" मान्य करा की तुम्ही आपल्या क्षमतांपासून अनभिज्ञ आहात"

बुधवार, ऑगस्ट, २०१०
प्रश्न : आपण आपल्या सत्संगात आलेल्या लोकांना काय म्हणायचे जे विविध गुरूंचे ज्ञान घेऊन येतात?
श्री श्री रविशंकर: ऐका आणि जाऊ द्या. त्यांच्या सोबत चर्चा करण्यात गुंतू नका. प्रत्येकाला आपले मत मांडू  द्या. महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतः चिंतन करणे.


प्रश्न : काम आणि आयुष्य यात संतुलन कसे साधायचे?
श्री श्री रविशंकर: तुम्ही सायकलवर कसे संतुलन साधता? तिथे "कसे" हे नसते. तुम्ही फक्त करा.


प्रश्न : मी ध्यानाचा "सगळे  ठीक आहे" हा अनुभव, ध्यानातून मिळणारी शांती कशी टिकवून ठेवू शकतो?
श्री श्री रविशंकर: तुम्ही रात्री कसे झोपता? तुम्ही सगळा सोडून देता.तुम्ही जेव्हा उठता तेव्हा ताजे तवाने असता आणि तुमच्यात परिस्थितीचा सामना करण्यासाठी उर्जा आणि गतिशीलता येते, तसेच ध्यानासोबत पण आहे. तुम्ही जर ध्यान केले नाही तर याच्या विपरीत अनुभव येईल.


प्रश्न : मी जेंव्हा अडचणीतून जातो तेंव्हा मी परिस्थितीचा शिकार होत आहे या भावनेच्या चक्रातून कसे बाहेर पडू? 
श्री श्री रविशंकर: जेंव्हा तुम्हाला हे लक्षात आले त्याच क्षणी तुम्ही त्या चक्रातून बाहेर पडला आहात.  तुम्हाला हे जाणवत आहे की हे मनाचे खेळ आहेत आणि हे पुन्हा पुन्हा होत राहणार आहे. ही जाणीव तुम्हाला काळासोबत येईल.आणि हे जेव्हा होईल, तेव्हा आनंदी आणि कृतज्ञ राहा. कल्पना करा तुम्ही ५ -१० वर्षांपूर्वी कुठे होता. तुम्ही किती बदलला? तेव्हा पासून आता परिस्थिती किती बरी झाली आहे. तुमचं लक्ष यावर केंद्रित करा. जितके आपण कृतज्ञ होऊ तितकी आयुष्यात कृपा राहील.
मजेची पहिली पायरी ही आराम करणे आहे. तुम्हाला उद्याची चिंता आणि महत्वाकांक्षा थकवत आहेत. कालचा क्रोध आणि घृणा मनात अडकून राहत आहेत. त्याच प्रकारे बेचैनी उत्साह कमी करते. दीर्घ विश्रांतीमध्ये तुम्हाला सगळे मजेशीर वाटत राहील.


प्रश्न : मी जास्त शिस्तबद्ध कसा होऊ शकतो?
श्री श्री रविशंकर: तुम्हाला शिस्तबद्ध का व्हायचे आहे? तुम्ही आनंदी राहाल? हे तुमची योग्यता वाढवेल? तुमचे आकारात राहण्याचे प्रेम किंवा आजारी पडण्याची भीती तुम्हाला शिस्तबद्ध  ठेवेल. प्रेम, भीती, आणि लोभ शिस्त  लावतो. जर कुणी तुम्हाला म्हणाले की आयुष्यात शिस्तीत राहण्यासाठी तुम्हाला १ करोड मिळतील तर तुम्ही तसे नक्की कराल.


प्रश्न : मी तुमची उपस्थिती आपल्या दैनंदिन आयुष्यात कशी अनुभवू शकतो?
श्री श्री रविशंकर:तुम्ही अगोदरच अनुभवता आहे ना?


प्रश्न : आपल्या प्रिय व्यक्तीच्या जाण्याचे नुकसान कसे सहन करावे?
श्री श्री रविशंकर: जेव्हा प्रिय व्यक्ती  जाते तेव्हा सहन करा. त्या क्षणासोबत राहा. कालच तुम्हाला त्या यातनांमधून बाहेर काढेल. त्यासाठी तुम्ही काही "करू" शकत नाही. ज्ञानात राहा.


प्रश्न: कलेचा काही उच्च उद्देश आहे का?
श्री श्री रविशंकर: कलेला काही उद्देश नाही. ती आनंदाची अभिव्यक्ती आहे. दर्शकासाठी कला सांत्वना आणि आराम देते. निर्मात्यासाठी ही एक अभिव्यक्ती आहे.


प्रश्न: मला जेव्हा काही मिळवायचे असते तेंव्हा मला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मी काय करू?
श्री श्री रविशंकर: जे तुमच्या मनात असते तेच प्रकट होते. तुम्ही स्वतःला काहीही छाप देऊ नका.त्याची गरज नाही. मान्य करा की तुम्ही स्वतःच्या गुणांना ओळखत नाही. तुम्ही नेहमी अडचणीत असता असा विचार करत असाल, पण असा विचार करणे तुम्हाला नकारात्मक दिशेकडे घेऊन जाइल. फक्त हे जाणून घ्या की तुम्हाला जे हवे आहे ते नक्की होईल.


