ नका. याचा अर्थ प्रेम देण्यात पण कौशल्य हवे. 
प्रेम देण्याचे कौशल्य म्हणजे प्रेमात असणे, प्रेम हि कृती नाही तर प्रेम हि स्थिती आहे. तुम्ही कुठल्याही अतीशिवाय तिथे राहा, आणि म्हणा की मी कुठल्याही अतीशिवाय इथे आहे तुझ्यासाठी, आता ते तुजवर आहे की येऊन घे. तुमच्यामध्ये असलेल्या ताकदी मुळे लोक तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारे समजू शकतील. आणि कुठलीही जबरदस्ती न करता समजाऊ शकता की तुमचे किती प्रेम आहे. ते पचवायला वेळ द्या कारण जबरदस्ती केली तर तुमाचासाठी उलटे पण होऊ शकते.

आधुनिक जगात ध्यानाची गरज


प्रश्न: आजच्या आधुनिक जगात ध्यान करायची गरज का आहे?
श्री श्री रवी शंकर: आजच्या आधुनिक जगात ध्यानाची गरज.. तुम्हाला माहितीये, जर तुम्ही ध्यानामुळे मिळणाऱ्या फायद्यांकडे बघितले तर लक्षात येईल कि त्याचीच आज गरज आहे. पूर्वीच्या काळी साक्षात्कार व्हावा म्हणून ध्यान केले जायचे, 'स्व' चा शोध घेण्यासाठी. मानसिक कष्टामधून मुक्ती मिळवण्यासाठी, त्यातून बाहेर येण्यासाठी, अडचणीमधून बाहेर येण्यासाठी सुद्धा ध्यान मदत करते. स्वतःच्या क्षमता वाढवण्याचा मार्ग म्हणजे ध्यान; तीन गोष्टी! 

आज साक्षात्काराला आपण बाजूला ठेवूयात, आजच्या विचित्र सामाजिक परिस्थितीमुळे, ताण-तणावामुळे ध्यानाची गरज निर्माण झाली आहे. जितकी जास्त जबाबदारी तितकी जास्त ध्यानाची गरज आहे. जर तुमच्याकडे करण्यासारखे काहीच नसेल, तर कदाचित तुम्हाला ध्यानाची गरज भासणार नाही कारण तुम्ही काहीच करत नाही. कामात जितके जास्त व्यग्र असाल तितका कमी वेळ तुमच्याकडे असतो, जितके जास्त काम कराल, तितक्या जास्त इच्छा मनात असतात आणि ध्येय पण असतात, तेवढेच ध्यान पण करायची गरज वाढते कारण ध्यान फक्त ताणातून मुक्तता देत नाही तर नवीन गोष्टीना तोंड देण्याची ताकद पण वाढवते. ध्यानामुळे आरोग्य वाढते, ध्यान हे आत्म्यासाठी अन्न आहे, मनासाठी शक्ती देणारे आहे तर शरीरासाठी आयुष्यरेखा आहे. ध्यान तुमचे शरीर आकारात ठेवते, चेता संस्थेला मदत करते, मनाला मदत करते, जागरुकता वाढवते, दृष्टीकोन सुधारते आणि स्वतःला इतरांसमोर नीट मांडायला पण मदत करते, सगळे मिळाल्यावर अजून काय पाहिजे? .
ध्यानाचे फायदे बरेच आहेत, थोडक्यात म्हणायचे तर .. जर तुम्हाला आनंदी राहायचे असेल तर ध्यान करा. आनंदी आणि आरोग्यपूर्ण राहण्यासाठी ध्यानाला पर्याय नाही. 

प्रश्न: ध्यान करण्याच्या कलेचे मनाला फायदे  कुठले, शरीराला, नात्यांना, अध्यात्मिक इच्छा आणि समाजाला फायदे कुठले?
श्री  श्री  रवी  शंकर : ध्यान तुमचा दृष्टीकोन बदलायला मदत करते. मन स्पष्ट विचार करू शकते. लोकांशी कसे बोलावे, कसे वागावे, विविध घटनांमध्ये कसा प्रतिसाद द्यावा,  इ. मध्ये ध्यानामुळे सकारात्मक बदल होतो. या सर्वांमुळे  हिंसा विरहित समाज, रोग विरहित शरीर, गोंधळ विरहित मन, मुक्त बुद्धी, आघात विरहित बुद्धी आणि दुक्ख विरहित आत्मा यांसाठी मदत होते.

रोज साधना करा

श्री श्री रवि शंकर नुकतेच उत्तर भारतच्या एक आठवड्याच्या दौर्यावरून परत आले. तिथलाच एक अनुभव सांगताना श्री श्री म्हणाले,  आसाम मधील बोडोलेंड म्हणून एक जागा आहे, एक अतिशय दुर्गम प्रदेश, हिंसाचाराने भरलेला! आपल्या वाय. एल. टी. पी. प्रशिक्षकांनी इतके चांगले काम केले आहे. बोडोलेंड मध्ये जवळ पास १ ,५० ,०००  लोक भर दुपारी सत्संग साठी गोळा झाले होते. इतक्या दुर्गम भागामध्ये लोकांनी चांगले काम कारला सुरुवात केली आहे. तिथे  तुम्ही वीज नाही म्हणून तक्रार करू शकत नाही, कारण तिथे तसेही वीज नाही.  तिथे वीज नाही, पाणी नाही आणि रस्ता पण नाही. पण तिथले लोक समाधानी आहेत. आपल्याला सर्व सोयी सुविधा उपलब्ध असताना आपण तक्रार करतो, पण जिथे सोयी नाहीत तिथे सुद्धा लोक समाधानाने राहतात.
(श्रोत्यांपैकी कोणीतरी प्रश्न विचारते)

प्रश्न : दारू आणि सिगारेटबद्दलची इच्छा कशी सोडावी?
श्री श्री रवि शंकर
: सिगारेट आणि दारू सोडण्यासाठी तुम्ही तीन गोष्टी करू शकता.

  1.  अध्यात्मिक साधना रोज करा. यातून तुमची अशा इच्छा मधून सुटका होईल. 
  2. असा विचार करा कि दारू आणि सिगारेट मुळे तुमचे नशीब खराब होणार आहे. तुम्ही जर ते घेतलेत तर काही तरी वाईट गोष्ट तुमचा आयुष्यात होईल.
  3. जर तुम्ही १ महिन्यासाठी सिगारेट आणि दारू सोडणार असाल तर कोणीतरी १ करोड देणार आहे, तर तुम्ही की कराल? जेंव्हा  जेंव्हा इच्छा होईल तेंव्हा  तेंव्हा असा विचार करा कि तुम्ही १ करोड रुपये घालवत आहात.
तुम्ही लोभ किंवा भीतीमुळे स्वतःवर काबू ठेवाल. वाईट सवयी सोडण्यासाठी लोभ आणि भीती एखाद्या दिव्य औषधी सारखे उपयोगी पडतात, जादू झाल्यासारखे.
यानंतर श्री श्री रवि शंकर यांनी श्रोत्यांचे ध्यान घेतले.


"जे अव्यक्त आहे ते प्रेम
जे अटल आहे ते सौंदर्य 
जे टाळता येत नाही ते सत्य "
~ श्री  श्री  रविशंकर