ओगस्ट  १४
श्री श्रीं बरोबर च्या सत्संगामधून

प्रश्न: गुरुजी  मी पहिल्यांदा आश्रमामध्ये येत आहे आणि येथे येऊन मला खूप आनंद होत आहे. मला अस वाटत कि तुम्हीच मला येथे घेऊन आला आहात. आपण आपल्या सार्वजनिक दैनंदिन जीवनामध्ये काही चांगल्या आणि काही वाईट गोष्टीना सामोरे जात असतो आणि काही वेळा आपण या मार्गावरून बाजूला हटतो. मी दररोज ध्यान, योग व प्राणायाम करतो. मी जेव्हा एकांतामध्ये असतो तेव्हा स्वतःकडे पाहायला व सात्विक गुण आत्मसात करण्यासाठी खूप सोपे जाते. सर्वांतर्फे माझा एक प्रश्न आहे कि जीवनामध्ये चांगल्या व वाईट गोष्टींचा सामना करीत असता सात्विक गुण, पवित्रता अंगी कशा जोपासायच्या?
श्री श्री : याबद्दलची जागरुकताच ती घेऊन येयील.ध्यान करा, सुदर्शन क्रिया करा सत्संगला जा आणि चांगल्या लोकांच्या संगती मध्ये राहा. ते सर्व घडेल. 


प्रश्न: गुरुजी गुरु आणि सत्गुरू यामधील फरक काय?
श्री श्री: सत हे फक्त गुरूच्या आधी जोडले गेले आहे. दोन्ही मध्ये काही फरक नाही. ते फक्त एक नाव आहे, दोन्ही एकच आणि सारखे आहेत. 


प्रश्न: भगवत्गीतेमध्ये धर्म आचरत असताना ४ पायऱ्या सांगितल्या आहेत. सत्य, नियमांचे पालन, सात्विकता, दया. मी शेतकीय विभागामध्ये सुपर्वाझेर म्हणून कामाची देखरेख करीत असताना माझ्या खालच्या सहकार्यांवर मी कामाच्या तणावामुळे (औद्योगिक क्षमता आणि उत्पादन वाढवण्यामुळे) दया दाखवू शकत नाही. 
श्री श्री: जे दुखी: आहेत त्यांचाशी दया दाखवावी, पण जे उद्धट आणि काम चुकारपणा करतात त्यांचाशी कडक वागले पाहिजे कुणाचा प्रामाणिकपणा न दुखावता.मित्रता, दया, सुख, उदासीनता:या चार गुणांपैकी :एक उच्च ध्येय्य गाठण्यासाठी सर्वजण एक करू शकता, उदासीनतेचा अभ्यास करायची जरुरी आहे किवा व्यवस्थित समजण्याची गरज आहे. . 

प्रश्न: गुरुजी मी एस प्लस केला आहे. मी दोन वर्षानंतर आश्रमामध्ये येत आहे आणि मी इथे काही दिवसांपासून आहे, मला आता आश्रम सोडून जावेसे वाटत नाही. मी माझ्या घरच्या जबाबदाऱ्या आणि इथे रहायची इच्छा यामध्ये साधर्म्य कसे साधू?
श्री श्री: दोन्ही कर. तुला दोन्न्हींची घरच्या जबाबदाऱ्या आणि इथे राहून सेवा करायची इच्छा यांची सांगड आणि काळजी  घेता आली पाहिजे.




The Art of living