या सृष्टीच्या तुलनेत आपण एका तीळाप्रमाणे आहोत.
१४ जानेवारी, २०१२

मकर संक्रांती, मी आणि पुणं यांचा काहीतरी संबंध आहे. या काळात तुम्ही काहीतरी करता आणि मला इथे ओढून  आणता. मग मी पुन्हा म्हणतो, ‘तीळगुळ घ्या गोड गोड बोला’. आज माझ्या लक्षात आले की तीळ हा बाहेरून काळा असतो आणि आतून पांढरा. जर तो बाहेरून पांढरा आणि आतून काळा असता तर काहीतरी वेगळेच झाले असते. आज ह्या तीळगुळाने देशाला आतली शुद्धता टिकवण्याचा संदेश दिला आहे.
तुम्ही जर तिळ चोळला तर तो बाहेरूनही पांढरा होतो. आपण या सृष्टीच्या तुलनेत आपण एका तीळासारखे आहोत. तुम्ही बघितलं तर या सृष्टीमध्ये आपलं काय महत्व आहे ; जीव काय आहे ?काही नसल्या सारखेच, एका तीळाप्रमाणे, क:पदार्थ. आपण फक्त एक सूक्ष्म कण आहोत.हा संदेश आपण लक्षात ठेवायला हवा.
आपण अगदी बारीक आणि गोड आहोत. तीळगुळासारखेच स्वादिष्ठ. तर, तीळगुळासारखेच छोटे आणि गोड रहा आणि तुम्ही खऱ्या अर्थाने मोठे व्हाल. आणि जर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात किंवा कोणत्याही अर्थाने खूप मोठे आणि महत्वाचे झाल्यासारखे वाटायला लागले तर उतरती कळा लागायला सुरवात होईल. हे अनुभवसिद्ध सत्य आहे.
हजारो लोकांच्या आयुष्यात असे झालेले आपण बघतो. ज्या क्षणाला अहंकार वर येतो किंवा ‘ मी कुणीतरी आहे असा भास व्हायला लागतो त्याक्षणी उतरती कळा सुरु होते. “मी सामर्थ्यवान आहे”, असे वाटले की बस, सामर्थ्य कमी व्हायला सुरवात होते. 
इथे महाराष्ट्रात शक्ती आणि भक्तीचा संयोग झालेला आहे. शिवाजीची शक्ती आणि तुकारामाची भक्ती याणेच भारताचा उत्कर्ष झाला. ही गोष्ट लोक विसरले आहेत असे दिसते. आजकाल ते फक्त शक्ती प्रदर्शनातच मग्न असतात. शक्ती बरोबरच भक्तीही तेवढीच आवश्यक आणि अत्यंत गरजेची आहे. मी तर म्हणेन की चार गोष्टी गरजेच्या आहेत. शक्ती, भक्ती, युक्ती आणि मुक्ती. यातल्या एकाचा जरी अभाव असेल तरी जीवन यशस्वी होणार नाही.
समाजात यशस्वी होण्यासाठी शक्ती आणि युक्तीची गरज असते. आणि जर तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत किंवा आध्यात्मिक जीवनात यश अनुभवायचे असेल तर भक्ती आणि मुक्तीची गरज असते. आपल्याला या चारही गावष्टींच्या बरोबर पुढे जायचे आहे.
तर हा संदेश आहे : भक्ती आणि शक्तीचा संयोग. आपल्या देशात याचीच गरज आहे. याने देशातील लोकांमधला जोश वाढेल.
मी जिथे जाईन तिथे लोक मला विचारतात, “ गुरुजी या देशाचे काय होणार ?” शेतकरी खुश नाहीत. ते म्हणतात,   “आम्ही भाज्यां पिकवतो आणि भाव उतरतात.आम्ही कशाच्या भरवशावर भाज्या पिकवायच्या ? हे म्हणजे आमचे हातच तोडून टाकल्यासारखे आहे.”
व्यापारी खुश नाहीत; कारखानदार खुश नाहीत. कोणाला कधी तुरुंगात टाकतील याचा भरवसा नाही. वकील आणि न्यायाधीशही खुश नाहीत. ते म्हणतात, “ आता देवच या देशाला वाचवू शकतो.”
राजकारण्यांना विचारा.त्यांची काय परिस्थिती आहे कोणालाच सांगता येत नाही. ते स्वत:च गोंधळलेले आणि निराश आहेत. त्यांच्या स्वत:च्या पक्षातल्या लोकांबद्दल आणि दुसऱ्या पक्षातल्या लोकांबाद्दलही ते खुश नाहीयेत. त्यांच्या स्वत:मध्येही कितीतरी संघर्ष चालू आहेत.
मी म्हटलं , “ अजिबात नाही, मी तसं होऊ देणार नाही.”
म्हणून तर मी जाईन तिथे सांगत असतो की, लोकांनी अशी शपथ घ्यावी की ते लाच देणार नाहीत आणि घेणार नाहीत.जिथे आपलेपणाची भावना सते तिथे भ्रष्टाचार असूच शकत नाही. जिथे सूर्य आहे तिथे आंध्र असूच शकत नाही. जिथे आपलेपणा असो तिथे अनैतिकता किंवा हिंसा असूच शकत नाही.
पण आजकाल जे चांगल काम करू पहाताहेत त्याच्यावरही लोक दोषारोप करताहेत.ते तर करतीलच तेत्यांच्यासाठी स्वाभविक आहे. पण ह्याने काहीच होणार नाही. सत्याचा नेहमीच विजय होतो तसा तो नक्की होईलच. मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर मला तुम्हा सर्वांना अशी ग्वाही द्यायची आहे की द देश पुढे जाईल, देशाची प्रगती नक्की होईल. जे लोक दुष्कृत्य, भ्रष्टाचार आणि काळा पैसा यात गुंतलेले आहेत त्यांना त्याचे भोग भोगावे लागतीलच.त्यांना नक्की शिक्षा होईल.
तर भक्ती हे जीवनाचे सार आहे, या जाचा अर्क आहे, त्याला धरून ठेवा त्याला जाऊ देऊ नका. मग बघा आपल्या आत्मविश्वास कसा प्रचंड प्रमाणात वाढतो ते. सामर्थ्य येईल आणि जिथे सामर्थ्य असेल तेथे नवीन कल्पना सुचतात आणि नवीन कौशल्ये आत्मसात केली जातात आणि त्रास आणि काळज्या यापासून तुम्ही मुक्त व्हाल.
देव तुमच्यातच आहे आणि तो मिळवण्यासाठी तुम्हाला काही करायची गरज नाहिये, या गोष्टीची आठवण करून देणे हाच माझा इथे येण्याचा हेतू आहे.काय झालं की गुरु ,’हे करा, ते करा’ असं सांगत राहिले आणि शिष्य विचार करत राहिले की काय करायचं आमी मग गुरु आणि शिष्य दोघेही हताश झाले. मी तुम्हाला सांगतो आहे की केवळ काही वेळ स्वस्थ बसा आणि त्याच्याशी नाते जोडा.
बघा, जेव्हा सु किंवा जावई तुमच्या घरात नव्याने येतात करतात तेव्हा त्याना आपलेसे करायला तुम्हाला किती वेळ लागतो ? पान मिनिटं मंगळसुत्र बांधलं की नाते जुळतं. काळपर्यंत ते अनोळख होते आणि आज ते एकमेकांचे होतात. हॉ की नाही ? देवाब्रोब्रही वेळ लागत नाही. नातं जोडायला खूप पैसा खर्च करावा लागतो. लाखो रुपये खर्च केल्यानंतर तुमी कोणाला तरी आपला जावी किंवा सून म्हणून कोणाला तरी स्वीकारता.पण देवाशी नातं जोडायला तेवढाही वेळ लागत नाही खरं म्हणजे काहीच वेळ लागत नाही. तुम्हाला काय कराव लागतं तर फक्त विश्वास ठेवायला लागतो की देव माझाच आहे, माझ्यातच आहे आणि आत्ता, इथेच आहे. हा विश्वास असला की थोडा वेळ स्वस्थ बसलं की मन शांत होते, भीती नाहीशी होते, दु:ख दूर होते आणि मग चेत्नेत्ला आनंद, समाधान दिसू लागते.
तुम्ही म्हणाल की , “ गुरुजी हे सगळे ऐकायला छान वाटते पण प्रत्यक्षात तसा अनुभव येत नाही.” तुम्ही जसा विचार कराल तसेच होईल. जर तुम्हाला वाटले की ते खूप अवघड आहे तर ते तसेच असेल. जर मुलाला वाटले की दहावीची परिक्षा पास होणे अवघड आहे तर तो आठवी नववी पर्यंतही पोहोचणार नाही. तो सात्वितच नापास होईल.आय.ए.एस होणे तर त्याच्यासाठी दूरची गोष्ट असेल. काही लोकांना वाटते की आय.ए.एस. ची परीक्षा पास होणे फार अवघड आहे किंवा एखादा विषय खूप अवघड आहे. जर एखादी गोष्ट अवघड आहे असे तुम्ही धरून चाललात तर तुम्ही तिथपर्यंत कधीच पोहोचणार नाही. एखादी गोष्ट टाळण्याचा सोपा मार्ग म्हणजे, ती गोष्ट अवघड आहे असे म्हणणे. ती अवघड नाहिये फक्त तुम्हाला तशी आंस ती करण्याची इच्छा असणे गरजेचे आहे. आणि देव निसर्गापासून अलग नाहिये.तो निसर्गाचाच भाग आहे. जसे तीळात तेल आहेच तसेच सृष्टीत देव आहेच. प्रत्येक हृदयात तो आहेच. हेच स्वत: बद्दलचे ज्ञान आहे.
तुम्ही सकाळसंध्याकाळ काही वेळ स्वस्थ बसलात, शांततेचे निरीक्षण केलेत आणि विचर केलात की , “ हे जीवन म्हणजे काय आहे ? मी इथे किती काळ असणार आहे ? कदाचित दोन दिवस ,दहा, वीस किंवा अगदी पन्नास वर्ष ? मी जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत मला या जगाकडून काय हवे आहे ?  आणि मी इथून जाण्यापूर्वी या जगाला काय देऊ शकतो ? असे प्रश्न मनात यायला हवे.
सुशिक्षित माणसाच्या मनात असे प्रश्न येतात.जर तुमच्या मनात असे प्रश्न आले तर मी म्हणेन की तुम्ही पदवीधर आहात. जेव्हा मुलाना शाळा कॉलेज मध्ये जाण्याची जबरदस्ती केली जाते तेव्हा ते नाखुश होऊन बाहेर येतात. सगळी नीती मूल्ये त्यांच्या मनातून पुसली गेलेली असतात.ते किती नाखुश दिसतात.
एक सुशिक्षित माणूस तो असतो जो सतत हसत असतो. आनंद त्याला सोडतच नाही आणि त्याला प्रेमाची कधी कमी नसते. अश्या माणसाला मी सुशिक्षित म्हणेन, विद्वान आणि ज्ञानी म्हणेन.जीवनातल्या सर्व क्षेत्रात विशेषत: शिक्षण क्षेत्रातआपल्याला अशा माणसांची गरज आहे.
