जेंव्हा तुम्ही दुसऱ्याच्या उपयोगी पडता तेंव्हा आयुष्य जगण्यायोग्य होते

इस्लामाबाद, पाकिस्तान
१३ मार्च २०१२

इथे तुमच्या बरोबर येऊन खूप छान वाटतय.
पहिल्यांदा ज्या शिक्षक आणि स्वयंसेवकांनी याचे आयोजन केले त्या सगळ्यांचे अभिनंदन. ज्या लोकांनी या साठी परिश्रम घेतले त्यांचे कौतुक आणि अनेक शुभेच्छा. काही वर्षापूर्वी सिंध प्रांतात आलेल्या पुरात YLTP  च्या तरुणांनी पुरग्रस्तांना मदत केली. ते काम चालू असताना मी त्यातील काहींशी फोनवर बोललो, पण आता मला त्यांचे प्रत्यक्ष अभिनंदन करायचे आहे. १ लाखापेक्षा जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांनी पीडितांना आधार दिला, शिबिरे घेतली, जीवनावश्यक वस्तू पुरवल्या, आणि घरे बांधली. संपूर्ण जगातून आर्ट ऑफ लिविंग च्या परिवाराने मदतीचा हात पुढे केला, सगळ्या जगातून त्यांना सहकार्य मिळाले. यातून आपण इथे दाखवून दिले की आपण एकटे नाही तर संपूर्ण जग आपले कुटुंब आहे. याचे एक वास्तव उदाहरण घालून दिल्याबद्दल मी खूप आनंदी आहे. माझी इच्छा आहे की जास्तीत जास्त लोकांनी आर्ट ऑफ लिविंग शिक्षक बनावे आणि प्रत्येक अश्रूचे हास्यात रुपांतर करावे.

आज ज्या वेगाने नैराश्य, कँन्सर, हृदय विकार वाढतायत, रक्तदाब, शारीरिक रोग, सामाजिक विवाद, दहशतवाद  ही सगळी आपण अध्यात्मीक क्षेत्रात कमी पडल्याची लक्षणे आहेत. कुठेतरी ती आपुलकीची भावना कमी आहे. म्हणूनच आर्ट ऑफ लिविंग समाजात ती आपुलकीची भावना निर्माण करणे, निरोगी शरीर, मानसिक आनंद, हृदयात सगळ्याबद्दल अपार प्रेम जागृत करण्यासाठी कटीबद्ध आहे.
मी नेहेमी म्हणतो हिंसाचार-मुक्त समाज, रोगमुक्त शरीर, तणावमुक्त मन, दडपणमुक्त बुद्धी, आघातमुक्त स्मुती आणि दुखः मुक्त चित्त हा सर्वांचा जन्मसिद्ध अधिकार आहे.
आपली बुद्धी दडपणाखाली असते. बरेचदा लोकांकडे खूप कल्पना असतात, पण ते दडपतात. आपल्याला दडपणापासून मुक्त व्हायचे आहे. आपल्याला असा अहंकार जपायचा आहे जो सगळ्यांना सामावून घेईल, फक्त “मी” नव्हे तर “आपण, या जगातील लोक”. हिंसाचारमुक्त समाज आणि रोगमुक्त शरीर ही कल्पना समोर ठेवून आर्ट ऑफ लिविंग ने जे काम केले आहे त्यामुळे एकीकडे खूप आनंद आहे पण त्याच बरोबर लाखो करोडो लोकांपर्यंत पोहोचायची आणि त्यांना शांतता आणि आनंद देण्याची एक मोठी जबाबदारी पण आहे. मला खात्री आहे की तुम्ही हे काम कराल. जेंव्हा तुम्ही दुसऱ्याच्या उपयोगी पडता तेंव्हा आयुष्य जगण्यायोग्य होते. वस्तू किंवा पदार्थ देऊन केलेली मदत हा एक प्रकार, पण तो फार काळ टिकत नाही. दुसऱ्यांना आपले मन, भावना आणि त्यांचे अंतरंग अधिक चांगले कसे होईल यासाठी ज्ञान देणे ही मोठी मदत होईल. हे म्हणजे कोणाला तरी मासेमारी शिकवण्यापेक्षा मासे देण्यासारखे आहे. या अर्थाचे एक सुभाषित आहे.
आर्ट ऑफ लिविंग हेच करत आहे – लोकांना त्यांचे मन, भावना, त्यांच्या कल्पना, त्यांच्या मर्यादा, त्या मर्यादान्मधून बाहेर पडणे यांचे व्यवस्थापन शिकवते. लोकांचा, परिस्थितीचा जसे आहेत तसा स्वीकार करा, आणि त्यांना चांगल्यासाठी बदलण्याचा प्रयत्न करा.
संपूर्ण दक्षिण आशिया, अमेरिका आणि अगदी युरोप मधे सुद्धा आज भ्रष्टाचार हा सगळ्यात मोठ्ठा प्रश्न आहे. भारतात आर्ट ऑफ लिविंग च्या स्वयंसेवकांनी छान काम केले आहे. त्यांनी ३ स्तरावर काम केले आहे.
त्यांनी मोठ मोठे सत्संग आयोजित केले, त्यात मी लोकांना शपथ घ्यायला लावली की ते लाच देणार नाहीत किंवा स्वीकारणार नाहीत.
दुसरी गोष्ट त्यांनी केली ती “मी लाच घेणार नाही” अशी स्टीकर अधिकाऱ्यांच्या टेबलावर लावली. कोणीही असे म्हणू शकणार नाही की “मी हे स्टीकर लावणार नाही”, आणि जर स्टीकर असेल तर त्यांना कोणी लाच देणार नाही. तर असे काही आपण करू शकतो, नाहीतर मृत्यूचा दाखला, जन्माचा दाखला, सगळ्यांसाठी लाच द्यावी लागते. विजेची जोडणी करण्यासाठी मोठी लाच द्यावी लागते.
तिसरी गोष्ट आम्ही खासदारांना सांगत आहोत की त्यांनी भ्रष्ट्राचार निर्मुलनासाठी एक कडक कायदा करावा आणि दोषींवर कारवाई करावी.
इथे पाकिस्तानात सुद्धा अशीच भ्रष्ट्राचाराच्या विरोधात लाट तयार होत आहे, कारण त्याची गरज आहे. याच प्रकारच्या गोष्टी रशिया, आणि आफ्रिकेत केल्या. सभ्य समाजाने बंड करून भ्रष्टाचाराचा बिमोड केला पाहिजे. फक्त कायदा आणि नियम यांनी हा प्रश्न सुटणार नाही, जेंव्हा लोकांमधे अध्यात्मीक बदल होईल, आपुलकीची भावना निर्माण होईल तेंव्हाच हा प्रश्न सुटेल. जेंव्हा आपुलकीची भावना संपते तेंव्हा भ्रष्ट्राचार सुरु होतो, या गोष्टीकडे आपण सगळ्यांनी लक्ष दिले पाहिजे.
परस्पर विश्वास आणि सुसंवाद विविधतेला एकत्र राहू देतात. हे शिक्षण आपण लोकांना दिले पाहिजे. इस्लाम चे वेगवेगळे गट आहेत, सुन्नी, शिया याच प्रमाणे काही ख्रिश्चन असतील, काही हिंदू, काही शिख. परस्पर विश्वास, विवेक आणि सुसंवाद यांचा हा पुष्पगुच्छ आहे – आर्ट ऑफ लिविंग चा हाच उदेश्य आहे आणि आपण याला प्रोत्चाहन दिले पाहिजे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे हसत राहा, काहीही झाले तरी हास्य लोपू देऊ नका !!

प्रश्न: गुरुजी, तुमची या वेळची भेट आणि मागच्या वेळची भेट यात काय फरक आहे?
श्री श्री: मागच्या वेळी माझ्या भोवती सुरक्षा सैनिकांचे कडे होते आणि मी फक्त होटेल मधे बांधला गेलो होतो. पण या वेळी मी लोकांबरोबर आहे, मी काल FCC  कॉलेजच्या ९०० तरुणांना भेटलो, आणि त्यांच्या बरोबर संवाद साधला. त्यांना माझ्या बद्दल आणि मला त्यांच्या बद्दल खूप प्रेम वाटले. छान कार्यक्रम झाला. मला वाटते पूर्वी पेक्षा आता जास्त शांतता आहे.

प्रश्न: गुरुजी, तुम्ही FCC कॉलेज मधून गेल्यानंतर विद्यार्थ्यामध्ये खूप सकारात्मक प्रतिक्रिया होती. ते खूप खुश होते आणि ज्ञान मिळून प्रबोधन झाल्यासारखे वाटत होते. आंम्ही आपले त्या बद्दल आभारी आहोत.
श्री श्री:  मला इथल्या आणि भारतातल्या विद्यार्थ्याच्या उत्साहात काहीही फरक वाटला नाही, तो सारखाच होता.  इतका उत्साह आणि जाणून घेण्याची वृत्ती, आणि शिकायची इच्छा बघून कुतूहल वाटले.

प्रश्न: गुरुजी, खूप लोक आहेत कि त्यांनी कोर्स केला आणि काही कारणाने ते बाहेर पडले. असा काही मार्ग आहे की जेणेकरून ते या मार्गावर राहतील ?

श्री श्री: मला वाटते कि जर इथे केंद्र (आर्ट ऑफ लिविंग चे ) असेल तर लोक येत राहतील. जर काही पुस्तके किंवा ज्ञानाच्या टेप असतील आणि जर सेवेचे काही उपक्रम असतील तर लोक येणे सुरु होईल.

प्रश्न: गुरुजी, आपण जरी जगाच्या वेगळ्या भागातून आलो असलो तरी आपली मुलभूत तत्वे एकच आहेत. आपल्या सर्वाना शांतता, सुख-समाधान हवे आहे. पण मला वाटते की आपण फक्त वरवर बघतो, मूळ मुद्दांकडे लक्ष देत नाही.
श्री श्री: पहिल्यांदा आपल्याला मूळ मुद्धे कोणते ते शोधावे लागतील. जगाच्या वेगवेगळया भागात ते वेगळे असतात. कुठे गरिबी, कुठे चुकीचे सिद्धांत, कुठे लोकांना चांगल्या संधी उपलब्ध नसणे, कुठे थोड्या लोकांचा स्वार्थ ज्यामुळे ते संपूर्ण जनतेला वेठीस धरतात. पण या सगळ्यात एक गोष्ट सारखी आहे आणि ते म्हणजे मानवी मूल्यांकडे संपूर्ण दुर्लक्ष. जर लोकांमध्ये मानावियता असेल तर कोणीही हिंसा करणार नाही, कोणीही भ्रष्टाचार करणार नाही, कोणीहि सामान्य लोकांची निर्दयी हत्या करणार नाही. त्यामुळे समाजात मूळ मानवी मूल्यांचे रोपण करावे लागेल. मला माहित आहे की हे अवघड काम आहे, पण अशक्य नाही. कमीतकमी मला तरी ते अशक्य वाटत नाही.
आपण आपल्याकडून हा सेतू बांधायचा प्रयत्न करायचा, बाकी सगळे देवावर सोडावे.

प्रश्न: गुरुजी, आर्ट ऑफ लिविंग मधे पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त का आहेत?
श्री श्री: मला वाटते ते सारख्या संख्येने आहेत, आज मला ते सारखे वाटतात. आर्ट ऑफ लिविंग चा स्त्री शक्ती वर विश्वास आहे. त्या काही गोष्टी चांगल्या करू शकतात, पुरुषांनी तसे म्हणावे अशी त्यांची अपेक्षा असते !!

