सुटकेचा केवळ एकच मार्ग

13
2013
Aug
बंगलोर, भारत

सत चित् आनंद  हे देवाचे रूप आहे, जेव्हा आपण देवाच्या जवळ जातो तेव्हा आपण आतून अतिशय आनंदी होतो.

प्रश्न : गुरुदेव, मी गायत्री मंत्राला सार्वजनिक ठिकाणी वाजवलेले ऐकले आहे. दीक्षा घेणे किती महत्वाचे आहे?

श्री श्री : या सर्व तपशिलांमध्ये आपण नंतर कधीतरी जाऊ या.

गा-य-त्री -तीन प्रकारची दुःखे आहेत. आपल्याला तीन शरीर आहेत, भौतिक शरीर, तरल आणि नैमेत्तिक शरीर. आणि या तीनही पातळ्यांवर दुःख आहे. मानवी जीवनामध्ये या तीनही ओलांडून जायचे असते, आणि गायत्रीचा हाच अर्थ आहे. जो ते म्हणतो तो या दुःखाच्या सागरात तरुन परमानंदाकडे जातो.

प्रश्न : गुरुदेव,तुम्ही म्हणालात की संस्कृत भाषेमध्ये पाणी आणि प्रेम यांच्याकरिता एकच शब्द आहे. या संदर्भामध्ये शिवलिंगावर पाणी अर्पण करणे याला काही महत्व आहे का?

श्री श्री : होय,ते प्रतीकात्मक आहे.

प्राचीन काळी लोक हाताच्या ओंझळीत पाणी घेऊन, सूर्याकडे टक लावून पाहायचे आणि ते पाणी अर्पण करायचे. सूर्याकडे टक लावून पाहणे फार चांगले आहे, कारण आपले डोळे हे प्रकाशसंवेदी आहेत. म्हणून सूर्याकडे टक लावून पहिल्याने सूर्याची उर्जा शरीरात येते.

सूर्याकडे टक लावून पाहणे हे आता जगभर माहिती झाले आहे. जेव्हा लोक सूर्याकडे टक लावून पाहतात तेव्हा त्यांची भूक कमी होते, त्यांची प्रतिकारशक्ती वाढते आणि अनेक गोष्टी घडतात.

जगभरात जेव्हा एखाद्याला अतीव वेदना होतात किंवा अतिशय प्रेमाचे भरते येते तेव्हा एक वाक्प्रचार वापरतात. तो वाक्प्रचार काय आहे? मला माझे हृदय रिते करावेसे वाटते आहे.

हृदय रिते करण्यामुळे तुम्हाला अर्पण केल्याची भावना वाटते. म्हणून जेव्हा तुम्ही शिवलिंगाला पाणी अर्पण करता तेव्हा सर्वस्व अर्पण केल्याचे ते प्रतिक असते, जिथे आपल्याला वाटते, ‘माझ्याकडे जे काही आहे, मी जो काही आहे ते सर्व,माझ्या देवा, तुझेच आहे.’

नमः न ममः अशी प्रार्थना आहे, माझे काहीही नाहीये, माझे जीवन माझे नाही,ते संपूर्णपणे तुझे आहे.

तर सर्वस्व रिते करण्याचे प्रतिक म्हणून आपण पाणी घेतो (कारण संस्कृतमध्ये पाणी म्हणजेच प्रेम आहे) आणि शंकराला अर्पण करतो.  तशी शंकराला पाण्याची काही गरज नाही.

प्रश्न : प्रिय गुरुदेव, वैदिक ज्ञान अभ्यासक्रमात सहभाग घेऊ इच्छिणाऱ्यांना गायत्री मंत्र आणि संध्यावंदन  याबद्दल अधिक माहिती पाहिजे आहे. तुम्ही कृपा करून यावर बोलाल का?

श्री श्री : तुम्हाला माहिती आहे जीवन हे चैतन्याच्या तीन पातळ्या आहे- जागृत अवस्था, स्वप्न अवस्था आणि निद्रा अवस्था. जेव्हा जागृत अवस्था संपते तेव्हा स्वप्नावस्था सुरु होते; जेव्हा स्वप्नावस्था संपते आणि निद्रावस्था सुरु होते, आणि जेव्हा निद्रावस्था संपते आणि जागृत अवस्था सुरु होते, या संधीस्थानांवर काहीतरी अप्रतिम घडते. ते काय असते? या तिन्हीच्या पलीकडे असलेल्याची तुम्हाला एक झलक मिळते. 

मनाला केवळ या तीन अवस्थांची अनुभूती होते, परंतु जेव्हा ते थांबते तेव्हा तुम्हाला कोठेतरी एका अवस्थेचा अनुभव येतो जी ना जागृत अवस्था असते ना स्वप्नावस्था असते ना निद्रावस्था असते. आणि हा अनुभव इतका दिव्य असतो. आणि समग्र निर्मितीचा हाच पाया आहे. त्या अवस्थेची झलक ज्याला योग असे म्हणतात. 

आता, हि अवस्था काय करते, ती सर्व गंड दूर करते आणि जीवनाला एक अतिशय रुंद कक्षा देते.

आपण विचार की माझे शरीर, माझे मन इ.इ. हे जीवन आहे,नाही! जीवनात याच्यापेक्षा अधिक भरपूर काही आहे. उदाहरणार्थ हा अनुभव जो विचार आणि भावना यांच्या पलीकडे जातो आणि स्तब्धतेच्या अश्या निराळ्याच पातळीवर जातो ज्याला संध्या असे म्हणतात. वंदन म्हणजे त्या आंतरिक अवस्थेची आराधना करणे.

तुम्ही नेहमी संध्यावंदन कधी करता? जेव्हा संक्रमण होते. जेव्हा सूर्योदय होतो, संपूर्ण सृष्टीचे संक्रमण होत असते. जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा पुन्हा संक्रमण होते. म्हणून नेहमी सूर्योदय, सूर्यास्त आणि दुपारच्या वेळी तुम्ही केवळ बसता आणि ध्यान धरता आणि प्राणायाम करता.

गायत्री मंत्र हे मानव जातीला मिळालेले मोठे वरदान आहे.

तो मंत्र काय म्हणतो? मला दिव्यात्वामध्ये चिंब होऊ दे, आणि देव माझे सर्व पाप नष्ट करू दे. सर्व पाप जाळणाऱ्या हे दिव्य प्रकाशा, मला तुझी आराधना करू दे आणि त्या दिव्य प्रकाशात मी चिंब होऊ दे. आणि ही दिव्यता माझ्या बुद्धीला प्रेरित करू दे.

हे पहा, आपल्या सर्व कृती या आपल्या बुद्धीमार्फतच होतात, बरोबर? विचार येतात आणि मग तुम्ही कृती करता.म्हणून तुम्ही देवाला प्रार्थना करता की चांगले विचार तुमच्या मनात येऊ दे. तुम्ही देवाला प्रार्थना करता, ‘माझ्या बुद्धीला तू काबीज कर. माझ्या बुद्धीला प्रेरित कर’; धियो योनः प्रचोदयात् 

धि  चा अर्थ आहे बुद्धी. माझ्या बुद्धीला तू (देव) मार्गदर्शन कर, प्रज्वलित कर आणि प्रेरित कर.

जेव्हा योग्य विचार येतील तेव्हा तुमची कृती ही नेहमीच योग्य असेल. जेव्हा अंतःस्फूर्तीचे विचार येतील तेव्हा तुमच्या कृतीला फळ मिळेल. म्हणून सर्वोत्कृष्ट विचारांकारिता प्रार्थना करावी. माझे मन, माझ्या जीवनाची संपूर्ण उर्जा ही दिव्यत्वात चिंब होऊ दे. हे ते आहे.

प्रश्न : महिला गायत्री मंत्राचा जप करू शकतात का?

श्री श्री : होय. असे कोठेही म्हंटलेले नाही की महिला करू शकत नाही.

हे फार दुर्दैवी आहे की कधीतरी मध्ययुगामध्ये स्त्रियांचे हे हक्क काढून घेतल्या गेले. आश्रमामध्ये आम्ही हे पुनःस्थापित केले आहे. अनेक स्त्रिया शिकत आहेत.

पहा, तो पुरुषप्रधान समाज होता. पुरुषांनी विचार केला की जर स्त्रियांनी गायत्री मंत्राचा जप केला तर त्याने त्यांना अनेक शक्त्या; रोगनिवारक शक्ती आणि संकल्प शक्ती प्राप्त होतील. ते ज्याची कशाची इच्छा करतील तश्या सर्व गोष्टी घडू लागतील. म्हणून पुरुष म्हणाले, ‘नाही, आपल्या बायका या आधीच इतक्या शक्तिशाली आहेत, आपल्याला त्यांना आणखी शक्तिशाली करायचे नाही. म्हणून आपण त्यांना या मंत्राचा जप करू द्यायचा नाही.’

याच कारणासाठी मुठभर लोकांनी याला अत्यंत संरक्षित गुपित म्हणून जपले.

सामान्य लोकांना योग आणि प्राणायाम हेसुद्धा शिकवले जात नव्हते कारण त्याने इतकी मानसिक शक्ती मिळते म्हणून. त्याने माणसाची आत्मिक शक्तीसुद्धा वृद्धिगत होते. आणि म्हणूनच त्यांनी हे एक मोठे गुपित म्हणून लपवून ठेवते, कोणालाही ते कळू दिले नाही, शिकू दिले नाही किंवा त्याचा सराव करू दिला नाही. परंतु आम्ही म्हंटले असे चालणारच नाही, हे मानव जातीच्या मालकीचे आहे.

म्हणूनच तुमची जी काही श्रद्धा असेल, तुमचा जो काही धर्म असेल, प्राणायाम, ध्यान आणि जप याने सर्वांचा फायदा व्हायला पाहिजे.

आजकाल अनेक हॉस्पिटलमधून, च्या जपाचा वापर केल्या जात आहे.

मद्रासमध्ये हॉस्पिटलमध्ये आजारातून बरे होण्यासाठी ते ॐ चा जप करतात. हे मंत्रोच्चार फार शक्तिशाली आहेत.

प्रश्न : गुरुदेव, लोकांनी एका जन्मामध्ये पाप केले तर देव त्यांना पुढच्या जन्मामध्ये शिक्षा का देतो? तुम्हाला कशाची शिक्षा दिल्या जात आहे हे माहित असले तर फार बरे होईल, नाही का?

श्री श्री : कर्म हे अनेक प्रकारचे असते. काही गोष्टी अश्या असतात ज्या तुम्ही आज केल्या तर त्याचे तुम्हाला लगेच फळ मिळते.

समजा की आग लागली आहे आणि तुम्ही त्यात हात घातला तर तो आज भाजेल का उद्या? तो आता याक्षणी भाजेल. पण जर तुम्ही आंब्याचे बी पेरले, तर त्याला मोठे होऊन आणि फळ देण्यासाठी किती वर्षे लागतील? सहा वर्षे. सहा वर्षांनंतर तुम्हाला फळ मिळेल. आणि जर तुम्ही फणसाचे झाड लावले तर त्याला फळ देण्यास दहा वर्षे लागतील.

एका सज्जन माणसाने लोखंडाचा कारखाना सुरु केला तर त्याच्यापासून नफा कमवायला अनेक वर्षे लागतील. खरा नफा आहे तो त्याच्या मुलांना मिळेल. या कारखान्याला चालू करण्याकरिता ज्याने इतके कष्ट केले आणि जीवनभर इतका घाम गाळला त्याला त्याची फळे मिळत नाहीत. जेव्हा त्याच्यापासून नफा मिळू लागतो त्याची मजा पुढची पिढी चाखते.

भगवद्गीतेत म्हंटले आहे, ‘गहना कर्मणो गतिः’ कर्माची पद्धत अनाकलनीय आहे. अनेक प्रकारचे कर्म असतात, वैयक्तिक कर्म, सामाहिक कर्म; काळाकरिता कर्म असते. प्रत्येक स्थालाकरिता कर्म असते.

त्सुनामी येते आणि एका क्षेत्रातील कित्येक लोक मृत्युमुखी पडतात. केवळ ते क्षेत्र का? ते त्या क्षेत्राचे कर्म असते. 

तर तुम्ही कर्मामध्ये जितके खोलवर जाल तितके ते अद्भुत आहे.

हिंदू धर्मामध्ये, उपनिषदामध्ये, सहा दर्शनापैकी एक आहे कर्म मीमांसा. ते कर्माविषयी संपूर्ण सांगते.

ते पुस्तक इतके मोठे आहे की तुम्हाला त्यासाठी कोणी विद्वान सापडणे कठीण आहे. जवळजवळ ३५-४० वर्षांपूर्वी बनारसमध्ये केवळ एक सज्जन होते ज्यांनी मिमांसेचा अभ्यास केला होते. आज याच्यावर आपल्याकडे एकही विद्वान नाही.

तसेच बौद्ध धर्माने याच्यावर बराच अभ्यास केलेला आहे. आणि जैनांनी यावर बरेच संशोधन केलेले आहे. पण सर्वात उत्तम आहे सेवा  करणे.

जेव्हा तुम्ही इतरांची सेवा करता, जेव्हा सांत्वनाची आवश्यकता असणाऱ्या लोकांचा तुम्ही परिहार करता तेव्हा ते तुमच्यासाठी सर्वात चांगले कर्म आणते. म्हणूनच धर्मदायी काम हे प्रत्येकाच्या जीवनाचा हिस्सा असले पाहिजे.

ध्यानामुळे वाईट कर्म धुतल्या जाते आणि धर्मादायी कामामुळे चांगले कर्म येते.  दोघांनी हातात हात गुंफून चालले पाहिजे. ज्ञानाकरिता, स्तब्धतेकरिता, शांततेकरिता आतल्या दिशेने जा आणि प्रेम हे त्याचे बाह्य आविष्करण आहे.

