5 April 2012


आपली चेतना हि पुरातन आहे.

बाली, ५ एप्रिल २०१२

समुद्राकडे पहा, न थांबता, सतत लाटा येत असतात, त्यांना त्याचा कधीच कंटाळा येत नाही.

पक्षी नेहमी गाणी गात असतात, त्यांना पण त्याचा कधी कंटाळा येत नाही. आयुष्यभर ते रोज सकाळी गात असतात पण ते कधीही कंटाळत नाहीत. फक्त मनुष्यप्राण्याला त्याच त्याच गोष्टींचा कंटाळा येत असतो. “ ओह ! परत तेच!” आणि आपल्याला हा उबग का येतो तर स्मृती मुळे.

तुम्ही पूर्वी केलेली ती गोष्ट आठवून कंटाळता. स्मृती हे जसे मनुष्याला आशीर्वाद आहे त्याप्रमाणे तो एक शाप हि आहे. तुम्हाला त्याचा कंटाळा येतो कारण तुम्हाला काहीतरी वेगळे, काहीतरी नवीन करण्याची गरज भासते आणि मग अशा तऱ्हेने रचनात्मक बदलाची प्रक्रिया सुरु होऊन परमेश्वरावर लक्ष केंद्रित करता. नाहीतर तुम्ही पण प्राण्यांप्रमाणे त्याच त्याच गोष्टी रोज करीत बसला असता. पण तुम्ही तसे करीत नाही कारण तुम्हाला ते परत परत करण्याचा कंटाळा येतो. होय कि नाही?

म्हणून त्या अर्थाने हा कंटाळा किंवा उदासीनता हा एक आशीर्वादच आहे. हि तुमची उदासीनता तुम्हाला पुढे जाऊन साधक बनायला प्रवृत्त करते आणि मग तुम्ही एक वेगळीच उंची गाठू शकता. त्याच वेळी हि उदासीनता एक अभिशाप आहे कारण ती तुम्हाला एका जागी स्वस्थ बसू देत नाही मग तुमचे मन एका गोष्टीवरून दुसऱ्या दुसरीकडे उगीचच भटकत बसते. त्या सर्वांचा मग कंटाळा येऊन तुम्ही कशाचाच आस्वाद घेऊ शकत नाही.मी काय म्हणतोय ते येतेय लक्षात?

उदासीनता तुम्हाला ज्ञानाकडे घेऊन जाते तेंव्हा तो एक आशीर्वाद बनतो. पण जेंव्हा हि उदासीनता तुम्हाला निराश करून मरगळ आणते तेंव्हा तो एक अभिशाप असतो.

उदासीनता तुम्हाला या दोन वेगळ्या मार्गांनी नेऊ शकते.

जेंव्हा तुम्ही उदासीन असता, तेंव्हा तुम्ही आस्वाद घेऊ शकत नाही आणि मग जेंव्हा तुम्ही आस्वाद घेऊ शकत नाही तेंव्हा दु:खी आणि उदास होता. असा तुमचा उदासीनते कडे प्रवास घडतो. किंवा मग तुम्ही उदास असल्याने, खडबडून जागे होता आणि मग शोध सुरु करता. मग तुमच्या असे लक्षात येते कि तुमचा अंतरात्मा तर नेहमीच ताजातवाना असतो! तो तर नेहमीच नवीन असतो. तुम्ही त्या अल्पकालीन, वर वरच्या उदासीनतेला कंटाळून आत्मनिरीक्षणाला सुरवात करून खोलवर डोकावून पाहायला लागता. आता लक्षात येतेय मी काय म्हणतोय ते?

म्हणून हि उदासी हा तर आशीर्वाद आणि शाप आहे. आशीर्वाद आहे कारण तो तुम्हाला रोजच्या रटाळ जीवनापासून लांब नेऊन तुम्हाला स्वतःची जाणीव करून देतो आणि परत जीवनात आणून सोडतो आणि शाप आहे कारण तो तुम्हाला स्थिरता देत नाही, दोन्हीही.
जे लोक प्रेमात पडलेले असतात ते कधीच कंटाळत नाहीत. कारण हृदयाला कंटाळा माहित नाही. बुद्धीला मात्र कंटाळा माहित आहे. पण आयुष्यात हृदय आणि बुद्धी दोन्हींची गरज असते. तुम्ही जर हृदयाच्या अधिपत्याखाली असला तर उगीचच भावूक होऊन जाता आणि जर जर बुद्धीच्या आधीन असाल तर ते हि काही बरे नव्हे. या दोन्हीचे संतुलन साधने म्हणजेच योग होय. हृदय आणि बुद्धी यांचे असे संतुलन अध्यात्मात असते.

खास करून अशा लोकांसाठी कि ज्यांना आपण आयुष्यात पराभूत झालो आहोत असे वाटते. ज्या कोणाला आपण पराभूत झालो आहोत असे वाटत असेल, तर त्यांनी जागे व्हायची गरज आहे! आयुष्य हे निरंतर आहे.

एका वर्षात ३६५ दिवस असतात आणि अशा अनेक वर्षांचे आयुष्य बनते. मग जर तुम्हाला एक दोन दिवस आयुष्य वाया गेले असे वाटले तर ते काही फारसे मनाला लाऊन घेऊ नका. आपण या पृथ्वीतलावर अनेक जन्म घालवले आहेत आणि आपली चेतना हि पुरातन आहे.

तो पौर्णिमेचा चंद्र पहा. एखाद्या पौर्णिमेला जर ढग येऊन त्याचे चांदणे जर पृथ्वीवर बरसले नाही तर चंद्र कधी दुखी होत नाही. एखाद्या पौर्णिमेला जर चंद्र दर्शन झाले नाही तर काय? चंद्र तर आहे तिथेच आहे. त्याप्रमाणे तुमच्यात पूर्ण असा परमात्मा आहे,आणि जर एखाद्या दिवशी जर तो आपला प्रभाव दाखवू शकला नाही वाईट वाटून घेऊ नका.