प्रश्न: आमचा देश आज एका कठीण परिस्थितीतून जात आहे. आर्ट ऑफ लिविंग चे लोक म्हणून हे ज्वलंत प्रश्न आम्ही कसे सोडवावेत, विशेष करून आमच्या शेजारी राष्ट्रांबरोबरचे संबंध. आम्हाला आमच्या शेजारी राष्ट्र, भारत, अफगाणिस्तान आणि अगदी इराण बरोबरचे संबंध दृढ करायचे आहेत. आर्ट ऑफ लिविंग ने हे जे चैतन्य तयार केले आहे त्याची काही मदत होऊ शकेल का?
श्री श्री: राज्यकर्ते शांत आणि सुजाण हवेत. जर निर्णय घेणारे लोक तणावाखाली असतील, त्यांच्या मनात राग असेल तर त्यांच्या निर्णयातही तेच दिसेल.
त्यामुळे राज्यकर्त्यांनी विशेष करून जेंव्हा अनेक लोकांच्या संदर्भातील महत्वाचे निर्णय त्यांना करायचे असतील तेंव्हा ध्यान करावे, शांत राहावे. त्यांनी शांत आणि प्रसन्न चित्ताने विचार करावा. सल्लागार फक्त तर्कानुसार सल्ला देतात आणि निर्णय घेणारे त्या सल्ल्यानुसार निर्णय घेतात. त्यामुळे सल्लागारांनी आणि निर्णय घेणाऱ्यांनी अंतरमुखी व्हावे. असे केल्याने निर्णय योग्य आणि मानवी मुल्यांना धरून होतील.
दुसरी गोष्ट बरेचदा त्रास हा बोलघेवड्यानमुळे होतो ते एक भीती निर्माण करतात ‘ओह इथे धोका आहे, तिथे धोका आहे’ काही लोकांना असे करण्यात मोठेपणा वाटतो. त्यांनी हे थांबवले पाहिजे, त्यांनी लोकांना उमेद दिली पाहिजे. भविष्य अंधारी असल्याचे चित्र रंगवण्या पेक्षा, त्यांना भविष्याबद्दल उमेद द्या, त्यानेही तणाव बराच दूर होईल. आर्ट ऑफ लिविंग ने लोकांना शिक्षित करून जिथे तंटा असेल तिथे तो सोडवण्यात मदत करावी. मी या आधी म्हणल्याप्रमाणे, मी तालिबानशी बोलायला तयार आहे, त्यांच्याशी बोलून, त्यांना समजून घेऊन त्यांना माझे म्हणणे सांगायला मी तयार आहे. आपण नक्कीच बदल घडवू शकतो, आणि आपण पुनःपुन्हा प्रयत्न करायला हवेत. आपल्याला १०० वेळा जरी प्रयत्न करावे लागले तरी आपण सोडू नये.  
प्रश्न: गुरुजी, काही काळ तुम्ही TM (Transcendental Meditation) शी निगडीत होतात. त्यानंतर ८० मधे आर्ट ऑफ लिविंग सुरु झाले. तुम्हाला आर्ट ऑफ लिविंग ची सुरुवात का करावीशी वाटली?
श्री श्री: होय, TM (Transcendental Meditation) सुद्धा ध्यान शिकवतात आणि जागतिक शांततेबद्दल बोलतात. मी किशोरवयीन होतो तेंव्हा तिथे व्याखान देत असे. मी जेंव्हा २४ वर्षाचा होतो तेंव्हा आर्ट ऑफ लिविंग सुरु केले. आर्ट ऑफ लिविंग अधिक सार्वत्रिक आहे, त्याचा पाया श्वास आहे, काही बाबतीत ते TM पेक्षा वेगळे आहे.  अर्थात आर्ट ऑफ लिविंग मधे सहज समाधी आहे जे TM सारखे आहे. आर्ट ऑफ लिविंग मधे आपण सामाजिक कार्यात कार्यरत आहोत जे TM मधे नाही, त्यानंतर संगीत/भजन सांस्कृतिक कार्यक्रम हे वेगळे आहे. TM चा कल शास्त्रीय संशोधनाकडे जास्त आहे. आर्ट ऑफ लिविंग आणि TM च्या तंत्रात काहीही विरोधाभास नाही, कारण आर्ट ऑफ लिविंग पाण्यासारखे आहे ज्या भांड्यात घालाल त्याचा आकार घेईल. त्यामुळे ध्यानाचा कुठलाही मार्ग सहज स्वीकारता येतो.
प्रश्न: आर्ट ऑफ लिविंग च्या उद्देश्याचा प्रसार करण्यात माध्यमे काय भूमिका करू शकतात.  
श्री श्री: होय, माध्यमे खूप काही करू शकतात.
आर्ट ऑफ लिविंग चे कोर्स लोकांना नैराश्यातून बाहेर काढू शकतात, घरातील संघर्ष मिटवू शकतात, लोकांना एकत्र आणू शकतात, ही गोष्ट माध्यमे अधोरेखित करू शकतात. यात आरोग्यासाठी फायदे आहेत, विद्यार्थ्यांच्या आयुष्यात फायदे आहेत, यामुळे भावनिक स्थर्य मिळते आणि इसम किंवा समूहा मधील संघर्ष मिटू शकतो. माध्यमे या सगळ्या गोष्टी लोकांसमोर आणू शकतात.

प्रश्न: आपण आर्ट ऑफ लिविंगच्या फायाद्यान्संदर्भात भारतीय आणि पाकिस्तानी माध्यमांपर्यंत कसे पोहोचू शकतो ?
श्री श्री: भारतीय माध्यमे याची नेहेमी दखल घेतात. आर्ट ऑफ लिविंग इतके सक्रीय आहे कि भारतीय माध्यमे नेहेमी काही न काही याबाबतीत दाखवत असतात.
उत्तर पूर्वेकडच्या राज्याकडचे अनेक आणि माओवादी ज्यांनी कोर्स केला त्यांनी हत्यारे टाकून दिली आणि हिंसा सोडून ते मुख्य प्रवाहात सामील झाले. या सगळ्या बातम्या वृत्तपत्रात आल्या होत्या. मला वाटते इथे पाकिस्तानात सुद्धा माध्यमे लोकांपर्यंत बातम्या पोहोचवत असतात. माध्यमे इथे काही मोठे बदल घडवू शकतात. ते एक महत्वाची भूमिका पार पडू शकतात, उदाहरणार्थ तालिबान आणि काही कट्टरपंथी लोकांशी शांतता चर्चा सुरु करण्यात माध्यमे महत्वाची भूमिका पार पडू शकतात. दुसरे, भ्रष्टाचार निर्मुलन करून लोकांना सशक्त बनवणे. तिसरे, दोन्ही बाजूच्या चांगल्या बातम्या समोर आणणे.
जेंव्हा लोकांना कळले कि मी इकडे येतो आहे, तेंव्हा खूप लोक आले आणि सल्ले दिले ‘तुम्ही आता तिकडे जाऊ नका, खूप धोका आहे. निदान स्वतःच्या अंगरक्षकांना घेऊन जा. तिथे कोणीही सुरक्षित नाही आणि रोज कोणीतरी मारले जाते. लोक माध्यमातून इथे फक्त उग्रवाद आहे, सहिष्णुता अजिबात नाही, रोज विस्फोट होतात असेच ऐकतात. मी म्हंटले ‘असे काही नाही, मी ठरवले आहे कि मी जाणार’. अगदी काल रात्री काही उच्च अधिकारी, आणि काही सरकारी लोक माझ्या कडे आले आणि म्हणाले ‘गुरुजी, कृपया तुम्ही जाऊ नका’ मी म्हणले ‘माझ्या सुरक्षेची काळजी करू नका, माझी सुरक्षा वेगळी आहे. मला कोणी काही करणार नाही, मी जाणार’

इथे लोक एकमेकांचा आदर करतात, विविधता इथेही आहे या गोष्टी लोकांना सांगण्याची भूमिका माध्यमे पार पाडू शकतात. या बातम्या लोकांपर्यंत पोहोचवून ते इथल्या पर्यटनाला चालना देऊ शकतात. इथे खूप ठिकाणे बघण्यासारखी आहेत, जसे तक्षशिला. इथे जर पर्यटनाला चालना मिळाली तर खूप महसूल जमा होऊ शकेल. ग्रीस हा एक अतिशय छोटा देश आहे पण तिथे दरवर्षी १२ लाख पर्यटक येतात, याला पर्यटन म्हणतात. 
भारतात ४ लाख पर्यटक येतात, आणि इथे पाकिस्तानात मला वाटते, काही हजार. पर्यटन इथे नगण्य आहे. पाकिस्तान पर्यटन उद्योगाला चालना देऊ शकते, देशाची अर्थव्यवस्था सुधारेल. अलीकडच्या काळात श्रीलंकेने हेच केले आणि त्यांची अर्थव्यवस्था बरीच सुधारली. तुम्हाला माहित आहे त्यांनी काय केले? रामायणाशी निगडीत सगळी स्थाने त्यांनी पर्यटन स्थळे म्हणून विकसित केली. १० वर्ष्यापुर्वीपर्यंत कोणालाही अशी ठिकाणे आहेत हे माहितीही नव्हते. आता श्रीलंकेत पर्यटनाचा ओघ वाढतो आहे. त्यांनी तिथे खूप चांगली व्यवस्था ठेवली आहे. थाईलंड सुद्धा छोटा देश आहे पण पर्यटन खूप विकसित आहे. बाली हे छोटे बेट आहे पण पर्यटनावर त्यांचा उदरनिर्वाह चालतो. माध्यमे पर्यटनाला प्रोत्साहन देऊ शकतात. चीन, जपान आणि कोरियातील अनेक बुध्द लोक इथे येतील. भारतातील हिंदू इथे गांधार, तक्षशिला पाहायला येतील. अर्थव्यवस्थेत एक विधायक प्रगती होईल.
भारतात चाणक्य चित्रपटानंतर प्रत्येकाला गांधार बद्दल उत्सुकता होती. तुम्ही चाणक्याबद्दल ऐकले आहे का? चाणक्य हा तक्षशिलेतील अतिशय हुशार आणि विद्वान मंत्री होता. चंद्रगुप्त मौर्यचे राज्यात त्याची फार मोठी जबाबदारी होती. चाणक्याने इथल्या एका गरीब मुलाला (चंद्रगुप्त मौर्य) या संपूर्ण खंडाचा राजा बनवले. त्याने ‘अर्थशात्र’ नावाचे पुस्तक लिहिले आणि आजही भारतात व्यवस्थापन शिकवणाऱ्या महाविद्यालयातून ते शिकवले जाते. अर्थशास्त्र वरील ते उत्तम पुस्तक आहे. हे सगळे इथले (पाकिस्तानातील) आहे. आयुर्वेद आणि योग यांचा उगम सुद्धा पाकिस्तानातील आहे. पहिला योग पाकिस्तानात शिकवला गेला. पाकिस्ताने हा सांस्कृतिक वारसा घेऊन त्याभोवती भव्य पर्यटन उद्योग उभा केल्यास समृद्धी येईल.

प्रश्न: तुम्हाला इथे पाकिस्तानात येऊन कसे वाटते आहे?
श्री श्री: या वेळी इथे खूप वेगळे आहे. मी इथल्या तरुणांशी बोललो आणि त्यांचा उत्साह आणि आपुलकीची भावना अगदी भारतातील तरुणान सारखीच आहे. इथे असलेले तुम्ही सगळे लोक सुशिक्षित आहात आणि कुठेही संकुचित भावना नाही. मला वाटते जे समोर दाखवले जाते ते चुकीचे आहे. माध्यमे जिथे तंटे आणि त्रास आहे तेच ते दाखवतात. आपल्याला देशाची नवीन प्रतिमा बनवली पाहिजे, हा देश सुद्धा सहनशील आहे, आम्हीही विविधतेचा आदर करतो, सगळीकडच्या लोकांना सामावून घेतो, हा संदेश जगात पोहोचला पाहिजे. त्याने पाकिस्तानच्या पर्यटनाला चालना मिळून, अर्थव्यवस्था सुधारेल. मला इथे खूप चांगले वाटत आहे, लोक खूप छान आणि चांगले आहेत. माझी इथली भेट हाच संदेश भारतात घेऊन जाईल आणि चांगली लाट तयार होईल.
गुरुजींचे इथे चांगले स्वागत झाले, लोक खूप आनंदी आहेत, गुरुजी खुश आहेत हा संदेश माध्यमांनी पोहोचवालाच आहे. हा संदेश दोन्ही देशांना जवळ आणेल.
जसे मी मगाशी म्हणालो २१ व्या शतकाचे औषध हे आयुर्वेद असेल, आणि त्याचा उगम पाकिस्तानात झाला आहे. आयुर्वेद म्हणजे सगळ्या औषधी वनस्पतींचे गुणधर्म असलेले शास्त्र हे तक्षशिलेत लिहिले गेले. इथल्या विद्यापीठात जगभरातून १०,०००  विद्यार्थी येऊन शिकत असत. आयुर्वेदाचा उगम जिथे झाला तिथे दुर्दैवाने ते फारसे वापरले जात नाही. भारतात आणि जगभरात आयुर्वेदाच्या फायद्यांबद्दल चर्चा होते आहे, आणि पाकिस्ताननेही यावर लक्ष्य केंद्रित करावे.

( श्री श्री आयुर्वेद ने बनवलेल्या शक्ती तेलाचे प्रात्यक्षिक श्री श्री रवी शंकर आणि दाखवले)
विषाचा एक थेंब तुमचे पूर्ण शरीर उद्वस्त करून शकतो हे तुम्हाला माहित आहे. जर विषाचा एक थेंब ७० किलोचे शरीर उधवस्त करू शकतो तर औषधाचा एक थेंब त्याला बळकट सुद्धा बनवू शकतो. तर हे (शक्ती थेंब) ३ औषधी वनस्पतींपासून बनवलेले मिश्रण तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते जेणे करून तुमचे शरीर बळकट होते. सकाळी तुम्ही जर ३-४ थेंब पाण्यात टाकून घेतले तर तुम्हाला खूप उत्साही वाटेल. परीक्षेच्या काळात जर थोडे त्वचेवर चोळले तर तास २ तास थकवा न येता तुम्ही जागे राहू शकाल.
याच प्रमाणे बोन्विता सारखे ओजास्विता नावाचे उत्पादन आहे. ते ७ औषधी वनस्पतींपासून बनवले आहे, जे आपल्या मेंदू आणि चेता संस्थेला गुणकारी आहे. ते एक कप घेतले तर तुम्हाला छान उत्साही वाटेल.  
तुमच्या पैकी किती डॉक्टर आहेत? तुम्ही आपल्या संकेतस्थळाला भेट देऊन आयुर्वेद इस्पितळाबद्दल माहिती घेऊ शकता. आपल्या इस्पितळात रक्ताचा एकही थेंब न सांडता, भूल न देता, काही वेदना न होता दात काढायची प्रक्रिया आहे. त्याच प्रमाणे नाडी परीक्षा, डॉक्टर फक्त नाडी तपासून तुमच्या आरोग्याचा पूर्ण इतिहास काही सेकंदात सांगतात. तुम्हाला कुठल्याही क्ष किरण चाचणीतून जायची गरज नाही. या आयुर्वेदाच्या काही खासियत आहेत आणि मी हेच सांगतो आहे कि योग आणि आयुर्वेद यांचा उगम इथे पाकिस्तानात झाला आहे. इथे दुर्दैवाने ते कोणाला माहित नाही. वैद्यकीय क्षेत्रातील बऱ्याच शाखा लोकांना माहित नाहीत, आयुर्वेद लोकांना खूप लाभदायक ठरू शकतो.



प्रश्न: गुरुजी, जर आम्ही अॅलोपॅथीक औषधे घेत असू आणि त्याबरोबर जर आयुर्वेदिक सुरु केली तर काही अनिष्ट परिणाम होतील का?
श्री श्री: नाही ! आयुर्वेदीक औषधांचे वैषीठय हेच आहे कि त्याने कुठलेही अनिष्ट परिणाम होत नाहीत आणि त्याचे इतर कुठल्याही औषधाबरोबर वाकडे नाही.

