शांत मन ही निर्मळ कृतीची गुरुकिल्ली आहे

09
2014
Dec
बेंगळूरू, भारत

बऱ्याच काळापूर्वी माझ्या मनात असाच एक विचार आला. 
एका राजाचे कोणीही मित्र नसतात आणि एका संताचे कोणीही 
शत्रू नसतात. जर राजाने मित्र बनवण्यास सुरुवात केली तर त्याचा 
तोटा होईल. त्याचप्रमाणे जर एका संताला शत्रू असतील तर त्याचे 
एका नाहीतर दुसऱ्या प्रकारे नुकसानच होईल. जर राजाचे मित्र असतील 
तर अशी शक्यता आहे की त्याच्या मित्रांच्याप्रती पक्षपाती राहून तो 
निर्णय घेईल आणि असा निर्णय लोकांच्या मोठ्या प्रमाणावर भल्याचा 
ठरणार नाही. जर राजा अनेक मित्र बनवू लागला तर त्यामुळे तो 
समदर्शी राहू शकणार नाही आणि मग त्याच्याकडून लोकांना निष्पक्षपाती 
न्याय मिळणार नाही. हो की नाही?
आपण राजाबरोबर अति जवळीक साधु नये आणि एका ज्ञानी संतापासून 
अति दूर जाऊ नये. जे राजाबरोबर अति जवळीक साधतात किंवा एका 
ज्ञानी संताच्या संगतीपासून अति दूर जातात त्यांचे कोणत्या न कोणत्या 
प्रकारे नुकसान हे नक्कीच होणारच.
प्रश्न आणि उत्तरे
 
प्रश्न: या अतिरेकी हल्ल्यांमुळे भूतकाळात अनेक निष्पाप लोक हे मृत्यू 
पावले आणि आजसुद्धा कित्येकजण मृत्यू पावत आहेत. मला हे सर्व 
बघणे सहन होत नाही.
 
श्री श्री: जगात अतिरेकी ही सर्वात मोठी समस्या आहेत. म्हणूनच 
आजसुद्धा भगवद गीता हे समयोचित आहे. 
भगवद गीता असे कधीही म्हणत नाही की जर तुम्हाला एका गालावर 
थप्पड पडली तर दुसरा गाल पुढे करा. नाही!  जर कोणी तुमच्या 
श्रीमुखात थप्पड मारत असेल तर तुम्ही तुमचे धनुष्य आणि बाण 
काढा आणि त्यांना ताबडतोब मारा, पण बदला म्हणून किंवा तिरस्काराने 
म्हणून नाही तर शांतपणाने. समोरच्या माणसाला धडा शिकवण्याच्या 
हेतूने मारा. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ' मयि सर्वाणि कर्मणी 
संन्यास्याध्यात्मचेतसा l निराशीर्निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः 
(३.३०) याचा अर्थ आहे : जा आणि दुष्टांबरोबर युद्ध करा पण योगामध्ये 
स्थित राहून 

प्रश्न: जय गुरुदेव, असा कोणता शब्द किंवा असे कोणते वाक्य आहे 
का जे सर्व वयांच्या गटांकरिता म्हटले जाऊ शकते आणि जे सर्व प्रसंगी 
वापरले जाऊ शकते? जर हो तर मग ते काय आहे?
 
श्री श्री: 'जय गुरुदेव!' हे कोणत्याही वेळी, आणि कोणत्याही कारणाने 
सर्वांना म्हणायला चांगले आहे. सुप्रभात, शुभरात्री, स्वागत आहे, 
रामराम, अरे माझ्या देवा! सगळ्याकरिता तुम्ही ‘जय गुरुदेव’ म्हणू 
शकता. आणि जेव्हा गोष्टी घडत नाहीत तेव्हा पण तुम्ही ‘जय गुरुदेव’ 
किंवा ‘ॐ नमः शिवाय’ म्हणू शकता.
प्रश्न: गुरुदेव, माझे डोके अनेक विचारांनी भरले आहे. मला कळत 
नाही काय करावे. कृपा करून काहीतरी सुचवावे.
 
श्री श्री: जर तुमचे डोके अनेक विचारांनी भरले आहे तर जमिनीवर 
झोपा आणि गडबडा लोळा आणि तुम्ही पाहाल की तुमच्या शरीराचा 
रक्तप्रवाहात सुधारणा झालेली आहे. जेव्हा रक्तप्रवाहात सुधारणा होते 
तेव्हा मनाला बरे वाटते. म्हणून तर ते शयन प्रदक्षिणा (जमिनीवर 
गोलाकार फिरत देवाची भक्ती करण्याची पद्धत) करतात. ते अनुभवा 
आणि पहा की तुमच्या मनःस्थितीत कसा बदल घडतो ते.
जुन्या दिवसात तो शिबिराचा एक भाग होता. कँनडामध्ये गवताच्या 
टेकड्या आहेत आणि लोक त्यावरून गोलाकार लोळत येतात. दगड 
नाहीत, केवळ गवत, ते एकदम सुरक्षित आहे. जेव्हा तुम्ही जमिनीवर 
गोलाकार लोळता, तेव्हा सर्व भय आणि चिंता निघून जातात.

प्रश्न: प्रिय गुरुदेव, या जीवनाचे रहस्य काय आहे? हा एक खेळ 
आहे का?
 
श्री श्री: प्रत्येक लहानसहान गोष्टीत गहन अर्थ शोधण्याचा प्रयत्न 
करू नका. असे केले तर तुम्ही आयुष्य जगणार नाही तर केवळ 
संकल्पना आणि कल्पना यांच्यात अडकून राहाल. 

तुम्ही बस्स सोडून द्या आणि प्रत्येक गोष्टीत कारण शोधू नका 
कारण तुमची समज ही खूप मर्यादित आहे.

जसे आपण परिपक्व होत जातो तसतशी आपली समज बदलते, 
मनात परिवर्तन घडते आणि जाणीवेत बदल घडतो. म्हणून, आता 
जाणीवेच्या ज्या पातळीवर आहात आणि जर तुम्ही अति विश्लेषण 
केले तर तुम्ही जाणीवेच्या त्या पातळीवर अडकून पडाल आणि मग 
तुम्ही परिपक्व होऊ शकणार नाही. तुम्ही वयाने मोठे व्हाल पण तुमची 
रुपसरणी ही तशीच जुनाट असेल.
अजिबात विश्लेषण न करणे हे चांगले नाही आणि अति विश्लेषण 
करणे हेसुद्धा चांगले नाही.

प्रश्न: जय गुरुदेव, जनावरांना नैसर्गिक मृत्यू का येत नाही? 
लोकांना त्यांना का मारावे लागते?
 
श्री श्री: होय, ते चुकीचेच आहे. लोकांनी जनावरांना मारणे मला 
अजिबात पसंत नाही. यावर्षी आश्रमात अनेक स्थलांतरित पक्षी 
आले आहेत. तळ्यावर तर माळढोक आणि पाणकोळी हे पहिल्यांदाच 
आले आहेत. त्यांना चांगले पर्यावरण पसंत असावे किंवा मग इतर 
कोठेही पाणी उपलब्ध नसावे. हे फारच चांगले आहे.
आपण पर्यावरण खात्याला सांगितले पाहिजे की इतके पक्षी आले आहेत 
म्हणून तळ्यांमध्ये मासेमारीला परवानगी देऊ नये. जर त्यांनी हवेत 
गोळी चालवली तर हे सगळे पक्षी घाबरून जातील.

