ईश्वर तुम्हाला दु:ख देणे अशक्य आहे

17
2013
Dec
बंगलोर, भारत

प्रश्न: गुरुदेव, जर देवानेच दुखावले तर आम्ही कुठे जायचं ?

श्री श्री: कुठेही जायचं नाही. देवाने तुम्हाला दुखावणे अशक्य आहे. लहानपणी शाळेत असताना आम्हाला कानडी मधला एक श्लोक शिकवला जायचा. त्याचा अर्थ असा आहे की, ऊस जितका जास्त पिळावा तितका त्यातून जास्तच गोड रस बाहेर पडतो. हिर्यालातुम्ही जितके जास्त तासाल तितका तो जास्तच चमकतो, सोन्यावर जितके जास्त हातोड्याचे घाव घालावे, आगीत घालावे तितके ते जास्तच चमकते. चंदन तुम्ही जितके जास्त घासाल तितका त्याचा सुगंध अधिकच दरवळतो.

निसर्ग तुम्हाला अनेकपरीक्षांमधून दिव्यांमधून जायला लावतो आणि तुम्ही त्यातून झळाळत बाहेर पडता. एक गोष्ट लक्षात ठेवा निसर्ग तुमच्यावारासा भार कधीच टाकणार नाही जो तुम्ही पेलू शकणार नाही. देव आधी शेपटीचे माप घेतो आणि मग ती प्राण्याला लावतो.म्हणजे त्याला शेपटी सहज हलवता येईल. विचार करा जर उंदाराला हत्तीची शेपटी असती तर ती त्याला उचलताही आली नसती.निसर्ग खूप हुशार आहे. तो तुमच्या सामोराशीच समस्या उभी करती, जी तुम्ही हाताळू शकता.

प्रश्न: गुरुदेव, माझे एक खोल दडवून ठेवलेले गुपित आहे, ज्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही. जर मी त्याबद्दल बोललो तर मी सगळे काही आणि सगळ्यांना गमावून बसेन. मी एका भौतिक जगात रहातो, मी पूर्णपणे समर्पित होऊ शकत नाही आणि मला अपयशाचे भय वाटते. मी काय करावे ?

श्री श्री: तुम्हाला परीकाम काय होणार ते दिसते आहे, मग तुम्ही अशी गोष्ट कां करता ज्याच्यातून तुम्हाला काहीच मिळणार नाहिये.

‘कन्फेशन’ (पापाची कबुली) नावाची एक गोष्ट असते. आता, तुम्ही कोणत्याही एका टॉम, डिक किंवा हॅरी समोर जाऊन पापाची कबुली देऊ शकणार नाही. पण एखाद्या समजदार माणसा समोर पापाची कबुली देऊ शकता जो गोपनीयता पाळू शकेल. चर्च मध्येही ती पाळली जाते. चर्च मध्ये एक खोली असते तिथे जाऊन तुम्ही पापाची कबुली देऊ शकता. तिथे त्या पाद्र्यालाही दिसत नसते की त्यांच्याशी कोण बोलत आहे.तुम्ही कबुली दिली की तिथे असलेल्या एका छोट्या खिडकीतून ते तुम्हाला काही प्रसाद देतात ज्याने तुम्हाला छान वाटते.तुम्ही इथे आहात याचे हे ही एक कारण आहे, रिक्त आणि पोकळ होण्यासाठी. तुम्ही तुमच्या चिंता, काळज्या लिहून टोपलीत टाका आणि मोकळे व्हा.

भूतकाळात जी काही असुखकारक घटना घडली आहे, ती झाली, होऊन गेली. तुम्ही त्याला पकडून ठेऊन तुमचा वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ खराब कां करताय ? म्हणूनच लिहा आणि टाकून द्या !

तुम्हाला जर असे वाटत असे की बोलून टाकल्याने फायदा होईल किंवा न बोलल्याने निरागस लोकांना त्रास होईल तर मग त्यांच्या बद्दलच्या जिव्हाळ्याने बोलून टाका म्हणजे ते अडकणार नाहीत. पण बोलणे कुणासाठीच चांगले नसेल तर मग तो विषय काढून चर्चा करण्यात काही अर्थ नाही. एखाद्या शहाण्या माणसाला सांगा किंवा लिहा आणि देवाला अर्पण करून टाका आणि मुक्त व्हा.

प्रश्न: श्रीमंत लोक जास्त श्रीमंत होत आहेत आणि गरीब लोक जास्त गरीब, असे कां ? गरीब लोक चौरस आहार मिळण्यासाठी धडपडत असतात, देव त्यांची काळजी कशी घेतो ?

श्री श्री: गरीब लोकांबद्दलचे माझे निरीक्षण असे आहे की देवाने त्यांना शिक्षा केळी आहे म्हणून ते गरीब आहेत असे नाही तर त्याचे कारण आहे दारू , तिच्यामुळेच लोक गरीब राहिले आहेत. एखादा कामगार जवळ जवळ, शहरात ऑफिसमध्ये सर्वसाधारण काम करणाऱ्या माणसाइतकेच कमवत असतो. पण त्याच्या कमाईतले दोन त्रीतीयांश तो दारूवर घालवतो त्यामुळे तो गरीब राहतो.

गरिबीचे दुसरे कारण आहे आळशीपणा. आजही तुम्ही एखादा गरीब मुलगा किंवा मुलगी बघीतली तर असे दिसेल की त्यांनी नीट कष्ट घेतले तर ते वर येऊ शकतात, खरोखरच वर येऊ शकतात. पिरॅमिडच्या पायथ्यापासून वरपर्यंत पोहोचलेली अनेक उदाहरणे दिसतात. तुमच्यात करून दाखवण्याचा जोश, इच्छा आणि उत्साह असायला हवा. बरेचदा लोकांमध्ये याचाच अभाव असतो.

आम्ही जेव्हा पहिल्यांदा ही जागा बघायला इथे बंगलोरमध्ये आलो होतो, तेव्हा हा आश्रम म्हणजे एक ओसाड जागा होती. ही जागा कुणालाही नको होती. इथे काहीही उगवत नव्हते, ना गवत, ना झाडं. या ६० एकर जागेत फक्त एकच झाड होते. कल्पना करा ! इथे काहीही नव्हते. फक्त पाणी उपलब्ध नसलेली खडकाळ, पडीक जागा होती. त्याकाळी फिलीप, किरण, विनोद मेनन आणि आणखी बऱ्याच लोकांनी ही सगळी झाडे लावली. सगळ्या आश्रमात लोक गवताच्या झोपड्यांमध्ये रहात होते. मला आठवते आहे ते बरोबर असेल तर, सरपंचाच्या मालकीचे एकच घर कौलारू छप्पर असलेले असे शेजारच्या खेड्यात होते. बाकीची सगळी घरं गवताचे छप्पर असलेली होती जी पावसाळ्यात गळायची आणि मोठा वारा सुटला तर उडून जायची. अशी परिस्थिती होती. फक्त इथेच नाही तर आसपास सगळीकडेच.

इतकेच नाही तर या कनकपुरा रोडवर फक्त दोन बसेस यायच्या. एक सकाळी आणि एक संध्याकाळी. आणि खाली असलेल्या नदीतली वाळू वाहून नेणाऱ्या ट्रक्स असायच्या. (सुदर्शन क्रियेच्या टेप मध्येही तो आवाज ऐकू यायचा ! ) त्या काळी जयानगर मधून आश्रमात यायला दोन बसेस घ्याव्या लागायच्या.

आम्ही या जागी आलो तेव्हा हे पूर्णपणे एक खेडेगावच होते. आम्ही शेजारच्या २० खेड्यातून मुले गोळा केली आणि त्यांच्या साठी शाळा सुरु केली. आसपासचे लोक खूप गरीब होते.आर्ट ऑफ लिव्हिंग मध्ये आमच्याकडेही पैसें कमीच होते. आश्रमासाठी आम्ही बँकेकडून बरेचदा ओव्हर ड्राफ्ट (आगाऊ रक्कम) घ्यायचो. आणि दोन तीन महिन्यांनी परत करायचो. 

नव्वदच्या शतकात मी या भागातल्या सगळ्या गरीब आणि बेरोजगार तरुणांना बोलावलं. सगळे २० ते २५ वर्षे या वयोगटातले होते. मी त्यांना सांगितले की त्यांनी काही नोकरी करावी असे मला वाटते. ते सगळे त्यांच्या कुटुंबियांवर एक ओझे बनून राहिले होते. काहीही करायचे नाहीत.संपूर्ण दिवस बसून रहायचे, रेडिओ ऐकायचे, पत्ते किंवा क्रिकेट खेळायचे आणि संध्याकाळी जाऊन दारू प्यायचे. आम्ही लहान मुलांसाठी शाळा काढली पण तरुण मात्र बेकार होते. ते दहावी पास होते आणि त्यांना शेतावर जाऊन काम करायचे नव्हते, शेतीतले कसलेच काम करायचे नव्हते. त्यांना असे वाटत होते की जे अजिबात शिकलेले नाहीत किंवा चौथ पर्यंत शिकले आहेत त्यांनी शेती करायची. हे शेती कां करतील ? त्यांना शेतात काम करायचे नव्हते.

मी कर्नाटक सरकारच्या लघु उद्योग विभागाच्या अधीक्षकांना भेटलो आणि त्यांच्याकडे असलेले सगळे प्रकल्प या मुलांना दाखवायला सांगितले. त्यांनी काहीतरी करावे असे मला वाटत होते. ( आमचा देखील गवताचे छप्पर असलेला एक हॉल होता जिथे आम्ही अष्टावक्र गीतेवर प्रवचने दिली.त्याचं जागी मी या मुलांना आणि त्यां अधीक्षकांना बोलावले होते.)

ते अधीक्षक अगदी उत्साहाने आले. त्यांनी खूप कष्ट घेऊन त्यांनी तीन ते चार तासांत जवळ जवळ २२५ प्रकल्प समजावून सांगितले. आणि त्या मुलांकडे दर वेळी हे जमणार नाही, ते शक्य नाही असे सांगायला कारणे तयार होती ! अधीक्षकांनी प्रत्येक प्रकल्प समजावून सांगितला की ते म्हणायचे, “गुरुदेव, हे शक्य नाही ! ” शेवटी मी त्यांना विचारले की “कशाने कां होईल ?” ते म्हणाले, “आम्हाला पोलिसमध्ये नोकरी मिळवून द्या किंवा आम्हाला बस कंडक्टर करा.”

पोलिसात किंवा कंडक्टर म्हणून किती जणांना नोकरी मिळू शकते ? कुणालाही व्यावसायिक व्हायचे नाही. कुणालाही कष्ट करायचे नाहीत. या लोकांना गरीबच रहायचं आहे , मग तुम्ही काय करू शकता?

त्यां वेळी मग आम्ही युवा नेतृत्व शिबिर सुरु केले. आम्ही त्या सगळ्यांना तीन महिन्यांचे कठीण असे प्रशिक्षण दिले. त्यांचा आळस निघून जावा म्हणून सकळच्या वेळी त्यांना चांगला व्यायाम करायला लावला. जेव्हा त्यांनी क्रिया आणि ध्यान करायला सुरवात केळी तेव्हा आम्ही त्यांना तीन महिन्यांसाठी नोकरी दिली. पण त्यांना हे सांगितले की तुम्हाला काहीतरी करावे लागेल. आज त्यांच्यापैकी बरेच जण व्यावसायिक झाले आहेत.

आज तुम्हाला आश्रमात कुठे गवताचे छप्पर दिसते ? नाही ! लोकांनी घरे बांधली. फक्त इथेच नाही तर आसपासची खेडीही आता संपन्न झाली. आर्थिक सुबत्ता आली. आता तुम्हाला या भागातून कामगार मिळत नाहीत. ते दुसरीकडून येतात.

असाच एक मुलगा होता. तो आमचा रखवालदार होता. आज त्याच्या हाताखाली ४०० लोक कामा करतात. या मुलाची कहाणी खूप रंजक आहे. लहान असताना त्याच्या शाळेत तो खूपच त्रासदायक होता. तो सगळ्या मुलांशी भांडायचा त्यामुळे कोणतीही शाळा त्याला प्रवेश द्यायला तयार नव्हती. त्याचे वडील त्याच्यापुढे थकून,कंटाळून गेले होते. त्यामुळे ते त्याला इथे सोडून गेले. ते आम्हाला म्हणाले, यांच तुम्हाला जे करायचं ते करा. त्यांना तो घरी नको होता कारण तो सगळ्यांना मारायचा, सगळ्याची तोडफोड करायचा, सगळीकडे नुसता त्रास. मग तो नुसता शक्ती कुटीर च्या बाहेर बसून रहायचा आणि लोकांना माझ्या खोलीत येण्यापासून रोखायचा. त्या काळी आमच्याकडे दुसरा कुणी रखवालदार नव्हता, तोच एकटा होता. तो सगळ्यांना रोखायचा. अगदी माझ्या आईला सुद्धा ! बरेचदा तिला माझ्यासाठी जेवण घेऊन आत येण्यासाठी त्याच्याशी झगडा करावा लागायचा. केवळ इथे रहाण्याने त्याच्यात केवढा फरक पडला बघा ! मग तो परत गेला आणि त्याचं लग्न झालं. त्याने एक मोठा धंदा सुरु केला. तो फार शिकलेला नव्हता, पण आज त्याच्याकडे जवळजवळ ३०० ते ४०० माणसं काम करताहेत. आणखी बऱ्याच लोकांची हीच कहाणी आहे. आणखी बरीच उदाहरणं आहेत, एकच नाही. आळस मात्र जायला हवा.

मंत्रीपदाचा उमेदवार असलेल्या एकाची चहाची टपरी होती. तो अगदी गरीब परिस्थितीतून आला होता. आज तो एका राज्याचा मुख्यमंत्री आहे. आणखी एक उदाहरण म्हणजे रामनाथ गोएंका यांचे आहे. त्यांनी इंडियन एक्सप्रेस वर्तमानपत्र सुरु केले आणि त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधींवरही उघडपणे लिहीले. ते फक्त दुसरीपर्यंत शिकले आहेत. ते मुंबईच्या रस्त्यांवर हातगाडीवर भाजी विकायचे. ते गरिबीतून वर आलेले असले तरी आज त्यांनी साम्राज्य उभे केले आहे.

आध्यात्मिक जोश, आत्मविश्वास आणि गरिबीतून वर येण्याची प्रबळ इच्छाशक्ती हे आपल्याकडे असायला हवे. फक्त गरिबांना जेवण आणि इतर गोष्टी देऊन काही उपयोग होणार नाही.

इथियोपिया हे आणखी एक उदाहरण आहे. तिथे सात वर्षे दुष्काळ होता. इतकी वर्षे दुष्काळ असल्यामुळे तिथले लोक काम करेनासे झाले. आठव्या वर्षी पाउस पडला तरी लोक काही काम करेनात ! कारण त्यांना इतर देशांकडून मदत मिळण्याची सवयच झाली होती.

दुसऱ्या कुणीतरी मदत, अन्न आणि इतर गोष्टी द्याव्या असेच त्यांना वाटू लागले. आजदेखील इथियोपियामध्ये इतकी मोठी जमीन आहे पण चीनी आणि भारतीय लोक तिथल्या जमिनी विकत घेऊन त्या कसत आहेत. कारण तिथल्या लोकांमधला काही करण्याचा जोश राहिलेलाच नाही.

इथियोपिया मध्ये आणखी एक विचित्र गोष्ट आहे. कुठल्यातरी धार्मिक श्रद्धेमुळे वर्षातले सहा महिने इथियोपिया मधले लोक दूध किंवा कोणतेही दुग्धजन्य पदार्थ खात नाहीत. त्यामुळे मग आता कुणालाही दुग्ध व्यवसाय करायचा नाही कारण सहा महिने त्यांच्या मालाची विक्रीच होणार नाही.

कदाचित् पूर्वीचा कालीकुनितरी म्हटले असेल की थंडीच्या दिवसात थंड दूध पिऊ नये किंवा दुसरे काहीतरी ठोस कारण असेल.काही असो एक धार्मिक श्रद्धा म्हणून सहा महिने दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांचे सेवन न करण्यामुळे त्या संपूर्ण व्यवसायावरच दुष्परिणाम होऊ शकतो. दारिद्र्यातून बाहेर येण्यासाठी मनाची एक विशिष्ठ धारणा असावी लागते. आणि मी तुम्हाला सांगतो हे आतूनच वाटायला हवे कुणीतरी कीव करून काही केल्याने काही होणार नाही. लोक म्हणतात, “मी बिच्चारा, इतरांकडे पैसें आहेत. माझ्याकडे नाहीत !”

तुमच्याकडे कां नाहीत ? कारण तुम्ही त्याच्यासाठी कष्ट घेतलेले नाहीत.

अर्थात याला दुसरी बाजूही आहे जिथे लोकांची पिळवणूक होते. हेही योग्य नाही.

प्रश्न: गुरुदेव,मी शिजवलेल्या भाताला हात लावला की माझे सासूसासरे मला हात धुवायला लावतात. माझी पाली चालू असताना मला देवघरात, स्वयंपाकघरात जाऊ देत नाहीत, कपड्यांना हात लाऊ देत नाहीत. अशा परंपरा कां पाळतात ? यामागे काही शास्त्रीय कारण आहे कां ?