प्रश्न: आयुर्वेदाचे अनिष्ट परिणाम नाहीत हे कसे मानावे ?
श्री श्री: काळानेच ते सिद्ध केले आहे. वनऔषधांची हीच सुंदरता आहे, यातील कशाचाही अनिष्ट परिणाम होत नाही. जगातील सगळ्या वनऔषधांच्या संकेतस्थळावर नजर टाकल्यास त्यांचे अनिष्ट परिणाम नाहीत हेच दिसून येईल. पण जर तुम्ही ते अतिरिक्त प्रमाणात घेतले तर तुमच्या साठी ते चांगले नसेल. उदाहरणार्थ त्रिफळा चांगला असला आणि त्याचे काही वाईट परिणाम नसले तरी ते तुम्ही खूप प्रमाणात घेतले तर तुम्हाला अतिसार होऊ शकतो, पण त्याला तुम्ही अनिष्ट परिणाम म्हणू शकत नाही.

प्रश्न: गुरुजी, वासना, दुखःकडे नेते का?
श्री श्री: वासना दुखःकडे नेतेच असे नाही. काही वासना पूर्ण व्हाव्यात अशी इच्छा असते पण तेव्हढी ताकत नसते आणि ती तुम्ही पूर्ण करू शकत नाही त्याने दुखः होते.

प्रश्न: यश म्हणजे काय ?
श्री श्री: यश हे वेगवेगळया लोकांसाठी वेगवेगळे असू शकते. माझ्या साठी यश म्हणजे तुमच्या चेहेर्‍यावरचे हास्य. जर तुमचे हे हास्य कोणीही हिरावून घेणार नसेल तर मी तुम्हाला यशस्वी म्हणेन. यशाचे अजून एक मापदंड म्हणजे कुठल्याही अडचणींना सामोरे जाण्याचा आत्मविश्वास.

प्रश्न: प्रेम म्हणजे काय?
श्री श्री: लहान मुलाच्या निष्पाप डोळ्यात बघा, त्यालाच प्रेम म्हणतात ! तुम्ही घरी आल्यावर तुमचा पाळीव कुत्रा कसा शेपटी हलवत तुमच्या भोवती खेळतो, तुमच्या अंगावर उङया मारतो, त्यालाच प्रेम म्हणतात ! जेंव्हा तुम्ही कोणाच्या प्रेमात पडता, आणि त्याची आठवण काढत असता, तेंव्हा स्वतःचा चेहेरा आरशात बघा, तुम्हाला तेच प्रेम तुमच्या डोळ्यात दिसेल. प्रेमामुळे दगडाला सुद्धा पाझर फुटू शकतो.
ज्या प्रमाणे आपले शरीर अमिनो अॅसीड, पिष्टमय पदार्थ (कार्बोहायड्रेट), प्रथिने आणि जीवनसत्वे यांनी बनले आहे त्याच प्रमाणे आपली चेतना प्रेम आणि सुंदरता यांनी बनली आहे.

प्रश्न: अहंकार म्हणजे काय?
श्री श्री: जो प्रेमाला नष्ट करतो तो अहंकार. जसे तुम्ही आत्ता आहात तसे सरळ आणि नैसर्गिक राहिल्याने अहंकारावर मात करता येते.

प्रश्न: जेंव्हा मी विचार करतो कि “मी कोण आहे?” किंवा “मी इथे का आलो आहे?” तेंव्हा मला खूप अस्वस्थ वाटते?
श्री श्री: खूप छान !! ही आस (उत्कंठा) खूप आवश्यक आहे. हि उत्कंठा तुमचा उद्धार करेल. मी कोण आहे? हे सगळे काय आहे? मी इथे का आलो आहे? हे सगळे खूप सुंदर प्रश्न आहेत, त्यांना जोपासा. इतर कोणालाही ते विचारू नका, तर स्वतःलाच विचारत राहा. 
जेंव्हा तुम्ही हे प्रश्न विचारता आणि आतून शांत असता, तेंव्हा तुम्हाला कळेल कि तुम्ही प्रकाश आहात, जो सगळीकडे आणि सगळ्यांचात आहे. तुम्ही कोणत्याही सीमेच्या पलीकडचे आहात याची तुम्हाला अनुभूती होईल.
आपल्याला असे वाटते की मन शरीरात आहे. नाही!! तर शरीर मनात आहे. तुमचे मन हे शरीराच्या १ फूट सभोवती आहे. जसे मेणबत्तीवर वात असते आणि त्यावर ज्योत तसेच आपले शरीर हे वातीप्रमाणे आहे आणि मन ही ज्योत आहे. आपल्या शरीराभोवती एक जीवउर्जा आहे. त्यामुळे केवळ स्पर्शाने काही गोष्टी होतात, जसे टच स्क्रीन. २० वर्षा पूर्वी लोकांना सांगितले असते कि फक्त स्पर्शाने iPad  काम करेल तर कोणीही विश्वास ठेवला नसता. फोनला  नुसता स्पर्श करून तो काम कळेल किंवा स्क्रीन उघडेल असे कोणी सांगितले असते तर कोणीही विश्वास ठेवला नसता. ते म्हणाले असते ‘उगाच काहीतरी वेड्यासारखे सांगू नका’ आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे फक्त स्पर्श केला की स्क्रीन उघडते. याचाच अर्थ आपल्या सगळ्यांकडे एक विशीष्ट उर्जा, स्पंदने आहेत. तुम्ही जीव्संख्याशास्त्रने बनवलेल्या कुलपाबद्दल ऐकले आहे का? त्यात तुमची उर्जा साठवलेली असते, आणि फक्त तुमच्या हातानेच ते उघडू शकते, दुसऱ्या कोणाच्याही हाताने नाही. प्रत्येक जण हा एक उर्जास्त्रोत आहे हा प्राचीन विचार आता तंत्रज्ञानाने सिद्ध होत आहे. आपण सगळे उर्जास्त्रोत आहोत आणि आपल्यात प्रचंड क्षमता आहे.

प्रश्न: योगी लग्न का करत नाहीत?
श्री श्री: त्यांनी लग्न करू नये असा काही नियम नाही, पण एकदा योगी झाले कि ते लहान मुलांप्रमाणे होतात आणि बालविवाह कायदेशीर नाही!!

प्रश्न: तणाव म्हणजे काय?
श्री श्री: मला माहित नाही. ज्यांना तातडीने विमान पकडायचे आहे आणि ते रहदारीत अडकले आहेत, त्यांना विचारा तणाव म्हणजे काय? 
The Art of living

© The Art of Living Foundation

प्रयत्न आणि प्रार्थना दोन्ही जीवनात आवश्यक आहेत !

१० मार्च २०१२
माणूस म्हणून आपल्या काही गरजा आणि काही कर्तव्य आहेत. जर आपण आपल्या गरजा आणि कर्तव्यांची यादी केली आणि जर गरजा जास्त असतील तर आपण दु:खी असतो आणि कर्तव्य जास्त असतील तर आपण आनंदी असू. हे रहस्य आहे आणि किती सोपं आहे. आजच बसून सगळ्या जबादार्यांची आणि गरजांची यादी करा.
देवाने आपल्याला बुद्धी दिली आहे आणि तिचा आपण उपयोग पण करतो. एक हुशार व्यक्ती जाणून घेईल कि जेव्हा इतर आनंदी असतात तेव्हा तो स्व:त आनंदी असेल. ‘माझं कुटुंब सुखी तेव्हा मी सुखी’. मग काय करायला हवं? आपल्या जबाबदाऱ्या समजून घ्यायला हव्या. कुटुंबाप्रती, समाजाप्रती आपल्या जबाबदाऱ्या समजून घ्यायला हव्या. आपण समाजासाठी आणि देशासाठी काय करू शकतो हे समजायला हवं. तीन स्तरांवर हे करायला हवं, कुटुंब, समाज आणि देश. जितक्या जास्त आपण जबाबदाऱ्या घेतो तितके आपण वाढत जातो आणि आपली कार्य शक्ती वाढत जाते.
इच्छा असणे हे साहजिक आहे. जेव्हा आपण आपल्या इच्छा पूर्ण करू शकत नाही तेव्हा आपण प्रार्थना केली पाहिजे. आयुष्यात प्रार्थना आणि प्रयत्न हे दोन्ही गरजेचे आहेत. फक्त प्रार्थना आणि प्रयत्न नाही केले असं नाही चालणार. आणि काही प्रयत्न खूप करतात पण प्रार्थना करत नाहीत असं सुद्धा नाही चालणार.  
आपल्या पुराणांमध्ये पुरुषार्थ आणि प्रयत्न दोन्ही म्हटले आहेत. आपण जितके करू शकतो तितके करावे आणि मग देवावर सोडावे. माझे इथे येणे तुम्हाला ही आठवण करून देणे आहे. तुमच्या मध्ये दैवी शक्ती आहे आणि तुम्ही ह्या शक्ती बरोबर स्वत:ला जोडून घ्यावं. तुमचं आणि तुमच्या अंतर शक्तीचा संबंध झाल्यावर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही.
एक श्रीमंत माणूस तुम्हाला पैसा देईल. पण जर ज्ञान नसेल तर ते तुम्हाला देईल कोण? तसेच ज्याला मोक्ष मिळाला आहे तोच दुसर्याना ह्या संसारिक बंधनातून मुक्त करू शकतो. जर कोणी बंधनात अडकला आहे, तर कोणी दुसऱ्याला बंधांतून कसा काय मुक्त करेल? आणि जर तो मुक्त करू शकत नाही तर मग प्रेम, ध्यान, आनंद कसा काय मिळवून देईल. पण जर तुम्हाला आंतमधून आनंद मिळत राहिला, तुमच्या मनापासून एक स्वातंत्र्य मिळालं तेव्हा तुमचं हसू कोणीच घेऊन जाऊ शकणार नाही. सगळे अश्याच आनंदा कडे बघत आहेत, जे कधीच कमी होणार नाही, हुरळून जाणार नाही. ह्या साठी काय करायला हवं? आपल्या मधील विश्वास वाढवायला हवा.
जे आनंदी आहेत ते हा आनंद पसरवू सुद्धा शकतात, आणि जे समाधानी आहेत ते दुसरयांना समाधानी करण्यात मदत करतात.
आपल्या देशात कोणतही चांगलं काम करण्या आधी मोठ्यांचे आशीर्वाद घेतले जातात. का माहीत आहे? ह्याचं एक वैज्ञानिक कारण आहे. जो समाधानी असेल त्याच्या मनात कोणतीही इच्छा येईल ती पूर्ण होईल, आणि त्यांचे आशीर्वाद खुपच फायद्याचे ठरतील. जर कोणी व्यक्ती स्वत: दु:खी असेल तर तो दुसर्याना कसा सुखी करेल आणि त्याचे आशीर्वाद दुसर्याना कसे काय फळतील. जो स्वत: समाधानी आहे तो दुसर्याना आशीर्वाद देऊन त्यांच्या इच्छा सहज रित्या पूर्ण करू शकतो. आपल्याला समाधान असणे गरजेचे आहे, थोड्या वेळा साठी तरी. समाधानी असल्याने दुसर्याना आशीर्वाद देण्याची पात्रता येते.
आपण गुरु आणि संतांकडे कश्याला जातो? कारण ते समाधानी असतात आणि जेव्हा ते आशीर्वाद देतात तेव्हा ते काम होऊन जातं. होत नाही का असं? कोणाला ते मिळत जे हवं आहे? बघा ! मग हे समाधान कधी आणि कसं मिळवावं ?
समाधान हे समाधानी माणसा बरोबर बसून किंवा सत्संग मध्ये बसून येत. जर तुम्ही निराश माणसाबरोबर बसल तर मग तुम्ही निराश व्हाल. एक अस्थिर व्यक्ती अस्थिरताच आणेल. सुखी आणि समाधानी सुख आणि समाधानच पसरवेल. आणि ह्या मागचं रहस्य आहे साधेपणा आणि सहजता. आता पर्यंत आपण अगदी औपचारिक पद्ध्तीने वागत आलोय.
लोकांना आम्ही फूल, पुष्पगुच्छ देवून स्वागत करतोय आणि आदर देतोय. ह्या औपचारिक वस्तूंची आयुष्यात जागा आहे, नाही असं नाही. पण आपण ह्यां मध्ये अडकून पडता कामा नये. जसं तुम्ही पुष्पगुच्छ विकत घेताना थैली घेता. आता थैली हि मुख्य गोष्ट नसून थैली मधली वस्तू महत्तवाची आहे. आपण थैली च्या आंत मध्ये डोकवायला हवं. तसचं आयुष्यात सुद्धा आपण हेच करतो, प्लास्टिक थैलीलाच आपण मुख्य गोष्ट समजतो. जसे आपण आयुष्यात औपचारिक होतो आणि आपुलकी राहात नाही. जेव्हा आपुलकी वाढते तेव्हा भ्रष्टाचार संपतो आणि सगळे आपलेसे वाटतात. कोणीच परका वाटत नाही.
जेव्हा आपुलकी असते, तेव्हा आयुष्य सुंदर होतं. आणि जेव्हा प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य सुंदर होतं तेव्हा समाज सुंदर होतो. कारण समाज हे तत्वज्ञाना मुळे पुढे वाढत नाही, प्रत्येक व्यक्तीच्या विकासामुळे आपण पुढे चालतो आणि अश्या लोकांमुळेच समाज समृध्द होतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीला आपुलकीच्या भावनेने बघणे गरजेचे आहे. जर आपुलकी असेल तर एक मोठा बदल घडू शकतो आणि लोकांच्या आयुष्यातून रुक्षता कमी होते.
रुक्षता आणि निरपेक्षतेमुळे इच्छा आणि अपुरेपणा येतो. पण आनंद आणि परमानंद जेव्हा आयुष्यात येतात तेव्हा सगळं काही तुम्हाला सहजपणे मिळेल.
आयुष्यात आनंद आणि परमानंद मिळण्यासाठी पुढील गोष्टींची आवश्यकता आहे.
१.      ज्ञान
२.      ध्यान
३.      गान
ह्या तिन्ही वस्तू तुमच्या आयुष्यात सामील करा. थोडा वेळ कीर्तन आणि सत्संग करा. ज्ञान मिळवा आणि सेवा करा आणि ध्यान करा. १५-२० मिनिटे शांत बसल्यामुळे खूप फायदे होतात. शरीर शक्तिशाली, वागणूक उत्तम, मन शांत, बुद्धी तल्लख, स्मृती वाढते आणि आत्मा परमानंदमयी होते.
तुम्हाल अजून काय हवं आहे?
तुम्ही हि म्हण ऐकली असेल, “एक साधे सब साधे, सब साधे सब जाये”. ज्या एका गोष्टीच्या तुम्ही मागे राहू शकता ती म्हणजे तुमची आत्मा. शांत बसा आणि ध्यान करा. गीते मध्ये म्हटलं आहे, “योगस्थ कुरु कर्माणि”, म्हणजे जो योग नियमित पणे करतो तो जास्त पात्र होतो त्याचे गुण वाढतात आणि तो यशाचं शिखर लवकरच गाठतो.
म्हणून आज आपण तिन्ही गोष्टी इथे करू. आपण गाऊ, ध्यान करू आणि ज्ञान वाटू आणि देशासाठी काही प्रतिज्ञा घेऊ.
आपण सगळ्यांनाच भारत एक शक्तिशाली देश म्हणून बघायचा आहे. मला पण असं होताना बघायचं आहे. आपण सगळे झोपेत गेलो आहोत पण आता आपल्याला जागरूक होणे गरजेचे आहे. देशाचे तरुण जागे झाल्यवर मग कोणीच देशाची प्रगती थांबवू शकत नाही. जर युवा व्यसन, हिंसाचार, जातीवाद, छोटा दृष्टीकोन घेऊन बसले असतील तर मग देशाची प्रगती होणार नाही.
माझे स्वप्न आहे एक दैवी समाज बनवण्याचं. माझ्या लहानपणी मला असं वाटायचं कि हे ज्ञान मी सगळ्या जगात घेऊन जाईन. परदेशातले क्लब भारतात आले, आणि लोकं रोटरी क्लब मध्ये जाऊ लागले. मग भारतातून सुद्धा काही संस्था परदेशात जायला हव्या. आज आर्ट ऑफ लिविंग ला ३० वर्षे पूर्ण झाली आहेत आणि १५२ देशांमध्ये हि संस्था कार्यरत आहे. हे सगळ आपोआप घडलं, मी काही नाही केलं. माझा फक्त एक हेतू होता, आणि पुढे सगळ घडून आले.
भारतातलं ज्ञान किती छान आहे! आपण हे ज्ञान असं दिलं पाहिजे ज्या मुळे युवकांना त्या मध्ये रुची येईल. आणि हेच होतं आहे. हजारो लाखो युवकांनी आर्ट ऑफ लिविंग कोर्स केला आणि अजून पण करत आहे आणि त्याचं जीवन खुलून गेलं आहे. पण हे पुरेसं नाहीये आणि आपल्याला अजून युवकांना हे ज्ञान द्यायचं आहे.
व्यसन आणि हिंसाचार हे समाजातून काढून टाकले पाहिजेत. मला अश्या दिव्य समाजाचं स्वप्न बघायचं जिथे तणाव, हिंसाचार आणि भ्रष्टाचार नाहीये. किती लोकांना ह्या मध्ये सहभाग करायचा आहे? आपले हात वरती करा? आपल्या सगळ्यांना हे मिळवण्या साठी काहीतरी करायचं आहे. आपण सगळे मिळून समाजात एक मोठा बदल घडवू शकतो.

