बोले तैसा चाले

30
2014
Aug
दिल्ली, भारत
 


(जामिया मिलिया इस्लामिया यांनी ‘द आउटरीच प्रोग्राम’ मध्ये श्री श्री रविशंकर 
यांचे व्याख्यान आयोजित केले होते. श्री श्री त्यांच्या व्याख्यानात, जागतिक शांतता, 
आणि वैश्विक सुसंवाद याबद्दल बोलले. त्यानंतर ध्यान घेण्यात आले. त्यानंतर जामिया 
मिलिया इस्लामिया मधील शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसह ४०० हून अधिक 
संख्येने जजर असलेया प्रेक्षकांनी प्रश्नोत्तराच्या सत्रात श्री श्रींशी संवाद साधला.) 
इथे व्यासपीठावर पुष्पगुच्छ देऊन माझे स्वागत केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद. 
या तुमच्या छानशा कृतीतून तुम्ही, मला तुम्हाला जे सांगायचे होते ते तुम्ही सर्वांनी 
आधीच सांगून टाकले आहे. 
  
या पुष्पगुच्छाप्रमाणेच आपला वैश्विक समाजही एक गुच्छ आहे. ज्यात लाल फूल आहे, 
पांढरे फूल आहे, कार्नेशनचे फूल आहे वगैरे. तर, पुष्पगुच्छ हा अनेक रंगछटा 
असलेल्या विविध प्रकारच्या फुलांनी बनवलेला असतो. आपण जेव्हा हे विसरतो 
आणि सर्व फुले एकाच रंगाची असावी अशी अपेक्षा करतो तेव्हाच मग समस्येला 
सुरवात होते.   
जागतिक शांतता प्रस्थापित होणासाठी आधी व्यक्ती शांत असायला हवी. जर मी शांत 
नसेन तर मी जाईन तिथे शांती पसरवू शकणार नाही. आणि व्यक्ती शांत कधी होईल ? 
तर जेव्हा तो किंवा ती पूर्णपणे तणावमुक्त असेल तेव्हाच. 

आज प्रत्येक घरात हेच दृश्य असते. समजा एका घरात पाच किंवा दहा लोक एकत्र 
रहात असतील तर प्रत्येक जण आपल्याच दुनियेत असते. (विचार आणि श्रद्धा) जर 
त्यांच्यात काही संवाद घडत नसेल त्यांच्या समविचार नसेल तर मग अशावेळी भांडणे 
सुरु होतात . 
 
आजच्या चर्चापिठाचा विषय आहे, जागतिक शांतता.मी तुम्हाला सांगतो, जागतिक 
शांतता प्रस्थापित होण्यासाठी, व्यक्ती शांत असली पाहिजे. जर मी शांत नसलो तर 
मी जिथे जाईन तिथे संती कशी पसरवू शकेन ? आणि एखादी व्यक्ती शांत कशी होऊ 
शकेल ? जेव्हा ती किंवा तो तणावमुक्त असेल तेव्हाच. जेव्हा आपण स्वत:च आतून 
खूश, शांत नाही आहोत तेव्हा आपण इतरांशी संपर्क करून ती खुशी कशी पसरवणार ? 

आपल्यात शांती रुजवण्यासाठी आपल्याला काय करायला हवे ? 
सर्वात प्रथम आपल्याला तणावमुक्त जीवन जगण्याची गरज आहे. आपल्या आयुष्यात 
तणाव निर्माण होणे सहाजिक आहे. तणाव म्हणजे काय आणि आपल्याला तो कधी 
जाणवतो ? जेव्हा आपल्या अगदी कमी वेळात खूप काही करायचे असते आणि ते 
करण्याची आपल्यात शक्ती नाहिये असे लक्षात येते, तेव्हा आपल्याला तणाव जाणवतो. 