ज्ञान आणि प्रेम, जीवनातील दोन अतिशय महत्वाच्या गोष्टी. 

जेव्हा तुमचा मृत्यू होईल तेव्हा तुम्हाला दोन प्रश्न विचारल्या जातील, तुम्ही किती ज्ञान मिळवले आणि तुम्ही किती प्रेम देऊ केले?

प्रश्न : गुरुदेव, तुम्हाला स्वप्ने पडतात का?

श्री श्री : माझे देशाकरिता स्वप्न आहे. मला भ्रष्टाचार-मुक्त, हिंसाचार-रहित, तणाव-मुक्त आणि आनंदी समाज पाहायचा आहे.

तुम्ही उपयुक्त आहात की निरुपयोगी?

15
2013
Jul
माँट्रियल, कॅनडा.

प्रश्न: प्रिय गुरुदेव, सेवेमध्ये असे काय आहे ज्यामुळे लोक ऑफिसामधील कामापेक्षा सेवा अधिक उत्साहाने करतात?

श्री श्री : असे पहा, आपल्याला कार्यरत राहायचे आहे आणि म्हणून आपण काहीतरी करीत असतो. कोणतेही काम करताना आपण त्यातून स्वतःसाठी काहीतरी फळाची अपेक्षा करतो. पण ज्या कार्यातून आपल्याला कोणत्याही फळाची अपेक्षा नसते आणि केवळ जीवनात काहीतरी उपयुक्त करावे म्हणून आपण जे कार्य करतो, त्याला सेवा म्हणतात. ज्या कृत्यातून फळाची अपेक्षा नसते आणि तरीही ते कृत्य केल्याने इतरांना फायदा होतो आणि करणाऱ्याला आनंद मिळतो, ती सेवा होय.

प्रश्न: सिद्धी कशासाठी असतात?

श्री श्री : आपल्या मनामध्ये एखाद्या गोष्टीची गरज उत्पन्न होण्यापूर्वीच ती गोष्ट सहजतेने प्राप्त होते, तेव्हा त्या प्रक्रियेला सिद्धी म्हणतात.

समजा तुम्हाला लग्न करायचे आहे आणि सत्तर वर्षे वय झाल्यावर सुद्धा तुम्हाला कुणी जीवनसाथी लाभला नाही, तर तुम्ही काय कराल? याचा अर्थ हा की तुम्हाला सिद्धी प्राप्त नाही. उलट लग्नाचा विचार तुम्ही करण्यापूर्वीच दहा व्यक्ती येवून “माझ्याशी लग्न करा ना,” अशी विनंती करू लागल्या तर याचा अर्थ तुमच्यापाशी सिद्धी आहे.

भारतीय भाषेमध्ये एक म्हण आहे, तुमचे दात असताना चणे मिळत नव्हते आणि चणे मिळाले तोवर दात शाबूत राहिले नाहीत!

असा प्रकार म्हणजेच सिद्धीचा अभाव आहे. तुम्हाला काही मिळते तेव्हा खूप उशीर झालेला असतो आणि त्या गोष्टीची उपयुक्तता संपलेली असावी.

याचप्रमाणे, तुम्हाला काहीतरी हवेहवे असावे आणि ते मिळाले तरी ते पुरेसे नसावे, हादेखील सिद्धीचा अभाव आहे. समजा तुम्हाला इथून कॅलिफोर्नियाला जायचे आहे. त्यासाठी पंधराशे डॉलर्सची आवश्यकता आहे. पण तुमच्याकडे एकूण तेराशे डॉलर्सच जमले, तर तुम्हाला सिद्धी प्राप्त नाही. म्हणजे गरज उत्पन्न होण्याआधी गरजेपेक्षा अधिक काही मिळून जाते, तेव्हा त्याला सिद्धी म्हणावे.

आपल्याला जे हवे असेल ते सहज मिळायला हवे. ते उशिरा अथवा कमी प्रमाणात मिळाले, तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणजेच, जे हवे ते आणि हवे तेवढे वेळेमध्ये प्राप्त झाले तर तुमच्यापाशी सिद्धी आहे म्हणावे.

गरजेपेक्षा अधिक आणि गरज उत्पन्न होण्यापूर्वी वस्तू मिळून जाणे, म्हणजे सिद्धी.

पण हे गरजेपेक्षाच अधिक हवे. तुमच्या हव्यासेपेक्षा अधिक नाही.

प्रश्न: गुरुदेव, केवळ तुमच्या सहवासात आल्यानेच इतके सुंदर आणि अदभूत वाटते. आपल्याला या सर्व ध्यान साधनेची आवश्यकता का आहे? आणि सर्व साधना नियमित करणे महत्वाचे आहे का?

श्री श्री : हो, अर्थातच. याचा अर्थ तुमच्याकडे करण्या सारखे काहीतरी आहे आणि माझ्याकडेही आहे!

याचे चार स्तर आहेत. पहिला स्तर सान्निध्य. म्हणजे दैवी उपस्थितीची जाणीव होणे.

दुसरा स्तर आहे, सामिप्य, ज्यात गुरु किंवा ईश्वराशी जवळीक जाणवते. सामिप्याची जाणीव तुमच्या अंतःकरणातून व्हायला हवी. ही जाणीव तुमच्यामध्ये कुणी घडवून आणू शकत नाही, ती स्वतःमधूनच उत्पन्न व्हावी लागते.

तिसरा स्तर आहे सारुप्य. म्हणजे ईश्वराशी एकरूप होणे. अर्थात, जेथे तुझ्यात आणि माझ्यात कोणताही भेद वा अंतर रहात नाही.

आणि शेवटचा स्तर आहे सायुज्य, ज्यात आपण ईश्वरामध्ये विलीन होऊन जातो.

प्रश्न: गुरुदेव, जर आर्ट ऑफ लिव्हिंगचा संबंध केवळ अध्यात्मिकतेशीच आहे आणि धर्मांशी नाही, तर मग आपण कृष्ण आणि इतर हिंदू देवतांची भजने का गातो?

श्री श्री : गायन हा अध्यात्मिकतेचाच एक भाग आहे. आपण ज्या पुरातन नामांची भजने गातो, ती खरे तर मंत्रासारखी आहेत. त्यां नामजपामध्ये ज्या शक्ती लहरी आहेत, त्यांचा आपल्या अस्तित्वावर प्रभाव पडतो. या गायनामध्ये एक साह्जीकता आहे. ॐ नमः शिवाय हा एक मंत्र आहे. आणि मंत्र जप हा अध्यात्मिकतेचाच एक भाग आहे.

तुम्ही जन्मलात तेव्हापासून नामकरण, लग्नविधी, मृत्युपश्चातचा विधी हे सर्व तुमच्या धर्मानुसार होत असतात. पण अध्यात्मिकता तुम्हाला एका उच्च पातळीवर घेऊन जाते. म्हणूनच योग साधना, ध्यान इत्यादी एका विशिष्ठ परंपरेतून उदभवले असले तरी ते निव्वळ धार्मिक विधी न राहता जगण्याची रीत होऊन जातात.

भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, जे स्वतः हिंदू होते, त्यांना कुणीतरी हिंदू धर्माची व्याख्या काय असा प्रश्न केला. ते उत्तरले, “ हिंदुत्वाची व्याख्या करणे अशक्य आहे. ती तर जगण्याची एक रीत आहे केवळ !”

जगात इतके सारे धर्म अस्तित्वात असल्यामुळे जगण्याच्या विशिष्ठ रीतीनाच धर्मांच्या नावाने ओळखले जाऊ लागले. नाहीतर हिंदुत्व हा धर्म नाहीच, ती तर जगण्याची एक रीत आहे.

आपण गातो, त्या गायनाने आणि जपाने आपल्या अस्तित्वावर, मनावर आणि चेतनेवर एक विशिष्ठ प्रभाव पडतो. हे स्वर आणि मंत्र जेवढे अधिक पुरातन असतील, तेवढा त्यांचा प्रभाव अधिक खोलवर होत असतो. म्हणूनच ॐ चा जप करणे अतिशय महत्वाचे मानतात.

गीतात कृष्ण आहे की इतर कुणाचे नाव आहे, हे महत्वाचे नाही. त्या मंत्र उच्चाराचा प्रभाव महत्वाचा आहे.

प्रश्न: गुरुदेव, ज्या प्रमाणे भाषणाचे विविध प्रकार असतात, तसेच मौनाचेही प्रकार आहेत का?

श्री श्री : तुम्ही सांगा, रिक्तपणाचे विविध प्रकार असतात का? मौन हे मौन आहे आणि रिकामे ते रिकामेच आहे. एक रिकामे भांडे कोणत्या प्रकारे रिकामे आहे असे तुम्ही विचारणार नाही. पण तेच भांडे भरलेले असेल तर विचाराल की ते कशाने भरले आहे!

भाषणाचे चार प्रकार आहेत. परा, पश्यन्ति, मध्यमा आणि वैखरी.

वैखरी हा भाषणाचा ढोबळ प्रकार. आपण आता जे जसे बोलत आहोत, ते वैखरी.

पश्यन्ति हे वैखरी पेक्षा अधिक तरल भाषण असते. या भाषणात भाषा व शब्द नसतात. पश्यन्ति मध्ये, शक्तीलहरींमधूनच जे काय सांगितले ते तुम्हाला कळते पूर्ण कल्पना येते. त्या विचारांना शब्दरूप देण्याची आवश्यकता नसते.

एक लहान मूल तुम्हाला “मी तुमच्यावर प्रेम करतो” असे सांगत नाही. ते तुमच्याकडे पाहते आणि तुम्हाला त्याच्या प्रेमाची जाणीव होते. प्रेम आणि भावना या शब्दांवाचुनच कळवता येतात. शब्दांवाचून सारे कळणे हीच पश्यन्ति आहे.

मध्यमा हे याहूनही अधिक तरल रूप आहे. जे व्यक्त करण्यापूर्वीच कळते ते मध्यमा. व्यक्तव्याच्या रूपात येण्याआधीच ते आपल्या अस्तित्वात उपजत असते आणि कोणत्याही माध्यमाशिवाय समजता येते. पश्यन्ति मध्ये भाषा नसली तरी समजण्यासाठी एका माध्यमाची आवश्यकता असते. पण मध्यमामध्ये अशा माध्यमाची गरज नसते.

परा हे अति तरल आणि अतिसूक्ष्म संभाषण आहे. यात भाषा नाही, शब्द नाहीत, माध्यम नाही. परा म्हणजे आपल्या अस्तित्व चेतानेमाधुनच उभारून येणारे ज्ञान.

तर अशा प्रकारे परा, मध्यमा, पश्यन्ति आणि वैखरी हे संभाषणाचे चार प्रकार आहेत.

“प्रुफ ऑफ हेवन” नावाच्या एका पुस्तकामध्ये लेखकाने तो कोम्यामध्ये असतानाचे अनुभव वर्णलेले आहेत भाषेशिवायचे संभाषण कसे असते याचे अनुभव त्याने विषद केले आहेत. शिवाय ईश्वराचे नाव ॐ आहे असे तो म्हणतो.

तुम्ही या पुस्तकाबद्धल वाचले आहे का? खूप कुतूहलपूर्ण आहे हे पुस्तक.

पुस्तकाचा लेखक अमेरिकेमधील एक न्युरोसर्जन आहे. तो एकदा आजारी पडून कोमामध्ये गेला. सगळ्यांची समजूत झाली की तो त्यातून बाहेर येणारच नाही. पण तो बाहेर आला आणि त्या दरम्यानच्या आपल्या अनुभवांबद्धल त्याने ‘प्रुफ ऑफ हेवन’ (स्वर्गाचा दाखला) हे पुस्तक लिहिले. कोमात शरिर असताना तो अस्तित्वाच्या पुढच्या अदभूत पातळीवर पोचला त्याचे हे वर्णन आहे.

हे अनुभव अत्यंत आश्चर्यजनक आहेत. शिवाय वेदान्तामध्ये आणि पुराणातील अनेक ग्रंथांमध्ये जे सांगितले आहे, तेच त्याने अनुभवलेले दिसते. जसेच्या तसे, इत्यंभूत! मी अनेक वर्षांपासून जे सांगत आलो आहे, तेच तो वर्णतो. म्हणतो, की पलीकडे दिव्य प्रकाश आहे आणि त्या प्रकाशाचे नाव ॐ आहे. तो प्रकाश सर्व व्यापी आहे, प्रेमाने आणि करुणेने परिपूर्ण आहे. तो प्रकाश दिव्य प्रेमच आहे.

लेखक पुढे सांगतो की तो एका अशा वृक्षामधून गेला ज्याची मुळे वरती आहेत आणि फांद्या आत, खाली आहेत. भगवंत गीतेमध्ये असा उल्लेख आहे; पलीकडच्या जगात जाण्यासाठी मुळामधून जावे लागते. लेखक याच मुळांबद्धल लिहितो.

पुढे तो सोनेरी अंड्याबद्धल सांगतो, ज्याला आपल्या शास्त्र ग्रंथांमध्ये हिरण्यगर्भ असे संबोधले जाते. लेखक म्हणतो की या विश्वाचा मध्यबिंदू आत्मन आहे आणि सोनेरी अंडे (हिरण्यगर्भ) हे त्याचे कवच आहे. भगवत गीतेमध्ये अगदी असेच वर्णन वाचता येते.