प्रश्न: गुरुजी, गीतेनुसार, जे घडलं आहे, पुढे घडणार आहे आणि आत्ता घडतंय ते चांगल्या साठीच घडतंय मग चांगलं आणि वाईट ह्यात फरक काय?
श्री श्री: मी तुमच्या कडे दोन व्यक्ती पाठवतो एक प्रशंसा करेल आणि दुसरा तुमची निंदा करेल. तुम्हाला चांगलं आणि वाईट ह्या मध्ये फरक लगेच कळेल. एक तुम्हाला त्रास देतो, तो त्रास कोणालाच नको असतो. एक किड्याला सुद्धा त्रास नको असतो. जे दु:ख कारक आहे ते वाईट आणि जे छोट्या काळासाठी आनंद देईल पण दीर्घकालीन दु:ख ते वाईट. जे तुम्हाला कमी काळासाठी दु:ख पण मोठ्या काळासाठी आनंद ते चांगलं हि मोजपट्टी आहे.


प्रश्न: जर मला माझ्या करिअर मध्ये घरच्यांची निवड किंवा माझी निवड ह्यांपैकी एक धरायची असेल तर मग मी काय करावे?
श्री श्री: काही अंशी त्यांच्या बरोबर बोलणी करा. त्यांना सांगा कि जी त्यांची निवड आहे ती तुम्हाला मान्य नाहीये. आणि जे तुम्हाला ते सांगत असतील ते सुद्धा एक मोठ्या दृष्टीकोनातून येत असेल. जर त्यांना त्यांच्या घरचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि ते तुम्हाला एम.बी.ए करायचे म्हणत असतील.  जर तुम्ही वेगळ्या व्यवसायामध्ये जात असाल आणि त्यांच्या कडे कोणी पण स्वत:च्या व्यावसायाकडे बघण्यासाठी नसेल तर काळजी पोटी ते तुम्हला म्हणत असतील. बऱ्याचदा आपण छंद आणि पेशा मध्ये गफलत करतो. आपण छंदांना व्यवसाय करतो आणि व्यवसायाबरोबर निष्काळजी होतो. तुमच्या आई-वडिलांशी बोला आणि तुमच्या एखाद्या शिक्षकाशी सुद्धा बोलून बघा.

प्रश्न: जेव्हा मी तुम्हाला भेटू शकत नाही तेव्हा मनाला इतकं दु:ख का होतं?
श्री श्री: जेव्हा हृदय जुळले आहेत, तेव्हा मिठी मारण्याची काय गरज. आपल्या सगळ्यांमध्ये एकच आत्मा आहे आणि आपण सगळे एक आहोत. मी इतक्या देशा मध्ये गेलो आहे, मला कुठेच असं नाही वाटत कि मी एका अनोळखी व्यक्तीला भेटतोय. जे मला भेटतात ते मला आपलेसे वाटतात आणि त्यांना हि माझ्या प्रती तेच वाटत. म्हणून तुम्ही सुद्धा सगळ्यांना त्याच नजरेने बघा आणि स्वीकार करा. हेचं सत्याच ज्ञान आहे, जिथे कोणीच परका नाहीये.

प्रश्न: गुरुजी, आम्ही कोण आहोत आणि आमचं अस्तित्व कशाला आहे?
श्री श्री: हा फारच उत्तम प्रश्न आहे, आणि हा प्रश्न कोणालाच देऊ नका. हा प्रश्न स्वत:ला विचारत राहा. हा एक फारच मोलाचा प्रश्न आहे. त्यांना थोडयासाठी देऊ नका आणि छोट्या मोठ्या उत्तरांनी समाधान मानू नका. जे तुम्हाला उत्तरं देत आहेत, ते तुमच्या बरोबर अन्याय करत आहेत. जे लोकं ह्याचं उत्तरं देणार नाहीत कारण हे एक चिन्ह आहे तुमच्या मेंदू आलेल्या वितार्काचे. वितर्के पासूनच आत्मज्ञान फुटत. ज्यांना माहित आहे त्यांना फार आनंद आहे तुमच्या मध्ये असं होण्याचा. ज्यांना माहित नाही ते तुमच्यावर अपेक्षेचं ओझं लाद्तील.

प्रश्न ५: देव आम्हाला सुरक्षित कसं ठेवतो?
श्री श्री: हे अद्भूत आहे ! तुम्ही जेव्हा पासून जन्मलात तेव्हा पासून त्याने तुम्हाला संभाळलं आहे. आई आणि वडील ह्यांच्या प्रेमाच्या रुपात तुम्हाला सुरक्षित ठेवलं आहे. ज्या कोणापासून तुम्ही प्रेम मिळवत आहात ते सगळ दैवी आहे. देव तुम्हाला सगळ काही देत आहे.

प्रश्न ६: आपण देवासाठी मुख्य वेळ दिला पाहिजे. मग कृपया सांगा कि हा मुख्य वेळ कोणता आहे?
श्री श्री: ह्याचा अर्थ कि फालतू वेळ देवाला देऊ नका. जेव्हा तुम्हाला अजून काही नाही करायचं आहे, चित्रपट नाही बघायचे, काम नाही संपवायच, आणि तेव्हा तुम्ही भजन करण्याच म्हटलं त्याचा काही उपयोग नाही. उरलेला वेळ देवाला देऊ नका. दर-रोज १० मिनिटे ध्यान करा सकाळ आणि संध्याकाळ. हे तुम्ही देवासाठी करत नाही आहात, देवाला तुमच्या कडून काही नकोय. हे फक्त तुमच्यासाठी आहे. तुम्ही ध्यान करा आणि गरीब आणि दिन ह्यांची मदत करा. तुमचे श्रम सेवे साठी वापरा.

प्रश्न ७: सगळ्यांना मोक्ष हवं आहे? पण २१व्य शतकात मोक्ष मिळण्यासाठी काय करावं?
श्री श्री: हो सगळेच मोक्ष मिळवू पाहत आहेत. भोगण्यासाठी सुद्धा एक मर्यादा आहे ती मर्यादा पोहोचल्या वर मग मोक्ष मिळण्याची इच्छा दांडगी होऊ लागते. जर तुम्ही कोणाला १० पराठे खायला सांगितले तर तो नाही खाऊ शकणार. ६-७ पराठ्यानंतर तो म्हणेल पुरे झाले. मोक्षसाठी तहान साहजिक आहे. प्रत्येक व्यक्तीला आत मधून मुक्ती हवी आहे. हि एक साहजिक भावना आहे !

प्रश्न ८: गुरुजी, तुम्ही पाकिस्तान ला चालला आहात. तिथे फार हिंसाचार आहे. पाकिस्तान च्या भवितव्य बद्दल तुम्हाला काय वाटतं?
श्री श्री: माझ्या येण्याची खबर तिथे पोहोचली आहे. बऱ्याच दिवसांनी त्यांनी एक आतंकवादी संघटनेला बंदी घातली आहे, ज्यांनी बऱ्याच शिया मुसलमानान मारलं आहे. पाकिस्तान स्वत: आतंकवादाला बळी पडलेला आहे. मी परवा तिथे ३ दिवसां साठी चाललो आहे. तिथे आपले बरेच श्रद्धाळू आहेत आणि त्यांनी मला तिथे बऱ्याच प्रेमाने बोलावलं आहे. जेव्हा मी तिथे २००४ साली गेलो होतो तेव्हा ते म्हणाले. ‘गुरुजी, आम्ही ५ वर्षे थांबलो आहोत, आता आम्हाला अजून ५ वर्षे नका थांबवू”. पण आता मी तिथे ७ वर्ष्यानी चाललो आहे. तिथे एक ‘शांती भवन’ स्थापित करायचं आहे.
मी युवकांना पुढे येऊन योग आणि ध्यान शिकण्यासाठी आग्रह करेन. किती लोकांना शिक्षक बनायचं आहे? आम्ही तुमच्या साठी इथे टीचर ट्रेनिंग चे आयोजन करू.
ध्यान शिकवणाऱ्या शिक्षकांची गरज जगभरात आहे. पाकिस्तान मध्ये आर्ट ऑफ लिविंग एक लाख लोकां पर्येंत पोहोच्लेला आहे. जेव्हा सिंध प्रांतात पूर आला होता तेव्हा आर्ट ऑफ लिविंग ने तिथे जाऊन लोकांची भरपूर मदत केली होती.
मी म्हणेन जितका पैसा भारत आणि पाकिस्तान आपल्या सुरक्षे साठी खर्च करत आहेत, तितक्या पैश्यान मधला १ टक्का जरी शांती ठराव पुढे आण्यासाठी खर्च केला तर आणि जर दोन्ही देशांच्या लोकांनी एकमेकांशी चांगले संबंध ठेवले तर मग आतंकवादा साठी जागा उरणार नाही.
जेव्हा आपल्याला एक चांगला डॉक्टर किंवा वकील हवा असतो तेव्हा आपण त्याची जात किंवा धर्म विचारत नाही. पण जेव्हा प्रश्न मतदानाचा असतो तेव्हा आपण जातीवाद करतो. जर भारताला पुढे वाढायच असेल तर आणि सगळ्यांना आर्थिक न्याय मिळायला हवा, तर मग आपण ह्या छोट्या दृष्टीकोनातून बाहेर यायला हवं, आपण बदलायला हवं.

प्रश्न: गुरुजी तुम्ही इतकं फिरता. किती तरी कार आणि प्लेन बदलता. तुम्हाला तर जेवायला आणि झोपायला सुद्धा वेळ मिळत नाही. तुम्हाला हे सगळ करायला कस काय जमते?
श्री श्री: जेव्हा काम करण्याची इच्छा असते तेव्हा शक्ती आपोआप येते. जेव्हा तुमच्या घरी उत्सव असतो तेव्हा तुम्हाला सुद्धा जेवायचा वेळ नसतो. तसेच माझ्यासाठी प्रत्येक दिवस हा एक उत्सव आहे.