(श्रोत्यांपैकी एकाने ऐकू न येण्यासारख्या आवाजात एक प्रश्न 
विचारला.)
 
श्री श्री: तुम्ही लोकांना धीर द्या, त्यांना प्रश्न विचारू आणि 
त्यांच्याकडून सांत्वनाची अपेक्षा ठेवू नका. घरातील माणसांकडून 
सतत आपल्याला प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आपण ठेवू नये. 
कधी तुम्ही संतप्त होता, कधी तुम्ही खुश असता, तुम्ही हसता, 
तुम्ही रडता, तुम्ही स्मित करता. तुम्ही आयुष्यभर सर्व भावनांचे 
प्रदर्शन करता, आणि ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. बसून 
त्याबद्दल काळजी करीत राहू नका. बाकीच्या इतर अनेक गोष्टी 
आहेत ज्या तुम्ही करू शकता. घराच्या लोकांमध्ये बदल घडवून 
आणणे हा केवळ काळाचा अपव्यय आहे आणि तसे करण्यात 
काही अर्थ नाही.

चमत्कार घडायला एक संधी द्या

25
2014
Oct
शिकागो, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका.
 

जीवनाचे तीन घटक आहेत.
१. प्रयत्न. स्व-प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याशिवाय काहीही घडत नाही. 
   म्हणून तुम्ही तुमचे प्रयास हे करायलाच हवे. केवळ तुमच्या प्रयत्नांनी 
   सर्व काही घडून येईल का? नाही. 
   तुम्ही प्रयास केले आणि आज एक आंब्याचे कलम लावले आणि 
   तुम्हाला लगेच उद्या त्याचे फळ पाहिजे असेल तर ते कलम काही 
   तुम्हाला उद्या फळ देणार नाही. त्याला त्याचा समय लागणार आहे.
२. समय हा तो दुसरा घटक आहे. प्रत्येक गोष्टीकरिता योग्य वेळ यावी 
   लागते. त्याचप्रमाणे कृती करण्याचीसुद्धा एक योग्य वेळ असते. 
   समजा तुम्ही हिवाळ्यात आंब्याचे कलम लावले आणि नंतर तुम्ही 
   म्हणाल, “अरे, हे तर अंकुरितच झाले नाही”, जर ते हरितगृहात 
   असेल तर ठीक, नाहीतर त्याला आता अंकुर फुटणार नाही. कृती 
   करण्याची एक योग्य वेळ असणे आणि कृतीचे फळ चाखण्याचीसुद्धा 
   एक योग्य वेळ असते. म्हणून समय अथवा वेळ हा दुसरा घटक आहे.
३. सर्व शक्याशक्यतांमध्ये दैवी शक्ती किंवा अनुग्रह हा पुढचा घटक 
   आहे. तुम्ही सर्वप्रकारच्या शक्यतांसाठी जागा ठेवणे जरुरी आहे; 
   चमत्कार घडायला एक संधी द्या. तार्कीकदृष्ट्या एखादी गोष्ट 
   तुमच्या विचाराने अशक्य असेल, परंतु अनेकवेळा ते शक्य होते. 
   तुमच्यापैकी कितीजणांना हा अनुभव आला आहे? सर्व शक्याशक्यतांमध्ये 
   दैवी शक्ती किंवा अनुग्रह हे एक वरदान आहे.
चिकाटी, संयम आणि शक्यता अशा प्रकारे तुम्ही या तीन घटकांना 
एकत्रित करू शकता. हे तीन घटक आहेत. हे ज्ञान आहे.
मध्यरात्री तुम्ही असे म्हणू शकत नाही, “मी सर्व प्रयास केले, 
मी पडदा काढून टाकला तरीपण सूर्य काही येत नाहीये”. नाही. 
केवळ योग्य वेळेलाच सूर्य येईल. आणि जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा 
जर तुम्ही पडदे गच्च लावून सगळीकडून घट्ट बंद करून ठेवले तर 
तुम्हाला सूर्यप्रकाश मिळणार नाही. म्हणून तिन्ही घटकांचे जुळून 
येणे जरुरी आहे.
जसे मोबाईल फोन, त्याचे चार्जर, सिम कार्ड आणि सिग्नल या सर्व 
गोष्टी असणे जरुरी आहे. जर फोन चार्ज असेल परंतु त्यामध्ये सिम 
कार्ड नसेल किंवा रेंज नसेल तर तो फोन चालणार नाही. म्हणून हे 
तिन्ही पैलू एकत्रित असणे जरुरी आहे.
जर योग्य वेळी तुम्ही खूप प्रयास केले तर त्याचे फळ तुम्हाला मिळते. 
परंतु कित्येक वेळा असेसुद्धा घडते की तुम्ही अतिशय थोडे प्रयत्न करता 
पण तरीसुद्धा तुम्हाला भरपूर यश प्राप्त होते. यामागचे कारण आहे की 
अदृश्य संभावना तुमची मदत करीत असतात. उदाहरणार्थ : एखाद्याने 
काहीही मेहनत न करता लॉटरी जिंकणे.
जेव्हा वेळ आणि शक्यता एकत्र येतात तेव्हा त्याला नशीब म्हणतात. 
तुम्ही म्हणता, “मला माहित नाही हे सगळे कसे काय घडले!” योग्य 
वेळ आणि शक्यता यांचे एकत्रित येणे हे भक्तांच्या आयुष्यात जास्त 
वेळा घडते.
जेव्हा तुम्ही योग्य वेळी भरपूर मेहनत करता तेव्हा त्याचा फायदा 
तुम्हाला होतो. जेव्हा तुम्ही अतिशय स्व-कष्ट करता परंतु निसर्गाकडून 
अजिबात आधार मिळत नाही तेव्हा ते दुर्दैव किंवा कमनशिबी असते. 
जेव्हा एकदम कमी प्रयास असतात पण भरपूर दैवी आधार मिळतो तेव्हा 
ते सुदैव असते.
आत्ता इतक्यातच सूर्य ग्रहण समाप्त झाले. मंत्र घोष आणि ध्यान 
धरण्यासाठी ग्रहण हा फारच चांगला काळ आहे. जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि 
चंद्र एका रेषेत असतात तेव्हा त्याचा परिणाम मनावर होतो आणि असे 
म्हणतात की अशा वेळी मंत्र घोष केला तर ते अतिशय शक्तिशाली असते. 
असे पुरातन सुवचन आहे.
ग्रहणाच्या एक किंवा दोन तास आधी अन्न ग्रहण करणे बंद करा म्हणजे 
जे पोटात अन्न आहे त्याचे पचन चांगल्या प्रकारे होते आणि ग्रहणादरम्यान 
तुमचे पोट रिकामे असेल आणि रिकाम्या पोटी मंत्र घोष करण्याने सर्वाधिक 
फायदा होतो.
प्रश्न आणि उत्तरे
 