तुम्ही तुमचे तणाव कमी करण्यासाठी, तुमच्या जीवनातल्या गरजा आणि जबाबदाऱ्या 
कमी करू शकता. किंवा दुसरा मार्ग म्हणजे तुम्ही तुमची शक्ती वाढवू शकता. मी 
शक्ती म्हणतोय ती केवळ शारीरिक शक्ती नाही तर मानसिक आणि भावनिक दृष्ट्या 
शक्तिशाली बनणे. त्यामुळे आपण आपली शक्ती आणि ऊर्जा कशी वाढवू शकतो 
याचा विचार करायला हवा.  
आपली उर्जाशक्ती आतून वाढवण्याची अनेक तंत्रे आहेत. पण या देशात या तंत्रांचा 
उपयोग करणारे फारसे लोक नाहीयेत आणि दुर्दैवाने ते याबद्दल दुसऱ्या कुणाला सांगत 
नाहीत. भारतात जात, धर्माच्या तत्वांवर इतका जास्त  भेद भाव आहे. आपल्या 
कुटुंबात देखील आपल्या आकांक्षा आणि ध्येय यांच्यामुळे आपल्यात भेद भाव होतात. 
लोक म्हणतात की , ‘मी हे तंत्र कुणालाही शिकावार नाही.’ हे बरोबर नाही. असा 
विचार कां कारावा ? खरं तर तुम्ही ही तंत्रे सर्वांना शिकवायला हवी. जर या तंत्रांमुळे 
तुमची तब्येत सुधारत असेल आणि तुमचा तणाव नाहीसा होत असेल तर तुम्ही ती 
इतरांनाही शिकवून मदत करायला हवी. आपण मात्र ते इतरांना न शिकवता गुपित 
ठेवतो.   
मला वाटते हे असे नसावे. मी म्हणतो की ज्या तंत्रांमुळे तब्येत सुधारते आणि 
छान वाटते ती सर्वांना शिकवायला हवी. जसे प्राणायाम, काही व्यायाम प्रकार आणि 
योगासने. जगातील सर्वांना या तंत्रांचे फायदे समजले पाहिजेत. जेणे करून सर्वसामान्य 
माणूस शांत आणि आनंदी राहील आणि त्याच्या भोवतालच्या माणसांशी चांगले संबध
ठेऊ शकेल. याच विचाराने आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग ही संस्था चालू केली.  
जोपर्यंत आपल्याला आतून शांत वाटत नाही तोपर्यंत आपण बाहेरून शांत राहून 
सुसंवाद साधू शकणार नाही आणि जागतिक शांतता निर्माण होणार नाही आणि 
व्यक्तिगत जीवनात प्रगतीही साधता येणार नाही. आता शांती निर्माण करण्यासाठी 
सर्वाच्या मेहनतीची गरज आहे. त्यासाठी जे काही थोडे फार करता येईल ते प्रत्येकाने 
करायला हवे.   
भारतात आपण नेहमी म्हणतो, ‘वसुधैव कुटुंबकम्’ म्हणजे हे संपूर्ण जग म्हणजे 
माझे कुटुंब आहे. पण खरोखरच आपले एक कुटुंब कधी होऊ शकेल ? हे तेव्हाच 
शक्य होईल जेव्हा आपण ज्ञानात राहू, जेव्हा प्रत्येक जण शांती अनुभवत असेल 
आणि जेव्हा आपण प्रेमाने सर्वांना जवळ घेऊ शकू. 
आपण जे सांगतो आणि जे करतो त्यात फरक असता कामा नये. आपल्या 
अंतर्मनाला जे वाटते तसेच वागायला हवे. त्यामुळे अंतर्शक्ती मिळते. ही शक्ती 
असणे ही मोठी गोष्ट आहे आणि तिचा उपयोग करुन आपण जीवनात  यशाकडे 
वाटचाल करू शकतो. 
आता मी हे बोलत असताना तुम्ही ऐकताय आणि तुमच्या मनात सत् वाद चालू 
आहे की, ‘ हां, हे असे असू शकेल’, ‘नाही हे बरोबर नाही’. तुमच्यातही एक 
संभाषण चालू असते, हो की नाही ? हे खूप महत्वाचे आहे आणि आपल्याला 
त्याची जाणीव व्हायला हवी. 
मी सांगतो आहे ते तुम्हला पटते आहे की नाही हे महत्वाचे नाही. पण तुमचे 
मन सांगते आहे ते तुम्हाला पट्टे आहे नां ? हा मुद्दा विशेष आहे. यालाच सजगता 
म्हणतात. त्याला आपण प्रज्ञा असेही म्हणतो. म्हणजेच जागृत बुद्धी. म्हणजे, 
आपल्या आत काय चालले आहे त्याचे आपण सजगतेने निरीक्षण करतो.  
माझ्या मते शिक्षणाचा खरा हेतू प्रज्ञा म्हणजेच सजगता वाढवणे हाच आहे. 
शिक्षण म्हणजे केवळ जास्तीत जास्त माहिती जमवणे इतकेच नाही. ते तर संगणकही 
करू शकतो. शिक्षण म्हणजे माणसाला माणूसकी असलेला कसे बनवायचे याची 
कला आहे. शिक्षण म्हणजे एकमेकाबरोबर खेळीमेळीने रहाणे आणि एकमेकातील 
संघर्षावर प्रगल्भ आणि अहिंसक मार्गाने, सर्वांना फायदेशीर होईल असा मार्ग 
काढून ते मिटवणे.  