प्रश्न: गुरुजी, उत्तर प्रदेश मध्ये एक युवा मुख्यमंत्री बनतो आहे. त्याने असं म्हटलं आहे कि तो गरिबी आणि अराजक सत्ता काढून टाकेल तुम्हाला असं वाटत का कि एक युवा देशाचं भविष्य बदलून टाकेल?
श्री श्री: नक्कीच ! युवकांना असा बदल हवा आहे. मी अखीलेशजीचे अभिनंदन करतो ज्यांनी उत्तर प्रदेश इथवर आणले, आणि त्यांना आदर्श मानून इतर युवकांनी पुढे याव. युवकांनी मंत्री मंडळात असावं हि एक फार छान गोष्ट आहे. अराजक सत्ता जी पैसा आणि शक्ती च्या बळावर चालवली गेली आहे ती नाहीशी झाली पाहिजे. जिथे जाल तिथे अध्यात्म घेऊन जा कारण अध्यात्मामुळे अराजकता मिटू शकते. अराजकते च्या विरुध्द चे कायदे फारच कडक असायला हवे.

प्रश्न: गुरुजी तुम्हाला प्रत्येक देशाच्या, धर्माच्या सगळ्या लोकांशी आपुलकी वाटते. हि तुमची महानता आहे. पण त्यांना सुद्धा तुमच्या साठी आपुलकी वाटावी ह्याचं काय रहस्य आहे?
श्री श्री: जे आपल्या मध्ये आहे तेच आपल्याला बाहेर दिसतं. हे जग एक आरसा आहे. जर आंत मध्ये वाईट असेल तर मग आपल्याला वाईटच दिसेल. जे आपल्याला चांगलं वाटतं तेच आपल्याला बाहेरून चांगलं वाटेल आणि जरी ते वाईट असले तरी ते तुमच्या साठी चांगले होऊन जातील.
प्रश्न १२: गुरुजी काही रेपिड फायर प्रश्न आहेत.
श्री श्री: हो !
तुम्ही?
मी तुमचा आहे !
मी?
तुम्ही माझे आहात.
जीवन?
मौल्यवान आहे.
बंधन?
ज्याच्यातून तुम्ही बाहेर यायला हवं.
अंधश्रद्धा?
जोवर पर्यंत तुम्ही त्यांच्या वर विचार करता तोवर त्या अंधश्रद्धा वाटत नाही.
खेळ?
जीवन हा एक खेळ आहे.
माया?
आदरातीथ्य
परमानंद?
तुमचा स्वभाव.
लग्न?
तुमची मर्जी.
स्वाभिमान?
लक्ष्य.
समाधान?
गम्य.
कृपा?
धन
शक्ती?
प्रयत्न
सत्संग?
एक उपकरण
राजनीती?
जे माणसाच्या भल्या साठी झटते.
अध्यात्म?
जीवनाचा एक अंग
यौवन?
नेहमी स्वत:मध्ये यौवन जपून ठेवा.
आशीर्वाद?
खूप आहेत.
भक्त?
सगळी कडे आहे.
एक गृहस्थ एकदा म्हणाले, ‘ जिथे एखादे वेळेस जेवण आणि पाणी मिळणार नाही, पण तिथे सुद्धा एक भक्त नक्कीच मिळेल’. चांगलं आहे जर सगळीकडे भक्त असतील तर ते सुगंध पसरवतात.

प्रश्न: गुरुजी, आज आम्हाला कळले कि तुम्ही एका कारागृहाला भेट दिलीत. हे तुमचं कर्म होतं का ज्या मुळे तुम्ही गेलात?
श्री श्री: हो ! आजच नाही मी बऱ्याच वेळी तिथे गेलो आहे. श्री कृष्ण कारागृहातच जन्मले होते. उदैपूर च्या कारागृहात हजारो लोकांनी आर्ट ऑफ लिविंग आणि मौन कोर्स केला आहे. ते खूप वर्षांपासून साधना करत आहेत म्हणून आज मी त्यांना भेटायला गेलो होतो. ते खूप आनंदात होते आणि त्यांना आनंदात बघून मला सुद्धा खूप आनंद झाला. २ लोकं तिथून सुटल्यावर शिक्षक बनले आहेत.

प्रश्न: गुरुजी, जर माझे सगळे काम तुमच्या कृपेने होत असेल तर मग माझे प्रयत्न घालण्यात काय उपयोग?
श्री श्री: मग स्वत:ला सेवेत रमवून घ्या.
सुख मे सेवा दु:ख मे त्याग. हा जीवनाचा उद्द्येश्या असला पाहिजे. जेव्हा आनंदी असाल तेव्हा सेवा आणि जेव्हा दु:ख असेल तेव्हा त्याग. जर तुम्ही दु:खाला सोडू नाही शकत तर मग आनंद कसा काय सोडू शकाल? आनंद तुम्ही सोडू नाही शकत. म्हणून आनंदी असताना तुम्ही सेवा करा दु:खात असताना आराम करा.

प्रश्न: गुरुजी, तुमच्या फोटोग्राफ मध्ये बघितल्यावर, तुमचे नाव घेतल्यावर आणि तुमच्या येण्याच्या बातमीनेच सगळी काम होऊन जातात. मी स्वत: हेच कसं करू शकतो?
श्री श्री: मला पण माहित नाही. मी एक लहान मुलगा आहे जो मोठा व्हायला तयार नाहीये. तुमच्या मध्ये सुद्धा एक लहान मुलगा दडलंय, तुमच्या आतील लहान मुलाला जागं करा आणि तुमच्या मध्ये असलेलं म्हातारपण सोडून द्या.

प्रश्न: गुरुजी, आजचे युवक संगणक वर बसतात किंवा टी.व्ही बघत बसतात किंवा पार्ट्यांना जातात. अजून कुठे आम्ही त्यांची शक्ती वळवू शकू?
श्री श्री: जर ह्या काम मध्ये ते रमत असतील तर काही हरकत नाही पण त्यांनी समाजासाठी सुद्धा काम केलं पाहिजे. त्यांनी देशाच्या लोकांना जागरूक करायला हवं. त्यांनी जागे होऊन पुढे यायला हवं आणि राजकरणात जायला हवं.
किती तरी लोकं मतदान करताच नाहीत कारण त्यांना वाटत कि सगळ्या पार्ट्या एक सारख्याच आहेत आणि मग सगळीकडे भ्रष्टाचार होतो. असे लोक निवडून येतात आणि काही उपयोग होत नाही. असं करू नका !
ह्या समाजात चांगले लोकं जास्त आहेत पण ते शांत बसले आहेत. समाज वाईट लोकांमुळे नव्हे तर चांगल्या लोकांच्या शांत राहण्यामुळे खाली गेलाय. अशा लोकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्यासाठी युवकांनी पुढे यावं. मग देशाची उन्नती मोठ्या अर्थाने होईल.
जेव्हा आपल्या देशात अध्यात्मिक शक्ती प्रखर होती तेव्हा देश खूप समृध्द होता. कोणत्याही गोष्टीची कमरतता नव्हती. एक तृतीयांश जी.डी.पी. भारतातून यायचा. आपल्या देशात इतकं धन होतं. आता आपण खूप नुकसान झालेले बघतोय आणि म्हणून युवकांनी पुढे यायला हवं. अंधश्रद्धा आणि अज्ञान हे मिटवून टाका. दर-रोज कितीतरी मंदिरात पशु हत्या होते, हे थांबायला हवं. जातीवाद थांबवायला हवा. आपले कितीतरी संत आणि साधू खालच्या जाती मध्ये जन्म घेतलेले आहेत.
चरणांची पूजा हि आपल्या देशामधली पद्धती आहे. पाय हे कधीच कमी दर्ज्याचे समजले गेले नाहीत.  पाद पूजा आपल्या देशात केली जाते, जिथे इतकी डोक्याची नव्हे परंतु पायांची पूजा केली जाते. परदेशात ‘माय फूट’ म्हणजे शिवि समजली जाते. पण भारतात पाय हे डोक्यापेक्षा जास्त पूजनीय समजले गेले आहेत. म्हणून मग जर क्षूद्रना पायांबरोबर समजलं गेले तर मग ते जास्त आदरणीय आहेत. सगळ्या धर्मानी आणि जातींनी एकमेकांकडे आदराने बघायला हवं.

प्रश्न: त्रेता युग मध्ये राम अवतार रावणा विरुद्ध आणि द्वापर युग मध्ये कृष्ण अवतारामध्ये कौरावन विरुद्ध तर मग कलीयुगात तुम्ही कोणा विरुध्द लढताय?
श्री श्री: माझे युध्द आहे अज्ञान, अन्याय, कमतरता आणि अपवित्रता. मी काही लोकांना असं म्हणताना बघितलाय कि सत्य युग मध्ये आत्मा अतिशय पवित्र होता, मग कलियुग पर्यंत पवित्रता जात राहिली. हे एकदम बकवास आहे. असं काही नाहीये. सत्य युग मध्ये सुद्धा राक्षस होते हिरण्यकशा आणि हिराण्याकाश्यपू जे कोणी देवाचे नाव घ्यायचा त्याला त्रास द्यायचे आणि देवाला चार वेळा अवतार घेऊन त्यांचा नाश करावं लागला. प्रत्येक युगा मध्ये आत्मा हा पवित्र आहे आणि वेळेच्या पलीकडे आहे. आत्मा हा पवित्र नाहीये असं विचार करण हे चूक आहे. कलियुग पण चांगलं आहे. वेळेला दोष देऊ नका. तुम्ही हि म्हण ऐकली असेल, ‘कलियुग केवळ नाम अधरा’. म्हणजे कलियुग मध्ये देवाचं फक्त नाव घेतल्याने देव मिळून जातो. म्हणून असं म्हणू नका कि सत्य युग कली युगापेक्षा चांगलं आहे.
वेळेवर अवलंबून न राहता साधकांनी साधना केली आहे आणि परमोच्च शिखर प्राप्त केलं आहे. मग तुम्ही सुद्धा तिथे पोहोचू शकता.

प्रश्न: आकर्षणं ने भरलेल्या ह्या दुनियेत, प्रथा आणि परंपरा कशी बनवून ठेवावी?
श्री श्री: आपली चेतना आनंदाने भरलेली आहे. आपल्याला असं वाटत कि अध्यात्म हे कंटाळवाण आहे आणि ह्यात रस नाही. तर तसे नाही ! अध्यात्म म्हणजे आयुष्य पूर्ण आनंदाने जगणं. एक आयुष्य शांती, आनंद आणि समाधानाचं. असं अनुभव होणे म्हणजेच ध्यान करणे. एकदा ध्यान केल्यानंतर बाकी सगळ रुक्ष वाटू लागत. एकदा तुम्ही स्वत:मध्ये स्थपीत झालात कि मग बाहेरच सगळ रुक्ष वाटतं.

प्रश्न: देवाला, तुम्हाला आणि माझ्या आई-वडिलांना मी एक चांगला माणूस बनवसं वाटतं. मग देवाने दुष्ट बनवलं कशाला?
श्री श्री: कोणी तुम्हाला म्हटलं तुम्ही वाईट आहात? मी कधीच असं म्हणालो नाही कि तुम्ही चांगले बना. तुम्ही आधीच चांगले आहात. फक्त उठा आणि बघा कि तुमच्या मध्ये लहान सहन वाईट सवयी सोडण्याची क्षमता आहे. ठीक आहे, म्हणून सोडून द्या.

प्रश्न: गुरुजी, अध्यात्मिक शिक्षक आणि भक्तांमध्ये वाढ झाल्यावर सुद्धा समाजात गुन्हाच प्रमाण सुद्धा का वाढतंय?
श्री श्री: अध्यात्मिक शिक्षक काही गुन्हे आणि भ्रष्टाचारच्या वाढीमध्ये मदत करत नाहीये. मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन १० वर्षांपूर्वी भारतात इतकी इस्पितळ नव्हते जितके आज आहेत. इस्पितळ वाढले म्हणून लोकं आजारी पडले का? इस्पितळ वाढले आणि रोग राई सुद्धा वाढली. तुम्ही इस्पितळांना त्यासाठी जबाबदार धरणार का? नाही. इस्पितळ वाढून सुद्धा रोग वाढतच चालले आहेत. तसेच अध्यात्मिक संत अस्तित्वात असूनही गुन्हे वाढत आहेत तर मग भारतात किंवा जगात जर ते नसते तर काय झाले असते ह्याचा विचार करा. तुम्हाला कळतंय का मी काय म्हणतोय ते? प्रत्येक गावात एक संत हवा. एक पुरोहित हवा जो लोकांना बांधून ठेवील आणि त्यांची उन्नती करेल. जो सगळ्यांच्या भल्याचा विचार करेल आणि कोणत्याही गोंधळात त्यांना समजावून स्थित शांत करण्याचा प्रयत्न करेल. एक व्यक्ती जो कमतरता कमी करेल अशी व्यक्ती हवी.
आज भारतात ७ लाख गाव आहेत. प्रत्येक गावामध्ये २ लोकं असतील जे लोकांच्या भल्यासाठी काम करू शकतील त्यांना योग आणि ध्यान शिकवतील तर मग आपला देश खूप प्रगती करेल. आपल्याला १४ लाख सेवाकारणारे योग आणि ध्यान शिकवणारे शिक्षक हवेत. मग तुम्ही सुद्धा एक असे शिक्षक बनू शकता. स्वत: शिकवा आणि दुसर्याना सुद्धा योग शिकवा.

