प्रेम आत्म्याला मजबूत बनवते, दुस्वास आणि दुःख आत्म्याला कमजोर बनवतात.

बेंगलोर  आश्रम १५ मे :

प्रश्न : चांगली व्यक्ती आणि वाईट व्यक्ती असे काही आहे का? जर कोणी बाहेरच्या अडचणींमुळे बांधले गेले असेल, तर नकारात्मकता त्यांचा मागे येते का? त्यापासून सुटका कशी करून घ्यावी?
श्री श्री रवि शंकर: चांगला किंवा वाईट आत्मा असे काही नाही. ताकदवान आणि कमजोर आत्मा असतात. ताकदवान आत्मे आनंदात असतात, आणि कमजोर आत्मे दुःखी  असतात. आता, हे आत्मे ताकदवान कसे बनतात? समर्पणाने आत्मे ताकदवान होतात. प्रेम ताकद देते, दुस्वास आणि दुःख आत्म्याला कमजोर बनवते.

प्रश्न : विश्वाशी तुलना केली तर आपले अस्तित्व काहीच नाही, मग आपल्या जन्माने अथवा जन्म न घेण्याने काय परिणाम होतो? आपल्या कारामांचे काय परिणाम होतात?
श्री श्री रवि शंकर: हे पहा, विश्वात कशाचाच परिणाम होत नाही, तरी सगळ्याचा परिणाम होतो. एक प्रजाती जरी नष्ट झाली तरी संपूर्ण विश्व नष्ट होईल. समजा एक माशी ही प्रजाती नष्ट झाली, विश्व नष्ट होईल, त्याचे अस्तित्वच राहणार नाही. शास्त्रज्ञ पण हेच सांगत आहेत, एका विशिष्ट प्रकारचे फुलपाखरू नसेल किंवा विशिष्ट प्रकारचे फुल नसेल तर विश्व टिकू शकत नाही.
एका माशीचे बघितले तर काही अस्तित्व नाही; किती तरी ग्रह आहेत! कितीतरी सूर्यमाला आहेत! कितीतरी आकाश गंगा आहेत! तरीपण माशी नसेल तर विश्व नष्ट होईल. म्हणून, माश्यांचे तसे महत्व नाही पण त्या महत्वपूर्ण आहेत. त्याचप्रमाणे, सगळ्यांचे महत्व आहे पण आणि नाही पण.

प्रश्न : प्रिय गुरुजी, जर शिव या विश्वाची संभावना असेल, तर नारायण तत्व काय आहे?
श्री श्री रवि शंकर: नारायण म्हणजे मानवी व्यवस्थेतील शिवाचे स्वरूप आहे. शिव तत्व हे पूर्णपणे अव्यक्त आहे; नारायण त्याचे व्यक्त रूप आहे. पाण्याची वाफ किंवा बाष्पासारखे हे आहे, तुम्ही ते पाहू शकत नाही पण ढगातून पाऊस पडतो तेंव्हा तो तुम्ही बघता. म्हणून पाणी हे नारायण आहे आणि बाष्प हे शिव तत्व आहे. म्हणूनच जेंव्हा तुम्ही स्वामी, सण्यासी किंवा योगी लोकांना बघता तेंव्हा म्हणता 'ओम नमो नारायण'

प्रश्न : मी इस्लाम च्या एका विशेष संप्रदायाचा आहे. इस्लाम बरोबर खूप हिंसाचार जोडला गेला आहे हे मी बघतो. जातीयतेवरून इतके वाद का आहेत?  त्यामागे काही मोठी शक्ती आहे का, कुठली अमानवी शक्ती? आपण सगळे धर्म साजरे करत आपला रस्ता का पाळत नाही? वेगवेगळ्या काळातील व प्रदेशांतील गुरूंचे वेगवेगळे भासणारे शब्द का आहेत?
श्री श्री रवि शंकर: त्या दिवसात संपर्क व्यवस्था इतकीशी चांगली नव्हती. एका ठिकाणाहून दुसऱ्या  ठिकाणी जाण्यासाठी महिने नाही तर वर्षे लागायची.  म्हणून त्यावेळी त्या ठिकाणी जे काही प्रचलित असेल, त्याबद्दल संत किंवा गुरु जास्त बोलायचे. मुहम्मद जुदैसम आणि ख्रिस्चनबद्दल बोलले, ते हिंदुत्वाबद्दल किंवा बुद्धत्वाबद्दल बोलले नाहीत कारण ते त्या भागापर्यंत पोचले नव्हते; पण ते म्हणाले की प्रत्येक जमातीसाठी वेगवेगळे ज्ञान दिले गेले आहे. ते असेही म्हणाले होते की, ‘माझ्या आधीही किती भविष्य वक्ते येऊन गेले, त्या सगळ्यांचा आदर करा.' ते तेच म्हणाले, शांतता ठेवा आणि प्रत्येकाचा सन्मान करा.

ते म्हणाले की १ लाख भविष्य वक्ते माझ्या आधी येऊन गेले, तुम्ही त्या सगळ्यांना मोजलेत तर त्यात कितीतरी ऋषी आणि महर्षी  असतील, आणि सगळे गुरु जे या ग्रहावर येऊन गेले. दुर्दैवाने त्यांच्या मृत्यूनंतर, धर्म दाबला गेला आणि लोकांवर बंधने घालायला लागला.
मोहम्मादानी त्यावेळी स्त्रियांना खूप स्वातंत्र्य दिले पण नंतर ते सगळे बदलले. तुम्हाला माहितीये की हे सर्व धर्मांमध्ये होते, जसा वेळ जातो, विकृती येत जाते. मूळ लोकांनी जे सांगितले ते राहत नाही, गोष्टी बदलतात.
आज बघा, पाकिस्तानमध्ये रोज मशिदीमध्येच बॉम्ब स्फोट होत आहेत कारण इस्लाम मधील एक संप्रदाय असा विचार करतो की तेच बरोबर आहेत आणि बाकी सगळे चूक. वहाबी संप्रदाय असा विचार करतो की सगळे अगदी सुफी सुद्धा चूक आहेत. मुख्यत्वाने धार्मिक नेतेच यातले बऱ्याचशा समस्या निर्माण करतात, धर्मसंस्थापक नाही. धर्मसंस्थापक म्हणाले असते की, अध्यात्मिक मार्गावर चला, तुमच्या अंतरंगामध्ये जा आणि स्वतःला देवत्वाशी जोड. त्या सर्वांनी योग, जप आणि ध्यान करायला सांगितले असते. त्यामुळे, दुर्दैवाने, धर्मातले गाभा सोडून बाहेरील गोष्टीतच अडकलो आहोत आणि लोक विनाकारण भांडत असतात. म्हणूनच आपण अध्यात्माकडे वळले पाहिजे.

या लोकांचा महत्वाचा संदेश असा आहे: तुमच्याबरोबर शांतता ठेवा, परिसरात शांतता ठेवा आणि जगात शांतात ठेवा. दुसरे म्हणजे सगळ्यांवर प्रेम करा आणि सगळ्यांची सेवा करा, तिसरे असे की अनेक नवे असलेल्या त्या एका देवावर विश्वास ठेवा, एवढेच.
अनेक नावांमध्ये अनेक रूपांमध्ये एकच देवत्व आहे. सर्वांबद्दल तुमच्या हृदयामध्ये प्रेम आणि दया आणि शांती, जर या गोष्टी असतील तर तुम्हाला अशा लोकांचे ऐकायची गरज नाही की जे तुम्हाला सांगतात तू अमुक आहेस म्हणून हे करू नको आणि तमुक आहेस म्हणून हे कर.

प्रश्न : विष्णूचे काम सोपे की तुमचे इथले पृथ्वीवरचे काम सोपे?
श्री श्री रवि शंकर: हे पहा, मी कुठलीही तुलना करत नाही. माझे काम सोपे असो व अवघड, मी त्याची चर्चा करत नाही आणि विचार करत नाही. जे काही असेल, अवघड असले तरी ते करायचे आहे, सोपे असले तरी करायचे आहे आणि हे सर्व विष्णू शक्ती मुळेच होत आहे. विष्णू म्हणजे कुठेतरी पाण्यात बसलेला नाही, विष्णू तो आहे की जो इथल्या प्रत्येकाच्या कणाकणात आहे.

© The Art of Living Foundation
The Art of living


वैराग्य म्हणजे तुम्ही स्वतःला आव्हान देणे

१७ मे २०११

प्रश्न : प्रिय गुरुजी, हे खर आहे का की भगवद गीतेमधील प्रत्येक अध्यायाचा विशिष्ठ ग्रहांवर परिणाम होतो? कृपया याबद्दल सांगा.
श्री श्री रवि शंकर: ग्रह खूप दूर आहेत, त्यांचा तुमच्या मनावर परिणाम होतो. तसाच भगवदगीतेतील प्रत्येक श्लोकाचा, अध्यायाचा तुमच्यावर परिणाम होतो.

प्रश्न: प्रिय गुरुजी, माझ्या व्यवसायात मी व्यस्त आहे, पण मला सेवा करायची खूप इच्छा आहे. असे काही आहे का की जास्त वेळ न देता मी पैसे देऊन मदत करू शकतो. त्याला सेवा म्हणता येईल का?
श्री श्री रवि शंकर: हो, ते चालेल. काही लोक वेळ देऊ शकतात, काही लोक साधन उपलब्ध करून देऊ शकतात. सेवा दोन्ही देऊन होते वेळ आणि संसाधन

प्रश्न : गुरुजी , तुम्ही नेहमी आम्हाला सांगता की वैराग्यपूर्ण राहा आणि तुम्हीच असे म्हणता की वैराग्य ही घटना आहे. मला खरच वैराग्य पूर्ण व्हायचे आहे पण मला कळत नाही की हे आयुष्यात कसे घडवून आणावे? कृपया मार्गदर्शन करा.
श्री श्री  रवि शंकर: वैराग्य ही घटना नाही; मी असे म्हणेन की वैराग्य म्हणजे तुम्ही तुम्हाला दिलेले आव्हान असते. तुम्ही जेंव्हा तुमची जागरुकता वाढवता, जेंव्हा तुम्ही सगळे जाणार आहे अशा दृष्टीने बघता आणि मृत्यू हा महत्वपूर्ण आहे, आपण सगळे मारणार आहोत आणि सगळे बदलत आहे. जेंव्हा हे ज्ञान मिळते तेंव्हा वैराग्य आपोआप येते. तुम्हाला हे समजून घेतले पाहिजे आणि आयुष्याकडे थोड्या मोठ्या दृष्टीकोनातून बघितले पाहिजे आणि आपोआपच तुमच्यामधून वैराग्य बाहेर येईल; पण थोडा प्रयत्न करावा लागेल. थोडासा प्रयत्न जरी झाला तरी या गोष्टी होतील.

