यशस्वी वैवाहिक जीवनाचे रहस्य

12
2012
Aug
बंगलोर
भावना,ध्वनी आणि राग (स्वर माला किंवा तराणा)

हे शेवटचे गायलेले भजन हे जोगिया रागात होते. तुम्ही हा राग राधे सोबत निगडीत धरू शकत नाही. जर तुम्ही, 'शिव, शिव', म्हणालात तर ते वैराग्याच्या रागासोबत निगडीत करू शकतो.

एकदा कोणाला विवाहाच्या स्वागत समारंभाचे आमंत्रण होते आणि त्याला गाणे म्हणण्याची विनंती केल्या गेली. तर त्याने (कन्नड भाषेत) गाणे म्हणणे सुरु केले, 'प्रिय आत्म्या,तू देहाला सोडून का निघून गेलास? हा मृत्यू समर्थन करण्या योग्य आहे का?'

त्या प्रसंगाला हे गाणे उचित होते का?

तुम्ही कोणतेही गाणे कुठेही म्हणू शकत नाही. भावना आणि राग हे एकमेकांना अनुरूप असले पाहिजे.

आपले आयुष्य हे या सारखेच आहे. आयुष्याचा प्रवाह हा अखंड वाहतच असतो परंतु पुढे जाण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपण प्रवाहाच्या विरुद्ध म्हणजे मागेच जात राहतो. 

तुम्ही हे बघितले असेल की वाहत्या नदीमध्ये काही ठिकाणी जर अडथळा असेल तर पाणी उलटे वाहू लागते. आणि जिथे कुठे प्रवाह उलट्या दिशेने असेल तिथे घाण कचरा जमा होतो. पुढच्या दिशेने वाहणारा प्रवाह हा नेहमीच स्वच्छ असतो. तसेच आपणसुद्धा जर पुढे जात राहिलो तर मनामध्ये प्रसन्नता राहते. जर आपण भूतकाळाबद्दल सतत विचार करीत राहिलो तर मनामध्ये कोलाहल उठतो.

आज कोणीच काही प्रश्न विचारीत नाहीये ! याची केवळ दोन करणे असू शकतात. एक तर तुम्हाला सगळे माहित आहे. किंवा मग मी बोलत असलेला एकही शब्द तुम्हाला समजत नाहीये. (कारण गुरुदेव हे कन्नड भाषेमध्ये संवाद साधत होते). तुमची काय परिस्थिती आहे?

श्रोते: जेव्हा कधी आम्ही तुम्हाला बघतो, आम्ही सगळे प्रश्न विसरून जातो!

हे तर फारच छान आहे.

प्रश्न : यशस्वी वैवाहिक जीवनाचे रहस्य काय आहे?

श्री श्री : मला वाटते की तुम्ही चुकीच्या व्यक्तीला विचारीत आहात!

इथे जर्मनीचे सद्गृहस्थ आणि इटलीची महिला होती. दोघांनीही अनेक वेळा लग्न केले होते. ते इथे आले आणि म्हणाले,'गुरुजी,आम्हाला तुमचे आशीर्वाद पाहिजेत. निदान हे लग्न तरी टिकू दे.'

मी त्या सदगृहस्थाला विचारले की त्याला इटालियन भाषा येते का आणि तो नाही म्हणाला. मी त्या महिलेला विचारले की तिला जर्मन भाषा समजते का आणि ती नाही म्हणाली. दोघांनाही इंग्रजी येत नव्हते. मी म्हणालो,'एकमेकांची भाषा शिकू नका आणि तुमचे लग्न यशस्वी होईल.'

कन्नड भाषेमध्ये एक म्हण आहे, 'केवळ शब्दांमुळे वितुष्टाची सुरुवात होते. केवळ शब्दांद्वारा लोकांना आनंद मिळतो. केवळ शब्दांद्वारा लोक संपत्ती कमावतात. म्हणून शब्द जपून वापरले पाहिजे.'

दरवेळेस काही गैरसमज निर्माण झाल्यावर लोक म्हणतात, 'चला,बसून,बोलू या.' या ‘बोलू या’ ने काम होत नाही. आपण कधीही बोलत बसू नये. झाले गेले सोडून द्या आणि पुढे चला, बस्स! बसून भूतकाळावर चर्वीचरण करू नका. भुतकाळाबाबत कोणतेही स्पष्टीकरण मागू नका. जेव्हा एखादी चूक घडते तेव्हा ती चुकून होते, बस्स, येवढेच! त्याला सोडून तुम्ही पुढे जायला पाहिजे.

अशी कल्पना करून बघा की तुमच्या हातून काही प्रमाद घडला आणि कोणीतरी तुम्हाला त्या चुकीचे सतत स्पष्टीकरण विचारत आहे. कायम कोणालातरी कारण सांगायचे, सतत आपल्या चुकीबद्दल खुलासा द्यायचा याचे किती ओझे होईल. दुसऱ्याला अपराधीपणा कधीही वाटू देऊ नका. हे अतिशय महत्वाचे आहे. ज्याला कोणाला तुम्ही अपराध्यासारखे वाटायला लावलं तो कुठेतरी आतून तुमचा मित्र उरणार नाही. मैत्रीचा बंध सैल पडेल.

एखाद्याला अपराधीपणा न वाटता त्याची चूक निदर्शनास आणून देणे हे एक कौशल्य आहे. परंतु सर्वसामान्य माणसाची प्रवृत्ती ही कोणालातरी अपराध्यासारखे वाटायला लावणे आणि त्यातून आनंदित होणे आहे. या आपण सर्वसामान्य प्रवृत्तीच्या वर उठायला पाहिजे, आणि कोणालाही अपराधीपणा वाटू देता कामा नये. आणि मग तुमच्या नात्याची वीण ही अधिक घट्ट होईल.

स्त्रियांसाठी एक आणि पुरुषांसाठी एक गुपित आहे. जर तुम्ही यावर विचार केला तर हे उपयोगी पडू शकेल. स्त्रियांसाठी गुपित आहे की कधीही पुरुषाच्या अहंला पायदळी तुडवू नका.

संपूर्ण जगाला म्हणू दे की या भल्या गृहस्थाला डोके नाहीये परंतु त्याच्या पत्नीने कधीही असे म्हणता कामा नये. तिने नेहमी असे म्हटले पाहिजे,'तुम्ही या ग्रहावरचे सर्वात बुद्धिमान माणूस आहात. जर का तुम्ही तुमचे डोके वापरत नाही तर काय झाले याचा अर्थ असा नाही की तुम्हाला अक्कल नाही!'

तिने नेहमी त्याच्या अहंला फुगवावे. हे फार फार महत्वाचे आहे.

जर स्त्री तिच्या जोडीदाराला सांगत राहिली की, 'तुम्ही कुचकामी आहात, तुम्ही तर एकदम पालापाचोळा आहे', तर तो खरोखर तसाच होऊन जाईल.

आता पुरुषांकरिता गुपित-एका पुरुषाने बायकांच्या भावनांना दुखवू नये. ती तिच्या भावाची, आईची किंवा कुटुंबाची तक्रार करेल परंतु तुम्ही या वरातीत सामील होऊ नका. ज्याक्षणी तुम्ही तिच्या तक्रारीला संमती दर्शक मान डोलवाल, त्याक्षणी ती फिरेल. तिच्या तक्रारी सोडून ती तुमचीच तक्रार सुरु करेल. तिची गाडी उलट्या दिशेने फिरेल.

आणि तिला जर कोणत्या धार्मिक कार्यक्रमाला, तीर्थाटनाला,सिनेमाला किंवा खरेदीला जायचे असेल तर संमती द्या आणि सोबत क्रेडिट कार्डदेखील देऊन टाका!

जोपर्यंत तुम्ही स्त्रियांच्या भावनांना लाथाडणार नाही तोपर्यंत सगळे ठीक राहील.

आता दोघांकारिता-जोडीदाराच्या प्रेमाचा पुरावा मागू नका.

'तुझे माझ्यावर खरोखर प्रेम आहे,'असे विचारू नका. कोणावरही तुमच्यावर असलेल्या तिच्या/त्याच्या प्रेमाचा पुरावा सदर करण्याचे ओझे टाकू नका. तुम्हाला समजते आहे का मी काय म्हणतो आहे ते?

जर तुम्हाला त्यांच्या प्रेमामध्ये कमतरता भासत असेल तर असे म्हणा,'माझ्यावर तुम्ही इतके अफाट प्रेम का करता?' 'तुझे माझ्यावर अजिबात प्रेम नाही', आणि या प्रकारची वाक्ये म्हणू नका.

प्रश्न : जर कोणी आपल्याला डिवचत असेल तर आपण शांत राहावे का त्याला धडा शिकवावा? जर आपण शांत राहिलो तर त्यांना तो आमचा कमजोरपणा वाटतो आणि जर आम्ही त्यांना धडा शिकवला तर ते म्हणतात की आमची काहीही अध्यात्मिक प्रगती झालेली नाही.

श्री श्री : जर कोणाला धडा शिकवायचा असेल तर तुम्ही शांत असणे जरुरी आहे. जर तुमच्यात संताप असेल,जर तुम्ही अस्वस्थ असाल,तर तुम्ही कोणाला धडा शिकवू शकत नाही.

त्याचप्रमाणे, तुम्ही सतत तुमचा दुसरा गाल पुढे करण्याची गरज नाही.

धडा जरूर शिकवा पण अनुकंपेने. यामुळे तुम्हाला बळ मिळेल.

जेव्हा तुम्हाला समोरच्याची परिस्थिती समजेल आणि तो तुम्हाला का चीथोवतो आहे ते समजेल,तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर शांत आणि अविचालीततेने व्यवहार करू शकाल.

प्रश्न : आपल्या सभोवती सतत नकारात्मकता पसरवणाऱ्या लोकांना आम्ही कसे हाताळावे?

श्री श्री : सर्वात प्रथम हे लक्षात ठेवा की कोणीही सतत कायम नकारात्मकता पसरवू शकत नाही. दुसरे म्हणजे त्याला कौशल्याने हाताळा.

तिसरे म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष करा.

प्रश्न : कृपा करून अशी परिस्थिती मी कशी हाताळू याबाबत तुम्ही स्पष्टीकरण द्या. मी एका व्यक्तीवर विनाअट प्रेम करतो परंतु ती व्यक्ति मला गृहीत धरून चालते. या दुःखाला मी कसे हाताळू?

श्री श्री : अरे,ते तुम्हाला गृहीत धरून चालतात का? ते तुमच्या प्रेमाच्या बदल्यात प्रेम देत नाही का? ते तुमच्यावरचे प्रेम व्यक्त करीत नाही,ही समस्या आहे का? त्यांच्या प्रेमाबाबत प्रश्न करू नका. जर तुम्हाला असे दिसून आले की ते तुमच्यावर प्रेम करीत नाहीयेत तर 'तुम्ही माझ्यावर प्रेम करीत नाही', असा आरोप करण्यापेक्षा त्यांना विचारा,'तुम्ही माझ्यावर इतके प्रेम का करता?'

जरा कल्पना करून बघा की तुम्ही त्यांच्यावर दया दाखवत नाही,तुम्ही त्याचबरोबर स्नेहपूर्ण नाही, तुम्ही मैत्रीपूर्ण नाही असे कोणीतरी सतत तुमच्यावर आरोप लावीत आहे तर तुम्हाला कसे वाटेल?

 (उत्तर: आम्हाला आमची वारंवार कानउघाडणी होत आहे असे वाटेल)

हो ना! मग आता तुम्हाला समजले की तुम्ही दुसऱ्याला कसे वागवता ते? कळले?

सतत तक्रार करणाऱ्या माणसाची संगत कोणालाही नकोच असते. वारंवार कानउघाडणी करणाऱ्या,आणि ज्याला तुम्हाला स्पष्टीकरण द्यावे लागते आणि कायम तुमच्या प्रेमाचा पुरावा सादर करावा लागतो अशा माणसाची संगत कोणाला आवडेल? नाही ना! याचे किती ओझे होईल आणि हे किती कंटाळवाणे होईल!

चांगली संगत ती आहे ज्यामध्ये चैतन्य प्रोत्साहित होते. जर कोणाची चांगली मनःस्थिती नसेल तर ते म्हणतील,'अरे,चल! झाले गेले ते विसर आणि आता आगेकूच कर'. 

ज्याच्यामध्ये उत्साह आहे,जो तुम्हाला नेहमी पुढे जाण्यास प्रोत्साहित करतो त्याची संगत चांगली आहे. कोणीतरी तुम्हाला स्पष्टीकरण मागतो,संशय व्यक्त करतो आणि प्रश्न करतो त्याची संगत चांगली नाही. म्हणून कधीही कोणाच्या तुमच्यावर असलेल्या प्रेमावर संशय घेऊ नका. प्रश्न किंवा तक्रार कधीही मुळीच करू नका. आगेकूच करा!

प्रश्न : भारतात डी आर्ट ऑफ लिविंग धरून अनेक संस्था आहेत ज्या योग आणि ध्यान शिकवतात. जर आपण सगळे एकच उदेश्याकरिता,ते म्हणजे समस्त मानव जातीमध्ये शांती प्रस्थापित करणे तर मग या सगळ्या संस्थामध्ये इतका फरक का आहे?

श्री श्री : हे बघा, समउदेश्य असणारे लोक हे नेहमी एकत्र येतात. हेतू समान असल्यामुळे जरी पद्धतीमध्ये भेद असला तरी तंटे उद्भवत नाहीत.

तुम्हाला माहिती आहे देवाला विविधता अतिशय आवडते.

जेव्हा मी पाकिस्तानला गेलो होतो तेव्हा लोकांनी मला विचारले की,'भारतात इतके देवदेवता का आहेत? देव तर एकच आहे.'

तेव्हा मी त्यांना म्हणालो,'एकच गव्हापासून तुम्ही इतके वेगवेगळे पदार्थ का बनवता? देवाने येवढ्या प्रकारच्या भाज्या बनवल्या.त्याने फक्त वांगे बनवून ,'आता जन्मभर हेच खा', असे म्हटले नाही.' भाज्या आणि फळे यातील देवाने निर्माण केलेली विविधता बघा. आहे ना? ती तर आहेच! भारतामध्ये अनेक देव आहे परंतु परमात्मा (सर्वोच्च चेतना)हा एकच आहे. अनेक नाम आणि रूपे असलेला एकच देव. तोच तर उत्सव साजरा करणे आहे.

सगळे किती निरनिराळे रंग घालून आलेल आहेत बघा. जर सगळ्यांनी एकच गणवेश घातला असता तर ही तर लष्कराची छावणी वाटली असती! समजले?

विविधता हे निर्मितीचे सौंदर्य आहे आणि त्याचा आपण मान ठेवला पाहिजे.

जेव्हा मी हे सांगितले तेव्हा त्यांना ते खुपच आवडले आणि ते म्हणाले,'याआधी कोणीही आम्हाला याप्रकारे समजावले नाही!'

प्रश्न : एका व्यक्तीचा देवावर विश्वास आहे परंतु तो फसवतो आणि चोऱ्यामाऱ्या करतो. दुसऱ्याचा देवावर विश्वास नाही परंतु तो कधीही फसवत नाही. कोण बरोबर आहे?

श्री श्री : तुमच्या प्रश्नाचे तुम्हीच उत्तर दिले आहे!

हे तर मला असे विचारण्यासारखे आहे,' मी एका ताटामध्ये कोळसा ठेवला आहे आणि दुसऱ्या ताटामध्ये लोणी. तुम्हाला काय आवडेल?' हे तर एकदम स्पष्ट आहे.

जर कोणाचा देवावर विश्वास आहे तर तो दुसऱ्यांना कसे काय फसवू शकतो? हेच मला कळत नाही. नाहीतर हे असे असेल की दुसऱ्यांना फसवल्यामुळे त्याची सदसद्विवेकबुद्धी त्याला सतत टोचण देत राहील आणि तो कायम देवाकडे क्षमेची याचना करीत असेल. 

फसवणारा माणूस हा अज्ञानामध्ये अडकलेला असतो. तिथे भव्यता नसते. त्याच्यामध्ये कुठेतरी भीती असते आणि म्हणूनच तो अशा गोष्टी करीत असतो.

प्रश्न : माझ्या मित्रांपैकी एक वेडा झाला आहे. तो आठवड्याचे सात दिवस आणि दिवसाचे चोवीस तास काम करतो. त्याच्या आई वडिलांना समजत नाहीये की काय करावे. मला कळत नाही की काय करावे.

श्री श्री : आजकाल असे वरचे वर घडताना मला दिसते. समवयस्क लोकांचा दबाव, परीक्षेत चांगले गुण आणण्याचा दबाव हे फार तीव्र आहेत. म्हणून ते दिवस न् रात्र वाचन करतच राहतात.

एक तरुण माझ्याकडे आला आणि त्याने मला सांगितले की तो त्याच्या टेबलावर चार मोठे दिवे लावून वाचन करतो आणि तो दिवस न् रात्र अभ्यास करीत राहतो. तुम्ही तुमच्या मेंदूचा इतका अतिरेकी वापर नाही करू शकत. मग अचानक काहीतरी होते आणि मेंदूचा खटका उडतो!

योग आणि ध्यान यांचा नियमित सराव करा. कधीतरी एकदा करणे पुरेसे नाही. असे सगळे मुद्दे YES + च्या टेबलावर ठेवा.

भगवान कृष्ण - प्रेमाचे प्रतिरूप

10
2012
Aug
बंगलोर
आज भगवान श्रीकुष्ण यांची जन्मतिथी आहे आणि संपूर्ण भारतभर सगळे लोक ती साजरी करीत आहेत.

भगवान श्रीकृष्ण म्हणाले,'मी कधीही जन्मलो नाही आणि कधीहि मृत्यू पावू शकत नाही. मी अजन्मा (जो कधीही जन्माला येऊ शकत नाही) आहे.' जो कधीही जन्माला येऊ शकत नाही त्याची जन्मतिथी साजरी करणे अतिशय रोचक आहे.

भगवान कृष्ण म्हणून जन्माला येण्याआधी भगवान कृष्ण यांनी एक पूर्वजन्म घेतला होता. पूर्वजन्मामध्ये त्यांना कपिल मुनी (ज्ञानी साक्षात्कार असलेला साधू) असे ओळखत असे. कपिल मुनी या अवतारामध्ये भगवान कृष्णाने आपल्या आईला आत्मज्ञान,सांख्य योगाचे ज्ञान देऊ केले. तर त्याचा भगवान कृष्ण म्हणून अवतार घेण्याआधी कपिल मुनी हा अवतार झाला.

आता आईची माया अशी असते की तिला आपले मुल प्रत्येक जन्मी आपल्या पोटी जन्माला येऊन पाहिजे असते. म्हणून तिला जरी आत्मज्ञान मिळाले तरी तिची आपल्या मुलाबरोबर नाळ जोडलेलीच राहिली.म्हणूनच पुढच्या जन्मी ती पुन्हा भगवान श्रीकृष्णाची आई यशोदा म्हणून जन्माला आली आणि भगवान श्री कृष्ण यांनी पुन्हा एकदा जन्म घेतला.

कपिल मुनी बनून त्यांनी स्वतःच्या आईला आत्मज्ञान देऊ केले परंतु भगवान श्रीकृष्ण म्हणून त्यांनी तिला भरपूर प्रेम आणि माया दिली आणि आत्मज्ञान नाही.