याशिवाय लेखक ज्ञान संपर्क पदधती बद्धल सांगतो. तो म्हणतो, संभाषण हे शब्द आणि भाषा विरहित होते. हेच तर आपण संभाषणाच्या चार प्रकारांमध्ये पाहिले. लेखकाचे हे सर्व अनुभव वाचण्याजोगे आहेत.

प्रश्न: प्रिय गुरुदेव, जेव्हा आपल्या आप्तांपैकी कुणी भय, संकल्पना आणि विचारांमध्ये गुरफटून गेलेला दिसतो, तेव्हा बुद्धीच्या पातळीवरून त्याला बाहेर काढून हृदयाच्या पातळीवर कसे आणावे?

श्री श्री : तुम्ही काळजी करू नका. असे लोक स्वतःच त्यातून बाहेर येतील. हा स्थळ काळाचा परिणाम असतो. हिंदीमध्ये एक काव्य पंक्ती आहे : या जगामध्ये सर्व काही आहे, या जगात अनेकाविध नजराणे आहेत. पण ज्याचेपाशी सत्कर्म नाही, त्याला त्यातले काहीही मिळत नाही!

तुमच्या इवल्याश्या आरश्यात अफाट सूर्याला पकडा

28
2013
May
बंगलोर, भारत

‘यस्य नाहंकृतो भावो बुद्धिर्यस्य न लिप्यते I
हत्वापि स इमाँल्लोकान्न हन्ति न निबध्यते II’ (१८.१७)

तो म्हणतो, ‘तो ज्याची बुद्धी ही मायेच्या प्रभावापासून मुक्त आहे (अलिप्त-बुद्धी ), अश्या माणसाने जरी संपूर्ण जगाचा नाश केला तरीसुद्धा तो मुक्त राहतो आणि कोणत्याही पापापासून निर्लेप राहतो. असा माणूस त्याच्या कर्माने बांधल्या जाणार नाही.’

खरे तर अशी जागृत बुद्धी असलेला माणूस जो मायेपासून अलग आहे तो लोकांना मारणे यासारखी हिंसात्मक कृती करणारच नाही. आणि त्याने जरी असे केले तरी तो ती कृती त्याचे योद्ध्याचे कर्तव्य म्हणून करेल आणि तीव्र इच्छा व घृणा यातून करणार नाही. (इथे विवेकी माणसाच्या कृतीतील सुसंस्कृतपणा या गुणाचा संदर्भ आहे).

म्हणून हा तिसरा टप्पा आहे ज्यामध्ये अलिप्त-बुद्धी  (शुद्ध बुद्धी जी मायेला  जोडलेली नाहीये आणि तिच्यामुळे जी प्रभावित होत नाही अशी बुद्धी) असलेली व्यक्ती मायेला  ओळखू
शकते.

अशी व्यक्ती मायेच्या कार्याला थोपवायचा प्रयत्न करीत नाही आणि तिच्यामुळे विचलितसुद्धा होत नाही. अश्या अवस्थेत ती व्यक्ती मायेपासून निर्लेप राहते आणि तिच्यापासून ती मुक्त असते.

तुम्हाला कळते आहे का मी काय म्हणतो आहे ते?

खरे तर या अवस्थेमध्ये आपल्याला मायेच्या  नाना तऱ्हाचे साक्षी होण्यात आनंद मिळतो आणि त्याने आपले मनोरंजन होते. ते एक मौजेचे स्रोत्र बनते.

प्रगतीच्या तिसऱ्या टप्प्यात जेव्हा आपण फुलून येतो तेव्हा जिच्यामुळे आपण संसाराच्या जंजाळात आणि भ्रमाच्या गुंतागुंत यामध्ये अडकून पडतो हीच ती माया आपल्या मौजेचे आणि करमणुकीचे स्रोत्र बनते.

तर माया  बंधने आणि भ्रम निर्माण करते, आणि त्याच वेळेस माया आपल्याला आनंद आणि हर्ष हेसुद्धा देते. म्हणूनच भगवान कृष्ण म्हणतो,

‘दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया I
मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते II’ (७.१४)

तो म्हणतो, ‘हे अर्जुना! माझी योग माया  ही दिव्या गुणांनी युक्त आहे, आणि त्याच्यावर एखाद्याला विजय मिळवणे सोपे नाही. तिला पराभूत करणे अतिशय कठीण आहे. केवळ माझ्यामध्ये आश्रय घेतल्याने आणि मला संपूर्णतः शरण आल्याने तू तिला पराभूत करू शकतो.’

ही संपूर्ण सृष्टी मायेने झाकलेली आहे. ज्याप्रमाणे वायूचा संचार सर्वत्र असतो त्याप्रमाणे संपूर्ण जग हे मायेच्या परिवेष्टनामध्ये आहे. प्रत्येक माणसाच्या मनावर मायेचे आवरण आहे. प्रत्येकजण हा मायेमध्ये खोलवर गुंतलेला आहे. प्रत्येकजणांचे मन हे मायेच्या कोणत्या न कोणत्या प्रभावाखाली आहे.

इथे बसलेल्या तुम्हा सर्वांच्या मनात अनेक विविध विचार आहेत. तुमच्या मनात काय काय चालले आहे याचे केवळ अवलोकन करा! आर देवा! (हशा) हीच तर माया  आहे.

तर या संपूर्ण सृष्टीला मायेचे आवरण आहे.

परंतु एक सच्च्या भक्ताला नेहमी असे वाटते, ‘हे भगवान शंकरा, माझे मन हे कायम तुझ्या भक्तीमध्ये गुंग आहे आणि तुझ्या विचारात बुडालेले आहे. माझ्या मनाने तुला संपूर्णपणे घेरलेले आहे. दिवस आणि रात्र मला तुझी आणि फक्त तुझीच आठवण असते.’

आता हे कसे काय शक्य आहे? आपले मर्यादित मन इतक्या प्रचंड आणि सर्वव्यापी परमेश्वराला कसे काय परिवेष्टित करून धरू शकते? देवाला आपल्या मर्यादित मनाने कसे बांधायचे? हे शक्य आहे?

होय, हे त्याचप्रकारे शक्य आहे ज्याप्रकारे एका मोठ्या हत्तीला (हत्तीच्या प्रतिमेला) आरश्यामध्ये पकडता येते.

तुम्ही सूर्याला संपूर्णपणे आरश्यामध्ये नाही का पकडू शकत? सूर्य इतका प्रचंड आहे, तरीसुद्धा तुम्ही त्याला व्यवस्थितपणे आरश्यामध्ये पकडू शकता, हो ना? त्याचप्रमाणे तुमच्या मनाकडे या दिव्यत्वाला संपूर्णपणे पकडण्याची क्षमता आहे.

म्हणूनच असे म्हणतात की तुमचे मन जर पवित्र असेल तर तुम्ही स्वतः देवच आहात! तुम्ही ब्रह्म आहात. परंतु असे केव्हा शक्य आहे? जेव्हा तुमच्या हृदयाचा आरसा हा स्वच्छ आणि पावन असेल तेव्हा तुम्ही दिव्यत्वाला स्वतःच्या आत निरखू शकता. जर आरसा (मायेमुळे)  झाकलेला असेल किंवा घाण असेल तर मग काम बनणार नाही.

एक संत असा आहे ज्याचे मन आणि हृदय हे आरश्याप्रमाणे लख्ख (नकारात्मकतेपासून मुक्त) असते. एक गुरु असा असतो जो स्वच्छ आरश्याप्रमाणे पवित्र आणि पारदर्शी असतो.

म्हणून तुमचे मन हे शुद्ध आणि पवित्र असले पाहिजे म्हणजे मग (चैतन्याची) पूर्णता तुमच्यात फुलून येईल.मग तुम्ही सूर्य आणि चंद्र यांना आपल्या आरश्यात पकडू शकाल.

तर, ज्याप्रमाणे एका भल्या मोठ्या हत्तीला एक आरसा पूर्णपणे पकडू शकतो त्याचप्रमाणे तुमचे मनसुद्धा दिव्यत्वाला पकडू शकते. परंतु मनाला मायेचे निवासस्थान होऊ देऊ नका; खरे तर तिथे देवाचे अधिष्ठान असले पाहिजे. मायेमध्ये गडप होणारे हेच ते मन आहे जे देवाला संपूर्णपणे शरणसुद्धा जाऊ शकते. 

असे सुंदर ज्ञान केवळ ऐकल्यामुळे मन उंचावते आणि ते इतके उंचावते आणि पावन होते, हो ना? सर्व तीव्र इच्छा आणि घृणा यापासून मन त्वरित शुद्ध होते.

आपण आपल्या चेहऱ्यावरील हास्य का गमावून बसतो? याचे कारण आहे तीव्र इच्छा आणि घृणा, आणि आपली मायेमधील गुंतागुंत. जेव्हा आपल्या मनातील अवकाश हे तीव्र इच्छा आणि घृणा यांनी भरून जाते तेव्हा आनंद संपूर्णपणे हरवून जातो.

‘अरे, हे बरोबर नाही, ते बरोबर नाही! हा मनुष्य चांगला नाही! तो माणूस बरोबर नाही!’ अशा विचारांमध्ये आपण इतके अडकून जातो, मी तर म्हणेन की आता तर तुम्हीसुद्धा बरोबर नाही!अश्या विचारांमध्ये तुमची सर्व उर्जा नष्ट होते.

जेव्हा तुम्ही तुमची सर्व सकारात्मक उर्जा अश्या विचारांवर व्यर्थ घालवता तेव्हा तुम्ही तर निरोपयोगी होऊन जाता; काही करण्यायोग्य नाही. जेव्हा तुमचा जीवनातील सर्व उत्साह हरवून जातो तर मग बाकी उरले काय?

असे अडकून पडल्यामुळे तुमचे प्रेम, हास्य आणि उत्साह हे सर्व काही हरवून जाते. जेव्हा तुम्ही तुमचा उत्साह गमावून बसता तेव्हा तुम्ही इतर सर्व काही हरवून बसता. मग तुम्ही केवळ एके ठिकाणी पडून राहाल आणि काहीही करणार नाही. हे सर्व का घडते? याचे कारण आहे माया. ही माया फार कोड्यात पडणारी आहे. ती तर कोणालाही पकडते आणि वाट्टेल तसे नाचायला लावते! आणि जो बिचारा अडकल्या जातो तो आपला नाचत राहतो.

मायेमुळे समस्त जग त्रस्त आहे. म्हणून याच्यामुळे, अनेक लोक टीका करतात आणि मायेच्या खेळाच्या विरोधी होतात. परंतु भगवान कृष्ण म्हणतो, ‘ही माया  दिव्या गुणांनी युक्त आहे, आणि ती माझ्यातून निर्माण झालेली आहे. म्हणून तू तिचा मान राख आणि तिचा आदर ठेव.’

केवळ भगवान कृष्ण अशी गोष्ट म्हणू शकतो, आणि इतर कोणी नाही. हे तर असे झाले की सिनेमाचा दिग्दर्शक केवळ असे म्हणू शकतो, ‘सगळे काही माझ्या मालकीचे आहे. नायक आणि खलनायक दोघेही माझे आहेत.’ खलनायक त्याचा आहे असे नायक म्हणू शकतो का? नाही, हे अश्याप्रकारे काम चालत नाही. सिनेमाच्या नायकाला खलनायकाला खलनायक म्हणूनच वागवले पाहिजे. परंतु, ‘नायक आणि खलनायक दोघे माझे आहेत. या सिनेमामध्ये काम करण्यास मी त्यांना दाम मोजले आहे. म्हणून त्या दोघांमधील भांडण हे मी लिहून काढले आहे आणि याचा अंत हासुद्धा मी लिहिलेला आहे’, असे बोलण्याचा हाक केवळ सिनेमाच्या दिग्दर्शकाला आहे.

याचसाठी म्हणून भगवान कृष्ण म्हणतो, ‘ही माया  माझ्यापासून निर्माण झालेली आहे. तो मी आहे जो तिचा प्रसार करीत आहे, आणि मी दिव्य आशीर्वादानेच तुम्ही तिला पराजित करू शकता. तुम्ही कितीही जरी प्रयत्न केलात तरी तुम्ही तुमच्या एकट्याच्या प्रयासाने तिच्यापासून मुक्त होऊ शकत नाही. केवळ माझ्यामध्ये आश्रय घेतला तरच तुम्ही हा मायेचा  महासागर पार करू शकता.’

म्हणून केवळ स्वतःच्या आत खोलवर गेल्यानेच तुम्ही मायेला पराभूत करू शकता.

उर्जेची सात केंद्रे (चक्रे)

26
2013
Jul
बून, नॉर्थ कँरोलीना

प्रश्न : गुरुदेव, लैंगिक उर्जा आणि ध्यानाने मिळणारी उर्जा हे दोन्ही समान आहेत का?

श्री श्री : होय, शरीरात केवळ एकच उर्जा असते, पण ती निरनिराळ्या प्रकारे वेगवेगळ्या चक्रांमधून दिसून येते. लैंगिक उर्जा, प्रेमाची उर्जा, बौद्धिक उर्जा, चटपटीतपणा, जागरुकता, संताप, हे सर्व एकमेकांबरोबर जोडलेले आहे.

तुम्ही सात चक्रां (उर्जा केंद्रां) विषयी ऐकले असेल; केवळ एक उर्जा  असते जी अनेक प्रकारे अभिव्यक्त होते.

पहिल्या चक्र  हे पाठीच्या कण्याच्या तळाला असते. तिथे उर्जा उत्साह किंवा आळस  या प्रकारात आविष्कृत होते.

जेव्हा तीच जीवन उर्जा दुसऱ्या चक्रामध्ये  येते आणि लैंगिक उर्जा किंवा सृजनशील किंवा निर्मितीक्षम उर्जा  म्हणून दिसून येते.