नवीन वर्शाच्या सुरवातीला मी जर्मनीत होतो आणि तिथे मला सांगितलं गेलं की ४० टक्के शिक्षक वैफल्यग्रस्त आहेत. मी म्हटलं की जर ४० टक्के शिक्षक मानसिकरित्या आजारी असतील ते विद्यार्थ्याना काय शिकवतील ? त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून मुलांना घरी पळून जावेसे वाटेल. देवा, सध्या भारतात अशी परिस्थिती नाहिये हे किती बरं आहे. जर शिक्षक वैफल्या ग्रस्त असतील तर मुलाना शिकण्यासाठी ते किती अयोग्य वातावरण असेल ? अति सुबत्ता असेल तेव्हा असे होते.
मागच्या महिन्यात जेव्हा मी खरगपूरला गेलो होतो तेव्हा मला सांगण्यात आलं होतं की त्यातीकानी सर्वात जास्त खप असलेलं औषध म्हणजे वैफल्यावर घ्यावं लागणारं औषध.
सर्व पालकांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या पाल्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी.त्यांच्यावर असे म्हणून दबाव आणू नका की, “ अभ्यास कर, स्पर्धा आहे तुला पहिलं यायलाच हवं .” या मुलांवर इतका दबाव येतो की त्यांना नैराश्य येऊन ते शाळा कोलेजात आत्महत्या करू लागतात.निकाल उत्तमच लागला पाहिजे म्हणून त्यांच्यावर दबाव आणू नका. त्याऐवजी त्यांना हे शिकवा की प्रभावी आणि हुशार व्यक्तिमत्व कसे बनवायचे ?
त्याना योग, ध्यान, प्राणायाम शिकवा आणि मग तुम्हाला त्यांच्यातले गुण उभरताना दिसतील.तुमच्या मुलांना यस प्लस चा कोर्स करायला सांगा. आर्ट ऑफ लिव्हिंग कोर्स करण्याचा हाक फायदा आहे की ती व्यक्ती आतून फुलून येते आणि सर्व बंधनं गळून पडतात.
बघा इथे किती लोक आनंदी दिसताहेत.जर कुणी आनंदी आणि खुश दिसले तर समजा की तो कुठल्यातरी कोर्सला गेला आहे. ही खरी गोष्ट आहे. आणि जर कुणी दु:खी चेहरा करून बसले असेल तर समजा की त्याने कोर्स केला नाहिये किंवा गुरुजींनी काय सांगितले ते त्याने ऐकले नाहीये.
काही वर्षांपूर्वी जेव्हा इस्रायलने लेबेनॉन वर हल्ला केला होता तेव्हा आपणही तिथे आर्ट ऑफ लिव्हिंगचे केंद्र चालवत होतो.मी माझ्या माणसांना सांगितले की तिथल्या स्वयांसेवकांना आणि प्रशिक्षकांना फोन करून त्यांची खुशाली विचारा. जेव्हा त्यांना फोन केला तेव्हा तेव्हा तिथले लोक संतसंग करत होते. सगळीकडे बॉम्ब वर्षाव सुरु होता आणि हे लोक संतसंग करत होते. त्यांनी मला सांगितले, “ ओ गुरुजी आम्ही मजेत आहोत!” मी त्यांच्या काळजीत होतो आणि ते म्हणत होते , “आम्ही मजेत आहोत.” कधी कधी असे वाटते की हे किती अनैसर्गिक आहे. हे असे होऊच शकत नाही. ते म्हणत होते , “ आम्ही सेवेत गुंग आहोत. बॉम्ब वर्षाव होत असला तरी आम्हाला भीती वाटत नाही.”
कां ? कारण त्यांचा विश्वास आहे की देव आहे. मला असेच ऐकायचे होते. जो चांगल्या, वाईट सर्व परिस्थितीत हसत रहातो त्याने आयुष्यात खरंच काहीतरी कमावलं आहे. लहान सहान अडचणींवर रडत बसू नये किवा छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोकांचा जीव घेऊ नये. आशा सोडू नका. आशा आणि धैर्याने जीवनात शांती आणि प्रगती निर्माण करा. जीवन हा एक झगडा आहे पण हा झगडा आपल्याला आणखी वर जायला मदत करतो. काही लोक झगडतात आणि त्यातून विध्वंस करतात. आपला झगडा झगड्याशी झगडण्याचा आहे जेणेकरून आपल्या देशाची उन्नती होईल. देवाब्द्दल्चे प्रेम आणि देशाबद्दलचे प्रेम दोन्ही सारखेच आहे. आपण त्यांच्यात फरक करू शकत नाही.काही लोक म्हणतात, “ गुरुजी तुम्ही भ्रष्टाचाराबद्दल कशाला बोलता ? तुम्ही निवांत रहा ध्यान क्र आणि इतरांना ध्यान करण्यात मदत करा आणि भजनं म्हणा. हेच तुमचे काम आहे. तुम्ही ह्या इतर प्रश्नांकडे कशाला लक्ष देता ? ते दुसऱ्यांना करू दे.” 
नाही. जीवनाची अशी विभागणी करता येत नाही. कुणाच्या डोळ्यात पाणी आहे आणि तुम्ही त्यांच्याकडे लक्ष न देता भजनं म्हणताय, हे बरोबर नाही. जर तुम्ही त्या अश्रूना गोड आश्रू मध्ये बदलू शकत असलात तर निदान ते पुसा तरी. सत्संगात खारे अश्रू गोड अश्रू होतात.जर लोकांच्या डोळ्यात गोड अश्रू असतील तर ठीक आहे. जेव्हा हृद्य मोकळं होतं आणि माणूस रडतो तेव्हा ते गोड अश्रू असतात. रागाला हसण्यात बदलणे आणि अश्रुंना गोड अश्रुत बदलणे हे आपले ध्येय असायला हवे. हेच माझे स्वप्न आहे.
असा भारत असावा जिथे गैरवर्तणूक नाही, दुष्टपणा नाही,हिंसा नाही,तणाव नाही,सगळीकडे फक्त हसरे चेहरे आहेत. सालीकडे भजन कीर्तन चालू आहे आणि आपलेपणाची भावना आहे. पुढच्या पिढ्यांसाठी माझे हे स्वप्न आहे. आपण असा भारत करून सोडायला हवा जिथे लोक भयमुक्त जीवन जगत आहेत. तुम्हाला काय वाटतं ? कुणा कुणाला या स्वप्नात सामील व्हायचयं ? 
आपला या पृथ्वितालाव्र्च्म आयष्य फार थोड्या काळासाठी आहे. पण जोपर्यंत आपण इथे आहोत तोपर्यंतआपण न घाबरता काही सत्कृत्य केले पाहिजे.महाराष्ट्र हा शूर लाध्वैय्यांसाठी प्रसिद्ध आहे. इठीनच भरतातील क्रांतीला सुरवात झाली आणि मला खत्री आहे की अशीच क्रांती पुन्हा एकदा या महाराष्ट्रातूनच सुरु होईल. सदाचार आणि पप्रामाणीकपणाची एक अशी लाट येऊ दे जी संपूर्ण देशभर पसरेल.
आता तुम्ही मला विचारलं, “ गुरुजी, आम्ही यासाठी काय करायला हवे ?”
सर्वात फिल्म म्हणजे तुम्ही स्वत:ला सामर्थ्यशील बनवायला हवे आणि तुमचे मन आणि अंत:करण शुद्ध ठेवायला हवे. आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात उभे रहायला हवे. तुम्हाला अस वाटेल की हे अशक्य आहे. हे सगळं बोलायला सोपं आहे पण प्रत्यक्ष जीवनात तसे होत नाही. नाही. आपण असा विचार करता कामा नये. कमीत कमी एक वर्ष मेहनत करुया आणि बघुया काय होतं ?  मी बघीन आणि तुम्ही सुद्धा बघा. जर उपयोग झाला नाही तर मी सुद्धा नाद सोडून देईन आणि मग देवाची प्रार्थना करीन की आता त्यानेच काळजी घ्यावी. पण आपण निदान एक वर्ष प्रयत्न करून बघुया. आणि तुम्ही सर्वांनी मतदान नक्की करायला हवे. निवडणुकीच्या वेळेला आपल्याला वाटते, “ सगळे पक्ष सारखेच आहेत, बेकार. मग आपण कशला जायचं ? आपले मूल्यवान मत उगीच कुणालातरी कशाला द्यायचे ? ते आपल्या जवळच ठेवलेले बरे. बरेच लोक जातच नाहीत.
मला माहिती आहे, खूप वेळ रांगेत उभं राहून ते वैतागतात.त्यांना असेही वाटते की जाण्यात काही अर्थ नाही कारण आजकाल लोकांना लाच देऊन मते विकत घेतली जातात. नाही आपण असा विचार करता कामा नये. जर कुणी तुम्हाला त्यांना मत देण्यासाठी पैसे देत असेल तर पैसे घ्या पण मत त्यांना देऊ नका. तो त्यांचा घामाचा पैसा नाहिये. तो तुमचाच पैसा त्यांच्याकडे आहे जो तुम्ही कराच्या रूपात दिला होता. त्यामुळे जर ते देत असतील तर घ्या आणि ठेऊन द्या. जे पैसे देऊन मत मागतात त्याना निवडणुकीत हरवले पाहिजे.
आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठीही कां केले पाहिजे. परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे.
मी नेहमी म्हणतो की, “ गुरु हा कचरा गोळा करणारा आहे.” तुमच्या ज्या खी समस्या असतील, कुणाबद्द वाटणारा   कडवटपणा असेल,वासना, शत्रुत्व सगळं मला देऊन टाका. तुम्हाला जेकाही दु:ख असेल ते मला देऊन टाका. मी पण कचरा गोळा करतो. मी जिथे जिथे जाते तिथे लोक मला फुलं देतात आणि त्याच्या बरोबर एक पत्र. त्या पत्रात तीन गोष्टी असतात.
१.        त्यांनी केलेली चूक
२.      त्यांना असलेल्या समस्या आणि
३.      त्यांच्या इच्छा
मला वाटतं मी माझ कां बरोबर करतोय. आध्यात्मात इतकी शक्ती आहे आणि य देशाच्या ज्ञानात इतकी  शक्ती आहे की फक्त आपल्या इच्छाच पूर्ण होतात असे नाही तर दुसऱ्यांना आशीर्वाद देण्याची शक्तीही आपल्यात आहे की ज्यामुळे त्यांच्या इच्छाही पूर्ण होतील. आणि तशा त्या होतात. ही ज्ञानाची शक्ती आहे.
फक्त गुरुजीच आशीर्वाद देऊ शकतात असे नाही. जे जे साधना करतात त्यांच्यात पण ही शक्ती येईल कारण ते सेवा, साधना आणि सत्संग यात मग्न असतात. हे तिन्ही आवश्यक आहे. या तिन्ही पैकी एकाचा जरी अभव असेल तर त्याचा उपयोग होणार नाही. तुम्ही जर म्हणलात की मी साधना करतो, सेवा नाही, तर उपयोग होणार नाही. 