तुमच्यात अनेक चांगले गुण आहेत आणि जर एखाद्या दिवशी जर त्यातले काही गुण दाखवायची संधी मिळाली नाही तर वाईट वाटून घेऊ नका. स्वतःला दोष देऊन त्यावर फार विचार करू नका. लक्षात येतेय मी काय म्हणतोय ते? आपण स्वतःबद्धल कधी कधी खूप विचार करून, त्याचे विश्लेषण करून मग उदास होऊन बसतो. कधी स्वतःला उगीचच नको तेवढा दोष देतो.

त्याचा फार विचार करू नका, इतक्या आयुष्यात एक वाया गेले म्हणून काय झाले? ज्यांना स्वतःबद्धल खूप कमीपणा वाटतोय त्यांच्याविषयी मी बोलतोय. माझ्या या बोलण्याचा विपर्यास करून ते सर्वांना लागू नाहीये हे ध्यानात ठेवा, नाहीतर सांगत सुटल कि “गुरुजी म्हणाले कि हे आयुष्य वाया गेले तरी हरकत नाही. चला, मजा करू यात आणि सर्व साधना विसरून जाऊ यात.’ नाही, मला असे सांगायचे नाहीये.!

जे अगदीच अगतिक झाले आहेत त्यांना मी तसे सांगू इच्छितो, कि जागे व्हा, इतके आयुष्य वाया गेले तर वाईट वाटून घेऊ नका, अजूनही वेळ गेलेली नाहीये. भविष्य-काळ हा उज्ज्वल आहे.

जेंव्हा तुम्ही भूतकाळात डोकावता तेंव्हा अशी पश्चातापाची वेळ येते. जेंव्हा तुम्ही चालता चालता मागे वळून पाहता तेंव्हा अशी पश्चातापाची पाळी येते. जेंव्हा तुम्ही पुढे पाहत असता, तेंव्हा सर्व काही उज्ज्वल आहे हेच दिसते. मागचा विचार सोडा कारण त्याने फक्त निराशाच पदरी येते. ते सर्व सोडून पुढे चला.

प्रश्न: प्रिय गुरुजी, मला तुमच्याबद्धल खूप आपलेपणा वाटतो, तरी तुमचे आशीर्वाद मिळविण्यासाठी मी तुम्हाला प्रत्यक्षात भेटणे जरुरी आहे काय?
श्री श्री रविशंकर: नाही, त्याची काही गरज नाहीये. पण ज्या अर्थी तुम्ही हा प्रश्न विचारताय तेंव्हा त्यामागे काही भावना किंवा इच्छा आहे. काळजी करू नका, तुम्ही अनायसे इथे आलाच आहात. आपण आता समोरासमोर पाहु यात, बोलू यात.

प्रश्न:  या मार्गावर चालताना धर्माचे पालन करणे कितपत महत्वाचे आहे? धर्म हा तुमच्या व्यवसायावर अवलंबून असतो कि तुमच्या ध्येयावर?
श्री श्री रविशंकर: धर्म हा तुमच्या प्रतीबद्धतेवर अवलंबून असतो. तुम्ही ज्यासाठी वाहून घेतले आहे तो तुमचा धर्म! जेंव्हा तुम्ही या मार्गावर असता तेंव्हा धर्म हा नैसर्गिकपणे आपोआप येतो.

प्रश्न: गुरुजी, प्राण आणि श्वास हे एकमेकांशी संबंधित कसे आहेत?
श्री श्री रविशंकर: श्वास घेण्याने प्राणशक्ती वाढते. प्राण हा तर जीवन शक्ती आहे. त्या दोन्हीचा आंतरिक संबंध आहे.

प्रश्न: मी योग्य जीवन साथी कसा निवडू?
श्री श्री रविशंकर: तुम्ही एखाद्या अनुभवी व्यक्तीला हा प्रश्न विचारायला पाहिजे. मला यात काहीच अनुभव नाहीये. ज्या कोणाला पहिल्याच अनुभवात जीवन साथी न भेटता, त्यासाठी त्यांनी अनेक प्रयास केल्यावर ज्यांना जीवन साथी मिळाला आहे त्यांना विचारा. ज्या जोडप्यांना खुपसा अनुभव आहे त्यांना विचारा. आणि मग तुम्हाला सापडल्यावर मला पण सांगा.
आता, तुम्हाला योग्य जीवन साथी हवा आहे. तुम्हाला योग्य जीवन साथी मिळेल, पण त्या जीवन साथीला पण योग्य जीवन साथी हवा असेल. त्या व्यक्तीसाठी तुम्ही योग्य जीवन साथी आहात काय? हा एक फार मोठा प्रश्न आहे. त्यांच्या दृष्टीने तुम्ही जर योग्य जीवन साथी नसाल तर काय?

प्रश्न: पुनर्जन्म जर असेल तर तो याच पृथ्वीवर होतो कि इतरत्र पण होऊ शकतो?
श्री श्री रविशंकर: याच पृथ्वीवर फक्त!



The Art of living
© The Art of Living Foundation

2 April 2012


पैसे मिळवण्याचा कोणताही सोपा मार्ग नाही
जागतिक व्यापार नीतिमूल्ये परिषद
सिंगापूर, २ एप्रिल २०१२


आज आदर्श व्यक्ती असणे फार गरजेचे आहे. तरुण उद्योजकांसमोर आदर्श असायला हवेत, उद्योग जे नीतीमत्येने काम करतात, जे न्यायी आणि सामाजिक जाणीव असणारे आहेत. असे बरेच उद्योग आहेत जे आचारसंहिता पाळून, आणि नीतीमत्येने वाढलेले आहेत, त्यामुळे हे व्हायला हवे. या परिषदेचा मुख्य हेतू ही बाब अधोरेखित करणे हेच आहे, असे उद्योग अधोरेखित करणे, जे पुढच्या पिढीसाठी नीतीमूल्य आचरणात आणण्यासाठी आदर्श असतील. 
तुम्हाला माहित आहे, पैसे मिळवण्याचे बरेच मार्ग आहेत, पण चांगली झोप बऱ्याच मार्गाने मिळवता येत नाही. जेंव्हा सगळे निर्मळ आणि सरळसोट वाटते, जेंव्हा पारदर्शकता, स्पष्टता, सरळता असते तेंव्हा चांगली झोप आणि आतून समाधान मिळते.
मी सामान्यतः सगळ्यांना, कंपन्यांमध्ये, कारखान्यात दुपारी ध्यान करायला सांगतो. १० ते २० मिनिटे ध्यान आणि नंतर एकत्र जेवण करायला सांगतो. तुम्हाला दिसेल की त्या समूहात सुसंवाद, सुसूत्रता येते. तुम्हाला एकत्र काम करावेसे वाटते, संघभावना वाढीस लागते, नवनवीन कल्पना सुचतात. त्यामुळे एकत्र जेवण करणे नेहेमीच चांगले.
बस!! माझा कमी बोलणे आणि जास्त काम करणे यावर विश्वास आहे. मला जे बोलायचे होते ते झाले, आता तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा..