जरा विचार करा, आज जागा सगळीकडे किती कलह आणि अशांतता आहे. 
गाझा, इराक, सिरीय वगैरे ठिकाणी काय चालले आहे बघा. भारतातील पत्रकार 
या घटनांबद्दल जास्त काही प्रसिद्ध करत नाहिये ते बरे आहे. पण तुम्ही जागतिक 
वृत्तवाहिनी वर बघितले तर या सर्व बातम्या असतात आणि त्यां पाहून तुम्ही 
बेचैन व्हाल. 

पैगंबर महंमदाने एकदा म्हटले होते की, ‘ मला पूर्वेकडून (भारत) येणारा गार 
वारा जाणवतो आहे.’ मी हे कार्य हाती घेतले आहे की युध्द आणि संघर्षाच्या 
गरम वार्यापेक्षा, पूर्वेकडून नेहमीच गार वाऱ्याचा ( शांती आणि सुसंवाद) झोत 
येत राहील. त्यांनी हे १४०० वर्षांपूर्वी म्हटले होते. पण मी आजही ही स्थिती 
टिकवण्यास वचनबद्ध आहे. 

भारत हा एक अनुकरण करण्यायोग्य असा आदर्श देश म्हणून जगापुढे यायला 
हवा. निरनिराळ्या धर्माच्या लोकांना आपण एकत्र कसे आणू शकतो ? खरे 
तर विविध धर्मांमध्ये तंटा नाहीच आहे. पण जेव्हा गैरसमज होतो किंवा आपल्यात 
खूप ताण असतो, तेव्हा आपल्या भोवतीच्या लोकांशी तंटा निर्माण होतो. बऱ्याचशा 
घरांमध्येही असेच होत असते. कुटुंबातील भावा भावात भांडण असते. त्यामुळे 
जोपर्यंत आंतरिक शांती मिळत नाही तो पर्यंत बाहेरून शांती आणि सलोखा निर्माण 
होऊ शकत नाही. आणि जागतिक शांतीही निर्माण होऊ शकत नाही किंवा तुमच्या 
जीवनात वैयक्तिक प्रगतीही होऊ शकत नाही. आणि ही शांती आणण्यासाठी 
प्रत्येकाच्या प्रयत्नाची गरज आहे. या दिशेने जे काही करता येईल ते कारायला हवे.
  