तीच उर्जा वरती नाभीमध्ये सरकून तिसऱ्या चक्रामध्ये  येते आणि लोभ, मत्सर, औदार्य आणि आनंद  या आपल्या चार भावना आहेत त्या चार वेगळ्या प्रकारे दिसून येते. म्हणूनच या सर्व चार भावना या उदराबरोबर निगडीत असल्याचे दर्शविले जाते.

मत्सर ही अशी भावना आहे जी एखाद्याला पोटात जाणवते. औदार्य हे मोठे पोट असलेले म्हणजे सांता क्लाँज यांच्याशी निगडीत दाखवले जाते. आनंद हा अतिशय प्रचंड मोठे पोट असलेले म्हणजे आपले लंबोदर गणपती आणि हसणारा बुद्ध यांच्याबरोबरसुद्धा दर्शविले जाते.

चौथ्या चक्रामधून  हृदय चक्रामधून तश्याच भावना येतात; प्रेम, घृणा आणि भय  या तीन वेगवेगळ्या भावना आविष्कृत होतात.

जेव्हा उर्जा पाचव्या चक्रामध्ये  पोचते तेव्हा ती घश्याच्या पातळीपर्यंत पोचते, आणि ती दुःख आणि कृतज्ञता  यांचे प्रतिक असते. जेव्हा आपल्याला दुःख होते तेव्हा आपला कंठ दाटून येतो, आणि जेव्हा आपलाल्या कृतज्ञ वाटते तेव्हासुद्धा कंठ दाटून येतो.

ती समान उर्जा जेव्हा भुवयांच्या मध्ये सहाव्या चक्रामध्ये  पोचते आणि संताप आणि सावधपणा  म्हणून प्रकट होते. क्रोध, सावधपणा, ज्ञान, आणि विवेक हे सर्व तिसऱ्या नेत्राच्या केंद्राबरोबर निगडीत आहेत.

 तीच समान उर्जा सातव्या चक्रामध्ये ,डोक्यावर जाते आणि निखळ परमानंद  म्हणून आविष्कृत होते. म्हणूनच कोणत्याही पवित्र स्थानच्या अनुभवामध्ये जेव्हा तुमच्या मनाला पूर्ण परमानंद जाणवतो तेव्हा मन ताबडतोब डोक्याच्या वर जाते. काहीतरी डोक्याच्या वरच्या दिशेने सुसाट जाते आणि तुम्हाला परमानंद जाणवतो.

म्हणून, उर्जेच्या ऊर्ध्व हालचाली आणि अधोगतीच्या हालचाली या जीवनाच्या सर्व भावना आहेत. 

संकेतस्थळ : http://www.artofliving.org/meditation/free-online-meditation

प्रश्न : गुरुदेव, मला प्रार्थना कशी करावी हे शिकायचे आहे. प्रार्थना कशी करावी याबाबत तुम्ही काही शब्द बोलू शकाल काय?

श्री श्री : प्रार्थना ही स्वयंस्फुर्त गोष्ट आहे. ती दोन प्रसंगी घडते, जेव्हा तुम्ही कृतज्ञ असता, आणि तुमची कृतज्ञता व्यक्त करत असता. आणि जेव्हा तुम्ही पूर्णपणे असहाय्य असता, आणि मदतीची याचना करीत असता.

प्रार्थना ही घडून येते, तुम्ही प्रार्थनेचे पीक उगवू शकत नाही. जास्तीत जास्त तुम्ही काय करू शकता तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या जीवनाचे सिंहावलोकन करू शकता आणि पाहू शकता की तुम्ही कोठे होतात आणि आता इथपर्यंत कसे काय पोहोचलात.

तर दुसरे म्हणजे असे तुम्ही इतर लोकांच्या जीवनाकडे पाहू शकता आणि बघा की किती लोक या ग्रहावर दयनीय अवस्थेमध्ये आहेत आणि तुम्ही किती भाग्यवान आहात! या मृदू जागरूकतेमुळे तुम्ही प्रार्थना कराल आणि कृतज्ञता व्यक्त कराल.

प्रार्थना ही सुरुवात आहे आणि ध्यान हे तिची परिणीती आहे. प्रार्थना म्हणजे देवाने जे सर्व काही दिले आहे त्याबद्दल त्याचे आभार मानणे, आणि ध्यान म्हणजे तिथे उपस्थित राहणे, देवाला जे म्हणायचे आहे ते ऐकला.

मी तुम्हाला प्रार्थना करण्यापासून परावृत्त करीत नाही. प्रार्थना ही ध्यानाच्या आधीची पातळी आहे. तुम्ही प्रार्थना करू शकता, आणि मग बसा आणि ध्यान करा.

प्रश्न : गुरुदेव, सर्वात सकारात्मक जागांमध्येसुद्धा आणि कित्येकवेळा प्रार्थना करतानासुद्धा भीतीदायक आणि वाईट विचार का येतात याचे मला नवल वाटते. कृपा करून मदत करा.

श्री श्री : हरकत नाही. विचार हे विचार आहेत. जोपर्यंत तुम्ही जागरूक आहात की हे विचार येत आहेत तोपर्यंत तुम्ही सुरक्षित आहात, कारण हे विचार येतात आणि जातात.

नकारात्मक विचार हे अनेक कारणांमुळे येतात :

१. शरीरामध्ये योग्य अभिसरण नसणे, आणि अयोग्य श्वास किंवा मेंदूला पुरेसा प्राणवायू न मिळणे.

२. मलोत्सर्जन चांगले न होणे; जर तुमचा मलोत्सर्ग झाला नाही तर तुमच्या लक्षात येईल की नकारात्मक विचार येत आहेत.

३. प्राणाची पातळी खालावणे किंवा उर्जा नसणे.

याच्यावर इलाज आहे :

१. अभिसरण सुधारा. उठा, व्यायाम करा, गाणी गा, नाचा, योग, ध्यान, प्राणायाम करा; यासर्वांमुळे मदत होईल.

२. थोडेफार शुद्धीकरण  वर्षातून एकदा किंवा दोनदा करा. जर तुम्ही श्री श्री योग लेवल II केला नसेल ज्यामध्ये तुम्ही पाणी पिणे शिकता आणि तुमची संपूर्ण प्रणाली शुद्ध करता किंजल (घसा आणि पोट साफ करते) आणि शंख प्रक्षालन  (मुखापासून ते गुदाद्वारापर्यंत संपूर्ण मूळ पचनसंस्थेचे शुद्धीकरण) याच्यामार्फत, तुम्ही तो केला पाहिजे. जेव्हा तुम्ही भरपूर पाणी पिता आणि एक व्यायामाचा संच करता तेव्हा पाणी तुमच्या शरीराला शुद्ध करते आणि तुमच्या प्रणालीतील सर्व विषारी द्रव्ये बाहेर काढून लावते. हेच कारण आहे की योग्यांनी प्राचीन काळापासून क्रिया  करण्याचा सल्ला दिला आहे.याने अनेक लोकांना स्वच्छ विचार करण्यास मदत झाली आहे.

३. चांगली सांगत ठेवा. संगतीमुळेसुद्धा तुमच्या उर्जेची पातळी खालावू शकते.

हे सर्व केल्यानंतरसुद्धा जर तुमच्या मनात नकारात्मक विचार येत असतील तर हरकत नाही, ते जसे येतात तसे ते निघून जातील. जर तुम्ही त्यांना घाबरलात तर ते ते तुमच्यासोबत राहतील. जर तुम्ही घाबरला नाहीत तर ते तुम्हाला सोडून जातील.

प्रश्न : गुरुदेव, जेव्हा आपण म्हणतो आपण साक्षीदार आहोत तेव्हा आपल्या म्हणण्याचा निश्चित अर्थ काय? योग्य कृती घडणे नक्की करण्याकरिता साक्षीदार होणे आणि भाग घेणे याचे संतुलन कसे करावे?

श्री श्री : जर तुम्ही महामार्गाच्या बाजूला उभे राहिलात आणि त्यावरून जाणाऱ्या गाड्या पाहत राहिलात, किंवा जर तुम्ही भोजनालयात बसलात आणि सगळ्यांना जेवताना पाहत राहिलात तर ते म्हणजे साक्षीदार होणे होय. याचा अर्थ भाग न घेणे, परंतु काय घडते आहे याचे केवळ निरीक्षण करणे. त्याचप्रमाणे तुमच्यामध्ये उठणाऱ्या अनेक विचारांचे तुम्ही अगोदरपासून साक्षीदार आहातच. तुम्ही प्रत्येक विचारामध्ये भाग घेत नाहीत; नाहीतर तुम्हाला वेड लागायची पाळी येईल.

प्रश्न : गुरुदेव, मानवतेच्या उत्क्रांतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची काय भूमिका आहे? वैज्ञानिक म्हणत आहेत की संविशेषता लवकरच येईल; याचा अर्थ अशी पाळी जेव्हा कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी बुधिमत्तेपेक्षा वरचढ होईल आणि या ग्रहावर वर्चस्व प्रस्थापित करेल. आपण काळजी करायला पाहिजे का?

श्री श्री : नाही, तुम्ही याच्यामुळे चिंतीत होण्याची अजिबात गरज नाही. माझ्याकरिता चिंतेची एकच बाब आहे ती म्हणजे लोक त्यांची बुद्धिमत्ता का वापरत नाही. प्रत्येकाला बुद्धिमत्तेचे वरदान दिले आहे आणि सर्वात मोठी समस्या ही आहे की ती ते वापरत नाही!

प्रश्न : प्रिय गुरुदेव, मी असे ऐकले आहे की स्वयं आणि वर्तमान क्षण यामध्ये छुपी शक्तिशाली जोडणी आहे. याबद्दल तुम्ही कृपा करून स्पष्टीकरण देऊ शकाल काय?

श्री श्री : होय, स्वयं हे नेहमी हजर असते आणि हा तुमचा वर्तमान आहे.

प्रश्न : प्रिय गुरुदेव, सरते शेवटी जर कर्ता करविता जर देव आहे तर मग सजीव प्राणी कर्मांकरिता किंवा कृतीच्या परिणामासाठी कसा काय जबाबदार होतो?

श्री श्री : हे बघा, कर्तेपणा आणि सुखी होणे हे एकमेकांबरोबर असतात. जर तुम्ही कर्ते नाही तर मग त्याची फळेसुद्धा तुम्हाला अनुभवता येणार नाही. तुम्ही असे नाही म्हणू शकत, ‘मी कर्ता नाही; देवाने मला जास्त अन्न खायला लावले पण माझे पोट दुखत आहे.’

मी तर म्हणेन, ‘देवाचे पोट दुखत आहे. तुम्ही मध्ये कुठून आलात?’

जर तुम्ही खाल्ले तर तुमचे पोट दुखेल; जर देवाने खाल्ले तर पोटदुखीसुद्धा देवालाच होईल. अपचनाचा त्रास हा तुम्हाला होत नाहीये. तुम्हाला कळते आहे का मी काय म्हणतो आहे ते?

माझ्या विचाराने आपण संपूर्ण तत्वज्ञानाचा चुकीचा अर्थ लावलेला आहे. प्रत्येक व्यक्तीला थोडीफार मोकळीक आहे, आणि काही गोष्टी या त्याच्या ऐपतीच्या बाहेर आहेत. 

जीवन हे इच्छा स्वातंत्र्य आणि प्रारब्ध या दोन्हीचा संयोग आहे. काही गोष्टी तुमच्या नियंत्रणात असतात आणि काही इतर गोष्टी नाही. तुम्ही असे म्हणू शकत नाही की माझ्या नियंत्रणात काहीही नाही, आणि तुम्ही असे म्हणू शकत नाही की सगळे काही माझ्या नियंत्रणात आहे, दोन्ही विधाने चुकीची आहेत. 

उदाहरणार्थ, पाऊस पडणे अथवा न पडणे यावर तुमचे काही नियंत्रण नाही. परंतु जर पाऊस पडत असेल तर भिजायचे किंवा नाही हे तुमच्या नियंत्रणात आहे. पाऊस हा प्रारब्ध आहे, परंतु न भिजणे हे तुमचे इच्छा स्वातंत्र्य आहे. रेनकोट घाला किंवा छत्री घ्या आणि तुम्ही कोरडे राहाल.

प्रश्न : प्रिय गुरुदेव, साक्षात्काराची इच्छा ही साक्षात्कार मिळण्यात अडथळा होऊ शकते का? साक्षात्काराची इच्छा असणे ही वाईट गोष्ट आहे का?

श्री श्री : नाही, ती अडथळा होण्याचे काही कारण नाही. त्याच्याबद्दल क्षोभित होणे ही अडथळा ठरू शकते, परंतु इच्छा असणे ठीक आहे. जर ती अगोदरपासूनच असेल तर तुम्ही काय करू शकता?

श्री श्री रविशंकर यांचा गुरुपौर्णिमा संदेश

22
2013
Jul
माँन्ट रियल, कँनडा

ओम नमःप्रणवअर्थाय शुद्ध ज्ञान एकअमूर्तये निर्मल प्रशान्ताय श्री दक्षिणामूर्तये नमः|| (

(जे सदैव शुद्ध आणि शांत असून, जे प्रत्यक्ष सात्विक ज्ञानाचा अवतार असून, जे सर्वार्थाने सर्वोच्च असा ओम सूचक अर्थ असलेल्या दक्षिणमूर्तीला माझा नमस्कार असो.)

कोणे एकेकाळी एक गुरु समुदायामध्ये बसले होते आणि अनेक लोक तेथे येऊन त्यांचा आशीर्वाद घेत होते. ते बराच वेळ शांत बसले होते पण जेंव्हा कोणी त्यांच्याकडे येऊन काही विचारात असे तेंव्हा ते म्हणत, ' अरे, तुम्ही खूप नशीबवान आहात!'