प्रश्न: कष्ट आणि क्रोध या पासून कसे मुक्त व्हावे?
श्री श्री रविशंकर : सुदर्शन क्रिया करा, श्वास घ्या, ध्यान करा, गा. आयुष्यात थांबण्यामध्ये काही अर्थ नाही, चालत राहा. काल काय घडले यासाठी आजचा दिवस वाया घालवू नका. जागे व्हा आणि म्हणा, " या सगळ्यावर मात  करण्यासाठी मी शूर आणि धैर्यवान आहे." दुसर्यांच्या क्रोधासाठी, त्यांना शांत करायला सगळ्या  युक्त्या करायला हव्यात. मग देवावर सोडा. शिकवा आणि दुर्लक्ष करा. त्यांना काही वेळ द्या. क्षमा मग आणि लोक घृणा करणार  नाही. ते करतात ते केवळ अजाणतेपणी.


प्रश्न: आपल्याला गरजेपेक्षा जास्त मिळालेले आहे असे जाणवले तर कसे होईल आणि ते गमावण्याची भीती वाटत असेल तर?
श्री श्री रविशंकर : कृतज्ञ आणि प्रार्थनेत राहा. हे जाणून घ्या की ज्याने तुम्हाला हे दिले आहे त्याला तुमची काळजी आहे आणि ते परत घेऊन नाही जाणार. सेवा करा. तुम्ही या समाजाला परत काय देउ शकता यावर तुमचे लक्ष केंद्रित करा. हे देवाला परत देण्यासारखे झाले. नकारात्मक विचारांनी असुरक्षितता, शंका मनात येतात, ओम नमः शिवायचा जप करा. तेच तुम्हाला सरळ मार्गावर ठेवेल. भूतकाळाला आपले नशीब माना आणि भविष्यकाळाला मुक्त इच्छा. जे घडायचे आहे ते घडणार आहे. आपण अगदी उलटे करतो. जे मूर्ख लोक असतात ते भूतकाळाला इच्छा समजतात आणि भविष्याला नशीब. यामुळे तुमचे वर्तमानकाळ दुखी बनते.
ओम नमःशिवाय कित्येक हजारो वर्षांपासून आहे. पाच तत्व या मंत्राने संबोधित केली जातात आणि मंत्रातला प्रत्येक स्वर त्या पाच तत्वांना संबोधतो. उदारणार्थ, ओम ही जीवन शक्ती किंवा दैवीशक्ती आहे. जपाने अंतरात्म्याला उर्जा मिळते. हे खूप शक्तिशाली आहे आणि ह्याचा जप रोज करायला हवा. हे नैराश्य दूर करते. हे करून बघा. तुम्हाला जेंव्हाही उदास वाटते तेव्हा ओम नमः शिवाय म्हणले की नकारात्मकता दूर होते.


प्रश्न:तुमचा पालकांना काय सल्ला आहे?
श्री श्री रविशंकर: घोडेस्वारी जमली पाहिजे! जेव्हा तुम्ही घोड्याच्या पाठीवर बसता, त्यासोबत पुढे जायला हव.तुम्हाला घोड्याच्या हालचाली सोबत तुम्हालाही हालचाल करावी लागते नाही तर पाठीला त्रास होतो. पालकांना घोडेस्वारी सारखीच कसरत करावी लागेल. कधी मुलांसाठी कडक व्हावे लागेल कधी सैल सोडावे लागेल. ज्याप्रमाणे लगाम कधी खेचावे लागतात कधी सोडावे लागतात त्याचप्रमाणे हे आहे. मुलांना जाणून घ्या आणि हळू हळू मार्गदर्शन करा.  कधी कधी शिस्त दाखवावी कधी कधी  मोकळीक ही द्यावी.


प्रश्न: तुम्ही मला सांगाल माझ्यासाठी योग्य व्यवसाय काय आहे?
श्री श्री रविशंकर:याची निवड मी तुमच्यावर सोडतो आणि आशीर्वाद देतो.


प्रश्न: मी आयुष्यातील नकारात्मक चाक्रांमधून कसे बाहेर पडू?
श्री श्री रविशंकर: तुम्हाला एकदा ती चक्रे लक्षात आली की तुम्ही तेंव्हाच त्यातून बाहेर पडलेले असता.


प्रश्न: तुम्ही म्हणता की निवड आमची आणि आशीर्वाद तुमचे. मला कसे समजेल की मी योग्य निवड केली आहे?
श्री श्री रविशंकर: वेळ सांगेल. पण ते आशीर्वादासोबत आले असेल तर ते जास्त चांगले असेल.


प्रश्न: मी स्वतःमध्ये शक्ती कशी शोधू?
श्री श्री रविशंकर: आराम करा आणि तुमचं मन योग्य जागी असू द्या.तुम्हाला शारीरिक आणि मानसिक आरामाची गरज आहे. तुम्ही जर विचार केला की "मी खूप काम केले आहे" तर ते कंटाळवाणे ठरेल.फक्त जाणून घ्या की जे करण्यासाठी तुमचा जन्म झाला आहे ते करण्यासाठी तुम्हाला पुरेसा वेळ आणि उर्जा मिळेल.
The Art of living