प्रश्न: एखादा संकल्प मोडला तर काय?
श्री श्री: हरकत नाही. शेतात तुम्ही इतक्या बिया पेरता. सगळ्याच 
अंकुरित होत नाहीत. काही अंकुरित होतात, काही होत नाहीत. जेव्हा 
तुम्ही एखादे कलम लावता तेव्हा प्रत्येक कलम रुजते असे नाही. काही 
रुजतात, काही रुजत नाहीत. झाडावरचे प्रत्येक फुलाचे फळ होत नाही. 
काही तर कच्चे असताना झाडावरून पडतात. म्हणून तुम्ही तुमच्याकडून 
मेहनत करा आणि मग सोडून द्या ( इथे समर्पण असा अर्थ अभिप्रेत 
आहे)
मेहनत न करता समर्पण करणे हा वेडेपणा आहे आणि तुमच्याकडून सर्व 
प्रकारे प्रयत्न करून झाल्यानंतर समर्पित न करणे हा सुद्धा वेडेपणा आहे. 

तुम्ही सर्व प्रकारे प्रयत्नांची पराकाष्ठा करा आणि सोडून द्या. प्रयत्नांची 
पराकाष्ठा न करता सोडून देणे हासुद्धा वेडेपणा आहे.
तुम्हाला काय मुक्त करते? मेहनत करणे आणि सोडून देणे हे तुम्हाला 
मुक्त करते.
जर तुम्ही अजिबात मेहनत न करता म्हणता, “मी सोडले” तर त्याने 
तुम्हाला मुक्ती प्राप्त होणार नाही.तुम्ही म्हणता, “ मी सोडले”, परंतु 
तुम्ही खरोखर सोडत नाही कारण कृती करण्याच्या इच्छेच्या त्या तुमच्या 
प्रवृत्तीमुळे. यामुळे मुक्त होण्यापासून तुम्ही मागे खेचल्या जाता. 
तुमच्याकडून प्रयास करा आणि सोडून द्या हे मुक्तीचे गुपित आहे.
काहीही प्रयास न करणे आणि सोडून देणे याने मुक्ती मिळत नाही. 
आणि संपूर्ण शक्ती खर्च करून तुमचे प्रयास करणे आणि सोडून न देणे 
यानेसुद्धा तुम्हाला मुक्ती मिळणार नाही.
Any action should only be done with awareness. An 
action from an unaware state has no meaning. Then 
it’s not called effort. कोणतीही कृती ही केवळ जागरूकतेने 
केली पाहिजे. अनभिज्ञ अवस्थेत केलेल्या कृतीला काहीही अर्थ नसतो. 
तेव्हा त्याला प्रयास म्हणता येत नाही. 

(श्रोत्यांपैकी एक सदस्याने एक प्रश्न विचारला आणि तो ऐकू येऊ 
शकला नाही.)
 
श्री श्री: वेळ येण्यासाठी वाट पहा.
निवड चांगले आणि वाईट यांच्यात नाही. जे काही तुम्ही निवडाल 
त्याच्याहून इतर नेहमी अधिक चांगले दिसेल. म्हणून पर्याय-रहित, 
उत्स्फूर्त राहा. काहीतरी मुद्दा उचलून धरा. आयुष्याची खेळी खेळा.
खूप जास्त पर्याय आणि त्यातून निवड करणे कठीण होते.

भारतातील शेतकऱ्यांसाठी

13
2014
Nov
बंगलोर आश्रम
 

आज देशभरातून अनेक शेतकरी इथे बंगलोर आश्रमात आले 
आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. 
जर देशातील शेतकरी सुखी आणि समृद्ध असतील तर त्या देशातील 
लोक जरूर सुखी होतील. ज्या देशातील शेतकरी दुखी: असतील तर 
तो देश सुखी आणि निरोगी असणार नाही, त्यामुळे शेतकरी सुखी आणि 
समाधानी असणे जरुरी आहे. त्याचे २ मार्ग आहेत
१. आपली आंतरिक शक्ती आणि स्वाभिमान वाढवणे. यामुळे आपल्या 
  समोर येणाऱ्या सर्व संकटाना तोंड देण्याची क्षमता वाढते. 
२. आपण कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी नीट योजना बनवून नियोजन केले 
  पाहिजे जेणेकरून अडचणी येणार नाहीत. 
काही गोष्टी आपल्या हातात आहेत तर काही आपल्या नियंत्रणापलीकडच्या 
आहेत. आपल्या हातात जे आहे त्या गोष्टी प्रयत्नपूर्वक सुधारणे आपण 
करू शकतो. जे आपल्या हातात नाही ते आपण देवावर सोडून दिले 
पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे कि सर्व काही नीट होईल आणि आत्मविश्वासाने 
पुढे गेले पाहिजे. त्यानंतर तुम्हाला दिसेल कि तुमची कामे मार्गी लागतील. 
श्री श्री शेतकर्यांना म्हणाले, आपण या ३ दिवसांच्या शिबिरात विविध विषयांवर 
चर्चा करू. मला विश्वास आहे कि तुम्हाला यातून लाभ होईल. आणि 
जर तुम्हाला यातून लाभ झाला तर देशातल्या लाखो लोकांना लाभ होईल. 
देशातील कितीतरी लोक तुमच्या कष्टामुळे त्यांची कुटुंबे चालवत आहेत. 
मी जिथे जिथे जातो तिथे लोकांना जेवणापूर्वी एक छोटा मंत्र म्हणावयास 
सांगतो ‘अन्नदाता सुखी भव’ ( हे अन्न बनवण्यात ज्यांचे ज्यांचे 
योगदान आहे त्या सर्वाना सुखी आणि समृद्ध असू दे).
आम्ही लहान असताना माझे वडील जेवणापूर्वी कायम हा मंत्र म्हणायला 
सांगायचे. ते तर जेवणानंतर सुद्धा हा मंत्र म्हणायला सांगायचे. मी त्यांच्या 
कडून दुसरा श्लोक कधी ऐकला नाही. ते कायम याच मंत्राला महत्व 
द्यायचे. जेंव्हा तुम्ही हा मंत्र म्हणता तेंव्हा तुम्ही हे जेवण पुरवणाऱ्या 
३ लोकांसाठी प्रार्थना करता. पहिला स्वाभाविकपणे शेतकरी जो जमिनीतून 
धान्य उगवतो. दुसरा व्यापारी जो हे धान्य आपल्या घरापर्यंत पोहोचवतो. 
आता तुम्ही विचारलं व्यापारी का? शेतकरी शेती करून धान्य पिकवतो 
पण जर व्यापाऱ्याने ते बाजारात आणले नाही तर शेतकरी आणि लोक 
दोघेही संकटात येतील. 
जे लोक धान्याचा संचय करून त्याची योग्य किंमत देत नाहीत किंवा खूप 
जास्त किंमत घेऊन लोकांना विकतात ते धान्याचा अपव्यय करतात. 
तुम्हाला माहित आहे आपल्याकडे मुबलक प्रमाणात धान्य उत्पादन होते 
पण योग्य पुरवठायंत्रणे अभावी अनेक लोकांना उपाशी झोपावे लागते 
आणि दुसरीकडे धान्याचा नाश होतो ( साठा करून ठेवल्यामुळे). 
चुकीच्या कार्यपद्धतीमुळे टोमाटोचे भाव अचानक खूप वाढतात आणि दुसर्या 
महिन्यात एकदम खाली येतात. तुम्ही सगळ्यांनी हे अनुभवलेले आहे ना ? 
ज्यांनी हे अनुभवलेले आहे त्यांनी हात वर करा? 