असे असताना एक विद्यार्थी गुरुदेवांकडे आला आणि म्हणाला ' मी माझ्या परीक्षेत नापास झालो आहे.' गुरुदेव म्हणाले, ' तू खूप नशीबवान आहेस!'

दुसरा मनुष्य म्हणाला, ' गुरुदेव, मी माझी नोकरी गमावली आहे.' त्यावर गुरु म्हणाले, ' तू खूप नशीबवान आहेस!

तिसरा मनुष्य म्हणाला, ' माझे कोणतेच मित्र माझ्याशी बोलत नाहीत, ते सर्व माझे शत्रू झाले आहेत' त्यावर गुरु म्हणाले, ' तू खूप नशीबवान आहेस!

अजून एक सद्गृहस्थ म्हणाले, 'माझी बायको मला सोडून गेली आहे' त्यावर गुरु म्हणाले, ' तू खूप नशीबवान आहेस!

अशातर्हेने कोणी काहीही प्रश्न घेऊन आला तरी त्यावर गुरुदेव म्हणत होते, ' तू खूप नशीबवान आहेस! आणि आश्चर्य म्हणजे अचानकपणे त्यांच्याबाबतीत काहीतरी घडून ते एकदम आनंदी होऊन तेथून निघून जात होते.

मग एक सद्गृहस्थ आले आणि म्हणाले, ' गुरुदेव, मी खूप नशीबवान आहे, कारण माझ्या आयुष्यात तुम्ही आहात. त्याबद्धल मी खूप ऋणी आहे.' असे म्हणताच गुरुदेव क्रोधीत झाले आणि त्यांनी त्याला एक थप्पड दिली!

तेथे बसलेले एक गृहस्थ हा सर्व प्रकार पाहून चक्रावून गेले! ते म्हणाले, ' मी जे बघितले त्यावर माझा विश्वास बसत नाहीये. जो मी ऋणी आहे असे म्हणतो त्याला एक थप्पड मिळते आणि जे त्यांच्याकडे रडत येत आहेत त्यांना ते सांगत आहेत कि ते नशीबवान आहेत!'. त्यांना तर काही समजत नव्हते. साधारणपणे जे काही चालले आहे त्याबद्धल ते गुरूला विचारू शकत नव्हते म्हणून त्यांनी मग तेथे बसलेल्या इतर भक्तांना विचारले, ' हा काय प्रकार चालला आहे हे मला कृपा करून सांगाल काय. कारण तुम्ही येथे बराच वेळ बसला आहात. या गुरूंना काय म्हणायचे आहे हे मला समजत नाहीये. ते पूर्णपणे तर्क विसंगत आहे.

नेहमीप्रमाणे प्रत्येक भक्ताचे आपले असे एक वेगळे स्पष्टीकरण होते. म्हणून मग त्यातले एक ज्येष्ठ भक्त म्हणाले. ' होय, ते म्हणाले ते योग्यच आहे.'

बंगलोर आश्रमात एका वयस्कर गृहस्थाने सांगितलेला प्रसंग मला आठवत आहे.ते मला म्हणाले होते कि त्यावेळी म्हणजे १९४२ मध्ये बंगलोरमध्ये फक्त एक सर्जन होते आणि हे सर्जन त्यांच्या वैद्यकीय परीक्षेत सातवेळा नापास झाले होते.

त्यावेळेला जेंव्हा कोणावर अंतर्पुच्छचे शल्यकर्म केले जायचे तेंव्हा एक ठराविक नस जर कापली गेली तर रोगी मारून जायचे. आपण कोणती नस कापायचो हे त्यांना काळात नव्हते. त्यावेळी या गृहस्थांनी ( सात वेळा नापास झालेल्या) ती नस कोणती हे शोधून काढले त्यामुळे त्यांना बरीच प्रसिद्धी मिळाली आणि लोक त्यांचा आदर करू लागले. काही दिवसांनी त्यांना एक आंतर राष्ट्रीय पुरस्कार पण मिळाला. पण ते वैद्यकीय परीक्षेत सात वेळा नापास झाले होते!

याचा अर्थ असा कि जर कोणी परीक्षेत नापास झाले तर ते अधिक अभ्यास करीत असत. 

जेंव्हा तुम्ही एकदा अभ्यास करून परीक्षेला बसलात आणि योगायोगाने पास झालात तर तुम्ही शिकलेले सर्व विसरून जाता.पण जेंव्हा तुम्ही नापास होता तेंव्हा परत अभ्यासकरून तुम्ही त्यात निष्णात होता. तुम्ही जर गणितात नापास झालात तर घोकंपट्टी करून ते सर्व तोंडपाठ करता.

याचा अर्थ असा कि जेंव्हा कोणी नापास झाले तर ते चांगले का तर ते अजून अभ्यास करून चांगले डॉक्टर किंवा चांगले इंजिनियर (हसतात) होतात. याचा अर्थ असा कि तोच अभ्यास करायला त्यांना अधिक श्रम करायला लागतात.

म्हणून एक ज्येष्ठ भक्त म्हणाले,' त्या विद्यार्थ्याला तो खूप नशीबवान आहेस असे म्हणाले कारण तो आता जास्त अभ्यास करीत आहे.' जे सद्गृहस्थ म्हणाले कि 'माझी नोकरी गमावली आहे' , ते ज्येष्ठ भक्त पुढे सांगू लागले ' होय, गुरुदेव योग्य तेच म्हणाले. जेंव्हा तुम्ही नोकरी करीत असता तेंव्हा तुम्ही स्वतः विषयी विचार करीत नाही. आता जेंव्हा तुम्ही नोकरी गमावली आहे तेंव्हा तुम्ही शांतपणे विचार करून तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला काय पाहिजे आहे याचा विचार करू शकता. तुम्हाला आयुष्याविषयी विचार करायला सवड मिळेल! जे नोकरी करीत असतात ते वेळ मिळत नाही म्हणून नेहमी तक्रार करीत असतात. आता तुमच्याकडे वेळ आहे !!

आयुष्यात वेळ मिळणे यालापण मोठे नशीब लागते. स्वतः वर विचार करायला, देवत्वाविषयी विचार करायला, सत्याचा शोध घ्यायला वेळ मिळणे हे निश्चितच मोठे नशीब आहे.

जे सद्गृहस्थ म्हणाले कि त्यांची बायको त्यांना सोडून गेली, त्यांच्या बाबतीत गुरुदेव योग्य तेच म्हणाले! आज पर्यंत ते अत्यंत असंवेदनशीलपणे आयुष्य कंठीत होते.आपल्या बायकोला कश्याची गरज आहे हे बघण्याची त्यांनागरज वाटली नाही.

कोणी तुमच्यापासून दूर गेल्यावर त्यांची खरी किंमत समजते. मग तुम्ही तुमच्या चुकांकडे गंभीरपणे बघायला लागता.काही गोष्टी तुम्ही अधिक चांगल्यापद्धतीने हाताळू शकला असता याची तुम्हाला जाणीव होते.

म्हणून ते सद्गृहस्थ आता स्त्री विषयक प्रश्नाकडे जास्ती संवेदनशील झाल्यामुळे नशीबवान ठरले होते.

तुम्ही जर एका स्त्रीच्या उन्नतीकडे लक्ष द्यायला लागलात, तिच्या भावनांकडे लक्ष द्यायला लागलात, तिच्या मानसिक आणि शारीरिक गरजांकडे लक्ष द्यायला लागलात तर ती तुम्हाला का सोडून जाईल? तुम्ही निश्तितच काहीतरी अयोग्य केले असले पाहिजे.तुम्ही स्त्री विषयी संवेदनशील असायला पाहिजे याची तिने तुम्हाला जाणीव करून दिली. त्यांना हे समजले आणि मग ते आनंदी झाले.

आणि या प्रमाणे, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर , जेंव्हा तुम्ही काही गमावता तेंव्हा तुम्ही दुखी होता पण हेच प्रत्येक दुखः तुम्हाला जागृत करीत असते.

मानवी चेतनेचे तीन स्तर असतात.

पहिला म्हणजे आळस. आपण हिंदीत ज्याला "घोर जडता" म्हणतो म्हणजे असंवेदनशील.निष्क्रियतेच्या या स्थितीत तुम्हाला कश्याची जाणीव नसते.या स्थितीत जेंव्हा तुम्हाला आयुष्यातील दुःखाची जाणीव व्हायला लागते, तेंव्हा ती विवेक आणि वैराग्य जागृत व्हायला लागतात. जेंव्हा तुमच्या आयुष्यात वैराग्य जागृत होते तेंव्हा तुम्ही नशीबवान असता!

जेंव्हा तुमचे सर्व मित्र तुम्हाला सोडून गेले असतील तर त्यांनी तुम्हाला तुमच्याविषयी,तुम्ही कोण आहात, तुम्ही काय आहात, आणि सत्य काय आहे यावर चिंतन करायला वेळ दिला आहे होय कि नाही? म्हणून तुम्ही खूप नशीबवान आहात.

सर्व आयुष्य कष्टदाई आहे याची जाणीव होणे हि पहिली पायरी होय. आयुष्य कष्टदाई आहे. आयुष्य दुखीः आहे. म्हणून लोक धार्मिक होतात . हि झाली एक पायरी.

पुढची पायरी म्हणजे आयुष्य आनंदमय आहे याची जाणीव होणे! प्रथम तुम्हाला अशी जाणीव होते कि हे सर्व कष्टदाई आहे.नंतर या सर्व दुखःप्रद गोष्टींपासून पुढची पायरी म्हणजे, ' दुखः कोठे आहे? चला, जागे व्हा'! अशा स्थितीत गुरूचा आयुष्यात प्रवेश होतो. गुरूची उपस्थिती किंवा जेंव्हा गुरु-तत्वाचा उदय होतो सर्व दुखः निवारण होते आणि आयुष्यात आनंदाचा प्रवेश होतो. पूर्ण आनंद ! आयुष्य म्हणजे आनंद! आयुष्य हि एक लीला आहे! असे प्रत्ययास यायला लागते.

आता, शेवटचा माणूस जो म्हणाला होता कि, ' मी खूप नशीबवान आहे 'त्याला थप्पड का मिळाली?

ज्येष्ठ भक्त म्हणाले,' गुरुदेवांनी त्याला थप्पड दिली कारण तो आत्म केंद्रित झाला होता, ' मी " नशीबवान आहे. थप्पड मिळताच त्याच्या जाणीव झाली कि ' तुम्ही अस्तित्वात नाही असे समजून जगा'. सहसा लोक अस्तित्वात असतात पण आयुष्य जगत नाहीत. आयुष्याशिवाय जगणे म्हणजे अज्ञान होय. आपण अस्तित्वात नाही असे समजून जगणे म्हणजे आत्म-प्रबोधन होय. ती एक थप्पड मिळताच तो जागा झाला.

त्या शेवटच्या गृहस्थाला ती थप्पड मिळताच तो संदेश समजून तो आनंदी झाला!

उपकृत होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? उपकृत होण्यासाठी दोघांची गरज असते आणि गुरु म्हणाले, ' अरे, जागा हो , तू आणि मी काय दोन आहोत काय ? आपण तर एकच आहोत. येथे मी नाही आणि तू नाही. येथे तर एकच दैवत्व अस्तित्वात आहे आणि हे सर्व एक नाटक, एक लीला आहे. त्याचा आनंद उपभोग! तुम्हाला जेंव्हा याची जाणीव होते तेंव्हा आयुष्यातून दुखः नाहीसे होते. प्रत्येक आव्हान हि एक संधी असते, आणि प्रत्येक संधी हि दैवात्वाकडे जायची एक पायरी असते. हाच या गोष्टीचा सारांश आहे. 

अजून एक गोष्ट.

आपल्या हाताची सर्व बोटे वेगळी असतात. कोणतीही दोन बोटे एकसारखी नसतात.

असेच एकदा सर्व बोटांमध्ये असा वाद उत्पन्न झाला कि सर्वात महान कोण आहे.

अंगठा म्हणाला, ' असे पहा कि मीच महान आहे.मी सर्वात जड असून जेंव्हा कोणी विजयी होतो तेंव्हा मला उंचावून विजयाची निशाणी म्हणून दाखवितात. त्यांना जर एखाद्या गोष्टीसाठी परवानगी द्यायची असेल तरी मला उंचावून दाखविले जाते.ते असे करतात कारण मी महान आहे. मी सर्वात सशक्त आहे.माझ्यात खरी शक्ती आहे! अगदी अशिक्षित असला तरी तो माझा उपयोग सही सारखा करतो.' अशा तर्हेने अंगठा म्हनला कि तोच महान आहे.

तर्जनी म्हणाली,' अरे, जेंव्हा लोकांना दिशा दाखवायची असते , तेंव्हा ते माझा उपयोग करतात. ज्यांच्या कडे शहाणपण आहे ते मार्गदर्शन करतात. मीच आयुष्याला दिशा दाखवितो आणि म्हणून मीच महान आहे.

नंतर मधले बोट म्हणाले,'मला वाटते कि तुम्ही सर्वजण आंधळे आहात! कोणाचाही हात पकडा आणि बघा कि कोण सर्वात उंच आहे.मीच सर्वात उंच आहे! तुम्ही विनाकारण वाद का घालीत आहात. असा वाद घालणे म्हणजे भर दुपारी सूर्य आहे कि नाही असा वाद घालण्यासारखे आहे.