प्रश्न : मकर संक्रांतीचा अर्थ काय ? आणि आपण आपले सण कां विसरतोय ?
श्री श्री रविशंकर : मकरसंक्रांतीचा अर्थ सूर्याचा मकर राशी मध्ये प्रवेशआणि उत्तरायण सुरु होते म्हणजे सूर्य उत्तरे दिशेकडे वळतो, थंडी संपते. वर्षातले एक पिक काद्गून झालेले असते आणि दुसऱ्या पिकाची तयारी सुरु होते. वर्षभरात बारा संक्रांती येतात, त्यापैकी मकर संक्रांती महत्वाची समजली जाते कारण या वेळेपासून उत्तरायण हा पुण्यकाळ सुरु होतो आणि उत्तरायण हा देवतांचा काळ मानला जातो.जरी पूर्ण वर्ष शुभ असले तरी हा काळ जरासा जास्त शुभ मानला जातो. बाकीचे सर्व सन याच्या पाठोपाठ येतात.  
 
प्रश्न : गुरुजी, आपल्या इच्छा आणि विचारांना कुठून सुरवात होते ? त्यांना कसे हाताळायचे किंवा सोडून द्यायचे ?
श्री श्री रविशंकर : तर , हा विचार सोडून द्यायची तयारी आहे कां ? जर मी या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तर काय कराल ? प्रश्नाला धरून ठेवाल ? तुमच्या मनात खूप विचार येतात. शोधून काढा की हे विचार कुठून येतात ? काही वेळ स्वस्थ बसा आणि बघा, हे विचार तुमच्यातूनच येतात. बघा कुठून येतात. तुम्हाला काहीही उत्तर मिळणार नाही आणि त्या तिथूनच विचार येतात. ती काही नसलेली, शून्याची जागा. तुम्ही ध्यानात खोलवर गेलात तर आणखी जास्त कळेल. 
प्रश्न : गुरुजी, मी नेहमी कोणताही निर्णय घेताना अडखळतो. मी काय करावे मी नेहमीच गोंधळलेला असतो.
श्री श्री रविशंकर : हे बघा, ‘नेहमीच’ असे म्हणू नका. तुम्ही जर नेहमीच करत असाल तर तुम्हाला कळणारही नाही. तुम्ही तसे अंतरा अंतराने करता म्हणून तुम्हाला कळते. तुम्ही जेव्हा द्वैताच्या पार जाता तेव्हा तुमच्यात सुज्ञपणाचा उगम होतो. आपण सहसा सगळे अनंत आहे असे ठरवून टाकतो. जसे, “मी नेहमीच चूक करतो.” जर एखादा नेहमीच चूक करत असे तर तो त्याला चूक समजणारच नाही. कोणी म्हणतो, “गावात सगळे आजारी आहेत.” गावात सगळे कसे आजारी असू शकतील? लोक सगळ्याला अनंत, सामान्य करून टाकतात. असे करू नये.
  
प्रश्न : गुरुजी, माझे जीवन जास्त अर्थपूर्ण करण्यासाठी मी काय करावे ?
श्री श्री रविशंकर : ज्या अर्थी तुम्हाला ज्ञानामध्ये रुची निर्माण झाली आहे त्या अर्थी तुमचे जीवन अर्थपूर्ण झाले आहे, याचा स्वीकार करा. जर तुम्हाला सत्संगामध्ये  बसायचे आहे तर हे लक्षात घ्या की तुमच्या जीवनाची यशाकडे वाटचाल सुरु झाली आहे.