प्रश्न: या आधी आम्ही ‘स्वहिताची पुनव्याख्या’ या विषयावर चर्चा करत होतो. तुम्ही या बद्दल परत सांगाल का?
श्री श्री: होय, स्वहित खूप महत्वाचे आहे. दुरगामी विचार केल्यास तुम्हाला एक गोष्ट माहित असायला हवी की तुम्ही जर प्रत्येक गोष्ट अनैतिक मार्गाने करत गेलात तर त्याचे परिणाम वाईटच होतील. याचा अर्थ तुम्ही स्वहित जपत नाही, तर तो विनाश आहे. ते स्वहित आहे असा फक्त भास होतो पण तो विनाश असतो.
अजून एक दृष्टीकोन म्हणजे तुमच्यात अनेक लोकांना, समाजाला सामावून घ्या. जेंव्हा तुम्ही ‘मी’ असा विचार करता, तेंव्हा तुम्ही स्वतः, तुमचे कर्मचारी, तुमची कंपनी एवढाच विचार करता. समाजात जोपर्यंत एक पोषक वाढ नसेल तोपर्यंत तुमची कंपनी राहू शकणार नाही. जोपर्यंत खरेदीदार नसेल तोपर्यंत इतक्या गोष्टी बनवून काय उपयोग? अशा वेळी तुम्ही काय कराल? तुमच्या “मी” मधे लोकांची खरेदी करायची ताकद सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. तुमच्या उत्पादन शक्ती बरोबरच लोकांची खरेदी करायची शक्ती वाढवणे हे तुमच्याच हिताचे आहे. आपले स्वहित समाजाच्या हितात बघण्याचा हा उत्तम मार्ग आहे.

प्रश्न: मी सार्वजनिक नेतृत्वाचे प्रशिक्षण देतो. जे लोक फळवाद आणि भ्रष्ट्राचारामुळे पिडीत आहेत त्यांना निर्णय कसे घ्यावेत यासाठी मदत करायला मला आवडते. मोठ्या स्तरावर निर्णय कसे घ्यावेत, आणि स्वतः समाधानी कसे राहावे? लोकांना फळवाद असो किंवा आंतरिक समाधान असो, हे निर्णय घ्यायला कशी मदत करावी?

श्री श्री:तुम्हाला फक्त त्यांचा दृष्टीकोन विशाल करावा लागेल, त्यांना सांगा “तुम्हाला काय करायचे आहे तुम्ही ठरवा. तुम्ही या वर्षी कर चुकवून पुढच्या वर्षी पकडले जाऊ शकता. त्यावेळी तुम्हाला दंड भरावाच लागेल. त्यापेक्षा आज कर भरा आणि पुढे चला” त्यांना हा दृष्टीकोन समजावला पाहिजे. जेंव्हा तुम्हाला आतून निर्मळ वाटते तेंव्हाच पोषक विकास आणि पोषक वाढ होऊ शकते.
दुसरे म्हणजे पैसे मिळवण्याचा कोणताही सोपा मार्ग नाही, हा मुद्दा उद्योगपतीसमोर, विशेषतः तरुण उद्योगापतींसमोर सतत मांडावा लागेल. त्यांना झटपट श्रीमंत होण्याचा मार्ग हवा असतो. त्यात रसातळाला जाण्याचा मोठा धोका आहे, याची जाणीव द्यायला हवी.
मला आज समाजात, लोकांच्या दृष्टीकोनात मागच्या ५ ते १० वर्षापूर्वीपेक्षा मोठा बदल झालेला दिसतो. आज बऱ्याच कंपन्यांमध्ये, बरेच उद्योजक जलद मोठे झालेत आणि कोसळलेत. आज कोणालाही त्या यादीत आले नाव नको आहे. ही उदाहरणे लोकांना या चुकीच्या मार्गाने न जाण्यासाठी उपयोगी ठरतात.

प्रश्न: या तणाव, हिंसा आणि भ्रष्ट्राचार युक्त जगात, जे तरुण व्यवसाय सुरु करत आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल?
श्री श्री:संपूर्ण जग भ्रष्टनाही हे लक्षात घ्या. काही थोडे लोक भ्रष्टाच्रारात बरबटलेले आहेत.
जिथे आपलेपणा संपतो तिथे भ्रष्ट्राचार सुरु होतो, हे लक्षात घ्या. ज्यांच्या बरोबर आपलेपणा वाटतो त्यांचाबरोबर आपण भ्रष्टाचार करत नाही. जिथे आपुलकी आहे तिथे भ्रष्टाचार अशक्य आहे. जिथे आपलेपणा संपतो तिथे भ्रष्ट्राचार सुरु होतो. आपल्याला लोकांना मूल्ये शिकवावी लागतील जेणेकरून ही आपुलकी वाढेल. यालाच मी अध्यात्म म्हणेन. अध्यात्म म्हणजे लोकांमध्ये आपुलकीची भावना वाढीस लागणे, जिथे प्रामाणीकपणा, एकमेकांची कदर करणे हे नैसर्गिकरित्या होईल. या परिस्थितीत भ्रष्टाचार अशक्य होईल.