श्री श्री: कोणताही प्रथा सिद्ध करायला किंवा बाद ठरवायला वैज्ञानिक प्रयोग करावे लागतात. प्रयोग केल्या शिवाय ती परंपरा चूक किंवा बरोबर ते ठरवता येत नाही. उदाहरणार्थ पारंपारिक घरामध्ये शौचास जाण्यापूर्वी पुरुष त्यांचे जानवे कानावर अडकवत असत. कधी कधी हे विचित्र वाटायचे. कारण असे सांगितले जायचे की जानवे खूप लांब असते आणि कशाततरी अडकू नये म्हणून कानावार अडकवून ठेवायचे. पण न्यूयार्क मधील एका वैज्ञानिकाने एक अभ्यासपूर्ण लेख लिहिला ज्यात म्हटले होते की कानाचा मागचा भाग आणि कानाची पाळी ही मल विसर्जनाशी संबंधित आहे. त्यामुळे जेव्हा कान पिळले जातात तेव्हा रक्तदाब खाली येतो आणि मल विसर्जना सुलभ होते. तर, या प्रथेचा परिणाम अजूनही आहे. त्यामुळे ती अंधश्रद्धा आहे असे म्हणता येणार नाही. जरी एका स्तरावर ती अंधश्रद्धा होती तर दुसऱ्या स्तरावर त्या प्रथेला शास्त्रीय कारण होते.

त्याचप्रमाणे स्वयंपाकात हळद वापरणे किंवा किंवा भांडी धुणे ही एक अंधश्रद्धा आहे असे लोकांना वाटत होते. बर्याचशा पदार्थांमध्ये पदार्थ शिजवून झाल्यावर त्याच्यावर पान ठेवायचे. ऐंशीच्या दशकात हळदीवर बरिच टीका झाली की त्याने फक्त रंग येतो, त्यात काही फारसे पोषण मूल्य नाही, त्यात पावित्र्य वागैरे काही नाही, त्याने जेवणात काही पोषक अशी भर पडत नाही. नव्वदच्या दशकात मात्र शास्त्रज्ञांनी शोधून काढले की हळद ही सर्वात चांगली अँटींऑक्सिडेंट आहे.

आयुर्वेदिक वैद्यांनी सांगितले आहे की हळद ही ‘वयस्थापन’ म्हणून काम करते. म्हणजे शरीराचे वार्धक्य रोखते. पण त्यांच्यावर कुणीही विश्वास ठेवला नाही. एम.बी.बी.एस. डॉक्टर्स म्हणायचे की थोतांड आहे. नंतर शास्त्रज्ञांनी सिद्ध केले की हळद तब्येतीसाठी खूप चांगली आहे. ती कॅन्सरला रोखते. तर कोणतीही प्रथा चुकीची आहे असे सिध्द केल्याशिवाय तुम्ही ती बाद करू शकत नाही.

मी परत तेच सांगतो आहे की मनाची तयारी ठेवा. कधी ते बरोबर ठरवले जाईल आणि नंतर चूक. संपूर्ण देशात अशी एक लाट आली होती की शेंगदाणा तेल खूप वाईट आहे. दक्षिण भारतात फक्त शेंगदाणा तेल आणि तिळाचे तेल वापरत असत. पाम तेल विकणाऱ्या एका कंपनीने खोबरेल तेल वाईट आहे, बाकीची सगळी तेलं वाईट आहेत असा प्रचार केला. अचानक सगळे पाम तेल वापरू लागले.

नक़्विन संशोधनाने सिध्द केले आहे की शेंगदाणा तेल अतिशय चांगले आहे, ते सर्वात चांगले आहे. ते शेंगदाणा तेलाची स्तुतीसुमने उधळत असतात. खरे तर इथे शेकडो, हजारो वर्षे शेंगदाणा तेल वापरले जात आहे. तामिळनाडू मध्ये तिळाच्या तेलाला ‘नल्ला एनाई’ म्हणतात. म्हणजे ‘चांगले तेल’. आपल्या शरीरासाठी ते खूपच चांगले आहे.

तेल बाजारात मलेशियाहून पाम तेल भारतात आणायचे होते त्यामुळे काही वैज्ञानिकांनी हा निष्कर्ष काढला. एका कंपनीने हा निष्कर्ष काढला होता आणि त्यामुळे लोकांचे चुकीचे मत झाले. त्यामुळे संशोधन हे सच्चे असायला हवे. आणि पुढच्या संशोधनासाठी आपल्या मनाची तयारी असायला हवी. भविष्यात आणखी एखादे संशोधन झाले आणि त्यात सिध्द झाले की हे चूक आहे तरमग तेच पकडून ठेवता कामा नये. नवीन स्वीकारायची तयारी हवी.

प्राची अशा आयुर्वेद पद्धतीची खासियत ही आहे की ती ५,००० वर्षांपासून चालत आलेली आहे. त्यामुळे परंपरेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. बऱ्याचशा गोष्टी परंपरेच्या नावाखाली केल्या जातात.

उदाहरणार्थ, लोक म्हणतात की लहान बाळाच्या अंगावर गरम खीर चोळावी म्हणजे त्याची चांगली वाढ होईल. किंवा त्याचे पाय पकडून त्याला काही वेळ उलटे हलवावे म्हणजे कदाचित कुठलातरी देव प्रसन्न होईल किंवा असेच काही तरी. या सगळ्या मूर्खपणाच्या गोष्टी आहेत. अशा गोष्टी अगदी काही ठिकाणीच होतात. काही खेड्यांमधून धर्माच्या नावाखाली त्या पाळल्या जातात. पण हे मूर्खपणाचे आहे.

मी असे म्हणत नाही की सगळ्या परंपरा पाळाव्यात, त्याच वेळी त्यांना पूर्णपणे उडवूनही लावू नये. सुवर्णमध्य साधावा.

जर एखाद्याकडे कुणाचा मृत्यू झाला तर त्यांना सुतक असते किंवा घरात मुल जन्मले सोयर असते. म्हणजे त्यांना दहा दिवस शिवायचे नसते. हे सगळे जवळचे नातेवाईक पाळतात. ते काही साजरे करत नाहीत किंवा कुणाच्याही घरी जात नाहीत. त्यांच्या घरचे अन्न कुणी घेणार किंवा खाणार नाही. याच्या मागचे कारण काय आहे ? कुणी तरी जाते तेव्हा त्यांच्या घरातले इतके द:खात बुडून जातात की त्यांच्या दु:खाच्या लहरी त्यांच्या घरात, त्यांच्या वातावरणात असतात. त्यामुळे ते सर्व नेहमीच्या जबाबदाऱ्यांपासून त्यांना सूट असते, इतकेच. असे नाही की तुम्ही कुणाला स्पर्श केला तर तुम्हाला काही तरी होईल. फक्त दहा दिवसांमध्ये लहरी तशा दु:खात बुडालेल्या असतात इतकेच.

समजा कुणाला दु:ख झाले नसेल ! समजा कुटुंबात कुणी तरी खूप काळ आजारी असेल, ते गेल्यावर कुटुंबातील लोकांना बरे वाटते. ते म्हणतात, “ चला, बरे झाले त्याला, मुक्ती मिळाली, मला त्याच्यासाठीही बरे वातेय आणि माझ्यासाठीही.” मग तिथे नकारात्मक, निराशाजनक, दु:खी लहरी नसतात. कारण त्यांना गेलेल्या व्यक्तीसाठी बरे वाटत असते. प्रत्येकाला एक दिवस जायचेच असते.

त्याचप्रमाणे जेव्हा एखादे मूल जन्माला येते तेव्हा सगळेजण खूप उत्साहात असतात, आनंदी असतात. त्यावेळी सुद्धा लहरी शांतिमय नसतात. त्यामुळे असे म्हटले जाते की त्यावेळीही त्यांना नेहमीच्या सर्व जबाबदाऱ्यांपासून सूट दिली जाते. पण लोक ही गोष्ट इतकी ताणतात की ते तुमच्या बुद्धीला पटत नाही.

जेव्हा स्त्रियांची पाळी सुरु असते तेव्हा त्यांना विश्रांतीची गरज असते. त्यामुळे हे फक्त त्यांना नेहमीच्या कामात अडकू नये म्हणून हो प्रथा पाळली जाते. स्त्रियांनी विश्रांती घ्यावी, झोपावे,आराम करावा, वाचावे, काही विणकाम करावे. नाही तर त्या काम करायला लागल्या तर मग खूपच काम करतात.

भात आणि शिजवलेल्या अन्नाचे असे आहे की पूर्वीच्या काळी शिजवलेले अन्न पिष्टमय आणि चिकट असायचे. बरेचदा ते भांड्यातून उतू जायचे. तुम्ही भांड्याला हात लावला आणि तोच हात आणखी कुठे लावला तर सगळेच चिकट होईल. तुम्ही अन्नाला हात लावला तर ते तुमच्या हाताला लागेल, त्यामुळे तुम्ही हात धुतलेले बरे, हेच कारण आहे. आज काळ तुम्ही त्याला हात लावत नाही चमचा वापरता. त्याकाळी स्वच्छता आणि आरोग्य याची खूपच काळजी घेतली जायची. त्यामुळे तुम्ही चिकट खरकट्या गोष्टीला हात लावला की तुम्हाला हात धुवायला लागतात. त्याकाळी फळेही वेगळी ठेवत असत. तरीही या प्रथांवर संशोधन व्हायला हवे.

ज्यू लोकांमध्येही अशाच प्रथा आहेत. जर तुम्ही दुधाला हात लावला तर मांसाला हात लावायचा नाही. त्यांच्यात असे खूप नियम आहेत.

जपानी लोकांच्याही अशा प्रथा आहेत. जुन्या विचारांचे लोक पाहुण्यांसाठी वेगळे कप आणि भांडी ठेवतात. त्यांच्याकडे या पाहुण्यांच्या भांड्यांसाठी वेगळे कपाट असते ज्यात त्यांच्यासाठी असलेली भांडी ठेवली जातात. हे जपानमध्ये बघून मला खूपच आश्चर्य वाटले होते.भारतात देखील आपल्या कपबश्या वेगळ्या ठेवण्याची प्रथा बरेच लोक पाळत असत. जपानमध्ये पारंपारीक घरांमध्ये आणि मॉनेस्टऱीज मध्ये हे प्रामुख्याने दिसते.

याच्यापैकी बऱ्याच सवयींच्या मागे काहीही शास्त्रीय पार्श्वभूमी किंवा कारण नाही. अशावेळी त्या पाळणे आपण थांबवायला हवे. काही प्रथा असतील तर त्या चांगल्या आहेत कां हे बघितले पाहिजे किंवा त्या दिशेने काही प्रयोग तरी करून बघितले पाहिजेत. 

प्रश्न: गुरुदेव, नशेच्या आहारी गेलेल्या, स्वत:ला आणि इतरांना सतत त्रास देणाऱ्या माणसाला कसे काय स्वीकारायचे ?

त्याची ओढ , जिगर आणि समर्पण यात अंतर कसे ठेवायचे ?

श्री श्री: त्याला यातून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला जे जे करता येईल ते ते करायला पाहिजे.युक्ती,शक्ती आणि प्रीती कसेही करून त्याला यातून बाहेर काढायला हवे. सर्वात उत्तम म्हणजे त्याला सुधारगृहात ठेवणे. कलकत्यात एक सुधारगृह आहे. इतर ठिकाणी सुद्धा अनेक सुधारगृहे आहेत. त्याला अशा ठिकाणी घेऊन जा. त्याला सुदर्शन क्रिया करायला लावा. तो जर क्रिया आणि प्राणायाम शिकला तर खूपच फरक पडतो. बऱ्याच लोकांनी सुदर्शन क्रिया नियमित करायला लागल्यावर नशा आणि दारू सोडली आहे.

प्रश्न: गुरुदेव, आजकाल बरेच लोक कॅन्सरने आजारी आहेत. या आजाराला आला कसा घालायचा ? त्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून त्या रुग्णाने आणि त्याच्या कुटुंबियांनी काय करावे?

श्री श्री: जीवनशैली बदलण्याने फायदा होईल. तुम्ही झोपायला जाता तेव्हा तुमची सर्व इलेक्ट्रॉनिक साधने बंद करा. तुमचे आय फोन, आय पॅड, वाय फाय, हे सगळे झोपताना बंद करा. झोपताना इतके सगळ्या इलेक्ट्रॉनिक लहरी भोवताली असणे चांगले नाही.

बरेचदा तुम्ही अयोग्य गोष्टी खाता. जर तुम्ही नीट ध्यान केले नाही तर शरीराला त्याची किंमत मोजावी लागते. योग्य वेळी, योग्य आहार घ्या. त्रिफळा, च्यवनप्राश घ्या. हे सगळे अँटींऑक्सिडेंट आहेत आणि ते तुमच्या शरीरात जायला हवेत.

असुयेवर विजय कसा मिळवाल

27
2013
Nov
बंगलोर, भारत

प्रश्न: गुरुदेव असुयेवर कसा विजय मिळवावा?

श्री श्री: फक्त हे जाणून घ्या की तुम्ही एक दिवस मरणार आहात आणि दुसरा माणूस सुद्धा एक दिवस मरणार आहे. ज्या माणसाचा आपण द्वेष करता तो आणि तुम्ही दोघेही एक दिवस संपणार आहात. द्वेष करण्यासारखे त्यात काय आहे.

एक दिवस मुल्ला नसरुद्द्दिन आणि त्याचा मित्र भर उन्हाळ्यात दुपारी एका झाडाखाली विश्रांती घेत होते. विश्रांतीनंतर मुल्ला उठला आणि म्हणाला “ओह! मी मस्त स्वप्न पहिले. एक सुंदर मुलगी माझ्या प्रेमात पडली” त्याच्या डोळ्यात अजूनही चमक होती. तो इतका आनंदी दिसत होता, त्यावर त्याचा मित्र म्हणाला “मला तुझा इतका द्वेष वाटतो आहे, या सुंदर मुली माझ्या स्वप्नात का येत नाहीत? मला फक्त माझ्या बायकोची भीतीदायक स्वप्ने पडतात आणि घाम फुटतो”

मुल्ला म्हणाला “तुला काय वाटते मला माझ्या बायकोच्या आठवणीने घाम फुटत नाही? ते स्वप्न होते. तू सुद्धा तसे स्वप्न का बघत नाहीस? माझ्या स्वप्नाचा द्वेष का करतोस? तुला तुझी स्वप्ने पाहण्याचे स्वातंत्र्य आहे. ती खरी होवोत किंवा नाही.”

जेंव्हा तुम्ही दुसर्याचा द्वेष करता तेंव्हा आयुष्याकडे खूप संकुचित दृष्टिने पाहता. त्या पलीकडे पहा. त्यामुळेच इच्छाहीन होणे महत्वाचे आहे, त्यामुळे तुमच्यात एक स्थिरता येईल. ही स्थिरता पाहून तुमच्याबद्दल सगळ्यांना हेवा वाटेल.

प्रश्न: या जगा बद्दलची वास्तवता एका कुत्र्याच्या आणि माकडाच्या सुद्धा दृष्टीकोनातून वेगळी आहे. प्रत्येक माणसाचा दृष्टीकोन दुसर्यापेक्षा वेगळा असतो. मग खरे सत्य कसे कळेल? सत्य कसे कळेल?

श्री श्री: सत्याचे वेगवेगळे स्तर आहेत. जस जशी आपली चेतना विस्तारते तस तसे आपले ज्ञान सुद्धा वाढते. एका लहान मुलाच्या दृष्टीने जग वेगळे असते, जस जसे आपण मोठे होतो तस तसे सगळे बदलत जाते. त्यामुळे ज्ञान हे चेतना आहे. जस जशी चेतना विस्तारते तस तसे ज्ञान विस्तारते.

प्रश्न: गुरुदेव, शंकराचार्यांना आज सगळ्या आरोपातून निर्दोष मुक्त केले आहे. त्यांच्या सारख्या पूज्य वक्तीला या कटू अनुभवातून का जावे लागले? कोणताही राजकारणी किंवा माध्यमे या बद्दल दिलगिरी व्यक्त करताना दिसत नाहीत.

श्री श्री: त्यांनी दिलगिरी वक्त केली पाहिजे. राजकारणी आणि माध्यमे यांनी क्षमा मागितली पाहिजे, त्यांनी हे एका व्यक्तीच्या बाबतीत नव्हे तर एका संस्था बाबतीत केले आहे, अशी संस्था जी दोन हजार वर्ष जुनी आहे. ‘सनातन धर्माचा’ प्रतिनिधी जो या संस्थाचा प्रमुख होता. अनेक लोक अनेक वर्ष यामुळे बेचैन झाले. ९ वर्ष या कटू अनुभवातून जाणे हा एख्याद्या संता साठी मोठा काळ आहे. पण त्यांच्या साठी हे एक तप होते. त्यांच्या साठी याचा फार फरक पडत नाही. एखाद्या संतासाठी प्रशंसा किंवा दुषणे याने काही फरक पडत नाही. पण व्यवस्थेसाठी, लोकांच्या विश्वासासाठी हे मोठे प्रश्नचिन्ह आहे.