अशा प्रकारे एका जन्मामध्ये त्यांनी तिला केवळ ज्ञान देऊ केले आणि दुसऱ्या जन्मामध्ये त्यांनी फक्त प्रेम दिले. त्यांनी यशोदेला कोणत्याही प्रकारचे आत्मज्ञान दिले नाही. ते खेळले आणि यशोदेच्या भरपूर खोड्या काढल्या. म्हणून आज खोड्या काढायचा दिवस आहे!(हशा)

ज्ञान,प्रेम आणि खोडकरपणाचा मिलाफ असलेला जन्म म्हणजे भगवान श्री कृष्ण यांचा जन्म अथवा अवतार होय. म्हणून भगवान कृष्णाच्या जन्मदिवशी तुम्ही सर्वानी भगवद गीता वाचण्याचा संकल्प (शपथ अथवा वचन)घ्या . इथे जमलेल्यांपैकी कितीजणांनी आत्तापर्यंत भगवद गीता वाचलेली नाही? (बऱ्याचजण हात वर करतात) बघा! चला आता एक गोष्ट करुया. आजपासूनच आपण गीता वाचन सुरु करू या. सोप्या भाषांतरासहित वाचा आणि जितकी समजून घेता येईल तितकी समजून घ्या. जर तुम्हाला समजली नाही तरी हरकत नाही,पण निदान एकदा तरी नक्कीच वाचा. तुम्हाला जे काही समजेल ते चांगलेच असेल.

समग्र भगवद गीता एकच बसणीला समजेल अशी अपेक्षा ठेवू नका. आयुष्यभर तुम्ही वाचा आणि गीतेची पाने पुनःपुन्हा चाळत राहा, तेव्हा जाऊन तुम्ही ती पूर्णपणे समजून घेऊ शकाल.

ज्यानुसार मन आणि बुद्धीच्या पक्वतेची पातळी वाढत जाईल, त्यानुसार आपले भगवद गीतेचे आकलन वाढत जाईल.

म्हणून आजचे कृत्तिका नक्षत्रसुद्धा हे अतिशय तेजपुंज आणि सक्रीय असते. आज शुक्रवार आहे ,अष्टमी सुद्धा (हिंदू कालगुनेनुसार महिन्याचा आठवा दिवस जो फार शुभ समजल्या जातो)आहे आणि आज जन्माष्टमीसुद्धा आहे. या सगळ्याचे एकत्र येणे खुपच खास आहे.

भगवन कृष्ण म्हणतात,'सेनानीनां अहं स्कंदः'-सैन्याच्या सेनापतींमध्ये,मी कार्तिकेय आहे.(कार्तिकेय हा सैन्यांचा सर्वात प्रबळ सेनापती होता.)

मुनींमध्ये(ज्ञानी साधू महात्म्यांमध्ये) मी कपिल मुनी आहे.

ऋषींमध्ये मी वेद व्यास आहे.

पांडवांमध्ये मी अर्जुन आहे.

जर कोणी भगवद गीतेचा दहावा अध्याय वाचला असेल तर त्यांना अगदी योग्य अद्वैताचे ज्ञान (आत्म्याचे अद्वैत असण्याचे तत्वज्ञान,सगळ्यांमध्ये एकालाच अनुभवणे)

याला अनुभूती योग म्हणतात. माणसाला विभूतीची ईश्वरी देणगी मिळते.

विभूतीचा अर्थ कपाळावर फसल्या जाणारे भस्म असा नाही. विभूतीचा चमत्कार असा देखील अर्थ आहे. भगवान कृष्णाच्या जीवनात अनेक चमत्कार झाले. परंतु त्याचवेळेस त्याला एक वरदानदेखील मिळाले होते, किंबहुना तो एक प्रकारे एक शापच होता.ज्याक्षणी एखादा चमत्कार घडायचा तेव्हा लोक लगेचच त्याबद्दल जवळ जवळ एक वर्ष विसरून जायचे.

तर, उदाहरणार्थ, जर आज एखादा चमत्कार घडला तर सगळे त्याबद्दल विसरून जायचे आणि एका वर्षानंतर त्यांना तो चमत्कार आठवायचा! असे काही तुम्ही ऐकले आहे का?

याचा उल्लेख श्रीमद भागवत (विष्णूचे अवतार खास करून श्रीकृष्णाच्या भक्ती (धार्मिक निष्ठे)वर मुख्य लक्ष्य केंद्रित करणारे संस्कृत वाङ्मयीन पाठ्य)या मध्ये आहे.

असे म्हणतात की भगवानाच्या भव्य दिव्य अविष्काराचे साक्षी राहिल्यानंतर पुढच्या क्षणाला लोक विसरून जायचे. म्हणून जेव्हा भगवान कृष्णाने कालिया (अनेक शीर्षे असलेला नाग)मर्दन केले, तेव्हा ते बघून लोक आपापल्या घरी परतले, सगळे या चमत्काराबद्दल विसरले आणि पुन्हा आपल्या कामाला लागले जणू काही झालेच नाही. त्याचे चमत्कार हे विसरले जाणारच आणि एका वर्षानंतर त्याची स्मृती होणार हे विधिलिखित होते. काही जण म्हणतात की हे वरदान होते आणि काही जण म्हणतात की हा भगवान ब्रह्मदेवाचा (पवित्र त्रिमुर्तीमधील सृष्टीकर्त्याचा)शाप होता की जेव्हा कधीही चमत्कार घडेल तेव्हा लोकांच्या स्मृतीवर पडदा पडेल.

तर जेव्हा कधीही गोकुळावर (भगवान कृष्णाच्या गावावर) संकट यायचे,तेव्हा लोक एकत्र जमा होऊन ,'ॐ नमःशिवाय' चा जप करायचे आणि त्यांच्या लहानग्या कृष्णाला वाचवण्याची आणि त्याला कोणताही धोका उत्पन्न होण्यापासून वाचवण्याची अशी भगवान नारायणा(भगवान विष्णू) ची प्रार्थना करायचे.

तर वृंदावनात सगळे यदुकुल नंदन (यदु वंशाचा वंशज,म्हणजेच भगवान कृष्ण)याच्या सुरक्षतेसाठी प्रार्थना करायचे आणि 'ॐ नमःशिवाय' चा जप करायचे. ते भगवान शिव यांनादेखील लहानग्या कृष्णाच्या सुरक्षिततेसाठी आणि त्याच्या कुशल मंगलतेकरिता प्रार्थना करत. आणि मग सगळे चमत्कार घडले, मग तो शक्तासुराचा वध असो वा पुतनेचा (बाळकृष्णाला ठार मारण्याकरिता कृष्णाच्या मामा कंसाने पाठवलेली राक्षसीणीचा) वध असो;लोक हे सगळे काही सेकंदाच्या आत विसरून जायचे आणि त्यांना ते एका वर्षानंतरच आठवायचे. याच्या परिणामस्वरूप लोक भूतकाळातील घटनांबद्दल बोलत राहायचे. अशी आहे श्रीमदभागवत कथा.

श्रीमदभागवत कथेनुसार भगवानाचा काळ हा मौजमजा, बागडणे, आनंद, प्रेम आणि निष्ठेने युक्त होता असे दिसून येते. परंतु या बरोबरच त्यात बरेच वैराग्य (इच्छाहीनता) सुद्धा होते. 

जर तुम्हाला वैराग्य समजून घ्यायचे असेल तर श्रीमदभागवत वाचा. म्हणूनच श्रीमदभागवत मध्ये वैराग्य (इच्छाहीनता) आणि अनुराग(प्रेम);ज्ञान आणि निष्ठा यांचा विरोधाभासयुक्त परंतु अत्यंत दुर्मिळ आणि विलक्षण असा मिलाफ आढळतो.

तर भगवान कृष्ण हे आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. पण भगवान कृष्णाबरोबर होत भगवान बलराम(भगवान कृष्णाचे वडील बंधू) आणि ते प्रचंड शक्ती आणि सामर्थ्याचे प्रतिक आहेत. लोकांना प्रचंड शक्ती जास्त करून भीती वाटते. जिथे कुठे आकर्षण आणि प्रेम असते तिथे नेहेमी अशक्तपणा किंवा असहायता दिसून येते. प्रेम म्हणजे मोठी ताकद जरी असली तरी त्यामुळे एखाद्याला दुर्बलता जाणवू शकतो. आणि जर एखाद्याने प्रेमामुळे उद्भवणारा केवळ दुर्बलता पाहिला की मग ते प्रेमापासून दूर पळून जातात. मग त्याचे रुपांतर तिरस्कारामध्ये होते.

तर भगवान कृष्ण हे आकर्षणाचे केंद्रबिंदू आणि प्रेमाचे कारंजे आहेत तर भगवान बलराम प्रतिष्ठा आणि सामर्थ्याचे प्रतिक आहेत. ते दोघे नेहमी एकत्र असतात.

भगवान कृष्ण तर राधेशिवाय असूच शकत नाहीत. म्हणूनच प्रेमामध्ये दुर्बलता असते असे मी म्हणालो. राधा ही शक्ती आहे, राधा कोणी व्यक्ति नव्हती. ती भगवान श्रीकृष्णाच्या शक्तीचे ,प्रेमाच्या शक्तीचे प्रतिक आहे. आणि जिथे कृष्ण जाईल तिथे भगवान कृष्णासोबत चालणाऱ्या शक्तीचे प्रतिक आहे भगवान बलराम. असे म्हणतात ,'निर्बल के बलराम '. ज्याप्रमाणे भगवान राम दुर्बल आणि असहाय्य लोकांना आसरा देतात, त्याचप्रमाणे भगवान बलराम भगवान कृष्णाच्या सामर्थ्याची खुण आहे आणि ते नित्य कृष्णाच्या सोबत असतात.

जिथे कुठे प्रेम असते तिथे अभिलाषा ही असतेच. जिथे कुठे अभिलाषा असते तिथे प्रेम हे नक्कीच हजर असतेच. अभिलाषा आहे म्हणून प्रेम उपस्थित आहे. त्याचप्रमाणे प्रेमामुळे प्रचंड शक्तीदेखील येते.

भगवान बलराम याने खूप वेळा पृथ्वीची प्रदिक्षणा केली आणि पृथ्वीच्या प्रत्येक भागाबरोबर त्याने स्वतःला जोडले. परंतु भगवान कृष्ण जिथे होते तिथेच राहिले आणि त्यांनी स्मितहास्य केले आणि संपूर्ण पृथ्वीने कृष्णाभोवती प्रदिक्षणा केली. एखाद्याला शक्ती कमावण्यासाठी बरीच मेहनत करावी लागते, पण प्रेमाकरिता कोणालाही कुठेही जाण्याची अगर काहीही करण्याची जरुरत नाही. तुम्ही जिथे कुठे आहात तिथे तुम्ही प्रेमात आकंठ बुडून राहू शकता.

भगवान बलराम हे यत्न आणि मेहनतीचे प्रतिक आहेत, तर भगवान कृष्ण हे संपूर्ण आरामाचे द्योतक आहेत. अशा संपूर्ण आरामामध्ये तुमच्यात प्रेमाचा उदय होतो.

प्रेम हे प्रयत्न केल्याने प्राप्त होत नाही, तर काहीही न करता ते मिळते. परंतु शक्ती मिळवण्याकरिता प्रयत्न करावे लागतात आणि मेहनत करावी लागते. काहीही न करता रिकामे बसल्याने भव्य शक्ती प्राप्त होत नाही. कोणत्याही क्षेत्रात योग्यता आणि विशेष श्रेष्ठत्व मिळण्यासाठी,तुम्हाला खूप कष्ट आणि अतिशय मेहनत घेण्याची आवश्यकता असते. जर तुम्हाला सतार वाजवण्याची इच्छा असेल तर तुम्हाला दररोज न चुकता काटेकोरपणे दोन तास सराव हा केलाच पाहिजे. जर तुम्हाला बासरी वाजवायची असेल तर तुम्हाला सराव करावा लागेल. तुम्हाला जर शरीर बलवान बनवायचे असेल तर तुम्हाला नियमित व्यायाम करावा लागेल. तर म्हणून शक्ती प्राप्त करण्याकरिता एखाद्याला प्रयत्न तर करावेच लागतात. ज्ञान मिळवण्याकरितादेखील प्रयत्न हे लागतातच. परंतू प्रेमाकरिता तुम्हाला प्रयत्न करण्याची गरज नाही. तुम्ही आराम करा आणि स्वयंमध्ये विश्राम करा.

भगवान कृष्ण म्हणतात, 'धर्मविरुद्धो भुतेशु कामोस्मिभारतरशभा.' तुमच्यात उद्भवणाऱ्या कामना, ज्या धर्माच्या (योग्य आचरणाच्या)विरुद्ध नाहीत, या माझ्यामुळे प्रेरित होऊन निर्माण होतात हे लक्षात ठेवा. कोणतीही कृती अथवा इच्छा जी धर्माच्या विरुद्द आहे त्यात मी नाही. हे फार आश्चर्यकारक आहे.

जर तुम्ही धर्मानुसार वागता आणि स्वधार्मानुसार (शास्त्रानुसार तुमच्या जबाबदाऱ्या)कर्मे करीत असाल तर तुमच्यात जागणाऱ्या योग्य कामना यांचा जनक मी (भगवान कृष्ण) आहे.तुमच्यात निर्माण सगळ्या सत्वशील इच्छांचे स्रोत्र मी आहे. हे किती विस्मयकारक आणि अनन्यसाधारण आहे.

तो म्हणतो,'मी बलवानांचे बळ आहे; तुम्ही जे सौंदर्य पाहता त्या सगळ्याचे सुंदरतासुद्धा मी आहे. कोणताही प्रत्येक चांगला गुण जो तुम्ही दुसया माणसात पाहता तो माझ्याकडूनच येतो.' तो असे का म्हणतो आहे? याचे कारण असे की मन हे कुठेही दिसणाऱ्या सुंदरतेकडे धाव घेत असते. जर एखाद्याकडे पुष्कळ धन किंवा खूप शक्ती असेल तर मन तिथेच धाव घेत राहते.तर अशा मनाला पकडून स्वयंमध्ये पुन्हा केंद्रित करण्यासाठी, भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतो, 'तू जे काही बघतो त्या सगळ्यामध्ये तू केवळ मला पहा. ज्या कशामध्ये किंवा जिथे कुठे किंवा कोणत्याही व्यक्तीमध्ये जर तुला महानता दिसत असेल तर ती माझ्यामुळे आहे, त्या सगळ्या मागची शक्ती मी आहे आणि मी थेट इथे आहे.'

दोलायमान असणाऱ्या आणि इथे तिथे भटकणाऱ्या मनाला हुडकून गोळा करून आणि त्याचे लक्ष्य पुन्हा आत्म्यावर जो योगेश्वाराचे (भगवान श्रीकृष्णाचे)शक्तीस्थान आहे त्यावर केंद्रित केले तर त्याने विभूती (चमत्कारी रहस्य) मिळते ज्यामुळे परिपूर्णता(सिद्धी) प्राप्त होते.

भगवान श्रीकृष्ण देवीचे (दिव्य मातेचे) पूजन करायचे. याचा उल्लेख दुर्गा सप्तशती (मार्कंडेय पुराणातील ७०० श्लोकांची दिव्य मातेची स्तुती करणारी मालिका) यामध्ये केलेला आहे. 

तुमच्यापैकी कितीजणांनी हे ऐकले आहे?

'रूपं देही जयं देही यशो द्विशो जाही' हे श्लोक दुर्गा सप्तशतीमधील अर्गला स्तोत्रामधील आहेत ज्याचे उच्चारण केले असता त्याचे कवच (चिलखत किंवा ढाल) बनते.

असे म्हणतात ,'कृष्णेन समस्तुत्य देवी शाश्वद भक्त्या तथाम्बिके,रूपं देही जयं देही यशो देही द्विशो जाही.' याचा अर्थ असा की,'हे देवी (दिव्य माते) जिचे पूजन चिरंतन भक्तीने भगवान कृष्ण करतात, आम्हाला रूपाचा(रूपं), विजयाचा(जयं), यशाचा(यशं) आशीर्वाद दे आणि आमच्यातील सर्व लालसा आणि अज्ञानाचा (द्विशो) नाश कर.'

ही प्रार्थना आहे. कवच अर्गला कीलकं यातील हे तीन श्लोक आहेत.

जर तुम्ही बघाल तर ती देवी आहे जी खरे तर भगवान कृष्णाला वाचवते. यशोदेच्या पोटी देवीचा सुद्धा अष्टमीला जन्म झाला होता. आणि त्याच दिवशी तिला मथुरेला नेले होते. कंसाने तिला पकडून ठार करण्याचा प्रयत्न केला परंतु ती त्याच्या हातातून निसटली.

इथे कंस अहंकाराचे (मीपणाचे) द्योतक आहे, भगवान कृष्ण आनंदाचे (परमानंदाचे) प्रतिक आहे आणि देवी किंवा दुर्गा ही आद्यशक्तीचे (आपल्यातील आदिकालीन उर्जा किंवा चेतन शक्ती)

अहंकार चेतन शक्तीला किंवा आदिकालीन उर्जेला (देवीला) पकडू शकत नाही आणि परमानंदालासुद्धा(असा आनंद जो कृष्ण आहे त्याला) धरू शकत नाही.

म्हणून मग दैवी चैतन्या (देवी)ने एक भविष्यवाणी केली की अहंकाराला (कंसाला) नष्ट करण्याचे परमानंदाचे (कृष्णाचे) विधिलिखित आहे आणि तो अगोदरच जन्माला आलेला आहे.

जेव्हा जीवन आनंदाने (परमानंदाने) ओतप्रोत होते तेव्हा अहंकार नाहीसा होतो. जेव्हा एखाद्याला परमानंदाची प्रचीती येते तेव्हा तिथे अहंकार उरत नाही. परंतु जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत माणसाला यातना सहन कराव्या लागतात आणि माणूस दयनीय राहतो. तो कुठल्या न कुठल्या कारणाने दुःखी राहतो आणि कोणाला न कोणाला दोषी मानत राहतो. तरीसुद्धा अहंकार चैतन्याला नष्ट करू शकत नाही कारण चैतन्य हे चिरंतन आहे.

चैतन्याची शक्ती कशामुळेही नष्ट होत नाही आणि कमीही होत नाही. ती अविरत आणि चिरंतन आहे. ज्यांनी भौतिकशास्त्राचा अभ्यास केला आहे त्यांना हे चांगल्या प्रकारे माहित आहे की उर्जा ही निर्माण करता येत नाही किंवा ती नष्टही करता येत नाही. तसेच चेतना ही निर्माण करता येत नाही आणि ती नष्टही करता येत नाही. ती (आदिकालीन) उर्जा निर्माण अगर नष्ट करण्याचे कोणतेही प्रयत्न हे निष्फळच होतील.

जर तुम्ही वरवर बघितले तर तुम्हाला ही केवळ एखादी कहाणी आहे असे भासेल. पण तुम्ही जर खोलवर खोदत गेलात तर तुम्हाला असे विस्मयकारक ज्ञान त्यात लपलेले सापडेल.