त्यावर अनामिका म्हणाली,' मला तुमच्या सर्वांचे हसू येत आहे.लोक त्यांचे अलंकार कोठे घालतात? अंगठ्याला कोणी अलंकार घालीत नाहीत. अंगठी नेहमी अनामिकेतच शोभून दिसते.मीच सर्वात महान आहे. जगातील लोकांना हे ओळखिले आहे कि मीच सर्वात महान आहे.

हे ऐकून करंगळी हसत सुटली! बाकीच्या बोटांनी तिला विचारले कि, ' तू का हसत आहेस?' 

त्यावर ती म्हणाली,' जेंव्हा कोणी मोठी व्यक्ती येते तेंव्हा सर्वात पुढे कोण असते?( जेंव्हा नमस्कारासाठी किंवा प्रार्थनेसाठी हात जोडले जातात तेंव्हा करंगळी सर्वात पुढे असते.) जेंव्हा कोणी देवळात प्रार्थनेसाठी जाते, तेंव्हा सर्वात पुढे कोण असते?जो महान असतो तोच देवाच्या पुढे जातो!म्हणून मी देवाच्या जवळ आहे. जो देवाच्या जवळ असतो तोच महान हो ! म्हणून मीच महान आहे!

अशा तर्हेने प्रत्येक बोटापाशी महान होण्यासाठी काहीतरी कारण होते.

म्हणून, तुमच्यातील महानता ओळखा आणि दुसऱ्यालोकातील मोठेपणा ओळखा. मग तेथे तुम्ही उरणार नाही आणि तेथे दुसरे कोणी उरणार नाही आणि तेच नमस्ते होय! तोच पूर्णानंद होय.

भगवान गौतम बुद्धांनी या जडतेपासून तुम्हाला त्यात दुखः दडले आहे हे दाखविले आणि या दुख्खापासून तुम्हाला अशा जागी नेले कि जेथे सर्व आनंद भरून राहिला आहे यालाच वेदांत म्हणतात ( एक तत्वज्ञानाची परंपरा जेथे असे आत्म प्रबोधन सांगितले आहे कि जे मिळाल्यानंतर एखाद्याला अंतिम सत्याची जाणीव होते.) मी म्हणजे कोणी नाही तर शून्यत्व आहे आणि मीच सर्वकाही आहे म्हणजे पूर्णता आहे; ध्यान आणि उत्सव , हे सर्व एकत्र असते! आणि आजचा दिवस हा ध्यान आणि उत्सव हे दोन्ही साजरे करण्याचा आहे (पूर्णत्व)!

आपत्त्तीमध्ये श्रद्धा कशी टिकवून ठेवावी?

23
2013
Jun
बंगलोर, भारत

प्रश्न : गुरुदेव, जर्मनी आणि युरोपच्या काही भागातून आम्ही इतक्यातच सर्वनाशी पुराचा सामना केला. आपले पर्यावरणाप्रतीचे कर्तव्य यावर तुमचा काय संदेश आहे आणि सामाजिक माध्यमे यात आम्हाला कसा काय पाठींबा देऊ शकतात?

श्री श्री : नैसर्गिक आपत्त्या येत राहतात आणि मानवी चुकांमुळे त्यात वाढ होते. अशा जागा जिथे आपल्याला माहिती आहेत की या प्रकारच्या आपत्ती घडतात, आपली त्यांना तोंड देण्याची तयारी अतिशय थोडी असते. ही अशी बाब आहे ज्याने मला फार चिंता होते.

केदारनाथ इथे हजारो लोकांचे प्राण अतिशय भयानक अश्या पुरामध्ये गेले आहेत. आपले पर्यावरणाकडे झालेले दुर्लक्ष हे काही अंशी याला कारणीभूत आहे. आपण पर्यावरणाची घ्यायला पाहिजे तशी काळजी घेत नाही. हिमालय पर्वताचे वितळणे ही एक मोठी समस्य आहे. आपण प्रगतीच्या नावाखाली जंगलतोड करीत आहोत. अधिक शक्ती मिळवण्याच्या नावाखाली आपण अनेक गोष्टी केल्या आहेत ज्या आपण निराळ्या प्रकारे करू शकलो असतो.

दुसरी गोष्टी म्हणजे जरी हजारो लोक तिथे जात असतील तरीसुद्धा भारतातील तीर्थयात्रेकरू हे दुर्लक्षित आहेत. मी तर म्हणेन की त्यांनी या भागांमध्ये अधिक चांगले मार्ग आणि जलद सुटकेकरिता पर्यायी मार्ग बनवले पाहिजे. पूर हे येणारच, विध्वंस होणारच, परंतु आपण निदान लोकांचे जीव तरी वाचवू शकतो.

कँलगँरी आणि युरोप इथे लोकांच्या जीवाला इतका अपाय झाला नाही. त्सुनामीनंतरच्या नजीकच्या वर्षांमध्ये आपण इतके जीव गमावलेले नाहीत. ही तर हिमालयन त्सुनामी आहे. आपले आर्ट ऑफ लिविंगचे कार्यकर्ते तिथे आहेत आणि लोकांना मदतीच्या जिन्नसा देत आहेत. आपले कार्यकर्ते हे जर्मनी आणि कँलगँरी इथेसुद्धा कार्य करीत आहेत.

मी या कोणत्याही कार्यकर्त्यांना सांगितलेले नाही की त्यांनी जाऊन मदत कार्य करावे. आपले चैतन्य जेव्हा उंचावते तेव्हा असे घडून येते. आपली हृदयाला मानवी मुल्ये जाणवतात. अशा परिस्थितीत ते स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद देते आणि लोक यात उड्या मारतात आणि माणसांचे भले करण्याकरिता उत्तमोत्तम कार्य करतात.

या अशा प्रसंगातून आपल्या मानवतेची परीक्षा घेतल्या जाते; तुम्ही खरोखर मानव आहात की यंत्रमानव आहात ते. अशा प्रसंगांमधून आपल्याला दुर्दैवी लोकांसाठी आणि ज्यांना आपली गरज आहे त्यांच्यासाठी आपला मदतीचा हात पुढे करावा लागतो. म्हणून मोठ्या संख्येने लोकांनी एकत्र यावे आणि कधीही आणि कुठेही अरिष्ट ओढवेल तिथे मदत करावी.

सरकारने काळजी घेतली पाहिजे. अश्या आपत्तींचा अंदाज आधीच वर्तवण्यासाठी हवामान खाते आहे ज्यामुळे वेळीच काळजी घेऊन लोकांचे प्राण वाचवता येतील.या दिशेने बरेच कार्य करता येईल. आपत्ती व्यवस्थापनाचे स्वतःचे एक शास्त्र आहे. नेक इरादा असलेल्या व्यक्तींनी याला हातभार लावावा आणि पुढे येऊन अश्या परिस्थितीत मदत करावी; आणि ते तशी मदत करीत आहेत. जे अपत्तीग्रस्तांचे जीवन चांगले करण्याकरिता प्रयत्न घेत आहेत त्यांचा मी खरोखर आभारी आहे.

इथे मला भारतीय सेना आणि जवान ज्यांनी लोकांची मदत करण्याकरिता आपला जीव धोक्यात घातला त्यांनासुद्धा मी धन्यवाद म्हणतो. त्यांचे समर्पण आणि मदत ही अमूल्य आहे आणि आपण त्यांना त्यांच्या यत्नांकरिता त्यांचे आभार मानले पाहिजे.

प्रश्न : एक अभूतपूर्व आपत्ती केदारनाथ इथे ओढवली आणि हजारो लोकांनी प्राण गमावले आणि त्यांची ताटातूट झाली. ते सर्व तीर्थयात्रेला प्रार्थना करण्यासाठी गेले होते आणि त्यांना या आपत्तीला तोंड द्यावे लागले. या स्थितीत अनेक लोकांच्या श्रद्धेला तडा गेला असेल. आम्ही याला कसे हाताळावे?

श्री श्री : सर्वप्रथम, आपण हे समजून घेतले पाहिजे की देव हा समदर्शी आहे. निसर्ग हा निःपक्षपाती आहे. तो हे बघत नाही की तुमचे काय आणि माझे काय. देव केवळ केदारनाथ इथे वास करीत नाही. तो सर्वत्र आहे. तो तुमच्या हृदयात आहे. तो सर्व ठिकाणी आहे.

जिथे अनेक यात्रेकरू जातात अश्या तीर्थयात्रेच्या स्थळांवर मोठ्या जमावाला हाताळण्याच्या पुरेश्या सोयी उपलब्ध नाहीत आणि आपल्या देशातील सर्व तीर्थयात्रेच्या स्थळांवर बरेच दुर्लक्ष झालेले आहे. या ठिकाणी चांगल्या सोयी, चांगल्या सडका, चांगल्या दळणवळणाची साधने असायला हवीत आणि यावर जितके दिल्या गेले पाहिजे तितके लक्ष पुरवलेले नाही.

असे अनेक प्रसंग येतात जेव्हा श्रद्धा डळमळीत होते, परंतु काहीही होऊ दे आपण ‘सत्याचा नेहमी विजय होतो’ आणि जे चांगले असते त्याला न्याय हा मिळतोच या आपल्या श्रद्धेला घट्ट पकडून ठेवले पाहिजे.ही वेळ प्रार्थना करण्याची आहे. जेव्हा आपत्ती येतात, जेव्हा आपल्या मनावर भयाचा पगडा असतो तेव्हा प्रार्थनेने मदत होते. अवसान गळू देऊ नका. प्रत्येक जागा ही देवाच्या मालकीची आहे. आपत्ती या येतातच आणि आपत्तीच्या काळातच तुमच्या श्रद्धेची कसोटी होते. तुमच्या श्रद्धेला पकडून राहा आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांना तुम्ही काय मदत करू शकता ते.

कित्येक जीव वाचवल्या गेले आहेत. त्या जीवांकरिता आभार माना. आणि ज्यांनी जीव गमावला त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि त्यांच्या परिवारासाठी प्रार्थना करा. या प्रचंड दुःखातून त्यांचे कुटुंब बाहेर येऊ देत. या दुर्दैवी प्रसंगातून बाहेर येण्यासाठी देव त्यांना शक्ती देवो. ही प्रार्थना आपण केली पाहिजे. जे वाचवल्या गेले आहेत त्यांच्याकरिता प्रार्थना करा आणि त्यांनी सहन केलेल्या अश्या भयंकर परिस्थितीतून त्यांना वाचवण्यासाठी देवाचे आभार माना.

मानवी दुःखांतिकेचे वर्णन करण्यासाठी शब्द नाहीत. आता आपण जागे व्हायला पाहिजे आणि अश्या बिकट आणि अवघड भूभागातील अडचणी लक्षात घेऊन पर्यायी व्यवस्था केल्या गेल्या पाहिजेत. योग्य रस्ते आणि चांगली दळणवळणांची साधने आणि परिवहन व्यवस्था आपण केली पाहिजे. हे अत्यंत तातडीचे आहे. दीर्घकाळापासून लोक तिथे जात आहेत आणि या आपत्तीमुळे ते तिथे पुन्हा जायचे थांबवणार नाहीत.

या शोकांतीकेपासून आपण धडा घेऊ या. या ग्रहावर मानवी निष्काळजीपणामुळे अश्या प्रकारची शोकांतिका परत कधीही घडता कामा नये. याच्या पलीकडे पण काही वर्तवू शकत नाही किंवा बोलू शकत नाही. म्हणून आपण मानवी निष्काळजीपणा जितका अधिक शक्य होईल तितका अधिक कमी केला पाहिजे.

प्रश्न : ब्राझील इथे इतक्यात झालेली निदर्शने यामुळे जीवनाच्या प्रत्येक पैलूवर परिणाम झाला आहे. आपण याला कसे काय हाताळावे?

श्री श्री :  जेव्हा लोकांना न्याय मिळत नाही किंवा जेव्हा ते समाजातील भ्रष्टाचारामुळे कंटाळून जातात तेव्हा त्यांचा भडका उठतो. लोक निदर्शने करण्यास, निषेध नोंदविण्यास एकत्रित होतात. लोक जागृत होत आहे ही एक चांगली खुण आहे.

एक पद्धत आहे जे जसे येते आहे तसे ते स्वीकारीत जायचे, त्याची फिकीर करायची नाही आणि भ्रष्ट व्यवस्थेचा एक भाग बनून राहायचे. दुसरी पद्धत आहे की जागे व्हायचे आणि भ्रष्टाचाराविरुद्ध, अन्यायाविरुद्ध, जे तुम्हाला योग्य वाटत नाही त्याच्याविरुद्ध उभे ठाकायचे. या दृष्टिकोनाचे स्वागत आहे. आपण याचे खरोखर कौतुक केले पाहिजे.

एका गोष्टीकडे आपण निश्चित लक्ष ठेवले पाहिजे की जमावाने असामाजिक किंवा हिंसक होता कामा नये. निदर्शने शांत असतील, ते एका कारणासाठी आहेत आणि कोणत्या व्यक्तीच्या विरुद्द नाहीत कारण लोक बदलतात आणि स्वतःचे रुपांतर घडवून आणणे प्रत्येकाला शक्य असते हे आपण लक्ष ठेवणे जरुरी आहे. लोकांमध्ये परिवर्तन येते हे आपण ओळखले पाहिजे. म्हणून अश्या निदर्शांचा शिष्टाचार आपण पाळला पाहिजे आणि ही निदर्शने शांततापूर्वक आणि हेतुपूर्वक असली पाहिजे.

जेव्हा आपण शांत नसतो तेव्हा आपण हेतू आणि ध्येय हेसुद्धा गमावून बसतो. माझे तर म्हणणे आहे की कोणत्याही लढा हा अहिंसेच्या तत्वावर आधारित असला पाहिजे. ते एका कारणासाठी असले पाहिजे आणि एकाद्या व्यक्तीच्या विरुद्ध असता कामा नये. जन आणि मालमत्ता यांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होता कामा नये. या नियमांवर हे घडले पाहिजे.