काही लोक बदनामी करून लोकांचा विश्वास तोडू पाहत आहेत. लोकांचा जर धर्मावर, अध्यात्मावर विश्वास असेल तर ते व्यसनाधीन होणार नाहीत, हातात बंदुका घेणार नाहीत. लोक भक्ती मार्गावर असतील तर व्यसने करणार नाहीत. या लोकांना आपली उत्पादने विकायची आहेत त्यामुळे ते लोकांना धर्म आणि अध्यात्म या पासून तोडू पाहत आहेत. यात काही नवीन नाही, पूर्वीपासून हे चालत आले आहे. त्यामुळे जे लोक झुरळ किंवा डीस सुद्धा मारणार नाहीत अशा लोकांवर असे गंभीर आरोप करतात. ९ वर्षानंतर हे सिद्ध झाले की सर्व ३२ जण निर्दोष आहेत. न्याय करायला उशीर लागता कामा नये, हे ६ महिन्यात वाहयला पाहिजे होते. पण याला ९ वर्ष्या इतका मोठा काळ लागला. आपला सत्य वर नेहेमीच विश्वास असला पाहिजे.

प्रश्न: गुरुदेव, विष्णूच्या १० अवतारापैकी कोणता सगळ्यात सुंदर आहे? आणि कृपया आम्हाला “कल्की” अवताराबद्दल सांगा.

श्री श्री: सुंदरता बघणाऱ्याच्या डोळ्यात असते. तुम्हाला जे आवडते ते तुम्हाला सुंदर वाटते. सुंदरता कुठे नाही? अगदी काट्यात सुद्धा सुंदरता आहे, पानात सुंदरता आहे. जर तुम्ही तुमचा दृष्टीकोन बदलला तर तुम्हाला सगळीकडे सुंदरता दिसेल. प्रत्येक अवतारात काही चांगले आणि काही वाईट गुण आहेत.
18
2013
Dec
बंगलोर, भारत

आपल्या वेदना किंवा दुःखाकडे चार प्रकारे बघता येवू शकते, तुम्हाला वेदना देणारा हा स्वतः वेदनांनी पीडलेला असेल, जे तुम्हाला दुःख देत आहेत ते त्या बाबतीत अज्ञानी आहेत, तुम्ही जास्त सहनशील व्हावे यासाठी कर्म किंवा निसर्ग तुम्हाला यातून जायला भाग पाडीत असेल. तुमची प्रत्येक वेदना, तुम्ही त्यातून तावून सुलाखून बाहेर पडण्यासाठी घेतलेली तुमची सत्व-परीक्षा असते. तुम्ही किती मजबूत आहात हे या परीक्षेत समजून येते. तुम्हाला आणखी मजबूत करण्याचे काम या वेदना करीत असतात. - श्री श्री.

ठीक आहे! तुम्ही ते केले नाहीत.

18
2013
Jul
माँट्रियल, कॅनडा.
प्रश्न : मी कर्तेपणाच्या भावनेपासून सुटकारा कसा मिळवू?

श्री श्री : केवळ कर्म करीत राहा, त्याच्याबाबत चिंता करू नका.

मला वाटते की तुमच्याकडे बसून ‘मी कर्ता आहे किंवा नाही’ असा विचार करत बसायला बराच मोकळा वेळ आहे असे दिसते. जी तुम्ही करायला पाहिजे आहे अशीच कर्मे करा.

प्रत्येक कियेचा मोबदला असतो; आनंददायी, अप्रिय किंवा मिश्र. मोबदल्याचे हे केवळ तीन प्रकार आहेत. जेव्हा तुम्ही कृती करता, तेव्हा तुम्ही काही सकारात्मक मोबदला कमावता, किंवा काही नकारात्मक मोबदला कमावता, किंवा काही सकारात्मक आणि नकारात्मक मोबदला कमावता. या सर्व मोबादाल्यांचा परिणाम केवळ काही काळापुरता टिकतो. म्हणून तर ज्ञानी याबद्दल चिंता करीत नाहीत.

प्रत्येक क्रियेमध्ये काहीतरी असे आहे जे सकारात्मक आहे आणि काहीतरी असे आहे जे नकारात्मक आहे. एखादी कृती १००% परिपूर्ण असू शकत नाही. एखाद्या कृतीमधून विकसित होणाऱ्या सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. आणि कृतीच्या परिणामांची काळजी करू नका, केवळ पुढे चालत राहा. 

जर तुम्ही चुकीची कृती केली असेल, त्यामुळे तुम्ही धडा शिकला असाल तर पुढच्या वेळी ती चूक पुन्हा करू नका. जर तुम्ही योग्य कृती केली असेल तर त्यामुळे तुम्हाला अधिकाधिक तश्याच योग्य कृती करण्याची प्रेरणा मिळते.

जर तुम्हाला असे दिसून आले की तुम्ही केलेल्या कृतीमध्ये तुम्ही अजून काही सुधारणा आणू शकता तर तुम्ही नेहमीच त्याबाबतीत सुधारणा करू शकता.

केवळ पुढे जात राहा, ‘मी कर्ता आहे’ किंवा ‘मी कर्ता नाही’ असे म्हणू नका. खरे तर एका बाबतीत तर कोणीही कर्ता नाही आणि दुसऱ्या बाबतीत पाहाल तर, होय, तुम्हीच तर कर्ता आहात, कारण तुमच्या आत द्वंद आहे. 

उपनिषदामध्ये अतिशय सुंदर कथा आहे ती अशी, ‘ज्या विश्ववृक्षावर, दोन पक्षी बसलेले आहेत, एक आहे जो फळ चाखतो आहे, दुसरा केवळ बघतो आहे, एका साक्षीदाराप्रमाणे’. तर, तुमच्यातील एक भाग आहे जो काहीही करीत नाही, तो बराच मोठा आहे. आणि तुमच्यातील एक भाग आहे जो सर्व खी करतो आहे. हे दोन्ही तुमच्या आत उपस्थित आहेत. 

आता तुम्ही “कसे?” हा प्रश्न विचाराल.

एका पातळीवर तुम्हाला आढळेल की तुमच्यात परिवर्तन येत आहे. तुमचे विचार बदलत आहेत, तुमच्या भावना बदलत आहेत, तुमच्या शरीरात बदल घडून येत आहे. तरीसुद्धा एका निराळ्या गहन पातळीवर तुमच्यामध्ये असे काहीतरी आहे जे अजिबात बदलत नाही; ते तसेच्या तसे आहे. तर हे किंवा ते असे नाही; तर हे दोन्ही एकत्र एकाचवेळी कार्यरत असतात.

जेव्हा अपराधीपणाची भावना तुम्हाला आतून खात असते किंवा गर्व तुमच्या डोक्याचा ताबा घेतो तेव्हा तुम्ही हे समजून घ्या की तुम्ही कर्ता नाही.  तुम्हाला समजते आहे का?

जेव्हा तुम्ही काहीतरी खूप चांगले काम करता आणि म्हणता, ‘अरे मी केले, मी केले’, तेव्हा तेसुद्धा तुम्हाला उदास करते. काहीतरी चांगले केल्यानेसुद्धा तुम्ही उदास होता कारण तुम्ही इतके काही करता आणि मग म्हणता की कोणालाही तुमची किमत नाही, कोणीही तुमचे ऐकत नाही.

तुमच्या चांगल्या कामाचे कौतुक झाले नाही म्हणून तुम्ही दुःखी होता, आणि जर तुम्ही काही चूक केली, तर तेसुद्धा तुमच्या मनाला खाते आणि अपराधीपणाची भावना निर्माण करते. जेव्हा अश्या गोष्टी घडतात तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही कर्ते नाही आहात. तेव्हा साक्षीदार व्हा.

या ग्रहावर सर्वात मोठे गुन्हे करणारे लोक कुठेतरी आत गहन विचार करतात, ‘अरे, मी हे केले नाही, असे कसे घडले.’

त्यांना आश्चर्यचकित आणि धक्कादायक वाटते, आणि ते विचार करतात की ते कर्ते नाहीत, हे असेच घडले. या ग्रहावरील सर्वात मोठ्या अपराध्यांबरोबर जर तुम्ही बोललात, तर तुम्हाला दिसून येईल की अपराधाच्या ठिकाणी ते कसे पोचले हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. त्याचप्रमाणे, ज्या कोणाच्या हातून सर्वोत्कृष्ट कार्य झाले त्यांनासुद्धा असेच वाटते की ते आपोआप घडले; ती नकर्त्याची भावना ही अनुभवण्यासारखी आहे. 

जेव्हा तुम्हाला गोष्टी करणे भाग आहे, तेव्हा ‘अरे, मी तर कर्ता नाही’ असे म्हणू नका. त्या साच्यामध्ये जाऊ नका. जर तुम्हाला काही कार्यावर लक्ष केंद्रित करणे गरजे आहे तर मग केवळ तिथेच लक्ष केंद्रित करा. मी कर्ता नाही, हा एक अनुभव आहे, कधीकधी त्याचा तुमच्या आत उदय होतो. जेव्हा तुम्ही अपराधीपणाच्या भावनेच्या किंवा गर्विष्ठपणाच्या गर्तातेत सापडता तेव्हा हा अनुभव तुमच्यासाठी एक कोपरखळी असतो.

प्रश्न : तुम्ही म्हणता की जेव्हा कधी आम्हाला भीती वाटते तेव्हा आम्ही आमच्या भयांचा सामना केला पाहिजे. माझा प्रश्न आहे की या भयांचा सामना करण्यासाठी मला धैर्य कोठून मिळेल?

श्री श्री : हे लक्षात घ्या की तुम्ही एकटे नाही, आणि अशी एक वैश्विक शक्ती आहे जी तुम्हाला खूप प्रेम करते, आणि तुमच्या सोबत आहे. जेव्हा तुम्हाला आठवते की तुमच्यावर अतोनात प्रेम केल्या जात आहे तेव्हा भीती नाहीशी होते. तुमचे सगळे त्रास सुरु होतात कारण तुमच्यावर खूप प्रेम केल्या जात आहे यावर तुम्ही विश्वास ठेवत नाही.  तिथूनच सगळ्या अडचणी सुरु होतात, आणि तुम्ही अश्या तऱ्हेने वागू लागता की त्यामुळे सगळे लांब ढकलल्या जातात. तुम्ही स्वतःकरिता दुःख निर्माण करता, कारण तुम्ही स्वतःवर शंका घेता; मी चांगला आहे ना? माझ्यावर प्रेम केल्या जात आहे ना? देव माझ्यावर प्रेम करतो की नाही? लोकांचे माझ्यावर प्रेम आहे की नाही? अश्या प्रकारच्या शंका.

तुम्ही एक विदुषक जरी असलात तरीसुद्धा तुम्ही आवडते आहात आणि तुमच्यावर प्रेम केले जात आहे हे केवळ गृहीत धरून चला. तुम्ही एक जोकर जरी असलात तरीसुद्धा तुमच्यावर प्रेम केले जात आहे आणि तुमची काळजी घेतल्या जात आहे. तुम्ही जसे कसे आहात तसे लोकांना तुम्ही आवडता. केवळ पुढे जात राहा, बसून राहू नका आणि अधिक काळ स्वतःची काळजी करण्यात, स्वतःला तपासण्यात, आणि परीक्षण करण्यात घालवू नका. केवळ एखादी जबाबदारी घ्या आणि तुम्हाला जे करणे जरुरी आहे ते करा, आणि निःपक्षपातीपणे खोल विश्रांती घ्या.

उत्कटता, उदासीनता, आणि अनुकंपा  या तीन गोष्टी असणे महत्वाचे आहे.

जेव्हा तुमच्याकडे उत्कटता असते, तेव्हा काळजी करू नका. जेव्हा तुमच्याकडे उत्कटता नसते तेव्हा तुम्ही बसून काळजी करा. उत्कटतेची कमतरता असते तेव्हा आत्मविश्वासाचा अभाव येतो. उत्कटतेअभावी जीवनातील सगळी मजा निघून जाते आणि तुम्ही निराशेच्या गर्तातेत सापडता. उत्कटता जरुरी आहे; उत्कटतेला जगवा.

नुसतीच उत्कटता नाही तर उदासीनतासुद्धा महत्वाची आहे. लोक तुम्हाला सांगतील की तुम्ही उत्कट असले पाहिजे पण मी म्हणेन तुमच्याकडे उदासीनता असायला पाहिजे. उदासीनता म्हणजे निराश अवस्थेत कामे करणे असे समजले जाते. लोक खूप निराश दिसतात आणि विचार करतात की हेच उदासीन असणे होय. हा समज अतिशय चुकीचा आहे.

उदासीनता तुम्हाला केंद्रित करते. ती तुमचे हास्य आणि संयमशीलता कायम ठेवते. ती तुमच्या बुद्धीला समजूतदार आणि भावनांचा समतोल राखते. जेव्हा तुमच्याकडे उदासीनता असेल तेव्हा तुमचे कुणाकडेही कशाबद्दलही तक्रार करणे थांबवते. हे जग जसे आहे तसे आहे, तुम्ही लोकांबद्दल वा प्रसंगांबद्दल तक्रार करणार नाही, आणि तुम्ही स्वतःबद्दल तक्रार करणार नाही. ही उदासीनता आहे.

अनेक वेळा आपण इतरांबद्दल तक्रार करतो, ज्यांच्यावर आपण सर्वात जास्त माया करतो त्यांच्याबद्दलसुद्धा तक्रार करतो. आपण समोरच्या व्यक्तीला बचावात्मक बनवतो, किंवा त्यांना स्पष्टीकरण द्यावयास लावतो. ही केवढी मोठी डोकेदुखी आहे!

सुरुवातीला मी यामुळे हलून जायचो. लोक म्हणायचे, ‘तुम्ही माझ्याकडे बघत नाही’, किंवा ‘तुम्ही माझ्याबरोबर बोलत नाही’, किंवा ‘तुम्ही माझ्यावर रागावला आहात का?’ , अरे देवा! आजकाल मी अश्या प्रश्नांची उत्तरेच देत नाही. जर तुम्ही तसा विचार करता तर असू दे. हरकत नाही! जेव्हा तुम्ही स्वतःच्या भावनांमुळे मात खाता तेव्हा त्याने तुम्ही शक्तिशाली बनता.

हे सगळे म्हणजे केवळ लक्ष वेधण्याचे प्रकार आहेत. तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्या आणि मग ते ठीक असतात. अगदी एखाद्या बालकाप्रमाणे-जर तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही तर ते आदळ-आपट करतात तुमचे लक्ष वेधण्यासाठी. तुमच्या कधी हे लक्षात आले आहे? जेव्हा तुमच्याकडे घरी पाहुणे येतात आणि तुम्ही त्यांच्याबरोबर बोलण्यात गुंग आहात त्याच वेळी मुलांना त्यांचे चित्र तुम्हाला दाखवायचे असते. त्यांनी ते तुम्हाला आधी दहावेळा दाखवून झाले असेल. परंतु तुम्ही काही महत्वाची चर्चा करीत असाल तेव्हा ते येतील आणि व्यत्यय आणतील. तुम्हाला नवल वाटेल की हे बालक इतके शांत होते आणि आता अचानक काय झाले!

आपण त्या अवस्थेतून अजून बाहेर आलेलो नाही, आपल्याला कायम लोकांकडून लक्ष पाहिजे असते. आणि या लक्षाकरिता आपण इतरांकरिता तणाव निर्माण करतो.

म्हणून उदासीनतेमुळे, तुम्हाला ना लक्षाची उणीव भासते ना तुम्हाला काही तणाव राहतो. तुमच्यात बसून लक्ष मिळवण्याची अभिलाषा उरणार नाही. उदासीनता आवशयक आहे.

आणखी एक गोष्ट खरोखर जास्त फायदेशीर आहे ती म्हणजे अनुकंपा. जेव्हा तुमच्यात अनुकंपा असते तेव्हा ती तुम्हाला प्रेरणा देते, प्रोत्साहन देते. तुमच्याबरोबर वाईट केलेल्या लोकांकरिता जेव्हा तुम्हाला अनुकंपा असते तेव्हा तुम्हाला त्यांच्याबद्दल तिरस्कार किंवा कडवटपणा वाटत नाही. अनुकंपा ही उत्कटपणा आणि उदासीनता यांच्यात वंगणाचे काम करते आणि त्यांचे संतुलन राखते.

प्रश्न : प्रिय गुरुदेव, संपूर्ण आयुष्यभर आपण आपल्या नातेसंबंधातून प्रेमाचा शोध घेत असतो आणि तरी हे प्रेम क्षणिक असते. परम प्रेम किंवा कधीही नष्ट न होणारे प्रेम काय आहे?

श्री श्री : तुम्ही प्रेम या द्रव्यापासून बनलेले आहात. जे तुम्ही इथे आणि तिथे शोधात आहात तेच तुम्ही आहात. अंतराभिमुख व्हा आणि विश्राम करा. जेव्हा तुम्हाला समजेल की तुम्हाला इतरांकडून प्रेमाची आवश्यकता नाही आणि त्याचे उगमस्थान तुम्हीच आहात, तेव्हा तुम्ही देण्यास सुरुवात कराल. जेव्हा तुम्ही मुबलक प्रमाणात देऊ लागाल तेव्हा ते मुबलक प्रमाणात परतून तुमच्याकडे येईल.

प्रश्न : जेव्हा मला दुसऱ्यांमध्ये सौंदर्य आणि प्रतिभा दिसते तेव्हा माझे मन एक तर त्यांना खाली दाखवण्यास सुरुवात करते किंवा माझ्या मनाला मत्सर वाटू लागतो. जर मी माझ्यामध्ये पूर्ण आहे तर माझे मन उणीवेच्या गर्तातेत का सापडते?