भगवान कृष्णाचा जन्म कारागृहात झाला होता. त्याचा जेव्हा जन्म झाला तेव्हा पहारा देत असलेले सगळे पहारेकरी झोपी गेले. पहारेकरी कोण होते? ते आपल्या जाणीवांचे प्रतिक आहेत-जेव्हा आपल्या जाणीवा, ज्या कायम बहिर्मुख असतात त्या जेव्हा शांत होतात म्हणजेच जेव्हा आपण अंतर्मुखी होतो आणि तेव्हाच अंतर्मुखी होण्यातून उद्भवणाऱ्या परमानंदाची आपल्याला अनुभूती मिळते.

या कहाण्यांचा खोलवर विचार करा आणि त्यांचे विश्लेषण करा, आणि अद्भूत ज्ञान आणि प्रेम हे दोन्ही तुम्हाला उपलब्ध झालेले तुम्हाला दिसून येईल.

भगवान कृष्ण म्हणाले, 'तुम्ही तुमच्या स्वतःच्या पापांपासून स्वतःची सुटका करून घेऊ शकत नाही.मी तुमची तुमच्या पापांपासून सुटका करेन.'

असे बघा,एखादी व्यक्ति जे सगळे काही करते-उपास, तीर्थाटन, प्रायश्चीत्त इ.इ.,हे सगळे ती व्यक्ति स्वतःची पापांपासून सुटका मिळण्यासाठी करत असते.

म्हणून भगवान कृष्ण म्हणतात,'अहं त्वं सर्व-पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा सुचः.'

ते म्हणतात,'तुम्हाला केवळ एकच गोष्ट करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही सगळे मला समर्पण केले पाहिजे आणि माझ्यामध्ये आश्रय घ्या.'

ते म्हणतात, 'या आणि माझ्यामध्ये आश्रय घ्या', तर ही त्यांची पहिली अट आहे. आणि मग भगवान म्हणतात, 'मी तुम्हाला तुमच्या पापांपासून सुटका देईन. ते माझे काम आहे.'

तर तुमचे इतकेच काम आहे की तुम्ही त्याच्या संरक्षणाच्या छत्राखाली या आणि त्याचा आश्रय घ्या आणि तो तुम्हाला तुमच्या सर्व पापांपासून मुक्त करेल. या बोलण्यातच त्याने सगळे सांगितले. यातच सकल पूर्णत्व आहे. मला वाटते की आपण सगळ्यांनी भगवान श्रीकृष्णाचे हे शब्द सगळीकडे उपलब्ध करून देऊ या. आपण असे करत नाही आणि त्याऐवजी आपण आजूबाजूच्या अनेक गोष्टी ऐकत बसतो. खास करून,'या आणि माझ्यामध्ये आश्रय घ्या. मी तुम्हाला तुमच्या सगळ्या पापांपासून सुटका देईन..'

आपल्या देशात ज्या प्रकारे धर्मांतरण सुरु आहे ते थांबवण्याकरिता हे इतकेच पुरेसे आहे. भगवान कृष्णाने अगदी हेच सांगितले आहे.

गुरु शिष्य परंपरेचे महत्व

06
2012
Aug
बंगलोर
प्रश्न : ध्यानात गहिरी समाधी लागते तेव्हा श्वास संथ होतो आणि कधी कधी थांबतोसुद्धा. अशावेळी शरीर कसे चालते ?

श्री श्री : जेव्हा स्वास संथ होतो तेव्हा शरीरातील क्रियाशीलताही कमी होते.उष्णतेचा क्षयही कमी होतो. समाधी म्हणजे जवळ जवळ शून्य क्रियाशीलता. पूर्णपणे शून्य क्रियाशीलता असे मी म्हणणार नाही पण जवळ जवळ शून्य. किंचितसे काहीतरी होतच असते. किंचितसा श्वास अगदी संथपणे आंत बाहेर होतच असतो.

प्रश्न: योगवसिष्ठामध्ये राम सांगतात की तिन्ही लोकाचे अस्तित्व मनामुळे आहे. जेव्हा मन नाहीसे होते तेव्हा तिन्ही लोकही नाहीसे होतील.मन म्हणजे त्यांना काय म्हणायचे आहे आणि मनामुळे जगाचे अस्तित्व कसे काय असेल ?

श्री श्री : हे समजावून सांगता येत नाही, हे केवळ अनुभवावे लागते.जोपर्यंत ते तुमच्या अनुभवास येत नाही तो पर्यंत ते फक्त शब्दच लक्षात राहू द्या त्याच्या स्पष्टीकरणाकडे बघू नका.

जर मी तुम्हाला म्हणालो की ‘लाडू गोड असतो’ आणि तुम्ही विचाराल की, ‘गोड म्हणजे कसे?’ तर मला सांगता येणार नाही. मी म्हणेन की ‘लाडू तुमच्या हातात येऊन तुम्ही तो तोंडात टाकेपर्यंत थांबा. मग तुम्हाला कळेल.’ त्याचंप्रमाणे जेव्हा तुम्ही वेदान्तिक सत्य ऐकता तेव्हा जितके जास्त स्पष्टीकरणात जाल तेवढे जास्त गोंधळून जाल. वेदांतात्तील शब्द फक्त ऐकायचे आणि झिरपू द्यायचे असतात. जेव्हा ते झिरपतात तेव्हा तो अनुभव बनतो.

जर मी म्हटले की ,’मी दैवी आहे’, तर तुम्ही म्हणाल की,’ तुम्ही दैवी कसे काय आणि मी दैवी कसा काय ? ‘ तर त्याचे स्पष्टीकरण देणे अशक्य आहे. तुम्ही जेव्हा समाधीमध्ये जाता तेव्हा तुम्हाला अचानक लक्षात येते की, ‘ आह, मी दैवी आहे.’

आत्ताच मी एका इराणी गटाला भेटलो त्यातला एक जण एक गोष्ट सांगत होता. तो एक चित्रपट काढतोय. त्या चित्रपटात तीस जणांचा एक गट देवाच्या शोधात एका गूढ ठिकाणी जातो. तर ते जातात आणि शोध घेतात. मग शेवटी काय होते की त्यांना पाण्यात त्यांचे प्रतिबिंब दिसते आणि त्याच्याकडे पाहून ते म्हणतात, “आता मला कळलं, मीच देव आहे.”

पंचतंत्रातही अशाच गोष्टी आहेत. तुमच्याकडे जे आहे तेच तुम्ही शोधत असता. पण तो शोध आवश्यक आहे कारण, तो तुम्हाला गोल फिरवून आणतो आणि एका क्षणी तुमच्या लक्षात येते की ‘अनहलहक्’ म्हणजे मीच सृष्टीकर्ता आहे . हा एक उर्दू शब्द आहे. ‘अहम् ब्रह्मास्मि’ म्हणजे मीच ब्रह्मन् आहे. वेदांतात हेच सांगितले आहे. अहम् ब्रह्मास्मि’ म्हणजे मीच ब्रह्मन् आहे. तर ‘अनहलहक’ म्हणजे ‘अहम् ब्रह्मास्मि’.

पण दुर्दैवाने जे ‘अनहलहक्’ म्हणाले त्यांना फासावर चढवले गेले. अरबस्थानात त्याचे शिरसंधान केले जाई. पण भारतात सुदैवाने तसे नव्हते. जो कोणी म्हणेल की, ‘अहम् ब्रह्मास्मि’, त्याला चांगल्या आसनावर बसवून हार घालून पूजा व्हायची. असे असायचे. 

ही सर्व सत्ये आहेत जी आतून अनुभवायची असतात. कोणत्याही स्पष्टीकरणाने ते बिघडून जाईल.

प्रश्न : तुम्ही लोकांना मुक्तपणे विचार करायला प्रोत्साहन देता पण मुक्तपणे विचार करणे हे श्रद्धेशी कसे काय जुळते ?

श्री श्री : होय, हीच तर मजा आहे. तुम्हाला सहसा असे वाटते की श्रद्धा म्हणजे अंधश्रद्धा किंवा तिथे तर्काला काही स्थान नाही. पण इथे तसे नाही.

वेदांतात नेहमीच ‘ विचार’ आणि विवेक या बद्दल बोलले जाते. समाधीबद्दलही असे म्हटले जाते की, ‘विचार-अनुगम समाधी. (समाधीची अशी स्थिती की ज्यात तुमच्या भोवती काही अनुभव,विचार,कल्पना, भावना घुटमळत असतात.) ‘वितर्कानुगम समाधी’, ( अशी समाधी स्थिती, ज्यात सृष्टीबद्दलची वादातीत ,तर्कशुद्ध अशी जाण)

समाधीतपण तर्काला परवानगी आहे. त्यामुळेच ‘सावितर्क समाधी’,( अशी समाधी स्थिती ज्यात चेतनेच्या एका भागाचा, त्याचं चेतनेच्या दुसऱ्या भागाशी संवाद किंवा वाद आहे.) आणि ‘निर्विकल्प समाधी’ आहे. ( अशी समाधी स्थिती,ज्यात कोणताही संवाद किंवा वाद नाही, तर्क नाही. ) तसेच ‘सारविचार समाधी’ ( अशी समाधी ज्यात काही ज्ञानाचा ओघ आहे. अशाप्रकारच्या गहिऱ्या समाधीमध्ये काही क्षीण विचार चालू असतात.) आणि, ‘निर्विचार समाधी’ ( ज्यात ज्यात अजिबात विचार नाहीत.ही एक विचार नसलेली अशी स्थिती आहे ज्यात काही नसण्याचा किंवा केवळ रिक्त असण्याचा अनुभव आहे.)

तर ‘तर्क’ ही काही वाईट गोष्ट किंवा श्रद्धेच्या विरीधी गोष्ट समजली जात नाही. तर्कानेच लोक श्रद्धेकडे वळतात, हो की नाही? जेव्हा तर्काने तुमचे समाधान होते तेव्हा श्रद्धा जास्त पक्की होते. मग तुमच्या श्रद्धेला कोणी धक्का पोचवू शकत नाही.

एखादा म्हणाला की,’ एकदा श्रद्धा असली की मग तर्क करू नका.’ तर मग ती श्रद्धा कमकुवत असते. कमकुवत श्रद्धा ही नेहमी तर्काला घाबरते. पण सत्य तर्काला घाबरत नाही.जेव्हा सत्य असेल तेव्हा कोणत्याही प्रकारे तुम्ही तर्क केला तरी सत्य तेच रहाते. जेव्हा तुमची सत्यावर श्रद्धा असते तेव्हा ते नेहमीच खास असेल.

म्हणूनच सगळा ‘उपदेश’ करून झाल्यावर भगवान श्रीकृष्ण शेवटी म्हणतात, “ मला जे सांगायचे होते ते मी सांगितले. आता तू काय ते ठरव. तुझ्या तर्कबुद्धीला पटले तर स्वीकार कर.” श्रीकृष्ण म्हणतात,“यथेस्चसी तथा कुरु.” ( तुला जसे वाटेल तसे कर.)

हे खूप महत्वाचे आहे. असे बघा कि, इकडे पूर्वेकडे तर्क आणि श्रद्धा यांच्यात संघर्ष नाहिये.विशेषत: जेव्हा ज्ञान हे अनुभवावर आधारित असते मनोधारणेवर आधारित नसते तेव्हा तुम्हाला तर्काने श्रद्धेला धक्का पोचण्याची भीती बाळगण्याचे कारण नसते.

चुकीचा तर्क मात्र करायचा नाही. तर्क चांगला आहे मात्र कुतार्काने तुम्ही कशाचा धिक्कार करू लागलात तर ते मात्र श्रद्धेच्या विरोधी असेल. तर प्रामाणिक साधक कुतर्क लढवणार नाही. कुतर्काचे उदाहरण म्हणजे – दरवाजा जर अर्धा बंद असेल तर तुम्ही म्हणू शकता की दरवाजा अर्धा उघडा आहे. पण दरवाजा पूर्ण बंद आहे म्हणजे तो पूर्ण उघडा आहे असे नाही. दरवाजा पूर्ण उघडा असताना तो पूर्ण बंद आहे असे म्हणणे म्हणजे कुतर्क.

विज्ञानात प्रथम तर्क येतो आणि मग श्रद्धा. बरोबर ? तुम्ही तर्काने सिद्ध करता आणि मग तर्काने जे पटते त्यावर विश्वास ठेऊ लागता

प्रश्न : गुरुदेव जर कुणी चारित्र्य आणि कसोटीवर आरोप करत असेल तर काय करावे ?

श्री श्री : कन्नडमध्ये एक सुंदर श्लोक आहे, त्यात म्हटले आहे की,

त्या माणसाला तुम्ही काय म्हणाल ज्याला आवाजाची भीती वाटते, त्याने भर बाजारात घर बांधले आहे ?

त्या माणसाला तुम्ही काय म्हणाल ज्याने समुद्र किनारी घर बांधले आहे, त्याला लाटांची भीती वाटते ?

त्या माणसाला तुम्ही काय म्हणाल ज्याने त्याने जंगलात घर बांधले आहे, त्याला प्राण्यांची भीती वाटते ?

त्या माणसाला तुम्ही काय म्हणाल जो समाजात रहातो आणि त्याला दोषारोप, आरोप आणि स्तुती यांची भीती वाटते ?

लोक आरोप करतात, नावे ठेवतात, तुम्ही काय करू शकता ? त्यांना तसे करुदेत आणि तुम्ही दुर्लक्ष करा. जरी तुम्ही सगळं चांगलच केल आहे आणि चांगल्याशिवाय काहीच केले नाही तरी लोक तुम्हाला नावे ठेवतात. ते तुम्हाला चुकीचा किंवा सरळमार्गी नसलेला ठरवतील.तुम्ही काय करू शकता ? काही नाही. जसे मी म्हटले, तुमची काहीही चूक नसताना लोक तुमचे शत्रू होतात. इथे किती लोकांना असा अनुभव आला आहे ? ( बरेच लोक हात वर करतात. ) तुम्ही त्यांना काहीही त्रास दिलेला नाही पण ते तुमचे शत्रू झालेत. तसेच काही लोकांवर तुम्ही काही फारसे उपकार केले नाहीत पण तरीही ते तुमचे मित्र झालेत. हो की नाही ?

तर मित्र होणे किंवा शत्रू होणे हे कर्म नावाच्या एका वेगळ्याच कायद्यामुळे होत असते. कर्मच तसे असेल तर काही घटनांबद्दल तुम्ही काहीच स्पष्टीकरण देऊ शकत नाही. ते तसे घडते इतकेच. त्यामुळे तुम्ही न केलेल्या गोष्टींसाठी लोकांनी तुमच्यावर आरोप केले तरी काळजी करू नका. अस्वस्थ होऊ नका. तुम्ही अस्वस्थ होऊ नका असे म्हणणे सोपे आहे पण तुम्ही अस्वस्थ होतच.पण त्यावेळी तुम्हाला हे ज्ञान उपयोगी पडेल की, ‘ कोणते तरी विचित्र कर्म आहे. असू दे. तर काय झाले, आपण काय करू शकतो ? जगाचा तसा निसर्ग नियम आहे.’ अशा प्रकारे तुम्ही स्वत:ला विरागी करायला हवे. जो विरागी असेल तो नेहमीच आनंदी रहातो.

 ||कस्य सुखम् ना करोति विराग:|| 

मनाच्या वैराग्य स्थितीशिवाय दुसरा मोठा आनंद नाही.

प्रश्न : कधी कधी मला आश्चर्य वाटते , माझ्या इतक्या न संपणाऱ्या इच्छा असतात आणि तुम्ही त्या सर्व पूर्ण करत राहता. मला याचे हसायला येते. इच्छापासून मुक्ती कशी मिळवावी गुरुदेव ?

श्री श्री : तुमच्या इच्छा पूर्ण होताहेत याची तुम्हाला जाणीव आहे हे पुरेसे आहे. दुसऱ्यांच्या इच्छा पूर्ण करण्यात स्वत:ला गुंतवून घ्या तुमच्या स्वत:च्या नव्हे.

बघा गुरु शिष्य परंपरेचे महत्व काय आहे ? शिष्याला याची जाणीव होणे की इच्छा न संपणाऱ्या आहेत. जसे, एकानंतर एक येत रहाण्याची समुद्राच्या लाटांची इच्छा असते. त्यामुळे माझ्या इच्छा मी दूर ठेऊन गुरुच्या इच्छेप्रमाणे वागत रहावे.

जेव्हा तुम्ही असे कराल तेव्हा तुमचे मन आतून रिक्त आणि पोकळ होते आणि तुम्हाला हलकेपणा जाणवतो. मग जीवन आनंद आणि दु:खाच्या पलीकडे जाते. आणि सर्व हाव आणि तिरस्कार आपोआप गळून पडतात. हाव आणि तिरस्कार घालवण्याचा हा एकमेव मार्ग आहे. म्हणूनच म्हटले आहे,

 ||‘ना गुर्रू अधिकम्, ना गुर्रू अधिकम्, ना गुर्रू अधिकम्’|| 

( गुरूपेक्षा श्रेष्ठ काही नाही, गुरूपेक्षा श्रेष्ठ काही नाही, गुरूपेक्षा श्रेष्ठ काही नाही कारण गुरू हाच सर्व श्रेष्ठ आहे)

त्यामुळे गुरूवर सर्व काही सोडून द्या आणि गुरूला समर्पण करून टाका.

इच्छा करून समाधान मिळत नाही. कारण एक इच्छा पूर्ण झाली की दुसरी निर्माण होते. आणि ती पूर्ण झाली की आणखी एक निर्माण होते. आणि मन इच्छाच्या मध्ये भटकत रहाते. ही ना ती इच्छा तुम्हाला रात्रंदिवस त्रास देत राहील. तुम्हाला माहित आहे कां , या जगात तुम्हाला त्रास देते असे या जगात जर काही असेल तर यादीत सर्वात वरचा क्रम कुणाचा असेल तर तो तुमच्या मनाचा ! मी म्हणतोय सर्वात वरचा क्रम कारण तुम्हाला हे दिसत नाहिये. तुम्हाला वाटते की कुणीतरी दुसरे तुम्हाला त्रास देत आहे. तुम्हाला वाटते की तुमची सासू तुम्हाला त्रास देत आहे किंवा तुमची सून त्रास देत आहे किंवा तुमचा नवरा किंवा बायको तुम्हाला त्रास देत आहे. हे सगळे दुसऱ्या क्रमांकावर ठेवा. तुमचे स्वत:चे मन तुम्हाला त्रास देत आहे. दुसरा कुणी शत्रू नाहिये. एकदा हे तुमच्या लक्षात आले की तुम्हाला समजेल की दुसरे कुणी नाही तर सर्व त्रास तुमच्या मनामुळे आहेत.

गुरुशिष्य परंपरेचे महत्व हेच की इच्छा न संपणाऱ्या आहेत याची शिष्याला जाणीव होणे. त्यामुळेच मी माझ्या इच्छा बाजूला ठेऊन माझ्या गुरुच्या इच्छेप्रमाणे करावे. तुम्ही जेव्हा असे कराल तेव्हा मन रिक्त आणि पोकळ बनते. मग जीवन आनंद आणि दु:खाच्या पलीकडे जाते. आणि मग सर्व हाव आणि तिरस्कार नाहीसे होतात.