आता मी तुम्हला इथेच एक प्रक्रिया करायला सांगणार आहे. तुम्ही त्यात भाग 
घाल नां ? खरे तर आज की तुम्हाला दोन गोष्टी करायला सांगणार आहे . 
मला खूप लांब लांब भाषण करायला आवडत नाही. प्रत्यक्ष अनुभवावर माझा 
जास्त विश्वास आहे. तुमच्या अवती भवती बघा आणि त्यांच्याकडे बघून म्हणा, 
‘मी तुमचाच आहे.’ समजले सर्वांना ? तुमच्या पुढे, मागे बसलेल्या लोकांनाही 
तुम्ही असे अभिवादन करू शकता. फक्त तुमच्या बाजूला बसलेल्यांनाच नाही.
आता मला सांगा अभिवादन करत असताना तुम्ही जे म्हटलेत तसे तुम्हाला खरेच 
वाटत होते कां, की तुम्ही नुसते वरवरचे म्हटलेत ? तुम्हीच विचा करा. इतराना 
सांगायची गरज नाही. जीवनातही असेच होत असते. बरेचदा आपण ‘सॉरी’ किंवा 
‘थँक यू’ असे अगदी वरवर म्हणतो. ते मनापासून आलेले नसते. जेव्हा तुम्ही 
विमानातून बाहेर पडता तेव्हा हवाई सुंदरी देखील, ‘बाय बाय, तुमचा दिवस चांगला 
जाऊ दे’ असे म्हणते, पण तुमचा दिवस खरोखरच चांगला जातो की वाईट याचे 
त्यांना काही नसते. पण तेच वाक्य जर तुम्ही तुमच्या आईकडून किंवा आजी 
आजोबांकडून ऐकले तर त्यांच्या म्हांन्यात वेगळेपणा जाणवतो. ते जेव्हा तुम्हाला 
हेच म्हणतात तेव्हा त्यांच्या म्हणण्यात काही वेगळ्या लहरी, आपलेपणा जाणवतो, 
हो की नाही ? ते बोलत नसतात. ते अगदी मनापासून बोलत असतात हे तुम्हाला 
जाणवते. आणि त्यात काही तरी असते की त्यांचा आशिर्वाद फळाला येतो. आणि 
मग तुम्ही प्रेमाच चिंब भिजून जाता, तुमच्यात त्यां प्रेमाच्या लहरी निर्माण होतात 
आणि तुमच्या भोवतालची माणसे सुद्धा त्याला प्रतिसाद देऊ लागतात. हा निसर्गाचा 
नियम आहे.  

आपल्या भोवती सतत अनेक प्रकारच्या लहरी असतात. केवळ, ‘शांती, शांती शांती’ 
असे ओरडून आपल्या भोवतालची परिस्थिती शांततामय होत नाही. अशा 
लोकांमध्ये, ना त्यांच्या आवाजात शांती असते ना त्यांच्या असण्यात. आपण 
शब्दांपेक्षा आपल्या असण्यातून जास्त व्यक्त करत असतो. 
  
घरातील लहान मूळ बोलू शकत नाही कारण त्याच्याकडे भाषा नसते. पण फक्त 
तुमच्या डोळ्यात पाहून सगळे प्रेम आणि भावना त्याच्यापर्यंत पोहोचतात. घरातल्या 
कुत्र्याचे उदाहरण घ्या. तुम्ही कामावरून किंवा शाळेतून घरी आलात की तो इतक्या 
आनंदाने तुमच्या भोवती फेऱ्या मारू लागतो, तुमच्या अंगावर उड्या मारतो. त्याच्या 
लहारीन्मधून त्याचे सगळे प्रेम व्यक्त होते. जरी एखाद्याने १०० शब्दात त्याचे प्रेम 
तुमच्या जवळ व्यक्त केले तरी त्याचा तितकासा परिणाम होत नाही किंवा भावना 
पोहोचत नाहीत. 
र, आपल्या लहरी सकारात्मक होण्यासाठी आपल्याला तीन गोष्टींची गरज असते. 
१. मनाची स्पष्टता 
२. हृदयाची शुद्धता 
३. कृतीतला प्रामाणिकपणा
तुमच्या मनात आणि विचारात स्पष्टता असायला हवी. तुमचे हृदय शुध्द असायला 
हवे. आणि तुमच्या कृतीत प्रामाणीकपणा  असायला हवा. तुम्ही जे काही कराल ते  
१०० % देऊन आणि मनापासून करायला हवे. 
चला, आपण आणखी एक प्रक्रिया करू. तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला सांगा 
की,‘ माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही.’ 
हे करता आले कां तुम्हा सर्वांना ? तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हे म्हणता आले नाही. 
तुम्ही म्हणायचा प्रयत्न केलात तरी दोघांनाही हसू यायला लागले. 
ठीक आहे, आता तुम्ही सर्वानी डोळे बंद करा आणि कल्पना करा की जगातले सगळे 
लोक तुम्हाला म्हणताहेत की त्यांचा तुमच्यावर विश्वास नाही. कल्पना करा की ते 
सगळे तुमच्याकडे शंकेच्या नजरेने बघत आहेत. अंदाजे ३० सेकंद पर्यंत फक्त हे करा. 
आणि मग डोळे उघडा. कसे वाटले तुम्हा सर्वांना ? तुम्हाला आतून खूप खराब वाटले, 
हो की नाही ?
कुणीही आपल्याकडे संशयाने बघू नये असे आपल्याला वाटते. पण आपण स्वत:च 
अनेक लोकांकडे अशा संशयित नजरेने बघत असतो. मग आपण तशाच लहरी आपल्या 
भोवती निर्माण करतो. आणि लोक त्यां लहरी पकडतात. आपण जेव्हा शंका कुशंकांमध्ये 
अडकतो तेव्हा आपण आपल्या भोवतीच्या लोकांमध्येही तशाच लहरी निर्माण करतो.
 