प्रश्न : गुरुजी, मी एक गृहिणी आहे आणि माझे कार्य माझे घर आणि कुटुंबिय यांच्यापुरतेच मर्यादित आहे.तुमचे आशीर्वाद जरी कायम माझ्यासोबत आहेत तरी, मी असे बघितले आहे की ज्या लोकांमध्ये माझ्याहून अधिक दोष आहेत ते माझ्याहून जास्त समृद्ध आहेत. आणि इतके कष्ट घेऊनही आम्हाला ते मिळवता येत नाहिये. असे कां ?
श्री श्री रविशंकर : असे वाटू शकते की जे लोक चुकीच्या गोष्टी करत आहेत ते खुश आहेत. पण प्रत्यक्षात तसे नाहिये. फक्त तसे वाटते. तो एक भास आहे. तसे काही काळ वाटू शकते पण एक दिवस ते कोसळतील आणि स्वत:ला वाचवू शकणार नाहीत.

प्रश्न : गुरुजी, सत्य जाणण्यासाठी ध्यान हा एकमेव मार्ग आहे कां ?
श्री श्री रविशंकर : तहानलेल्याला जसे पाणी तसे ध्यान आहे. ध्यान हा आतल्या शांततेचा आत्म्याची उन्नती करण्याचा मार्ग आहे. जर तुम्ही मला विचारलेत की ,” पाणी हा तहान भागवण्याचा एकमेव मार्ग आहे कां ? भूक भागवण्याचा जेवण हा एकमेव मार्ग आहे कां ?” मी काय म्हणू ? होय ! झोप हा थकवा घालवण्याचा एकमेव मार्ग आहे कां ? हो नक्कीच.

प्रश्न : गुरुजी, तुमच्या स्मितहास्याचे रहस्य काय आहे ?
श्री श्री रविशंकर : मी आता ते रहस्य ठेवलेले नाही. मी सगळ्यांना तेच तर देतोय. जीवन जगण्याची कला.

प्रश्न : गुरुजी, इतक्या जबाबदाऱ्या असूनही इतके जोशपूर्ण कसे जमवायचे ?
श्री श्री रविशंकर : ध्यान ! आणि भक्ती, युक्ती, शक्ती आणि मुक्ती या चारीना तुम्ही बरोबर ठेवायलाच हवे.

प्रश्न : गुरुजी, चटकन्‌ उत्तर देण्याचे काही प्रश्न आहेत.
श्री श्री रविशंकर : हो हो , विचारा.


गुरुजी काय आहेत ?
एक लहान मूल ज्याला मोठ व्हायचंच नाहिये.
राजकारण ?
अटळ.
धर्म ?
जीवनरेषा किंवा मृत्युरेषा असेल.
राग ?
टाळता येणारा .
भीती ?
वरचे खाली आणि खालचे वर असे उलटे झालेले प्रेम.
हर्ष ?
तुमचा स्वभाव
ज्ञान ?
ज्याने आनंद मिळतो.
दारू ?
ज्याने दु:ख मिळते.
भक्त ?
नशीबवान.
गोंधळ ?
परमानंदाची जननी
तुमचे स्मितहास्य ?
अविस्मरणीय
प्रार्थना ?
काम करते.
नाते संबंध ?
नेहमीच चांगले नसतात.
तरुण ?
जबाबदारी. जो कोणी जबाबदारी घेतो तो तरुण असतो.
बुद्धिमान ?
जो जबाबदारी पार पाडतो.
जग ?
मानवजातीला मिळालेली भेट.
सत्य ?
देव.
प्रेम ?
दुसरे रूप .
तंत्रज्ञान ?
आराम देण्यासाठी.
सेवा ?
जी तुम्ही चुकवू शकत नाही.
भविष्य ?
जे तुम्ही उजळवू शकता.
देव ?
प्रेम .
जीवन ?
तेच , अगदी तसेच.

 http://www.youtube.com/watch?v=RxGsHdOolCU&feature=plcp&context=C3777a7bUDOEgsToPDskJBrmiwKhBsTyDFGF51XeJW