सुंदर भारत

05
2012
Aug
बंगलोर
(श्री श्री आकाशाकडे पाहत आहेत)

आकाशात बघा ढग जमू लागले आहेत. या महिनाअखेरीला चांगला पाऊस होणार आहे. देशामध्ये जर गैर वर्तणूक आणि नैतिक अधःपतन होत असेल तर निसर्गदेखील आपला संताप व्यक्त करतो. जेव्हा भ्रष्ट लोक ज्यांना आपण उच्चासनावर बसवले आहे, असे लोक जेव्हा देशावर स्वतःच्या फायद्यासाठी अन्याय करतात तेव्हासुद्धा निसर्ग आपला क्रोध दाखवतो.

आपल्या देशातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. जर शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर त्याचा परिणाम निसर्ग आपला संताप दर्शविण्यात होतो. म्हणून लोकांमध्ये सदाचरण वाढायलाच हवे. देश चालवणारे लोक जर सज्जन नसतील, तर देशाची राखरांगोळी होऊन, देशातील लोक उध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही.

हे काही नवीन नाहीये, हे तर फार पुरातन काळापासून चालू आहे. प्राचीन काळी राजगुरू असायचे जे राजाने जर काही चुकीचे केले तर त्याचा कान पकडायचे आणि त्याने केलेल्या चुकीमुळे त्याचे आणि त्याच्या रयतेचे काय नुकसान होऊ शकते याबाबत त्याला सूचित करायचे. आजकाल तर कोणीच ऐकत नाही.

शेतकऱ्यांवर इतका अन्याय होतो कामा नये.

आजपासून तुम्ही जेवायच्या आधी ,”अन्नदाता सुखी भव”' असे म्हणायला सुरवात करा. आपल्यासाठी अन्न निर्माण शेतकऱ्याला आनंदी होऊ द्या. आपले अन्न गाड्यांमधून परिवहन करून पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांना आनंदी होऊ द्या. आणि तिसरी व्यक्ति म्हणजे आपल्या कुटुंबातील त्या स्त्रिया ज्या अन्न शिजवून वाढतात त्यांना आनंदी होऊ द्या, जर हे तिघे आनंदी झाले तर जग आनंदी होईल.

जर परिवारातील स्त्रिया आनंदी असतील तर घरात आनंद नांदेल. जर घरातील स्त्रिया दुःखी ,निराश.हताश आणि क्रुद्ध होऊन स्वयंपाक करतील,तर ते अन्न व्यवस्थित पचन होणार नाही आणि याचा परिणाम मनावर देखील होतो.

जर व्यापारी आनंदी असतील तर ते फसवणूक किंवा भेसळ करणार नाही. आपल्याला शुद्ध आणि स्वच्छ अन्न मिळेल. ते व्यापारी आपल्याला लुटणार नाहीत आणि अवाजवी दरवाढ करणार नाहीत.

जुन्या कालावधीपासून, व्यापारी वर्ग तलाव ,मंदिर आणि धर्मशाळा (सदाचरणाच्या शाळा) बांधणे अशाप्रकारचे अनेक सामाजिक कार्य करीत असत. जर व्यापारी आनंदी नसतील आणि ते जर लोभी बनले तर याचा लोकांवर बराच परिणाम होतो.

त्याचप्रमाणे, शेतकरीसुद्धा आनंदी असायला पाहिजे.हे फार महत्वाचे आहे.

तर मग या तिघांना लक्षात ठेवा,चला तर 'अन्नदाता सुखी भव' या मंत्राचे दररोज उच्चारण करू या.

प्रश्न : गुरुदेव, मागच्या काही दिवसात वीज पुरवठ्यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले होते. हा प्रश्न कसा सोडवावा ?

श्री श्री : एकदा आमच्याकडे कचऱ्यापासून वीज निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखवायला एक माणूस आला होता. मी त्याला तसे कर्नाटकातसुद्धा तो प्रयोग करण्यास प्रोत्साहन दिले आहे. त्याला कोणत्याही प्रकारचा एक हजार किलो कचरा पाहिजे, ज्याचे परिवर्तन तो विजेत करतो. आता ते कसे काय होते ते बघुयात.

प्रश्न : अनेक थोर संत जसे कि येशू ख्रिस्त यांचा हिंसक मृत्यू झाला. असे का?

श्री श्री : भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणाले आहेत,

'क्लेशोधिकातरस तेशाम अव्यक्तासक्त-चेतसाम अव्यक्ता हि गर्ति दुःखं देहावद्भिर अवाप्यते' 
(अध्याय १२ श्लोक ५) 

कोणी जर परमेश्वराच्या केवळ अव्यक्त स्वरूपालाच पुजले तर त्याने अमाप दुःख मिळते.  

जर तुम्ही बघाल तर मोझेस,जिजस,आणि मुहम्मद पैगंबर यांचे जीवन अडचणीयुक्त होते. गुरु नानक यांच्या वंशजांना देखील अशाच अडचणीचा सामना करावा लागला.याचे कारण त्यांनी सगुण ब्रह्म(गुणयुक्त परमेश्वर) याकडे दुर्लक्ष केले आणि केवळ निर्गुण ब्रह्म (गुण रहित परम सत्या)ची उपासना केली. 

हे अतिशय रोचक आहे.

म्हणूनच 'अविद्यया म्रीत्यम तीर्थ विद्यया अमृतम स्नुते' असे म्हणतात. सगुण आणि निर्गुण या दोघांना तुमच्याबरोबर घ्या. व्यक्त आणि अव्यक्त या दोहोंची गरज आहे.

|| ईश्वरो गुरुरामती मूर्ती भेदो विभागीने,व्योमवाद व्याप्त देहया दक्षिणमुर्तये नमः ||

गुरु,आत्मसाक्षात्कार आणि देव या सगळ्यांची जरुरत आहे.जर आपण या सगळ्यांना जीवनात घेतले तर आपण या जगात आणि दुसऱ्या जगात या दोन्ही जगात आनंदी राहू. प्रश्न : मी एक शेतकरी आहे. मला एक क्विंटल मक्याकरिता एक हजार दोनशे रुपये मिळतात. परंतु जर आम्ही बंगलोरच्या सुपर मार्केटमध्ये गेलो तर ते आम्हाला मिळते त्यापेक्षा कितीतरी अधिक दराने विकतात. आम्ही मूल्यनिर्धारण मंडळाची स्थापना करू शकतो का? शेतकरी भरपूर मेहनत करतात परंतु त्यांच्या उत्पादनाला चांगल दर मिळत नाही.आम्ही अशाप्रकारचा काही प्रस्ताव सरकार समोर ठेवू शकतो का? 

श्री श्री : मी जेव्हा काश्मीरला गेलो होतो तेव्हा मला विमानतळावर सोडायला एक शासकीय अधिकारी आला होता. तो आधी अर्थ आणि कृषी मंत्रालयात होता. त्याने शेतकऱ्यांकरिता एक योजना तयार केली होती ज्याच्या अंतर्गत आर्थिक सुट देण्याऐवजी शेतकऱ्यांना जीन्नसाचे दर वाढलेले असतील तर वाढीव दर मिळत आणि जर त्या जीन्नसाचे दर घटले असतील तर कमी दर मिळत. याच्या परिणामस्वरूप भारताचे सतरा हजार करोड रुपये बचत झाली असती. 

परंतु त्याच्या वरच्या जागी असलेल्या मंत्र्याने या योजनेला कचऱ्याची टोपली दाखवली.का? कारण यामुळे त्याचा व्यक्तिगत फायदा झाला नसता. 

मी त्या शासकीय माणसाला त्या योजनेचा तपशील देण्यास सांगितले कारण की या योजनेबाबत लोकांना सांगणे ही माझी जबाबदारी आहे. 

असे अनेक भले शासकीय अधिकारी आहेत पण खूप लोकांना त्यांच्याबद्दल माहित नाही. 

त्या शासकीय अधिकाऱ्याने सांगितले की शेतकरी आत्महत्या करीत आहेत कारण त्यांना त्यांच्या उत्पादनाला योग्य किंमत मिळत नाही. वस्तूंचे दर वाढत आहेत पण शेतकऱ्यांना योग्य किंमत दिल्या जात नाही. तसेच आपल्या गोदामांमध्ये अन्न सडून चालले आहे. 

त्याने अतिशय चांगली योजना तयार केली होती ज्यामुळे शेतकरी आणि सरकार दोघांचाही फायदा झाला असता. परंतु त्या मंत्र्याने ही योजना अजिबात पुढे जाऊ दिली नाही. 

जोपर्यंत असे भ्रष्ट मंत्री सत्तेवर आहेत तोपर्यंत देशाची भरभराट कशी होईल? सगळ्यांनी एकत्र येऊन याबाबत काहीतरी केले पाहिजे. 

प्रश्न : असे म्हणतात की मानव जन्म हा अतिशय भाग्याने मिळतो.तरीदेखील काहीजण एकदम ऐशोआरामात जगतात आणि काही अतिशय दुःखात. असा भेदभाव का?

श्री श्री : जे आनंदात आहेत त्यांनी त्यांचा आनंद जे दुःखी आहेत त्यांच्याबरोबर वाटून घ्यावा.जे दुःखी आहेत त्यांनी त्यागाचा भाव ठेवून आंतरिक शक्ती वाढवण्याकडे प्रयत्न करावे.

ज्ञान तुम्हाला आंतरिक शक्ती देते. आंतरिक शक्तीमुळे सहनशक्ती येते आणि सहनशक्तीमुळे इतरांच्याबरोबर चांगले वर्तन घडते. म्हणूनच ज्ञान,गान(गायन) आणि ध्यान हे जीवनात फार महत्वाचे आहेत.

प्रश्न : मी गेले चार वर्षे सुदर्शन क्रिया करीत आहे. मी विद्यापीठपूर्व कॉलेजकरिता मेहनत करून अभ्यास केला. हे सगळ करूनदेखील मला कॉलेजला आणि मला पाहिजे असलेल्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला नाही. मी सगळी आशा हरवून बसलो आहे. मला संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीला प्रवेश मिळाला आहे.

श्री श्री : संगणक विज्ञान चांगली शाखा आहे. त्यात प्रवेश घे. काळजी करू नकोस,ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळेल तिथे पुढे जा. तुझे जीवन चांगले असेल. कळलं?

खुपसे विद्यार्थी चांगले मार्क मिळाले नाही किंवा चांगली कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही तर उद्विग्न होतात आणि आत्महत्येचा विचार करू लागतात. असे कधीही करू नका. तुमच्या जीवनाला कधीच कमी लेखू नका. तुमचे जीवन अतिशय मौल्यवान आहे. तुमच्यात काय कौशल्य दडलेला आहे ते तुम्हाला माहिती नाही. तुम्ही एक महान मंत्री किंवा मोठे व्यावसायिक होऊ शकता. सगळ्या प्रकारच्या शक्यता घडू शकतात.

मुंबईच्या हातगाडीवर भाजी विकणारा,रामनाथ गोएंका,यांनी भारतातील सर्वात मोठी प्रकाशन संस्था सुरु केली. म्हणून तुम्ही कधी उदास होऊ नका. जर तुला संगणक विज्ञान मिळाले आहे तर त्यात पुढे जा. आपल्या देशात आधीच इतकी सुधारणा झालेली आहे आणि संगणक विज्ञान क्षेत्रात अजून सुधारणा होईल.

प्रश्न : तुमच्या स्वप्नातला भारत कसा आहे,खास करून शिक्षण,संरक्षण,अर्थव्यवस्था आणि वित्तव्यवस्था या क्षेत्रांमध्ये?

श्री श्री : स्वच्छ आणि सुंदर समाज जिथे गुन्हेगारी नसेल अशा समजाचे माझे स्वप्न आहे.

भूतान, स्विझर्लंड आणि आयर्लंड यासारख्या छोट्या देशांमध्ये किती शांती आहे. कोणे एके काळी भारतसुद्धा असाच होता.

लॉर्ड मॅकॉले याने म्हटले होते,'मी संपूर्ण भारतभर फिरलो आणि मला अशी एकसुद्धा व्यक्ति दिसली नाही की जी भिकारी किंवा चोर आहे.या देशात मी इतकी समृद्धी,इतके उच्च नैतिक मूल्ये बघितली.'

आपले असे गौरवशाली राष्ट्र होते. आपल्याला पुन्हा आपल्या देशाला तो दर्जा प्राप्त करून देण्याची गरज आहे.

प्रश्न : थोड्या दिवसांआधी तुम्ही म्हणाला होतात की देवाकडून काही हवे असल्यास त्याला लाच देऊ नका. हिंदू धर्मामध्ये आम्ही नवस करतो ज्यात आम्ही देवाला काही गोष्टी करिता प्रार्थना करतो आणि त्याच्या बदल्यात आम्ही देवाला काही देऊ करतो. हे बरोबर आहे का?

श्री श्री : नवस करणे हे केवळ तुमच्या समाधानासाठी आहे. देवाची कृपा ही बिनशर्त (अहेतू कृपा) आहे. या केवळ चालीरीती आहेत. प्राचीन शास्त्रांमध्ये याला काही आधार नाही. जर तुम्ही चांगली सेवा केली तर त्याने तुम्हाला चांगले पुण्य मिळते आणि पुण्य मिळाल्याने आनंद होतो.

प्रश्न : स्वामी नित्यानंद यांनी हिंदू संस्कृतीच्या नावाला बट्टा लावला आणि तेव्हापासून लोक आश्रमात प्रवेश करताना साशंक असतात. देवाने त्यांना असे वागण्याची अनुमती कशी काय दिली? हे सगळे बघून अतीव दुःख होत आहे.

श्री श्री : यात नवीन काही नाही. वर्षानुवर्षे हेच सुरु आहे.

रामायणात एका संन्याशाने सीतेला फसवले. रावणाला माहित होते की जर तो संन्याश्याच्या वेशात आला तर सीतेचा त्याच्यावर विश्वास बसेल.

विजयनगर साम्राज्याचा नाश हा संन्याश्याच्या वेशातील शत्रूमुळेच झाला. त्याने राजाला एका दिवसात ठार केले. शेकडो आणि हजारो हत्ती आणि सैन्य असलेले हे साम्राज्य एका दिवसात नष्ट झाले. याचे कारण संन्याश्याना सगळीकडे मुक्त प्रवेश होता.

प्रत्येक क्षेत्रात असे लोक असणारच.

आज तुम्ही या सगळ्या घटना टीव्हीवर बघता. शिक्षक वर्गात विद्यार्थिनींबरोबर गैरवर्तन करतात. पालकांना आपल्या मुलांना शाळेत पाठवायला विश्वास कसा वाटेल?

इस्पितळात डॉक्टरने रुग्णाचा बलात्कार केला. या सगळ्यातून असे दिसते की देशात अध्यात्मिक, मानववंशीय आणि नैतिक जागृतीची नितांत गरज आहे.

आपण सध्या खुपच वाम मार्गाकडे झुकलेले आहोत. धर्मनिरापेक्षतेच्या नावाखाली आपल्या देशात सगळी मूल्ये फेकून दिल्या गेली आहेत. आपल्याला धार्मिक (सत्त्वशील) समाज पुन्हा निर्माण करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर काय होते ते तर तुम्ही पाहताच आहात. शाळा,कॉलेज आणि इस्पितळे असुरक्षित बनलेली आहेत.

आपल्या देशात शिक्षक आणि डॉक्टर यांना खूप आदर दिला जायचा.

वैद्योनारायणो हरिः -डॉक्टरांना नारायणाचा अवतार समजायचे.

नृपो नारायणा- राजाला देवाचा अवतार मानायचे.

देव सगळीकडे अंतर्व्याप्त असायचा. हा देवाचा समाज होता. परंतु आता सगळीकडे भीतीचा वावर आहे. लोक मुलांना शाळेत पाठवायला घाबरतात. लोकांना डॉक्टरांकडे जायला भीती वाटते. ते तुमच्याकडून पैसे घेतात आणि तुम्हाला कफल्लक करतात. 

कित्येक वेळा ते म्हणतात, 'शस्त्रक्रिया यशस्वी झाली', पण रुग्णाचा मृत्यू होतो.

या सगळ्याचे मूळ कारण आहे अध्यात्मिक ज्ञानाची कमतरता. म्हणूनच तुम्ही सगळ्यांनी शिक्षक आणि साधक (अध्यात्मिक पंथावरचा शोधक) व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांना तुम्ही साधक बनवायला पाहिजे. आणि मगच आपण बदल नक्कीच आणू शकू.

दोनशे चाळीस अतिरेकी शस्त्र टाकून इथे आश्रमात नवीन जीवन सुरु करण्यास आले आहेत. त्या प्रत्येकाचे आयुष्य अतिशय रोचक आहे. त्या प्रत्येकावर आपण पुस्तक लिहू शकतो.

प्रश्न : आत्मसाक्षात्काराचा सोपा मार्ग कोणता?

श्री श्री : ध्यान,'मी कोण?' याचे आत्मनिरीक्षण आणि तुम्ही काय नाही आहात हे समजणे.

प्रश्न : लोक म्हणतात की आत्महत्या करणे पाप आहे,तर मग गांधीवादानुसार आमरण उपोषण हे पाप नाही का?

श्री श्री : आत्महत्येचा कोणताही प्रकार हा चुकीचाच आहे.मी त्याला पाठींबा देत नाही. एखाद्याने आमरण उपोषण करावे याबरोबर मी सहमत नाही.

आपल्या पूर्वजांचा आदर करा

03
2012
Aug
बंगलोर
(बरेच भक्त गुरुजींना मोरपिसे अर्पण करतात)

गुरुदेव: मला जाणून घ्यायचे आहे की ही पिसे तुम्ही मोराच्या पिसातून खुडली आहेत की नैसर्गिक रित्या पडली आहेत? जर ती खुडली असतील तर ती इथे आणू नका. आपण लोकांना मोरपिसे खुडण्याला अजिबात प्रोत्साहन देता कामा नये. मला माहित नाही की ही नैसर्गिकरित्या पडली आहेत की लोकांनी खुडली आहेत.

(श्रोत्यातून: त्यांनी खुडली आहेत गुरुजी)

मग तुम्ही ती अजिबात इथे आणता कामा नये. आपण ती खरेदी करता कामा नये, कारण जर आपण ती खरेदी केली तर ते अजून मोरांना मारतील. कोणीही ती खरेदी करू नयेत. 

आपण सगळीकडे या सूचना लावू की कोणीही मोरपिसे खरेदी करू नयेत. त्यामुळे जबरदस्तीने मोरपिसे खुडण्यापासून लोक परावृत्त होतील.

तुम्हाला काय वाटते? बरोबर आहे !!

ही एक नवीन प्रथा सुरु करू, आपण ही मोरपिसे खरेदी करणे बंद करू. आपण आज चांगला निर्णय केला आहे.

प्रश्न: गुरुदेव, मला तुमच्या बरोबर नाचायचे आहे.

श्री श्री: माझी चेतना कायम नाचत असते.

प्रश्न: गुरुदेव, गुरु माणसाचे कर्म बदलू शकतो काय, आणि ते कधी होऊ शकते?

श्री श्री: जर गुरु एकटा कोणाचे कर्म बदलू शकत असेल तर त्याने एका फटक्यात सगळ्यांचे कर्म बदलले असते. तुम्हाला स्वत:ला सुद्धा प्रयत्न करावा लागतो.

गुरु तुमची प्रमादापासून नक्कीच मुक्तता करू शकतो. जेंव्हा तुमच्याकडून काही प्रमाद घडतो, आणि त्याची तुम्हाला जाणीव होते की तुमची चूक झाली आहे आहे तुमची त्यातून मुक्तता होत नाही पण गुरु तुमच्यासाठी हे नक्कीच करू शकतो, त्यामुळे त्या अर्थाने होय!!