प्रश्न :गुरुजी, मी तुम्हाला प्रार्थना करतो की मला अशा सिद्धी द्या की जेणेकरून ज्या लोखंडी साखळ्या आपल्याला अलग करतात त्या मी तोडू शकेन,मी प्रार्थना करतो की तुमचा सचिवांना अशा सिद्धी द्या जेणेकरून ते समजू शकतील की मी आतून किती चांगली व्यक्ती आहे आणि मला लगेच तुम्हाला भेटण्याची वेळ देऊ शकतील.
श्री श्री  रवि शंकर: त्यांना माहिती आहे की तू किती चांगली व्यक्ती आहेस आणि म्हणूनच ते तुला थांबवून ठेवत आहेत, त्यांना माहिती आहे की तू जास्त वेळ थांबू शकतोस, हो. मी दिवसातून ३ वेळा दर्शन देतो आणि मी सगळ्यांना भेटतो, आज मी जवळपास १००० लोकांना भेटलो मी भेटत राहतो. पण तुमचे समाधान होत नाही, हं, मी लोकांना परत परत रांगेत येऊन उभे राहताना बघतो. तुम्ही थोडे काही काम करता, मोठे प्रोजेक्ट घेता आणि माझाशी बोलायला काही कारण काढता. तुम्ही काही करत नाही पण फक्त उभे राहून मला भेटायचे असते, भेटायची वेळ घेणे तर नाहीच.

प्रश्न: प्रिय गुरुजी, भारतावर दक्षिणेच्या अम्मांचे राज्य आहे, पूर्वेच्या दीदी, उत्तरेच्या बेहेनजी, राजधानीतील आंटी आणि मध्यातील मेदाम यांचे राज्य आहे: भारतावर महिलांचे राज्य आहे, आता हे पुरुषांचे जग नाही गुरुजी, तुम्ही काय म्हणता?
श्री श्री  रवि शंकर : आणि राष्ट्रपती भवन, ताई तिथेपण आहे. प्रवक्ती पण महिलाच आहे आणि राज्य ही महिलाच करत आहेत. अशी आशा आहे की हे अधिक चांगले होईल आणि तुमच्या घरात, तुमच्या घरात कोणाचे राज्य आहे, ते विसरू नका!

प्रश्न : गुरुजी, मी आणि माझी पत्नी २ वर्षांपूर्वी वेगळे झालो, आम्हाला परत लग्न करायचे आहे. तुम्ही असे म्हणू शकता की आमचा बाबतीत घटस्फोट टिकू शकला नाही पण आम्ही दोघे थोडे भीत आहोत, की आम्ही तीच चूक पुन्हा तर करत नाही ना? कृपया मार्गदर्शन करा.
श्री श्री  रवि शंकर: तुम्हाला हे पुढे न्यायचे आहे हे चांगले लक्षण आहे. जसा वेळ जातो तसे तुमची चेतना बदलत जाते, तुमचे मन बदलते आणि तुमची समजून घेण्याची क्षमता पण बदलते. हे सगळे बदलते असताना जर तुम्हाला आणखी एक प्रयत्न करून बघायचा असेल तर त्यात काही चूक नाही, प्रयत्न करून बघा. जर ते योग्य तरले नाही तर पुढच्या जन्मात ह\तीच व्यक्ती जोडीदार म्हणून परत निवडू नका.

प्रश्न : जर आयुष्य एक दिवस संपणार असेल तर मी त्याचा आनंद कसा घ्यावा. हा विचार मला आयुष्याच आनंद नाही घेऊ देत.
श्री श्री रवि शंकर: याने खरेतर तुमचा आयुष्याबद्दलचा मन वाढला पाहिजे. हे पहा, फुल हे कधीतरी नष्ट होणारच आहे तरी पण तुम्ही फुलाकडे बघण्याचा आनंद घेता की नाही. तुम्ही गुलाब जमून, आईस क्रीम, इ. खाल्ल्यावर तर संपणार आहे पण तुम्ही त्याचा आनंद घेता ना? आता पहा इतका सुंदर पूर्ण चंद्र, पण तोही अदृश्य होणार आहे एक दिवस, तरीसुद्धा आपण त्याचा आनंद आज घेत आहोत. छान आहे!

प्रश्न : माझे एका मुलीवर प्रेम आहे पण आम्ही वेगवेगळ्या जातीचे आहोत. मी असे ऐकले आहे की ब्रिटीश आल्यापासून जातीव्यवस्था सुरु झाली. त्या आधी जाती व्यवस्था नव्हती. आता ब्रिटीश जाऊन ६० पेक्षा अधिक वर्षे झाली, आता मी तीचाशी लग्न करू शकतो का?
श्री श्री  रवि शंकर: हो, हो. जात ही काही अडचण नाही. फक्त तुमच्या आई-वडिलांबरोबर शांतता ठेवा, आई-वडिलांबरोबर नाते खराब करून, आयुष्यभर दोन्ही बाजूनी त्रास सहन करण्यात काही अर्थ नाही. तुम्ही तुमच्या आई-वडिलांना समजवा आणि मग पुढे जा, काहीच अडचण नाही. त्यांना समजावून द्या की जातीची काहीच अडचण नाही. ते काहीच नाहीये.

प्रश्न : गुरुजी आज बुद्ध पोर्णिमा आहे. त्याबद्दल काही सांगा
श्री श्री  रवि शंकर: बुद्धाने आयुष्यभर ध्यानाचे महत्व पटवून देण्यासाठी प्रयत्न केले. आपण एक छोटे ध्यान करूयात.

प्रश्न : मी राजस्थानचा आहे, राजस्थान मध्ये अनेक आश्रम आहेत आणि मी असा विचार करत होतो की आपण आर्ट ऑफ लिव्हिंगचा आश्रम बांधला तर, तुम्हाला काय वाटते?
श्री श्री रवि शंकर: ठीक आहे, आश्रम बांधा, तुम्ही सगळे एकत्र या आणि एक बनवा. मी लोक बनवतो, तुम्ही आश्रम बनवा. कालच आम्ही बोलत होतो की इतके सगळे आश्रम आहेत, पण लोकच नाहीत. आश्रमामध्ये योगी नाहीत म्हणून मी असा विचार केला की सगळ्यात आधी ताकदवान लोक बनवावे आणि म्हणून मी 'व्यक्ती विकास केंद्र ' असे नाव ठेवले 'आश्रम विकास' नाही.

प्रश्न : जेंव्हा कोणी खूप जवळचे वारते आणि आपण त्याचसाठी तयार नसतो. खूप काही सांगायचे बोलायचे असते जेंव्हा ते जातात तेंव्हा तुम्हाला ते हवे हवेसे वाटत असतात. तुम्ही म्हणता की ते नेहमी असतात, हे कसे करायचे?
श्री श्री  रवि शंकर: जे सोडून गेले आहेत त्यांना हे समजेल की जग म्हणजे एक खेळ आहे; बाकी काही नाही; ती एक लाट आहे त्यामुळे त्यांना काही सांगायची, समजवायची गरज नाही, काही न सांगता ते समजून घेतील. जेंव्हा आपण शरीर रुपात असतो तेंव्हा शब्द लागतात, पण एकदा शरीर सोडले की संवाद हा भावनेतून होतो.तेंव्हा काळजी करू नका, तुम्ही आनंदात राहा, जे गेले ते गेले आणि आता आपण इथे आहोत.

प्रश्न : गुरुजी, जर आपले अगदी जवळचे लोक आमच्या तुमच्याबद्दलच्या भावना समजत नसतील आणि तर्काने विश्लेषण करत असतील तर त्याचा त्रास होतो. ही परिस्थिती कशी सांभाळावी, हे आमच्या आयुष्यात सारखेच होत असते.
श्री श्री  रवि शंकर: तुम्हाला सगळ्यांना सगळे का समजावून सांगायचे आहे? भावना अशा असतात की लोकांना त्या पटकन समजत नाहीत. तुम्हाला तुमच्या सर्व भावना अशाप्रकारे व्यक्त करायची गरज नाही. त्यांना कदाचित भीती वाटत असेल की तुम्ही घर सोडून आश्रमात जाल आणि तिथेच राहाल. तुमचे प्रेम आणि समर्पण भाव येव्हादाच दाखवला पाहिजे की ते समजू शकतील.तसेच आनंदाचेही आहे, काही वेळा तुम्हाला कळत नाही की आनंद कसा दाखवावा; जर तुम्ही तो खूप दाखवला तर लोकांना समजत नाही.
एक भक्त कुणाचा अंत्यसंस्काराला गेला, आणि तिथे भजन चालू होते आणि त्याने नाचायला सुरुवात केली, लोकांना काही कळलेच नाही. जेंव्हा सत्संग आणि भजन असते आणि तुम्ही आनंदात असता आणि तो म्हणाला की तसेही सर्व उत्सवच आहे पण अशा ठिकाणी तुम्ही नाचलात तर लोक नाराज होतात. त्यामुळे तुम्ही बघितले पाहिजेत की समोरच्या माणसाला काय समजते; आणि तुम्हाला हवे ते त्यांना कसे सांगायचे. सांगताना कौशल्यपूर्ण राहा जेणेकरून तुमच्या पद्धतीने त्यांचा मनात राग किंवा भीती उत्पन्न होऊ नये आणि मग दुर्लक्ष करा. एका मर्यादेनंतर फक्त दुर्लक्ष करा.

प्रश्न : मला असे वाटते की भारतातील सामाजिक आर्थिक प्रश्न अति लोकसंख्येमुळे आहेत, तुम्ही याच्याशी सहमत आहात काय?
श्री श्री  रवि शंकर: नाही, नाही. भारताचे प्रश्न अति लोकसंख्येमुळे नाहीत, ते भ्रष्टाचारामुळे आहेत. लोकसंख्या हा काही वर्षापूर्वी शाप समजला जात होता पण लोकसंख्या हा आर्थिक सुधारणेचा घटक आहे. लोकसंख्या म्हणजे मोठा बाजार, बाकीचे देश भारताकडे का पाहतात, कारण इथे मोठी बाजारपेठ आहे.
 