The Art of living
© The Art of Living Foundation

हे राष्ट्र रामकृष्ण मिशनच्या संन्यासींचे आभारी आहे.
नवी दिल्ली, १२  जानेवारी २०१२
ओम नम: प्रणावार्थय शुद्ध ज्ञानेक मुक्तये | निर्मालाय प्रशान्ताय श्री दक्षिणामुर्तये नम: |
मंचावर सुंदर कोरलेले पुतळे, आणि प्रेक्षकांत सुंदर कोरलेले पुतळे. ज्या प्रमाणे तुम्ही एखाद्या पुतळयाप्रमाणे ध्यानस्थ पणे संपूर्ण लक्ष देऊन बसले आहात, ते भारत जागा होतो आहे याचे लक्षण आहे. लोक करमणुकीसाठी जातात आणि बसतात, पण जेंव्हा ते अध्यात्मीक प्रवचनासाठी बसतात तेंव्हा अर्धेअधिक पेंगतात, त्यांचे डोके खाली असते किंवा अर्ध्यावेळेला ते दुसरीकडेच असतात. पण, ज्या एकाग्रताने तुम्ही इथे बसले आहात त्यावरून हेच लक्षात येत आहे कि, आपण योग्य दिशेने जात आहोत.
स्वामी विवेकानंदजी या देशातील तरुणांना एक स्वप्न देऊन गेले. आणि जेंव्हा आपण हे स्वप्न उराशी बाळगतो तेंव्हा या देशाच्या प्रगतीशिवाय दुसरा मार्ग असूच शकत नाही. या देशातल्या ६१२ जिल्हापैकी २०० जिल्ह्यात जो विकासाचा अभाव दिसतो त्याचे कारण रामकृष्ण मिशन तिथे पोहोचले नाही. ज्या भागात नक्षलवाद, किंवा हिंसक कारवाया होताना दिसतात, त्याचे कारण त्यांचे शिक्षण नीट झाले नाही.
तुम्हाला माहित आहे जेंव्हा किरण बेदी निवृत झाल्या तेंव्हा खूप लोकांना हायसे वाटले. त्यांना तुम्ही निवृत्त अधिकारी म्हणू शकत नाही. त्यांच्या साठी निवृत्ती नाहीच. त्या आता अधिक जोमाने अजून मोठ्या कार्यात व्यग्र आहेत. आज जे पारितोषिक वितरण झाले त्यात ६ पैकी ५ मुली आहेत. मुलींकडे उत्तम गतीदाई शक्ती असते, त्यामुळे त्या संपूर्ण वातावरण भारावून टाकू शकतात. लोकांना प्रेरणा देऊ शकतात. जर देशातील प्रत्येक स्त्री त्यांच्या मर्यादित क्षेत्रातून बाहेर पडली तर त्या खूप मोठा बदल घडवू शकतात.
जेंव्हा किरण बेदी याबद्दल बोलत होत्या तेंव्हा त्या जणू ‘आर्ट ऑफ लीविंग’ चा संदेश देत असल्यासारखे वाटले.
स्वामीजींचे आयुष्य हे प्रेरणा होते. स्वामीजी जे होते त्यामागे शारदादेवींची मोठी प्रेरणा होती. त्यांच्या छोट्या छोट्या शिकवणुकीतून स्वामीजींचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, हे सगळे अदभूत आहे.
या महिन्याच्या ९ तारखेला, ३ दिवसांपूर्वी मी कलकत्त्याला रामकृष्ण मिशनच्या स्वामींबरोबर होतो. इतकी वर्ष कठीण परिस्थितीत ज्या निष्ठेने ते हे कार्य करत आहेत ते विलक्षण आहे. आम्ही अरुणाचल प्रदेश मध्ये रामकृष्ण मिशन बरोबर काम करतो. इस्पितळे, शाळांत आर्ट ऑफ लिविंग चे स्वयंसेवक बरोबरीने काम करतात. त्यांना खूप आव्हानांचा सामना करावा लागतो, पण राग, द्वेष, पश्चाताप यांचा तिळमात्रही लवलेश न होता ते काम करतात. कठीण परिस्तिथीत आणि वातावरणात त्यांनी जी सहनशीलता दाखवली आहे ती उल्लेखनीय आहे. संपूर्ण देशात याचे अनुकरण करणे गरजेचे आहे.
कृतीवादाची अध्यात्माशी सांगड घालणे जरूरीचे आहे. अण्णानमध्ये आपल्याला हेच आढळते, नाही का? ते अध्यात्मीक आहेत पण त्याच बरोबर नुसते बसून सगळे काही ठीक होईल असा विचार ते करत नाहीत. जे काय करायचे आहे ते देवाला करू देत, आम्ही बसून फक्त मजा करतो, असे होत नसत. तुमच्यातील देव तुम्हाला हे काम करायला सांगतोय.
तुम्हाला एक गोष्ट सांगतो:
अद्वैत तत्वज्ञानचे गाढे अभ्यासक आदि शंकराचार्य म्हणाले ‘सगळे क्षणिक आहे, सगळे सतत बदलत आहे, ही सगळी माया आहे’ एकदा ते चालत असता एक मदमस्त हत्ती त्यांच्या मागे लागला, ते बघुन ते धावू लागले. तेंव्हा एक जण त्यांना म्हणाला ‘ही सगळी माया आहे. तुम्ही म्हणालात की हत्ती माया आहे, मग तुम्ही का धावताय.’ तुम्हाला माहित आहे आदि शंकराचार्य काय म्हणाले? ‘जर हत्ती माया असेल तर माझे धावणे सुद्धा माया आहे’. जर स्वप्नात तुमचा वाघाशी सामना झाला तर तुम्हाला वाघाला मारायला स्वप्नातील बंदूक लागेल. तुम्ही खरीखुरी बंदूक घेउन त्याला मारायचा प्रयत्न करणार नाही.
आयुष्य ही एक जटील भेट आहे, आपण त्याला शिक्षा मानता कामा नये. या सीमित जगात ही अनंत जटील गोष्ट आहे. शांतता आणि जोश, प्रेम आणि कृती, मौन आणि सेवा.
रामकृष्ण मिशनच्या संन्याशीनि वेदान्तिक शिकवण आणि भजन हे त्यांचे कार्य इतके वर्ष चालवले आहे, त्या बद्दल हे राष्ट्र त्यांचे आभारी आहे. एक संस्कृत सुभाषित आहे ‘काव्य शास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमातम’
विद्वान लोक गाणे (भजन), आनंद, निष्ठा या द्वारे समाज प्रबोधनाचे काम सहज करत असतात. ज्ञान तुम्ही प्रत्यक्षात आणू शकत नाही असे नाही, जे तुम्ही सहज आत्मसात करून तुम्हाला त्याचा उपयोग होतो त्याला ज्ञान म्हणतात.
आपल्या देशातील आणि धर्मातील अनेक अंधश्रद्धा आणि कल्पित गोष्टी ज्या अगदी मुळापर्यंत खोल रुजल्या होत्या त्यांचे स्वामीजींनी समूळ उच्चाटन केले, जसे वाळूतून साखर वेगळी करावी. या देशातील युवक त्यांचे शतशः ऋणी आहेत.
आज मला हे सांगताना खूप उत्साह आणि आनंद वाटतोय की स्वामीजींचे हे स्वप्न साकार करणे आपले कर्तव्य आहे.
आपल्याला या देशाला भ्रष्ट्राचारपासून वाचवायचे आहे. जिथे आपुलकीची भावना संपते तिथे भ्रष्टाचाराचा उगम होतो. अध्यात्म म्हणजे काय? तर आपुलकीची भावना जागृत करणे, सगळे आपले आहेत ही भावना निर्माण करणे. विशाल दृष्टीकोन आणि हृदय, खुले मन आणि हाती घेतलेले काम तडीस नेण्याची वृत्ती याने हे साध्य होऊ शकते. गेली १५० वर्ष स्वामीजी या देश आणि युवकांसाठी एक प्रेरणास्रोत होते आणि पुढेही राहतील. 
माणसाचे गुण हे त्याला मानणाऱ्या लोकात दिसून येतात. ज्या समर्पण भावनेने आणि शांत चित्ताने हे सन्यासी देशात क्रांती घडवू पाहत आहेत ते अनुकरणीय आहे. ते कर्तव्य, अहिंसा, सत्य आणि न्याय यांचा एक भक्कम पाया राचातायेत. मी खात्रीने सांगू शकतो जर शाळा, महाविद्यालात कर्तव्य, ज्ञान,विश्वास आणि श्रद्धा यांचा पाया भक्कम झाला तर आयुष्यात संतुलन येईल, समाजात सुधारणा होईल.
जर तुम्ही भ्रष्टातल्या भ्रष्ट माणसाला विचारलेत की त्यांचे शिक्षण कुठे झाले आहे, तर त्यातील बऱ्याच लोकांचे  शिक्षण सरकारी शाळेत झाले आहे, जिथे नैतिकतेला थोडा फाटा दिला जातो. मी असे अजिबात म्हणत नाही कि जे सरकारी शाळेत शिकले ते सगळे अनैतिक आहेत. आपण सगळ्यांना एकाच तराजूत तोलू शकत नाही, ती चूक ठरेल. या देशातल्या साधू संतामधेही या गोष्टी आढळतील. आपण प्रत्येक परिस्थितीचा उपयोग देश उभारणी, स्वतः आणि जगाच्या उन्नतीसाठी केला पाहिजे.
बरेच लोक म्हणतात जे वेदांती किंवा सन्यासी आहेत त्यांच्या साठी सगळे देश सारखे आहेत, तर मग ते एका देशाबद्दल देशाभिमान
कसा दाखवतात? जेंव्हा आपण ‘माझा देश’ असे म्हणतो तेंव्हा आपण संकुचित होतो. मी म्हणतो हे संपूर्ण जग आपले आहे.
देशाबद्दल अभिमान किंवा समर्पण तुमच्या वैश्विकतेबदल अडथळा बनूच शकत नाही. आपला देशाभिमान वैश्विक चेतनेच्या आड येऊ शकत नाही.
स्वामी विवेकानंदानी देशभक्ती ठेऊन तुम्ही वैश्विक कसे होऊ शकता याचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.
दैवभक्ती, देशभक्ती आणि गुरुभक्ती या तीन गोष्टी वेगळ्या नाहीत, त्या एकच आहेत. दैवत्वातून या जगाची उत्पत्ती झाली, आणि हे विश्व म्हणजेच देव. देव आणि निसर्ग या दोन वेगळ्या गोष्टी नाहीत. या देशाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे नद्या, पर्वत, झाडे, गाई, वासरू, कुत्रा हे सगळे देवाचाच अविष्कार आहेत असे मानले जाते.
'या प्रकृती लीनास्या या परस्य महेश्वरा'
जो या निसर्गाशी एकरूप आहे तो महेश्वर, देव आहे. आपल्याला निसर्गाबद्दल अनुकंपा असली पाहिजे.
देशभक्ती आणि देवभक्ती वेगळी नाही. जागरुकपणे आणि तळमळीने आपण देशाला पुढे नेऊ या. स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातील गौरवशाली भारत बनवण्यासाठी आपण संकल्प करू या, असा भारत जो संपूर्ण जगाचे अध्यात्मिक नेतृत्व करेल.
जे वयाने आणि मानसिकतेने तरुण आहेत त्या इथे बसलेल्या आपणा सर्वांची ही जबाबदारी आहे. तुमच्या पैकी  बरेच वयाने तरुण आहेत आणि बरेच मनाने, तुम्ही सगळ्यांनीच आज हा संकल्प करा. स्वामी विवेकानंदानी तुम्हाला दिलेल्या सुंदर, संपन्न आणि सुयोग्य भारताच्या स्वप्नाची स्वतःला आठवण करून द्या. 