प्रश्न: गुरुजी, आपण मूल्ये, नैतिकताआणि स्वहित याबद्दल चर्चा केली. माझ्या मते प्रत्येक मनुष्यात काही प्रमाणात अध्यात्मिकता असणे गरजेचे आहे. तुम्ही कुठल्याही धर्माचे असलात तरी तुमच्या मनात काही मुद्दे हे धर्म किंवा अध्यात्मिकतेमुळे दृढ झालेले असतात. पण जेंव्हा तुम्ही नैतिकता किंवा मुल्यांचा विचार करतो तेंव्हा सगळे नीट आणि न्यायी वाटते. माझा दृष्टीकोन हा असा आहे, तुम्हाला काय वाटते?
श्री श्री:मला तुम्हाला एक उदाहरण देतो.ज्या ठिकाणी गर्दी असते तिथे चोऱ्या होत असतात, जसे भारतासारखे देश. जिथे मोठी गर्दी तिथे चोऱ्या होतात. पण जेंव्हा कुंभमेळा होतो, ३ कोटी लोक एकत्र जमतात पण एकही चोरीची तक्रार नसते. का? कारण तिथे एक पवित्रता, एक धार्मिकता, भाव असतो ‘मी इथे यात्रे साठी आलो आहे’ लोक त्यांच्या चीजवस्तू, लॅपटॉप ठेवून फिरत असतात, आणि कोणीही ते चोरत नाही, हे अविश्वसनीय आहे.
एरव्ही तुम्ही ठेवलेला जुना चष्मा सुद्धा चोरीला जातो, तुमच्या चपला चोरी होतात आणि कुंभमेळ्यात तुमचा , लॅपटॉप सुद्धा चोरला जात नाही. हे विस्मयकारक आहे.
इतरांना देण्यात, सहाय्य करण्याने तुमची वृध्दीच होते. मी तुम्हला एक गोष्ट सांगतो एकदा जानेवारी महिन्यात जवळपास ० डीग्री तापमान होते एका रात्री ५० स्वयंसेवकसह मी घोंगडी वाटायला गेलो. तेथे खूप गरीब लोक होते ते खूप लांबून यात्रेसाठी, गंगेतस्नान करायला आले होते त्यांच्याकडे फार काही नव्हते, त्यामुळे आम्ही त्यांना घोंगडी देत होतो.
एक २०-२२ वर्षांचा मुलगा पुलाखाली कुडकुडत उभा होता. ज्यावेळी आम्ही त्यांना घोंगडी देऊ केली तेंव्हा तो म्हणाला ‘मला आज रात्री घोंगडी नको, मी आजची रात्र तशीच काढीन. तिथे पलीकडे काही वृद्ध स्त्रिया आहेत, त्यांना त्याचा जास्त फायदा होईल, कृपया तुम्ही त्यांना द्या.’ त्याने आम्हाला दाखवले आणि म्हणाला ‘तिथे ५०० मीटर वर काही वृद्ध लोक आहे, त्यांना या घोंगडीचा जास्त उपयोग होईल, मी तरुण आहे मी आजची वेळ निभावून नेईन’. त्या तरुणाची ती आपुलकी बघून मी भारावून गेलो. तो तरुण फक्त टी-शर्ट वर होता आणि तो ही कुडकुडत होता पण तो म्हणाला ‘नाही! पहिल्यांदा त्यांना द्या. जर काही उरले तर मी घेईन’. हा एकमेकांची कदर करण्याचा गुण खास आहे आणि विशेषतः गरीबांमध्ये तो दिसून येतो.
मूल्ये आणि अध्यात्म तुमच्यातील मानविय मूल्ये, हे चांगले गुण बाहेर आणतात. हे गुण आपल्यात असतातच फक्त ते बाहेर आणावे लागतात. मूल्ये आणि अध्यात्म हेच काम करतात.
३ महिन्यापूर्वी उत्तर-पश्चिम दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी आमच्या एका शिक्षकाला बोलावले. त्यांनी सांगितले तिथे जवळपास ३५० गुंड आहेत, जे चोऱ्यामाऱ्या, आणि इतर समाजविघातक कृत्ये करत आहेत, त्यांना तुम्ही लगेच जेल मधे टाकू शकत नाही पण त्यांच्या मुळे त्रास मात्र होतो आहे. आयुक्तांनी त्या ३५० जणांना बोलावले आणि आमच्या शिक्षकांना त्यांच्या साठी काहीतरी करायला सांगितले. त्यांना मूल्ये आणि आध्यात्मिकते बद्दल काही सांगता येईल का ते विचारले. त्या लोकांना सांभाळणे कठीण होते, पण ६ दिवसात त्यांच्यात अमुलाग्र बदल झाला. आम्ही त्यांच्या बरोबर रोज २-३ तास घालवले, काही मिनिटांचे ध्यान, प्राणायाम, ज्ञान, आणि ६ दिवसानंतर त्यांचात पूर्ण बदल झाला होता. तेच समाजविघातक लोक स्वच्छता मोहीम, आरोग्याबद्दल जागरुकता अशी कामे करू लागली, उत्तर-पश्चिम दिल्लीतला गुन्हेगारीचा दर ९०% ने खाली आला. पोलीस आयुक्त स्वाभाविकच अचंबित होते, ते म्हणाले ‘आपण हे सगळीकडे का करत नाही’ आम्ही त्यांना सांगितले ‘आम्ही केंव्हाही तयार आहोत’ 
तणाव मुक्त कसे जगावे हे आपल्याला कोणीही शिकवत नाही. फक्त बोलण्याने किंवा सल्ले देण्याने तो जात नाही. त्यांना काही तंत्र, काही साधने काही कार्यतंत्र शिकवावे जेणेकरून त्यांना आपले मन शांत करता येईल. त्यांना शांत आणि संकलित मनाने विचार करता यायला हवा. आम्ही हीच गोष्ट पनामा मधे सुद्धा केली.
शिकागो मधे, जिथे शाळेत हिंसाचाराचे प्रमाण खूप जास्त होते तिथे आम्ही प्राणायाम, ध्यान शिकवले. आम्ही हे वर्ग घेतल्यानंतर तिथे हिंसाचाराच्या घटना २६८ वरून ६० वर आल्या.
शिक्षण खाते खूप अचंबित झाले. अखेर आम्ही हिंसा आणि तणावमुक्ती साठी काहीतरी करू शकलो.
मला वाटते आपल्या शैक्षणिक पद्धतीत तणावमुक्त राहण्याचे शिक्षण अंतर्भूत असायला हवे. तणाव हा आजकाल नेहेमीचा झाला आहे, त्यामुळे मानसिक शुद्धता असायला हवी. आपण दातांचे आरोग्य शिकवतो पण मनाचे आरोग्य राखायचे शिकवायला विसरतो. आपण मुलांना शाळेत, महाविद्यालयात असल्यापासून आपले मन स्वच्छ आणि शहाणे ठेवायला शिकवले पाहिजे, तणाव आणि काळजीने ते भ्रमिष्ट होता कामा नये.
युरोपातील ३०% लोक नैराश्याने ग्रासले आहेत, सिंगापूर मधे ते किती आहे मला माहित नाही, कदाचीत इतके जास्त नसेल, कदाचित २०% असेल. काही वर्षांपूर्वी ही परिस्थिती नव्हती. आपण आर्थिकदृष्ट्या बलवान होत असताना असे व्हायला नको, पण वास्तविक तसे होते आहे, म्हणूनच आपल्याला लोकांना अध्यात्मीक मूल्ये शिकवली पाहिजेत, तुम्हाला काय वाटते?
अध्यात्म तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत स्थिर राहायला मदत करते. अध्यात्म म्हणजे नुसते बसून धार्मिक कर्मकांड करणे नव्हे, तर आयुष्याकडे एका विशाल दृष्टीकोनातून बघणे होय. धर्म हा तुमच्या आयुष्याचा एक भाग निश्चित आहे, पण अध्यात्म थोडे वेगळे आहे. अध्यात्म म्हणजे मूल्ये आणि विशाल दृष्टीकोनातून बघणे