(श्रोत्यामधून बरेच हात वर जातात)
जर व्यापाऱ्यांनी आपले काम नीट केले नाही किंवा ते नाखूष राहिले तर 
त्याचा भार तुमच्या खांद्यावर येईल. जो नाखूष, रोगी किंवा असमाधानी 
असेल तोच काहीतरी वाईट करेल. जो नाराज असेल तोच कायदे नियम 
तोडून अप्रामाणिकपणा करेल. जो माणूस समाधानी असेल तो इतरांना 
त्रास देण्याचा विचार करणार नाही. त्यामुळे जेंव्हा व्यापारी आनंदी असेल 
तेंव्हा तो सर्व कायदे नियम पाळेल आणि शेतकर्यांना फसवण्याचा, त्रास 
देण्याचा विचार करणार नाही. आज आपल्या शेतकऱ्यांचे शोषण होत आहे. 
किती जण याच्याशी सहमत आहेत ? ( अनेक लोक हात वर करतात). 
तुम्हाला माहित आहे भारतात आपण जी साखर तयार करतो त्याची किंमत 
१२ रुपये किलो आहे. पण आपण ती बाहेच्या देशातून आयात करतो 
आणि ३० रुपये किलोने विकतो. आपली भारतीय साखर काय बाहेरच्या 
साखरे पेक्षा कमी गोड आहे? हे असे का होत आहे?
काही भ्रष्ट राजकारणी उद्योगपतींशी हातमिळवणी करून अशा बेकायदेशीर 
गोष्टी करत असतात. त्यामुळे जर व्यापारी नाखूष असतील तर शेतकरी 
आणि सामान्य लोकांना त्रास होईल. 
व्यापारी जेंव्हा नाराज असतात तेंव्हा ते धान्यात, साखरेत भेसळ करून 
जास्त नफा कमावण्याचा प्रयत्न करतात. जेंव्हा तुम्ही १ किलो धान्य 
खरेदी करता तेंव्हा त्यात १००-२०० गरम भेसळ, कच, कचरा मिळेल. 
आजकाल दुध, गव्हाचे पीठ, तूप यात सुद्धा भेसळ होते. जो व्यापारी हे 
असेले उद्योग करतो तो नक्कीच मनातून नाराज आणि असमाधानी असला 
पाहिजे. म्हणूनच आपण त्याच्या साठी प्रार्थना केली पाहिजे, जेणेकरून 
ते अन्नात भेसळ करणार नाहीत आणि शेतकर्यांना बाजारातला त्यांचा 
हक्काचा नफा मिळेल.
व्यापारी हव्यासी नसावा. त्याने अवाजवी भावात वस्तू विकून नफा 
कमवू नये. त्याने शेतकऱ्यांकडून घेतलेल्या भावापेक्षा आतिशय जास्त 
भावाने विकू नये. धर्मशास्त्रात लिहिल्या प्रमाणे व्यापाऱ्याने २०% नफा 
कमवावा, त्यापेक्षा जास्त नव्हे. पण आज व्यापारी स्वार्थासाठी ५०% किंवा 
जास्त नफा ठेवतात आणि शेतकर्यांना खूपच कमी देतात. हे बरोबर नाही. 
याउलट जर एखादे धान्य किंवा उत्पादन जर बाजारात जास्त विकले जात
असेल तर त्याच्या नफ्याचा योग्य हिस्सा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे.
या मंत्राद्वारे ज्या तिसऱ्या व्यक्तीसाठी आपण प्रार्थना करतो तिसरी व्यक्ती 
म्हणजे घरातील स्त्री, जी अथकपणे जेवण बनवते. जर ती नाखूष असेल 
तर घरातील इतर लोकांना त्रास होईल. जर घरातील स्त्री आतून नाराज 
आणि असमाधानी असेल तर ते त्या जेवणाचा आनंद तुम्ही घेऊ शकणार 
नाही, आणि ते पचणार नाही. जर ती जेवण बनवताना रडत असेल तर 
जो माणूस ते जेवण खाणार आहे त्याला सुद्धा अश्रुपासून सुटका नाही. 
त्यामुळे घरातील स्त्री आनंदी आणि खुश असणे अतिशय जरुरी आहे. 
यासाठीच आपण ही प्रार्थना करतो.
जर तुम्ही बघितले तर खरा अन्नदाता (अन्न देणारा) हा दुसरा कोणी 
नसून देवच आहे, आणी देव नेहेमी खुश आणि समाधानी असतो. देव 
कधी नाखूष होतो का? नाही पण तरीही या एकंदर भौतिक व्यवहारी 
जगात आपण देव, जो अंतिम पालनपोषणकर्ता आहे त्याच्याकडे या 
अन्न देणाऱ्या तिघांसाठी आपण प्रार्थना करतो. आपण त्यांच्यासाठी 
रोज जेवणाआधी आणि नंतर प्रार्थना करू. जेवणाआधी आणि नंतर 
त्यांना आशीर्वाद द्या.   

भारत हा जगातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या देशांपैकी एक आहे. 
इथे इतका पाऊस पडूनही आपण आपल्या पाण्याचे योग्य नियोजन करत 
नाही. आपण नद्या आणि तलावात रसायने सोडतच आहोत. जगात ज्या 
रासायनिक खते आणि रसायनांवर बंदी आहे ती आपल्या शेतात आजही 
वापरली जातात. आपण या रसायनांवर प्रचंड खर्च करतो शिवाय यामुळे 
जमिनीचा मुळचा कस जातो. यामुळे केवळ पैशांचेच नाही तर आपली 
जमीन आणि नैसर्गिक स्त्रोतांचे नुकसान होत आहे. आपण या गोष्टींचा 
खोलात जाऊन विचार केला पाहिजे.  

( श्री श्री शेतकऱ्यांना उदेशून म्हणाले, इथे आश्रमात अनेक तज्ञ आणि 
शास्त्रज्ञ आले आहेत. ते तुमच्याशी बोलतील, तुम्ही सुद्धा मोकळेपणाने 
तुमच्या समस्या त्यांच्या समोर मांडा. तुम्ही तुमच्या घरी आला आहात 
असेच समजा. तुम्ही तुमच्या अध्यात्मिक निवासात आहात. हे तुमचेच 
घर आहे त्यामुळे खुश राहा आणि इथल्या वास्तव्याचा आनंद घ्या. सकाळी 
तास, दोन तास थोडा योग, प्राणायाम आणि ध्यान करा. इथे बरेच 
शिक्षक आहेत जे तुम्हाला शिकवतील, त्यामुळे तुम्ही निरोगी आणि 
तंदुरुस्त राहाल. जर तुम्ही निरोगी असाल तर देश निरोगी होईल. 
जर तुम्ही आनंदी आणि निरोगी असाल तर तुम्ही जे धान्य पिकवाल 
त्यामुळे त्यामुळे देशातील जी जनता ते खाईल ते आनंदी आणि निरोगी 
राहतील.)
  