श्री श्री : कदाचित तुमच्या लक्षात येत नसेल की एके दिवशी सगळे मृत्यू पावणार आहेत. हे सगळे सुंदर लोक आहेत, तेसुद्धा मरण पावणार आहेत. भूतकाळात जिवंत होते ते सर्व सुंदर होते, आणि लढाया लढल्या गेल्या आणि ते सर्व मृत्युमुखी पडले. ते सर्व ज्यांच्याबद्दल तुम्हाला मत्सर वाटतो, तेसुद्धा मृत्यू पावणार आहेत. जागे व्हा आणि पहा, हा मत्सर कुठे आहे? सौंदर्य काय आहे? जी वरवरची कातडी आपल्याला सुंदर वाटते ते सौंदर्य नाही.

तुमच्या स्वतःच्या चैतन्याचे स्वरूप ही सुंदरता आहे. जेव्हा तुम्ही आनंदी आणि समाधानी असता, तेव्हा तुमच्या आत उदय पावणारी चेतना किंवा जीवन यांचे गुणधर्म हे सौंदर्य आहे. बाहेर दिसणारी छबी हे सौंदर्य नाही.

प्रश्न : कर्माचे विघटन करण्याचा सर्वात उत्तम मार्ग कोणता?

श्री श्री : केवळ कृती करून. काळजी करू नका, कर्म हा भूतकाळ आहे. ज्ञान, जागरूकता, ध्यान आणि चांगली कृती, या गोष्टींमुळे भूतपूर्व कर्म पुसले जातात.

जागरूक असणे आणि भूतकाळ हा भूतकाळ आहे हे जाणणे, जे काही झाले ते काही काहीतरी कारणाने झाले याची जाणीव ठेवणे; या ज्ञानाची जागरुकताच स्वतः गत कर्मांना पुसून टाकते. चांगल्या कृती करा, काहीतरी चांगले करा.

ज्ञानातील अंतर

31
2013
May
बंगलोर, भारत

‘प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्'. (९.२)

भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात, ‘हे ज्ञान असे आहे कि तुम्हाला लगेच याचा अनुभव येईल. असे नाही कि तुम्ही जर आज त्याचे अनुगमन केले तर काही वर्षांनी तुम्हाला याचा फायदा होईल. नाही! या ज्ञानाची फळे तुम्हाला लगेच दिसू लागतील. कसे काय? तुम्हाला स्व:ताला त्याचा अनुभव घेता येईल. ज्या प्रमाणे तुम्ही भूक, दु:ख अनुभवता त्याच प्रमाणे.

जर तुम्हाला झोप येत असेल तर तुम्ही दुसऱ्या कोणाला विचारता का कि, ‘मला झोप येत आहे का?’

जर तुमचे पाय दुखत असतील तर दुसऱ्या कोणा व्यक्तीला विचारायची गरज नाही कि माझे पाय खरच दुखत आहे का? हे उघड सत्य आहे.

त्याच प्रमाणे, तुम्ही पाहू शकाल कि हे ज्ञान स्वत:स्पष्ट आहे आणि तत्क्षणी तुम्हाला त्याचा अनुभव येईल.

आता, तुम्ही सर्वजण सुदर्शन क्रिया, प्राणायम, ध्यान रोज करता. तुम्हाला याचा फायदा होतो कि नाही हे तुम्ही दुसऱ्या कोणाला कधी विचारले आहे का?

तुम्ही जेव्हा ध्यान करता, तुम्हाला त्यातून काय मिळाले हे तुम्हाला लगेच कळते. तुम्ही सुदर्शन क्रिया केल्यानंतर तुम्हाला त्याचा अनुभव लगेच त्याचा फायदा अनुभवायला मिळतो, हो कि नाही? त्याच प्रमाणे ज्यावेळी तुम्हाला भूक लागते, त्याची जाणीव तुम्हाला लगेच होते.

ज्या वेळी तुम्ही ध्यान करता, तत्क्षणी तुम्हाला आनंद आणि शांततेचा अनुभव येतो. त्या क्षणी तुमचे मन एकदम शांत होते.

त्याच प्रमाणे भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात, ‘ तुम्ही स्व:तासाठी या ज्ञानाचा प्रत्यक्षात अनुभव घेऊ शकता. या ज्ञानाने तुमच्या आयुष्य आनंदी होईल आणि तुम्ही दु:खा पासून मुक्तता. या ज्ञानाचे अनुसरण करणे फायदेमंद आहे. हे ज्ञान समजण्यास आणि अनुसरण करण्यास सोपे आहे, आणि हे ज्ञान अनंत आणि कधीही न बदलणारे आहे.’ 

तुम्हीं एकदा जरी ध्यान केले तर त्याचे फळ तुम्हाला जे मिळेल ते अनंत आणि कायम स्थायी आहे.

तुम्ही जर एखादे चांगले कर्म केले तर त्याचे पुण्य कायम तुमच्या बरोबर राहते. म्हणून हे ज्ञान अनंत आणि कायम स्थायी आहे.

तुम्ही जर का एकदा हे ज्ञान आत्मसात केले तर ते तुमच्या जवळ आयुष्यभर राहते. ज्या प्रमाणे तुम्ही सायकल चालवायला शिकता त्यानंतर ती आयुष्यभर तुम्हाला येते. तुम्हाला ती परत ती वारंवार शिकण्याची गरज नाही. त्याच प्रमाणे एकदा जर तुम्ही हलवा ( एक भारतीय गोड पदार्थ) बनवायला शिकलात तर तो वारंवार शिकण्याची गरज नाही.

म्हणून भगवान श्री कृष्ण म्हणतात, ‘मी तुला आता हे ज्ञान जे देणार आहे ते अनंत आणि अजरामर आहे.’

पुढच्या श्लोकात भगवान श्री कृष्ण म्हणतात,

‘अश्रद्दधानाः पुरुषा धर्मस्यास्य परंतप । 
अप्राप्य मां निवर्तंते मृत्युसंसारवर्त्मनि’॥ (९.३) 

ते म्हणतात, ‘हे सर्वोच्च ज्ञान जे मी तुला सांगणार आहे त्याच्यावर जर कोणाचा विश्वास नसेल तर ते मला कधीही प्राप्त करू शकणार नाहीत.’

ह्याचा अर्थ म्हणजे असे व्यक्ती स्व:ताला कधीही ओळखू शकणार नाहीत. 

 म्हणून हे म्हणतात, ‘असे नास्तिक व्यक्ती मला कधीही प्राप्त करू शकणार नाहीत आणि ते जन्म मृत्यू च्या विळख्यात अडकून राहतील.’

हे पहा जो व्यक्ती या ज्ञानाच्या मार्गावर येत नाही तो या जगाच्या व्यग्रता मध्ये अडकून राहतो. हे खरे आहे कि नाही? तो रोजच्या जीवनातील संघर्षा मध्ये अडकून राहतो. त्याच त्या तक्रारी, त्याच त्या अडचणी, त्याच त्या गोष्टी वारंवार येत राहतात.

जो ज्ञान विरहीत आहे, ज्याची दृष्टी पारिभाषिक नाही, किंवा ज्याचा जीवनात मोठे उद्दिष्ट नाही असा जीवनात काहीही कमवू शकणार नाही. 

असे व्यक्ती काय करतात? ते इच्छा आणि परावृत्ती मध्ये जखडून जातात. असे व्यक्ती, त्यांच्यावर जे प्रेम करतात त्यांच्याशीच भांडतात आणि त्यांच्या बरोबर जे भांडतात त्यांच्यावर ते प्रेम करतात. ह्या मुळे त्यांचे जे मित्र आहेत ते त्यांचे शत्रू बनतात आणि त्यांचे जे शत्रू आहेत ते त्यांचे मित्र होतात.

तुम्ही पाहिले असेल कि तुम्ही जर कुणाचे वाईट केले नसले तरी काही लोक तुमचे शत्रू बनतात. तुमच्या पैकी किती जणांना असा अनुभव आला आहे? (प्रेक्षका मध्ये बरेचजण हात उंचावतात) 

पहा, बहुतांश जण हात उंचावत आहेत!

लोक जीवनात एका पाठोपाठ एका अशा घटनातून जात असतात आणि शेवटी ते मृत्यू ला सामोरे जातात. त्यांना या जन्म मृत्यू च्या विळक्ख्यात बरेच दु:खे भोगावे लागतात, आणि त्यांना सु:ख मिळत नाही. या भौतिक जगात खरा आनंद, सु:ख मिळणे फार कठीण आहे. आणि तुम्ही जर जास्त त्याचा शोध घेत राहिलात तर तुम्हाला जास्त दु:खे भोगावे लागतील. 

ज्याचा या ज्ञानावर विश्वास नाही आणि ज्याचे जीवन भक्ती विरहीत आहे अशा व्यक्तीच्या जीवनात काय असून शकेल?

जीवनातील प्रत्येक गोष्टी वर हे जीवन अर्पण करणाऱ्या या भव्य शक्ती वर जर कुणाचा विश्वास नसेल, जी शक्ती या प्रेमाचा अविष्कार आहे, तर त्याच्या जीवनात काय उरेल? त्याचे जीवन किती कंटाळवाणे असेल.

असा व्यक्ती आपल्या इच्छा पूर्ती साठी धडपडत असतो आणि सारखे काही तरी नवीन मागत असतो. त्याला जेव्हा ते मिळत नाही तेव्हा तो दु:खी असतो, आणि ते मिळाल्यावर सुद्धा तो दु:खी असतो. यालाच मृत्यू संसार  म्हणतात (हे भौतिक जगताच्या संदर्भात आहे जिथे सर्व काही अस्थायी आहे, अखंडपणे बदलते आहे आणि मृत्यू च्या आधीन आहे).

म्हणून भगवान श्री कृष्ण म्हणतात, ‘असे लोक ज्यांचे जीवन विश्वास आणि भक्ती विरहीत आहे मला कधीही प्राप्त करू शकणार नाहीत. असे लोक अखंड देवत्व म्हणजेच मला प्राप्त करण्यास अपयशी ठरतील, आणि ते या मृत्यू लोकात येत राहतील (बदलते भौतिक विश्व)’.

पुढच्या दोन श्लोकात भगवान श्री कृष्ण म्हणतात,

‘मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना । 
मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः‘॥ (९.४) 

न च मत्स्थानि भूतानि पश्य मे योगमैश्वरम् । 
भूतभृन्न च भूतस्थो ममात्मा भूतभावनः’॥ (९.५) 

भगवान श्री कृष्ण म्हणतात, ‘हे अर्जुना, ही संपूर्ण सृष्टी म्हणजे माझा अविष्कार आहे. तरी पण मी निराकार आणि अव्यक्त आहे. ही संपूर्ण सृष्टी (ज्याच्या मध्ये आकार आहे) मी निर्माण केली आहे (सुक्ष्म निराकार ईश्वरत्व). तू जे काही या सृष्टी मध्ये पहात आहेस त्याची मिर्मिती मी केली आहे. सर्व पाच भूत: ( सृष्टी चे पाच मुलतत्वे) – पृथ्वी, जल, अग्नी, आकाश, आणि वायू माझ्या मध्ये समाविष्ट आहेत आणि माझ्या पासून त्याची निर्मिती होते. पण त्यांच्या मध्ये मी समाविष्ट नाही.

हे म्हणजे ‘हा कपडा माझा आहे पण मी त्या कपड्यात नाही’ असे म्हटल्यासारखे आहे.

पहा, तुम्ही तुमच्या कपड्या मध्ये आहात आणि त्या कपड्या मध्ये तुम्ही झाकले गेले आहात, तरी पण तुम्ही म्हणजे तो कपडा नाही जो तुम्ही घातलेला आहे. त्याच प्रमाणे भगवान श्री कृष्ण म्हणतात, ‘हया पंच महाभूतांचा जन्म माझ्यापासून झाला आहे, ते माझ्या मध्ये समाविष्ट आहेत तरी पण मी त्यांच्या मध्ये नाही (ह्याचा अर्थ म्हणजे ईश्वर म्हणजेच दिव्य चेतना ही पंच महाभूतांसाठी मर्यादित नाही जरी त्याची निर्मिती त्यांनी केली असली तरी)’. 

हेच भगवान श्री कृष्ण इथे सांगतात, आणि हेच मोठे गुपीत आहे.

या ठिकाणी ते म्हणतात की, ‘मी एक निराकार पैलू आहे जो कोणालाही दिसत नाही आणि तुम्ही जे काही पाहता त्याच्या पलीकडे आहे.’

उदा: एक झाड आहे आणि त्याच्या खोडामध्ये मधुरस आहे. पनू तुम्ही फक्त झाड पाहू शकता पण त्यातील मधुरस नाही.

म्हणून इथे भगवान श्री कृष्ण म्हणतात, ‘मी तो (ईश्वर) मधुरस आहे जो या सृष्टीमध्ये विविधतेचा उत्कर्ष करतो. सर्व झाडे, त्यावरील पाने, त्यांची फळे या सर्वांच्या मागचे कारण मी आहे. त्याच प्रमाणे तुम्ही व्यक्तीला पाहू शकता पण त्याच्या आत्म्याला नाही. आत्मा हा निराकार आहे आणि तो आत्मा म्हणजे मी आहे.’

प्राणशक्ती हि आपल्या शरीराच्या प्रत्येक कणा कणा मध्ये असते. ज्या क्षणी हि प्राणशक्ती शरीर सोडून जाते त्या क्षणी तो व्यक्ती मृत म्हणून जाहीर केला जातो.

उदा: जेव्हा तुमच्या शरीरावरील काही त्वचे बाग भाजला जातो, काही काळानंतर त्या भागावर तुम्हाला काही वेदना होत नाहीत. तुम्हाला त्या भागावर काही झाले तरी कळत नाही कारण त्या भागातील प्राणशक्ती नष्ट झालेली असते.

या सृष्टी मध्ये चेतने मुळे जीवन आहे. म्हणून भगवान श्री कृष्ण म्हणतात, ‘तुमच्या चेतनेला आधार देण्यासाठी मी या सृष्टी मध्ये सर्वत्र आहे. हे मोठे गुपीत आहे जे तुम्ही जाणून घेतले पाहिजे.’

दूरदृष्टी परिपूर्ण हवी

31
2013
May
बंगलोर, भारत


भगवतगीतेमधील नवव्या अध्यायला राज-विद्या योग  किंवा राज-गुह्या विद्या  ( अत्यंत सर्वश्रेष्ठ गोपनीय ज्ञान) असे म्हटले जाते.

एक राजा कुठल्या गोष्टी साठी खूप सारे प्रयत्न करीत नाही. तुम्ही कधी कुठल्या राजाला एखाद्या गोष्टी साठी प्रयत्न करताना पहिले आहे का? म्हणून भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात कि, एखादा व्यक्ती हे ज्ञान प्रयत्न न करता घेवू शकतो.

भगवान श्री कृष्ण याला राज गुह्या विद्या  म्हणतात. म्हणजे हे ज्ञान गोपनीय आहे.

भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात,

  ‘इदं तु ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यनसूयवे । 
ज्ञानं विज्ञानसहितं यज्ज्ञात्वा मोक्ष्यसे‌ शुभात् ॥‘(९.१) 

ते म्हणतात, ‘हे अर्जुना! तू अनुसया आहेस (ज्याच्या मध्ये मत्सर, नकारात्मकता नाही), म्हणून मी तुला एक मोठे गुपीत सांगतो.’

अनुसया म्हणजे काय? जो प्रत्येक गोष्टींमध्ये अवगुण शोधत नाही त्याला अनुसया म्हणतात. असूया कुणाला म्हणतात? ज्याला आपल्या आवतीभोवती सतत अवगुण दिसतात त्याला असूया म्हणतात. एखाद्याची दृष्टी विकृत आणि अपरिपूर्ण आहे, तो प्रत्येक गोष्टीमध्ये अवगुण पाहतो. असा व्यक्ती ज्याला प्रत्येक गोष्टी मध्ये अवगुण दिसतात त्याला असूया  म्हणतात.

म्हणजे असूया म्हणजे ज्याची दृष्टी विकृत आहे. अनुसया म्हणजे ज्याची दृष्टी विकृती आणि नकारात्मकते पासून मुक्त आहे. 

उदा: जर एका दुखी व्यक्तीला कोणी जर काही सांगितले तर त्याला वाटते कि तो व्यक्ती त्याची चेष्टा करत आहे. तुमच्या पैकी किती जणांना असा अनुभव आला आहे?

एखाद्या अस्वस्थ व्यक्तीची तुम्ही जरी स्तुती केली तरी त्याला वाटते कि तुम्ही त्याची चेष्टा करत आहात. तुम्ही त्याचे काही चांगले केले तरी त्याला त्याच्या मध्ये अवगुण दिसतात.

तुम्ही जर एखादी गोष्ट चांगल्या उद्दिष्टेने केली तरी असे व्यक्ती त्या मध्ये काही ना काही तरी अवगुण काढतात. असे व्यक्ती ज्यांना प्रत्येक गोष्टी मध्ये अवगुण पाहण्याची प्रवृत्ती असते त्यांना असूया  म्हणतात.

अनुसया  म्हणजे ज्यांची दृष्टी विकृत नाही. असे व्यक्ती प्रत्येक गोष्टी मध्ये अपरिपूर्णता न पाहता त्यांचा आहे तसा स्वीकार करतात.

मग तुम्हीं सर्वात गुप्त गोष्ट कुणाला सांगू शकाल? जो अनुसया आहे त्याला.