© The Art of Living Foundation
The Art of living

देवदूत म्हणजे एक सकारात्मक उर्जा आहे

बेंगलोर आश्रम १८ मे २०११ 


स्वामी , साधू ह्यांना मी बघितले आहे कि त्यांची निंदा केली कि त्यांना अजिबात आवडत नाही. आणि सतत संकटांविषयी बोलून बोलून तुम्हाला कशातच उत्तर मिळत नाही. पण जर तुम्ही शांत राहिलात तर तुम्हाला लगेच उत्तर मिळेल. तुम्ही हे नक्की करून पहा . जेंव्हा तुमच्यावर कुठले संकट येते किंवा आव्हान येते तेव्हा तुम्ही शांत राहून अंतर्मुखी व्हा . तुम्हला लगेच उत्तर मिळेल. हे करून पहा नाहीतर तुमचे संकट वाढत जाईल. ह्यात तुमची कर्म असतात. ते कमी करा , वाढवू नका. करुणामय व्हा. तुम्ही आधी स्वतः आनंदी व्हा , दुसर्यांना आनंदी करायला जाऊ नका. ह्याचाने तुम्ही स्वावलंबी व्हाल. वैराग्याबत तुम्हाला ओढ असू द्या. सतत असे म्हणू नका कि हा माणूस असा आहे, तो मला हे म्हणाला. ह्यात गुंतू नका. आणि गुरुजींनी माझ्याकडे बघितले नाही असे अजिबात म्हणू नका, जर मी तुम्हाला लाथ मारली तेरी त्याला प्रसाद समजा . सगळे इकडे प्रसाद आहे. तुम्ही नुसतेच लोकांचे त्रास ऐकू नका , आणि त्यात वाहून जाऊ नका. लक्ष नको आणि चिंता नको.


प्रश्न: गुरुजी तर्पण म्हणजे काय?
श्री श्री रवि शंकर : तर्पण म्हणजे आपल्या पूर्वजांची आठवण करणे आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी करण्यात येणाऱ्या पूजेला तर्पण, सगळ्या धर्मात वेगवेगळ्या पद्धतीने तर्पण केले जाते. हिंदू धर्मात सुद्धा हे पूर्वापार  चालत आले आहे. 


प्रश्न : गुरुचे काम आहे मनातला गोंधळ वाढवणे मग आम्ही कोणाकडे जावे.
श्री श्री रवि शंकर : कुठेही गेलात तरी गोंधळ वाढणारच आहे मग कुठेच जाऊ नका. तिथेच रहा .उत्तर मिळेल.


प्रश्न : गुरुजी कृपा करून देवदूताविषयी  सांगा. ते प्रत्येक ठिकाणी असतात का?आणि ते सगळ्यांच्या आयुष्यात काही चांगले करतात का?
श्री श्री रवि शंकर: हो नक्कीच . देवदूत म्हणजे एक सकारात्मक उर्जा आहे. 


प्रश्न : गुरुजी आमच्या मनात काय चालले आहे तुम्हाला कसे कळते आणि तुम्ही आमच्या सगळ्या इच्छा  कशा  पूर्ण करता , जरी आम्ही तुमच्या पासून इतके दूर राहतो .
श्री श्री रवि  शंकर: ते माझे गुपित आहे.


प्रश्न :आई बाबा नेहमी सांगतात कि कोणाच्या श्राद्धात, किंवा तेराव्याला जाऊ नये , का?
श्री श्री रवि शंकर: ती एक सामाजिक प्रथा आहे त्यात जाण्यात काहीच हरकत नाही, जाऊन आल्यानंतर अंघोळ करून शुद्ध व्हा.

The Art of living
© The Art of Living Foundation

तुम्ही या जगासाठी भेट आहात!!!

१३ मे २०११ बेंगलोर आश्रम

प्रश्न :प्रिय गुरुजी , तुम्ही म्हणालात की आपले नाते ह्या पृथ्वी इतके जुने आहे. आपण कधी कुठल्या मागच्या जन्मात तुमचा वाढदिवस साजरा केला आहे का? मला आठवत नाही , पण तुमच्या नक्कीच लक्षात असेल. कृपया सांगा ना.
श्री श्री रवि शंकर :
हो , नक्कीच आपण साजरा केला आहे. आता मला सांग जेंव्हा मला तुम्ही पहिल्यांदा भेटलात तेंव्हा आपण अगदी पहिल्यांदा भेटतोय असे वाटले तुम्हला ? नाही ना , मला सुद्धा मी कोणा अनोळखी माणसाला भेटत आहे असे वाटले नाही . आत्तापर्यंत जेवढ्या लोकांना मी भेटलो आहे , मला नेहमीच असे वाटत आले आहे की मी ह्यांना आधी भेटलो आहे आणि मी ह्यांना आधीपासूनच ओळखतो आहे. आत्तापर्यंत मी कधीच कुठल्या अनोळखी माणसाला भेटलो नाहीये.

प्रश्न :गुरुजी मला तुमच्याविषयी उत्कट अभिलाषा हवी आहे , पण ती येते आणि जाते, आणि मन दुसऱ्या गोष्टींच्या मागे धावते . मला हि उत्कट अभिलाषा तुमच्याविषयी सुसंगत कशी राहील?
श्री श्री रवि शंकर
: काहीच हरकत नाही. आयुष्यात जरा मजा करा. जेंव्हा तुम्ही म्हणता की मला अभिलाषा नाही , पण तीसुद्धा एक अभिलाषाच आहे. तुमची अभिलाषा हि अभिलाषेसाठीच आहे. तुम्हाला राग येतो कारण तुम्ही रागात असता . तसेच तुमची अभिलाषा हि अभिलाषेसाठीच आहे हे माहिती असणे पण अभिलाषाच आहे.

प्रश्न :गुरुजी संकल्प आणि इच्छा ह्यात काय फरक आहे? आणि त्यात जर फरक असेल तर सगळ्या इच्छा ह्या संकल्प स्वरुपात बदलण्यासाठी काय करावे?
श्री श्री रवि शंकर
: तुम्हाला माहित असेल मी ह्याविषयी खूप बोललो आहे, संकल्प आणि इच्छा , आणि त्या बदलणे . हे सगळे वैराग्य आहे. खरे तर वैराग्य सगळीकडे कमी येते.

प्रश्न :गुरुजी मी आज विचार करतो आहे की सगळीकडे प्रकाशाचा समावेश आहे आणि जेंव्हा मी स्वतःमध्ये पाहतो आहे , तिथे तुमचाच प्रकाश माझ्यात आहे . माझ्यात , त्याच्यात आणि सगळीकडेच तुम्ही आणि फक्त तुम्हीच आहात. मी जिकडे पाहतो तिकडे फक्त तुमचाच प्रकाश आहे. तुम्ही कोठून आला आहात आणि तुम्ही कोण आहात? कृपया मला आज तरी सांगा.
श्री श्री रवि शंकर :
मी कोण आहे ह्याचे उत्तर जर पाहिजे असेल तर तुम्हाला माझ्याशी एक व्यवहार करावा लागेल . तो व्यवहार म्हणजे, पहिले तुम्ही हे जाणून घ्या की तुम्ही कोण आहात? आणि जेंव्हा तुम्हाला हे समजेल की तुम्ही कोण आहात तेंव्हा मी कोण आहे हेही तुम्हाला समजेल. आणि हेच मला पाहिजे आहे की तुम्ही जाणून घ्या की तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला कळेल की मी कोण आहे.

प्रश्न :हे जग इतक्या जलदगतीने बदलत आहे पण तरीही तुम्ही तेच आहात. न बदललेले इतके सुंदर आणि पूजनीय. हे कसे काय गुरुजी?
श्री श्री रवि शंकर :
काही प्रश्न हे आश्चर्यकारक असतात, तसाच हासुद्धा प्रश्न नाहीये पण तुम्ही आश्चर्य करावे असे आहे . प्रश्न हे नेहमीच वेडेवाकडे आणि कुटील असतात पण आश्चर्य हे नेहमी सरळ म्हणूनच आयुष्याचे प्रश्नांकडून आश्चर्यात परिवर्तन करणे हेच ज्ञान आहे .ज्ञान हे प्रश्नांची उत्तरे देत नाही तर प्रश्नांचे आश्चर्यात रुपांतर करते. म्हणूनच ह्याविषयी तुम्ही आश्चर्य बाळगावे असे आहे.

आश्रमवासियांनी दररोज भगवदगीतेमधील श्लोक म्हणणे सुरु केले आहे. मला हे सगळ्यांना सांगायला आवडेल की तुम्ही जिथे कुठे असाल तिथे दररोज भगवदगीतेमधील श्लोक म्हणणे सुरु करा. रोज तीन ते चार श्लोक म्हणा . जरी तुम्हाला संस्कृत कळत नसेल तरी ठीक आहे. नुसता अनुवाद देखील पुष्कळ आहे.

दुसऱ्याच्या मधले चांगले गुण बाहेर आणणे हे आपले काम आहे!!!

बेंगलोर, मे ७:

प्रश्न : गुरुजी , आपण जेंव्हा म्हणतो की अमुक तमुक व्यक्तीला आत्मदर्शन झाले आहे, कृपया मला सांगा की त्यांना काय साक्षात्कार होतो?
श्री श्री रवि शंकर
: साक्षात्कार म्हणजे मी शरीर नाही आणि त्यापेक्षा जास्त आहे हे कळणे. मी इथे माझा या जन्माआधी होतो आणि मी माझ्या मृत्युनंतरही इथे असेन. जर कुणाला हे कळले तर तेव्हडे पुरे आहे. पण ते फक्त तेच सांगू शकतात, इतक लोक नाही सांगू शकत.


प्रश्न : प्रिय गुरुजी, कृपया मला सांगा की आपण अध्यात्म शोधणारे माणसे आहोत की अध्यात्मिक व्यक्ती पण मनुष्याच्या रुपात?
श्री श्री रवि शंकर:
दोन्ही. अध्यात्मिक व्यक्ती मनुष्याचा रुपात आणि ज्यांना आपल्या मूळ स्वरूपाकडे परत यायचे आहे.

राधा या शब्दाचा अर्थ महिती आहे का? राधा म्हणजे मूळ स्वरूपाकडे परत येणे. धारा म्हणजे प्रवाह; स्रोतापासूनच प्रवाह म्हणजे धारा आणि धारा हा शब्द उलट वाचला की तो राधा असा होतो. जेंव्हा पाणी खाली पडते, तेंव्हा ती धारा असते, आणि जेंव्हा पाणी परत जिथून वाहायला सुरुवात झाली तिथे जाते त्याला राधा म्हणतात.