ज्ञानाच्या दृष्टीकोनातून

30
2014
Nov
दिल्ली
  

(श्री श्री रविशंकर यांनी आर्ट ऑफ लिविंगच्या प्रेरणा या 
कर्करोग विशेषज्ञच्या आणि सार्क फेडरशनच्या सहकार्याने 
चालणाऱ्या उपक्रमाचे उद्घाटन केले. प्रेरणा हा कर्करोगी रुग्णांसाठी 
चालवलेला विशेष उपक्रम आहे. खाली श्री श्री यांनी या प्रसंगी 
दिलेल्या भाषणाचा वृतांत)

इथे या प्रसंगी तुम्हा डॉक्टरां बरोबर खूप चांगले वाटत आहे. तुम्ही 
सगळे इतके चांगले काम करत आहात, चांगली काळजी घेत आहात. 
तुमच्यापैकी अनेक जण रुग्णांची चांगली काळजी घेत आहात, पण 
तुम्हाला तुमची स्वतःची सुद्धा काळजी घ्यायला हवी. 
मला खूप आनंद होत आहे कि तुम्ही सगळे प्रेरणा शी जोडले गेले 
आहात. रुग्ण बरा व्हायचा असेल तर जीवनशैली बदलावीच लागेल.
जर तुम्ही जीवनाकडे ज्ञानाच्या नजरेतून बघितले तर सर्व नकारात्मक 
भावना गळून पडतील आणि तुम्ही अगदी अंतरांगापासून आनंदी व्हाल.    
मी अलीकडेच अमेरिकन मानसोपचार मंडळाचा एक लेख वाचला ज्यात 
असे म्हंटले होते कि तुम्ही ८ आठवडे जर ध्यान केले तर तुमच्या 
मेंदूची घडण सकारात्मकपणे बदलते. जर ८ आठवड्याच्या ध्यानाने 
इतका मोठा बदल होत असेल तर समाजासाठी आशेला वाव आहे.
अजून एका संशोधनानुसार माध्यमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांना वाटणाऱ्या 
चिंता/काळजीची पातळी १९५० साली असणाऱ्या मनोरुग्णा इतकी झाली 
आहे, हे फार चिंताजनक आहे. 
आज लोकांमध्ये खूप तणाव आणि चिंता आहे. एक २० वर्षाचा युवक 
येऊन सांगतो “मी आयुष्याला कंटाळलो आहे” त्यांनी आयुष्य काय हे 
बघीतले सुद्धा नाही आणि ते आयुष्याला कंटाळले आहेत !! याचा अर्थ 
ते निरोगी असणार नाहीत, पुढच्या ५-६ वर्षात ते विविध आजारांनी 
ग्रासले जातील.
छिन्नमानसिकता (मनोभंजन, स्कीझोफेनिया) हा अजून एक आजार 
विद्यार्थ्यांना भेडसावत आहे. अतिशय हुशार विद्यार्थी तणाव नीट 
हाताळू शकत नाहीत त्यामुळे द्विधृवीय (स्कीझोफेनिया) ची शिकार 
होतात.
माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, २५-३० वर्षापूर्वी तुम्ही स्कीझोफेनिया 
बद्दल ऐकले होते का? ( श्रोते “नाही” म्हणतात)
आज छोट्या किंवा मोठ्या शहरात आपण या आजराबद्दल ऐकतो. 
आपल्याला आपल्या जीवनशैलीकडे लक्ष देऊन सामाजिक आरोग्याकडे 
लक्ष द्यावे लागेल. आपल्याला सगळ्यांना हे माहित आहे की तणाव 
हाच या सगळ्याचे कारण आहे.  तणाव म्हणजे काय? एक व्याख्या 
अशी देता येईल कि तुम्हाला बरेच काही करायचे आहे आणि त्या साठी 
वेळ आणि शक्ती कमी पडत आहे. यानेच तणाव तयार होतो. आज 
तुमचे काम कमी करणे व्यावहारिक नाही. वेळ आहे तेवढाच आहे, तो 
तुम्ही वाढवू शकत नाही. त्यामुळे तुमची शक्ती, उर्जा वाढवणे हाच 
पर्याय आहे. ही उर्जा वाढवण्याचे अनेक मार्ग आहेत. 
१. अन्न: सकस अन्न खाणे. आपण दक्षिण आशियाई देशात सकस, 
  पोषक आहार करत नाही. आपण फक्त कार्बादके ( कार्बोहायड्रेट्स) खातो. 
  आपला आहार परिपूर्ण नाही. आपण ज्या भाज्या खातो त्यात बटाटे, 
  टोमाटो, वांगी आणि कांदे अधिक प्रमाणात असतात. बटाटे, चपात्या, 
  डाळ हे पिष्टमय पदार्थ आहेत. हा असंतुलित आहार आहे. आपण रोज 
  पोषक आहार घेत नाही. आपल्याला पोषक आणि सकस आहाराबद्दल 
  जागरुकता आणावी लागेल. 
२. चांगली झोप: झोप सुद्धा तुम्हाला उर्जा देते. औषधोपचारांपेक्षा झोप 
  जास्त महत्वाची आहे. मी औषधांचे महत्व कमी करत नाही, पण 
  तुम्ही एखाद्याला औषधे दिली पण त्याला झोपू दिले नाही तर औषधे 
  काम करणार नाहीत. त्यामुळे झोप अतंत्य महत्वाची आहे. निद्रानाश ही 
  आजची मोठी समस्या आहे, आणि पुरेशी झोप नसणे ही सुद्धा गंभीर 
  समस्या आहे. लोक नीट झोपू शकत नाहीत. वाईट स्वप्न पडणे हा 
  नेहेमीचा प्रकार झाला आहे. योग मध्ये औषधाविना आणि झोपेच्या 
  गोळ्याविना चांगली झोप लागण्याचे विविध प्रकार आहेत. काही आसने 
  आणि ध्यान यामार्गे चांगली झोप लागू शकते. हे मार्ग अवलंबल्याने 
  फायदा होईल. 
३. आरोग्यविषयक: आरोग्याच्या दृष्टीने ठेवणाऱ्या स्वच्छतेबाबत सर्व 
  दक्षिण आशियायी देश मागे आहेत. आपल्याला याबाबत जागरुकता आणावी 
  लागेल. आर्ट ऑफ लिविंगच्या 5H (Health, Hygiene, Homes for 