प्रश्न: गुरुजी, ग्रहांचा आणि वेळेचा आपल्या जीवनावर काय असर पडतो?
श्री श्री: जे काही असेल ते, तुम्ही ओम नमः शिवाय म्हणू शकता आणि भक्ती आणि ध्यान केल्यामुळे सुद्धा ते कमी होते. अजून कशाची गरज नाहीये. ह्या जगात प्रत्येक वस्तूचा दुसऱ्या वस्तूवर परिणाम होतो. असं म्हटलं आहे कि जर दक्षिण अमेरिकेत फुलपाखराने पंख फडफडवले तर चीन मध्ये ढगांवर परिणाम होतो. असं शास्त्रज्ञ म्हणतात. म्हणून असं साहजिक आहे कि सूर्य, चंद्र आणि ग्रहांचा तुमच्या जीवनावर असर होईल पण इतका नाही कि तुम्ही दु:खी आणि गोंधळलेले राहाल. बऱ्याचदा आपण ज्योतिषांशी बोलतो आणि मग हवं ते फळ नाही मिळाल्यावर उदास होतो. असं करण्याची गरज नाही. चांगले आणि वाईट दिवस हे सगळ्यांच्या जीवनात येतात. ते शरीर, मन बुद्धी या गोष्टींवर फरक पडतात. पौर्णिमेच्या आणि अमावस्या च्या रात्री चंद्रामुळे आपल्या शरीर आणि मनावर फरक पडतो ह्या साठी प्राणायाम, ध्यान आणि योग करणे महत्त्वाचे आहे.

प्रश्न: गुरुजी राजस्थान मध्ये शौर्यला मोठे स्थान  आहे. पण आज युवक हे विसरून गेले आहेत आणि पाश्चिमात्य विचारसरणीची भूल पडत चालेले आहेत. आपण त्यांच्या मध्ये भारतीय गुण कसे काय टिकून ठेवू शकू?
श्री श्री: नक्कीच हे गुण जपणे गरजेचे आहे. जर तुम्ही पाश्चिमात्य झालात तर तुम्हाला परत फिरून मुळ भारतीयतेकडे यावे लागेल. आजकाल तर परदेशी लोकं सुद्धा भारताकडे येत आहेत. त्यांना भारतीय सभ्यतेचे आकर्षण आहे आणि त्यांना भारतीय परंपरेनुसार लग्न करायचं असतं इत्यादी. पृथ्वी गोल आहे, पश्चिमेकडे गेलात तरी तुम्हाला इथेच परत यावे लागेल. लवकर परत येणे हि खरी युक्ती आहे.

प्रश्न: गुरुजी, बऱ्याच लोकांनी इथे आपले त्रास आणि समस्या पाठवले आहेत.
श्री श्री: हो, सगळे त्रास आणि समस्या इथे सोडून द्या. मी असं ऐकलं आहे कि चांगल्या घरातून सुद्धा आत्मा हत्येचं प्रमाण वाढलं आहे. जर तुमच्या मनात असं काही दु:ख किंवा त्रास असेल तर मग हे माहित करून घ्या कि तुम्ही एकटे नाही आहात. मी तुमच्या बरोबर आहे. तुमचे सगळे दु:ख आणि त्रास मला देऊन टाका. साधना, सेवा आणि ध्यान करा. पुढे या आणि देशा साठी काही तरी करा. घरी जाताना आनंदाने जा आणि झोपण्यापूर्वी ध्यान करा आणि सगळ्या इच्छा समर्पित करा आणि आनंदाने झोपा. संकल्प घेण्याची हि एक पद्धत आहे. तो संकल्प घ्या आणि सोडून द्या.

प्रश्न: गुरुजी, तुम्ही असं म्हटलं आहे कि योगा मध्ये यश साधना आणि अनाग्रही बनल्याने येत. मी साधना करतोय पण मी विवाहित असल्याने माझ्यामध्ये अनाग्रही पणा नाहीये. मी योगामध्ये कशी प्रगती करू?
श्री श्री: नाही ! आपल्या जबाबदाऱ्या पार पाडणे हे सुद्धा अनाग्रही असण्याचे लक्षण आहे. तुमच्या जबाबदाऱ्या पार पाडा. जे तुम्हाला करायचं आहे ते पूर्ण करा आणि आराम करा. जे तुम्हाला सोडायचं आहे ते सोडा आणि आराम करा आणि तेच अनुग्रही बनणे आहे.
तुम्हाला तुमचं घर सोडण्याची किंवा कुठे जाण्याची काहीच गरज नाहीये. तुम्ही तुमच्या जबाबदारी पार  पाडता योगपथावर चालू शकता. घरी बसून सुध्धा तुम्ही सत्या पर्यंत पोहोचू शकता. ह्यात काहीच हरकत नाही.

प्रश्न: उदैपूर च्या लोकांसाठी ३ संदेश द्या.
श्री श्री: हजारो लोकं इथे आज आले आहेत. सगळे स्वयंसेवक बनून एकत्र येवून काही करू शकता. २ आठवड्यात २ तास समाजासाठी द्या. दर रविवारी सकाळी ९ ते ११ सगळे एकत्र या आणि शहर स्वच्छ करा आणि झाडे लावा आणि लोकांना व्यसन मुक्ती आणि मुलींचा बळी ह्यांच्यावर आळा


घालण्यासाठी काम करा. १५ ते २० लोक मिळून जवळच्या गावात जाऊन सत्संग करा. त्यांना चांगल्या गोष्टी सांगा आणि आपण सगळे एक कुटुंबातले आहोत असं सांगा. आपण सगळ्यांनी एकत्र येवून असं काम केलं तर मग काही मोठ्ठ करू शकू. एक भक्ती, ज्ञान आणि अध्यात्मिकतेची  लाट येईल.

प्रश्न: गुरुजी, तुम्ही राजनीती मध्ये कधी येताय?
श्री श्री: राजनीती मध्ये येऊन मी चांगल्या लोकांना एका बाजूला नाही करू इच्छित. सत्ताधारी आणि विपक्ष मध्ये चांगल्या लोकांची गरज आहे. एक पत्रकार, संत आणि समाजसेवक ह्यांनी तटस्थ राहिलं पाहिजे आणि चांगल्या लोकांना पुढे ठेवलं पाहिजे. जाती, पैसा किंवा शक्ती च्या जोरावर नव्हे. म्हणून मी एका समाजसुधारकाची भूमिका करतोय, आणि जर युवकांना पुढे यायचं आहे राजनीती, आध्यात्मिक आणि सेवेकडे कल असणाऱ्यांना जास्त प्रोत्साहन देईन. राजकारणाला व्यवसाय बनवु नये. देश मग पक्ष आणि शेवटी मी असा दृष्टिकोन असला पाहिजे.

The Art of living
© The Art of Living Foundation

ज्या व्यक्तीचे मन बाहेरच्या दिशेने धावणारे असेल तर तो देवापर्यंत कधीच पोचू शकत नाही

