कर्मांचे मोजमाप

09
2014
Sep
बंगलोर आश्रम
प्रश्न : गुरुदेव, कोणते कर्म करावे आणि कोणते करू नये हे कसे कळेल? 
श्री श्री: तुम्ही तुमच्या मनाला, अंतरमनाला विचारा. दुसऱ्यांनी तुमच्या 
बाबतीत जे करू नये असे तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही दुसऱ्यांच्या 
बाबतीत करू नका. हाच निकष आहे. 
आपण अशाच गोष्टी कराव्या ज्या करताना तात्पुरता त्रास होणार 
असला तरी, दूरगामी फायदा मिळेल. अशा गोष्टी करू नयेत ज्याच्या 
पासून तात्पुरता आनंद मिळेल पण दूरगामी परिणाम दु:खकारक असतील. 
कर्माचा हाच निकष आहे. 

प्रश्न : गुरुदेव, जेव्हा दुसरे एखादे आध्यात्मिक गुरु येऊन अनादराने 
वागतात किंवा अपमानकारक गोष्ट करतात तेव्हा तुम्हाला काय वाटते ? 
श्री श्री : करुणा आणि अचंबा. आधी अचंबा वाटतो की एखादी ज्ञानी 
व्यक्ती असे कसे वागू शकते. असे बघा की, एखादा दागिन्यांच्या 
दुकानाचा मालक अगदी क्षुल्लक किमतीची भाजी किंवा एखादा किलो 
केळी किंवा सफरचंद चोरणार नाही. जर असे कुणी केले तर तुम्ही केवळ 
आश्चर्य करू शकता आणि दुसऱ्या बाजूला करुणाही वाटेल. कुठेतरी खोलवर 
रुजलेले अज्ञान असेल आणि तुम्ही त्या अज्ञानाबद्दल फक्त करुणा दाखवू 
शकता. त्यांच्यावर रागावण्यात काही अर्थ नाही. त्याने कुणाचाच फायदा 
होणार नाही. हा माणूस, जो चढत होता तो घसरला. हाव आणि घृणा 
यांच्या ते आहारी गेले आहेत. आणि जर ते खरे असतील तर ते स्वत:लाच 
शिक्षा करून घेतील. त्यालाच प्रायश्चित्त म्हणतात. जेव्हा कुणाच्या हातून 
चूक होते तेव्हा आणि ती त्यांच्या लक्षात येते तेव्हा त्यांनी स्वत:लाच शिक्षा 
करून घ्यावी, दुसऱ्यांनी शिक्षा करण्याची वाट पाहू नये. आणि जर त्यांनी 
यापैकी काही केले नाही तर त्यांना आध्यातिक गुरु मानू नये. ते अध्यात्मिक 
ज्ञानाचा स्वत:च्या स्वार्थीपणासाठी वापरत आहेत.  
 
प्रश्न : मला आध्यात्मिक साधना आणि वातावरण आवडते. आध्यात्मिक 
दृष्ट्या विकसित झालेले लोक आणि त्यांचे कार्य यात राहिल्याने मला 
संतुलित आणि समाधानी वाटते. आध्यात्मिक साधनेतच व्यासाय करणे 
शक्य आहे कां ? जर तसे असेल तर तुम्ही काय सल्ला द्याल ? 

श्री श्री : असे बघा, आध्यात्मिक साधनेचा व्यवसाय करता येणार नाही 
पण आर्ट ऑफ लिव्हिंगने बऱ्याच संधी उपलब्ध केल्या आहेत. आपल्या बऱ्याच 
शाळा, संस्था, विद्यापीठे आणि नोकऱ्या उपलब्ध करून देणारे केंद्र आहे. 
तुम्ही तुमचे नाव नोंदवा कारण देशाला सक्षम लोकांची गरज आहे आणि 
आध्यात्मिक कल असलेल्या लोकांचे सर्वत्र स्वागतच असते. तर संधी भरपूर आहेत.     

प्रश्न : लोकांनी विचारलेल्या कोणत्या प्रकारच्या प्रश्नांनी तुम्हाला अस्वस्थ 
वाटते ? 

