नवरात्री : स्रोतापर्यंतचा प्रवास

नवरात्रीचा सण प्रार्थना आणि आनंदाने अश्विन आणि चित्र महिन्याच्या सुरुवातीला साजरा केल्या जातो. हा अवधी  स्वतःला समजण्याची आणि स्वतःकडे परतायची वेळ आहे. ही परिवर्तनाची वेळ आहे, प्रकृती जुने टाकून नवे धारण करते, प्राणी शीतनिद्रेत जातात आणि वसंतामध्ये नवीन जीवन सुरु होते.


वैदिक शास्त्राप्रमाणे, गोष्ट वारंवार निर्माण होण्यासाठी आपल्या मूळ आकारात जाते. ही रचना एकरेषीय नाही तर चक्रीय आहे. सर्व काही पुनर्निर्माण होत असते, कायापालटाची एक निरंतर प्रक्रिया. तरीपण, मानवी मन या निरंतर चक्राहून मागे पडते आहे. नवरात्री हा मन पुन्हा सोत्राकडे मागे नेण्याचा उत्सव आहे.
शक्ती माता ही फक्त बुद्धीदेवता नाही तर भ्रांतीदेवता म्हणूनही ओळखली जाते; ती नुसतीच लक्ष्मीदेवता नाही तर क्षुधादेवता (भूक) आणि तृष्णादेवता (तहान) पण आहे. सृष्टीच्या या रचनेत शक्तीचे हे रूप जो जाणतो तो सखोल समाधी अवस्थेत जातो. हे जुन्या पश्चिमेतील धार्मिक संघर्षाला उत्तर आहे.  ज्ञानाद्वारे, निष्काम कर्माद्वारे आणि समर्पणाद्वारे अद्द्वैत सिद्धी प्राप्त केली जाऊ शकते. 
काली ही प्रकृतीची सगळ्यात भयानक अभिव्यक्ती आहे. प्रकृती हे सुंदरतेचे प्रतिक आहे, तरीपण त्याचं भयंकर स्वरूप आहे. दोन विरुद्ध गोष्टींचा स्वीकार करताना मनात पूर्ण स्वीकृती येते आणि मन शांत ठेवते.  

नवरात्री हा वाईटावर चांगल्याचा विजय साजरा करणारा सण म्हणून जरी साजरा केला जात असला तरी, मूळ लढाई ही वाईट आणि चांगल्याची नाही. वैदिक दृष्टीकोनातून बघितले गेले तर, संपूर्ण सत्याचा स्पष्ट द्वंद्वावर विजय आहे. अष्टावक्राच्या शब्दात सांगायचे तर एका छोट्या लाटेचा समुद्रापासून आपली ओळख लपवण्याचा हा प्रयत्न आहे, पण काही फायदा नाही. 

तीन बीजभूत गुणांना आपल्या भव्य ब्रम्हांडाची स्त्री शक्ती मानले जाते. नवरात्री दरम्यान देवीची पूजा केल्याने, तीन गुणांचे संतुलन होते आणि वातावरणातील सत्व वाढते. 

हा आत नेणारा प्रवास आपल्या नकारात्मक कर्मांना नष्ट करतो. नवरात्री हा उत्सव आहे भाव आणि प्राणाचा जो एकटाच महिषासुर (जडता), शुंभ - निशुम्भ (गर्व आणि लज्जा) आणि मधु - कैटभ (तृष्णा आणि घृणा चे तीव्र रूप) यांना नष्ट करू शकतो. ते पूर्णपणे एकमेकांच्या विरुद्ध असले तरी परस्परपूरक आहेत. जडता, आत खोलवर असलेली नकारात्मकता, आग्रह (रक्ताबीजासुर), अनुचित तर्क (चंड - मुंड), आणि नीट पाहू न शकणारी दृष्टी (धूम्रलोचन) या सगळ्यावर मात करायला जीवन शक्ती उर्जा, प्राण आणि शक्ती वाढवायला लागेल. 

साधक उपवास, प्रार्थना, मौन आणि ध्यान या द्वारे खऱ्या स्रोत्राकडे परतू शकतो. रात्र म्हणतात कारण ती नवीन जीवन आणते. हे आपल्या अ अस्तित्वाच्या तीन स्तरावर समाधान देते - शारीरिक, सूक्ष्म,आणि कारण. उपवास शरीरातील दुषित द्रव्य काढतो, मौन वाचा शुद्ध करतो आणि अशांत मनाला शांत करतो, आणि ध्यान स्वत्वात नेतो.

ज्या तीन बीजभूत गुणांपासून ब्रह्मांड बनले आहे त्या गुणांना वाढवण्यासाठी नवरात्रीचे नऊ दिवस संधी आहे. जरी आपल्या आयुष्यावर तीन गुणांचा प्रभाव आहे, तरी आपण त्यांवर क्वचितच ओळखतो किंवा विचार करतो. नवरात्रीचे पहिले तीन दिवस तमोगुण म्हणून  संबोधले जातात, पुढचे तीन दिवस रजोगुण आणि शेवटचे तीन दिवस सत्त्वगुण. आपली चेतना तमो आणि रजो गुणा द्वारे  प्रवास करते आणि शेवटच्या तीन दिवसात सत्वगुणाद्वारे  बहरते. जेव्हा हे सत्व आयुष्यात वाढते तेंव्हा साहजिकच विजय होतो. दहाव्या दिवशी ह्या ज्ञानाचे सार विजयादशमी म्हणून सन्मानिले जाते आणि साजरी केले जाते.

जरी संसाराचे सूक्ष्म दर्शन या विश्वातच आहे, त्याचा मानलेला वेगळेपणा हाच वादाचे कारण आहे. ज्ञानी व्यक्तीसाठी, पूर्ण जगताची निर्मिती सजीव आहे आणि ज्या प्रमाणे लहान मुले सगळ्यात जीवन बघतात त्याचप्रमाणे तो सगळ्यातच जीवन बघतो. पृथ्वी माता किंवा शुद्ध चेतना यांनीच स्वतः सगळी  रूपे आणि सगळी नावे व्याप्त केली आहेत. प्रत्येक रुपात आणि नावात देवत्व ओळखणे हाच नवरात्रीचा उत्सव आहे. म्हणूनच, जीव आणि प्रकृतीच्या सगळ्या पैलूंचा सन्मान करणाऱ्या विशेष पूजा शेवटच्या तीन दिवसात साकारल्या जातात.

The Art of living