  people, Harmony in diversity and Human Values) कार्यक्रमाद्वारे 
  आम्ही हेच करत आहोत. आपल्या सगळ्याची जीवनशैली वेगवेगळी आहे. 
  केवळ भारतातच ६०० पोटभाषा आहेत, वेगवेगळे धर्म आहेत त्यामुळे 
  सगळ्यांनी एकत्र गुण्यागोविंदाने नांदणे महत्वाचे आहे. 5H कार्यक्रमातून 
  आपण हेच साध्य करतो.
  आपल्या सभोवतालच्या परिसराकडे लक्ष देऊन रोगराई पासून कसा बचाव 
  करता येईल हे पाहिले पाहिजे. बरेच लोक थंडीत दारे उघडतच नाहीत 
  त्यामुळे घरातील हवा कोंदट राहते. बऱ्याच घरात हवा खेळती राहत 
  नाही. मी एका सुप्रसिद्ध कर्करोग विशेषज्ञा कडून ऐकले कि कर्करोग 
  होण्याचे एक महत्वाचे कारण म्हणजे लोक नीट श्वास घेत नाहीत. 
  जेंव्हा तुम्ही पुरेसा ऑक्शिजन आत घेता, तेंव्हा तुमच्या शरीरातून 
  विषारी द्रव्ये बाहेर फेकली जातात आणि रोगनिवारण होऊ शकते. 
  दीर्घ श्वास घेण्याने नक्कीच कर्करोग होण्यापसून वाचता येऊ शकते. 
  मी असे शेकडो लोक बघितले आहेत ज्यांनी प्राणायाम, ध्यान, योग 
  आणि थोडे आहारातील बदल याने कर्करोगावर मात केली आहे. लोकांना 
  रसायन उपचारपद्धती (केमोथेरपी) करायची गरज पडली नाही कारण 
  त्यांच्या शरीराने योग्य प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. 
४. श्वास हा उर्जाचा आजून एक स्त्रोत आहे. शुद्ध आणि स्वच्छ हवा 
  जरुरी आहे. बरेचदा मोठ्या शहरातून जेंव्हा आपण चालतो तेंव्हा 
  फक्त पेट्रोलचा धुरच नाही तर विद्युतचुंबकीय लहरींमुळे सुद्धा शरीरावर 
  परिणाम होतो. तसेच तुम्ही ८-९ तास टेलीव्हिजन पहिला तर 
  नक्कीच त्रास होईल. अमेरिकेत जेंव्हा पालकांना काम असते तेंव्हा 
  ते मुलांना तासंनतास टेलीव्हिजन समोर सोडतात. ३-४ वर्षाची 
  मुले तासंनतास टेलीव्हिजन पाहतात. इतके छाप त्यांचा मेंदूवर 
  पडून त्यांच्या मेंदूचे काय होत असेल? याचा परिणाम म्हणजे त्यांच्यात 
  एकाग्रतेचा अभाव येतो. आपल्याला आपल्या जीवनशैलीकडे लक्ष देऊन 
  समाजाच्या आरोग्याकडे आणि त्यांना तणावातून कसे मुक्त करता येईल 
  हे पाहिले पाहिजे. आपल्याला मिळालेल्या देहरूपी देणगीबद्दल आपण 
  कृतज्ञ असले पाहिजे. आपण शरीर आणि मन दोन्हीचा आदर 
  केला पाहिजे.
  जर तुम्ही सर्व नकारात्मक भावना कोंडून ठेवल्या तर ते कर्करोगाला 
  निमंत्रणच ठरेल. तुम्ही राग, इर्षा, लालच, या भावना व्यक्त न करता 
  कोंडून ठेवता कामा नये. इथे योग, प्राणायाम यासारख्या गोष्टी 
  फायदेशीर ठरतील.
  आयुष्याकडे एका विशाल दृष्टीकोनातून पहिले तर राग, द्वेष या गोष्टी 
  आपोआप निघून जातील. तुम्हाला कशा बद्दल इर्षा वाटते? जगात 
  ७०० करोड लोक आहेत, आणि प्रत्येकाला समान संधी आहे. 
  जेंव्हा तुम्ही ज्ञानचक्षु मधून जीवनाकडे पाहता तेंव्हा या नकारात्मक 
  भावना गळून पडतात आणि अंतरंगातून हास्य उमटते. 
  आर्ट ऑफ लिविंगचा ऊदेश्य प्रत्येक चेहेऱ्यावर हास्य आणणे हाच 
  आहे. तुमच्या स्वतःच्या विश्वातून बाहेर येऊन जगाकडे एका 
  वेगळ्या दृष्टीकोनातून पहिले तर आयुष्यात बदल घडेल. जेंव्हा 
  छोटी किंवा तुम्ही ज्याला मोठी समस्या मानता त्यात अडकून पडता. 
  जागे व्हा आणि बघा जगात लोकांना कितीतरी मोठ्या समस्या आहेत. 
  त्यांना तुमची गरज आहे आणि तुम्ही त्यांना मदत करू शकता. 
  ज्यांना मदतीची गरज आहे त्यांना मदतीचा हात द्यायला पुढे व्हा. 
  जेव्हा तुम्ही असे कराल तेंव्हा तुमची समस्या तुम्हाला वाटली तेव्हडी मोठी 
  नसून एकदम छोटी वाटेल. जेंव्हा तुमच्या लक्ष्यात येईल कि 
  तुमची समस्या छोटी आहे त्याच क्षणी तुम्हाला उर्जा मिळेल आणि 
  तुम्ही पुढे चालायला लागाल. 
  मनाला थोड्या शिकवणीची गरज आहे. काही तासात आम्ही 
  लोकांना थोडे निर्देशन करून, काही छोट्या सूचना देऊन त्यांना 
  आपल्या मनावर, भावनांवर नियंत्रण कसे मिळवता येईल हे शिकवतो. 
  आपण कोणाची जीवनशैली बदलू शकत नाही, ती त्यांची त्यांनाच 
  बदलावी लागेल. एक डॉक्टर म्हणून तुम्ही रोग्याच्या औषधाची 
  काळजी घेऊ शकाल, पण ती औषधे घेण्याची जबाबदारी त्यालाच 
  घ्यावी लागेल. त्याचप्रमाणे तुम्ही त्यांना तणाव दूर करायचे मार्ग 
  सुचवू शकाल. लोकांना मदत करण्यासाठी पुढचे पाउल टाका. 