प्रश्न : प्रिय गुरुजी, माझा मुलगा २ वर्षांचा आहे, त्याला इतर लोकांबरोबर असुरक्षित वाटते. त्या वयाचा सगळ्याच मुलांना असे वाटते का? मी ते कसे हाताळावे?
श्री श्री रवि शंकर:
ती लहान मुलांमधली असुरक्षितता पण असू शकते. २ वर्षांचे मूळ असुरक्षित असू शकत नाही, ते तुमचे स्वतःचे मत असू शकते. काही वेळा मुलाला काय वाटत आहे किंवा काय म्हणायचे आहे यावर तुम्ही तुमचीच मते पुढे करत राहता. विशेषकरून आजी-आजोबा असे जास्त करताना दिसतात. आजोबा म्हणतील की माजं ६ महिन्याचे बाळ मजकडे बघून मला म्हणाले, “आजोबा तुम्ही आज फिरायला जाऊ नका, आज माझाबरोबर थांबा" आणि हे ते त्याचा डोळ्यातून सांगत होते. बाळ बोलू पण शकत नाही आणि आजोबाना वाटते की ते सर्व सांगते आहे. खूप गोष्टी ही तुमची मते असतात.


तुम्हाला जर असे वाटत असेल तुमच्या मुलामध्ये ईर्ष्या आहे, भावंडाबद्दल ईर्ष्या आहे, तुम्हाला तसे वाटत असेल तर त्यांना जवळ घ्या आणि थोडे जास्त लक्ष द्या.

प्रश्न : गुरुजी मी येस + हे शिबीर २ वर्षांपुर्वी केले आणि नुकतेच माझ्या आई-वडिलांना माझ्या hollow and empty या अनुभवाबद्दल आणि 'काहीच नसणे' या भावनेबद्दल सांगितले. ते म्हणतात की माझा काही उपयोग नाही. मी त्यांना काय सांगू?
श्री श्री रवि शंकर:
त्यांना काहीच सांगू नको. त्यांना दाखवून दे की तू खूप काही करू शकतोस. तुझा कामाने त्यांचे मन जिंक, शब्दाने नाही.


प्रश्न : गुरुजी , लालसा दिव्य गुण कसा असू शकतो? मला तर त्यात खूप त्रास होतो.
श्री श्री रवि शंकर:
तडप म्हणजेच ईश्वर!


प्रश्न: गुरुजी, मला असे वाटते की माझा सभोवताली अतिशय स्वार्थी आणि दुष्ट लक आहेत ज्यांना माझ्याकडून फक्त काम करून घ्यायचे आहे. मी माझा निर्दोष स्वभाव आणि साधेपणा कसे टिकवून ठेऊ?
श्री श्री रवि शंकर:
सगळ्यात पहिल्यांदा, कुणालाही दुष्ट आणि भ्रष्ट असे नाव चिकटवू नका. तुम्ही त्यांना त्याच प्रकारे पाहाल. ते तसे असले तरी त्यांना तसे नाव चिकटवू नका. तुमचा विचार किंवा संकल्प त्यांचातले वाईटात वाईट गुण बाहेर पडू शकतात. तरीपण, जर तुमचा संकल्प चांगला असेल, तर जे वाईट आहेत त्यांचातले पण चांगले गुण दिसून येतील.


आज श्रीनगर मधल्या एका प्रशिक्षकाने मला फोन केला; त्याने ५० तरुणांचा YLTP शिबीर घेतले. तो सांगत होता की त्या तरुणांमध्ये इतका मोठा बदल झाला आहे. जिल्ह्याचे कलेक्टर निरोप समारंभाला आले होते आणि म्हणाले, " हा चमत्कार आहे. या तरुणांना काय झाले आहे? इतका मोठा बदल?”. तरुण म्हणत होते की तुम्ही याप्रकारे आम्हाला अध्यात्मिक ज्ञान या आधी कधीच दिले नाही आणि तुम्ही आम्हाला दोष देता की आम्ही हे केले न ते केले, पण कुणीही कधीही आम्हाला आत्मिक शांततेबद्दल शिकवले नाही.

त्यामुळे दुसऱ्यानमधले चांगले गुण बाहेर काढणे हे आपले काम आहे, आपण दुसऱ्यांची खूप वेळा निंदा करतो, म्हणतो की "तू निराशाजनक आहेस" पण तुम्हाला माहिती आहे की इतर काही चांगले गुणही आहेत, तुम्हाला त्यांना आशा दाखवली पाहिजे. तुमच्या आजूबाजूचा लोकांमध्ये जे दिव्य गुण आहेत ते बाहेर काढा; हे एक तुमचे विशेष कार्य म्हणून हातात घ्या. मी तुम्हाला भोळे व्हा म्हणून सांगत नाहीये. काळजीपूर्वक राहा, त्याच वेळी चांगले गुण बाहेर काढा.

प्रश्न : असे म्हणतात की आयुष्य हे चेतनेचे खेळ आणि प्रदर्शन आहे. चेतनेला हे खेळ खेळावे असे का वाटते?
श्री श्री रवि शंकर:
खेळ हा स्वभाव आहे. जेंव्हा तुम्ही आनंदी असता तेंव्हा तुम्ही खेळ खेळता. जेंव्हा तुम्ही खेळता तेंव्हा तुम्हाला गरज नसते. म्हणूनच तुम्ही खेळता. तुम्हाला जर खूप गरजा असतील तर तुम्ही फक्त काम आणि कामच करता, तुम्ही खेळू शकत नाही, कळतंय का? खेळ तेंव्हाच येतात जेंव्हा मोकळा वेळ असतो. तुमचा आयुष्याचा गरजा पूर्ण झाल्यावर खेळ हा तुमच्या आयुष्याचा भाग बनतो. चेतना पूर्ण आहे आणि तिचा स्वभाव खेळकर आहे. खेळकर असणे हाच दिव्य स्वभाव आहे.


प्रश्न: गुरुजी, वातवरण हा एक महत्वाचा मुद्दा बनला आहे, त्याची काळजी घेण्यासाठी आपण काय करावे?
श्री श्री रवि शंकर:
हो. वातावरणाची काळजी घेणे हा आर्ट ऑफ लिव्हिंग चा मोठा भाग आहे. झाडे लावा; प्लास्टिकचा कमीत कमी वापर करा, जर शक्य असेल तर प्लास्टिक ऐवजी कापडी पिशव्या वापरा. या सर्व गोष्टी माहिती करून घेण्यासारख्या आहेत. तुम्ही त्याबद्दल बेसिक कोर्स मध्ये आधीच ऐकले असेल त्यामुळे तुम्हाला ते माहिती आहे.

वातावरण स्वच्छ ठेवा, जर तुम्हाला लोक रस्त्यावर घाण करताना दिसले तर तुम्ही तिथे उभे राहा आणि लोकांना बोलावा आणि म्हणा, " आपण ही जागा स्वच्छ करूयात". असे काहीतरी करूयात.
The Art of living
© The Art of Living Foundation

प्रेमाबरोबर बांधिलकी म्हणजेच भक्ती!!!

बुधवार, एप्रिल २७,२०११

मॉन्ट्रियल केंद्र कॅनडा, २१ अप्रैल २०११.

प्रश्न : जेंव्हा प्रिय व्यक्तींचा मृत्यू होतो तर त्यांचा पुनर्जन्म होतो का? आपण त्यांना ओळखू शकतो का? पालकांच्या बाबतीत आपण त्यांचाशी परत संबंधित होऊ शकतो का?
श्री श्री रवि शंकर:
सर्व काही शक्य आहे! जर त्यांचा पुनर्जनम आता होतो तर तुम्ही त्यांना ओळखू शकता आणि अनुभव सुद्धा घेऊ शकता! तुम्ही हा अनुभव केलाय की तुम्ही कुठे जाता आणि कोणी व्यक्ती शी घनिष्ठ संबंध जुळून जातात? तुमचा अंतरात्मा तुम्हाला या गोष्टींचा अनुभव करून देईल. सर्व संभव आहे. कधीतरी आपण एकमेकांशी सम्बंधित होतो. पूर्वी आपण आपापसात संबंधित होतो; आता सुधा आपण एकमेकांशी संबंधित आहोत. आपल्याला हे समजो अथवा न समजो, तरी पण आपण एकमेकांशी संबंधित आहोत.

प्रश्न : आनंद काय आहे?
श्री श्री रवि शंकर :
जेंव्हा तुम्ही म्हणता, मला काही नको, तो आनंद आहे. जेंव्हा तुम्ही खुश होता आणि तुम्हाला जर हा प्रश्न विचारला की "तुम्हाला काय पाहिजे?" तुमचे उत्तर असते की "नाही, मला काही नको"

प्रश्न :प्रिय गुरूजी मी माझ्या स्वतःवर खूप संशय घेतो, मी आपले कौशल्य, योग्यता आणि निर्णय यांवर संशय घेतो. स्वतःवे संशय करण्यापासून स्वतःला कसे थांबवावे?
श्री श्री रवि शंकर :
कोणी व्यक्ती जर स्वतःवर संशय घेत असेल तर त्यावर उपाय काय? सगळ्यात पहिल्यांदा या संशयाला समजून घ्या; संशय नेहमीच कुठल्यातरी चांगल्या गोष्टीसाठी असतो. जेंव्हा तुम्हाला कोणी म्हणते, "मी तुझावर प्रेम करतो", तर तुम्ही लगेच विचाराल, "खरच?" आणि जर कोणी म्हणाले " मला तुझी घृणा येते" तेंव्हा तुम्ही विचारणार नाही "खरच" म्हणून.  म्हणूनच संशय हा नेहमी चांगल्या गोष्टींवरच असतो. तुम्ही तुमच्या योग्यतेवर संशय घेता; पण काम्जोरीन्व्र कधीही संशय घेत नाही. तुम्ही आनंदावर संशय घेता, पण दुःखावर कधीही संशय घेत नाही. ठीक आहे? कोणीही आपल्या उदास भावना किंवा निराशेवर संशय घेत नाही, परंतु म्हणतो की माझा पूर्ण विश्वास नाही की मी खुश आहे किंवा नाही. जेंव्हा तुम्ही हे समजून घेता की संशय हा नेहमी सकारात्मक गोष्टींवर असतो तेंव्हा तुमचे मन एका विशिष्ठ स्तरावर पोचते.
संशयाचा सरळ अर्थ आहे; प्राण उर्जेची कमी यासाठी अधिक प्राणायाम करा आणि मग तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही त्या स्थितीतून बाहेर पडला आहात.