तुम्हाला याबरोबरच पुरुषार्थ (स्वप्रयत्न) करावेच लागतील. तुम्हाला सत्कर्म करावे लागेल. प्रेम आणि भक्तीची योग्य मात्रा कर्मापासून मुक्तता करायला मदत करते.

प्रश्न: माझ्या भेकड स्वभावामुळे मी आयुष्यातील प्रत्येक आव्हानापासून दूर पळतो. मी यातून कसा बाहेर पडू?

श्री श्री: प्रथम हे जाणून घ्या की तुमच्या पुढे जे आव्हान आहे ते पेलायची शक्ती तुमच्यात आहे. तुम्ही याची जाण ठेवा, की ती शक्ती आणि चैतन्य तुमच्यात आहे. तुम्ही या निष्ठेने पुढे चला मी तुमच्या बरोबर आहे.

प्रश्न: गुरुदेव, आपण मृत व्यक्तीसाठी विधी करतो. याला काही आधार आहे का?

श्री श्री: हे विधी म्हणजे मृत व्यक्तीप्रति तुम्ही दाखवलेला आदर होय. पण आजकाल पंडित आणि पुरोहितांनी हे इतके किचकट केले आहे की ते काय म्हणतात ते तुम्हाला कळत सुद्धा नाही. संस्कृत मधे ते जे म्हणत आहेत त्याचे भाषांतर केले तर तुम्हाला त्याचा अंदाज येईल.

तिळ घेऊन तुम्ही ‘तर्पनामी तर्पनामी तर्पनामी’ असे का म्हणता ठाऊक आहे? याला तर्पनम असे म्हणतात. तुम्ही मृत व्यक्तीचे नाव घेता, तीळ आणि पाणी तबकात सोडता. असे का करायचे? असे करून तुम्ही गेलेल्या जीवाला सांगता ‘तुमच्या मनात ज्या काही इच्छा राहून गेल्या आहेत त्या तीळासारख्या छोट्या आहेत. छोट्या इच्छा समर्पित करा. देवाघरी अपार आनंद, परमानंद आहे त्याचा उपभोग घ्या. तुमच्या अपूर्ण इच्छाची आम्ही पूर्तता करू. तुम्ही समाधानी, आनंदी रहा’. तर्पणमधे गेलेल्या जीवाला आपण हेच सांगतो.

त्यांना इच्छा असतात; त्यांना त्यांच्या नातवंडांचे लग्न बघायचे असते, पतवंडाना अजून एक मुलगी झालेली पाहायची असते. मरणापूर्वी अश्या इच्छा राहतात, त्यामुळे आपण त्यांना सांगतो ‘या इच्छा छोट्या आहेत, त्या सोडा. प्रेम आयुष्याचे सार आहे आणि दैवत्व म्हणजे प्रेम होय. तुम्ही प्रेमाच्या प्रकाशाकडे जा.’ मृत व्यक्तीला हे निर्देश देणे म्हणजेच श्राद्ध होय.

तुम्ही त्यांच्याकडे नंतर आशीर्वाद मागता, ‘मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करीन, माझे मन चांगल्या मार्गावर राहण्यासाठी, योग्य वेळी योग्य गोष्टी करण्यासाठी मला आशीर्वाद द्या. आम्हाला चांगले भाग्य आणि भरभराटी साठी आशीर्वाद द्या.’

अश्या प्रकारचे श्राद्ध जगात सगळीकडे असते. दक्षिण अमेरीकेत सुद्धा असे करतात. एका विशिष्ट दिवशी संपूर्ण शहर एका ठिकाणी जमून त्यांच्या पूर्वांजांसाठी काही चित्र आणि बऱ्याच गोष्टी रस्त्यावर जाळून टाकतात. हे असेच ते चीन आणि सिंगापूर मधेही करतात.

तुम्हाला माहीत आहे का ते सिंगापूर मधे काय करतात? पूर्वांजांसाठी एक दिवस राखून ठेवलेला असतो. त्यांच्या पूर्वांजांना ज्या गोष्टी आवडत असत त्यांच्या कागदाच्या प्रतिकृती बनवून जाळून टाकतात. जर त्यांच्या वडिलांना गाड्यांची आवड असेल तर ते छान बेनझ गाडी बनवून रस्त्यावर जाळतात. सिंगापूर हे खूप स्वछच शहर आहे. पण या एका दिवशी तिथे जळलेल्या कागदांचा खूप कचरा पडलेला असतो.

चीन मधे असे मानले जाते की जर का खोट्या नोटा जाळल्या तर ते पूर्वांजांपर्यंत पोचते आणि ते तुम्हाला चांगले दैव प्रदान करतात. कधी कधी मला वाटते की हि फसवणूक आहे. पण त्याच वेळेला जाणवते की हा विश्वास आहे. म्हणून ते रस्त्याच्या रस्त्याच्या मधोमध घर बनवतात आणि जाळून टाकतात. कारण त्यांचा विश्वास आहे यामुळे त्यांना आशीर्वाद मिळतील.

अशा प्रकारे जीवनाच्या पार पोचलेल्या लोकांबरोबर जोडून राहणे, त्यांचा आदर करणे हीच श्रद्धा आहे.

युरोपातही अशा प्रकारे ‘सर्व संतांचा दिवस’आहे. त्या दिवशी लोक दफन भूमी मधे जाऊन फुले वाहतात. श्रद्धा हि जवळपास सर्व धर्मांमध्ये, सर्व संस्कृतींमध्ये आहे. इथे संस्कृतमधे त्याला खूप महत्त्व आहे. पण हे लोकांना समजत नाही.

जसे की पिंड दान, आपले शरीर हे अन्नाच्या गोळयापासूनच बनले आहे न? म्हणून अशी प्रथा आहे की आपण अन्नाचा गोळा ठेवतो, ते पितरांच्या आवडीचे काहीही असू शकते. म्हणून तुम्ही पितरांच्या आवडीचे काहीही बनवा आणि गरीब लोकांमध्ये ते वाटून द्या.

हि श्रद्धा आहे, हे कृतज्ञता आणि उत्सवाच्या जाणीवेने करायचे असते.

तुम्ही हे एवढे करू शकता. त्यांच्या आवडीचे अन्न बनवून थोड्या लोकांमध्ये वाटून खायचे. त्यांचे आभार माना आणि ते ज्या जगात असतील तिथे त्यांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करा आणि त्यांचे आशीर्वाद मागा, की तुमच्या इथल्या प्रवासात तुमची प्रगती होईल.

प्रश्न: लोक आपले आयुष्य का संपवतात?

श्री श्री: बुद्धी न वापरल्यामुळे असे होते. लोकांना आरामाची खूप सवय झालेली असते. जेंव्हा त्यांना थोडे कष्ट होतात तेंव्हा त्यापासून दूर पळायला ते स्वतःला मारून टाकतात. हा मुर्खपणा आहे. हे म्हणजे थंडीत कुडकुडत असताना आपला सदरा आणि जाकेट काढून टाकण्यासारखे आहे, असे करण्याने थंडी कमी होणार नाही. पण त्यांच्यात ही समज नसल्याने ते असे करतात. म्हणूनच सुरुवातीपासून अध्यात्मीक ज्ञान जरुरीचे आहे.

ज्या लोकांमध्ये टीका आणि दुःख सहन करायची सहनशक्ती असते, जे संकटाना सामोरे जातात त्यांना आत्मबल मिळते, आणि ते कधीही आत्महत्या करत नाहीत.

जेंव्हा आत्मबल नसते, आणि लोकांना आरामाची सवय झालेली असते तेंव्हाच ते आत्महत्या करतात. त्यामुळे आरामाची सवय सुरुवातीपासूनच मोडायला हवी. जेंव्हा लोकांना कठीण परिस्थितीत राहून टीकेला सामोरे कसे जायचे हे कळेल तेंव्हा ते आत्महत्या करणार नाहीत.

प्रश्न: गुरुदेव, कृपया मोक्षा बद्दल सांगाल का?

श्री श्री: तुमच्या मनात ज्या काही इच्छा आकांक्षा असतील तर त्या मरणापूर्वी संपवून टाका. असा एक तरी क्षण असावा जेंव्हा तुम्हाला वाटेल ‘मला आता काहीही नको’ – त्यालाच मोक्ष असे म्हणतात. मोक्ष मिळवण्यासाठी मरणाची गरज नाही. मरणापूर्वी तुम्हाला समाधानी वाटायला हवे. जेंव्हा आयुष्यात ही तृप्त भावना वाटेल तेंव्हा मुक्ती, अधिक मुक्ती मिळेल.

प्रश्न: तुम्हाला गुरु पौर्णिमेला रडताना पाहून मला फार वाईट वाटले.

श्री श्री: नाही, अश्रू फक्त अडचणीतच येत नाहीत; अश्रू प्रेमाचे सुद्धा असतात. मी तिथे असलेल्यांचे प्रतिबिंब होतो, सगळ्याचे डोळे पाणावलेले होते त्यामुळे या शरीरातून सुद्धा ते आले. गुरु पौर्णिमेला सगळे कृतज्ञ होते, कृतज्ञतेने भरलेले! कोणतेही डोळे कोरडे नव्हते, त्यामुळे जेंव्हा सगळ्यांचे डोळे पाणावले तेंव्हा माझेही डोळे पाणावले.

प्रेम हि एक घटना आहे

04
2012
Aug
बंगलोर
प्रश्न: गुरुदेव, प्रेम, आदर, संबद्धता या तिन्ही गोष्टी एकमेकाशी कशाप्रकारे जोडलेले आहेत? आपल्या नातेसंबंधात याचा समतोल कसा राखता येईल?

श्री श्री: मला वाटतय कि तुमच्याकडे बराच रिकामा वेळ आहे. तुम्ही कामात मग्न असायला हवे. नुसते रिकामे बसून चिंता करू नका. प्रेम, आदर ह्या भावना तुमच्या मध्ये आहेतच. जेव्हा तुमचे मन आणि हृदय निर्मळ असेल तेव्हा योग्य भावना योग्य वेळी येतील.

प्रेम, आदर या घटना आहेत. तुम्ही या घटना घडवू शकत नाही. तुम्ही आदराला तुमच्यामध्ये यायला आमंत्रण देवू शकत नाही. तुम्ही जर प्रेम, आदर या भावनांना जाणण्याचा प्रयत्न केला तर त्यात तुम्हाला अपयश येईल. तुम्ही फक्त तुमचे मन उदासीनते पासून मुक्त करून ज्ञानाने भरा.

ज्ञान म्हणजे या जगाकडे पाहण्याचा मोठा दृष्टीकोन आहे.

तुम्ही स्थायी काय आहे आणि अस्थायी काय आहे हे पहा. लोकांचे अभिप्राय हे अस्थायी असतात. ते येतात आणि जातात. हे तुम्ही फक्त लक्षात ठेवा. आदराची इच्छा ठेवू नका. काही लोक तुम्हाला आदर देतील काहीजण देणार नाहीत, ठीक आहे. तो त्यांचा प्रश्न आहे. जर तुमचे आयुष्य लोकांच्या आदरांवर अवलंबून असेल तर तुम्ही दुर्बल आहात. तुम्हाला दुर्बल असल्याची जाणीव होईल आणि जेव्हा हि जाणीव तुम्हाला होईल तेव्हा तुम्ही दु:खी व्हाल.

तुम्ही हे जाणले पाहिजे कि तुम्हाला कोणाच्याही आदराची गरज नाही. ‘माझा आहे माझ्यापाशी आहे, मला कोण्याच्याही आदराची गरज नाही’ बस्स!!!

याचा अर्थ असा नाही कि तुम्ही अनादराने वागावे. तुम्ही आदर करा पण बदल्यात कोणी तुमचा आदर करेल याची अपेक्षा करू नका.

काही लोकांमध्ये थोडा सुध्दा आदर नसतो. ते तसेच असतात, त्या गोष्टीवर तुम्ही विचार करू नका. कोणी तुमचा आदर करत नसेल तर तुम्ही विचार करत बसू नका. या वरून त्यांच्यावर काय संस्कार काय आहेत हे दिसते.

तुम्ही जर ज्ञानी असाल तर तुम्ही सर्वाचा आदर कराल, मग ते वेडे असोत कि शहाणे. तुम्ही मग वेड्यांचा हि आदर कराल कारण आदर करणे हे तुमच्या स्वभावात आहे. तुम्ही त्यांच्याकडे या सृष्टी निर्मितीचा एक भाग म्हणून पाहता. कारण ते या विश्व, सृष्टी निर्मात्या च्या मालकीचे आहेत. तुम्ही जर सगळ्यांचा आदर केलात तर तुम्ही किती ज्ञानी आहात हे दिसून येईल.

आदराची अपेक्षा करणे हि आपली दुर्बलता दर्शविते, आणि आदर करणे मग तो कोणीही असो हे तुम्ही किती ज्ञानी आहात हे दर्शविते.

प्रेम हे या सर्व सृष्टी निर्मितीचा मूलाधार आहे. तो कधीही अदृश्य होणार नाही. तो सदैव असणार आहे. तुम्ही जेवढे प्रेम द्याल, त्याच्या द्विगुणीत तुम्हाला परत मिळेल.

प्रश्न: अनंतता हि निनावी का असते?

श्री श्री: तुम्ही कधी शोधू नये म्हणून.

तुम्हाला जर कोणत्या गोष्टी बद्दल उत्कंठा असेल तर तुम्ही ती शोधता. ही शोधण्याची प्रक्रिया खूप सुंदर असते. त्यासाठीच म्हणतात कि उत्कंठा म्हणजे राधा, आणि श्याम म्हणजे प्रेम. उत्कंठा आणि प्रेम हे एकत्र जातात. उत्कंठा नसेल तर तिथे प्रेम असणारच नाही. आणि जिथे प्रेम असते तिथे उत्कंठा असतेच.

प्रश्न: गुरुदेव, कृपया असंगोहम् ( एक पद जे गुरुदेव अडव्हान्स कोर्स मध्ये वारंवार उच्चार करतात) चा अर्थ सांगा.

श्री श्री: असंगोहम् म्हणजे - मी हे नाही. उदा: मी वस्त्र परिधान केले आहेत, पण मी वस्त्र नाही.

हे शरीर माझे आहे पण मी शरीर नाही. मी मन नाही, विचार नाही. अशा प्रकारे तुम्ही विचार करत रहा आणि स्वत:च्या ओळखीच्या सर्व स्तर दूर करून टाका. आणि शेवटी ज्यावेळेस तुम्ही विचाराल कि, ‘मी कोण आहे?’ तुम्हाला काहीच मिळणार नाही!

असंगोहम् म्हणजेच ‘मी कोणीच, काहीच नाही. मी फक्त या अवकाशातील मोकळी जागा आहे.

असंगोहम् म्हणजे स्व: बरोबर असणे. जर मी विचार केला कि मी वस्त्र आहे तर ती एक समस्या आहे. मी या अस्तित्वाच्या सर्व स्तरांचा पलीकडे आहे.

जर मी सारखा विचार करत बसलो कि मी विचार आहे, मी भावना आहे, मी संवेदना आहे तर मी माझ्या विस्तीर्ण स्वरुपा पासून भरकटत जाईन. जर तुम्हाला स्वत: च्या विस्तीर्ण स्वरुपाची परिपूर्ती करायची असेल तर, ‘मी कोणीच नाही’ असे वारंवार म्हणत रहा. 

(गुरुदेव गातात)

मनो बुध्याहंकार चित्तानी नाह्म, ना चा श्रोत्रा जिव्हे न चा ग्राना नेत्रे ना चा व्योमा भूमीर ना तेजो ना वायू:, चिदानंद रूप: शिवोह्म शिवोह्म - श्री आदी शंकराचार्य यांच्या आत्माष्ट्कम मधून

मी मन, बुद्धी, स्मृती किंवा अहंकार नाही. मी कोणीच नाही.

अशा पद्धतीने विचारांना निष्प्रभ करून रिकामे आणि मोकळे व्हावे. हेच शिव तत्व आहे. हीच परिपूर्ती म्हणजे ध्यान ज्याला आपण समाधी म्हणतो.

प्रश्न: गुरुदेव, काही दिवसापूर्वी तुम्ही गायत्री मंत्र चे महत्व सांगितले होते. गायत्री मंत्रोचचार करण्याआधी जी दिक्षा घेतली जाते त्याचे महत्व काय आहे?

श्री श्री: हो, कोणताही मंत्र म्हणण्याआधी दिक्षा घेणे आवश्यक आहे. तरच तो मंत्र प्रभावी ठरतो. तुम्ही फक्त पुस्तकामध्ये बघून मंत्र म्हणू शकत नाही. तो अशा व्यक्ती कडून घेतला पाहिजे जो उद्घोष करत असेल.

प्रश्न: गुरुदेव, तुमच्या प्रेमापोटी ज्या असह्य वेदना होतात त्यावर उपाय काय आहे? काय करावे?

श्री श्री: लिखाण सुरु करा; त्याच्यातून काही कविता निर्माण होतील. काही उपक्रम हाती घ्या. सेवा करा; ज्ञान शिकवा आणि तुम्ही ज्ञानात रहा. ह्यामुळे तुमच्यातील सृजनशीलता दिसून येईल.

प्रश्न: गुरुदेव, ज्यावेळेस मी माझ्या हृदयात पाहते मला तुम्हीच दिसता. मला तुमच्या शिवाय काहीच सुचत नाही, तुम्ही माझ्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडवून आणले आहेत. तुम्ही माझ्या आयुष्याची नाव कोणत्या दिशेने नेण्याचे ठरविले आहे?

श्री श्री: ऐका! तुम्ही अदभूत आहात, तुम्ही एवढे संपूर्ण आहात म्हणूनच तुम्ही तुमच्या तीव्र भावना अनुभवू शकता.

ज्या व्यक्ती कडे भाव नाही तो व्यक्ती परमानंद कधीच अनुभवू शकणार नाही. जर कोणी व्यक्ती बुद्धीत अडकलेला असेल तर त्याचे आयुष्य शुष्क होते. ना तो शांती अनुभवू शकतो ना ईश्वरीय प्रेम अनुभवू शकतो. आयुष्यात ईश्वरीय प्रेम नसेल तर आकांक्षा आणि इच्छा माणसाच्या पाठी लागतात. म्हणून दोन्ही असणे म्हणजे सुदैवी मानले जाते.

भगवद्गीते मध्ये भगवान श्री कृष्ण म्हणतात, ‘नसति बुद्धिर आयुक्त्स्य ना चायुक्तस्य भावना, ना चाभावयतः शांतीर अशांत्स्य कुत्: सुखम’ – (अध्याय २, श्लोक ६६).

जो कोणी स्वत:च्या आत्म्याशी एकरूप होवू शकत नाही, त्याच्या कडे ना बुद्धी असते ना तीव्र भावना. आणि ज्याच्याकडे तीव्र भावना नाहीत तिथे ना शांती असते ना ईश्वरीय प्रेम. हे सत्य आहे.

मी खात्रीने सांगू शकतो कि तुम्ही जर ज्ञानात असाल तर तुम्ही या विश्वासाठी एक खजाना आहात. तुम्ही सर्वासाठी एक उत्कृष्ट भेट वस्तू आहात.