चांगला हेतू असणारी माणसे निदर्शने सुरु करतात आणि नंतर ध्येयावर केंद्रित राहणे मुश्कील होऊन बसते कारण असामाजिक तत्त्वे प्रवेश करतात आणि हिंसाचार सुरु करतात. इथेच लोकांनी हिंसाचार आणि नासधूस यांच्या वाईट परिणामाबाबत जागरूक होणे गरजेचे आहे.

जर निषेध नोंदविताना किंवा निदर्शनाच्या अग्रभागी अहिंसा ठेवली तर त्याचे स्वागत केले पाहिजे. जर हिंसेला सुरुवात झाली तर ती शांत करण्याकरिता बळाचा उपयोग करणे याच्याशिवाय कोणताही पर्याय उरत नाही. हे अतिशय कठीण होऊन बसते. मी पुन्हा जोर देऊन सांगतो की आपण शांततापूर्ण क्रांती, अहिंसात्मक क्रांती घडवून आणली पाहिजे. आजच्या घडीला याची फार फार गरज आहे.

प्रश्न : प्रिय गुरुदेव, हिंसाचाराचा वापर न करता आम्ही आमच्या नागरी आणि लोकशाही हक्कांचे संरक्षण कसे करू? सरकार ही ध्रुवीकरण प्रबलीत करीत आहे आणि ‘फोडा आणि राज्य करा’ ही नीती वापरत आहे अशा परिस्थितीत समाजात तद्भाविता कशी काय निर्माण करावी?

श्री श्री : मोठ्या ध्येयामध्ये अनेक अडचणी आणि अनेक अडथळे येतात. जेव्हा आव्हाने ही मोठी असतात तेव्हाच आपल्याला आपल्या नीतीमूल्यांना पकडून ठेवले पाहिजे. मला माहिती आहे की जेव्हा अन्याय होत असतो तेव्हा शांत राहणे हे कठीण असते, आणि खास करून जेव्हा हिंसाचार होत असतो. आपल्याला ती अधिक काळजी घेतली पाहिजे आणि आपली तडफ जिवंत ठेवली पाहिजे. आपण असे म्हटले पाहिजे की काय वाट्टेल ते होवो आपण आपल्या लोकशाही हक्कांच्या ध्येयाला पडकून ठेवले पाहिजे.

जेव्हा तुमचा निर्धार पक्का असतो तेव्हा मी सांगतो की ज्या लहानसहान अपयशांना तुम्हाला तोंड द्यावे लागेल ती काहीच नसतील. तुम्ही तरीसुद्धा पुढेच जात राहाल. 

न्याय मिळवणे आणि तुमचे मानवी हक्क आणि मानवी मुल्ये पाहिजे असणे हे तितके सोपे नाही. ही मजल फार लांबची आहे. समाजात निहित हितसंबंध असतात आणि केवळ सत्तेला कवटाळून बसणारे लोक असतात. काहीही विचार न करणारे लोक असतात आणि त्यांना केवळ हिंसाचाराची भाषा कळते. जेव्हा असे दृश्य असते तेव्हा आपल्या ध्येयाचा पाठपुरावा शांतपणे आणि अहिंसेच्या मार्गाने करीत असताना आपल्याला अधिक खबरदारी घेणे जरुरी आहे.

सत्याचा नेहमी विजय होतो असे नैतिक धैर्य आपल्या माणसांना आपण दिले पाहिजे. जेव्हा तुम्हाला विश्वास होईल की सत्याचा विजय होईल तेव्हा तुम्ही आत्मविश्वास आणि अत्यंत जरुरी असलेल्या धैर्याने येणाऱ्या आव्हानांना तोंड देऊ शकाल. 

जेव्हा आपण उदास, तणावग्रस्त आणि क्रोधीत होतो तेव्हा आत कुठेतरी आपण डगमगतो आणि आपली उर्जा गमावून बसतो. कोणतेही मोठी कार्य करण्यास आपल्याला प्रचंड उर्जेची आवश्यकता असते आणि ही प्रचंड उर्जा आपल्या आतून एक प्रकारच्या शांततेतून येते.

दुसरी गोष्ट म्हणजे संवादाकरिता नेहमी दार उघडे ठेवा.

तिसरे म्हणजे कोणतीही व्यक्तीला किंवा व्यवस्थेला वाईट असे लेबल लावू नका. एकदा का तुम्ही लेबल लावले की मग संवादाकरिता तुम्ही दार बंद करता. महात्मा गांधी यांनी ब्रिटीश लोकांना वाईट असे लेबल लावले नाही. त्यांनी संवादाचे ते दार सदैव त्यांच्यासाठी उघडे ठेवले होते. त्यांच्या अगणित अत्याचारानंतरसुद्धा गांधीजी संवादाकरिता त्यांच्याकडे जात राहिले. इतर लोक किंवा सरकार हे लोकांच्या विरुद्ध आहे असा आपण विचार करता कामा नये. त्याने आपण अजून क्रोधीत होऊ, आणि जेव्हा आपण क्रोधीत होतो तेव्हा आपण आपली अधिक उर्जा गमावून बसतो.

सर्वात उत्तम म्हणजे संवादाकरिता उपलब्ध राहणे, न्याय, लोकशाहीचे अधिकार, शांती, समृद्धी आणि प्रगती याबाबतीत तुमच्या दृष्टीकोनात तुम्ही खंबीर राहा. स्वतः अविचल राहा आणि निदर्शने करताना लोकांना अविचालीत आणि शांत राहण्यास प्रोत्साहन द्या. मला माहिती आहे की हे बोलणे फार सोपे आहे आणि करणे एकदम कठीण, परंतु तरीसुद्धा आपण या दिशेने सरकले पाहिजे म्हणजे मग विजय हा आपलाच असेल.

प्रश्न : प्रिय गुरुदेव, पाकिस्तानातील मुस्लीम हे शांतीप्रिय आहेत, म्हणून आम्ही पाकिस्तानांतून दहशतवाद कसा काय नष्ट करू शकतो?

श्री श्री : दहशतवादाला आवर घालण्यासाठी आपण संवाद कसा काय साधू शकतो हे आपण पाहायला पाहिजे आणि दहशतवाद्यांच्या मनात जाणीव निर्माण केली पाहिजे.

दुसरी गोष्ट म्हणजे आपण विविधतेचा स्वीकार केला पाहिजे आणि विविधतेचा आनंद लुटला पाहिजे. विविधता हे तंट्याचे किंवा भांडणाचे कारण होऊ शकत नाही, विविधता ही उत्सव साजरा करण्याची गोष्ट आहे.

प्रत्येकजण निराळे आहे.प्रत्येकजण वेगळे वस्त्र परिधान करून आहेत, आणि प्रत्येकाची जीवनशैली ही निराळी आहे. आपण वैविध्य स्वीकारले पाहिजे आणि वैश्विक कुटुंबाचा दृष्टीकोन ठेवायला पाहिजे. आपण सगळे एक विश्व कुटुंबाचे आहोत जरी आपल्या भाषा वेगळ्या आहेत, धर्म वेगळे आहेत, संस्कृती निराळी आहे आणि राष्ट्र वेगळे आहेत. विविधतेचा हा उत्सव साजरा करणे हे तरुण मनांवर बिंबवले पाहिजे. एकदा का त्यांना हे माहिती झाले की मग ते अतिरेकी किंवा दहशतवादी होणे शक्यच नाही.

दहशतवाद येतो जेव्हा त्यांना वाटते की केवळ त्यांच्याकडेच स्वर्गाची चावी आहे. ही भ्रामक कल्पना किंवा हा एक गैरसमज आहे जो त्यांना अशा स्थानी नेऊन ठेवतो.अतिरेकी आणि दहशतवादी मनोवृत्ती असलेल्या लोकांच्या संबंधात मी आलेलो आहे. दोन प्रकारचे अतिरेकी असतात, एक असतात धार्मिक अतिरेकी आणि दुसरे असतात वैचारिक अतिरेकी.

भारतातील माओवाद्यांकडे कारण आहे आणि त्या कारणासाठी ते आपले प्राण त्याग करण्यास तयार असतात. त्यांना एकच गोष्ट कळत नाही ती म्हणजे इतरांना दुःख आणि हाल अपेष्टा दिल्याने त्यांच्या ध्येय पूर्ती करता मदत होणार नाही किंवा त्यांना त्याने कोणताही आनंद प्राप्त होणार नाही. आपण हे विविधतेचे शिक्षण लोकांपर्यंत नेले पाहिजे, त्यांच्याबरोबर संवाद प्रस्थापित केला पाहिजे आणि ‘केवळ मी बरोबर आहे आणि बाकीचे सर्व चुकीचे’ अश्या चुकीच्या अभिव्यक्तीमध्ये फसण्यापासून थांबवले पाहिजे.

जर या लोकांनी थोडेफार श्वसन केले, थोडे शिथिल झाले आणि सृष्टीतील सौंदर्य पहिले, विविधतेतील सुंदरता तर मला खात्री आहे की ते नक्कीच बदलतील. आणि मी अनेकांना त्यांची विचार करण्याची पद्धतीमध्ये बदल घडून येताना बघितले आहे. त्यांच्यात काही चुकीचे मतरोपण असते, काही अनोळखी भीती असते, किंवा ते स्वतः हिंसाचाराचे बळी असतात. हे ते कारण असू शकते ज्यामुळे ते इतकी अतिरेकी विचार प्रणाली स्वीकारतात जी स्वयं विनाशी आहे.

प्रश्न : अर्जेन्टिनामधील राजकीय वर्गाला आम्ही कसे काय समजवावे की समाज बांधण्याचा सर्वोत्तम मार्ग हा शांतीतून आहे?

श्री श्री : आपण राजकारणाला अध्यात्मीक, व्यवसायाला सामाजिक आणि धर्माला धर्मातीत करायला पाहिजे. हे उत्तर आहे. धर्मातीत असणे म्हणजे धार्मिक लोकांनी संपूर्ण जगाचा विचार केला पाहिजे, केवळ त्यांच्या धर्माचा किंवा त्यांच्या जातीचा नाही. त्यांच्या धर्माचे पालन करणाऱ्यांबरोबरच धार्मिक लोकांना नेहमी जवळीक वाटते. त्याने या अडथळ्यातून बाहेर यावे आणि संपूर्ण जगाकरिता प्रार्थना करावी.

त्याचप्रमाणे, प्रत्येक व्यावसायिकाने थोडे फार सामाजिक अभियांत्रिकी करावी, किंवा काहीतरी सामाजिक जबाबदारी उचलून घ्यावी. ते याचा भाग असले पाहिजे.

राजकारणी लोकांनी प्रथम राष्ट्राबद्दल विचार केला पाहिजे, नंतर त्यांचा पक्ष आणि नंतर स्वतःबद्दल. आज काय होते आहे तर ते सर्वात आधी स्वतःचा विचार करतात, नंतर पक्षाचा, आणि जर काही उरले तर मग राष्ट्राचा. या प्रथेला ताबडतोब पालटले पाहिजे.

जेव्हा ते मोठा भलेपणा करण्याची काळजी घेतली, समाजातील तमाम लोकांकरिता, तर मग साहजिक आहे की ते अध्यात्मिक असतील, त्यांना शांतता प्रिय असणे हे नैसर्गिक असेल आणि जगभरातील समाजात कोलाहल निर्माण करणारी संकुचित वृत्ती गायब होऊन जाईल.

सत्ता आणि पैसा येतात आणि जातात परंतु आपल्या वागणुकीतून, आपल्या कृतीमधून आपण जो चांगुलपणा निर्माण करतो तो कायम राहतो. हेच ते काय राजकारण्यांनी समजून घेतले पाहिजे.त्यांचा निकटदृष्टीकोन असता कामा नये तर त्यांचा दृष्टीकोन हा अधिकाधिक लोकांचे दीर्घकालीन भले होणारा हवा. हे त्यांनी त्यांची कार्यप्रणाली म्हणून ठेवले पाहिजे. ती सर्वात आदर्श गोष्ट राहील.

म्हणून शांती ही पूर्णपणे महत्वाची आहे. जेव्हा आपण शांत असतो तेव्हा आपल्याला अश्या कल्पना सुचतात. जेव्हा आपण शांत नसतो तेव्हा आपण फार विचलित असतो आणि आपण अश्या कृती करू आणि असे विचार मनात आणू ज्यामुळे शांती नाही तर अजून अशांती निर्माण होईल. म्हणून सर्वांनी ध्यान करणे जरुरी आहे!

प्रश्न : शांतता म्हणजे काय आणि आम्ही आमच्या जीवनात आमचा धर्म, संस्कृती आणि परिवार यांच्यामार्फत आणि शिशुवर्गापासून सुरुवात करून आमच्या शिक्षण प्रणालीमध्ये शांतीच्या तत्त्वांची कशी काय अंमलबजावणी करावी

श्री श्री : आपण मुलांकडून जास्तीतजास्त शिकले पाहिजे. त्यांनी रोज एक नवीन मित्र बनवला पाहिजे हे आपण त्यांना समजावण्याची गरज आहे.

चाळीस पन्नास मुलांच्या वर्गात जर तुम्ही विचाराल की त्यांचे किती मित्र आहेत तर उत्तरात नेहमी हाताच्या बोटावर मोजण्याइतके हेच मिळते, आणि ते त्या मित्रांसोबत वर्षभर राहतात. त्यांच्या मैत्रीपूर्ण स्वभावाला आपण बाहेर आणण्याचे काम केले पाहिजे. आणि ते घडून येण्यासाठी रोज एक नवीन मित्र बनवण्यासाठी आपण त्यांना सांगायला पाहिजे. तुमचा अपमान होत असेल तर वाईट वाटून घेऊ नका. हसा आणि सोडून द्या. विनोदबुद्धी आणि खेळकरपणा ठेवा. विविधतेचा आदर राख. 