The Art of living
© The Art of Living Foundation
एक प्रेमी नेहमीच आनंदी, शांत आणि उदार असतो.
११ जानेवारी २०१२
सत्संग म्हणजे सत्याच्या बरोबर राहणे. त्यालाच साधना असेही म्हणतात. सत्संग म्हणजे काय? आपल्या आयुष्यात आत्ता या वर्तमान क्षणात सत्य काय आहे - याकडे लक्ष दिले पाहिजे.  सत्य काय आहे? 'मी आहे' हे सत्य. शरीराचे अस्तित्व आहे आणि श्वास चालू आहे. तुमच्या शरीर आणि श्वासाकडे लक्ष द्या. मनाकडे लक्ष द्या. सत्य काय आहे? मनात खूप सारे विचार येत आहेत आणि जात आहेत. येत आहेत आणि जात आहेत, उठत आहेत आणि शांत होत आहेत, ही मनाची प्रवृत्ती आहे.  बुद्धी कायम तर्क किंवा विचारामध्ये गुंतलेली असते. आयुष्यात काय निर्णय घेतले? त्याचामुळे काय झाले? त्यातून काय शिकलो आणि काय घेतले? या सगळ्याचा विचार म्हणजे सत्संग. फक्त भजन करणे म्हणजे सत्संग नव्हे. भजन करणे म्हणजे सत्संग आहे, पण तेवढेच नव्हे.  बसा आणि विचार करा, ' माझ्या आयुष्यात, मी काय सत्य शोधले? माझ्यात काय कमी आहे आणि माझी बलस्थाने काय आहेत?'कमीपणा कमी होताना आणि बलस्थाने वाढताना पहा. ही साधना आहे आणि या अशा सत्संगा मध्ये तुम्ही असले पाहिजे. तुमचा विवेक जागृत होत आहे; तो आधी कमी होता, आता एक टक्का जास्त आहे! म्हणजे आयुष्यात प्रगती आहे. हळू हळू किंवा वेगाने, ते होत आहे. तुमचे लक्ष जगाकडे असते, तेंव्हा तुम्हाला देव दिसणार नाही. आणि जेंव्हा देव दिसेल, तेंव्हा जग अदृश्य होते. तुम्हाला दोन्हीपैकी एकच दिसू शकेल.

२४ तास जगालाच धरून बसण्यापेक्षा, देवाचा २४ मिनिटे जरी विचार केला, तर त्याने कितीतरी शांतता आणि आराम मिळेल. तुम्ही काहीही करत असाल, चोवीस तासामधले  फक्त चोवीस मिनिट शांत बसा आणि विचार करा, ' हे जग म्हणजे काही नाही; मला त्याचाकडून काहीही नको. या जगाकडून मला काहीही अपेक्षा नाहीत.' - हा एवढाच विचार मनाला अंतर्मुख करतो. जोपर्यंत आपल्याला  स्थान, मान आणि श्रीमंतीची किंवा कुणाकडून कौतुकाची इच्छा आहे तोपर्यंत मन मागे फिरणार नाही. जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत व्याकुळता आहे. अगदी थोड्या वेळासाठी सुद्धा आपण जर असे म्हणले की, ' मला या जगाकडून काहीही नको ', त्याच वेळी विवेक जागृत होतो आणि मन आनंदी आणि शांत होते. हे देवाच्या दृष्टीचे सूचक आहे: प्रसंत  -मानसं  ह्य एनं  योगिनां सुखं  उत्तमम उपैति संत-राजसं ब्रह्मा -भूतं  आकालमासम.'ब्रम्ह चेतना, जिथे अशुद्धी, दुर्लक्ष, गोंधळ  नाही - अशी जागरुकता, थोड्या वेळासाठी आपल्याला अनुभवता येते. तर तुम्ही इथे तीन चार दिवस आहात, भौतिक जगातल्या गोष्टी, आसक्ती आणि द्वेष  अजिबात धरून बसू नका. जर त्या आल्या,  तर लक्ष देऊ नका. जेंव्हा त्या येतात, त्यांना समर्पित करा. हे जाणून घ्या की त्या जाण्यासाठी आलेल्या आहेत. हे जाणून घ्या, आणि आपल्या स्वतःला या सगळ्या गोष्टींपासून वेगळे ठेवा, स्वतःमध्ये आराम करा.
जर आपण ही जागरुकता घेऊन बसलो तर एक दोन तीन प्रयत्नात नाही पण थोड्या वेळाने तरी मन नक्कीच शांत होईल.
प्रश्न : गुरुजी , सत्य आहेच, तर मग त्याच्या प्रमाणीकरणाची गरज काय?
 श्री श्री: पुरावे मागणे हा मनाचा गुणधर्म आहे. भावना पुरावे मागत नाहीत, मन मागते. मनाच्या समाधानासाठी आणि शांतीसाठी पुराव्याची गरज आहे. पण फक्त त्यालाच धरून बसणे हा ही एक अडथळाच आहे. म्हणूनच प्रमाण, विपर्यय,विकल्प, निद्रा, स्म्रीतायः यांना मनाच्या प्रवृत्ती समजले जाते. त्यांना योग हे नियंत्रण आहे. तुम्ही पुरावे नष्ट करू शकत नाही. जोपर्यंत बुद्धी आहे, ती पुरावे मागणारच. आणि त्याला नष्ट करायची गरज नाही. फक्त त्याबद्दल सजग व्हा आणि पुढे चला.
'
योग बुद्धी परतत्त्व सह ', स्व किवा देव हे बुद्धीच्या पलीकडे आहे.
प्रश्न : गुरुजी, मध्यप्रदेशातील मुस्लीम नेत्यांनी सूर्य नमस्काराच्या विरोधात फतवा  काढला आहे. तुम्ही यावर काही बोलाल का?
श्री श्री: बहुतेक ते सूर्याला देव किंवा अल्ला पासून वेगळे समजत असतील. तसे नाही आहे. नमस्कार  म्हणजे काय? आभार मानणें. याचा अर्थ असा काढला पहिजे. सूर्य आणि पृथ्वीचे आभार मानणें. निसर्गातील प्रत्येक गोष्ट, गावा पासून सूर्यापर्यंत जगण्यासाठी आवश्यक आहे. आपण आयुष्यासाठी उपयोगी असलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. तुम्ही सूर्याला देव म्हणालेच पाहिजे असे नाही. तरीपण, सूर्य ती शक्ती आहे जी प्रत्येक गोष्टीला आधार देते, आणि त्या सूर्याला बनवणारा तोच देव आहे. आपण म्हणतो की टेलिफोन किंवा मोबाईलच्या शोधामुळे खूप सोप्पे झाले आहे. आपण फोनचे जेंव्हा आभार मानतो, तेंव्हा आपण त्या वस्तूबद्दल आभार मानत नाही, तर ज्या व्यक्तीने शोध लावला त्याचे आभार मानतो. म्हणूनच आपण म्हणतो, ' सर्व देव नमस्कारं केशवं प्रती गच्छति|]. तुम्ही कुणाचे आभार मानता याने फरक पडत नाही, सर्व आभार एका आणि एकच देवापर्यंत पोचतात
सूर्य नमस्कार  हा आसनांचा संच आहे जो सूर्योदयाचा वेळी करतात, यामुळे रक्ताभिसरण सुधारते, तब्येत चांगली राहते आणि आपण निरोगी राहतो. सूर्य नमस्कारांचे असंख्य फायदे आहेत- हृदय, यकृत, आतडी, पोट, छाती, गळा, पाय. डोक्यापासून नखापर्यंत, शरीराच्या प्रत्येक भागाला सूर्य नमस्कारांचा फायदा होतो. कित्येक मुस्लिमांना सूर्य नमस्कारचे फायदे मिळाले आहेत. जग भर लोक सूर्य नमस्कार घालून त्यांची तब्येत सुधारत आहेत. त्यांची दृष्टी सुधारते आहे. त्यामुळे मुस्लीम लोकांना यापासून वंचित ठेवणे योग्य नाही असे मला वाटते. ज्याने तब्येत सुधारते अशा गोष्टीपासून कुणाला दूर ठेवणे हे योग्य नाही. जगात फक्त एकच देव आहे, हे समजणे गरजेचे आहे, तिथे दुसरे नाही. जेंव्हा दोन नाहीत, पण प्रार्थनेच्या फक्त वेगळ्या पद्धती आहेत. जरी तुम्ही त्याला प्रार्थनेची पद्धत समजत नसाल, तर याला एक शारीरिक व्यायाम म्हणून बघा आणि मला नाही वाटत की ती देवाची निंदा असेल.