तुम्ही एखादी गुप्त गोष्ट त्याला सांगू शकता जो त्याच्या मध्ये अवगुण शोधणार नाही आणि ज्याची दृष्टी विकृत नाही.

असूया व्यक्ती प्रत्येक गोष्टी मध्ये अवगुण पाहतो मग तो कोठे हि असो. असे व्यक्ती आपल्या मनातील नकारात्मकता बाहेरील जगात टाकतात, आणि मग ते दुसऱ्यांना दोषी ठरवतात. ज्या व्यक्तीची दृष्टी विकृत आहे, त्याला स्वत:ची अपरिपूर्णता दिसत नाही. तो दुसऱ्यांमध्ये अपरिपूर्णता आणि वाईट गुण बघतो.  तो अवतीभोवती असणाऱ्या व्यक्ती मध्ये जास्तीत जास्त अपरिपूर्णता पाहतो. असा व्यक्ती असूया आहे. अशा व्यक्तींचा कोणीही स्वीकार करत नाही, जरी गुरु ने स्वीकार केला तरी तो गुरूच्या शिकवणी मध्ये चूक काढतो. तो म्हणतो कि, ‘गुरुदेव तुम्ही हे सांगितले खरे पण ते चुकीचे आहे’.

असा व्यक्ती गुरुचे ज्ञान काय आत्मसात करेल जो गुरूच्या शिकवणी मध्ये चुका काढतो? त्याला काहीच आत्मसात करता येणार नाही. ह्या मुळेच म्हटले आहे कि आपल्या गुरु कडे मर्यादित बुद्धीने पाहू नका, ज्ञाना बद्दलची आपली दृष्टी विस्तीर्ण ठेवा. 

भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणतात, ‘तुझी दूरदृष्टी ही विकृतीहीन आहे म्हणून मी तुला एक थक्क करणारे गुप्त ज्ञान देवू इच्छितो. हे ज्ञान जाणल्याने तू तुझ्या सर्व दु:ख आणि नकारात्मकता पासून मुक्त होशील. हे ज्ञान पारिभाषिक (विज्ञान) आणि अलौकिक (ज्ञान) आहे.

‘हे काय आहे?’ हे जाणून घेणे म्हणजे विज्ञान ( परिमंडळ ज्ञानाच्या संदर्भात), आणि ‘मी कोण आहे’? हे जाणून घेणे म्हणजे अध्यात्म (स्व च्या अलौकिक ज्ञानाच्या संदर्भात). म्हणून ते म्हणतात की, ‘ या ज्ञानामुळे तुझी सर्व अमंगल गोष्टी पासून मुक्तता होईल आणि तुझ्या आसपास नकारात्मकता राहणार नाही. हे ज्ञान जाणल्याने तुला कसलीही इजा होणार नाही किंवा तुला कुठलेही दु:ख भोगावे लागणार नाही.

पुढच्या श्लोकात भगवान श्री कृष्ण म्हणतात,

‘राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम् । 
प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम् ॥(९.२) 

ते म्हणतात, ‘मी तुला अशी कोणतीही गोष्ट सांगणार नाही जी तुला समजणार नाही किंवा ज्याचा तुला सराव करावा लागणार नाही.’

समजा गुरु ने एखादी गोष्ट आपल्या भक्ताला सांगितली आणि ती जर त्याला करता आली नाही, तर त्याचा काय उपयोग? जर गुरु आपल्या भक्ताला उच्च आणि कठीण ज्ञान देत असेल जे त्या भक्ताला समजत नसेल तर त्याचा काय उपयोग?

एकदा एका ज्ञानी ऋषींचे प्रवचन ऐकण्यास एक सद्गृहस्थ गेले होते. प्रवचन ऐकून आल्यावर त्यांनी आपल्या मित्रांना सांगितले की, ‘प्रवचन खूप छान होते. ऋषींनी अद्भुत ज्ञान दिले.’

त्यातील एका मित्राने विचारले, ‘आम्हाला पण सांग ऋषीजी कोणत्या विषयावर बोलत होते.’

ते सद्गृहस्थ म्हणाले, ‘ज्ञान खूप उच्च दर्जाचे होते, ते माझ्या डोक्यावरून गेले.’

जर त्याला त्यातील काहीच समजले नाही तर अशा उच्च दर्जाचे ज्ञान ऐकून त्याला काय मिळाले. आणि जरी एखाद्या व्यक्तीला ते कळले तरी जो पर्यंत तो त्याचा सराव करून त्याचे अनुगमन करीत नाही तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाही.

म्हणूनच भगवान श्री कृष्ण म्हणतात, ‘मी तुला असे कोणतेही ज्ञान सांगणार नाही जे तुला समजणार नाही अथवा तू त्याचा सराव करू शकणार नाही. मी तुला जे ज्ञान देत आहे ते सर्व ज्ञानापैकी अधिपती आहे. हे सर्वश्रेष्ठ आणि गोपनीय आहे; ते सर्व ज्ञाना मध्ये परम आणि पवित्र आहे.’

जर ज्ञान हे शाही आणि दिव्य असून पवित्र नसेल तर त्याचा काय उपयोग? ते सर्वश्रेष्ठ गुप्त असेल, पण त्याच्या मध्ये काही पवित्रता नसेल, तर कोणालाही या ज्ञानाचा उपयोग होणार नाही. कुठलीही लज्जित करणारी गोष्ट गुप्त ठेवली जायची नाही. मोठमोठ्या गोष्टी साध्य करण्यासाठी जे काही लागते त्या गोष्टी गुप्त ठेवल्या जायच्या. या साठीच या ज्ञानाला राजगुह्यं  म्हटले आहे म्हणजेच सर्वश्रेष्ठ आणि गोपनीय ज्ञान.

भारताची विशेषता ही आहे कि इथे गुप्तता आणि पवित्रता एकमेकाच्या हातात हात घालून जातात. भक्ताला मंत्र हा गोपनीय पद्धतीने दिला जायचा. शिष्याला दिक्षा देताना, गायत्री मंत्र जो सर्व मंत्रामध्ये पवित्र आहे, त्याच्या कानात गुप्त पद्धतीने सांगितला जायचा. आणि शिष्याला तो मंत्र गुपीत ठेवायला सांगितले जायचे, ज्या मुळे तो मंत्र त्याच्या मध्ये एका बीजा प्रमाणे राहील. ज्या प्रमाणे बीज हे माती च्या खाली पेरले जाते. बीज हे मातीत पेरल्या मुळेच त्याला अंकुर फुटतो आणि त्याचे रुपांतर मोठ्या झाडा मध्ये होते. म्हणून गुप्तता ही एका बीजा प्रमाणेच आहे.

गुप्तता हि अशी आहे कि जिच्या मुळे जीवनात पवित्रता येते आणि जीवन एकदम सुंदर, अद्भुत होते.

म्हणून श्री कृष्ण म्हणतात कि हे ज्ञान सर्वश्रेष्ठ गोपनीय आहे. ते क्षुल्ल्क किंवा निरर्थक नाही. ह्या ज्ञानात लाज वाटेल किंवा गुप्त ठेवण्या सारखे काही नाही. हे ज्ञान जो कोणी जाणून घेईल तो आनंदी होईल आणि त्याला फायदा होईलच. या ज्ञानाला जो कोणी स्व:तला अर्पण करतो त्याची सर्व गोष्टीतून मुक्तता होते.

क्षमा न करता तुम्ही सुखी होऊ शकता का?

27
2013
Jul
बून, नॉर्थ कँरोलीना

प्रश्न : गुरुदेव, मी प्रेम करीत असलेल्या व्यक्तीने मला दुखावले आहे. मला त्यांना क्षमा करणे कठीण वाटते आहे. मी काय करू?

श्री श्री : तुमच्यासमोर काय पर्याय आहेत?

एक आहे, तुम्ही त्यांना क्षमा करू नका. जर क्षमा करणे इतके कठीण वाटत असेल तर त्यांना क्षमा करू नका. मला काळजी आहे ती याची की तुम्ही आनंदी आणि शांत आहात का? क्षमा न करता तुम्ही आनंदी, समाधानी आणि शांत होऊ शकता का? नाही! मग केवळ सोडून द्या! 

अशी अनेक माणसे आहेत; असे अनेक काटे आहेत. तुमच्या पायाला टोचणे हा काट्याचा स्वभावच असतो. आता, तुम्ही तो काटा काढा आणि फेकून द्या, आणि तुमच्या मार्गाने चालू पडा. तुम्ही तो काटा स्वतःजवळ ठेवून आणि, ‘का रे बाबा मला कशाला टोचालास? तुझे असे मला टोचणे किती तीक्ष्ण होते! मी तुला कधीहि क्षमा करणार नाही कारण तू मला टोचालास!’ असे त्याला सवाल विचारु शकत नाही.

काटा म्हणेल, ‘अरे, हे पहा, तो माझा स्वभाव आहे. मी याच्याशिवाय अजून काही करू शकत नाही. मी केवळ हेच करू शकतो! आणि तुम्ही मला सवाल करीत आहात, मी तुम्हाला का टोचलो? मी तुम्हाला दगा का दिला? लोकांना दगा देणे हा माझा स्वभावच आहे. तुम्ही माझ्या मार्गामध्ये आडवे आलात आणि म्हणून रस्त्यात आपण एकमेकांना असे भिडलो!’

हे सोडून पुढे चालणे हेच आता चांगले आहे की त्यांच्या मागे मागे धावणे चांगले आहे!

ज्यांनी तुम्हाला दगा दिला अश्या कोणाच्या मागे तुम्ही का धावता आहात? ज्याने तुम्हाला दगा दिला अश्या माणसाचा तुम्ही का विचार करीत बसता? त्यांना काढून फेकून द्या! तुमच्या जीवनाच्या बाहेर त्यांना काढून फेका! 

जेव्हा तुम्ही क्षमा करू शकत नाही तेव्हा तुम्हाला त्यांना संपवावे लागते! जर तुम्ही बंदूक घेऊन त्यांना खरोखर संपवले तर तुमचाच अंत होईल. तुमची रवानगी तुरुंगात होईल. बरेचसे लोक हेच करतात.

जो बुद्धिमान असतो तो त्यांच्याबद्दल केवळ विचार करणे बंद करून टाकतो. किंवा मग त्यांना त्यांच्याबद्दल अनुकंपा वाटेल आणि ते विचार करतील, ‘ काय अडाणी माणूस आहे, त्यांच्या जीवनाला ज्ञानाच्या एका थेंबानेसुद्धा स्पर्श केलेला नाही. त्यांना माहित नाही की जर तुम्ही कोणाला दुखावले तर तेच दुःख त्यांच्याकडे दसपट येणार आहे. त्यांना जास्तच सोसावे लागणार आहे. ते अडाणी आहेत, आणि हा त्यांचा स्वभाव आहे.’

असा विचार करा की हा त्यांचा स्वभाव आहे, ते दुर्बुद्ध आहेत! त्यांना माहित नाही ते काय करीत आहेत ते. असे म्हणा, ‘मला अश्या लोकांबरोबर काही देणेघेणे ठेवायचे नाही. मला अश्या माणसांबद्दल विचार करीत बसायला वेळ नाही.’ उलट, स्वतःला व्यस्त ठेवा.

जर तुमचे हृदय मोठे असेल तर तुमच्या लक्षात येईल की ते अडाणी आहेत, त्यांना माहित नाही ते काय करीत होते; त्यांनी जे केले ते अति लोभामुळे किंवा मत्सरामुळे केले, आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल अनुकंपा असेल.

याचा काही अर्थ लागतो का?

प्रश्न : गुरुदेव, मी अतिशय उदास आहे. मी पुन्हा तुमच्यापासून शारीरिकदृष्ट्या लांब होणार. या ताटातूटीच्या भावनेवर मी कसा काय विजय मिळवू?

श्री श्री : नाही, नाही, नाही. मी तर वाऱ्याप्रमाणे आहे, आणि सूर्य व चंद्र यांच्याप्रमाणे; तुम्ही माझा एक भाग आहात, मी तुमचा भाग आहे. केवळ आनंदी राहा आणि समाजात काहीतरी चांगले काम करीत राहा. तुमच्याकडे जे काय आहे ते तुमच्या आजूबाजूला सगळ्यांना द्या. अनेक लोक आहेत जे दयनीय आहेत, आणि आपण त्यांना त्या अवस्थेतून बाहेर आणण्यासाठी काहीतरी करू शकतो, हो ना?

आपण आनंदाच्या लहरी निर्माण करायला पाहिजे. तुम्ही जिथे कुठे आहात, तुमच्या मित्रांना आणि कुटुंबाला तुमच्या तळघरात बोलवा किंवा जिथे कुठे जागा मिळेल तिथे जमा आणि भस्त्रिका, थोडे व्यायम करा,नाचा, गा आणि १०-१५ मिनिटे थोडे ध्यान धरा. ध्यानाच्या अनेक टेप आहेत. प्रत्येकजण ध्यानाच्या टेप घेऊ शकतात आणि तुमच्या जागी ध्यान धारणा करू शकता. किंवा तुम्ही शिक्षकाला बोलवा, ते तुम्हाला प्रस्तावानापर भाषण देऊ शकतात. तुम्ही एक उत्सव साजरा करण्याची लहर, आनंदाची लहर निर्माण करू शकता.

प्रश्न : गुरुदेव, अध्यात्मिक साधनेच्या तीन पातळ्यांबद्दल तुम्ही कृपा करून आम्हाला सांगू शकाल काय?

श्री श्री : पहिली अवस्था आहे आण्व उपाय,  ज्याच्यामध्ये प्राणायाम, ध्यान, मंत्रोच्चार, व्यायाम आणि योग यांचा समवेश असतो.

दुसरी अवस्था आहे शक्त उपाय.  ही जरा जास्त तरल आहे; हे सर्व सर्व केल्यानंतर तुम्ही अनुभवता ती स्तब्धता असते; ही फार आंतरिक आहे.

यात तुम्ही अतिशय कमी यत्न करता, खरे तर सर्व काही घडत असते. इथे कोणी कर्ता नसतो, कोणी काही करत नसते, तरीसुद्धा ते घडत असते;तुम्हाला शक्त उपाय  तुम्हाला जाणवतो; तो फार तरल असतो.

तिसरी अवस्था, शाम्भव उपाय  ही शक्त उपायाच्या एक पायरी पुढे आहे; केवळ प्रतीबोधन असते, केवळ जागरूकता असते. त्याचा अचानक साक्षात्कार होतो, तुम्हाला काहीच खुणगाठ नसते, तुम्हाला त्यात काहीच म्हणता येत नाही, तुम्हाला त्याबाबत काहीच करता येत नाही.

तुम्ही चालत असता, तुम्ही सूर्यास्त पाहत असता, अचानक काहीतरी घडते, काहीतरी उलगडते. तुम्ही कोणालातरी भेटता; अचानक तुम्हाला पराकोटीच्या आनंदाची भावना जाणवते.

तुम्ही ध्यान करीत असाल, झोपलेले असाल, किंवा काही काम करीत असाल, तुमच्यामध्ये अचानक एक जागरूकता, एका जाग्रणाचा उदय होतो. तो आहे शाम्भव उपाय; वरदान, आशीर्वाद किंवा प्रेम किंवा कशामुळे तरी हे घडून येते.

पहिली अवस्था, आण्व उपाय,  ही अपरिहार्य आहे. दुसरी अवस्था, शक्त उपाय,  ही प्रगत मार्गक्रमण आहे. तिसरी अवस्था, शाम्भव उपाय,  ही एक उपहार आहे.

प्रश्न : गुरुदेव, आर्ट एक्सेल शिबिरातील मुलांपैकी एकाचा हा प्रश्न आहे. प्रसिद्ध आणि महत्वाची व्यक्ती होणे कसे वाटते?

श्री श्री : मला एक लहान मुलगा व्हायचे आहे आणि मला लहान मुलगा म्हणूनच राहायचे आहे. एक लहान मुलगा होण्यात जी मजा आहे ती दुसऱ्या कशातही नाही. आणि प्रत्येकाने हे लक्षात ठेवा की त्यांनी कधीही मोठे होता कामा नये.

मला तर वाटते की मी मोठे होऊच नये; मला लहान मुलगा व्हायचे आहे आणि मला लहान मुलगा म्हणून कायम राहायचे आहे. आपण सर्वांना तसेच वाटले पाहिजे; मोठे होणे आणि प्रसिद्ध होणे या सर्वाची पर्वा करता कामा नये. केवळ निष्पाप मुले; हे एकदम छोटेसे जग आहे.

प्रश्न : गुरुदेव, या देहाची आसक्ती मी कशी काय सोडू? मी या शरीरात आहे आणि तरीसुद्धा मी शरीर नाही हे मला लक्षात घेणे अशक्य वाटते.

श्री श्री : तुम्हाला काही प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही, जरा थोडा वेळ थांबा; शरीर तुमच्यापासून वेगळे होईल, तुम्हाला शरीरापासून विभक्त होण्याची गरज नाही.

आरामात राहा. मला वाटते की तुमच्याजवळ भरपूर रिकामा वेळ आहे स्वतःबद्दल विचार करत बसण्यासाठी. जरा बाहेर पडा आणि काहीतरी चांगले काम करा; जगाला तुमची आवश्यकता आहे, लोकांना तुमची गरज आहे.