जर कोणी वेगळ्या प्रकारचे कपडे घातले असतील किंवा वेगळे दिसत असतील किंवा काहीतरी निराळे करीत असतील तर त्यांना परग्रहावरून आल्यासारखी वागणूक देऊ नका पण त्यांना तुमचा भाग असल्याची भावना वाटू द्या. 

धर्माचा उद्देश्य हे आपल्या जीवनात प्रेम आणि शांतता आणणे हे आहे. आपण एका वैश्विक सत्य, वैश्विक आत्मा आणि वैश्विक प्रेम यांच्याबरोबर जोडले जाणे आणि तसेच आपल्या सोबत असणाऱ्या माणसांची मदत करणे हेच धर्माचे कारण आहे. तर धर्माचे सार आहे दिव्यत्वाचा, प्रकाशाचा, प्रेमाचा आंतरिक अनुभव घेणे आणि हेच आपले ध्येय असले पाहिजे आणि यावरच आपण लक्ष केंद्रित केले पाहिजे.

दुसरी गोष्ट म्हणजे सांस्कृतिक विविधता. संस्कृती ही दर काही किलोमीटरवर बदलते. तुम्ही एक शंभर किलोमीटर प्रवास करून जा आणि बोलीभाषा बदलेले, अन्न बदलेले आणि ही विविधता तर आपल्या सृष्टीतील सौंदर्य आहे. आपण याचे कौतुक केले पाहिजे. याला तंट्याचा मुद्दा बनवण्यापेक्षा आपण याला उत्सव साजरा करण्याची संधीमध्ये बदलून टाकले पाहिजे. हे अतिशय महत्वाचे आहे आणि हे सर्व करण्याकरिता आपल्याला उर्जेची आवश्यकता आहे.

जेव्हा आपण तणावग्रस्त असतो तेव्हा आपल्याला उर्जा कशी काय मिळू शकेल? इथेच तर आपल्याला काही श्वसनाचे व्यायाम करणे, योग्य आहार घेणे आणि जीवनात काही विनोद असणे जरुरी आहे आणि सर्वात महत्वाचे आहेत ती रोजची दहा ते पंधरा मिनिटे जी शिथिल होण्यास अथवा ध्यान करण्यास असतात. मी याची शिफारस सगळ्यांना करतो. केवळ दहा ते पंधरा मिनिटे, बसा आणि शिथिल व्हा, तुमच्या मनाला शिथिल करा, तुमच्या बुद्धीला शिथिल करा, आतल्या दिशेने जा, स्वतःच्या श्वासाचे निरक्षण करा, तुम्हाला कळेल की तुम्ही एक उर्जेचे कारंजे आहात, तुम्ही प्रेमाचा सागर आहात आणि तुम्ही कल्पनांचा डोंगर आहात.

प्रश्न : कोरियामध्ये आत्महत्येचे प्रमाण फार जास्त आहे. कोरियातील मुले ही अशा वातावरणात वाढून राहिली आहेत जिथे अतिशय स्पर्धा आहे आणि संस्कृती व अध्यात्म यांचा अभाव. कृपा करून आमच्यासाठी तुमचे ज्ञानाचे शब्द पाठवा.

श्री श्री : जेव्हा उर्जेची पातळी खालावते तेव्हा तुम्ही उदास होता आणि जर ती आणखी खालावली तर आत्महत्येच्या प्रवृत्ति निर्माण होतात. नीट श्वसनाचे व्यायाम, थोडे ध्यान आणि चांगली व प्रेमळ सांगत याने उर्जेची पातळी उंचावते.

नेहमी जेव्हा कधी आपली मनात काही नकारात्मक विचार आले की आपण ते कोणाबरोबर वाटून घेतो आणि ज्यांना आपण मित्र म्हणवतो असे लोक या नकारात्मकतेला दूर करायचे सोडून ती अजून घट्ट करतात. ते म्हणतात, ‘होय, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे आणि सर्व काही निराशाजनक आहे!’ वास्तविक पाहता त्यांनी तुमचा उत्साह आणि उर्जा यांची पातळी वाढवायला पाहिजे.

केवळ गरीब माणसे आत्महत्या करितात असे नाही तर श्रीमंत माणसेसुद्धा आत्महत्या करतात कारण आत्महत्येच्या प्रवृत्ती करिता त्यांची मनःस्थिती जबाबदार असते. याचे भौतिक संपदेबरोबर काही देणे घेणे नसते. मी तर म्हणेन की आत्महत्येची प्रवृत्ती असलेल्या व्यक्तीला कोणीतरी ध्यान, काही श्वसनाचे व्यायम शिकवले पाहिजे म्हणजे त्यांची उर्जेची पातळी उंचावेल. आणि हे शक्य आहे.

स्वतःविरुद्ध हिंसा ही दुसऱ्याच्याविरुद्ध हिंसेइतकीच वाईट आहे. तर जग हे एकीकडे सामाजिक हिंसा आणि दुसरीकडे आत्महत्या यामध्ये अडकले आहे. केवळ अध्यात्मच आहे जे त्यांना केंद्रित करू शकते आणि त्यांना या दोन टोकांपासून वाचवू शकते.

जर तुम्हाला कोणी थोड्याजरी आत्महत्येच्या प्रवृत्तीचे आढळले तर कृपा करून त्यांना थोडा योग करण्यास सांगा. त्यांना चांगल्या संगतीत आणा, त्यांना गायला आणि नाचायला लावा, आणि त्यांना हे समजावा की जीवन हे केवळ थोड्या भौतिक अवस्थेपेक्षा खूप जास्त आहे. कोणाकडून टीका किंवा कौतक यापेक्षा जीवन खूप काही जास्त आहे. जीवन हे एक नाते किंवा नोकरी याच्यापेक्षा खूप मोठे आहे. नातेसंबंधातील अपयश, नोकरीतील अपयश आणि जे मिळवायचे होते ते जीवनात न मिळणे ही आत्महत्येची करणे आहेत. तुमच्या चेतनेमध्ये उठणाऱ्या छोट्याछोट्या इच्छा यापेक्षा जीवन फार मोठे आहे. जीवनाकडे एका मोठ्या दृष्टीकोनातून पहा आणि स्वतःला कोणत्या तरी सामाजिक कार्यामध्ये, सेवेमध्ये गुंतवून घ्या. 

सेवेमुळे लोक शहाणे रहातात आणि मानसिक उदासीपासून दूर राहतात. मानसिक उदासी ही आर्थिक मंदीपेक्षा फार खराब. हे निभावून नेण्याची आणि आपल्या नजीकच्या लोकांना मदत करण्याची आपण जबाबदारी घ्यायला पाहिजे. डी आर्ट ऑफ लिविंग अश्या लोकांबरोबर काम करण्यात अतिशय गुंतलेले आहे आणि हे उदासी आणि आत्महत्येची प्रवृत्ती यांच्या संकटाचे उच्चाटन करण्याकरिता आणखी लोकांनी सहभागी झालेले मला फार आवडेल.

प्रश्न : व्यसनाधीनता ही समजतील सर्वात मोठी गंभीर समस्या आहे, यातून बाहेर कसे पडावे? तसेच व्यसनाधीन मुलांच्या पालकांसाठी तुमच्याकडे काही सल्ला आहे का?

श्री श्री : मुलांनी व्यसन जडेल आणि ज्यामुळे त्यांना अपाय होईल अशा पदार्थांना हात लावू नये अशा प्रकारचा अडथळा पालकांनी मुलांच्या मनात निर्माण केला पाहिजे. आपण त्याच्याविरुद्ध पूर्वग्रह निर्माण केला पाहिजे, एक मानसिक अडथळा जो त्या दिशेने पाहण्यापासूनसुद्धा थांबवेल. हे जरुरी आहे.

जसे एखादे झाड वाढवताना तुम्ही त्याच्या आजूबाजूला कुंपण लावता त्या झाडाचे संरक्षण करण्याकरिता. अगदी त्याचप्रमाणे आपण बालमनांना जपले पाहिजे, त्याकरिता काही मानसिक कुंपण घालणे जरुरी आहे. आपण त्यांना काही संकल्पना दिल्या पाहिजे ज्यांच्या आधारामुळे ते त्या दिशेने एक इंचसुद्धा पाऊल टाकणार नाही.

जे आता व्यसनाधीन आहेत त्यांना त्यातून बाहेर काढा, त्याचे तीन मार्ग आहेत: प्रेम, लोभ आणि भीती.जर त्यांचे कोणावर प्रेम आहे तर त्यांना प्रेम असलेल्या व्यक्तीची शप्पथ घ्यायला लावा की ते त्याला आता परत कधीच हात लावणार नाही. किंवा त्यांना सांगा की ते अतिशय भाग्यवान बनतील जर ते व्यसन असलेल्या पदार्थांना हात नाही लावतील.

ज्या कोणत्या प्रकारे जमेल त्यांना मदत करा यातून बाहेर येण्यासाठी. होमिओपॅथी आणि आयुर्वेद यांच्यामध्ये अनेक उपचार आहेत. योग आणि ध्यान हे सुद्धा फार चांगले आहेत. केवळ योग आणि ध्यान यामुळे मिलियन्स लोकांना मी व्यसनाधीनतेपासून दूर झालेले पहिले आहे.

प्रश्न : जर कोणाला असे वाटत असेल की योग, ध्यान आणि प्राणायाम हे धर्मातीत नाही आहे, तर तुमचा त्यांच्यासाठी काही सल्ला आहे का?

श्री श्री : ज्यांना योग, ध्यान आणि प्राणायाम धर्मातीत वाटत नाही अशा लोकांनी त्याचा प्रयोग केलेला नाही आणि त्यांची पूर्वग्रहदूषित मते आहेत. एखादा व्यायम किंवा एखादे तंत्र हे प्रत्येकासाठी आहे, त्याचा उपयोग प्रत्येकाला होतो. त्याने मन शांत होते आणि अधिक सृजनशील बनते. म्हणून लोकांनी आधी त्याचा प्रयोग केला पाहिजे आणि नंतर जर त्यांना दिसून येईल की ते किती धर्मातीत आणि किती वैश्विक आहे ते.

योग हा कोणत्याही व्यक्तीच्या धर्माचा अथवा त्यांच्या विश्वास प्रणालीचा विरोध करीत नाही. हा एक गैरसमज आहे आणि तो सहजपणे दूर करता येतो केवळ एकदा केल्याने.

प्रश्न : जगात अनेक धर्म आहेत. धर्म हे फुट पडण्याचे कारण आहे का किंवा धर्मामुळे एकजूट होते का?

श्री श्री : ज्ञानाशिवाय, विवेकाशिवाय धर्म हे लोकांमध्ये दुफळी निर्माण करीत आहे असे भासते. ते तुमचा गाभा बनते किंवा तुमच्या व्यक्तित्वाची एकुलती एक ओळख.

सर्वप्रथम वेगवेगळ्या धर्मांमध्ये तंटे उत्भवतात, नंतर तुम्हाला अंतर धर्मामध्ये भांडणे दिसतील आणि मग गट निर्माण होतात. हे सर्व घडते ते ज्ञानाच्या आणि समजुतीच्या अभावामुळे.

एक विवेकी माणूसाचा प्रत्येक धर्मामुळे फायदा होतो. आपल्या जीवनाचे मूल्य धर्म वाढवतो आहे का याकडे तो लक्ष ठेवतो. या विवेकाशिवाय जर तुम्ही धर्माला केवळ स्वतःची ओळख म्हणून धरून बसलात आणि स्वतःच्या परिपक्वतेकरिता नाही तर मग तो नक्कीच विभाजनाचे काम करेल.

आपली ओळख सर्वात आधी अशी पाहिजे की आपण सर्व एकाच प्रकाशाचा भाग आहोत. आपली दुसरी ओळख अशी की आपण सर्व एका मानवी समाजाचा हिस्सा आहोत, एक वैश्विक कुटुंबाचा हिस्सा. आणि तिसरी ओळख आपला देश किंवा भाषा होऊ शकते. चौथी ओळख असेल आपला धर्म. आणि पाचवी ओळख आपला वारसा किंवा आपला परिवार हे होऊ शकते.

तुमच्या इतर ओळखी असू देत, परंतु जेव्हा तुम्ही हे विसरता की तुम्ही मानवी समजाचा, एका वैश्विक प्रकाशाचा हिस्सा आहात, तेव्हा धर्माचा उपयोग आपल्या समाजामध्ये फुट पाडण्यासाठी आणि आपल्या नाशासाठी केल्या जातो. विवेकामुळे तुम्ही विविधतेचा उत्सव साजरा करू शकता आणि प्रत्येक धर्मातून त्याचा उत्कृष्ट्पणा घेऊ शकता म्हणजे मग तुमचे एका चांगल्या मानवामध्ये रुपांतर होते.

प्रश्न : श्री श्री, सर्वांकरिता तुमचा काय संदेश आहे?

श्री श्री : या धरतीवरील प्रत्येक चेहरा हे विश्वाचे एक पुस्तक आहे, देवाचे पुस्तक. प्रत्येकजण हे प्रेमाचे कारंजे आहे. हे प्रेम व्यक्त होऊ द्या, या कारंज्याला वाहू द्या; आणि या घडीला आपल्या ग्रहाला संपन्न करा. तुम्हा सर्वांना प्रेम आणि आशीर्वाद.