प्रश्न : गुरुजी , जर आपण मागच्या जन्मातील कर्मांची फळे आत्ता भोगत असू, तर या जन्मातील कर्मांची फळे कधी मिळणार?
 श्री श्री: ते तसे नाही! आपल्या काही कृत्यांची फळे या जन्मातही मिळतात. मी एक उदाहरण देतो: जर तुम्ही मुग डाळ भिजवलीत, तर २-३ दिवसात कोंब येतात. जर तुम्ही शेंगदाणे पेरलेत तर ३-४ महिने लागतात शेंगदाणे येण्यासाठी. पण जर तुम्ही नारळाचे झाड लावलेत, फळे येण्यासाठी ३-४ वर्षे लागतील आणि आंब्याचे झाड लावलेत तर आणखी वेळ लागेल. त्याच प्रमाणे, काही कर्मांची फळे लगेच मिळतात - जर तुम्ही तुमचा हात आगीवर ठेवलात तर लगेच भाजेल, उद्या नाही. पण डाळिंबाचे झाड शेतात लावलेत, तर फळे यायला काही वेळ लागेल. त्यामुळे काही कर्मांची फळे लगेच मिळतात तर काहींची उशिराने. जर तुम्हाला कारखाना उभारायचा असेल, तर देवालाच माहिती किती वर्ष लागतील. आजकाल परवाना मिळायलाच किती वेळ लागतो. तुम्ही एक कारखाना बांधा आणि दहा परवाने लागतील. यात काही लोकांना लाच पण द्यायला लागते. आपल्यासारखे लोक, जे लाच देत नाहीत. त्यांना वीस वर्ष लागतील परवाना मिळायला. एक माणूस जो अथक श्रमाने कारखाना उभा करत असतो, त्याच्या मुलांना त्याचा कष्टांची फळे मिळतात. त्याच्या आयुष्यात त्याला खरच भागवणे अवघड होते. चांगल्या आणि प्रामाणिक उद्योगपतीचे उद्योग फार कमी वेळा लगेच उभे राहतात. खूप उद्योगांना स्थापित व्हायला अनेक दशके लागतात. दहा, वीस, पन्नास वर्षानंतर त्याची फळे चाखायला मिळतात.

प्रश्न : गुरुजी, नवरा बायकोचे नाते सात जन्मापर्यंत टिकते हे खरे आहे का? जर तसे असेल तर मला या जन्मताच मोक्ष हवा आहे कारण सातव्या जन्मापर्यंत मी खूपच निराश होईन!
श्री श्री: अरे, तुला हे कसे माहित की हा तुझा सातवा जन्म नाही म्हणून! हा सहावा किंवा पहिला असू शकतो. प्रार्थना कर!
तुझा बायकोलाही विचार की ती कसे तोंड देते आहे. तू इतका निराश आहेस, तर तुझ्या साथीदाराला विचार की ती किती निराश किंवा आनंदी आहे. एकाने निराश असणे आणि दुसरा आनंदी असणे, हे अशक्य आहे. दोघेही निराश होतात. जे काही आहे, ते साजरे करा.

प्रश्न : गुरुजी, तुम्ही देव आहात. तुम्ही पण क्रिया करता?
श्री श्री: कधी कधी! जर कुणाला शिकवायचे असेल तर, मला निदान लक्षात तरी असले पाहिजे!

श्री श्री : हो, अगदी पहिल्यांदा, तेंव्हा खूप कमी लोक होते, पन्नास च्या जवळपास. ते सगळे आले आणि अनुभव घेतला.

प्रश्न : गुरुजी, माझे मन दुविधेत आहे आणि अशांत आहे. जेंव्हा डोळ्यांनी तुम्हाला बघायचे असते तेंव्हा तुम्ही डोळे बंद करायला सांगता. इथे येण्या आधी तुम्ही आम्हाला मौनात जायला सांगता आणि आम्ही मौन सोडायचा आधी तुम्ही जायला निघता. आमचा विचार करा गुरुजी, मनाला खूप त्रास होतो.
श्री श्री: तीव्र इच्छा म्हणजेच देव. तीव्र इच्छा असणे चांगले आहे. आणि हे असे आहे की ज्याला काही उत्तर नाही. ते कधीही कमी होत नाही. ही तहान अशी आहे की जी कधी भागवता येणार नाही.

प्रश्न : गुरुजी, तुमच्या आईने तुम्हाला कधी रागावले आहे का? कृपया मला माझा राग कसा आवरायचा ते शिकवा. मी माझ्या आईवर बऱ्याच वेळा रागावतो.
श्री श्री:  हो, माझी आई मला खूप ओरडायची! एक काम करा. रोज जाऊन आईला नमस्कार करा. जरी तुम्ही आज रागावलात तरी उद्या तुम्हाला तसेही नमस्कार करायचाच आहे. जर तुम्ही आईचे पाय धरून तिचे आशीर्वाद मिळवलेत, तर त्या दिवसाचा राग तिथेच वितळून जाईल.

प्रश्न : गुरुजी, जेंव्हा पासून मी आर्ट ऑफ लिव्हिंग साठी जास्त वेळ द्यायला लागलो तेंव्हा पासून माझ्या बायकोला त्याबद्दल जास्तच ईर्ष्या होऊ लागली आहे असे वाटते. यावर उत्तर काय?
श्री श्री: तुम्हाला सायकल कशी चालवायची ते माहित आहे का? त्याचप्रमाणे आयुष्याचे वाहन चालवले पाहिजे. समतोल ठेवा: तुम्हाला जे आवडते ते करा, पण इतरांना आवडते ते पण करा.

प्रश्न : गुरुजी, तुम्ही अष्टावक्र गीता सांगितलीत त्याचप्रमाणे योग वसिष्ठ पण सांगाल का? खूप वेळा मी वाचते त्यातील काही भाग समजायला अवघड जाते.
श्री श्री: हो, तुम्ही वाचत राहिले पाहिजे. योग वसिष्ठ एका वाचण्यात समजणे अवघड आहे. जशी तुमची जागरुकता वाढत जाईल त्याप्रमाणे तुम्हाला जास्तीत जास्त समजत जाईल. त्यामुळे तुम्ही ते सातत्याने वाचले पाहिजे. परत परत वाचल्यामुळे, नवीन कल्पना येऊ लागतात.

श्री श्री: सगळ्यात पहिल्यांदा ही कल्पना तुमचा मनातून मुळापासून काढून टाका. प्रत्येक जागा ही एकमेव आहे. जर कुणी तुम्हाला वर ठेवले असेल तर ते खाली असलेल्यांची मेहनत आहे. ते आधार आहेत. इमारतीमध्ये वरचा मजला तळ मजल्या इतका महत्वाचा नसतो. जर पाया मजबूत असेल तर वर कितीही मजले चढवता येतात. जर तुम्ही वर असाल, तर नम्र असा. ती नम्रता असलीच पाहिजे, तेंव्हा तुम्ही वरती असता. जेवढे वर चढल,  तेवढे तुम्ही नम्र होता. नम्रता हे सफलतेचे लक्षण आहे. आणि जेंव्हा नम्रता असते तेंव्हा अडचणी राहत नाहीत. सर्व काही नैसर्गिकरित्या होत राहते.

प्रश्न : मला नेहमी विस्मय वाटतो की देवाने आपल्याला एवढे गुंतागुंतीचे का बनवले आहे. आपल्याला मन दिले आहे की जे इकडे तिकडे भटकत राहते आणि आपण त्याला काबूत आणतो. आपल्याला काबूत असलेले मन का नाही दिले?
श्री श्री : तुम्ही एवढे आळशी का आहात की तुम्हाला काहीच करायचे नाही? निसर्गाला तुम्हाला काहीतरी बनवायचे आहे, काही जबाबदारी घ्या. हे असे विचारण्यासारखे आहे की, ' तुम्ही जीग्सो कोडे का बनवता? ते तयारच घ्या, एकदमच बसवलेले.'जीग्सो कोडे तुम्हाला खेळण्यासाठी बनवले आहे, त्यापासून काहीतरी बनवण्यासाठी. आयुष्य तसेच आहे. तो एक खेळ आहे. आणि मन हे मोठे खेळाडू आहे.

प्रश्न : गुरुजी, तुम्ही आम्हाला नात्यात कसे असावे हे सांगितले आहे. त्यातून बाहेर कसे यावे हे कृपया सांगा.
श्री श्री : तुम्ही त्यातून बाहेर पडलेलेच आहात. जेंव्हा तुम्हाला त्यातून बाहेर पडायचे असते तेंव्हा ते झालेले आहे! हो की नाही? महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही विश्वाशी नाते जोडा, देवत्वाशी. तुमचे देवाशी नाते असेल, तर तुमचे प्रत्येकाशी नाते आहे. तेंव्हा कुणाशीही नाते जोडायचा किंवा तोडायचा प्रश्नच येत नाही. तोडण्याच्या प्रयत्नात सुद्धा तुम्ही अडकून राहू शकता. जेवढे मन तोडायचा प्रयत्न करते तेवढे ते त्याच्याकडे ओढले जाते आणि त्रास होतो. तुम्हाला राहायाचेही नाही आणि सोडायचेही नाही.
सोडताना काहीतरी हरवल्यासारखे वाटत राहते, आणि राहण्यामध्ये दु:ख्ख  इतके वाढते की ते सहन करणे अवघड होते. तेंव्हा त्या एका बरोबर नाते टिकवणे हे सुरक्षित आहे. याने प्रत्येकाबरोबर तुमचे नाते स्थापित होते.