मुल्ला नसरुदिनची एक गोष्ट आहे. एकदा मुल्लाला बरीच हाडे 
मोडल्यामुळे बॅन्डेज बांधून इस्पितळात दाखल केले, मुल्लाला त्याच्या 
मित्राने येऊन विचारले ‘मुल्ला कसा आहेस?’ मुल्ला म्हाणाला 
‘ठीक आहे फक्त मी हसलो कि खूप दुखते आहे’ त्याच्या मित्राने 
विचारले ‘ या अवस्थेत तू कसा हसू शकतोस?’ मुल्ला म्हणाला 
‘मी आता हसू शकलो नाही तर मी माझ्या आयुष्यात कधीही हसलो 
नाही असा होईल’ याला ज्ञान म्हणतात, प्रत्येक परिस्थितीत हास्य 
कायम ठेवणे. आयुष्याकडे संघर्ष म्हणून न पाहता एक आव्हान 
म्हणून पहा. आयुष्य ही पिडा नसून अनेकविध भावनांचा समूह 
म्हणून पहा. यालाच मी ज्ञान असे म्हणेन. 
आपल्याकडे हे ज्ञान शेकडो वर्षापासून चालत आले आहे, पण ते 
काही मर्यादित लोकांसाठी होते. त्यांनी ते त्यांच्यासाठी वापरले आणि 
त्यांच्या वारसांकडे दिले पण संपूर्ण समाजाला दिले नाही. मला वाटते 
ते ज्ञान सगळ्यांना मिळण्याची हीच योग्य वेळ आहे. ही सगळी
विद्या लोकांना त्यांचे आयुष्य चांगले आणि निरोगी जगायला मदत 
करेल. 

याचे उत्तर आहे : प्रेम

13
2014
Nov
बंगळूरू, भारत.

प्रश्न: गुरुदेव, आसक्तीपासून कशी सुटका करून घ्यावी ?

श्री श्री : तुम्हाला आसक्तीपासून का सुटका हवी आहे? कारण ती तुम्हाला 
वेदना देते म्हणून? जर ती तुम्हाला वेदना देत नसती तर तुम्ही तिच्यापासून 
सुटका करून घ्यायचा विचार केला नसता. आसक्ती तुम्हाला वेदना देते 
कारण त्याच्याबाबत काही अज्ञान आहे. आसक्तीपासून दूर जायचा प्रयत्न 
करू नका. मी असे म्हणेन कि, तुम्ही केंद्रित व्हायला शिका. जीवन तसेच 
ही निर्मिती याबद्धलची तुमची समज वाढवा. मग तुमच्या असे लक्षात येईल 
कि आसक्तीपासून सुटका करून घ्यायची तुम्हाला गरज नाही. ती आपसूक 
नाहीशी होईल.

तुमच्यापैकी किती जणांना या आधीच असा अनुभव आला आहे की तुमची 
आसक्ती आपोआप गळून गेली आहे ? त्यांनी हात वरती करा. 

(अनेक श्रोते हात वरती करतात).

लहान मुलांना साखरेच्या कापसाबद्धल खूप आसक्ती असते. तुम्ही 
त्यांच्यासमोर कोणताही गोड पदार्थ ठेवायचा अवकाश की ते तो ताबडतोब 
फस्त करतात. पण ते जसे मोठे होतात तसे त्यांचा गोड पदार्थ आणि 
खेळणी यांचा हव्यास आपोआप कमी होतो. त्यासाठी त्यांना काही विशेष 
कष्ट घ्यावे लागत नाहीत.

अनासक्ती हि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.

जसे तुम्ही परिपक्व होत जाता, जसा तुमचा विकास व्हायला लागतो, 
तसे तुम्ही आयुष्यातील अशा छोट्या छोट्या गोष्टीत अडकून आणि 
गुंतून राहणे हे आपोआप थांबते.

नाहीतर, पूर्वी तुमचा कोणी अपमान केला किंवा वाईट वागणूक दिली तर 
तुम्हाला त्याचे खूप वाईट वाटायचे आणि तुम्ही मग अनेक दिवस मनात 
ती गोष्ट ठेवत असायचे, काही वेळा तर अनेक महिने ते तुमच्या लक्षात 
राहायचे. तुम्हाला असे वाटायचे कि ‘ त्याने मला कशी वागणूक दिली हे 
मी कधीच विसरणार नाही.’ असा विचार करून तुम्ही स्वतःला का शिक्षा 
देत आहात? असे आपण नेहमी आणि अनेक वेळा करतो, आणि असा 
असंतोष मनात ठेवल्यावर आपल्याला अभिमान वाटत असे. पण असे 
करणे हा एक मुर्खपणा आहे. 

तुम्ही अवलोकन करून असा स्वीकार केला पाहिजे कि विविध लोकांच्या 
बोलण्याच्या विविध तऱ्हा असतात, त्यांची वागणूक वेगळी असते, अनेक 
गोष्टी करण्याचा आणि स्वतःला व्यक्त करण्याचा त्यांचा दृष्टीकोन वेगळा 
असतो. त्यांच्या हृदयात प्रेम नसते म्हणून ते असे करतात असा विचार 
करू नका. ते तसे नसते. कदाचित तुम्हाला ते योग्य तऱ्हेने दिसत नसेल 
किंवा त्यांना ते योग्य तऱ्हेने प्रस्तुत करता येत नसेल.
या सगळ्याकडे तुम्ही दुसऱ्याच्या दृष्टीकोनातून बघा. सासू-सुना कितीही 
भांडल्या तरी शेवटी ते भांडण संपते. म्हणून या सर्व गोष्टी व्यापक 
दृष्टीकोनातून बघा.

काही आठवड्यापूर्वी एक तरुण मुलगी तिच्या काही कौटुंबिक समस्याबाबत 
माझ्याबरोबर चर्चा करण्यासाठी माझ्याकडे आली होती. ती मला म्हणाली 
कि, ‘गुरुदेव, माझ्या सासूबाई फार कठोर आहेत आणि त्या सारख्या मला 
रागवत असतात’.

मी तिला विचारले कि असे का आहे.

त्यावर ती म्हणाली , ‘ त्या तश्या का वागतात हे मला माहित नाही. 
पण त्या माझ्या प्रत्येक कामात चूक काढीत असतात’.

ते ऐकल्यावर मी तिला म्हणालो, ‘ मला एक सांग, तुझी आई तुझ्याशी 
अशी वागत नव्हती का?’
त्यावर ती म्हणाली,’ होय गुरुदेव, ती पण माझ्याशी अशीच वागत असे. 
कोणत्याही छोट्या कारणावरून आमच्यात सतत भांडणे होत असत.’

आता जेंव्हा तुम्ही तुमच्या आईशी भांडता तेंव्हा ते मनाला लाऊन घेत नाही. 
एखादे वेळी कितीही भांडण झाले असले तरी दुसऱ्या दिवशी तुम्ही परत 
तिच्याशी प्रेमाने आणि नेहमीसारखे वागत होता, होय कि नाही? आता 
तुमची आई आणि तुमच्या सासूबाई या दोघी एकाच पिढीतील आणि 
साधारणपणे एकाच वयाच्या असतील. मग सासूबाई जर तुम्हाला काही 
म्हणाल्या तर ते तुम्ही एवढे मनाला का लाऊन घेता?

मग ती मुलगी म्हणाली,’ गुरुदेव, मी असा विचार कधीच केला नव्हता’.

म्हणून तुमच्या विचार-सारणीत थोडा बदल करा.या छोट्या गोष्टी सोडून 
देऊन आयुष्यात पुढे चालत रहा. 
अशा छोट्या छोट्या गोष्टी अडकून राहून, ‘ अरे, ती मला असे म्हणाली, 
तिने मला योग्य वागणूक दिली नाही’ असे म्हणण्याचा काय उपयोग आहे.