प्रश्न:जगातील बरेच देश लालच ही चांगली संस्कृती मानतात. सिंगापुरमध्ये आम्ही खूप नशीबवान आहोत कारण सरकार मध्यस्ती करून गरीब आणि श्रीमंत यातील दरी कमी करत आहे, पण इतर देशात असे होताना दिसत नाही. गुरुजी, आर्ट ऑफ लिविंगचे स्वयंसेवक म्हणून आणि तुमच्या शिकवणुकीनुसार आम्ही यात भाग घेऊ शकतो.  समाजात, जिथे लालच, नफेखोरी, अब्जापती बनणे हीच मानवाच्या अस्तित्वाची मूल्ये बनली आहेत तिथे हे मोठे आव्हान आहे. कृपया आम्हाला तुमचे मौलिक मार्गदर्शन करावे.

श्री श्री:असे बघा, उद्योजगातिका आणि स्पर्धा चांगली आहे. समाजात ती असणे गरजेचे आहे. पण खेळाचे नियम डावलून, त्यांना धाब्यावर बसवून खेळ जिंकायचा प्रयत्न करणे धोकादायक आहे. एखादा माणूस इच्छित फळासाठी लालची असू शकतो पण ते कोणतीही किंमत देऊन नसावे. तुमच्या लक्षात येतं मी काय म्हणतोय? तुम्हाला माहित असते की जितकी खूप असेल तितकेच खावे. तुम्हाला खावे वाटले तर खा, पण बुलीमियाला बळी पडू नका, जिथे तुम्ही उलटी करता आणि जाऊन परत खाता. बुलीमिया हा आजार याचे उत्तम उदाहरण आहे.  मी उद्योगांच्यात्यांनी खूप नफा कमावण्याच्या विरुद्ध नाही. तुम्ही जितका नफा कमवायचा तितका कमवा, पण नैतिकतेने. जितका जास्त नफा तुम्ही कमवाल तितके जास्त तुम्ही CSR (उद्योगांची सामाजिक जबाबदारी) मधे गुंतवा, सामाजिक कार्य करा. जर तुम्ही असे कराल जर तुम्ही सुरु केलेला उद्योग सुरु राहील आणि वाढेल, अन्यथा तो उद्योग जलद वाढेल आणि तिथ्याच लवकर खाली येईल. मागील काही वर्षात लोकांना हाच धडा मिळाला आहे. आज लोकांना त्याची जाण आहे.


The Art of living
© The Art of Living Foundation

जर तुम्ही स्वत:बरोबर सहज असाल तर सगळेच तुमच्याबरोबर सहज असतील


एप्रिल२०१२-इंडोनेशिया बाली दिन

समाधान आणि आनंद हे फार महत्वाचे आहेत. बाकीच्या गोष्टी येतात आणि जातात.
आपण या ग्रहावर किती वेळा आलेलो आहे, आपण पुन्हा येणार आहोत. जीवन हे चालूच राहते; येणे आणि जाणे,येणे आणि जाणे चालूच राहते.

प्रश्न: मी माझी हिम्मत बांधलेली कशी ठेऊ?
श्री श्री रविशंकर: जेव्हा कधी तुम्ही काळजीत असता तेव्हा लक्षात ठेवा कि हे छोट्या छोट्या कारणांमुळे आहे आणि सगळ काही ठीक होणार आहे याची मनात घट्ट गाठ बांधून ठेवा.
या अडचणी येताना आणि जाताना तुम्ही बघता आणि मग तुम्ही म्हणता,"मी याने विचलित होणार नाही. मी याच्यापेक्षा मोठा आहे." वा!
केवळ एवढाच विचार -मी याच्यापेक्षा मोठा आहे.यामुळे हिम्मतीला बळ मिळते. मी देह नाही; देहामध्ये सतत बदल होत असतात. मला कधी थकवा येतो,कधी बलवान वाटते. मी देहापेक्षा मोठा आहे.
लोकांना वाटते की मन देहाच्या आत आहे, हे चुकीचे आहे, देह मनाच्या आत आहे. मन हे मेणबत्तीप्रमाणे आहे,त्यात वात आहे आणि वातीच्या वर ज्योत आहे. जर तुम्ही मेणबत्तीला झाकून बंदिस्त करून ठेवले तर ऑक्सिजन असेपर्यंतच ती जळेल. त्याचप्रमाणे जर तुम्ही एखाद्याला खोलीत डांबून ठेवले तर तो ऑक्सिजन असेपर्यंतच जिवंत राहील. तर मग मन हे ऑक्सिजनवर जगणाऱ्या ज्योतीच्या प्रभेसारखे मन हे चेतानेवर जगणारे आहे. तर सर्वप्रथम देह आणि नंतर मन असते,हे मन बरेच मोठे आहे. जेव्हा तुम्ही लक्षात ठेवता की मन ज्योतीप्रमाणे आहे आणि ते बरेच मोठे आहे तेव्हा शांततेचा लाभ होतो. तरीदेखील काही चिंता सतावत असेल तर श्वसन (सुदर्शन क्रिया) करा. जलद श्वसन आणि भस्त्रिका याने खूप चांगला फरक येईल.