श्री श्री : आतापर्यंत कुणी अस्वस्थ करणारे प्रश्न विचारल्याचे मला आठवत 
नाही. मला कुणाबारोबरच काही झाले तरी अस्वस्थ वाटत नाही. आतापर्यंत 
तरी नाही, भविष्यातले मला माहित नाही.  
प्रश्न : गुरुदेव, क्लेश किंवा भायाने ग्रासलेल्या लोकांना तुम्ही कसे 
समजावता ? तुमच्या आयुष्यात आलेले तणावाचे आणि चिंतेचे सर्वात 
मोठे क्षण कोणते होते ? 
श्री श्री : चिंतेचा तर मला अनुभव नाही पण तणावाचे बरेच क्षण होते. 
आम्ही सुनामी मध्ये अडकलो होतो आणि आम्ही सतत ४८ तास प्रवास 
करत होतो. ते दिवस खूपच तणावपूर्ण होते. जेव्हा मी इराक मध्ये होतो 
आणि मागे पुढे सगळीकडे बॉम्ब फुटत होते. मी धोक्याच्या ठिकाणी होतो. 
अर्थातच मला काळजी नव्हती पण माझ्या भोवतालच्या लोकांना मी 
काळजीत टाकले. मला माहित होते की आमचे सगळे व्यवस्थित होणार 
आहे. सरकारनेही धोक्याच्या ठिकाणी न जाण्याबद्दल सांगितले पण मी 
तिथल्या आदिवासी लोकांना भेटण्याच्या बाबतीत आग्रही होतो. त्यांनी 
आम्हाला १२ वाहने आणि माझ्या सुरक्षेसाठी २ टँकर्स दिले. त्यामुळे जे 
अंतर अर्ध्या तासात पार करू शकलो असतो ते पार करायला आम्हाला 
दोन तास लागले. तर, या युद्धजन्य भागात प्रवास करणे हा माझ्यासाठी 
काळजीचा भाग नव्हता, उलट थरारक अनुभव होता. 
खूप वर्षांपूर्वी काश्मीरमध्ये संघर्ष चालू असताना मी तिथे बऱ्याच ठिकाणी 
प्रवास केला. मी श्रीलंकेतही गेलो होतो पण 
तिथला माझा अनुभव निराशाजनक होता. मी श्रीलंकेला गेलो कारण 
मला तिथे शांतता प्रस्थापित करायची होती. मी श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांशी 
बोललो आणि मला प्रभाकरनशी ही बोलायचे होते. मला त्याला हे 
सांगायचे होते की, युद्धाचा मार्ग न स्वीकारता चर्चेला तयार हो. तो 
मला भेटला नाही हे जरासे निराशाजनक होते. मी एक दिवस किलिनोच्चीला 
राहिलो होतो. मला हे दिसत होते की जर या माणसाचे गर्व हर्ण केले नाही 
तर ऐंशी हजार लोक मारले जातील. जर तो चर्चेसाठी आला असता तर 
श्रीलंका मधील युद्ध टाळता आले असते. अर्थात त्याच्या हाताखालचे लोकही 
उतावळे झाले होते. ते म्हणाले, “ गुरुदेव, कृपा करून आमच्या नेत्याला 
भेटा.” ते त्याला थलाइवार (नेता) म्हणायचे. “ जर तुम्ही त्यांना 
भेटलात तर त्यांचे मत परिवर्तन होईल.” पण त्या माणसाने भेटायला 
नकार दिला. तो अध्यात्मिक गुरूंना भेटणार नाही, असे त्याने सांगितले.   
तसेच, जेव्हा दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया मध्ये संघर्ष सुरु होता, 
तिथ्लीआ नवीन राष्ट्राध्यक्षांना भेटण्याचा प्रयत्न केला होता. 
ते विशीतले एक तरुण राष्ट्राध्यक्ष होते. त्यांना माफियांनी घेरलेले होते. 
आम्हाला असे सांगण्यात आले की ते आम्हाला राष्ट्राध्यक्षांपर्यंत पोहोचू 
देणार नाहीत. त्यामुळे त्यावेळी हे अगदी होता होता फिस्कटले. अशा 
गोष्टी होतात पण त्या गोष्टींमुळे मी अस्वस्थ होत नाही.  

प्रश्न : गुरुदेव, मी ३० वर्षांचा आहे आणि मला माझ्या आयुष्याकडून 
काय हवे आहे ते खरोखरच मला अजूनही माहित नाही. मला एखादी 
गोष्ट आवडीने करावीशी वाटते, असे म्हणता येत नाही पण जेव्हा दुसरे 
कुणीतरि एखादी गोष्ट मनापासून करताना दिसले की मला पोकळी जाणवते. 
मला माझ्या जीवनात काय हवे आहे हे मला कसे कळेल ? 

श्री श्री :‘मला जीवनात काय हवे’ हे तुम्ही बदलून, ‘ भोवतालच्या 
लोकांना काय हवे’ असा विचार करायला हवा. देशाला काय हवे. 
‘मला काय हवे’ हे ‘माझ्याकडून काय हवे आहे’ हा बदल जर तुम्ही 
केलात तर तुम्हाला समाधान मिळेल. जेव्हा तुम्ही असा विचार करता 
की, “ मी देशाच्या भल्यासाठी काय करू शकतो” तेव्हा, तेव्हा तुम्हाला 
पोकळी जाणवणार नाही. आर्ट ऑफ लिव्हिंगचे अनेक प्रकल्प आहेत. 
एखाद्या स्वयंसेवकाला गाठा, तो तुम्हाला त्यांच्या सोबत घेऊन 
जाईल. जेव्हा तुम्ही एखाद्या सामाजिक प्रकल्पात सक्रीय सहभागी 
होता, तेव्हा मिळणारा आनंद अवर्णनीय असतो. तसा आनंद तुम्हाला 
आणखी कुठेही मिळणार नाही. 
प्रश्न : गुरुदेव, तणाव आणि चिंता यांना कसे हाताळायचे ? 
श्री श्री : आत्ता हसत आहात तसेच हसत रहा. तणाव आणि चिंता 
यांना पक्डून्न ठेऊ नका. जर तुम्ही या गोष्टी धरून ठेवल्या नाहीत 
तर त्यांना हाताळण्याचा प्रश्नच येत नाही. 
गुरु आणि आश्रम कशासाठी आहे ? सगळ्या चिंता टाकून द्या, 
प्रार्थना करा, श्रद्धा ठेवा आणि पुढे जा. तुम्ही श्रद्धा ठेवा, त्याची 
फळे तुम्हाला मिळतीलच. तुम्हाला माहिती आहे कां ? बंगलोर मधल्या 
काही लोकांची अशी श्रद्धा आहे की, जर ते रविवारी आश्रमात आले 
आणि तिथलं प्रसादाच अन्न खाल्लं तर त्यांचे पोटाचे आणि इतर आजार 
बरे होतात. त्यांची श्रद्धा आहे आणि त्यांच्या श्रद्धेमुळेच त्यांना इच्छित फळ 
मिळते. इथे राहणाऱ्यांना कदाचित पोदात दुखत असेल आणि त्यावर 
औषध घायावे लागत असेल पण बाहेरून जे लोक रविवारी या श्रद्धेने ते 
पूर्णपणे बरे होतात. हा बऱ्याच लोकांचा अनुभव आहे.