प्रत्येकाला काहीतरी खुबीचे वरदान मिळाले आहे. हे कौशल्य स्वतःसाठी नाहीये. संगीतकाराचा गळा चांगला आहे, ते बाथरूममध्ये गाणे म्हणण्यासाठी नव्हे; त्याचा मधुर आवाज असतो ते इतरांचे मनोरंजन करण्यासाठी. लेखकाचे भाषेवर चांगले प्रभुत्व असते, ते स्वतःला पत्रे लिहिण्यासाठी आणि नंतर ती वाचत बसण्यासाठी नव्हे; लेखकाची कला असते ती इतरांना आनंद देण्यासाठी आणि त्यांच्या बुद्धाला चालना देण्यासाठी.

त्याचप्रमाणे, जर तुमची विनोदबुद्धी चांगली असेल तर तुम्ही स्वतःवर हसत बसणार नाही; तुमच्या विनोदबुद्धीचा तुम्हाला काहीही उपयोग नाही, ती आहे सर्वांच्या उपयोगाकरिता.

तुम्हाला मिळालेले प्रत्येक वरदान हे असते वाटून घेण्यासाठी इतरांबरोबर, समाजाबरोबर. जर तुम्ही उत्तम शल्यविशारद आहात तर तुम्ही स्वतःची शस्त्रक्रिया करू शकत नाही. एका चांगल्या शल्यविशारदाचे कौशल्य आणि ज्ञान हे त्याला जेव्हा गरज असते तेव्हा त्याच्या स्वतःच्या काहीही उपयोगाचे नसते; त्याला दुसऱ्या शल्यविशारदाकडे जावे लागते.

प्रश्न : गुरुदेव,आयुष्यभर मी ज्ञान शिकतो आहे, ज्ञानाचा शोध घेतो आहे आणि ज्ञानाचे विश्लेषण करतो आहे. जेव्हा मी दि आर्ट ऑफ लिविंगमध्ये आलो तेव्हा मला सांगण्यात आले की विचार करणे, विश्लेषण करणे बंद करून केवळ ध्यान धरा जे मला करता येत नाहीये. कृपा करून मदत करा.

श्री श्री : हे पहा, इथे विचार,विश्लेषण आम्ही करतो! तुम्ही विश्लेषण करा पण मशीन इतकेसुद्धा वापरू नका की त्याला सर्वथा परीक्षणासाठी वेळ द्यावा लागेल. तुम्ही खूप वेळ गाडी चालवली तर तिला डागडुजीसाठी देता ना? ध्यान धरणे म्हणजे तुमच्या मनाला डागडुजीसाठी गँरेजमध्ये घेऊन जाणे.

विश्लेषणात्मक विचारांमुळे जर तुम्ही या यंत्राकडून अधिक काम करून घेतले तर ते मोडकळीला येईल. म्हणून तुम्हाला संतुलन राखणे जरुरी आहे. ध्यान म्हणजे तुमच्या बौद्धिक यंत्रणेची डागडुजी करणे होय.  त्याला टाकून देऊ नका. आम्ही असे कधीही म्हणत नाही, ‘विश्लेषण करू नका, स्वतःची बुद्धी बंद करून ठेवा!’. बिलकुल नाही! तुम्ही तुमच्या बुद्धीचा अधिकाधिक उपयोग केला पाहिजे, पण वेळोवेळी त्याची डागडुजीसुद्धा करा.

प्रश्न : गुरुदेव, कर्म शास्त्राच्यानुसार तुमच्या पुर्वसंचीतानुसार गोष्टी तुमच्या नशिबी येतात, आणि आकर्षणाच्या नियमानुसार जाणतेपणी किंवा अजाणतेपणी तुम्ही स्वतःचे अनुभव स्वतःच निर्माण करीत असता. मी गोंधळलेलो आहे. कृपा करून समजावा.

श्री श्री : असे काही कर्म आहेत जे तुम्ही पुसून टाकू शकता. असे काही कर्म आहेत जे तुम्ही पुसून टाकू शकत नाही; महामार्गावरून खाली उतरण्याचा तो निर्गम मार्ग आहे, तुम्ही केवळ याच ठिकाणाहून निर्गम करू शकता. जर तुम्ही तो निर्गम मार्ग चुकावलात तर तुम्हाला गाडी सरळ चालवत नेण्याशिवाय आणि पुढच्या निर्गम मार्गापर्यंत पोहोचणे याशिवाय काही पर्याय नाही.

जीवन हे असेच आहे; अनेक निवडी आहेत ज्या तुम्ही करू शकता; अनेक मोक्याची वळणे येतात जिथे तुम्ही वळू शकता, परंतु तुम्ही एक ठिकाण चुकवले तर तुम्हाला पुढचे वळण येईपर्यंत थांबावे लागेल. काळजी करू नका; जीवनमार्गावर अनेक मोक्याची वळणे येतात. आता, जर तुम्ही दोन मोक्याच्या वळणांवर असाल तर तुम्हाला असहाय्य वाटेल; आणि ते प्रारब्ध आहे.

प्रश्न : गुरुदेव, मी विचार करतो की जीवन हे एक मायाजाल आहे. या आपल्या जीवनात आपले कशावरही नियंत्रण आहे का? जन्म आणि मृत्यू यावर आपले नियंत्रण आहे का? कृपा करून हे स्पष्ट करून सांगाल का?

श्री श्री : होय, आपले नियंत्रण आहे. जर आपले कशावरही नियंत्रण नाही तर मग प्रश्न विचारण्याचे तरी कष्ट कशाला घ्या?

जीवन हे इच्छास्वातंत्र्य आणि प्रारब्ध या दोहोंचा सुंदर मिलाफ आहे.  अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता, आणि काही गोष्टी ज्या तुमच्या नियंत्रणाच्या पलीकडच्या आहेत त्यांचा तुम्ही स्वीकार केला पाहिजे.

या सर्व विषयांबद्दल मी ‘Celebrating Silence’ या आणि बाकीच्या पुस्तकांमध्ये बोललो आहे; त्यांची पाने चाळीत राहा.

कचराकुंडीतील हिरा

27
2013
Jul
बून, नॉर्थ कँरोलीना


जीवन हा एक उत्सव आहे. तो साजरा करण्यासाठी मिळणारी प्रत्येक संधी पकड आणि ती वापरा आणि कृतज्ञ रहा.

उत्सव कसा साजरा होईल? केवळ फुले आणि फुगे लावून उत्सव साजर होत नाही; त्याच्यासाठी आतून भावना असल्या पाहिजे. उत्सव साजरा होणे हे घडून येण्याकरिता कोणती कौशल्ये आणि परिस्थिती असणे आवश्यक आहे? तुम्ही याचा कधी विचार केला आहे का?

(श्रोते : कृतज्ञ वाटणे, आनंदी वाटणे) 

हे तर इकडे आड तिकडे विहीर असे झाले,जर तुम्ही उत्सव साजरा करता तर तुम्ही आनंदी आहात;जर तुम्ही आनंदी आहात तर तुम्ही उत्सव साजरा करता.

(श्रोते : समाधान, चांगली सांगत, उत्सव साजरा करण्याकरिता कोणी सोबत असणे, घरच्यासारखे वाटणे,सुरक्षिततेची भावना असणे) 

होय, जर तुम्ही भेदरलेले असाल तर तुम्ही उत्सव साजरा करू शकत नाही. प्रेमात असणे; तद्भावितेची भावना असणे!

(श्रोते : चांगले अन्न) 

निश्चितच, अन्न हा उत्सव साजरा करण्याचा भाग आहे. जर तुम्ही उपाशी असाल तर तुम्ही उत्सव साजरा नाही करू शकत!

(श्रोते : अन्न आणि पेय यांची देवाणघेवाण) 

ऐका, अन्न आणि पेय यांची देवाणघेवाण करणारी माणसे यांना तुम्ही खरोखर आनंदी असे पाहता का? किंवा ते उत्सव साजरा करीत आहेत असे वाटते का? त्यांच्या चेहऱ्यांकडे पहा!

नंतर आपल्याला पाहिजे पवित्रातेची भावना. 

जेव्हा तुम्हाला शुद्ध वाटते तेव्हा तुम्ही उत्सव साजरा करू शकता. जेव्हा तुम्हाला घाण वाटत असते तेव्हा तुम्ही साजरा करू शकता का? जर तुम्ही जलःनिसारणाचे काम करीत आहात आणि तुम्हाला कोणीतरी बोलावून म्हणाले, ‘चला, आपण उत्सव साजरा करू या’, तुम्ही म्हणाल, ‘नाही, मी घाण आहे. मला अंघोळ करू दे, नंतर मी येईन आणि साजरा करीन’. असे नाही का तुम्ही म्हणत?

तर तुम्हाला साजरा करण्यासाठी काय पाहिजे? पवित्रातेची भावना; स्वच्छता. उत्सव साजरा तेव्हाच होतो जेव्हा तुम्हाला आतून आणि बाहेरून स्वच्छ वाटते. जे लोक स्वतःला सर्वात वाईट पापी समजतात ते उत्सव साजरा करू शकत नाही कारण अपराधीपणाची भावना आणि पाप त्यांना आतून खात असते. म्हणून आतून आणि बाहेरून पवित्रातेची भावना.

या गुरु पौर्णिमेला मला तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवून पाहिजे, तुम्ही एक हिरा आहात; कदाचित सध्या एका कचराकुंडीत असाल!

म्हणून, जेव्हा तुम्हाला अपवित्र वाटत असेल तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही एक हिरा आहात. तो एका कचराकुंडीत असू शकतो पण एक हिरा कधीही अपवित्र असू शकत नाही.

जर कचराकुंडीत हिरा असेल तर तुम्ही तो फेकून देणार का? नाही, तुम्ही तो उचलाल आणि तो धुवून घ्याल. हे सर्व सराव तुम्ही करता ते असते हिऱ्याचे धुणे, बस्स!

तुम्हाला हिरा धुण्यासाठी किती अवधी लागतो? तुम्हाला तो घासावा लागतो का? नाही, केवळ थोडेसे पाही, कदाचित चिमुटभर साबण. त्याचप्रमाणे, सोsहम सोsहम, बस्स इतकेच, आणि तो हिरा पुन्हा पवित्र होतो.

जेव्हा तुम्हाला हे कळेल की नित्य शुद्धोहम  म्हणजेच मी नेहमीच पवित्र आहे,  तेव्हा तुमच्या जीवनातील उत्सव साजरा होणे कधीही थांबणार नाही.

अंगभूतरित्या आपण सगळे स्वभावाने पवित्रच आहोत; परंतु ज्या क्षणी तुम्हाला हे जाणवते, की तुम्ही पवित्र आहात, तुमचे हृदय पवित्र आहे, तुम्ही या ग्रहावर किंवा इतर कोणत्याही ग्रहावर कोणचेही वाईट चिंतीत नाही, तेव्हा तुम्ही प्रेम असता. 

जेव्हा तुम्हाला जाणवते की तुम्ही पवित्र आहात तेव्हा तुम्ही प्रेम असता आणि तुम्ही फुलून येता. आणि मग तुमच्या आत एक प्रकारची जागरुकता असते, जागेपणा असतो.

तुम्ही नेहमीच पवित्र होतात, आणि मौन हे या पवित्रतेचा सुवास असतो. मौन, आणि ही जाणीव की मी नेहमी पवित्र आहे, यामुळे तुमचे जीवन हे एक उत्सव बनते. मौनातून निर्माण होणारा उत्सव हा खरा उत्सव असतो कारण तो गहनतेमधून निर्माण होतो.

आता तुम्ही साबण आणि पाणी आणि सर्व काही वापरले आहे हिरा साफ करायला (आर्ट ऑफ लिविंगच्या मौनाच्या शिबिराला उल्लेखून), आता हिरा चमकतो आहे, आणि तो उत्सव आहे साजरा करणे. तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये एक सच्चेपणा आहे; तुमचे हास्य हे सच्चे आहे.

काही लोकांचे हास्य तुम्ही पहिले आहे का? ते हास्य आतून येत नाही; ते कृत्रिम हास्य असते. लोक म्हणतात, ‘तुमचे स्वागत आहे’, पण ते इतके कृतीम स्वागत असते.

लोक म्हणतात, ‘अनेक धन्यवाद’,पण ते धन्यवाद इतके कृत्रिम असते. ते केवळ वरवरचे असते, कारण आतून तिथे मौन नसते, तिथे असते क्षुब्धता, अपवित्रातेची भावना, पापाची भावना; हे सर्व आतून खदखदत असते.

मानवी जीवन हे उत्सव साजरा करण्याच्या लायकीचे आहे. त्याच्यामध्ये आपण आपल्या आत जे काही भरतो त्यापासून सुटका करण्यायोग्य ते आहे.

आपण काय करतो तर दागिन्यांच्या डब्यामध्ये आपण कचरा भरून ठेवतो. कचराकुंडीमध्ये दागिन्यांचा डबा नसतो तर आपण दागिन्यांच्या डब्यामध्ये कचरा टाकणे चालू ठेवतो. आपल्याला केवळ तो कचरा काढून टाकायचा आहे.

तुम्ही शुद्ध प्रेम आहात हे लक्षात घ्या. आपण पाप केले आहे आणि आपण पापी आहोत असा विचार करण्याची आपल्याला सवय लावल्यामुळे आपण आपल्या स्वतःवर इतके कडक असतो. आणि आपण स्वतःवर इतके कडक असतो म्हणून आपल्याजवळील सुंदर गुण, आपल्याला मिळालेले वरदान यांना आपण ओळखत नाही.

या सुंदर ग्रहावर आलेला प्रत्येक जण भरपूर सुंदर गुण घेऊन आलेला आहे; आपण या ना त्याप्रकारे हे केवळ ओळखत नाही.

गुरु पौर्णिमा ही तुम्ही सुंदर आहात हे तुम्ही ओळखण्याचा उत्सव साजरा करणे आहे. जेव्हा तुम्ही ही सुंदरता आणि तुम्हाला मिळालेले वरदान ओळखता केवळ तेव्हाच तुम्हाला कृतज्ञ वाटेल. ती कृतज्ञता गुरु परंपरेप्रती व्यक्त करणे म्हणजेच गुरु पौर्णिमा होय. 

ते खरे साजरा करणे होय.

आपण मौनातून बाहेर आलो आहोत (आर्ट ऑफ लिविंगच्या मौनाच्या शिबिराला उल्लेखून), परंतु आपण तरीसुद्धा आपल्या आत मौन घेऊन चालत आहोत. आता हे ओळख की तुम्ही हिरा आहात; कदाचित कचराकुंडीतील,पण हरकत नाही.

याचा अर्थ असा नाही की तुम्ही उदास व्हावे, तुम्ही क्रोधीत होऊ नका, तुम्ही ते सगळे करू नका जे तुम्ही करत आहात. किंवा तुम्ही सदैव गोड गोड असा आणि कोणावरही वैतागू नका; नाही, तुम्ही हे सर्व करू शकता!तुम्हाला दैनंदिन जीवनात जे काही करणे आवश्यक आहे ते तुम्ही सर्व करा. तरीपण हे लक्षात ठेवा की तुम्ही ज्या कृती करीत आहात त्याच्यापेक्षा तुम्ही खूप मोठे आहात. तुमच्या आजूबाजूला जे प्रसंग आहेत, तुमचे विचार, तुमची भावनिक रचना आहे त्यापेक्षा तुम्ही खूप मोठे आहात. तुम्ही स्वतःबद्दल जो विचार करता त्यापेक्षा तुम्ही खूप मोठे आहात. पुनःपुन्हा हे ओळख, ‘मी एक हिरा आहे, पण दुर्दैवाने, मी कचराकुंडीत पडलेलो आहे. आता मी त्याच्यातून बाहेर पडत आहे आणि स्वतःला स्वच्छ धुवून काढत आहे!’ 

ही वार्षिक धुलाई असेल किंवा वर्षातून दोनदा धुलाई असेल, मग तुमच्या लक्षात येईल की ज्याला तुम्ही स्वतःचे समजून घट्ट कवटाळून बसला होतात ते तुमचे नव्हतेच. तुम्ही सदैव पवित्र होतात.

हे ओळखणे किंवा याच्यावर विश्वास ठेवणे इतके कठीण आहे का? तुम्ही पवित्र आहात आणि काहीतरी खूप सुंदर आहात केवळ हे ओळखण्यासाठीच आपण सुदर्शन क्रिया आणि इतर सगळे सोपस्कार करतो.

तुम्ही एक हिरा आहात, सदैव पवित्र आहात याच्यावर विश्वास ठेवणे तुमच्यापैकी कितीजणांना अवघड वाटते? (श्रोत्यांपैकी काहीजण हात वर करतात)

अरे, तुम्हाला अवघड वाटते? तुम्हाला अजून दोनेक मौनाचे शिबीर करायला पाहिजे; कदाचित केवळ एकानेच काम बनेल. तुमच्यापैकी कितीजणांना त्याच्याबरोबर जोडता आले, हात वर करा? (श्रोत्यांपैकी काही जण हात वर करतात)

अरे व्वा, मला थोडे बरे वाटले!तुमच्यापैकी निदान थोड्यांना तरी कळते आहे की मी काय म्हणतो आहे ते. मस्त!

गुरु पूजेच्या सुरुवातीला आपण मंत्रोच्चार करतो :

‘अपवित्रः पवित्रो वा सर्ववस्थान गतो पि वा. या स्मरेत पुंडरीककाशं, स बाह्य अभ्यंतरा सूची हि.’