प्रश्न: गुरुजी,नात्यांमुळे स्वातंत्र्य का संपुष्टात येते?
श्री श्री रविशंकर: जर नात्यांमध्ये विवेक असेल, तर ते नाते स्वातंत्र्य हिरावून घेत नाही. जर विवेक नसेल, तर मग त्या नात्यात स्वातंत्र्य उरत नाही. नात्यामुळे स्वातंत्र्य मिळते किंवा संपुष्टात येते, असे  नाही. तर ते विवेकाच्या अभावाने होते.

प्रश्न: प्रिया गुरुजी,माझे कर्तव्य काय आहे?
श्री श्री रविशंकर: तुमच्या अंतरात्म्याचे ऐका. तुमचा अंतरात्मा तुम्हाला तुमचे कर्तव्य काय ते 
सांगेल.

प्रश्न: जय गुरुदेव, आपल्या जीवनातील वाईट गोष्टीदेखील ईशकृपा आहे का?
श्री श्री रविशंकर: जर तुम्ही मोठ्या दृष्टीकोनातून बघितले तर तुमच्या लक्षात येईल की दु:खद प्रसंगांमुळे तुम्हाला एक प्रकारची गहनता आणि परिपक्वता मिळाला आहे.
जेव्हा कधी तुम्ही दुःखी असता तेव्हा समर्पण करा. सामान्यतः तुम्ही चिडलात कि म्हणता, "मी हात टेकले!"
दुःखी असताना सर्व त्यागण्याची शक्ती आणि सुखात असताना सेवा करण्याची शक्ती तुमच्यात असली पाहिजे. सुखात सेवा आणि दुःखात त्याग.

प्रश्न: गुरुजी, मला या जगात मोठा बदल घडवून आणायचा आहे. बदल आणण्याचा मार्ग मी कसा शोधू?
श्री श्री रविशंकर: जगात मोठा बदल घडवून आणण्याची मनीषा असणारे तुमच्यासारखे लोक मला पाहिजे आहेत. माझ्याकडे या आणि मी तुम्हाला वेगवेगळया जागी पाठवीन, जिथे जाऊन तुम्ही खूप काही काम करू शकाल. तुमच्याकडे आयते व्यासपीठ आहे. श्रीगणेशा करून त्यावरच पुढची तीस वर्षे वाया घालवण्याची तुम्हाला गरज नाहीतुमच्याकडे आयते व्यासपीठ आहे, इथे स्वतःला झोकून द्या आणि बदल घडवून  आणा.
मला काही करायचे आहे हे एक आणि जगात कशाची गरज आहे ते आपण केले पाहिजे हे दुसरे. मला बदल घडवायचा आहे हे आणि आपल्याला बदल घडवायचा आहे या दोन्हीत फरक आहे. जगाकरिता काय जरुरी आहे ते आपण करुया.हि भावना आपल्यामध्ये असली पाहिजे.

प्रश्न: प्रिय गुरुजी, मी भयगंडाने पछाडलेला आहे. काय करू?
श्री श्री रविशंकर: मी असताना भीती कशाची! तुम्ही माझे आहात आणि मी तुमचा. जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही एकटे आहात आणि तुमच्याबरोबर कोणी नाही तेव्हा तुम्हाला भीती वाटते.
जेव्हा तुम्हाला जोडलेले वाटत नाही, एकटेपणा वाटतो त्यामूळे भय वाटते. शीर्षासन केलेले प्रेम   म्हणजे भय. जाऊ द्या,जरा उज्जयी श्वास घ्या, सत्संगाला जा आणि मग बदल होईल.

प्रश्न: गुरुजी,मला कामुकतेचा चाळा लागला आहे. कामवासने बाबत मी माझे संपूर्ण नियंत्रण हरवून बसलो आहे. मी खूप प्रयत्न करतो पण मी स्वतःला आवरू शकत नाही.
श्री श्री रविशंकर: मला वाटते की तुमच्याकडे भरपूर मोकळा वेळ आहे. जर तुम्ही कार्यमग्न असाल आणि मेहनत करत कराल आणि इतके थकलात कि घरी येऊन कधी एकदा बिछान्यावर अंग टाकतो आणि अंग टाकल्यावर एका मिनिटात झोपेच्या अधीन व्हाल.
एक तर तुमच्याकडे पुष्कळ मोकळा वेळ आहे किंवा मग तुम्ही जास्त आहार सेवन करीत आहात,यामुळे असे चाळे,व्यसने आणि भावातीरेक लागतात. अतिरेकी आहार आणि अतिरेकी कामवासना हे एकमेकांशी जोडलेले आहे.

