देवाच्या जवळ असणे !

02
2014
Oct
बंगळूरू, भारत
 

नवरात्रीनिमित्त आर्ट ऑफ लिविंग आंतरराष्टीय केंद्र, बंगळूरू येथे झालेल्या 
ऋषी होमाच्यावेळी श्री श्री नी केलेला वार्तालाप:
आताच वैदिक पंडितांनी सामवेदातील सुंदर ऋचा गायल्या. हा संसार 
(भौतिक जग किंवा भ्रामक जग) म्हणजे मनाचा खेळ आहे. आपण 
जे जग समजतो तसे ते बाहेर नसते. आपल्या मनामुळे या निर्मितीबाबत 
अशी आपली धारणा आणि समजूत झाली आहे. हा भवसागर पार करायचा 
असेल तर आपण एक पूल वापरू शकतो. आपल्याला हा संसार पार करून 
जायला मदत करणारा हा कोणता पूल आहे ? या पुलाच्या दोन बाजूंना 
आहे तरी काय ?
त्याच्या एका बाजूला अडाणा (लालच, स्पष्टतेचा अभाव). अडाणा म्हणजे 
सततची लालसा, ‘ मला हे पाहिजे, मला ते पाहिजे’. आपल्याला कोणतीही 
गोष्ट दुसऱ्याला द्यायला आणि त्यांच्याबरोबर वाटून घ्यायला आवडत नाही. 
म्हणून या ऋचेत असे म्हटले आहे कि, तुम्ही तुमच्याकडे जे आहे ते 
दुसऱ्याबरोबर वाटून घेऊन तसेच उदारपणे दान-धर्म करून हे अडाणाचे 
लक्षण सोडून देणे आवश्यक आहे.

त्यानंतर त्यात असे म्हटले आहे कि, तुम्ही जास्त शांत होऊन तुमचा 
राग सोडून दिला पाहिजे.

आणि शेवटी त्यात असे म्हटले आहे कि, तुम्ही तुमच्या शंका आणि 
चुकीच्या समजुती सोडण्यासाठी तुमची श्रद्धा दृढ करण्याची आणि देवाची 
भक्ती करण्याची गरज असते. जेंव्हा तुम्ही श्रद्धेमध्ये दृढ होता तेंव्हा 
तुमच्या सर्व शंका आणि नकारात्मकता आपोआपगळून पडतात. त्याचप्रमाणे, 
जेंव्हा तुम्ही सत्याची कास धरून, तुम्ही पक्के सत्यनिष्ठ होता तेंव्हा 
आपोआपच सर्व खोटेपणा आणि नकारात्मकता नाहीसे होतात.

तर हा भवसागर पार करून जायच्या पुलाच्या बाजूला असे सर्व गुण 
असतात.

या ऋचेच्या पुढच्या ओळीत असे म्हटले आहे कि हा क्लेशदायक 
भवसागर पार करणे अवघड आहे पण जर तुम्ही सततच्या सरावाने 
हे महान गुण अंगी बाणले पाहिजेत.

सततच्या सरावाने तुम्हाला काय मिळेल ? तुम्ही दृढ होऊन परमात्म्याशी 
स्थिर होता आणि हा भवसागर पार करून अमरत्वाच्या अमृताचे सेवन 
कराल (आत्म-तत्वाशी समरूप व्हाल). मग तुम्ही एखाद्या प्रज्वलित 
दिपासारखे व्हाल.
पुढच्या ऋचेत असे म्हटले आहे कि , ‘ तुम्ही मुळात परमात्म्याचा 
एक भाग आहात. म्हणून तुम्ही तुमच्या स्त्रोताशी एकरूप व्हा आणि 
मग तुमच्या मनाचे विघटन होऊन तुम्ही सर्वांबरोबर समरूप होऊन 
पूर्वीसारखे परमात्म्याचा एक भाग होऊन व्हा.

नाहीतर असे होते कि तुम्ही एक विचार करता, दुसरा कोणी काही 
वेगळाच विचार करतो आणि मग तुमच्यात एकवाक्यता होत नाही. 
इथूनच खरा प्रश्न सुरु होतो. हि ऋगवेदातील शेवटची ऋचा आहे आणि 
भारतीय घटनेचा शेवट पण हाच आहे. हि ऋचा आपल्या सर्वांचे विचार 
आणि मन वैश्विक मनाशी एकरूप करणारी प्रार्थना आहे. प्रत्येक स्तरावर 
धैर्य असु देत कारण प्रत्येक जण हा सारखा असून परमात्म्याचाच एक 
भाग आहे. अशा रीतीने आपल्या सर्वांचे मने कोणत्याही संघर्ष किंवा 
मतभेदाशिवाय एकत्र काम करू देत. या ऋचा खरोखरच खूप सुंदर आहेत.