प्रश्न : प्रिय गुरुजी भक्त कोण असतो? भक्ताने काय केले पाहिजे? भक्त कसे बनता येते?
श्री श्री रवि शंकर:
भक्त बनण्यासाठी कुठलाही अवघड प्रयत्न करू नका; प्रेमाबरोबर बांधिलकी म्हणजेच भक्ति. प्रेमाबरोबर विवेक असणे म्हणजेही भक्ती.
विवेकाशिवाय प्रेम नकारात्मकतेत बदलू शकते. आज प्रेम करा; उद्या घृणा करा; आज प्रेम करा, संबंधांबद्दल तृष्णा उद्यासाठी ठेवा.

प्रेमाबरोबर विवेक म्हणजे परमानन्द असतो; आणि तीच भक्ती आहे. भक्ति एक अतिशय मजबूत बंधन आहे, हा आपलेपणाचा अनुभव आहे. प्रत्येक व्यक्ती या गुणांबरोबर जन्म घेतो. हे परत लहान मूळ बनण्यासारखे आहे.

प्रश्न : प्रिय गुरुजी मी धन्य आहे की मी तुमच्याबरोबर आहे आणि माझा स्तनांचा कर्क रोग सुद्धा बारा होत आहे ज्याचे निदान मागच्या वर्षी झाले. तुम्ही मला आणि आम्हाला सगळ्यांना सांगू शकता का की रोगापासून काय शिकायला मिळू शकते?
श्री श्री रवि शंकर:
तुम्हाला आजारांपासून काहीही शिकण्याची आवश्यकता नाही. पुढे चला. हा जीवनाचाच हिस्सा आहे. शरीर कधी कधी आजारी पडते. हे अनेक कारणांमुळे होते. हे कर्म, पूर्व संस्कार आणि वंशपरंपरागत जीन मुळे होऊ शकते. हे प्रकृतीच्या नियमांचे उल्लंघन करण्यासारखे आहे. आवश्यकता नसताना जेवण करणे, आणि हे आत्ताच्या औद्योगीकीकरणामुळे पण होऊ शकते. याच्यामुळे अनेक विकिरण उत्पन्न होत आहेत. त्यासाठी त्यातून काय शिकता येईल याचाकडे लक्ष द्यायची गरज नाही.
फक्त एक विश्वाश, एक ज्ञान आणि एक कृतज्ञता यांचाबरोबर पुढे चला. तुम्ही आनंदी राहिले पाहिजे की आपण या ग्रहावर आहात, आणि जोपर्यंत तुम्ही इथे आहात, तुम्हाला सगळे चांगलेच करायचे आहे कारण सगळ्यांना निश्चितपणे इथून एक दिवस जायचे आहे.

प्रश्न : मला दोन सिद्धांतांचा परिचय करून दिला गेला आहे ज्यामुळे माझे गोंधळ होतो आहे; अ: मी करता नाही, ब: मला प्रत्येक लहान सहन गोष्टींची जबादारी घेतली पाहिजे माझे त्याचावर नियंत्रण नसले तरी, कृपया हे समजवा?
श्री श्री रवि शंकर :
जीवन या दोन गोष्टींचे संतुलन आहे. जबाबदारी घेणे आणि ती समर्पित करणे. आणि हे एक उत्तम संतुलन आहे. वर्तमान आणि भविष्य याची जबाबदारी घ्या आणि भूतकाळाबद्दल एक जाणून घ्या की हे असेच होणार होते आणि पुढे चला. परन्तु तुम्ही बऱ्याच वेळा याच्या विरुद्ध करता. तुम्ही विचार करता की भूतकाळ तुमची स्वतंत्र इच्छा होती आणि त्याचा पश्चात्ताप करता. आणि भविष्याला भाग्य समजून त्यासाठी काहीच करत नाहीत. तुम्हाला माहिती आहे का की ज्ञानी लोक काय करतात? ते भविष्याला स्वतंत्र इच्छा, आणि भूतकाळाला भाग्य समजतात आणि वर्तमानात खुश राहतात. यासाठी तुम्ही तुमच्या भूतकाळाचा पश्चात्ताप करू नका आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला भविष्यात काय करायचे आहे आणि त्याचसाठी सक्रीय व्हा.  
The Art of living

सहजता आणि सरलता यांचा अभाव म्हणजेच अहंकार!


प्रश्न: चांगले आणि वाईट कर्मामध्ये काय अंतर आहे?
श्री श्री रवि शंकर:
कर्माला चांगले वाईट असे नाव आपण देतो. तणावातून आपण जे काही करतो ती सर्व वाईट कर्मे आहेत. प्रसन्न चित्ताने जे काही कराल ते सर्व चांगले असते. एक गोष्ट आहे- बोधिसत्व चीनला गेले. तेंव्हा चीनचा चक्रवर्ति राजा स्वागत करण्यासाठी आला, म्हणाला " आम्ही इतके तलाव बांधले आहेत, इतके सगळे केले आहे, अन्न दान केले आहे, हे केले आहे, ते केले आहे." हे सर्व ऐकल्यानंतर बोद्धिसत्व ने म्हणाले की तू नरकात जाशील. हे काय चांगले कर्म आहे!  का? मी करत आहे. मी करता आहे! हे सगळे करता भावाने केले आहे. तणावातून केले आहे. अहंकाराने केले आहे. तेंव्हा ते चांगले कर्म असले तरी ते वाईट कर्म बनते.

प्रश्न: गुरुजी अहंकार काय आहे आणि त्याला कसे नष्ट करता येईल?
श्री श्री रवि शंकर
: स्वतःला या सगळ्या गोष्टींपासून वेगळे मानणे म्हणजे अहंकार. इतरांपासून स्वतःला वेगळे मानणे. मी खूप चांगला आहे, सगळ्यांपेक्षा चांगला आहे किंवा वाईट आहे. दोन्ही अहंकार आहे. आणि अहंकार तोडायचा प्रयत्न पण करू नका. असे वाटते, त्याला राहू देत. जर असे वाटत असेल की मला अहंकार आहे तर म्हणा ठीक आहे, माझा खिशातच राहा! काही प्रोब्लेम नाही! ते आपले आपण सहज होऊन जाईल. सहजतेचा अभाव हाच अहंकार आहे. सरलतेचा अभाव हाच अहंकार आहे. आपलेपणाचा अभाव अहंकार आहे. आत्मीयता असल्याचा अभाव अहंकार है. आणि याला तोडण्यासाठी सहजता, आत्मीयता, आपलेपणा, सरलता या गोष्टी जीवनात आणाव्या लागतील

प्रश्न: जर कुणा जवळच्या व्यक्तीचे निधन झाले तर त्यांच्या आत्म्याच्या शांती साठी काय करू शकतो?
श्री श्री रवि शंकर
: तुम्ही शांत व्हा. जसे तुम्ही शांत व्हाल, प्रेमाने पूर्ण होता, भजनामध्ये एक होता, ज्ञानात एक होता, ज्ञानात राहता, तेंव्हा जे लोक पलीकडे गेले आहेत त्यानाही खूप छान वाटते. आत्ता आपण इथे बसून ध्यान करत आहात, केले आहे, सगळ्याचा परिणाम फक्त तुमच्यावर नाही तर त्यांचावारही आहे जे पलीकडे पोचले आहेत.

प्रश्न: आपण आपली सहनशीलता कशी वाढवू शकतो?
श्री श्री रवि शंकर
: परत तीच गोष्ट! माझ्यात सहनशीलता नाही हे जेंव्हा मानून चालतो तेंव्हा ते तसेच होते. माझी आज्जी नेहमी म्हणायची की कुठलीही गोष्ट नाकारात्मक बोलु नये. का? ती म्हणायची की काही देवता घरात असतात त्यांचे नाव आहे वास्तू देवता. तुम्ही काही म्हणाला त्याला ते तथास्तु म्हणतात. समजून चला की घरी मिठाई नाही तर मिठाई नाही असे कधीही म्हणायची नाही. म्हणायची की बाजारात भरपूर मिठाई आहे, चला बाजारात जाऊयात. शब्दांमध्येही ती कधीही नाही म्हणायची की मिठाई संपली आहे. म्हणाल तर माहिती नाही की कुठे वास्तू देवता असेल आणि तथास्तु म्हणेल. मग सगळे संपलेलेच असेल. याच प्रकारे जर काजू हवे असतील तर बाजारात काजू भरलेले आहेत, बाजारात चला.
त्या पिढीतल्या लोकांच्या मनात किती विश्वास होता.आणि ही गोष्ट खरी पण आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही हे खरे आहे. आपण ज्याला ण समजत मानतो, ते तसेच होते. आभावाला मानल तर अभाव राहतो. खूप लोक म्हणतात की पैसे नाहीत तर वास्तू देवता लगेच तथास्तु म्हणते.  जे आयुष्यभर ' नाही नाही' चे गाणे लावतात, ते कधीच तृप्त नसतात. एक समृद्धि चा अनुभव करा. माझ्या जवळ सर्व काही आहे. मग तुमच्याजवळ सर्व गोष्टी यायला लागतील. माझ्या जवळ नाही, माझ्यात प्रेम नाही मग तसेच वाटायला लागते. मी खूप प्रेमळ आहे. समजून चला, तेंव्हा मनात प्रेमच झळकेल.

एक अतिशय कंजूस व्यक्ति माझ्याजवळ येते तर मी बोलतो की तू किती उदार आहेस. तेंव्हा एक जण माझ्याजवळ येऊन म्हणाले  "गुरुजी तुम्ही नेहमी म्हणता की मी उदार आहे. मी कुठे उदार आहे? मी किती कंजूष आहे. मी माझ्या पत्नीला दहा रुपये सुद्धा खर्चू देत नाही. तुम्ही मला उदार कसे म्हणू शकता? मुले काँगेस प्रदर्शनात जातात तेंव्हा एक-दोन कैन्डी विकत घ्यायला पण मला त्रास होतो. मी एकच मिठाई घेऊन देतो, आणि तुम्ही मला उदार म्हणता.
कारण तू उदार बनावे.
ज्या भावना तुमच्या मनात आणायची इच्छा होते, ते मानून चाल, ते आपलेच आहे. त्याला नाही असे मानून चालला तर नाही होणार.
हे लक्षात ठेवा, " काजू भरलेले आहेत, बाजारात जाऊयात!"