प्रश्न: अध्यात्मायाच्या मार्गात विवाह करणे आणि संतान होणे हे वाईट आहे का?
श्री श्री रविशंकर: नाही. तुम्ही लग्न करू शकता आणि तुम्हाला मुले झालेली चालेल.
त्यासाठीच मी Sri Sri Matrimony याची सुरुवात केली आहे,म्हणजे मग अविवाहित मुली आणि मुले त्यांचे नाव इथे नोंदवू शकतील आणि एक दिवस आपण "स्वयंवर" ठेवू या. मग तुम्हाला कोणाबरोबर लग्न करायचे त्याची निवड करू शकता.
आम्ही याची सुरुवात आधीच केली आहे,आता त्याचा विस्तार करायचा आहे. जो जोड्या उत्तमप्रकारे जुळवू शकतो अशा कोणीतरी यात थोडे लक्ष घातले पाहिजे.

प्रश्न: गुरुजी,एवढ्या वर्षांनंतरदेखील मी अजून संघर्ष करतो आहे,का? तुमच्यावर खूप प्रेम आहे गुरुजी!
श्री श्री रविशंकर: तुमचे माझ्यावर प्रेम आहे आणि तरीदेखील तुम्ही संघर्ष करीत आहात. कशाकरिता संघर्ष चालू आहे?
जर तुम्ही पैशाकरिता संघर्ष करीत असाल तर बसून स्वप्नरंजन करू नका. मेहनत करा. जर एक धंदा चालला नाही तर दुसरा धंदा निवडा आणि तो करा.
व्यवसाय किंवा नातेसंबंध या दोन बाबतीतच तुमचा संघर्ष असू शकतो.
जर तुमचे लग्न होत नसेल तर याचा अर्थ कि तुम्ही निवड करताना चोखंदळपणा करीत आहात आणि म्हणून ते काम होत नाही. आणि जर तुमचे नाते नीट नाही आणि तुम्ही ते टिकवायला संघर्ष करीत असाल तर अर्थात लोक जसे आहेत तसे त्यांना स्वीकारा हे ज्ञान इथे उपयोगी पडेल. तर मग तुम्ही त्यांचा जास्तीत जास्त स्वीकार करण्याचा प्रयत्न करता परंतु तुमचे मन नकार देते. ज्ञानामुळे तुम्ही टिकून आहात आणि जिवंत आहात हे जाणून घ्या. तुम्हाला समजते आहे का मी काय म्हणतो आहे ते? तुम्ही कसेही करून सगळे जमवता आहात.
तर मग असे समजू नका कि तुम्हाला काहीच जमत नाही. मला नाही वाटत कि हे खरे आहे.
आरोग्य ही तिसरी समस्या असू शकते. आणि चौथी समस्या असणे शक्य नाही. आणि दि आर्ट ऑफ लिविंगमध्ये आल्यानंतर या तीन समस्या हाताळण्यात तुम्हाला मदत मिळते.
बसून स्वप्नरंजन करू नका आणि चमत्कार होण्याबद्दल विचार करत राहू नका. चमत्कार होतात पण जर तुम्ही चमत्काराची लालसा धरून बसलात तर चमत्कार लोप पावतील. निसर्गाला तुम्ही चैतन्यपूर्ण पाहिजे आहात.
"गुरुजी,कृपा करून मला लॉटरीचे क्रमांक सांगा.मला लॉटरी जिंकायची आहे म्हणजे मला बाकी काही करायची जरुरत नाही. पूर्ण वेळ केवळ साधना करायची आणि काही सेवा करायची." असे मला विचारणारे लोक आहेत. माझे उत्तर आहे,"बिलकुल नाही!"
सर्वात प्रथम तुम्हाला जीवनाकडून काय पाहिजे ते ठरवा.
संघर्ष कशाचा? पैशाचा?!
पैसा अशी गोष्ट आहे जी लोकांकडे नेहमीच कमी असते हे जाणून घ्या. नेहमीच! उदाहरणार्थ अमेरिका,जगातील सर्वात संपन्न राष्ट्र,आपल्या ग्रहावरील महासत्ता मोठ्या कर्जखाली आहे,अब्जावधी डॉलरचे कर्ज. मोठ्या कंपन्या घ्या,त्यातल्या बऱ्याच कर्जबाजारी आहेत.
धनवान माणूस जेवढे कमावतो तेवढा जास्त खर्च त्याला करावा लागतो. त्याचवेळी तुम्हाला गरीब माणसे धर्मादायाकरिता पैसे देताना,देवा करता दानधर्म करताना दिसतात जे आश्चर्यकारक आहे. त्यांना एवढी विपुलता वाटते.
परवा एक सद्गृहस्थ माझ्याकडे आला. त्याचे एक छोटेसे दुकान आहे,एक टपरी आणि त्याला दोन भूखंड वारसा हक्काने मिळाले. तर तो माझ्याकडे येऊन त्याल्तील एक भूखंड मला देण्याचा प्रस्ताव त्याने केला. "मला हा भूखंड तुम्हाला द्यायचा आहे,"तो म्हणाला,त्याने आग्रहच धरला. त्याची आई,पत्नी अशा त्याच्या संपूर्ण परिवाराबरोबर आला होता आणि म्हणाला,"माझ्यकडे दोन आहेत,त्यातील एक मला दान करायचा आहे आणि दुसरा ठेवायचा आहे"
भूखंड शहरातील महागड्या ठिकाणी होता आणि तो त्याने विकला असता तर त्याचे नशिब उघडले असते. पण त्या माणसाच्या मनाच्या मोठेपणाकडे बघा.
मी म्हणालो,"ठीक आहे.मी तो घेईन पण तो तुझ्याच नावावर राहील. माझ्याकरिता तू तो सांभाळून ठेव आणि तू तिथे दुकान बनव. दुसरा भूखंड विक आणि त्याच्या पैशाने धंदा चालू कर." मी घेणार नाही असे त्याला स्पष्ट म्हणू शकलो नाही कारण तो दुखावला गेला असता,म्हणून मी म्हणालो,"हो,तो माझा असेल पण तुझ्या नावावर राहील आणि तुझीच मालकी असेल."
या माणसाच्या मनाच्या मोठेपणाकडे बघा.
आणखी एका दिवशी एक महिला माझ्याकडे आली,आणि तिच्याकडे केवळ एक सोन्याची साखळी जी तिला वारसा हक्काने मिळाली, ती होती.मी गाडीकडे चाललो होतो आणि ती धावत आली आणि तिने एक पाकिट माझ्या हातात ठेवले.
लोक नेहमी त्यांच्या समस्या सांगणारी पत्रे मला पाकिटातून देतात. म्हणून मी ते पाकीट  घेऊन घेतले,आणि मला त्यात मिळाली सोन्याची साखळी.मग मी काही लोकांना ह्या महिलेचा शोध घेण्यास पाठविले आणि ती साखळी परत देऊन तिला कळविले की गुरुजींचे आशीर्वाद दिले आहेत.
तुम्हाला माहिती आहे,आपल्या रौप्यमहोत्सवाच्या वेळेस एक सुंदर घटना घडली! शेवटच्या दिवशी मी पायऱ्या उतरून येत होतो आणि एक छोटा मुलगा धावत माझ्याकडे आला,त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्याने मला एक पाकीट दिले. मी पाकीट घेतले आणि त्यात होते रु.५०००. मी त्या मुलाकडे बघितले आणि विचारले,"तू काय करतो?"
तो म्हणाला तो एक मजूर होता.
त्याने त्या पाकिटात जे पैसे दिले ती त्याची दोन महिन्याची कमाई होती,आणि तो म्हणाला,"कृपा करून हे घ्या."
तो म्हणाला,"मी सांगू शकत नाही कि माझ्या आयुष्यात किती अमुलाग्र बदल झाला आहे.कृपा करून याचा स्वीकार करा."
मी त्यातून केवळ रु.१०० घेतले आणि बाकीचे रु.४९०० परत केले. मी त्याला म्हणालो,हे रु.१०० माझ्य्कारिता खूप मौल्यवान आहेत,तेवढेच पुरे आहेत.ते मी घेतो.
दोन महिन्याची कमाई;तेसुद्धा एक माजुराकडून जो काबाडकष्ट करतो,तो येतो आणि अर्पण करतो. लोकांचे हृदय किती मोठे आहे!
माझे एवढेच म्हणणे आहे की तुम्हीदेखील विपुलता अनुभव.त्याकरिता तुम्ही धनवान असणे जरुरी नाही.खरे तर बऱ्याच श्रीमंत लोकांना विपुलता अनुभवता येत नाही,त्यांना कमतरता वाटत राहते. त्यांना औदार्य वाटत नाही.परंतु गरीब लोक नेहमी उदार असतात;त्यांच्याकडे त्या भावना असतात,ती कला असते.
अश्या काही प्रसंगाची कल्पना करू नका कि तुम्ही एक दिवशी भरपूर श्रीमंत होणार आहात आणि मग तुम्ही काही सेवा सुरु कराल,मनही,तसे काही नाही. तुम्ही विपुलतेचा अनुभव कोणत्याही क्षणी घेऊ शकता. आणि ज्या क्षणी तुम्ही विपुलता अनुभवाने सुरु कराल,त्या क्षणी सगळ काही अधिक चांगले होऊन जाईल,समजले!
त्याचप्रमाणे नाते संबंधांच्या बाबतीत उतावळे होऊ नका,आरामात राहा आणि तुम्ही बघाल के तुमचे लोकांबरोबरचे नाते अधिक चांगले होऊ लागले आहे. जर तुम्ही एखाद्या जळूप्रमाणे एखाद्या नात्यातील व्यक्तीला घट्ट चिटकून राहिलात आणि त्यांना संतप्त करू लागलात,तर मग तुम्ही जरी त्यांच्याशी चांगल्या शब्दात बोललात तरी ती व्यक्ती तुमच्यापासून दूर पळून जाईल, कारण ती हे हाताळू शकणार नाही.
प्रेम देणे हा एक पैलू आहे आणि प्रेम कसे हाताळावे ,प्रेम कसे स्वीकारावे हा दुसरा पैलू आहे. त्याकरिता संतुलित साक्षात्कारी व्यक्तीची गरज आहे. अशी वागणूक प्रत्येकाकडून अपेक्षित करू नका.
तुम्हाला स्वतःसोबत सहज असणे जरुरी आहे.जर तुम्ही स्वःताबरोबर सहज असाल तर सगळेच तुमच्याबरोबर सहज असतील