पवित्र किंवा अपवित्र, तुम्ही कसेही असा (तुमचे इतके अधःपतन झाले असेल कि तुम्ही दलदलीमध्ये एकदम खोलात असाल) तरीसुद्धा हे लक्षात ठेवा की तुम्ही कमळ (कमळाचे फुल हे चिखलात फुलते पण त्याला कधीच चिखल लागलेला नसतो किंवा ते त्या चिखलात अडकून नसते.) आहात. सत् हे कमलाप्रमाणे फुलून आलेले आहे. (पुंडरीक चा अर्थ आहे कमलाप्रमाणे फुलणे). 

सत् हे साक्षीदार आहे; जेव्हा तुम्हाला माहिती असते की तुम्ही साक्षीदार आहात तेव्हा तुम्हाला आंतरिक आणि बाह्य पवित्रता ताबडतोब मिळते (स बाह्य अभ्यंतरा).

या स्मरेत पुंडरीककाशं;  हे म्हणजे केवळ कमलनयन असलेल्याची आठवण करणे असे नाही.

इथे दोन गोष्टी आहेत; आकाशं (डोळा) म्हणजे साक्षीदारसुद्धा होय. पुंडरीक  (कमळ) म्हणजे फुलणेसुद्धा, तरीसुद्धा चिखलाने ना बरबटलेले ना चिखलाचे डाग पडलेले.

म्हणून, जेव्हा चैतन्य फुलून येते तेव्हा ते डागरहित आणि अस्पर्शित असते, त्याच वेळी ते साक्षीदार असते आणि ते जागृत चैतन्य असते. 

जागृत चैतन्याच्या नुसत्या आठवणीने तुम्हाला पवित्र वाटते.

जेव्हा साक्षात्कारी गुरु परंपरेबरोबर तुम्हाला जोडलेले वाटते तेव्हा अचानकपणे पावित्र्य उदय पावते. जेव्हा तुम्ही अतिशय प्रेम करीत असलेल्या व्यक्तीबद्दल विचार करता तेव्हा तुमच्यात प्रेम जागृत होते. जेव्हा तुम्ही तुमच्या शत्रूचा किंवा तुम्हाला आवडत नसलेल्या व्यक्तीचा विचार करता तेव्हा एक अप्रिय संवेदना तुमच्या शरीरात उठते; तुमच्या शरीरातील प्रत्येक पेशी क्षोभित होऊन उठते. ज्याचा कशाचा किंवा ज्याचा कोणाचा आपण विचार करतो, ते आपल्या शरीरात घडते. म्हणून, जेव्हा तुम्ही साक्षात्कारी लोकांबद्दल विचार करता तेव्हा तुम्हाला जाणवते की तुमच्यात एक पावित्र्याची भावना उदय पावत आहे.

जर तुम्ही कोणा अतिशय लोभी किंवा महत्वाकांक्षी व्यक्तीचा विचार करता तेव्हा त्याप्रकारची कंपने तुमच्यात उठतील. जर तुम्ही कोणा अतिशय शांत किंवा आनंदी व्यक्तीचा विचार कराल तर तुम्हाला तशीच कंपने जाणवतील. तुमचे चैतन्य आनंदाची तीच भावना पकडेल.

तुम्ही कोणाचा तिरस्कार का करता कामा नये? याचे कारण असे की तुम्ही ज्याचा कोणाचा तिरस्कार करता ती व्यक्ती तुमच्या चैतन्याच्या मोठ्या भागाला अडवून बसते.

ज्याचा कोणाचा तुम्ही विचार करता, तुम्ही त्याचे गुण स्वतःमध्ये आत्मसात करता.  म्हणून, जेव्हा तुम्ही फुललेल्या, साक्षीदार असलेल्या उच्चकोटीच्या परंपरेच्या चैतन्याचा विचार करता तेव्हा अचानक तुम्हाला स्वतःच्या आत आणि आपल्या आजूबाजूला पावित्र्य जाणवते. हे इतके वैज्ञानिक आणि खरे आहे.

ध्यान करताना भगवान बुद्ध यांच्या मूर्ती का ठेवल्या होत्या हे तुम्हाला माहिती आहे?

जेव्हा बुद्ध देह सोडून गेले तेव्हा त्यांनी बुद्धांच्या मूर्ती ठेवणे सुरु केले. जेव्हा तुम्ही बुद्धाच्या मूर्ती समोर बसतो तेव्हा तुम्ही बुद्धाप्रमाणे बसणे सुरु करता. तुम्ही तुमचे डोळे बंद करता आणि तुम्हाला जाणवते की तुम्ही ती स्तब्धता आत्मसात करीत आहात. बुद्धाची मूर्ती ठेवण्यामागे ही अस्सल कल्पना होती. आज, मोठ्या, महागड्या मुर्त्या ठेवणे याची केवळ टूम निघालेली आहे.

महत्व मूर्तीला नाहीये तर तुम्ही मूर्तीप्रमाणे,तुमच्या चेहऱ्यावर हास्य ठेवून बसणे याला आहे. शिथिल व्हा, तुम्ही उगीचच ज्याला पकडून बसले आहात त्याला सोडून द्या. लक्षात घ्या, ‘मी हिरा आहे, सदैव पवित्र.’ मग तुम्ही ते गुण तुमच्यात आत्मसात कराल.

प्रत्येकाचे चैतन्य हे समृद्ध आहे आणि चांगल्या गुणांनी युक्त आहे. तुम्हाला बाहेरून उसने घेण्याची गरज नाही, ते तिथे आधीपासूनच आहे. त्याला केवळ थोड्याफार पोषणाची गरज आहे. कमळाच्या फुलाप्रमाणे; सगळ्या पाकळ्या आधीपासून तिथे आहेत, त्याला केवळ उमलण्याची,उघडण्याची आणि स्वतःचे ऐश्वर्य दाखवण्याची गरज आहे,  त्याचप्रमाणे, प्रत्येक व्यक्तीमध्ये हे गुण आहेत.

गुरु पौर्णिमेच्या दिवशी, वर्षातून एकदा, तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही ही सुंदर मुल्ये आत्मसात केली, आणि कृतज्ञ राहा. जितके अधिक कृतज्ञ तुम्ही राहत तितके अधिक वरदान तुमच्या जीवनात प्राप्त होईल.

म्हणून, मौनामध्ये उत्सव साजरा होतो, एका पवित्रतेच्या भावनेने, आणि सहभागीपणाच्या भावनेने.

सेवा टीममधील लोक हे सेवा केल्यामुळे त्यांना किती चांगले वाटते हे वाटून घेत होते. जेव्हा तुम्ही वाटून घेता तेव्हा मिळणारा आनंद हा निराळाच असतो, आणि तेच साजरा करणे असते.

जर अजून काही असेल तर मला सांगा, आपण ते जोडू.

(श्रोते : हो, देवाबरोबरसुद्धा उत्सव साजरा करणे)

फक्त जागे व्हा !

21
2013
Jul
मोन्त्रेअल, कॅनडा.

प्रश्न: गुरुदेव, तुम्ही आम्हाला या आयुष्यात भेटलात. मला असे वाटते कि तुम्ही पृथ्वीवर क्वचित येता, तेंव्हा जो पर्यंत आपली पुढच्या कोणत्यातरी जन्मात भेट होत नाही तोपर्यंत आमचे काय होते? आम्ही हे सर्व विसरून जाणार काय ? आम्ही ज्ञान ग्रहण करीत राहणार काय ?

श्री श्री : तुम्ही हे ज्ञान विसरणार नाही!

म्हणून तर जेंव्हा आपण गुरु पौर्णिमा साजरी करतो, तेंव्हा आपण आपली किती प्रगती झाली ते बघतो आणि आपण सर्व ज्ञान विसरलो नाही ते बघतो.

तुम्ही जर १० पावले पुढे गेलात तर असे वाटेल कि तुम्ही ८ पावले मागे आलात, पण सर्व १० पावले मागे जाणार नाही. तसेच तुम्हाला जी आठ पावले वाट आहेत ती चार-पाच किंवा तीन-चार पावले असतील. त्याचा फारसा विचार करू नका, मी ते फारसे लक्षात घेत नाही, तुम्ही पण ते मनावर घेऊ नका!

आपण एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायला पाहिजे ती म्हणजे, ' आपल्या मनासारखे होवो किंवा न होवो, मी आनंदी राहणे सोडणार नाही. मी नेहमी आनंदी राहणार !'

तुम्ही दुखी राहून ज्या होणार आहेत त्या गोष्टी बदलणार नाहीत. तुम्ही काही मोठे काम करायला घेता, आणि का कोणास ठाऊक ते काही पूर्ण होत नाही. पण मग ते पूर्ण झाले नाही तरी तुमच्याकडे जे आहे ते कशाला घालवायला पाहिजे. तुमचा जो काही आनंद आहे तो त्यामुळे वाया घालवू नका. तुम्ही एवढे जरी लक्षात ठेवले तरी ते पुरेसे आहे !

साधनेचा काय अर्थ आहे ते तुम्हाला माहित आहे काय? साधना म्हणजे एक अशी अनुभूती कि ' मी देवाच्या जवळ आहे.मी वैश्विक चेतनेच्या जवळ आहे. मी त्या परमात्म्याशी संबंधित आहे.' हा एवढा संबंध पुरेसा आहे. तुम्ही एवढे लक्षात ठेवले तरी तुम्ही तुमच्या साधनेत यशस्वी व्हाल आणि मग इतर काही करण्याची गरज नाही.

मी तुम्हाला ध्यान सोडायला सांगत आहे असा याचा अर्थ काढू नका. तुम्हाला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य देणारे ध्यान, प्राणायाम वगैरे सर्वकाही चालू ठेवा. पण अध्यात्मिक दृष्टीने तुम्हाला ते माहित पाहिजे आणि तुम्ही त्याची अनुभूती घ्यायला पाहिजे.

त्यासाठी तुम्हाला असे वाटले पाहिजे कि, ' मी त्या परमात्म्याशी संबंधित आहे, मी देवाच्या संबंधित आहे, मी गुरूच्या संबंधित आहे. हे सर्व एकच आहे. मी माझ्याशी संबंधित आहे.

मनाला काही गोष्टी पटतात आणि काही पटत नाहीत.

काही वेळा बुद्धीला असे वाटते कि मी बरोबर आहे, ते तसे असू शकते, पण त्याचा फार विचार न करता ते बाजूला ठेवा. कृतीच्या मर्यादित क्षेत्रात काही कृती या इतर कृतींपेक्षा चांगया असतील. काजी वेळा या कृती चांगल्या वाटतील तर कधी त्या कृती चांगल्या वाटतील. सर्व कृतींमध्ये काही त्रुटी असतात, काही मर्यादा असतात आणि सर्व कृतींना फायदे असतात. जी सर्वांगाने उत्तम असेल अशी एकपण कृती नाहीये. असे काही वेळा वाटते, पण वाटणे आणि असणे यात फरक असतोच !

तुमचे मुख्य लक्ष म्हणजे ज्ञान मिळवणे आणि ते घोकून पाठ करणे होय. म्हणून, तो आनंद जपून ठेवा! हे सांगायला खूप सोपे आहे हे मला माहित आहे. तुम्ही असे म्हणू शकता, ' गुरुदेव, तुमच्यासाठी ते सोपे असेल , पण माझ्यासाठी ते सोपे नाहीये, तर अवघड आहे.' 

मला हे चांगले माहित आहे, पण काही झाले तरी तो आनंद सोडू नका, असे तुम्हाला सांगण्याचा मोह मी टाळू शकत नाही !

तुम्ही तुमचे नातेसंबध हरवून बसला असाल, पण तुमचे स्मित-हास्य हरवू नका.

तुमचे एक नाते हरवून बसला असाल, पण काही हरकत नाही, तुमच्यासाठी सात कोटी लोक आहेत ! दुसरे कोणीतरी येईल आणि तुम्हाला शोधून काढील. तुम्ही जर तुमचे स्मित-हास्य शाबूत ठेवले तर तुमच्या आयुष्यात दुसरे कोणी येईल. नाहीतर उदास माणसाबरोबर मैत्री करायला कोण येणार? तुम्ही जर निराश झाले असाल, किंवा हताश दिसत असाल, तर तुम्हाला दुसरा मित्र किंवा मैत्रीण कशी मिळणार! तुमच्याकडे कोणी बघणार नाही आणि लांब चेहरा करून बसलेल्या माणसाकडे कोण आकर्षित होणार.

तुम्ही जेंव्हा जोडीदार शोधात असता तेंव्हा उत्साह आणि स्मित हास्य यांची गरज असते. 

आता तुम्हाला जर नोकरी नसेल तर ते ठीक आहे.

लांब चेहरा केलेल्या आणि निराश झालेल्या माणसाला कोण नोकरी देणार? असे पहा कि आयुष्य चालू राहील. तुम्ही काही उपाशी राहून मारणार नाही. तुम्हाला सर्व काही मिळेल ! तुम्ही परमात्म्याशी, वैश्विक चेतनेशी संबधित असे आहात. तुम्ही अध्यात्माच्या मार्गावर आहात.

'काहीही झाले तरी मी चालत राहणार आहे ! नोकरी मला शोधात माझ्या दाराशी येईल. तरीसुद्धा मी ती शोधात राहिले पाहिजे!'

तुम्ही जर असे केले तर आर्ट ऑफ लिविंग चे उदिष्ट साध्य झाले असे म्हणावे लागेल ! 

समजा तुमचे घरातील कोणाशी जर भांडण झाले तर तुमच्या चेहऱ्यावर हसू परत यायला फारसा वेळ लागत नाही. तुमचे भांडण हे भ्रमण ध्वनीच्या एखाद्या सोई सारखे असावे, म्हणजे, ऑडीओ, विडीयो, कॅमेरा. तुमचा भ्रमण ध्वनी काही फार वेळ कॅमेरा या सोयीत राहू शकत नाही, तो लवकरच इतर सोई वापरू शकला पाहिजे, होय कि नाही ?

त्याप्रमाणे मन हे भांडणाच्या अवस्थेत असायला हरकत नाही पण पुढच्या मिनिटात हि अवस्था बदलायला पाहिजे !

तुमच्यातील काहींना सुटका झाल्यासारखे वाटत असेल, गुरुदेवांनी भांडणाला परवानगी दिली आहे! मनावरचे ओझे उतरल्यासारखे झाले असेल!

काही काळजी करू नका , तुम्हाला जर भांडायचे असेल तर जरूर भांडा, पण लगेच हास्य चेहऱ्यावर परत येऊ देत. बदल व्हायला पाहिजे! तुमच्यात ती क्षमता आहे! मला तुम्ही भाजीपाल्यासारखे झालेले आवडणार नाही , फक्त होयबा असलेली कमकुवत मनाची माणसे मला आवडत नाहीत.

मला तुम्ही मजबूत आणि हसरे, मजबूत आणि सूक्ष्म, समजदार आणि संवेदनशील असे हवे आहात, पण सर्व एका वेळी.

अशी काही माणसे असतात कि जी समजदार असतात पण ते एखाद्याचा मुर्खपणा सहन करू शकत नाहीत. जेंव्हा तुम्ही मुर्खपणा सहन करू शकत नाही तेंव्हा तुमची संवेदनशीलता घालवून बसता, होय कि नाही?

असे पण काही लोक असतात कि जे संवेदनशील असतात पण समजूतदार नसतात. ते एवढे संवेदनशील असतात कि ते बोलत असताना जर कोणी जांभई दिली तर ते म्हणतील, ' बघा, मी जे सांगतो आहे त्यात त्यांना काहीच रस नाहीये!

तुम्हाला माहित आहे कि काही ठिकाणी जांभई हे घटस्फोटाचे कारण झाले आहे?

पत्नी म्हणाली, ' जेंव्हा मी माझ्या पतीशी बोलायला लागते तेंव्हा ते जांभया द्यायला सुरवात करतात, त्यांना माझ्या बोलण्यात काही रुची नाहीये. हा खरे तर माझा अपमान आहे. प्रत्येक वेळी मी जेंव्हा त्यांच्याशी बोलायला जाते तेंव्हा ते जांभया द्यायला लागतात.'

म्हणून, जे लोक फार संवेदनशील असतात ते समजूतदार नसतात. तुम्ही संवेदनशील आणि समजूतदार असे दोन्ही झालेले मला पाहिजे आहे.

आता परत पाहिल्यासारखे म्हणू नका, ' अरे, मी समजदार आहे आणि संवेदनशील नाही' किंवा 'मी समजदार नाही पण संवेदनशील आहे.'

परत तसे म्हणू नका. हे तुमच्या मनात ठेवा , बघा ते कसे तिथे राहते.

आत्म-ज्ञान कसे मिळविले जाते? त्याला संस्कृतमध्ये प्रत्याभिज्ना असे म्हणतात.( हा एक असा सुंदर शब्द आहे कि ज्याच्यासारखा शब्द इतर भाषेत सापडत नाही.)

प्रत्याभिज्ना म्हणजे जाणून घेणे. प्रत्याभिज्ना हृदयं म्हणजे हृदयाने स्वतःला जाणून, उमजून घेणे. हे ज्ञान म्हणजे एवढेच आहे. हे संतुलन, हे ध्यान, आपण ज्या तीन गोष्टी शिकलो ते, म्हणजेच उत्साह , दया आणि वैराग्य. ज्ञान हे कोणत्याही कृतीने नव्हे तर फक्त जाणून घेण्याने मिळते.