प्रश्न: गुरुजी, लग्नात प्रेम असून सुधा इतकी भांडणे का होतात?
श्री श्री रवि शंकर
: काय म्हणायचे? मला तर काहीच माहिती नाही! माहिती करून घ्यायची चेष्टा पण केली नाही! होऊ शकते की काही जोड स्वर्गात बनले तिथे थकले आणि मग नरकात उतरले, किंवा असेही असेल की नरकातल्या विशेष भागात आले.
पहा, प्रत्येक संबंधांमध्ये कुठे ना कुठे, कधी ना कधी, काही ना काही गडबड ही होताच असते आणि ते ठीक पण होते. तेंव्हा प्रत्येक परिस्थितीमध्ये स्वतःच्या मनाला समजावा, संभाळा, त्याने सर्व गोष्टी ठीक होतील. कधी ना कधी गोष्टी ठीक होतातच.

परदेशात अजूनही एका देशात ८२ वर्षाचा पुरुषाने, ८० वर्षाच्या आपल्या पत्नीवर कोर्ट केस केली. घटस्फोट घेतला ८० वर्षानंतर. ४० वर्ष एकसाथ राहिले दोघे. शेवटी केस का केली? ज्या खुर्चीवर तो रोज बसायचा, पत्नी ती देत नव्हती! सोडायला तयार नव्हती! बाकी प्रत्येक गोष्टीचे दोन भाग झाले, खुर्चीची गोष्ट घेऊन कोर्टात एव्हडी मोठी केस झाली! माणसाचा मेंदू खूप विचित्र आहे! ज्याचाशी मैत्री करतो त्याचाशी भांडण करतो. आणि ज्याचाशी भांडतो परत त्याचाशीच मैत्री करण्यासाठी तडफडतो. 

तर हे जीवन खूप जटील आहे, आणि जटिल जीवनात हसत हसत निघून जाणे हीच बुद्धीमानी आहे. फक्त व्यक्तिलाच पाहत बसाल तर अज्ञानात राहाल. व्यक्ती नाही व्यवहार होतो. व्यक्तीच्या मागे जी चेतना आहे, सत्ता आहे, त्याला पाहाल तर ती एकच चेतना आहे - या व्यक्ती कडून असे करून घेतले, त्या व्यक्तीकडून तसे करून घेतले. अशा प्रकारे व्यक्तीच्या मागे जी चेतना आहे, जीचामुळे सर्व होते, त्याला ओळखणे हेच ज्ञान आहे. समजलात का?

आपण सगळ्यांना पाहाल तर प्रत्येक व्यक्तीमध्ये काय आहे  Hollow and Empty. आणि जसा विचार आला तसा त्यांनी काही व्यवहार केला. त्यांची काय चूक.

प्रश्न: गुरु आणि ऋषिकडून काही मागितले पाहिजे का?
श्री श्री रवि शंकर
: हे तर मागितलेच. काही उत्तर तर मागितलेच आहे. जेंव्हा मागणी येते तेंव्हा ती आल्यावरच तुम्ही विचार करता की मागू की नको.आली मागणी. तहान लागली तर पाण्याची मागणी येते. पाण्याचा मागनिलाच तहान म्हणतात. भूक म्हणजेच जेवणाची मागणी. मागणी स्वाभाविक आहे. मागणी आल्यावरच कळते की मागणी आली. काय? नाही? आता करावे न करावे - गोष्टच नाही. करून टाकले. करूनच समजेल की केले. केल्यानंतरच कळले की मी मागितले आहे. ती खरी मागणी जी आतून आली आहे, खोलवरून, आवश्यकता आहे. आशी आवश्यक मागणी पूर्ण होणारच आहे. पूर्ण होते.

प्रश्न: बेसिक कोर्स सांगतात, "जो जसा आहे तसे त्याचा स्वीकार करा." याचा अर्थ असा आहे की भ्रष्ट नेत्यांचा पण स्वीकार करायचा जे आपल्या देशाला विकायला बसले आहेत ?
श्री श्री रवि शंकर
: तीन प्रकारच्या दक्षता समजून घ्या- शारीरिक, वाचिक और मानसिक - कृत्यात, वाणीत आणि भावनांमध्ये. जसे काही लोक करतात- बोल्त खूप चांगले, गोड गोड पण कामाची वेळ येईल तेंव्हा काम नाही करणार. हे काय? वाणी तर ठीक आहेत पण कृत्या मध्ये नाही. खूप लोकांचे मन खूप साफ आहे ते भावनेमध्ये ठीक आहे , पण जसे तोंड उघडतील तसे आग ओकू लागतात. समाजात ही खूप मोठी समस्या आहे. व्यक्ती चांगल्या आहेत, काम पण चांगले करतात, पण जसे तोंड उघडतात तसे लोकांना वाटते की कान बंद करावेत. काही लोक काम ठीक ठीक करतात पण बोलत नाहीत. आणि काही लोक काम ओं ठीक करतात, बोलतात पण ठीक आणि मन मात्र ठीक नसते, भावना ठीक नसतात. खूप कमी लोक मिळतील ज्यांचे भाव, वाणी आणि कृत्य पण शुद्ध आहे. किती वेळा आपण टेलर ला कपड़े देतो तो चांगली चांगली गोड गोड गोष्टी करेल, दिवाळीच्या एक दिवस आधी या, देऊन टाकू! त्यांचा मनात काही चुकीची भावना नसेल, त्यांच्या मनात खोटे बोलणे किंवा धोका देणे या भावना नसतील - भाव ठीक असेल, वाणी ठीक असेल, पण कृत्यामध्ये गडबड. काही लोक आपल्या कृत्यात गडबड करतात. बोलतात चांगले, भाव पण ठीक आहे पण तुम्ही लोक असे समजत की त्यांनी जाणून बुजून केले - तेंव्हा तुमचा भाव गडबड झाला. त्यांचे कृत्य गडबड झाले आणि तुमचा भाव गडबड झाला. तुम्ही दोगेही एकच बोटीत आहात. तिन्हींची शुद्धि पाहिजे - वाणी शुद्ध पाहिजे, कृत्य शुद्ध पाहिजे आणि भावनेची शुद्धी पाहिजे. तेंव्हाच सिद्ध व्हाल  - Perfection.
The Art of living

आपण आनंदी राहिले पाहिजे आणि इतरांना आनंदी ठेवले पाहिजे

बेंगलोर, मे ८, २०११

श्री श्री रवि शंकर: स्वतः ला शांत ठेवण्यासाठी दिवसातला काही वेळ आपण मोकळा ठेवला पाहिजे. यासाठी, आपण सजग राहिले पाहिजे की जे आज आहे ते काही काळाने नसणार आहे, पाण्याच्या बुडबुड्यासारखे. अस्थिरतेबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. आपण जगतो तर आनंदात जगावे आणि इतरांना आनंदात ठेवावे. आपण जेंव्हा मृत्यूला आठवतो तेंव्हा आयुष्याचे प्रश्न कमी वाटतात.
आपण जगताना आपल्याला दोन गोष्टी मिळवायच्या असतात - आपण किती प्रेम वाटले आणि किती ज्ञान मिळवले. याच दोन गोष्टी अशा आहेत की ज्या मेल्यावर सुद्धा आपल्याबरोबर राहतात.

दररोज थोडावेळ बसून ध्यान केले पाहिजे - दुसरे की विचार करतात अशा अनावश्यक गोष्टींपासून मोकळे व्हा. आपल्याला हे जाणून घेतले पाहिजे की देव(परमात्मा) सगळ्यांमध्ये आहे. जर तो सगळ्यांमध्ये नसेल, तर आपण त्याला देव म्हणू शकत नाही. तो नेहमी इथे आहे, सगळीकडे आणि आपल्या सगळ्यांमध्ये. आपण डोळे बंद करून त्याला पाहतो आणि यालाच ध्यान म्हणतात. गुरु, देव आणि आत्मा हे सारखेच आहेत.

जेंव्हा तुम्ही आश्रमात येत, तुमचा सगळ्या चिंता इथेच सोडून द्या - त्यांना तुमच्याबरोबर परत घेऊन जाऊ नका.
तुम्ही जेंव्हा सेवा करता, तुमचा गरजांची काळजी घेतली जाते. आपले काम ज्ञान पसरवणे हे आहे. तुम्ही ज्ञान पसरवा, आणि तुम्हाला जे गरजेचे आहे ते आपोआप होईलच.

आपली स्वतःची कमाई स्वतःवरच खरच करण्यात काही अर्थ नाही. त्यातले २-३ टक्के सामाजिक कार्य, धर्म जागृती (सत्य पसरवणे) यासाठी दिले पाहिजेत – त्याने भ्रष्टाचार कमी होईल. आपण सगळे एकत्र आले पाहिजे आणि देशवासियांना त्यासाठी उत्तेजन दिले पाहिजे.

जेंव्हा तुम्हाला प्रश्न पडेल स्वतःला विचारा, आणि जर उत्तर नाही मिळाले, तरच तुमच्या गुरूला विचारा. तुमच्या प्रारब्धानुसार(मागचे कर्म) तुम्हाला बाकीचा गोष्टी मिळतील आणि सगळ्या चांगल्याच गोष्टी होतील.

संगीत, ध्यान आणि ज्ञान - या तीनही गोष्टी आयुष्यात असल्या पाहिजेत

महिला दिन विशेष

बंगलोर, मार्च ८,२०११

प्रश्न: कृपया अर्धनारीश्वर या संकल्पनेबद्दल विस्तारित स्वरुपात सांगा.
श्री श्री रविशंकर: सगळ्यांमध्ये स्त्री आणि पुरुषाची गुणसूत्रे असतात. तुम्ही तुमचे आई व वडील दोघांपासून बनले आहात. तुम्ही अर्धे आई व अर्धे वडील यांपासून बनले आहात. दिव्यातेमध्ये स्त्री व पुरुष दोहोंची तत्वे आहेत. हे खूप आधी समजले होते आणि अर्धनारीश्वर च्या रुपात दाखवले होते.भगवान फक्त पुरुष किंवा महिला नाही - अर्धनारीश्वर आहे. सृष्टिमध्ये पुरुष आणि महिला दोन्ही तत्व आहेत.