प्रश्न: गुरुजी,मला पूर्णपणे तुमच्यापाशी समर्पण करायचे आहे.
श्री श्री रविशंकर: नाही,नाही,असे काही करू नका. तुम्हाला समर्पण का करायचे आहे? तुम्हाला समर्पण करण्याची काय गरज आहे? काही नाही. आराम करा!
तुमचे समर्पण करणे हे तुमच्याकरिता आणि माझ्याकरिता फार मोठे काम होते...मोठी डोकेदुखी! तुम्हाला समर्पण करण्याची काही आवश्यकता नाही,आराम करा. तुम्ही कशाचे समर्पण कराल? तुमचे हृदय,मन आणि आत्मा? शक्यच नाही,ते आधीच माझे झाले आहे. सगळे काही माझेच आहे.
"अरे तुम्ही माझे हृदय चोरले" असे कोणी तरी गात होते. जे आधीपासूनच माझे आहे ते मी चोरण्याची काय गरज? मी तुमचे हृदय का चोरवे? या ग्रहावरचे सगळेच्या सगळे माझेच आहेत, असे मला वाटते,कळले का!
मला चोरण्याची आणि तुम्हाला समर्पण करण्याची काहीच गरज नाही. तुम्ही माझे आहातच. तर मग आराम करा...स्वस्थ बसा!
जेव्हा तुमच्या डोक्यावर नकारात्मकतेचे ओझे असते तेव्हा "शरण येण्या"ने मदत होते. जर तुमच्यात नकारात्मकता किंवा तिरस्कार असेल तेव्हा तुम्ही ते समर्पण करा. तुमचे चांगले गुण किंवा जे काही सुरेख आहे ते समर्पण करण्याची आवश्यकता नाही, कारण ते आधीच माझे आहे. जे काही नकारात्मक आहे ते माझे नाहीये आणि जर ते तुमच्याकडे असेल तर ते मला देऊन टाका.


The Art of living
© The Art of Living Foundation