रक्षा बंधन

01
2012
Aug
बंगलोर
 आज आहे पौर्णिमा-श्रावण पौर्णिमा . याच्या आधीची पौर्णिमा होती गुरु पौर्णिमा, गुरु आणि शिक्षक यांना समर्पित. त्याच्या आधी होती बुद्ध पौर्णिमा आणि त्याच्यासुद्धा आधी होती चैत्र पौर्णिमा.

तर या चौथ्या पौर्णिमेला श्रावण पौर्णिमा म्हणतात आणि ही पौर्णिमा भावा-बहिणीच्या नात्याला समर्पित आहे-रक्षा बंधन.

आजचा दिवस हा जानवे बदलण्याचासुद्धा दिवस आहे. तुमच्या खांद्यांवर तीन जबाबदाऱ्या अगर कर्ज आहेत याची आठवण ठेवणे असे जानवे बदलण्याचे महत्व. तीन जबाबदाऱ्या म्हणजे तुमची तुमच्या पालकांच्या प्रति, समाजाच्या प्रति आणि ज्ञानाच्या प्रति.

ह्या आपल्या तीन जबाबदाऱ्या अगर आपली तीन कर्ज आहेत. आपल्यावर आपल्या पालकांचे उपकार आहेत, समाजाचे उपकार आहेत आणि आपल्यावर गुरुचे;ज्ञानाचे उपकार आहेत. तर आपल्यावर ही तीन कर्जे आहेत आणि जानवे या तीन जबाबदाऱ्यांची आठवण करून देते.

जेव्हा आपण कर्ज असा उल्लेख करतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की आपण काही घेतले आहे आणि ते आपण परत करणे जरुरी आहे. परंतु इथे आपण जबाबदारी म्हणून समजणे योग्य आहे. या संदर्भात कर्जाचा अर्थ काय होतो? जबाबदारी असा! तुमची आधीच्या पिढीच्या प्रति असलेली जबाबदारी, पुढच्या पिढीच्या प्रति असलेली जबाबदारी आणि वर्तमान पिढीच्या प्रति असलेली जबाबदारी याबाबत पुनरावलोकन करणे. आणि म्हणूनच तुम्ही हे दोऱ्याचे तीन पदर (जानवे) खांद्यावर घेता.

मला माझे शरीर शुद्ध, माझे मन निर्भेळ आणि माझी वाणी पवित्र ठेवू दे- हे याचे महत्व आहे. शरीर, मन आणि वाणी यांची शुद्धता. आणि जर तुमच्या भोवती दोरा लोंबत असेल तर तुम्हाला दररोज आठवण राहते, 'अरे मला या जबाबदाऱ्या आहेत.'

प्राचीन काळी स्त्रियांना देखील जानवे घालावे लागत असे. हे एक किंवा दोन जाती पुरते मर्यादित नव्हते. ते ब्राह्मण असो वा क्षत्रिय, वैश्य वा शुद्र सगळ्यांना ते घालावेच लागत असे; परंतु मागाहून ते थोड्यांकरीताच सीमित झाले.

जबाबदारी ही सर्वांकरिता आहे.

आता जर कोणाचे लग्न झाले तर त्यांना सहा पदराचे जानवे मिळते- तीन पदर स्वतःचे आणि तीन पदर हे पत्नीचे सुद्धा. खरे तर स्त्रियांनीसुद्धा जानवे घालावे परंतु पुरुष ती जबाबदारी स्वतःवर घेतात. हा पुरुष प्रधान समाज आहे; त्यांनी ही फार मोठी चूक केली. प्राचीन काळी स्त्रिया देखील घालायच्या- जबाबदारी घेण्याचा समारंभ व्हायचा. परंतु आता विवाहानंतर पुरुष पत्नीच्या वाट्याचीसुद्धा जबाबदारी उचलतो.

तर रक्षा बंधन च्या दिवशी राखी बांधतात,ज्याला आता मैत्रीची फित असे म्हणतात. ही संज्ञा तर आता इंग्रजीत प्रचलित झाली, परंतु रक्षा बंधन हे प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. भावाने बहिणीचे संरक्षण करण्याचे हे बंधन आहे. म्हणून रक्षा बंधन असा उत्सव आहे ज्यात बहिणी या त्यांच्या भावाकडे जाऊन त्याला राखी बांधतात. आणि तो त्यांचा सख्खा भाऊ असणे जरुरी नाही, खरे तर त्या सगळ्यांना बांधायला लागतात आणि सगळे त्यांचे भाऊ आहेत. तर हे या देशात प्रचलित आहे आणि श्रावण पौर्णिमा हा फार मोठा सण आहे.

श्रावण पौर्णिमे नंतर येते भाद्रपद पौर्णिमा. ही देखील साजरी केली जाते. नंतर येते अनंत पौर्णिमा, जी अनंततेची पौर्णिमा आहे. आणि नंतर येते शरद पौर्णिमा. शरद पौर्णिमेचा चंद्र हा मोठा आणि सुंदर असतो. जर कोणाचा चेहरा फुललेला आणि टवटवीत दिसत असेल तर त्याला, 'तू तर एकदम शरद पौर्णिमेसारखा दिसतो आहेस.' असे म्हणतात.

शरद पौर्णिमा ही संपूर्ण वर्षभरातील सर्वात उत्कृष्ट, सर्वात मोठी आणि सर्वात सुस्पष्ट पौर्णिमा आहे. जर कोणी अतिशय आनंदायक आणि आल्हाददायक दिसत असेल तर त्याला,'शरद चंद्र निभानना' असे म्हणतात.

असे म्हणतात की देवी मातेचा चेहरा हा शरद पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे आहे. म्हणून ही पौर्णिमा अतिशय मंगल आहे.

या नंतर येते कार्तिक पौर्णिमा जी तुम्ही खूप दिवे लावून साजरी करता. तर प्रत्येक पौर्णिमेला काही महत्व आहे आणि काही उत्सव त्या सोबत जोडलेला आहे.

शरद पौर्णिमेला भगवान श्रीकृष्ण गोपिकांबरोबर नाचले. तो जरी एकच होता तरी प्रत्येक गोपीला वाटायचे की तो अनेक आहे, त्यांना जणू तो अनेक पटीने वाढल्याप्रमाणे वाटायचा आणि अशाप्रकारे तो सगळ्या गोपिकांबरोबर नाचायचा. सगळे समाधिस्थ व्हायचे! आणि सगळ्यांना कृष्ण आपला स्वतःचाच आहे असे वाटायचे आणि तो सगळ्यांबरोबर नाचायचा. शरद पौर्णिमा यासाठी सुप्रसिद्ध आहे.

लोक हा दिवस साजरा करतात. ते दुधाला चंद्रप्रकाशात ठेवतात आणि नंतर मग ते दुध ते ग्रहण करतात. तर अशाप्रकारे शरद पौर्णिमा साजरी केली जाते.

जर तुम्ही तुमच्या जीवनाला उत्सव बनवू शकला नाही आणि जर तुम्ही प्रत्येक दिवस साजरा करू शकला नाही तर निदान महिन्यातले काही दिवस तुम्ही साजरे करू शकाल. आणि जर महिन्यातील काही दिवस अति होत असतील तर मग निदान महिन्यातून एकदा तरी म्हणजे प्रत्येक पौर्णिमा तुम्ही साजरी करू शकता; अशा प्रकारे वर्षातील बारा उत्सव.

मन हे चंद्राबरोबर इतके जोडलेले आहे, म्हणूनच अमावस्येला किंवा पौर्णिमेला मनात चढ उतर होतात. मन आणि चंद्र हे खुपच जोडलेले आहेत म्हणूनच वेदांमध्ये म्हटलेले आहे, 'चंद्रमा मनसो जाता'-मन हे चंद्रापासून निर्माण झालेले नाही तर चंद्र हा मनापासून निर्माण झालेला आहे.’ म्हणूनच हे दिवस अतिशय महत्वाचे आहेत. जीवनही तसेच महत्वाचे आहे. मी तर म्हणेन की संपूर्ण आयुष्य हे ज्ञानी माणसाच्यादृष्टीने महत्वाचे आहे.

म्हणून, या दिवशी जानवे बदलतात आणि ते या निश्चयाने(संकल्पाने) बदलतात की-मला अशी क्षमता मिळू दे ज्याच्या योगे मी परिणामकारक आणि किर्तीवंत कर्मे करू शकेन.

कृती करण्यास देखील क्षमतेची आवश्यकता असते. आणि जेव्हा शरीर शुद्ध असेल, वाणी पवित्र असेल आणि चेतना जिवंत असेल तेव्हा कार्य पार पडता येते.

असे म्हणतात की एखाद्याला कोणतीही कृती, अध्यात्मिक कृती किंवा प्रापंचिक कृती,करण्याकरिता कुशलतेची आणि क्षमतेची गरज आहे. आणि अशी कुशलता आणि क्षमता मिळवण्यासाठी आपण जबाबदार व्यक्ति असणे जरुरी आहे. केवळ जबाबदार माणूसच कार्य करण्यास योग्य आहे. बघा, एवढा सुंदर संदेश दिला गेला आहे.

जर तुम्ही कोणतेही काम एखाद्या गैरजबाबदार माणसाला दिले तर त्याने नुकसानच होईल.

जर तुम्ही गैरजबाबदार माणसाला स्वयंपाकाचे काम दिले आणि दुसऱ्या दिवशी न्याहारीसाठी तुम्ही विचारले तर तो, 'न्याहारी अजून तयार नाही', असे तुम्हाला सांगेल.

जर सकाळची न्याहारी दुपारच्या जेवणाच्या वेळेस दिली तर तो माणूस जबाबदार नाही. आणि गैरजबाबदार माणूस कोणतेही काम, संसारिक काम किंवा अध्यात्मीक काम, करण्यास योग्य नाही. म्हणूनच सर्वात प्रथम आपल्याला आपल्या आयुष्यातील जबाबदाऱ्या कशा पार पडायच्या हे माहित असले पाहिजे. आणि ही जबाबदारी कशी पेलावी हे शिकणे म्हणजेच यज्ञोपवित संस्कार होय.

जानवे हे असेच बदलले जात नाहीत. जीवनात जबाबदाऱ्या असतात. म्हणून ते बदलताना -मी जे काही करेन ते जबाबदारीने करेन- या जाणीवेने आणि निश्चयाने बदलतात.

श्री श्री विश्व विद्यालयाचे दरवाजे उघडले

31
2012
Jul
बंगलोर
भुवनेश्वर,ओडिशा येथे आज आपण आपल्या विश्व विद्यालयाचे उद्घाटन केले.

या विश्व विद्यालयात विद्यार्थ्यांची पहिली तुकडी येऊन पोचली आहे, आणि हि विद्यार्थ्यांची पहिली तुकडी आपला अभिमान आहे, कारण ते अशा गोष्टीचा पाया आहेत जी खूप मोठी आणि भव्य होणार आहे.

ओडिशामधील श्री श्री विश्व विद्यालय हे मूल्ये आणि वैश्विक सहकार यावर आधारित आहे. पूर्वेकडील सर्वोत्तम आणि पश्चिमेकडील सर्वोत्तम गोष्टी विद्यार्थ्यांना विश्व विद्यालयात प्रदान केल्या जातील आणि ते मग वैश्विक नागरीक बनतील आणि त्यांचे कौशल्य आणि हुशारी ते संपूर्ण जगभर घेऊन जातील.

मी आपले कुलगुरू डॉ.मिश्रा आणि आपल्या विश्व विद्यालयाचे अध्यक्ष डॉ राव आणि इतर सर्व यांचे अभिनंदन करतो. त्यांनी थोड्या अवधीत अतिशय मेहनत केली आहे. त्यांना सगळे प्रमाणबद्ध करावे लागले. भुवनेश्वरमध्ये प्रचंड पाऊस असताना देखील. त्यांच्या समोर बरीच आव्हाने उभी ठाकली आणि ही आव्हाने पेलत त्यांनी ठरवलेल्या तारखेला विश्व विद्यालय सुरु केले. जस जसे आपण पुढे जात राहू, चांगल्या सुविधा या येत राहतील.

मी सगळ्या विद्यार्थ्यांचेदेखील अभिनंदन करतो; तुमचे भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे!

हे विश्व विद्यालय सुरु व्हायाच्यासुद्धा आधी,मला जगभरातून अनेक माणसांचे ते या विश्व विद्यालायाबरोबर कसे सलग्न होऊ शकतात असे फोन आले. आणि आज मला फार बरे वाटत आहे की आजच्या शुभ दिवशी आपण या विश्व विद्यालयाची सुरुवात केली. मला खात्री आहे की ही विद्यार्थ्यांची पहिली तुकडी ही आपल्या संघाचे नेतृत्व करेल.

ज्ञान, व्यक्तिमत्व, आर्थिक उन्नती, सामाजिक जबाबदारी आणि समाजाचे नेतृत्व हे आम्ही आमच्या विद्यार्थ्यांकडून अपेक्षित करतो. आणि मला खात्री आहे की ते एक नवीन आशा आणतील. आर्थिक ऱ्हास, नैतिक अधःपतन, सामाजिक अन्याय, गरीबी आणि इतर आव्हाने समोर ठाकली असता, ते एक नवीन आशा जागवातील.

आजच्या समाजासमोरील आव्हानांची मला गणती करायची नाही. पण मला खात्री आहे की हे तरुण करोडो लोकांचे अश्रू पुसतील आणि जगात आर्थिक उन्नती आणि भरभराट पुन्हा आणतील.

एक विद्यार्थी म्हणून तुम्हाला दोन गोष्टींची आवश्यकता आहे :

१)    तुमचा दृष्टीकोन अधिक व्यापक पाहिजे,आणि

२) अधिकाधिक ज्ञानाने स्वतःला सुसज्ज करण्याची तयारी. स्वतःला केवळ अभ्यासक्रमात सीमित न ठेवता, अभ्यासक्रमाच्या पलीकडे पहावे.तुम्हाला जे शिकायचे आहे त्याची शिक्षकांकडे मागणी करा. माझ्या मते विद्यार्थ्यांनी उत्साही असणे गरजेचे आहे.

संस्कृतमध्ये एक जुनी म्हण आहे,'जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही आरामाची इच्छा ठेवू नये.आणि ज्यांना आरामाची सवय आहे त्यांना उच्च ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही.'

विद्यार्थिना कुटो सुखं;सुखार्थीनो कुटो विद्या.

याचा अर्थ असा नाही की तुम्ही असुखकारक राहावे. पण केवळ सुख आणि आनंद यावर लक्ष केंद्रित केले तर शिक्षणावर विपरीत परिणाम होईल. म्हणून जर तुम्ही ज्ञानाला लक्ष केले तर मग संपूर्ण आयुष्यभर सुखे आपणहून येताच राहतील.

ज्ञान हे आंतरिक आणि भौतिक सुखांना आकर्षित करते. म्हणून आपण ज्ञानावर लक्ष केंद्रित करावे आणि सुखे आपणहून आपल्या मागे येतील.

ही विद्यार्थ्यांची पहिली तुकडी आपल्या जगासाठीच्या मोठ्या आशेचे प्रकाशमान उदाहरण असतील या बद्दल मला समाधान आणि आत्मविश्वास आहे.

इथे जमलेल्या विभागांचे देखील मी अभिनंदन करतो. तुम्ही मानवतेचा नवीन पाया तयार करीत आहात.

या विश्व विद्यालयात भविष्यात अस्थिचिकित्सा शास्त्र, निसर्गोपचार, योग, आयुर्वेद आणि अनेक इतर शाखा असतील ; खास करून देशात दुर्मिळ असलेल्या.

भारतात पहिल्यांदा अस्थीचिकित्सा शास्त्राचा अभ्यासक्रम आम्ही सुरु करत आहोत. भारतात कोणालाही अस्थीचिकित्सेबाबत माहित नाही. जसे आपल्याकडे विषमचिकित्सा औषध आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे अस्थीचिकित्सा आहे जी स्नायूंच्या सांगाड्याची (सांधे,स्नायू आणि पाठीचा कणा यांची) रचना यांच्यात दुरुस्ती आणण्यावर लक्ष केंद्रित करते ज्यामुळे अनेक आजार बरे होतात. त्याने रोग प्रतिकार शक्ती देखील वाढते आणि मनुष्य संपूर्णपणे निरोगी आणि कुशल बनतो. म्हणून आम्ही असा अभ्यासक्रम आपल्या विश्व विद्यालयात सुरु करत आहोत.

आणि नंतर दी कॉलेज ऑफ गुड गव्हर्नन्ससुद्धा आपल्या विश्व विद्यालयात सुरु होणार आहे. आज प्रत्येक क्षेत्रातील लोकांना काही ना काही पात्रता असणे जरुरी आहे. परंतु राजकारणात हे अनुपस्थित आहे. म्हणूनच राजकारण्यांचा दर्जा हा कधी नव्हे इतका खालावला आहे. हीच कथा आहे प्रशासनाची-ग्रामपंचायतीपासून ते संसदेपर्यंत,आपल्याला व्यवस्थित प्रशासन आणि सामाजिक नेतृत्व निर्माण करण्याची गरज आहे. दी कॉलेज ऑफ गुड गव्हर्नन्स हे येऊ घातले आहे. ते लवकरच येईल.

आता आज व्यवसाय व्यवस्थापन आणि व्यवसाय प्रशासन यांचे अभ्यासक्रम सुरु केलेले आहेत आणि येणाऱ्या दिवसांमध्ये संपूर्ण जगभरातील ज्ञान आपल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या जाईल. याच हेतूने तर आम्ही हे विश्व विद्यालय सुरु केले आहे.

बघा ना, आपण आपल्या मुलांना लांबच्या देशांमध्ये पाठवतो. आपण त्यांना ऑस्ट्रेलिया, लंडन, अमेरिका इथे पाठवतो आणि त्यांच्या या विदेशी शिक्षणाकरिता आपण अमाप पैसा जमा करतो आणि खर्च करतो. येवढ करून आपल्या मुलांना तिथे नीट वागणूक मिळत नाही. त्यांना तिथे इतका हिंसाचार सहन करावा लागतो. आपल्या देशाने आपली बरीच मुले अशी गमावली आहेत. आपण आपली बुद्धिवान मुले अशा देशांना हरवून बसलो आहे.

म्हणून मी विचार केला की जगातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांना भारतात बोलवावे, आणि मुलांना ज्याकरिता आपण त्यांना परदेशात पाठवतो त्या दर्जाचे शिक्षण इथे भारतात उपलब्ध करून द्यावे. जर इथे तसे विश्व विद्यालय असेल तर आपल्याला आपल्या मुलांना परदेशी पाठवण्याची गरज नाही. आपण आपला बराच खर्च वाचवू शकू आणि आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्याचे आपल्याला समाधान देखील वाटेल. हे डोळ्यासमोर ठेवून, आम्ही जागतिक दर्जाचे विश्व विद्यालय इथे ओडिशाला सुरु केले.

येत्या वर्षांमध्ये तुम्ही सगळ्यांनी तुमच्या मुलांना या विश्व विद्यालयात पाठवावे असे मला सांगावेसे वाटते. तुमच्या मुलांना इथे जे शिक्षण मिळेल ते परदेशी शिक्षणाच्या तोलामोलाचे असेल. या विश्व विद्यालयात ते शैक्षणिक उत्कृष्टता गाठतील.