जेंव्हा तुम्हाला कोणी असे काही हानिकारक बोलेल किंवा अपमानास्पद 
वागणूक देईल तेंव्हा असे लक्षात घ्या कि ते त्यांचा तणाव किंवा त्यांचे 
अज्ञान यामुळे तसे करीत आहेत. ते आतून अपमानित असतात म्हणून 
ते असे वागतात. त्यांच्या मनातल्या जखमांसाठी तुम्ही का स्वतःला का 
त्रास करून घेताय? तुम्ही मन मोठे करून याकडे व्यापक दृष्टीकोनातून 
पाहिले पाहिजे.

तुम्हाला माहित आहे का, तुम्ही प्रेमाने प्रत्येकाला आणि प्रत्येक परिस्थितीला 
जिंकू शकता. प्रेमाने जिंकू शकत नाही असे या जगात आणि आयुष्यात 
काहीहि नाही.

आता हेच पुढे ताणून मला असे विचारू नका कि, ‘ गुरुदेव, आपण 
या पद्धतीने तालिबानवर विजय मिळवू शकू का?’
त्यासाठी आपल्याला साम (वास्तविक अनुनय), दम (लालच), भेद 
(धमकी), दंड (शिक्षा) याचा उपयोग करायला पाहिजे. पण आपल्या 
घरात या निष्कारण वादात पडून स्वतःला त्रास करून घ्यायची काय गरज 
आहे? तुमच्या सासूशी वैर ठेऊन तुम्ही काय मिळवू इच्छिता? कमीतकमी 
तुम्ही स्वतः प्रथम एक व्यापक दृष्टीकोन ठेऊन या सगळ्याकडे बघायला 
शिका.

माझा सल्ला ऐकल्यानंतर त्या दोन्ही स्त्रिया आता एकमेकींशी प्रेमाने वागत 
आहेत. जणू काही घडलेच नाही अशा तऱ्हेने तो प्रश्न आता सुटला आहे. 
ती सून घर सोडून दुसरीकडे राहायला जाणार होती, पण आता ते कुटुंब 
या समस्येपासून दूर गेले आहे.

ही काही एका विशिष्ट घरातील गोष्ट नाही. आपल्या संपूर्ण देशभर अशी 
अनेक हजारो कुटुंबे आहेत की जेथे हा प्रश्न आहे. हा प्रश्न प्रामुख्याने 
आशिया आणि भारतासारख्या देशात आढळून येतो.

आपण आपले मन कसे नियंत्रित करतो यावर हे अवलंबून आहे. म्हणून 
आपण नियमित साधना केली पाहिजे. आपण काही क्षणापुरते का होईना 
आपले मन शांत करून विश्राम कसा घेता येईल हे पाहिले पाहिजे. मी 
तुम्हाला सांगतो कि, आपण जर आपली दृष्टी थोडीशी विस्तारित केली 
तर आपण आपल्या आयुष्यात आश्चर्यकारक बदल घडवून आणू शकू. 
यामुळे आपण तर आनंदी होऊच पण त्याबरोबर आपल्या आजूबाजूच्या 
लोकांमध्ये पण बदल घडवून आणू शकतो.
साधारणपणे आपण छोट्या छोट्या गोष्टीत अडकून बसतो आणि मग 
आपल्याला आणि आपल्या आजूबाजूच्या सर्व लोकांना दुखः होते. हे 
अज्ञान आहे. हे समजण्यासाठी तुम्ही काही फार मोठे पंडित असायचे 
आवश्यकता नाही किंवा पोथ्या पुराणे वाचायची पण गरज नाही. फक्त 
रोज काही वेळ ध्यान करा आणि ज्ञान ऐकत रहा. जे ज्ञान ऐकले आहे 
ते मनावर बिंबवून आयुष्यात उपयोगात आणा.

प्रश्न: गुरुदेव, नेपाळमध्ये भगवान शंकरांची ‘पशुपतीनाथ’ म्हणून 
पूजा केली जाते. पशुपती याचा अर्थ काय?

श्री श्री: पशु ( प्राण्यांसाठी हिंदी शब्द) म्हणजे ज्याला कशाने 
तरी बांधून ठेवले आहे किंवा जो कोणी गुलामीत अडकला आहे. पाश 
म्हणजे दोरासारखा असतो, जो तुम्हाला कशाला तरी बांधून ठेवतो किंवा 
तुमच्या हालचालींवर बंधन आणतो तो. असे आठ प्रकारचे पाश आहेत 
आणि म्हणून आठ प्रकारचे पशु त्यांनी बांधून ठेवले आहेत.

इंग्रजीत अशी एक म्हण आहे कि “ माणूस हा सामाजिक प्राणी आहे.’ 
म्हणून या जगात प्रत्येकजण हा कोणत्या न कोणत्या तरी बंधनात 
अडकला आहे जसे कि लालसा, आसक्ती वगैरे. ही सृष्टी जी  आठ 
प्रकारच्या बंधनांनी बांधली आहे, तिचे भगवान शंकर हे स्वामी आहेत. 
म्हणून ते या जगातील सर्व सजीव जीव वस्तूचे स्वामी आणि भगवान 
आहेत.
नेपाळमध्ये प्राणी बळी द्यायची एक जुनी रूढी आहे. तुम्ही जाऊन देवळात 
कोणताही बळी देऊ नका. भगवान शंकरांना ते अजिबात आवडत नाही. 
तुम्हा सर्वांना हे माहित आहे काय? देवाला खुश करण्यासाठी दुसऱ्या 
जीवाचा बळी देणे हे खूप मोठे पाप आहे. असे करणे म्हणजे मोठे 
अज्ञान आहे.

आज मी आपल्या आर्ट ऑफ लिविंगच्या सर्व शिक्षकांचे आणि स्वयं-सेवकांचे, 
त्यांनी प्राणीबळी आणि प्राणीहत्या संपविण्यासाठी केलेल्या कठोर परीश्रमांसाठी 
अभिनंदन करतो. मला असे सांगण्यात आले आहे कि प्राणीबळी हे ४०% किंवा 
६०% कमी झाले आहेत. याबद्धल तुम्ही नेहमी लोकांना जागरूक केले पाहिजे 
आणि या दृष्टीने जास्तीत जास्त लोकांना शिकविले पाहिजे. त्यांना असे सांगा 
कि दुसरा एखादा जीव ते या जगात ते आणू शकत नाहीत त्याचप्रमाणे 
ते कोणाचा जीव घेऊ शकत नाही. तुम्ही जर एखाद्या निष्पाप बकऱ्याला 
जन्म देऊन जीवन देऊ शकत असाल तरच तुम्हाला त्याचा जीव घ्यायचा 
हक्क आहे. पण जेंव्हा त्या बकऱ्याला जन्माला घालायची ताकद जर 
तुमच्यात नसेल तर तुम्ही त्याला मारू पण शकत नाही. या पृथ्वीवरील 
प्रत्येक जीवाला जगण्याचा हक्क आहे. देवाला प्रसन्न करण्यासाठी कोणाचा 
बळी द्यावा असे आपल्या कोठल्याही पुराणात लिहिलेले नाही.