प्रश्न : गुरुजी, तुम्ही असे म्हणता की आपण या जगात अनेक वेळा एकत्र आलो आणि वेगळे झालो; आम्ही विसरलोय आणि तुम्हाला लक्षात आहे. या वेगळे होण्यात तुम्हाला त्रास नाही झाला?
श्री श्री :  मी तुमच्यापासून वेगळा कुठे आहे? अन्यथा तुम्ही माझे कसे असता? इथे बाहेरचा कुणीही नाही. इथे फक्त मी आणि मीच आहे.

प्रश्न : गुरुजी, माजे अगदी जवळचे मित्र जेव्हा दुसऱ्याना दुषणे देत असतात तेंव्हा मी काय करावे. ते म्हणतात की फक्त एकमेकांना सांगणे आहे, पण मला ते अजून ऐकायचे नाही. काय करू?
श्री श्री  :  कानात बोळे घालून त्यांना ऐका. त्यांना ते सांगायचे आहे कारण त्याने हलके वाटते. ते त्यांना करू देत. तुम्ही ते अजिबात घेऊ नका. हे महत्वाचे आहे.
प्रश्न : गुरुजी, तुम्ही सगळ्यांवर प्रेम करता. तरी मला असे का वाटते की तुम्ही माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम करता?
श्री श्री :  ते एक गुपित आहे. कुणाला सांगू नका! हे खरे आहे, पण सगळ्यांना सांगण्यासाठी ते नाही! एक पूर्ण सत्य!

प्रश्न : गुरुजी, मी एका मुलीवर प्रेम करतो जिला माझ्या प्रेमाचा पुरावा महागड्या भेटवस्तूतून हवा आहे. तुम्ही म्हणता की प्रेम फुकट आहे, पण हे माझ्यासाठी खूपच महाग ठरते आहे!
श्री श्री ये मुला, धडा शिक! प्रेम आणि मैत्री काय आहे हे तू काही दिवसात शिकशील, जसा तू मोठा होशील. तू किती त्याग करू शकतो हे ती कदाचित पारखून पाहत असेल. प्रेम त्याग मागते. तू किती कंजूस किंवा उदार आहेस हे तिला पहायचे असेल. खरा प्रेमी कधीच लालची नसतो. प्रेमी आनंदी, शांत आणि उदार असतो. पण याचा अर्थ असा नाही की आहे ते सगळे उडवावे. तुमचा विवेक वापरा.

प्रश्न : (ऐकू नाही आला)
श्री श्री : तुम्ही विचारात आहात आणि मी काय सांगितले ते ऐकत पण आहात. जर तुमच्या मध्ये चेतना नसती तर तुम्ही प्रश्न कसे विचारले असते?
तुम्ही पहिले, ऐकले किंवा समजले कसे असते? जे तुमच्या आतून ऐकत आहे, समजते आहे, पाहत आहे, अनुभवत आहे ते म्हणजे चित्त. मन, स्मृती, बुद्धी, अहं, शरीर, प्राण यांचे मुख्य उर्जास्रोत;शक्तीचा झरा जो स्वतःच चेतना आहे. जे आहे तच सत्य आहे. तुम्ही आहात, बरोबर? इमारत आहे? इमारत सत्य आहे. पण ते खांब जे बोलले जात आहे ते ऐकत आहेत असे वाटत नाही म्हणून इमारतीमध्ये चेतना नाही. आपण तसे म्हणू शकत नाही, कारण प्रत्येकामध्ये ती थोडीफार असतेच; ती दगडातही असते. पण तुमच्यामध्ये ती जास्त स्पष्ट आहे. जरी झाडे ऐकत असली तरी झाडांमध्ये ती थोडी कमी जाणवते. पण तुमच्यामध्ये ती चेतना जास्त मोठी आहे. जेंव्हा ती चेतना परम आनंदात बदलते, तो परमात्मा असतो. विश्वात एकच सत्य आहे. चेतनेमध्ये जीवन आणि विश्व दोन्हीही असतात. आणि देवामध्ये सत्य, चेतना आणि परम आनंद हे तीनही असतात. आणि आनंद आपल्यामध्ये लपून बसला आहे. साधनेने हा आनंद वाढतो. देव तुमच्यामध्ये लपलेला आहे, झोपला आहे - त्याला जागे करा.
त्यालाच जागरण म्हणतात. मातेला, तुमच्या आतील देवीला जागे करा!
शिवजी आत बसले आहेत, त्यांना जागे करा. श्रीहरी आत बसले आहेत, त्यांना जागे करा.

प्रश्न : गुरुजी, अध्यात्माच्या मार्गावर वैराग्य आणि जोश यातील कुठला मार्ग योग्य आहे
श्री श्री: दोन्हीही महत्वाचे आहे. म्हणूनच श्री कृष्णाने अर्जुनामध्ये ' पहा लोक काय म्हणतील? ते म्हणतील की हा किती भित्रा आहे'. असे म्हणून उत्साह जागवला. 'अपमानाचे जगणे काय उपयोगाचे; त्यापेक्षा मेलेले चांगले'.नंतर ते म्हणाले, ' क्षत्रीयासाठी असे बसून राहणे योग्य आहे का? एका बाजूला तू रडतो आहेस आणि दुसऱ्या बाजूला तू उच्च शिक्षित माणसाप्रमाणे बोलत आहेस. कुणीही धर्माबद्दल बोलताना असे कापते का?'भगवान कृष्ण पुढे म्हणाले, ' तू कशा प्रकारचा माणूस आहेस? मी तुला धाडसी आणि शूरवीर समजलो. आणि तू असा वागतो आहेस? तू म्हणतोस की तुला हे नको!'अशा टोमण्यांना वापरून भगवान श्री कृष्णाने अर्जुनामधील जोश जागृत केला. नंतर भगवान कृष्ण पुढे म्हणतात, ' हे सगळे काहीच नाही.'अनित्यं असुखम लोकं' - हे जग अस्थिर आहे, हे राहत नाही. सर्वकाही नाशाकडे चालले आहे. या जगाकडून काहीही अपेक्षा ठेवू नकोस.'हे सर्व सांगून भगवान कृष्णाने अर्जुनाला हळू हळू वैराग्यात आणले. त्याने उत्साह आणि वैराग्य दोन्हीही जागवले, आणि मग म्हणाले, ' आता जा आणि लढ.' त्यांनी अर्जुनामध्ये किती योग्य मनोभाव निर्माण केला. उत्साहामध्ये काम करण्याचा जोश असतो - तो वैराग्याबरोबर जोडून, जो मार्ग दाखवला तो अद्भुत आणि एकमेव आहे!

प्रश्न : गुरुजी, ज्यांना या जन्मात गुरु मिळाला, आणि काही करणामुळे त्यांना मुक्ती मिळणे शक्य नसेल, तर त्यांना पुढच्या जन्मात गुरु मिळतो की ते असेच लक्ष्यहीन भटकत राहतील?
श्री श्री  :  नाही, नाही! अर्जुनाने हाच प्रश्न विचारला, जर मी योगाचा मार्ग या जन्मात अनुसरु शकलो नाही तर काय?'तर कृष्ण उत्तरले, ‘नही कल्याण  करीत कश्चित दुर्गतिं तातं गच्छति - जो महान कार्य करतो तो या जन्मात किंवा पुढच्या जन्मात खाली कधीच जाणार नाही, कधीच दु:ख्खी राहणार नाही. तुम्ही अस्तित्वाच्या वरच्या पातळ्यांवरच नेहमी चढाल. तू महान आणि श्रीमंत कुटुंबात जन्म घेशील, आणि पूर्व जन्मीच्या कृतींचा स्मृतीवरून तू जिथे सोडलेस तिथून पुढे चालू लागशील. तर काळजी करू नका. तुमची क्रिया आणि साधना वाया जात नाही.
टिप्पणी : गुरुजी, स्वप्नात मी स्वर्ग बघितला, आणि मला असे वाटायचे की पृथ्वी सोडल्यावर मी स्वर्गात जाईन. पण आश्रमात येईपर्यंत मला पृथ्वीवरच स्वर्ग सापडेल अशी अपेक्षा नव्हती.
श्री श्री  अगदी बरोबर! संतुष्ट राहा. हे स्वर्गापेक्षाही चांगले आहे. असे म्हणतात की सगळे असले तरी, स्वर्गामध्ये प्रेम नाही. इथे प्रेम आणि ज्ञान दोन्ही आहे



The Art of living
© The Art of Living Foundation