पुन्हा एकदा मी सर्व विद्यार्थ्यांना, विश्व विद्यालयात आलेल्या तरुण मनांना, आशीर्वाद देतो. अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आणि मी लवकरच तुमच्या भेटीला येईन!

प्रश्न : प्रिय गुरुदेव, जेव्हा आपण या मार्गावर असतो तेव्हा इतर गुरुंचे ज्ञान आपण कोणत्या हद्दीपर्यंत ऐकू शकतो?

श्री श्री : सगळ्यांचा मान ठेवा हेच माझे म्हणणे असेल. केवळ एकच ज्ञान आहे आणि ते तुम्हाला उपलब्ध आहे. जर तुम्ही ते इथे तिथे खरेदी करत राहाल तर तुमच्यातील गोंधळ अधिक वाढेल. आम्ही म्हणतो,'सोहम करा.'

दुसरे कोणी म्हणेल,'नाही!सोहम बरोबर नाही,हमसा करा."

तिसरा म्हणेल,'हमसा बरोबर नाही,तुम्ही सदा सोहम करा.'आणि तुम्ही अधिक मोठ्या गोंधळात पडाल.

म्हणून, सगळ्यांचा आदर ठेवा आणि एका ज्ञानाला चिटकून राहा. जर त्या एका ज्ञानाने तुम्हाला समाधान दिले, तुमची जीवनात काही प्रगती झाली, तर तुम्ही त्यात खोलवर शिरा. ठिकठिकाणी खड्डे खोडून काही उपयोग नाही. एकच ठिकाणी खोलात जा.

प्रश्न : गुरुदेव, तुम्ही अहंच्या पलीकडे आहात आणि म्हणून तुम्हाला काही कर्म उरत नाही. परंतु तरीसुद्धा तुम्ही मानवतेच्या भल्याकरिता बरीच कर्मे करीत आहात.पण मग कर्माच्या नियमानुसार तुम्हाला फळे भोगावी लागणार. मग तुम्ही हे कसे करता?

श्री श्री : एकदम सोप्पे! हे मोरपिसाहून हलके आहे.

प्रश्न : गुरुदेव बऱ्याच वर्षांपासून माझ्या मनात एक इच्छा आहे. आतापर्यंत ती पूर्ण झालेली नाही. याचे काय कारण असेल?

श्री श्री : समय! त्याला त्याचा समय घेऊ द्या. तुम्ही सतत असे म्हणा, 'जर ही इच्छा माझ्यासाठी चांगली असेल तर ती पूर्ण होईल. नाहीतर मग नाही होणार.'

प्रश्न : सर्वात प्रिय गुरुदेव, अध्यात्म हे बंधनकारक आहे का? अध्यात्माचा मार्ग इतका निसरडा का आहे?

श्री श्री : हो का? तसा तो भासतो पण तो तसा नाही. अध्यात्माचा अर्थ आहे वातानुकूलित-पूर्णतः आराम

प्रश्न : प्रिय गुरुदेव, विश्वामध्ये घडणारी प्रत्येक घटनेची माहिती देवाला असते असे मी समजतो. तर मग देव गुन्हेगारी का वाढवतो आणि नंतर मग चांगल्या गुणांनी त्याला शह का देतो. कृपया समजवा.

श्री श्री : अशाप्रकाचे बरेच प्रश्न आहेत. देवाने दोन डोळे समोर का ठेवले? त्याने एक डोळा समोर आणि एक मागे ठेवायला पाहिजे होता. म्हणजे मग तुम्हाला मागे वळून पाहण्याची गरज नव्हती. तुम्ही बाजूने जाऊ शकता,नाही का?मला वाटते की देवाकडे कल्पनांची कमतरता आहे.

जर तुम्ही सिनेमाच्या दिग्दर्शकाला विचारले,'नायिका मिळवण्यासाठी नायकाला इतक्या अडचणींचा सामना का करावा लागला,आणि खलनायक का आहे? तुम्ही एवढे नाट्य कशाला निर्माण करता?सगळे काही सरळ सोपे असले पाहिजे.' तर तो काय म्हणेल? शोधून काढा! नंतर मी तुम्हाला सांगेन. कारण देवाचेदेखील हेच उत्तर असेल!

प्रश्न : सर्वात प्रिय गुरुदेव, गुरु मंडल म्हणजे काय ते कृपया समजवा!

श्री श्री : जेव्हा तुम्ही गुरूच्या निकट जाण्याचा प्रयत्न करता तेव्हा बऱ्याचशा गोष्टी मध्ये येतात.-यालाच गुरु मंडल म्हणतात.

सुरुवातीला तुम्हाला अनेक विकर्षण मिळतील. आणि जेव्हा तुम्ही ती पार कराल तेव्हा अनेक आकर्षक गोष्टी येतील. अनेक सिद्धी मिळतील. नवीन लालसा आणि घृणा निर्माण होतील. आणि तुम्ही हे सर्व पार कराल आणि मग मंडलाच्या मध्यभागी पोचाल.

मंडल म्हणजे वर्तुळ.

तर,तुम्ही गुरूला भेटण्यास आणि साधना करण्यास इथे आलेले आहात आणि अचानक तुम्हाला एक सुंदर मुलगी किंवा मुलगा भेटतो आणि मग तुम्ही त्यांच्या पाठी पळू लागता. किंवा तुम्ही ज्ञानाकरिता आला आहात आणि अचानक तुमचे मन म्हणते, 'अरे, मला तर पैसा कमवायचा आहे.मी हे कसे काय करू शकतो?' तर अशा प्रकारची विकर्षणे तुमची एकाग्रता दर्शवतात; तुमची केंद्रबिंदूकडे जाण्याची शक्ती प्रदर्शित करतात. हे नकारात्मकतेचे, शंकांचे, आकर्षणांचे, लालसेचे आणि या सर्व विकर्षणांचे वर्तुळ तुम्ही कसे काय पार करून केंद्राकडे जाऊ शकणार!

आणि 'मी तर गुरूपेक्षा चांगला आहे, अरे गुरुदेव हे काय बोलत आहेत, मलादेखील हे माहित आहे. मी यापेक्षा बरे करू शकतो.' असे म्हणणारा अहं हा आहेच.

या प्रकारची योग माया येते. हे सगळे आहे आणि या सगळ्याला गुरु मंडल म्हणतात.

प्रश्न : दी आर्ट ऑफ लिविंगचा अण्णांच्या चळवळीला पाठींबा आहे का?

श्री श्री : दी आर्ट ऑफ लिविंग ही IAC (India Against Corruption) चळवळीची संस्थापक आहे.सुरुवातीपासूनच आम्ही भ्रष्टाचाराच्या विरुद्ध उभे ठाकले आहोत आणि आमचे प्रयत्न चालूच आहेत.

मी अण्णाजी आणि त्यांच्या संघाला उपोषण सोडण्याचे आव्हान करतो. तुमच्या प्रयत्नांची देशाला खूप जास्त गरज आहे. जवळ जवळ ३५० तरुण तिथे गेल्या सहा दिवसांपासून बसून आहेत आणि आता सातवा दिवस येणार आहे. कृपा करून अजून उपोषण करू नका आणि स्वतःच्या शरीराला इतक्या यातना देऊ नका. मी तुम्हाला आव्हान करतो की तुमचे उपोषण सोडा परंतु तुमचा लढा सुरूच ठेवा.

अजून बरेच काम करायचे आहे आणि या देशात आपल्याला अजून खूप बदल घडवून आणायचे आहेत. भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करावायचे आहे आणि या प्रयत्नामध्ये आपण सगळे एकजूट आहोत.

या देशातील भ्रष्टाचार निर्मुलन करण्याचा आपला एकच उद्देश्य आहे, परंतु आपली साधने वेगळी आहेत. आपली कार्यपध्दती वेगळी आहे.

आमचा दृष्टीकोन हा कोणाचा अपमान करणे अगर कोणाला दुषणे देण्याचा नाही. आम्ही कोणाच्या घरी जाऊन हिंसा आचरत नाही. कोणत्याही प्रकारची हिंसा वा बळजबरीवर आमचा विश्वास नाही.

आमच्या सतसंगामध्ये एक प्रकारची उर्जा असते जी खूप उच्च आणि अतिशय सकारात्मक असते. ती मत्सर आणि क्रोधाची नसते तर ती असते उत्साह,उमेद आणि आशेची,काहीतरी करण्याची,बदल घडवून आणण्याची. आणि आम्ही आमच्या लक्ष्याकडे या तडफेने चालत जातो.

जागरुकतेने आणि उत्साहाने पुढे जाणे ही दी आर्ट ऑफ लिविंगची पद्धत आहे. या मार्गाला आम्ही आपलासा केला आहे. म्हणून आपण निषेध केला पाहिजे परंतु संपूर्ण जागरुकतेने,संपूर्ण ज्ञानाने आणि संगीता सहित.

अण्णाजी आता या क्षणी उपोषणाला बसले आहेत आणि त्या ठिकाणी आपले आर्ट ऑफ लिविंगचे गायक तिथे बसून गायन करून तिथल्या जनतेला प्रोत्साहन देत आहेत. परंतु दुर्दैवाने काल तिथे काही लोक दंगेखोर होते; जे आर्ट ऑफ लिविंगचे नव्हते. असे होता कामा नये आणि अशा दंगलखोरीला मी मान्यता देत नाही. आपल्याला क्रांती घडवून आणायची आहे पण संपूर्ण जागरुकतेने.म्हणून आपण सगळ्यांनी विचारपूर्वक कृती करायला पाहिजे.

प्रश्न : गुरुदेव, मी इतक्यातच TTC (शिक्षक प्रशिक्षण कोर्स) संपूर्ण केला आहे. मी पूर्णवेळ शिकवावे किंवा नाही याचा निर्णय घेण्याचा मापदंड काय आहे?

श्री श्री : तुमच्या पारिवारिक जबाबदारीकडे बघा. जर काहीच जबाबदारी नसेल तर तुम्ही पूर्णवेळ शिक्षक बनू शकता. जर घरची जबाबदारी जास्त असेल तर मला तुम्ही तुमची जबाबदारी पेलून कडेकडेने शिकवलेले आवडेल.

तीन प्रकारचे भ्रम

30
2012
Jul
बंगलोर
प्रश्न: प्रिय गुरुदेव, नेहमी ध्यान करताना आनंदाची विशेष अनुभूती मिळत असते. अशी अनुभूती ध्यान करून किंवा ध्यान न करिता सतत कशी मिळविता येईल?

श्री श्री : ज्ञान आणि वैराग्याने. जेंव्हा तुम्ही सर्व जगाकडे एक स्वप्न म्हणून बघता, तुमची ध्यान-मग्न अवस्था जागृत राहते. पण त्या अवस्थेचा तुम्ही मनोदशा म्हणून उपयोग करता कामा नये. नैसर्गिकपणे इतरांसारखे, साधे, सरळ आयुष्य जगा.

ध्यानातून मिळणारी शांती धरून ठेवायचा प्रत्यत्न करू नका, कारण त्यातून अनेक प्रश्न तयार होऊ शकतात. ते सोडून देऊन रिकामे व्हा. त्यात काही वेळा अडथळे निर्माण होऊ शकतात, पण म्हणून काय झाले. त्यातून नाउमेद होऊ नका. कारण जग असेच असते. कन्नडभाषेमध्ये काही दोहे असे आहेत कि
“जो समुद्र किनाऱ्यावर घर बांधतो आणि लाटांना घाबरतो, त्याला तुम्ही काय सांगणार,” “जो जंगलात घर बांधतो आणि जंगली प्राण्यांना घाबरतो, त्याला तुम्ही काय सांगणार,” “जो शहराच्या मध्यभागी घर बांधतो आणि आवाजाला घाबरतो, त्याला तुम्ही काय सांगणार.”

त्याचप्रमाणे, जेंव्हा आपण या ग्रहावर, या जगात राहतोय, तेंव्हा काही सुखद घटना घडतात तर काही दुखद घटना घडतात. लोक तुमची स्तुती करतात आणि काही कारण नसतांना तुम्हांला दोषपण देतात. तुम्ही त्या दोन्हीचा स्वीकार करून पुढे जायला पाहिजे. 

काय छान सल्ला दिला कि नाही?

आज काही लोक माझ्याकडे आले आणि मला म्हणाले कि एक अमुक अमुक व्यक्ती खूप असभ्य आहे, ती चांगली नाही, आणि त्यांच्यामध्ये काही दोष आहेत. ती व्यक्ती नेहमीच चिडलेली असतात. तुम्ही असे लोक आश्रमात का ठेवता? मी त्यांना सांगितले नाही, मी त्यांना आधारासाठी एक मोठी दोरी दिली आहे.समजा मी त्यांना बाहेरच्या जगात सोडले, तरीही ते तसेच वागतील. ते आता तुम्हांला त्रास देत आहेत, आणि तुम्ही जरी त्यांना आश्रमाच्या बाहेर जायला सांगितले तरी ते तुम्हांला त्रास देत राहतील. येथे त्यांना सुधारण्याची संधी तरी आहे.

होय कि नाही?

म्हणून मोठ्या धैर्याने मी त्यांना येथे राहायची, आणि स्वतःमध्ये सुधारणा करायची संधी दिली आहे.

प्रश्न: प्रिय गुरुदेव, बायबल असे सांगते कि एक वेळ सुईच्या भोकातून उंट जाणे शक्य आहे पण श्रीमंत माणसाला देवाच्या दरबारात जाणे शक्य नाही. याचा अर्थ असा काय कि त्यांना फक्त श्रीमंत आहे म्हणून नरकवासच मिळतो? 

श्री श्री : नाही, ते तसे नाहीये!

अशी वचने संत आणि प्रेषित लोकांनी वेगवेगळ्या वेळी लोकांना वेगवेगळ्या कारणांसाठी सांगितली आहेत. येशूने असे म्हटले आहें कि मी काही येथे शांतता निर्माण करण्यासाठी आलेलो नाहीये तर मी मुलीला आईविरुद्ध आणि मुलाला पित्याविरुद्ध उभे करावयास आलो आहे. त्याचा अर्थ असा नव्हे कि त्याला कुटुंब आवडत नाही किंवा तो कुटुंबात दुफळी निर्माण करण्यासाठी आला आहे.

लोकांना एकमेकांविषयी अनुकंपा निर्माण व्हावी म्हणून असे म्हटले आहे. जेंव्हा सर्वत्र गरिबी असतांना, जेंव्हा एखादा जण इतरांची पर्वा न करिता फक्त एकटा आपली श्रीमंती भोगत असेल तर तो पाषण-हृदयी एखाद्या दगडा सारखा आहे. ते जर फक्त दगडासारखे असून त्यांच्यात मृदुता जर नसेल त्यांना स्वर्गापर्यंत पोहोचणे मुश्कील आहे.

आता माझ्या मनात असा विचार आला कि आपण सर्वजण मिळून सुमारे पन्नास लक्ष रुपयांची औषधे आसामला पाठवायला पाहिजेत. आपण सर्वजण मिळून पन्नास लक्ष रुपयांची आयुर्वेदिक औषधे विकत घ्यायला पाहिजेत. म्हणून प्रत्येकाने थोडी थोडी मदत करून, ती सर्व आपण तिथल्या लोकांना देऊ शकतो.

मी लवकरच आसामला भेट देणार आहे तेंव्हा बघुयात.

सर्वप्रथम त्यांना काही औषधांची गरज भासणार आहे. आपण काहीतरी करूयात.

आपण येथे इतके जण आहोत कि प्रत्येकाने पाचशे रुपये दिले तर मोठी रक्कम उभी राहील. आपण त्यांना औषधे पाठवू शकतो. आणि काही आयुर्वेदिक वैद्य आसामला जाण्याची गरज आहे, आपण त्यांना आसामला पाठ्वूयात.

प्रश्न: प्रिय गुरुदेव, शहाणी माणसे अशे सांगतात कि जर कोणी तुम्हांला एका गालावर मारले तर दुसरा गाल पुढे करा. या भानगडीत मी दोन वेळा मार खाल्ला आहें. याला काय म्हणावे, माझा अडाणीपणा तर नव्हे?

श्री श्री : तुम्ही एकच व्यक्तीकडून दोन वेळा थप्पड खाल्ली कि दोन वेगवेगळ्या व्यक्तींकडून? यावर ते अवलंबून आहे.

असे पहा कि, तुम्ही वेगवेगळ्या लोकांपुढे तुमचा गाल पुढे केलात आणि त्यांनी तुम्हांला एकदाच थप्पड मारली तर त्यात तुमचा काहीच शहाणपणा नाही, आले लक्षात?

तुम्हांला पहिली थप्पड मारणारा माणूस जर का सुज्ञ आणि संवेदनाशील असेल तरच तुम्ही दुसरा गाल पुढे करणे योग्य ठरते. पण तो जर तसा नसेल तर तिसर्यांदा गाल पुढे करू नका कारण तुम्हांला फक्त दोनच गाल आहेत. समजले का?

प्रश्न: गुरुदेव, तपस्या म्हणजे काय? तपस्वी कसे व्हावे?

श्री श्री : जगण्यासाठी कमीत कमी गरजा असणे, आपल्या गरजा कमी करणे.

मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला तेसुद्धा पाहिजे, असे नाही. जे काही आहें त्यात समाधानी असणे.

तुमच्याकडे गाडी आहे तर ते चांगले आहे. तुम्ही असे म्हणायची गरज नाही कि ती गाडी पन्नास लाखाची आहे, का पंधरा लाखाची आहे कि वीस लाखाची आहें, ...नाही. एक साधी गाडी पुरेशी आहे. घालायला चांगले कपडे आहेत,खायला चांगले अन्न आहें हे पुरेसे आहे. 

तपस्या म्हणजे तुम्ही स्वतःला त्रास किंवा यातना द्यायला पाहिजेत असे नाही. फक्त अर्धेच जेवण जेवले पाहिजे असे काही नाही. तपस्या म्हणजे साधेपणा, कमीत कमी गरजा ठेवणे होय. जे कमीत कमी आवश्यक आहे , त्यावर आनंदी असणे .

प्रश्न: गुरुदेव, भगवतगीतेमध्ये श्रीकृष्ण भगवान असे म्हणतात कि “ योग क्षेम्यम वहम्यहं “. मला जे मिळत आहें हे त्या परमेश्वराकडून, पण मला हे समजत नाहीये कि तो परमेश्वर ते माझ्याकडून काढून का घेत आहे.

श्री श्री : चांगले आहे तर मग तुम्ही आश्चर्य करीत रहा. हे सर्व जग तुम्हांला दिले जात आहे आणि एक दिवस ते तुमच्याकडून काढून घेतले जाईल. हा या अस्तित्वाचाच एक भाग आहे. एक लक्षात घ्या कि वरती कोणीतरी ईश्वर बसून हे सर्व करीत आहें असे नाहीये. हे सर्व जग, हे विश्व हि एक प्रक्रिया आहें. सदासर्व काळ हि क्रिया चालू राहते.

प्रश्न: प्रिय गुरुदेव, कधी कधी स्वतःबद्धल, स्वताच्या क्षमता, कार्यक्षमता त्याचप्रमाणे गुरूवरील श्रद्धा याविषयी शंका उत्पन्न होतात. हे कसे टाळावे?