रतलाम (मध्य प्रदेश) येथील आत्मोत्सव
८ मार्च २०१२
जेव्हा तुम्ही दुकानात काही घ्यायला जाता तेव्हा ती वस्तू तुम्हाला एका पुडक्यात मिळते. ते एक पुडके असते. ती वस्तू पुडक्यात बांधणे जरुरी असते परंतु ते पुडके ती वस्तू नसते. जे सत्व(द्रव्य) असते ते बांधलेले असते. त्याचप्रमाणे औपचारिकतादेखील पुडक्याची बाहेरील बाजू असते ...आवेष्टनाच्या कागदाप्रमाणे. तद्भाविता असणे हे महत्त्वाचे आहे. जर एकात्म भाव नसेल तर त्याला सत्संग किंवा उत्सव म्हणता येणार नाही.
मी पूर्ण जगभर प्रवास केला आणि माझ्या लक्षात आले की अध्यात्म आणि उत्सव ज्याप्रमाणे  भारतात खोलवर रुजलेले आहेत तसे दुसऱ्या कोणत्याही देशात नाही. एकीकडे ते अध्यात्मिक आहेत आणि दुसरीकडे ते मेजवान्यांना जातात आणि मौज मजा करतात. तथापि अध्यात्मिक संमेलनात कोणतीही मजा किंवा आनंद नसतो; ते फार गंभीर प्रकरण असते. हे असे गंभीर होणे आपण भारतातदेखील करतो, पण हे असे असता कामा नये! होळी सण हा मौज मजा करण्याचा, बागडण्याचा आणि आनंदित होण्याचा सण आहे.
तुम्ही सगळे होळी खेळलात का? कोणती होळी तुम्ही खेळलात? केवळ एकमेकांना रंग लावण्याच्या होळीबद्दल मी बोलत नाहीये. स्वतःच्या आत्म्याच्या रंगात रंगण्याचा सण आहे. आत्म्याचे सप्त रंग आहेत.
तुम्ही या समारंभाला फार छान नाव दिलात-आत्मोत्सव! आत्म्याचा उत्सव म्हणजेच आत्मोत्सव. जेव्हा जेव्हा बंगलोर, भोपाल किंवा इतरत्र मोठे समारंभ व्हायचे तेव्हा रतलामचे लोक मोठ्या प्रमाणावर उपस्थित असायचे आणि मला विचारायचे," तुम्ही रतलामला कधी येणार?"
पहा,मी आलो की नाही रतलामला?
तद्भाविता हे जीवनाचे सार आहे. तद्भाविता असली म्हणजे निरसता वाटत नाही. जिथे निरसता नाही तिथे लोभ उरत नाही. तुमच्या इच्छा तुम्हाला त्रास देणार नाहीत. सर्व विकृती नष्ट होतात. कोणत्याही विकृतीचे मूळ कारण असते जडता...म्हणजे जेव्हा तुम्हाला काहीही आवडत नाही. ही भावना निरसतेतून येते.
जिथे तद्भाविता असते तिथून निरसता पूर्णपणे नष्ट होते आणि तुम्ही आनंदी होता. आणि मग तुमचे दारूचे व्यसन अपोआपच सुटून जाते.
जगभरातील करोडो लोकांचा अनुभव आहे की जसे त्यांनी ध्यान आणि सुदर्शन क्रिया करणे सुरु केले तशी त्यांना त्यांच्या वाईट सवयीतून मुक्तता मिळाली.
मला माहिती आहे की प्रत्येक माणूस हा जन्मतः चांगलाच असतो आणि यात काहीही शंका नाही. प्रत्येकात चांगले गुण असतात. परंतु काळानुसार हे चांगले गुण झाकले जातात आणि विकृती डोक वर काढायला लागतात. अज्ञान आणि अध्यात्मिक ज्ञानाचा अभाव हे यामागचे कारण आहे.
जीवन कसे जगावे याबद्दल घरी आणि शाळेत शिकवण मिळत नाही. आपले मन कसे हाताळावे हे आपल्याला कळत नाही. स्वतःला कसे हाताळायचे हे सोडून आपण आयुष्यात बाकी सगळे शिकतो. हे शिकणे अतिशय महत्वाचे आहे.
(कोणीतरी श्री श्री यांना हार अर्पण करते आणि ते म्हणतात)या हारामागाच्या तुमच्या भावना मला समजतात. आपण आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही. ही फुले माध्यम बनतात. पण मी म्हणतो या सगळ्याची काहीच गरज नाहीये. तुमच्या चेहऱ्यावरील हास्य माझ्यासाठी पुरेसे आहे. तुम्ही फुललात की मग तुमच्या चेहेऱ्यावरील हास्य हे फुलापेक्षा सुंदर असेल. याने मला फार समाधान मिळते.
तर मग आपण काय बोलत होतो? तद्भाविता! तद्भाविता असायला पाहिजे. जिथे तद्भाविता संपते तिथे भ्रष्टाचार सुरु होतो. आपण आपल्या माणसानबरोबर कधीच भ्रष्ट आणि दुष्ट होऊ शकत नाही. आपण ज्यांना परके समजतो त्यांच्याशी असे वागतो. जर आज आपल्याला समाजात पुन्हा शांतता प्रस्थापित करायची असेल तर आपल्याला अध्यात्माची लाट निर्माण करणे जरुरी आहे. बरोबर? आपण सगळ्यांना याकरिता झटायला लागणार आहे.
आपल्याला हिंसा मुक्त समाज पाहिजे. असा समाज जिथे चोरी होणार नाही, एकमेकांबद्दल वैर भाव नसेल,आणि लोकांच्या परस्पर नात्याची वीण घट्ट असेल.
कोणे एके काळी आपला समाज असाच होता. भारतात जेव्हा अध्यात्म उच्च शिखरावर होते तेव्हा भारताची आर्थिक स्थिती फारच चांगली होती. परंतु अध्यात्माचा जेव्हा ऱ्हास झाला,  तेंव्हा आपण आर्थिकदृष्ट्या खालावलो. आपण दोन्ही प्रकारे पाहू शकतो: आपली आर्थिक स्थिती खालावली तेव्हा अध्यात्मातदेखील आपण खाली आलो. पण मी तर म्हणेन की आपण आपल्या समाजाला अध्यात्मातेच्या लाटेमध्ये बुडवून टाकू या, जर आपण योग, उद्योग आणि यज्ञ एकदम हाती घेतले तर महात्मा गांधीनी पाहिलेले "राम राज्य" भारतात नक्कीच अवतीर्ण होईल. तर मग आज आत्मोत्सवात आपण तीन गोष्टी करणार आहोत: गायन, ज्ञान आणि ध्यान.
जीवनात एका गोष्टीची नेहमी श्रद्धा ठेवा की तुम्ही एकटे नाही, तुमच्या सोबत कोणीतरी आहे. तुमचे सगळे त्रास,अडचणी आणि दुःखे तुम्ही मला देऊन टाका. केवळ म्हणा," गुरुजी, मला हे सहन होत नाही, कृपा करून हे घ्या". या प्रकारे विचार करा किंवा लिहून काढा, पाठवून द्या, तुम्हाला जसे करायचे ते करा पण निश्चिंत मनाने आयुष्यात पुढे जात राहा. मला एवढेच हवे आहे.
मौन नसलेला उत्सव काय कामाचा आणि ज्या मौनाचे रुपांतर उत्सवात होत नाही ते मौन काय कामाचे ? मौनामुळे उत्सवाला खोलपणा मिळतो तर उत्सवामुळे मौनाची आंतरिक शक्ती बाहेर येते. याकरिताच थोडा वेळ तरी ध्यानाचा सराव आपण केला पाहिजे. हे फार महत्वाचे आहे. यामुळे स्मरण शक्ती तल्लख होते आणि आपण निरोगी राहतो.
तुमच्यापैकी कितीजण अंग दुखीने बेजार आहात? तुम्हाला असे का होते ते माहिती आहे?
आपण आपल्या जमिनीमध्ये किटाणू नाशके आणि रसायने या सारखे विष पेरतो. त्यामुळे. आपण जमिनीमध्ये रासायनिक खाते घालतो आणि असे पीक आपण जेव्हा खातो,आपल्याला अंग दुखी होत.
माहिती आहे अगोदर आपण जेव्हा तांदूळ आणि गहू घरी साठवून ठेवायचो तेव्हा त्याला कीड लागायची, हो ना? परंतु आता तसे होत नाही.
याचा काय अर्थ आहे? आता तर किड्यांनासुद्धा आपण जे खातो ते आवडत नाही. कारण त्यांना माहिती आहे की यात विष आहे ते. आपण अस सगळ खातो आणि मग सगळे अंग दुखण्याने हैराण होतात. किती तरी लोकांना कर्क रोगाचा त्रास होतो आहे. म्हणूनच आपण रसायने मुक्त, जैविक शेती करायला पहिजे आणि असेच पदार्थ जेवले पाहिजे. जर काय खायचे हे जर समजले तर आपण आपल्याला दुखण्यांपासून दूर ठेवू शकतो. जर तुम्हाला स्वतःची देह शुद्धी करायची असेल तर आयुर्वेदाकडे या. आठवड्यातून एकदा तरी त्रिफळा चूर्ण घ्या. स्वतःचा कोठा साफ ठेवा.
देह शुद्धीकरीता तुम्हाला आयुर्वेदाचा वापर करावा लागेल. रोज थोडे प्राणायाम करा. याने तुमच्या शरीराला जोम मिळेल आणि मन ताजेतवाने राहील. आणि प्रत्येकाने संगीत हे ऐकलेच पाहिजे. लोक संगीत ऐकतात परंतु तेवढे लक्ष्य देऊन नाही. गाणे वाजत असते पण तुमचे मन मात्र इतरत्र भटकत तरी असते किंवा तुम्ही बोलत तरी असता. असे अजिबात असता कामा नये. काही काळ संगीत ऐका. संगीत तुमच्या भावना शुद्ध करते. ज्ञानामुळे मन शुद्ध होते. दानांमुळे संपत्ती शुद्ध होते. साजूक तुपामुळे अन्न शुद्धी होते.
भजन आणि भोजनात संकोच करू नये. नाहीतर मग तुम्ही शारीरिक दृष्ट्या आणि अध्यात्मिक दृष्ट्या उपाशी राहाल.
प्रश्न : गुरुजी,जीवनाचा उद्देश्य काय आहे?
श्री श्री रविशंकर : हा तुमच्या मनात फार चांगला प्रश्न उद्भवला आहे. स्वतःला भाग्यवान समजा. "जीवनाचा उद्देश्य काय आहे?" हा प्रश्न तुमच्या मनात उद्भवला हे तुमचे सुभाग्यच आहे.
आपण जीवन जगतच राहतो आणि जीवन खरोखर काय आहे याचा कधीच विचार करीत नाही. ज्याला याचे उत्तर माहिती आहे तो ते कधीच नाही सांगणार आणि जो याचे उत्तर देतो त्याला माहित नसते.
प्रश्न : गुरुजी, जर देव आपल्यामध्ये आहे तर आपण आयुष्यात दुःख का अनुभवतो?
श्री श्री रविशंकर : याचे कारण आहे की आपण देवाच्याप्रती अनुकूल नाही. सूर्य तर आहे पण जर तुम्ही त्याच्याकडे पाठ करून उभे राहिलात तर तुम्हाला केवळ स्वतःची सावली दिसेल. तुमचे दुःख ही ती सावली आहे. ते सत्य नाही तर केवळ सावली आहे, तुम्ही देवाप्रती अनुकूल नसल्याची ती सावली आहे. जेव्हा आपण देवापासून दूर जातो तेव्हा आपल्या वाट्याला दुःख येते.
प्रश्न : गुरुजी, भगवद्गीता आणि महाभारत यांच्यात काय फरक आहे?
श्री श्री रविशंकर : भगवद्गीता ही महाभारताचा भाग असून ते महाभारतातील एक प्रकरण आहे.
प्रश्न : गुरुजी, गुरु आणि सद्गुरु यांच्यातील फरक काय?
श्री श्री रविशंकर : काहीही फरक नाही, ते समानच आहेत. ज्याचे सत्य आचरण नाही त्याला गुरु म्हणता येत नाही. हे एक केवळ विशेषण आहे आणि काही नाही.
प्रश्न : गुरुजी, मनात फक्त एकाच उत्सुकता आहे की यश म्हणजे काय आणि आपण संपूर्ण यशस्वी कसे होऊ शकतो?
श्री श्री रविशंकर : तुमच्या चेहऱ्यावरील हास्य ही तुमच्या यशस्वी होण्याची खुणगाठ आहे. जर आयुष्यातील कोणत्याही प्रसंगाला तुम्ही हसत सामोरे जाऊ शकले म्हणजेच तुम्ही यशस्वी झालात.
प्रश्न : गुरुजी, तुम्ही नक्षलवादी आणि अतिरेकी यांना बदलू शकता का?
श्री श्री रविशंकर : नक्कीच, खूप जणांचा कायापालट झाला आहे! बऱ्याच नक्षलवाद्यनी मुख्य प्रवाहात प्रवेश केला आहे आणि आता ते चांगले मनुष्य झालेले आहेत. झारखंडात प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस काही तरी समस्या व्हायची. खूप जण आपले प्राण गमावून बसायचे. पण या वेळेस बघितले तर तुम्हाला दिसेल की हिंसाचाराची एक देखील घटना घडली नाही. बऱ्याच चांगल्या माणसांनी निवडणुकीत भाग घेतला. हजारोंच्या संख्येने नक्षलवादी आता समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले आहेत.
प्रश्न : कर्म, धर्म आणि अध्यात्म यापैकी कशाला आयुष्यात सर्वात जास्त महत्व दिले पाहिजे?
श्री श्री रविशंकर : तुम्ही टीवी आधी ऐकाल आणि नंतर मग बघाल? असे चालेल का? नाही, त्या दोन्ही क्रिया एकाच वेळेला व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे कर्म, धर्म आणि अध्यात्म हे एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत.
प्रश्न : गुरुजी, आपण दि आर्ट ऑफ लिविंगचे प्रतिनिधीत्व करतो. तर मग जगाला तोंड देताना आपली वागणूक काय असली पाहिजे?
श्री श्री रविशंकर : तुम्ही खरोखर चांगले मनुष्य असले पाहिजे. ढोंगी असता कामा नये. तुम्ही आतून आणि बाहेरून समानच असले पाहिजे. याचा अर्थ असा नाही की सत्य बोलण्यावर तुम्ही क्रुद्ध व्हावे. नेहमी जे परिपूर्णतावादी असतात किंवा ज्यांना प्रत्येक गोष्टीत बिनचूकपणा पाहिजे असतो, असे लोक नेहमी संतप्त होत असतात. अज्ञानाला कसे हाताळायचे हे आपल्याला माहित असले पाहिजे.                                                                                                               जर तुम्ही साधेपणाने प्रामाणिक आयुष्य जगू शकता तर मग तुम्ही जीवन जगण्याची कला(दि आर्ट ऑफ लिविंग) शिकलात.
प्रश्न : गुरुजी, आम्हाला कसे कळणार की आम्ही जे करतोय ते बरोबर आहे की नाही?
श्री श्री रविशंकर : स्वतःला विचारा. आपल्या अंतःकरणाला विचार. जर तुम्ही काही चूक केली असेल तर ते तुम्हाला टोचेल. पण जर तुम्ही काही योग्य केले असेल तर तुम्हाला निर्भय वाटेल. तुम्ही काही योग्य केले तर तुम्हाला कोणतीही भीती वाटत नाही. जर तुमच्या हातून काही प्रमाद घडला तर तुम्हाला त्याची टोचणी वाटेल,आतून चीड चीड होईल. तुमच्यासमोर अनेक समस्या उदभवायला लागतील.
प्रश्न : भ्रष्टाचार आणि आतंकवाद कधी संपणार? सनातन धर्म नष्ट होईल का?