उदाहरणार्थ, लोक आपला चष्मा डोक्यावर सरकवून ठेवतात आणि मग सगळीकडे शोध सुरु करतात कि चष्मा कोठे ठेवला.

मग कोणीतरी त्यांना सांगते, ' अरे, तो तर तुमच्या डोक्यावर आहे.'

मग त्यांच्या लक्षात येते, ' अरे खरच कि.'

म्हणजे, ज्ञान लगेच फळ देते. तुम्ही काही करायची आवश्यकता नाही, कोठले कर्म किंवा कोणती कृती यांची गरज नाही.

तुम्ही चष्मा शोधत होता आणि अचानक तुमच्या लक्षात येते कि तो तेथे आहे. म्हणजे तुमचे चष्म्याबद्धलचे ज्ञान हे चष्म्याबरोबर येते.तुम्हाला तो मिळाला कारण तो तेथेच होता. ज्ञान आणि ज्ञानाची जाणीव यात काहीच अंतर नाही.

मी आता हे अजून सोपे करून सांगतो. असे समजा कि तुम्हाला सफरचंदाच्या पाय विषयी माहिती आहे, पण तुमची त्याविषयी माहिती आणि ती सफरचंदाची पाय, म्हणजे ती मिळवून खाण्यात यात खूप अंतर आहे. पण चष्मा तुमची डोक्यावर आहे यात हे ज्ञान म्हणजेच त्याचे फळ होय. या ज्ञानाचा निकाल आपल्याला लगेच प्राप्त झाला. कारण त्याच्यामध्ये कोणतीही कृती नव्हती.

गुरु-वाणी, म्हणजे ज्ञानाचे शब्द, म्हणजे तुम्ही ते शब्द ऐकता (ज्ञानाचे) आणि ते लगेच तुम्हाला प्राप्त होतात. त्यासाठी वेगळे काही करावयाची गरज नसते.

असे पहा कि तुम्ही सुंदर आहात. पण तुम्ही सुंदर आहात हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला काही करायची गरज नसते. आले लक्षात?

आता पर्यंत मी तुम्हाला हे सर्व करायला सांगत होतो, प्राणायाम, सत्संग, भजन, भक्ति करा. पण आता मी तुम्हाला पूर्णपणे वेगळी गोष्ट करायला सांगणार आहे, ती काय? तर फक्त जागे व्हा!

तुम्ही जागे कसे होता? हा काही प्रश्न नव्हे. तुम्ही माझे बोलणे ऐकले आहे , आणि तुम्ही जागे झाले आहात.

जर कोणी झोपले असेल तर तुम्ही म्हणता, 'अरे, जागा हो!'

पण जेंव्हा ते तुमचे जागे करणे ऐकतात, तेंव्हा ते जागे झालेले असतात, होय कि नाही ? हेच तर ते आहे, तात्काळ ! सिद्धी माहित असणे, ती मिळविणे आणि त्याबद्धल माहिती असणे यात काहीच अंतर नाही. हेच तर ते!

आता पहा, तुम्हाला आतून किती बरे वाटत असेल ते! अचानक तुम्ही म्हणता कि, ' मला आता काही करायची गरज नाही.'

कोणी जर म्हणाले कि तुम्ही सुंदर आहात, तर आता तुम्हाला सौंदर्यप्रसाधने वापरायची गरज नाही, कारण तुम्ही सुंदर आहात , यावर फक्त विश्वास ठेवा.

आता तुम्ही असे म्हणू शकता , ' नाही, मी सुंदर नाही, पहा माझे नाक कसे वाकडे आहे ते, माझ्या भुवया खूप छोट्या आहेत. मला हाताच्या, पायाच्या निगेची गरज आहे ? माझ्या या भुवया काढून घ्या आणि मला चांगले दिसण्यासाठी काहीतरी करा.'

मी म्हणेन, ' अरे, तुम्ही खरोखरच सुंदर आहात.' यातच सगळे आले.तुम्ही काही वेगळे सौदर्य प्रसाधन वापरण्याची गरज नाही !

पण तुम्हाला जर असे वाटत असेल कि तुम्ही सुंदर नाही आणि तुम्हाला सौंदर्य वाढविण्यासाठी सौंदर्य-तज्ञांकडे जाऊन फौंडेशन लावून, त्यावर तुमचे गाल लाल दिसण्यासाठी गुलाबी रंग लावायचा असेल, आणि इकडे थोडा हिरवा, तिकडे थोडा निळा, डोळ्यांवर काही चकाकणारे लावल्यानंतर तुम्ही सुंदर दिसत असे वाटत असेल तर मी काय म्हणणार?

ठीक आहे, तसे करा!

असे पहा कि लोकांच्या मनाची आज अगदी अशीच स्थिती आहे. काही करण्याविषयी त्यांचे विचार इतके ठाम आहेत कि कोणी त्यांना सांगितले कि तुम्ही सुंदर आहात तरी त्यांचा त्यावर विश्वास नाही.

यावर ते म्हणतील, ' नाही, पहिल्या प्रथम मला माझे केस कापायला पाहिजेत, मग मी तो टाय घालीन, आणि मग काहीतरी चमकणारे घालून मग मी छान दिसेन.'

तुम्ही त्या सर्व गोष्टी करू नयेत असे मला म्हणायचे नाही. पण तुम्हाला वरून छान आणि मृदू दिसण्यासाठी त्या गोष्टी वापरायच्या असतील तर एक लक्षात ठेवा कि तुम्ही आतून पण खूप मृदू आणि छान आहात.

अस्पर्श रहा

21
2013
Jul
मोन्त्रेअल, कॅनडा

प्रश्न: गुरुदेव, मला असे सांगण्यात आले आहे कि, मानवी आत्म्यालामुक्ती मिळण्यासाठी एक ते दोन दश लक्ष वर्षे लागतात. रोज क्रिया आणि ज्ञान करून हि मुक्ती एका जन्मात मिळविता येते हे खरे आहे काय?

श्री श्री : प्रत्येक गोष्ट हि एका अदभूत कर्माने बांधलेली असते.तुम्ही डोळे वाट करून या कडे लक्ष देण्याची गरज आहे.

येथे मला एका सुंदर काव्य-पंक्तीची आठवत झाली आहे, त्यात असे म्हटले आहे कि , ' या जगात सर्व आवश्यक एवढी संपत्ती आहे, पण ज्याच्याकडे कर्माचे पुण्य नाही, त्याला ती मिळू शकत नाही'.

म्हणून, तुम्हाला येथे जे काही मिळते किंवा जे मिळत नाही , ते अदभूत कर्मावर अवलंबून असते.

प्रतिष्ठा, पैसा, सत्ता, नातेसंबंध, आरोग्य हे सर्व उत्पत्तीच्या काही कायद्यावर अवलंबून असते.

जेंव्हा चांगली वेळ येते तेंव्हा तुमचे कट्टर शत्रू तुम्हाला मदत करतात आणि जेंव्हा वाईट वेळ येते तेंव्हा तुमचे चांगले मित्र हे शत्रूसारखे वागायला लागतात. ह्या सर्व गोष्टी काही कर्मामुळे घडत असतात.

हुशार माणूस या सर्वात न अडकता, तो आपले काम चालू ठेवतो आणि पुढे जात राहतो.

या साठी जे काही आवश्यक श्रम लागतात ते करून तुम्ही ते सोडून द्यायला पाहिजे.

तुम्हाला हे माहित आहे काय कि भगवान श्रीकृष्ण यांनी तीन वेळेला महाभारतातील युद्ध थांबवायचा प्रयत्न केला होता ?

जेंव्हा कोणीतरी भगवान श्रीकृष्णांना म्हणाले कि, ' जेंव्हा काहीही झाले तरी हे युद्ध होणार हे तुम्हाला माहित होते , तरी तुम्ही ते थांबविण्याचा तीन वेळा प्रयत्न का केलात? तिन्हीवेळा तुमची शिष्टाई फसली तरी तुम्ही का गेलात? ' असा एक चांगला प्रश्न त्यांना केला गेला. 

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ' जर मी गेलो नसतो तर असा प्रश्न उपस्थित झाला असते कि तुम्ही जर शांततेच्या वाटाघाटी करू शकत होता तर तुम्ही त्या का केल्या नाहीत?'

तुमची तुमच्या कर्माविषयी काही कर्तव्ये असतात आणि ती तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत पार पाडावी लागतात !

समजा जर भगवान श्रीकृष्णांची शिष्टाई सफल झाली असती तर, सारे महाभारत तिथेच संपले असते आणि मग गीता कधीच सांगितली गेली नसती ! भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले ते दैवी गीत (भगवत गीता) मग कधीच या जगात अवतीर्ण झाली नसती ! 

म्हणजे, गीता सांगावी लागणार आहे हे माहित असून सुद्धा आणि हे युद्ध होणार आहे हे सुद्धा माहित असून सुद्धा भगवान श्रीकृष्ण हे शिष्टाई करायला गेले होते. कारण तो आमचा धर्म आहे, तो आमचा स्वभाव आहे. आपण आपले प्रयत्न करीत राहायला पाहिजे आणि त्याच्या परिणामाची पर्वा करता कामा नये.

मी काय म्हणतोय ते लक्षात येत आहे काय? हे महत्वाचे आहे कारण या न त्या कारणाने मनुष्य मायेच्या भ्रमात अडकत असतो.

काल तुमच्यापैकी काही लोकांनी भिंतीवर काही चित्रे काढली होती. पाच ते सहा वर्षांनी या भिंतीला परत रंग द्यावा लागेल. त्यावेळी तुमच्या या चित्रांवर दुसरी चित्रे काढली जातील. 

त्याचप्रमाणे, तुम्ही जेंव्हा तुमच्या बगीच्यात काही झाडे लावता त्याबरोबर तेथे गवत पण वाढते. तुम्ही मग ते गवत काढून टाकता. आणि परत जेंव्हा तेथे गवत उगवते तेंव्हा तुम्ही असे म्हणू शकत नाही कि, 'अरे मी तर आताच बाग साफ केली होती पण परत गवत उगवले आहे! ' हे अगदी नैसर्गिक आहे.

मलीन होणे हा शरीराचा गुणधर्म आहे. आंघोळ केल्यावर तुम्ही असे म्हणू शकत नाही कि , ' बस, मी आता सर्व वर्षाची आंघोळ केली आहे.' तुम्ही परत, परत आंघोळ करायची गरज असते.

त्याप्रमाणे, तुमच्या मनाला सारखे मारून मुटकून ज्ञानाची कास धरायला लावली पाहिजे. ते ज्ञानाच्या चार खांबांमधून सहज सुटू शकते.ते चार खांब कोणते तर, विवेक, वैराग्य, आत्म-सैयम आणि जे आहे त्यात समाधानी असणे ( जे आपल्याकडे नाही त्याबद्धल दुखी न होणे) हे होय.आणि मग मोक्षाची अपेक्षा ठेवणे. म्हणून मनाला सारखे ज्ञानाची कस धरायला लावणे! अचानकपणे तुमच्या असे लक्षात येईल कि ज्ञान तर तेथेच आहे.

जेंव्हा तुमचे या कडे दुर्लक्ष होते, तेंव्हा ती एक पायरी असते.

हे सर्व समजून सुद्धा जेंव्हा तुम्ही मायेच्या भ्रमात फसता, तेंव्हा तुमच्या त्या फसण्याचे वाईट वाटून घेऊ नका कारण तसे फसणे अगदी साहजिक आहे. ' अरे, मी ज्ञानाचा उपयोग केला नाही' किंवा ' दुसरे कोणी तरी चूक असेल किंवा मी चूक असेल ! ' असे म्हणू नका.

हि प्रवृत्ती आपल्या समाजात, आपल्या देशात काही काळापासून दिसून येत आहे. आपल्याला त्यातून बाहेर पडणे आवश्यक आहे. काही वेळा तुम्ही त्यातून बाहेर पडता तर काही वेळा तुम्ही त्यात अडकून जाता, होय कि नाही? त्यातून बाहेर पडा आणि मग त्याकडे वस्तुनिष्ठ दृष्टीने पहा. ह्या क्षणाला हे असे आहे कारण आपल्याकडे फक्त हा क्षण आहे ! 

आता क्षणी काही अप्रिय गोष्ट घडत असेल किंवा काही चांगली गोष्ट घडत असेल , मी त्याचा एक केवळ एक साक्षीदार आहे. आणि जर माझे मन त्या मायेच्या भ्रमात अडकून जात असेल तर त्या घटनेचा पण मी केवळ साक्षीदार आहे.

आणि या पद्धतीने तुम्ही परिस्थितीवर मात करता !

योग-सूत्र सांगणारे महर्षी पतंजली म्हणतात, ' स तू दीर्घ काल नैरंताय्रा सत्कार्सेवितो दृढ भूमिय'.

 प्राणायाम, ध्यान आणि ज्ञान याचा तुम्ही दीर्घकाळ अभ्यास केला पाहिजे. संपूर्ण आयुष्य हाच एक अभ्यास आहे आणि जेंव्हा तुम्ही आदराने त्याचा अभ्यास करता, तेंव्हा तुमच्या आयुष्यात त्या ज्ञानाचा पाया घातला जातो.

प्रश्न: गुरुदेव, आतापर्यंत आम्ही ध्यान करताना डोळे मिटून घ्यायचो जेणेकरून आम्हाला अंतर्मुख होता यायचे. आता ध्यान करताना डोळे अर्धवट उघडे ठेवण्याचे काय कारण आहे? 

श्री श्री : बर्याच वेळा जेंव्हा तुम्ही डोळे मिटून घेता तेंव्हा सहजपणे मनाचे खेळ सुरु होतात, किंवा मग स्वप्नावस्था सुरु होते किंवा मग काही वेळा झोप पण लागते. योगाच्या परिभाषेत याला मनोराज्य असे म्हणतात.

मनोराज्य हि एक मनाची अशी एक अवस्था आहे कि ज्यात मन स्वतःचे एक राज्य तयार करते आणि सुखाने किंवा संभ्रमित होऊन त्यात विहार करू लागते. तुम्ही मनातल्या मनात विचार करून किंवा काही कल्पना करू लागता त्यात मग तुम्हाला सुख वाटू लागते किंवा मग तुम्ही दुखी होता.

मग तुम्हाला असे वाटते कि हे सर्व जग तुमच्या विरुद्ध आहे, तुमच्या सासूबाई, तुमचे सासरे, तुमचा पती किंवा पुरुष-मित्र हे सर्व तुमच्या मागे लागले आहेत. किंवा मग तुमचे मन तुम्ही कोणाला कसे पटवायचे किंवा जिंकायचे याचा विचार करू लागते. अश्या तर्हेच्या गोष्टी मग मनात सुरु होतात.

तुम्ही जेंव्हा ध्यानात डोळे मिटून घेता तेंव्हा अशा मनोराज्यात अडकायची शक्यता जास्ती असते.

ध्यान करताना तुम्ही जेंव्हा डोळे अर्धवट उघडे ठेवता, तेंव्हा अशा मनोराज्यात मश्गुल व्हायची शक्यता कमी होऊन एका वेगळ्या ध्यानाची अनुभूती होते.

प्रश्न: गुरुदेव, शिव-तत्व आणि कृष्ण चैतन्य यात काय फरक आहे? 

श्री श्री : शिव-तत्व हि एक संकल्पना आहे , त्याला भौतिक आकार नाही.

कृष्ण हे असे आहेत कि ज्यांनी मानवी रुपात शिव-तत्व आचरणात आणले. कृष्ण हि एक ऐतिहासिक व्यक्ती होती. ते ५११४ वर्षांपूर्वी होऊन गेले.

कृष्ण जरी या ग्रहावर वावरले होते तरी त्यांनी शिव-तत्व आचरणात आणले होते. ते सर्वार्थाने पोकळ आणि रिकामे होते आणि मग त्यांनी वेळो वेळी शिव-तत्वाचा उपयोग केला.

प्रश्न: मला माझे कुटुंब सोडून इतर सर्वत्र जगण्याच्या कलेचा अनुभव येतो. मी यातून का व कसे बाहेर पडावे हे कृपा करून समजावून द्याल काय?

श्री श्री : काही वेळेला, काही लोक काही ठिकाणी इतरांपेक्षा जास्त उपयोग करून घेतात. ती तुमची तपस्या , तुमची साधना आहे. तुम्ही तिथे ते तसे होऊद्यात, त्यापासून लांब पळून जाण्याचा विचार करू नका कारण ती तर तुमची परीक्षा आहे. ती एक परीक्षा आणि एक प्रयोग आहे. त्यापासून तुमची सुटका नाही.

हा ज्ञानाचा तिसरा स्तंभ आहे- शट-संपत्ती (सहा प्रकारच्या संपत्ती), त्यातून तुम्हाला आवश्यक ती शक्ती मिळेल.

प्रश्न: गुरुदेव, शक्ती क्रियेचे फायदे काय आहेत? ती फक्त शारीरिक पातळीवर काम करते कि तिचा मनावर पण परिणाम होतो ?

श्री श्री : दोन्हीकडे. ज्याचा तुमच्या आत्म्याला लाभ होतो, त्याचा तुमच्या शरीराला पण लाभ होतो. जर शरीर ताकतवान आणि आरोग्यपूर्ण असेल तर त्याचा बुद्धी आणि मनावर पण परिणाम होतो.