श्री श्री : प्राणशक्ती वाढवा म्हणजे झाले. जेंव्हा प्राण-शक्ती कमी होते तेंव्हा स्वतःविषयी शंका यायला लागतात. जेंव्हा स्वतःविषयी शंका यायला सुरवात होते तेंव्हा साहजिकच त्या शंका शिक्षकांविषयी, गुरुविषयी, आणि मग सर्वांविषयी मग ते कुटुंबीय किंवा मित्र असोत, त्यांच्याविषयीपण शंका यायला लागतात. आणि मग सर्व जगच या शंकांचा विषय होऊ पाहते. म्हणूनच जास्त प्राण-शक्ती म्हणजे जास्त स्पंदने, आतून जास्त उर्जा शक्ती आणि मग त्याप्रमाणात जास्त श्रद्धा !

प्रश्न: प्रिय गुरुदेव, माया म्हणजे काय याविषयी काही सांगा. मायेचे वेगवेगळे प्रकार पण सांगा.

श्री श्री : मायेचे तीन प्रकार आहेत.

पहिली म्हणजे मोह माया. जेंव्हा कोणी आपली मुले किंवा पैसा यात जास्त गुंतत चालला तर मग त्याला बाकीचे काही दिसत नाही, यालाच मोह माया म्हणतात.

अनेक लोक असे आहेत कि जे फक्त पैशाच्या मागे लागलेले असतात. मग ते इतर नातेसंबध जसे कि बायको, मुले, आई, वडील, मित्र वगैरे सर्व विसरुन जातात. त्यांना फक्त पैसा महत्वाचा वाटत असतो. आणि ते पैशासाठी कोणावरही खटला भरायला तयार असतात. ते आईवर, वडिलांवर खटला भरतील आणि सांगतील कि ते मानसिकरित्या सक्षम नाहीयेत, आणि पैशासाठी सर्वांशी भांडतील.कदाचित ते त्यासाठी कोणाला मारायला पण मागे-पुढे बघणार नाहीत...हि झाली मोह माया.

तर मोह माया म्हणजे काय, ज्यामुळे तुम्हांला फारसा आनंद मिळत नाही पण तिचा अभाव तुम्हांला दुख देऊ शकतो.

नंतरची ती महामाया. हि निसर्गातून उदयाला पावते किंवा जन्म घेते. ती असा काही पडदा तयार करते कि तुम्ही मग नीटसे पाहू शकत नाही. मग आपण त्यात अडकून जाऊन आळस वाटायला लागतो. आणि मग आपल्या सर्व भावना या दगडासारख्या होऊन जातात. 

त्यानंतरची ती योगमाया. योगामध्ये पण माया आहे. हि फारच आकर्षक आहे.

तुम्हाला सध्याची “निर्मल बाबा” यांची गोष्ट माहित असेलच (भारतातील एक आध्यात्मिक माणूस जो अलीकडे अध्यात्मात काही बेकायदेशीर घटनाबाबत चर्चेत होता)

ते एकीकडे लोकांना आशीर्वाद देत होते, पण लोक मात्र त्यांना लफंगा आणि भामटा म्हणत होते. पण ते मात्र तसे नाहीयेत. ते एक चांगले आणि निष्पाप गृहस्थ आहेत पण ते योगमायेत अडकले आहेत.

काहीवेळा असे होते कि, योग आणि साधना यांच्या नियमित सरावाने तुमच्यात काही दैवी शक्ती जागृत होतात. असे झाल्याने तुम्ही भविष्यात होणाऱ्या काही घटनाबद्धल ठामपणे सांगू शकता. मग तुम्हाला भविष्यात घडणाऱ्या घटनांची चाहूल लागते. आणि अशा वेळी तुमच्यात काही गोष्टींविषयी जर आस किंवा ओढ असेल, आणि तुम्ही जर पूर्णपणे रिकामे , पोकळ नसाल तर ते त्या दैवी शक्तींच्या कामात अडथळा होऊ शकतात. अशावेळी मग भविष्य कथन पूर्णपणे सत्यात उतरत नाही. ते सुमारे पन्नास ते साठ टक्केच प्रत्यक्षात उतरते आणि मग बाकीचे खोटे ठरते.

त्याचप्रमाणे मला अशीच एक स्त्री माहित आहें कि जी योगमायेत अडकली होती. त्यांनी सुमारे २५ ते ३० वर्षे खूप साधना केल्यामुळे त्यांना सिद्धी प्राप्त झाली होती. मग त्यांना त्या साधनेमुळे देवीचा सहवास मिळू लागला होता आणि मग त्यांना असे वाटत देवी त्यांना काही गोष्टी करायला सांगत आहें. त्या स्त्रीचे यजमान त्यांच्या बरोबर राहत होते आणि त्यांना असे वाटले कि देवी त्यांना त्यांच्या यजमानांना मधुमेहाची औषधे देवू नका असे सांगतेय असे वाटले. “ त्यांना निश्चितच बरे वाटेल, तुम्ही त्यांना फक्त आशीर्वाद देत रहा.” असे त्यांनी ऐकले. म्हणून त्या फक्त त्यांच्या यजमानांना आशीर्वाद देत होत्या.

त्या त्यांच्या यजमानांना असे सांगत होत्या कि” देवी स्वतः मला असे म्हटली आहे कि तुम्हाला मधुमेहाची औषधे देऊ नको.”

पण ती औषधे न घेतल्यामुळे त्यांना मग अंधत्व आले, त्यांनी आपले दोन्ही डोळे गमावले.

त्या जेंव्हा दुसऱ्या लोकांशी बोलायच्या तेंव्हा त्यांना खूप चांगले वाटत असे. त्या जे काही सांगायच्या ते खरे व्हायचे.पण या घटनेनंतर त्या खूप त्रासून जाऊन त्या माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या “ गुरुदेव, हे माझ्या बाबतीत असे का झाले?” माझे पती दृष्टीहीन का झाले?”

मी त्यांना म्हणालो “ तुम्ही योगमायेत अडकला आहात.”

आणि नेमके हेच निर्मल बाबांच्या बाबतीत झाले आहे.

असे पहा कि, काही गोष्टी तुम्ही समजू शकता तर काही नाही. खात्रीने तुम्ही लोकांना आशीर्वाद देऊ शकता. जेंव्हा तुमच्यात किंदालिनी जागृत होते, तेंव्हा तुम्ही लोकांना आशीर्वाद देऊ शकता. मग ते आशीर्वाद लोकांसाठी चांगले आणि फायदेशीर होतात. पण मग हे आशीर्वाद अंतर्गत इच्छांमुळे, जशी कि चांगल्या अन्नाविषयी, त्या अंतर्गत इच्छामुळे त्यामध्ये बाधा निर्माण झाली. आणि मग लोकांना दिलेले संदेश किंवा आशीर्वाद हे पण त्याच स्वरूपाचे होते. हे काही दिवस चालू राहिले आणि मग ते काम करेनासे झाले.  योगमायेत अडकले आणि मग त्यांना ते तसे सांगणारे कोणी नव्हते. त्यांना स्वतःला पण ते समजले नाही.

हे सर्व लक्षात आल्यानंतर, कोणी सिद्धींच्या मोह जालात न अडकता, स्वतःमध्ये आणि ध्यानात मग्न होऊन राहणे हेच योग्य आहे. असे झाले तर मग आशीर्वाद आपोआप फलद्रूप व्हायला लागतात.

आपल्याकडे आता येथे अनेक आशीर्वाद देणारे आहेत, येथे आशीर्वाद देणारे किती लोक आहेत? हात वर करा! तुमचे आशीर्वाद फलद्रूप होतात ना? ( सभेतील आशीर्वाद देणारे होय! म्हणतात)

बघा, तुम्ही सुद्धा आशीर्वाद देऊ शकता.

जेंव्हा तुम्ही भक्तीमध्ये मश्गुल होऊन तुमची योग साधना जर नियमित पणे चालू असेल तर तुम्हाला पण लोकांना आशीर्वाद देण्याची शक्ती प्राप्त होते आणि लोक त्यांच्या आजारपणातून बरे होऊ शकतात, त्यांच्या इच्छा आणि प्रार्थना फलद्रूप होतात. अशी सिद्धी योग आणि आध्यात्मिक अभ्यासातून प्राप्त होऊ शकते.

पण आपण जर त्या सिद्धीला काही अंधश्रद्धांची जोड दिली, म्हणजेच असे म्हटले कि तुम्ही जर दहा लोकांना भुकेल्या लोकांना जेवायला घातले, किंवा कुत्र्याला पोळी घातलीत तरच आशीर्वाद काम करतील तर ते नाहीये.

अनुग्रह हे नेहमी हेतू विरहित असतात (अहेतु कृपा), ते कधीच कोणताही गुणावर किंवा कारणावर अवलंबून नसतात. अनुग्रह मिळविण्यासाठी कधीच अटी नसतात. काही केल्यानंतर मिळणार असेल तर तो अनुग्रह नसून तो तर धंदा झाला. अनुग्रह किंवा कृपा हि नेहमीच असते. तुम्हाला फक्त अनुग्रहाची जाणीव असायला लागते आणि मग खात्री बाळगा कि अनुग्रहाचा वर्षाव हा होणारच.

आपण जेवढे अधिक कृपाळू व्हाल तेवढा अधिक कृपेचा अनुभव मिळवू शकाल. जे सारखे तक्रारी करीत असतात त्यांना कृपेचा अनुभव कधीही येत नाही. कृतज्ञ रहा, आभारी रहा. तुम्ही जेवढे अधिक समाधानी तेवढी अधिक कृपा अनुभवू शकता.

अनुग्रह किंवा कृपा हि कधीही खास अशी नसते. कृपा हि तर नेहमीच असते फक्त जाणीव आवश्यक असते.

अनुग्रह किंवा कृपा मिळविण्यासाठी काही किंमत मोजावी लागत नाही. पाकीट न उघडता, पैसे न देता कृपा मिळत असते.

पण जेंव्हा अशा स्वरूपाचे अयोग्य किंवा दिशा भूल करणारे विचार जेंव्हा मनात येतात तीच योग माया होय. त्याबद्धल कोणाला दोष देता येणार नाही.

कोणी आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे जर असे वागत असतील तर त्यांना तुम्ही दोषी धरू शकत नाही. त्यांच्या मनात काही किंतु नसतो कारण ते सर्वांना आशीर्वाद देत असतात. पण जेंव्हा काही मंडळी यातून पैसे मिळवायला लागली, त्याचा धंदा करू लागली तर त्यांची आशीर्वाद द्यायची शक्ती कमी पण होते.

तुमच्या हे लक्षात येतेय काय? ते योग्य धारणा विसरुन गेले आहेत.

म्हणून, जेंव्हा तुम्ही कोणाला आशीर्वाद देता तेंव्हा त्यात काही तडजोड करू नका. तुम्ही पैसे न घेता मुबलक आशीर्वाद द्यायला पाहिजेत. पण जर आशीर्वाद दिल्यानन्तर त्या लोकांनी काही पैसे देऊ केले तर त्याचा स्वीकार करून ते योग्य कामासाठी वापरा.

हे (आशीर्वादासाठी पैसे घेण्याची प्रथा) आता सर्व धर्मात सुरु झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. तुम्हाला आशीर्वादासाठी काही देणगी द्यायला सांगितले जाईल. हे काही योग्य नाही. अनुग्रह मिळविण्यासाठी कधीच अटी नसतात.

मग तुम्ही आता असे विचारलं कि आर्ट ऑफ लिविंगच्या अभ्यासक्रमासाठी पैसे का द्यावे लागतात. कोणाच्या मनात हा प्रश्न येऊ शकतो. त्याचे कारण असे कि शिक्षण किंवा ज्ञान हे दक्षिणा दिल्या शिवाय मिळत नाही.

असे पहा कि आशीर्वाद हे मोफत असतात. पण जर दक्षिणा न देता तुम्हाला काही शिकायचे असेल तर त्याला तामसिक यज्ञ म्हणजेच नकारात्मक किंवा आळसातून घडलेली कृती म्हणता येईल.

ज्ञानार्जन हा एक यज्ञ, पवित्र काम आहे.

आपण येथे काही शिकत आहोत. काहीतरी देऊन मगच आपण ज्ञान प्राप्त करू शकतो. आपण जर ज्ञानाच्या मोबदल्यात काही दिले तरच ते ज्ञान आपल्यापाशी टिकते.

हा मुद्दा प्राचीन आणि पवित्र ग्रंथातून आला आहे. ते काही का असेना, काही वेळ हा मुद्दा बाजूला ठेउयात. सध्याचा सर्वसाधारण अनुभव काय आहे? जेंव्हा तुम्ही फी भरून वर्गात बसता तेंव्हा इमानदारीने, लक्ष देऊन शिकू शकता. जर आम्ही फुकट शिकवू लागलो तर लोक एक-दोन दिवस येतील आणि तिसऱ्यादिवशी ते गायब होतील. ते पूर्ण लक्ष देवून शिकणार नाहीत.

म्हणून त्या अर्थाने आम्ही विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतो. पण जर कोणी तुम्हाला म्हणाले कि पैसे देले तरच आशीर्वाद देतो तर तुम्ही त्यांच्यापासून लांब राहिले पाहिजे. ते योगमायेत गुंतले आहेत. म्हणून प्रसार माध्यमे आणि लोक त्यांना (निर्मल बाबा) ढोंगी आणि फसवे म्हणत आहेत. ते स्वतः आश्चर्य चकित झाले असले पाहिजेत कारण हे काय होतेय हे त्यांना पण माहित नाही. आता पर्यंत काम करणारे आशीर्वाद एकदम गायब कसे झाले?

साधनेच्या मार्गावर असे होत असते.

म्हणून असे म्हटले आहे कि “श्रोत्रियं ब्राह्मनिश्थम” (गुरू हे “श्रोत्रीय” आणि “ब्राह्मनिश्थम” असायला पाहिजेत.श्रोत्रिय म्हणजे ज्यांना शास्त्रांची चांगली जाण आहें आणि जे त्यांचे चांगले विवरण करू शकतात आणि ब्राह्मनिश्थम म्हणजे ज्यांचे सत्य ज्ञानात चांगले अधिष्ठान आहे.)

श्रोत्रिय आणि ब्राम्हनिश्थम असल्याशिवाय या शक्ती आणि हे खेळ फार दिवस टिकत नाहीत, ते फार लवकर संपून जातात.

हे सर्व योगमायेचे खेळ आहेत.

इथे पण काहीसे असेच झाले होते. एक स्त्री येथे आली आणि म्हणाली कि मी प्रत्यक्ष देवीचा अवतार आहे.मी त्यांना फक्त आदरपूर्वक आसन ग्रहण करण्यास सांगितले.

होय, हे पाहून कधी कधी खूप राग येतो. या गोष्टींचा राग येणे अगदी साहजिक आहे. पण रागाच्या भरता काही बोलणे किंवा काही करणे यात तुमची शक्ती उगीचच वाया जाते. 

तुम्हाला माहित आहे का, कि अशा शक्ती जेंव्हा एखदयाला प्राप्त होतात तेंव्हा त्या त्यांना एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातात. आणि नेमक्या त्याच वेळी मनाचे खेळ सुरु होतात.

म्हणून ते काही वाईट किंवा अप्रामाणिक होत नाहीत.

होय त्यात काही अप्रामाणिक लोक पण आहेत पण तरी सुद्धा त्यात योगमायेच्या गुंत्यात अडकलेल्यांची संख्या जास्त आहे.

म्हणूनच योगसाधनेमध्ये योगमायेला समजून घेऊन त्या पलीकडे जायची गरज असते. तरच त्यात पूर्णता मिळून सिद्धी प्राप्त होतात. आणि मग त्यातून आयुष्याला पूर्णता मिळते.

तुम्ही जर नीट बघितले तर असे लक्षात येईल कि जेंव्हा तुम्ही साधक होता तेंव्हा सुरवातीला लोकांना शाप द्यायची शक्ती तुम्हाला प्राप्त होते. म्हणून असे म्हणतात कि कोणाबद्धल वाईट चिंतू नये. जात कोणाविषयी वाईट विचार किंवा राग तुमच्या मनात आला तर त्याचा त्यांच्यावर लगेच परिणाम दिसून येतो. होय कि नाही?

किती लोकांना असा अनुभव आला आहे? तुम्ही जेंव्हा कोणावर रागावलात तेंव्हा त्यांचे नुकसान झाले आहे? असा अनुभव आले आहें कि नाही?( प्रेक्षकातील अनेक हात उंचावतात).

म्हणून कोणाचे वाईट चिंतू नका आणि सर्वांना आशीर्वाद द्या. आशीर्वाद देण्यात कंजूसपणा करू नका.

“जर मी कोणाला आशीर्वाद दिले तर माझी शक्ती कमी होईल” असा विचार करू नका. काही लोकांच्या मनात अशी चुकीची समजूत असते. ह्याला पण योगमाया म्हणतात.

योग मायेचे अनेक प्रकार आहेत. काही लोक केवळ स्पर्शाने दुखी आणि व्यथित होतात. त्यांना असे वाटते कि तो दुसरा त्यांची शक्ती काढून घेत आहे. तुम्ही एवढे का घाबरता? आपण सर्वजण चेतनेच्या समुद्रात बुडून गेलो आहोत. होय पण काही नियम पाळणे महत्वाचे असते.

म्हणून, योगमाया म्हणजे छोट्या सिद्धींच्या जाळ्यात अडकण्याची प्रवृत्ती होय. त्याच्या पलीकडे गेल्यावर साहजिकच त्या दैवी शक्तींचा लाभ होतो. आणि मग जेंव्हा तुम्ही आशीर्वाद देता तेंव्हा त्यांच्या इच्छा आणि आकांक्षा सहज पूर्ण होतात.

प्रश्न: अहंकार, उद्धटपणा आणि आत्म-सन्मान यात काय फरक आहें?

श्री श्री : अहंकार आणि उद्धटपणा यात काही फरक नाहीये. “मी” हा अहंकार. “फक्त मीच चांगला आहें, इतर कोणीही चांगले नाहीये” हा झाला उद्धटपणा. उद्धटपणाचे अनेक प्रकार आहेत.

आत्मसन्मान हि एक अशी गोष्ट आहें कि जी तुम्ही कधीही घालविता कामा नये. जेंव्हा तुम्ही स्वतःला समजून घेता तेंव्हा स्वतः बद्धल अभिमान वाटायला लागतो, तो आत्म सन्मान.

जर कोणी तुमचा अपमान करीत असेल तर तुम्ही तेथून निघून जायला पाहिजे. जर तुम्ही स्वतः बद्धल वाईट शब्द ऐकून घेतले तर त्याचा आत्य्म्याला त्रास होऊन तुम्ही शक्ती कमी होते. म्हणून जर कोणी तुम्हाला अपशब्द बोलत असेल तर ते ऐकून नका.

आज आपण हि एक नवी गोष्ट शिकलो!

प्रश्न: असे म्हणतात कि अहंकार असल्याशिवाय स्वताचे प्रयत्न होत नाहीत आणि असे पण म्हटले आहे कि अहंकार असू नये. यामुळे काहीसा संभ्रम निर्माण होत आहे.

श्री श्री : होय, या दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. तुम्ही “निस्सीम साधकासाठी अंतरंगातील गोष्टी” याचे वाचन करा, त्यात मी हे सर्व विस्ताराने सांगितले आहे.