देवी दुर्गा वाघावरून येते ; दुर्गा आई आहे, जी किती सौम्य  करुणामयी आहे, तरीसुद्धा वाघावर बसते जो अतिशय क्रूर आहे. हा किती मोठा विरोधाभास आहे.! विरोधाभासी मूल्य एक दुसऱ्याला पूरक आहेत आणि प्राचीन लोकांना याची माहिती होती. वैज्ञानिक दृष्टिकोण पाहता जर एक जरी जनावर लुप्त झाला तर सृष्टी टिकू शकत नाही. प्रत्येक जनावर पृथ्वीवर तरंगाच्या रुपात विशिष्ठ उर्जा आणत असतो. वाघ दुर्गा देवीच्या स्पन्दनाना पृथ्वीवर आणतो.

देवी सरस्वतीला अनेक हात दाखवले आहेत! एका हातात जप माला आहे जे ध्यान दाखवते, त्यांच्या दूसऱ्या हातात पुस्तक आहे,जो बौद्धिक ज्ञान दाखवते आणि एका हाताने वीणा वाजवताना दाखवले जाते. म्हणूनच जेंव्हा बौद्धिक ज्ञान, संगीत और ध्यान एकत्र असतात तेंव्हा ज्ञानाच उदय होतो. लाखो हजार वर्षांपूर्वी हे ज्ञान होते. देवी सरस्वती एका दगडावर बसली आहे, याचा अर्थ असा आहे की जेंव्हा तुम्हाला ज्ञान प्राप्ती होते तेंव्हा ते तुमच्यामध्ये खोलवर जाऊन बसते. देवी लक्ष्मी कमलावर बसली आहे, याचा अर्थ असा की लक्ष्मी चंचल आहे. धन अस्थिर असून गतीवान आहे आणि गतीवान असला पाहिजे.

प्रश्न: स्त्री साथी लग्न करणे महत्वपूर्ण आहे का? देवानेच तिची काळजी घ्यावी हे ठीक नाही का? आई न बनता सुद्धा ती परिपूर्ण आहे का?
श्री श्री रविशंकर: तुम्ही सर्व जगाची आई असल्याचा अनुभव घेऊ शकता, आई पानाचा भाव हा प्रत्येक व्यक्तीचा नैसर्गिक स्वभाव आहे, त्यामुळेच करुणा, प्रेम आणि ओढ आहे.
 विवाह केला पाहिजे अथवा नाही हा व्यक्तिगत निर्णय आहे. आनंदी राहणे सगळ्यात महात्व्चे आहे. हे माझे मत आहे. असे किती आहेत जे अविवाहित आहेत आणि खुश आहेत, आणि असे किती आहेत जे विवाहित आहेत परन्तु खुश नाहीत आणि याच्या विरुद्ध पण आहे. निवड तुमची आणि आशीर्वाद माझे!

प्रश्न: जेंव्हा घरातल्या मोठ्या व्यक्तीच परंपरा आणि पारंपारिक मूल्यांना विसरले आहेत तेंव्हा मी घरातील एक स्त्री म्हणून की करू शकते?
श्री श्री रविशंकर: तुम्हाला जे काही शिकायचे आहे ते तुम्ही इंटरनेट वर शिकू शकता. हे किती अद्भुत युग आहे, एका लैपटोप वर गूगल वर शोधून पृथ्वीवर उपलब्ध असलेली कुठलीही माहिती सहजतेने उपलब्ध होऊ शकते. सर्व सूचना हाताच्या बोटांवर उपलब्ध आहेत. मी नेहमी सांगायचो की ज्ञान हातच्या बोटांवर उपलब्ध होईल आणि जे मला ऐकायचे त्यानाही माहित नव्हते की मी असे का सांगत आहे. सर्व माहिती याने उपलब्ध आहे. मी त्याला ज्ञान तर नाही म्हणणार पण माहिती  म्हणू शकतो. 

प्रश्न: कधी पुरुष दिवस पण असेल का?
श्री श्री रविशंकर: (हसून) त्यसाठी सुद्धा देवी ची (स्त्री जाति) प्रार्थना करावी लागेल.
राक्षस आणि देवता सिद्ध त्यांचाकडे वरदान मागत असत. कोणी गम्मत करताना सांगत होते की :एकदा एका माणसाने कुणाला तरी विचारले की या घराचा मालक कोण आहे, ती व्यक्ती म्हणाली की माझा बायकोला विचारून सांगतो!

प्रश्न: कुठलेही लक्ष प्राप्त करण्यासाठी मानवा मध्ये कुठले ८ महत्वपूर्ण गुण पाहिजेत?
श्री श्री रविशंकर: त्या संख्येला फक्त ८ वरच का थांबवत आहात ? तुम्हाला त्या ८ ची यादी हवी की की त्या ८ चा विस्तार. यावर विचार करूयात.
सगळ्यात पहिले तर लक्ष ठरावा. मन इतके चंचल आहे, यासाठी लक्ष ठरवणे महत्वपूर्ण आहे. नंतर तुम्हाला त्यासाठीचा वेळ मर्यादा ठरवायला लागेल. नंतर त्याचा अनुकूल आणि प्रतिकूल परिणामांचा अनुमान लावणे आणि परिस्थितीनुरूप बदलायची तुमची क्षमता वाढवायला लागेल. लक्ष पूर्ती साथी लागणारी साधणे गोळा करणेही सगळ्यात महत्वपूर्ण आहे.

प्रश्न: स्त्री आणि पुरुषांसाठी आध्यात्मिक मार्ग भिन्न आहेत का?
श्री श्री रविशंकर: नाही. आध्यात्म महिला आणि पुरुष दोघांसाठी समान आहे.
इतिहासात काही काळासाठी पुरुषांनी महिलांवर काही निर्बंध लावले होते, ज्यामुळे महिला सत्तेमध्ये येऊ शकल्या नाहीत. परन्तु समाजाचे काही कायदे असतात आणि प्रत्येक व्यक्तीने त्यांचे पालन केले पाहिजे.

प्रश्न: मृत्यु आणि पुनर्जन्म यांच्या मधल्या वेळात की होते ?
श्री श्री रविशंकर: निद्रा अवस्थेतून जाग्रित अवस्थेमध्ये तुम्ही येत तेंव्हा काय होते? तसेच होते- तुम्ही निष्क्रिय होता. जेंव्हा वेळ येते तेंव्हा चेतना परत येते.

प्रश्न: आपल्या महाकाव्यांमध्ये महिलांनी अनेक असाधारण काम केले आहेत, ज्यावर विश्वास करणे कठिण आहे! तुम्ही यानाद्दल काही सांगा.
श्री श्री रविशंकर: उदाहरण घ्यायचे झाले तर आपण गांधारी बद्दल boluyat, तिने मदक्यान्मधून १०० मुलांना जन्म दिला आहे. वास्तवाट त्यांनी टेस्ट ट्यूब बाळांना जन्म दिला. एक भ्रूण आणि १०० मडकी! आपल्याला तेंव्हाही यामागचे विज्ञान माहिती होते !
जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत ते केवळ तथ्य असते. जसे कोणीही विश्वास ठेवत नाही की डायनासोर होते परन्तु त्यांच्या असण्याचे पुरावे आपल्याकडे आहेत. जटायु एक डायनासोर पक्षी ज्यावर सीतेने सवारी केली होती. भगवान श्री कृष्ण च्या आस्तित्व बद्दल सुद्धा पुरावे आहेत. त्याला ज्याप्रकारे पुढे आणले जाते ते बऱ्याच वेळा कल्पना आणि  तथ्य यावर आधारित असते. जसे कुठल्या कवितेमध्ये कल्पना आणि तथ्य यांचे मिश्रण असते. जर तुम्ही अब्दुल कलाम ,जवाहरलाल नेहरु किंवा इंदिरा गाँधी यांच्या आयुष्याबद्दल वाचाल तर तुम्हाला कळेल की, त्यात कित्येक गोष्टी जोडल्या जातात.

प्रश्न: वर्तमान क्षणात आणि प्रभावकारी राहण्यासाठी मला काय केले पाहिजे?
श्री श्री रविशंकर: तुम्ही आत्ता ठरवत आहात की भविष्यात वर्तमान क्षणात राहण्यासाठी तुम्हाला काय केले पाहिजे! तुम्हाला कळते आहे की मी काय म्हणत आहे?

प्रश्न: कृपया आध्यात्म आणि साम्यवाद यातील सामानातेबद्दल सांगा?
श्री श्री रविशंकर: हाँ, साम्यवाद म्हणतो की सर्वाना समा संधी मिळाली पाहिजे. आध्यात्म म्हणते की दिव्यता सगळ्यांमध्ये आहे आणि प्रत्येक जण ईश्वर आहे. अशाप्रकारे दोघेही एकच गोष्ट सांगतात. तुमच्या भावना समान असतील पण अभिव्यक्ति वेगवेगळी असू शकते. तुम्ही प्रेम वेगवेगळ्या रुपात अभिव्यक्त करता जसे की एखादे लहान मूळ अथवा वृद्ध यांच्या बद्दल वेगळे प्रेम असते.

(गंगा अशी नदी आहे की जिचा निर्माण प्राचीन लोकांनी केला – http://www.bharathgyan.com/ वेब साईट वर भागीरथी बद्दल तथ्य आणि गोष्टी आहेत की कसे संतानी आणि त्यांचा सहकार्यांनी त्याची संरचना केली आणि कसे मानसरोवर चा प्रवाह पश्चिम दिशेकडून केला.

प्रश्न: मानसिक रूपाने विक्षिप्त असलेल्या लोकांबरोबर कसे राहावे याबद्दल सांगा?
श्रीश्री रविशंकर: ते लोक इथे सेवा घेण्यासाठी आले आहेत, त्यांची सेवा करा!!!

जीवन साथी

सोमवार, ऑगस्ट , १६, २०१०


प्रश्न : गुरुजी, माझ्यामध्ये एक वर्षाचा संकल्प घेण्याची क्षमता नाही. मी काय करू?

श्री श्री रवि शंकर : क्षमता नाही? एक एक दिवसाच्या संकल्पाने सुरुवात करा. एक दिवसाचा जरी संकल्प करू शकलात तरी ते पुरेसे आहे. तुम्ही रोज असे करा. असा विचार नका करू की, "अरे देवा, मला आता एक वर्ष भर हे करायचे आहे.’ आज मी करत आहे– हे चांगले आहे. उद्या करेन - हे चांगले आहे.