श्री श्री रविशंकर : नाही, सनातन धर्म कधीच नष्ट पावणार नाही. अनादी काळापासून तो अस्तित्वात आहे आणि तो चालूच राहणार. दि आर्ट ऑफ लिविंगची स्थापना करून तीस वर्षे झाली आहेत. आज आपण असे म्हणू शकतो की जगभरातील सुमारे १५२ देशांमध्ये योग, प्राणायाम आणि सुदर्शन क्रियेचा सराव होतो.                                                                       जर तुम्ही दक्षिण धृवावरील सर्वात शेवटचे शहर तीएरा डेल फुएगो येथे गेलात तर तुम्हाला दिसेल की हजारो लोक प्राणायाम, ध्यान करत आहेत आणि ते शाकाहारी झालेले आहेत. जर तुम्ही उत्तर धृवावरील शेवटचे शहर ट्रोमसो इथे गेलात तर तिथे दोन महिने ना सूर्योदय होतो ना चंद्रोदय. तिथे विमानतळावर माझी वाट बघत उभ्या लोकांना बघून मी स्वतः आश्चर्यचकित झालो. ते म्हणाले," आम्ही येथील विश्वविद्यालयात साधना करतो". हे आता संपूर्ण जगभर आहे.                                         ११ मार्चला मी पाकिस्तानातसुद्धा जाणार आहे. मी साडेसात वर्षांपूर्वी पाकिस्तानला गेलो होतो. मी इंदोरला आलो आणि मग पाकिस्तानला गेलो.                                                                                                                                                             यावेळेस पुन्हा मी मध्य प्रदेशमधील इंदोर आणि रतलाम येथे आलो आणि येथून पाकिस्तानला जाणार. तिथेसुद्धा हजारो लोक साधना करीत आहेत. त्यांच्याकडे येण्याकरिता ते मला खुपच विनवण्या करीत होते. त्यांना मी खरोखरच पाकिस्तानला यायला हवे आहे आणि म्हणून मी येथून पाकिस्तानकरिता रवाना होईन.                                                        जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात आपले ज्ञान आणि ध्यान परंपरेची फार गरज आहे. आपणदेखील अर्थपूर्ण प्रस्तुती केली पाहिजे. मी जेव्हा पाकिस्तानला गेलो तेव्हा तिथल्या लोकांनी मला प्रश्न केला, "तुमच्या देशात इतक्या देवी-देवतांचे पूजन होते पण आमच्या देशात तर आम्ही एकाच देवाला पुजतो". मी म्हणालो, "नाही, आम्ही एकाच देवाची पूजा करतो, पण तुम्हाला माहिती आहे कशी? तुम्ही एकाच गव्हाच्या कणकेपासून समोसा, पराठा, शिरा आणि इतर पदार्थ बनवता. हे सर्व एकाच गव्हाच्या कणकेपासून बनवता. कराची हलवादेखील कणकेपासूनच बनवलेला असतो."                                      मी विचारले,"तुम्ही एका गव्हाच्या कणकेचे इतके पदार्थ का बनवता? त्याचप्रमाणे देव एकच आहे पण आम्ही त्याची वेगवेगळ्याप्रकारे पूजा करतो. एकाच देवाचे वेगळे गुण आहेत आणि प्रत्येक गुणासाठी आम्ही त्याला एक रूप दिले आहे. इस्लाम धर्मात अल्लाहची नव्याण्णव नावे आहेत."                                                                                                                        सनातन धर्मामध्ये एकशे आठ नावे आहेत आणि आम्ही तेवढी रूपे बनवली. फक्त एकशे आठ नाही तर मी म्हणेन की हजारो नावे "सहस्र नाम!" पण देव एकच आहे, "नूर" एक, "परमात्मा" एक आहे, आणि आम्ही केवळ "त्याचीच" आराधना वेगवेगळया नाव आणि रुपाने करतो. हे जेव्हा मी त्यांना सांगितले तेव्हा त्यांना एकदम बरे वाटले. ते म्हणाले,"आम्ही या पैलूने कधीच ऐकले नव्हते, आम्हाला असे ज्ञान कधीच मिळणे शक्य नव्हते. आम्ही नेहमीच असा विचार केला की तुम्ही लोक(इतर धर्माचे लोक) आमच्यापेक्षा भिन्न आहात."
सनातन धर्म म्हणजे काय? "वसुधैव कुटुंबकम", असे पुरातन काळापासून म्हटले आहे, याचा अर्थ, हे माझे स्वतःचे जग आहे, हे जग एकच कुटुंब आहे(विश्व कुटुंब). जर तुमचा येवढा उदार दृष्टीकोन असेल तरच तुम्ही स्वतःला धार्मिक म्हणू शकता.
प्रश्न : गुरुजी, या तंत्रज्ञानाच्या युगात, तरुण पिढीमधील अध्यात्म हरवत आहे.
श्री श्री रविशंकर : अजिबात नाही. इथे किती तरुण बसले आहेत ते पहा!
प्रश्न : लोक पैशाच्या मागे धावतात. अशा वेळेस आम्ही अध्यात्माबरोबर कसे काय जोडलेले राहू शकतो? मी कुठून सुरुवात करावी?
श्री श्री रविशंकर : अध्यात्म आणि आर्थिक व्यवस्था हे एकमेकांचे शत्रू नाहीयेत हे सर्व प्रथम लक्षात घ्या. हे सत्य स्वीकारा. अध्यात्म म्हणजे जीवनात भरभराट न करणे असे समजू नका. भरभराट करा, संपत्ती जमवा, त्यात काही चुकीचे नाही, पण हे धर्माने करा.
प्रश्न : गुरुजी, आज धार्मिक मेळावे सगळीकडे आयोजित होत आहेत परंतु धर्म हरवला आहे. याचे काय कारण असू शकते?
श्री श्री रविशंकर : मला असे नाही वाटत. जर तुम्हाला असे दिसत असेल तर जरा आपले डोळे थोडे चोळा. जगात चांगल्या लोकांची संख्या जास्त आहे. वाईट करणाऱ्यांची संख्या कमी आहे. परंतु चांगले लोक गप्प बसून राहतात, हे चुकीचे आहे. चांगले लोक गप्प राहिल्यामुळे, त्यांच्या निष्क्रियतेमुळे समाजाचा ऱ्हास होतो. आसुरी वृत्तीचे लोक थोडेसेच आहेत. ज्या दिवशी चांगले लोक सक्रीय होतील त्या दिवशी आसुरी लोकांचा बिमोड होईल.
प्रश्न : गुरुजी, २०१२ बद्दल खूप काही चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर भारताचे भवितव्य तुम्हाला कसे दिसते?
श्री श्री रविशंकर : भारताचे भवितव्य उज्वल आहे. या वर्षी लोक जागृत होतील. आणि मला खात्री आहे येथील तरुण पिढी जागी होते आहे. हे निवडणुकांमध्ये देखील दिसून येत आहे. लोक जागृत होत आहेत आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज चढवत आहे.
प्रश्न : गुरुजी, स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये इतका भेदभाव का आहे?
श्री श्री रविशंकर : भेदभाव करू नये. भारत असा देश आहे जिथे देवाला "अर्धनारीश्वर" अर्धी स्त्री आणि अर्धा पुरुष म्हणून बघतात. खरे तर भारतात स्त्रियांना पुरुषांपेक्षा एक पाऊल पुढेच समजतात. जोडप्याचा उल्लेख करताना स्त्रीचे नाव प्रथम,श्रीमती व श्री, असे घेतात तर बाकीच्या ठिकाणी मिस्टर आणि मिसेस असे संबोधतात. इंग्रजीत कधीही मिसेस  आणि मिस्टर असे नाही म्हणत तर मिस्टर आणि मिसेस असेच म्हणतात. केवळ भारतात श्रीमती व श्री म्हटले जाते.
प्रश्न : गुरुजी, जीवनात कशाला जास्त महत्व दिले पाहिजे,प्रियजनांच्या आनंदाला की आपल्या स्वतःच्या?
श्री श्री रविशंकर : ते तुमचे दोन डोळे आहेत असे समजा. जर तुम्ही स्वतः आनंदी असाल तर तुम्ही दुसऱ्यांना आनंदी ठेऊ शकाल. आणि जर दुसऱ्यांना आनंदी करण्यात तुम्हाला आनंद मिळत असेल तर तुम्ही आयुष्यात खूप प्रगती कराल.
प्रश्न : गुरुजी, आयुष्यात संतुलन कसे ठेवायचे आणि जीवनाच्या उतार चढावात आनंदी कसे राहायचे?
श्री श्री रविशंकर : "गायन, ज्ञान आणि ध्यान"
प्रश्न : मुक्ती मिळवण्याचा मार्ग कोणता आहे?
श्री श्री रविशंकर : तुम्ही योग्य ठिकाणी पोहचला आहात आणि योग्य शब्द ऐकता आहात. ज्याला स्वतःला मुक्ती प्राप्त झाली आहे तोच केवळ तुम्हाला मुक्त करू शकतो. तुम्हाला समजत आहे का मी काय म्हणतो आहे ते?
प्रश्न : गुरुजी, वयाच्या कितव्या वर्षी तुम्हाला अध्यात्मामध्ये रुची निर्माण झाली?
श्री श्री रविशंकर : मी ती जन्मतः स्वतःबरोबर घेऊन आलो. मला वाटत हा माझा स्वभावच होता. मला माहित नाही पण जेव्हापासून मला कळायला लागले तेव्हापासून हे असेच आहे. हे जग मला नवीन आणि जुने असे दोन्ही दिसते. सगळे मला आपलेच वाटतात आणि मला अनोळखी कोणीच नाही.
प्रश्न : गुरुजी, खूप प्रयत्न करूनसुद्धा जर आम्ही चुकीच्या मार्गावरील माणसाला बरोबर मार्गावर आण्यात अयशस्वी झालो तर आम्ही काय करायचे?
श्री श्री रविशंकर : चुकीच्या मार्गावर गेलेल्याला सुधारण्याचे प्रयत्न करा. जर प्रयत्नांना फळ नाही आले तर त्याच्यासाठी प्रार्थना करा,तो नक्कीच चांगल्या मार्गाला लागेल.                                                                                                           प्रार्थना म्हणजे केवळ वरपांगीची नव्हे. त्याला चुकीच्या मार्गावरून चालताना होणाऱ्या वेदना तुम्हाला जाणवल्या पाहिजे. आणि त्या वेदना स्वतःजवळ ठेवू नका. त्या देवाला वाहून टाका.                                                                                       प्रार्थना हृदयाच्या खोलीतून उमटायला पाहिजे.,"हा माणूस लवकर बरा होऊ दे", आणि ही प्रार्थना नक्कीच देव ऐकेल. येवढे करून देखील काही उपयोग नाही झाला, तर ते त्याचे कर्म असे समजून विसरून जा.
प्रश्न : गुरुजी,  देव खरोखर अस्तित्वात आहे? जर आहे तर मग आम्हाला त्याची अनुभूती कशी होईल?
श्री श्री रविशंकर : देव अस्तित्वात आहे आणि तो तुमच्या आत आहे हेच तर सांगायला मी आलेलो आहे. त्याला पाहण्याचा प्रयत्न करू नका.                                                                                                                जर तुम्हाला कोणी सांगत असेल की तो देव बघण्यात तुमची मदत करेल तर समजून घ्या की तो मुर्ख आहे. देव काही भौतिक वस्तू किंवा  दृश्य नाही तर तो त्रिकालदर्शी आहे. म्हणूनच केवळ ध्यानामार्फत आपण देवापर्यंत पोहचू शकतो. ज्या व्यक्तीचे मन बाहेरच्या दिशेने धावणारे असेल तर तो देवापर्यंत कधीच पोचू शकत नाही. जर कोणाला वाटत असेल की तो भगवान हनुमंताला पाहू शकतो तर तो फक्त भास आहे. त्याच्या मेंदूमध्ये काही तरी गडबड असेल. का? कारण तुम्ही त्रिकालदर्शीला दृश्य म्हणून बघू शकत नाही. "तो" दृश्य नाही,भौतिक वस्तू नाही आणि आपल्यापेक्षा निराळासुद्धा नाही. परमात्मा हा आत्म्यामध्ये दडलेला आहे. जेव्हा तुम्ही ध्यान करता, तेव्हा तुम्हाला वाटत," अरे वा, ज्याला मी सगळीकडे शोधात होतो तो तर माझ्या आतच आहे." तुम्हाला असा अनुभव येईल. त्यानंतर तुम्हाला कोणीही हलवू शकणार नाही. तुमचे हास्य कोणीही पुसून टाकू शकणार नाही. तर देव इथे या क्षणी आपल्यामध्ये आहे, हे लक्षात घ्या आणि निश्चिंत व्हा. हे स्वीकारा आणि निर्धास्त व्हा. विश्रामामध्येच राम आहे.!
प्रश्न : गुरुजी, जीवनाचे सत्य काय आहे? कधी कधी मला वाटते की मी कल्पना विश्वामध्ये जगतो आहे!
श्री श्री रविशंकर : कल्पना विश्वातून बाहेर येणे हेच जीवनाचे सत्य आहे.
प्रश्न : गुरुजी, समाजासाठी काही करण्याकरिता मी काय करावे ?
श्री श्री रविशंकर : हा एक फार चांगला प्रश्न आहे. तुम्ही विचार करा तुम्ही काय करू शकता. मला सगळ्या तरुणांनी सहा महिन्यांकरिता आमची मदत करावी अशी माझी इच्छा आहे आणि मग आपण देशात सगळीकडे एक क्रांतिकारक लाट निर्माण करू. मग बघाच आपला देश कसा बदलेल. भारताला संपूर्ण जगात अग्रेसर पाहण्याचे माझे स्वप्न आहे. मला भारत बलवान बनलेला पाहिजे आणि आपल्याला आपली प्रतिष्ठा आणि मान पुनः मिळवायचा आहे....जी प्रतिष्ठा आणि मान प्राचीन काळात होता तो...तुमच्यापैकी कितीजण माझ्याबरोबर आहेत?                                                                              भारताला बलवान राष्ट्र म्हणून पुढे यायचे आहे आणि मला एकदेखील तरुण बेरोजगार नको. इथले किती तरुण बेरोजगार आहेत? मला तुम्ही इथल्या केंद्रात स्वतःचे नाव नोंदवा. या देशात करण्यासारखे खूप काही आहे. नळ दुरुस्ती करणारा, चालक, स्वयंपाकी आणि विजेची कामे करणारा हे आजकाल आपल्या देशात सापडणे कठीण होऊन बसले आहे. या लोकांसाठी प्रचंड पुरवठा आहे. आम्ही तुम्हाला प्रशिक्षण देऊ.
आपली शिक्षण संस्था अतिशय जुनी आणि चुकीची आहे, त्यामुळे लोक शिक्षण संपवूनदेखील बेरोजगार राहतात. आपल्या देशात जे अशिक्षित आहेत त्यांना रोजगार मिळतो पण ५९% पद्व्योत्तरांना काम मिळत नाही. त्यांनी येवढे वर्ष शिक्षणावर इतकी मेहनत घेऊन पद्व्योत्तर अभ्यासक्रम संपवला तरीसुद्धा ते बेरोजगार आहेत. शिक्षण हे व्यवसायभिमुख असले पाहिजे. आपले शिक्षण असे असले पाहिजे ज्याद्वारे आपल्या रोजगार मिळवण्याच्या कसबेला धार मिळेल.  शिकवणे हे जर व्यवसायभिमुख असेल तर विद्यार्थ्यांचे शिक्षण संपल्या संपल्या त्यांना रोजगार उपलब्ध होईल. आपल्याला हा बदल घडवून आणणे गरजेचे आहे.
सगळ्या डॉक्टरांनी वर्षातून तीनदा मोफत वैद्यकीय शिबीर आयोजित करावे अशी मी त्यांना विनंती करतो. जर तुम्ही वकील असाल तर मला तुम्ही तीन खटले मोफत चालवून दिले पाहिजे. चार महिन्यातून एकदा हे त्या गरीब लोकांसाठी करा जे तुम्हाला तुमच्या फीचे पैसे देऊ शकत नाही.                                                                                                                                      तुम्ही हे करू शकाल?                                                                                                                                                         आणि जेवढे शिक्षक आहेत त्यांनी अभ्यासात कच्च्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शिकवणी द्यावी. वर्षातून तीन विद्यार्थ्यांचा विचार करा. आणि जर तुम्ही विद्यार्थी असाल तर मतदान करण्याबाबत जन जागृती करा. सगळ्यांना मतदान करण्यास सांगा आणि भ्रष्टाचाराविरुद्ध मत देण्यास सांगा.
प्रश्न : गुरुजी, तुम्हाला रामावतार, कृष्णावतार आणि तुमचा वर्तमान अवतार यात काय फरक वाटतो?
श्री श्री रविशंकर : यात फरक शोधणे मी तुमच्यावर सोपवले आहे. मी का सांगू? जो माझ्यात आहे, तुमच्यात आहे आणि सगळ्यांमध्ये आहे मी फक्त त्यालाच पाहतो.
प्रश्न : गुरुजी, आपल्याला जीवनात गुरुची खरोखर गरज आहे का?
श्री श्री रविशंकर : तुम्हाला याचे उत्तर पाहिजे का? जो प्रश्नाचे उत्तर देतो तो गुरु होतो आणि जो ऐकतो तो शिष्य होतो. तर असा प्रश्न विचारून तुम्ही तर कोंडीत सापडलात. आता तुम्ही हा प्रश्न विचारून म्हणता आहात, "मला गुरुची गरज आहे!" हे तर एखाद्या झोपलेल्या माणसाला "तू झोपला आहेस का?" असे विचारणे झाले. आता तो हो किंवा नाही म्हणाला तर त्याचा अर्थ एकच आहे आणि तो म्हणजे तो जागा आहे.                                                                                                                        त्याचप्रमाणे, तुमचे विचाराने, "आम्हाला गुरुची आवश्यकता आहे का?". कारण जर तुम्ही प्रश्न करता आहात म्हणजेच तुम्हाला गुरुची आवश्यकता आहे.
प्रश्न : गुरुजी,आम्ही सर्व प्रथम कोणाचे ऐकावे...मनाचे की हृदयचे?
श्री श्री रविशंकर : जेव्हा तुम्ही व्यवसाय करता आहात तेव्हा मनाचे ऐका. आणि जेव्हा तुम्ही आयुष्य जगता आहात किंवा काही समाज सेवा करता आहात तेव्हा आपल्या हृदयाचे ऐका. जेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत असता तेव्हा आपल्या हृदयाचेच ऐका.

The Art of living
© The Art of Living Foundation