प्रश्न : प्रिय गुरुजी, मी खूप प्रार्थना केली होती की या आठवड्यात तुम्ही इथे यावे. तुम्ही इथे आलात यासाठी मी आभारी आहे. प्रार्थनेबद्दल काही सांगा.
श्री श्री रवि शंकर :
जेंव्हा तुम्हाला खूप आभारी वाटत असते किंवा लाचार वाटत असते, तिथे प्रार्थनेचा जन्म होतो. प्रार्थनेचा उदय होण्याचे तिसरे कारण असे आहे की जेंव्हा तुम्ही ज्ञानात स्थित होता. तेंव्हा तुम्हाला दिसते की चेतनेचा विस्तार झाला आहे, चेतनेच्या एका नव्या आयामात तुम्ही पोचला आहात, की जो पूर्ण आहे, अंतर्ज्ञान, ज्ञान आणि प्रेमाने भरलेला आहे.



प्रश्न : कृपया नात्यांबद्दल सांगा. बऱ्याच वेळा ती इतकी अवघड का होतात?
श्री श्री रवि शंकर :
तुम्हाला परत एकदा ‘Celebrating Love’ हे पुस्तक वाचले पाहिजे. तुम्हाला की वाटते की नात्यांमध्ये अडचणी का येतात?



प्रश्न : मला माझ्या भावना व्यक्त करता येत नाहीत. उलट जेंव्हा मी माझ्या भावना लपवतो तेंव्हा मला ताण येतो. मला कळत नाही की या परिस्थितीतून मी कसा बाहेर पडू. तुम्ही सांगितल्याप्रमाणे ध्यान करून सुद्धा मनाला रिकामे करणे अवघड आहे का?
श्री श्री रवि शंकर :
जर तुमच्या डोक्यात खूप विचार येत असतील, तर त्यामागे काही करणे आहेत. एक कारण तर असे आहे की पोट साफ नसणे, पोटाला तडस लागणे, असे असेल तर मनात खूप विचार येतात. जर शरीरात रक्त प्रवाह नीट नसेल तरी पण खूप विचार येतात.  हो की नाई? तर, योगासन आणि प्राणायाम केल्याने तुम्हाला मदत मिळेल. योग्य आहार केल्याने मदत मिळेल. आयुर्वेदिक डौक्टरना दाखवा. तो सांगेल, जर शरीरात पित्त जास्त झाले असेल तर त्यानुसार योग्य जेवण केल्याने मदत मिळेल.



प्रश्न : ज्या लोकांमध्ये आक्रमकता, ईर्ष्या आणि असंतुलन  अशा नकारात्मक प्रवृत्ती असलेल्या लोकांबरोबर काम कसे करायचे?
श्री श्री रवि शंकर :
कौशल्याने. त्यांच्या वागण्यावर प्रतिक्रिया देताना कारुण्याचा उपयोग करा आणि बघा की तुम्ही त्यांच्या बरोबर कसे काम करू शकता. हां? यातून पहिली गोष्ट अशी होईल की तुमचे कौशल्य वाढेल. दुसरी गोष्ट अशी की धैर्य वाढेल. तीसरी गोष्ट अशी की तुम्हाला कळेल की ती व्यक्ती नेहमी ईर्ष्यापूर्ण किंवा रागात नसतो. तो पण बदलतो. तुम्हाला बघून आश्चर्य वाटेल की लोक कसे बदलतात.



प्रश्न : लहान मुलांसारखे होणे आणि जबाबदारी घेणे यात काय साम्य आहे?
श्री श्री रवि शंकर :
तुम्ही जबाबदारी घेता ही एक गोष्ट झाली. लहान मुलासारखे होण्याने जबाबदारी घेण्याला काही फरक पडत नाही. उलट यामुळे जबाबदारी घेण्याला मदत मिळते.



लहान मुलासारखे होणे आणि लहान मूल होणे यात फरक काय आहे? लहान मूल झाल्यावर तुम्ही जबाबदारी घेऊ शकत नाही. लहान मुलासारखे होऊन जबाबदारी घेता तेंव्हा तुम्ही नैसर्गिक राहता, सगळ्यांबरोबर मिळून मिसळून घेता, सगळ्यांकडून प्रतिक्रिया मागता, आणि जर कुठली प्रतिकूल प्रतिक्रिया असेल तर तुम्ही त्यामुळे चिंतेत पडत नाही, त्याचा सामना करता. जर ते योग्य असेल तर त्याचा स्वीकार करा, जर निरर्थक असेल तर स्वतःचा तोल न ढळू देता त्याकडे दुर्लक्ष करा.


प्रश्न : आपण आपल्या ग्रहासाठी काम करणे किती आवश्यक आहे?आपण की करू शकतो? आपण हे सगळे कसे टिकवून ठेवू शकतो?
श्री श्री रवि शंकर
: आपल्याला या गोष्टींबद्दल जागरूक राहायला लागेल की हा ग्रह म्हणजे आपले घर आहे. जेंव्हा आपण वरून पाहतो तेंव्हा आपल्याला देशांच्या सीमा दिसत नाहीत. सीमा रेषा या आपल्या समजुतीच्या सीमा रेषा आहेत, आपला भ्रम आहे. खरे तर कुठलीच सीमा रेषा नाही. आकाशाला सीमा रेषा माहित नाहीत. ढगांना पण या सीमा कळत नाहीत. हवेला कुठलीही सीमा नाही. या पृथ्वीचे पाचही तत्व सीमा रेषा मनात नाहीत. हा ग्रह सगळ्यांचेच घर आहे. आपण सगळे एकच कुटुंब आहोत, यासाठी आपल्याला बृहद दृष्टिकोण ठेवायला पाहिजे. योग्य दृष्टिकोण काय आहे? तर हा पूर्ण ग्रह आपले घर आहे.



आपण आपला परमाणु कचरा इथे तिथे फेकू शकत नाही. जगात कुठेही ती जागा असो, परत आपल्याकडेच ते पोचेल! आपण कुठलीही एक जागा सीमाबद्ध करून साफ नाही ठेवू शकत. हे शक्य नाही. आपल्याला पूर्ण ग्रहाची काळजी घेतली पाहिजे. आपल्याला पूर्ण जगाला जैविक शेतीकडे घेऊन गेले पाहिजे. जेंव्हा जेवण किंवा पीक पिकवण्याची वेळ येते तेंव्हा आपण हे नाही सांगू शकत की ' ठीक आहे, मी केवळ इथेच जैविक शेती करेन, बाकी जगात प्रदूषण होऊ देत!' कारण हवेतून सगळीकडे प्रदूषण पोचणार आहे! आपण निसर्गामध्ये ढवळाढवळ करून खूप व्हायरसना जन्म दिला आहे. आपण पृथ्वीवरचे कित्येक जीव नष्ट केले आहेत. आपण पृथ्वीची काळजी नाही केली, की ज्यामुळे अन्नाचे उत्पन्न खूप कमी झाले आहे. येणाऱ्या पिढ्यांना यामुळे खूप अडचणींचा सामना करावा लागणार आहे.


मला असे वाटते की या ग्रहावर प्रत्येक व्यक्तीला पृथ्वी प्रदूषण मुक्त करण्याची, पृथ्वी टिकवून ठेवायची आणि तिचा विकास करायची, जलाशय तसेच पाण्याचे रक्षण करणे व जास्तीत जास्त झाडे लावणे याची जबाबदारी घ्यायला लागेल. हे खूप आवश्यक आहे!


जगाची अजून एक मोठी समस्या आहे ती महणजे पाण्याची कमतरता. लाखो लोक उपासमारीच्या टोकावर आहेत. आपल्याला पूर्ण जगाकडे लक्ष ठेवून त्याची काळजी घेतली पाहिजे. हां, आपल्याला आपले घर, आपला शेजार पाजार, जिथे आपण राहतो तिथली काळजी तर घेतलीच पाहिजे. हे सगळ्यात जास्त जरुरी आहे, पण त्याच बरोबर ही पण काळजी घेतली पाहिजे की या ग्रहावरचा प्रत्येकजन या कुटुंबाचा एक भाग आहे.


प्रश्न : हे शक्य आहे का की आपण प्रेम पण करावे आणि आतूनही मजबूत राहू, प्रेम पण करू आणि तर्कसंगत पण राहू, प्रेम करूनही वैराग्यात पण राहू, प्रेम भी करूनही ईर्ष्या आणि परिग्रह यापासून दूर राहू?
श्री श्री रवि शंकर : नक्कीच. जर ज्ञान असेल तर हे शक्य आहे की तुम्ही प्रेम पण करू शकाल आणि या नकारात्मक भावनांपासून दूर राहाल. भावनांपासुन दूर राहाल. ज्ञानाबरोबर प्रेम असणे आनंददायक आहे. जर प्रेमाबरोबर ज्ञान नसेल तर तुम्ही सांगितले ते सर्व होते – ईर्ष्या, लालच, इत्यादि।


प्रश्न : प्रिय गुरुजी, आपण मला मार्गदर्शन कराल का - मी ज्या व्यक्तीवर एक वर्षापासून प्रेम करते ती व्यक्ती माझासाठी योग्य आहे का?
श्री श्री रवि शंकर :
तुम्ही जेंव्हा एखाद्यावर गाढ प्रेम करता तेंव्हा ती व्यक्ती तेव्हाद्यापुरती ठीक असेल. पण भविष्यातही ठीक असेल हे कोणी सांगू शकत नाही. हे तुमच्यावर आहे की ती परिस्थिती तुम्ही कशी संभाळाल. तुम्ही कुणावर प्रेम करत असाल तर आधी हे माहिती करून घ्या की की तीव्याक्ती पण तुमच्यावर प्रेम करते की नाही. जर ती व्यक्ती पण तुमच्यावर प्रेम करत असेल तर दोघांनी मिळून ज्ञानात राहून पहा की हे प्रेम टिकवून कसे ठेवायचे– पुढे कसे जाल, कसे वागला, इत्यादी, ठीक आहे!



प्रेमाची सुरुवात खूप सरळ असते, पण खूप लोक हे प्रेम टिकवून ठेवू शकत नाहीत.
जर कोणी तुमच्यावर प्रेम करत असेल आणि जर तुम्हाला त्याचा योग्य पद्धतीने स्वीकार करता आला नाही, त्याला वाढवता आले नाही तर तुम्ही ते घालवून बसता. ‘Celebrating Love’ या पुस्तकात मी त्या कौशल्याबद्दल सांगितले आहे, की ज्यामुळे तुम्ही प्रेम टिकवून ठेऊ शकता.