जेव्हा तुम्ही प्रेमात बुडालेले असता तेव्हा तुमच्यात प्रेमाच्या लहरी निर्माण होतात 
आणि तुमच्या भोवतालचे लोकही त्याला त्याचं प्रेमाने प्रतिसाद देतात. हा निसर्गाचा 
नियम आहे. 

तीन प्रकारच्या शंका असतात 
१. स्वत:वर घेतलेली शंका 
२. आपल्या भोवतालच्या लोकांवर घेतलेल्या शंका
३. देवावरची शंका 
आपण देवाला कधीच बघितले नाही त्यामुळे मनात कुठेतरी नेहमीच शंका असते 
की देव खर्च आहे की नाही. 
पहिली गोष्ट मंजे आपण लोकाना ते आहेत तसे स्वीकारायला हवे. आपण समाजात 
प्रत्येकाला एका शंकेच्या नजरेने बघत असतो. आपल्याकडे लोकांनी शंकेने बघू नये 
असे आपल्याला वाटते तर मग आपणही लोकांकडे शंकेने बघू नये. मी असे म्हणतोय 
याचा अर्थ असा नाही की तुम्ही प्रत्येकाच्या प्रत्येक गोष्टीववर आंधळेपणाने विश्वास 
टाकावा.    
अनोळखी माणसासमोर तुमच्या पर्सची काळजी घ्यायची नाही किंवा तो ती घेऊन 
पळाला तरी, ठीक आहे, असे वाटू देऊ नका. मी असे म्हणायचे नाहिये. पण आपल्या 
मनात काय चालले आहे त्याची जाणीव असावी. याकडे आपण लक्ष द्यायला हवे. 
आपण जोपर्यंत आपल्यात सुधारणा करत नाही, जोपर्यंत आपण आपल्यातले प्रेम आणि 
आनंद जागवत नाही तोपर्यंत समाजात आणि सर्व जगात शांती आणि आनंद कसा 
निर्माण होईल ?  

सर्वात आधी आपल्याला लोकांना, ते जसे आहेत तसे स्वीकारायला हवे. 
तुम्ही जगात अशा किती लोकांना भेटला आहात जे अगदी तुमच्यासारखे आहेत? 
तुम्हाला असे कुणी भेटले आहे कां? 
नाही भेटले. तरीही तुम्हला वाटत असते की प्रत्येकाने तुमच्यासारखाच विचार आणि 
कृती करावी. तुम्हाला माहितीये, जर तुम्हला अगदी तुमच्यासारखेच कुणी भेटले तर 
तुम्ही पाच मिनिटेही त्यांना सहन करू शकणार नाही. सत्य हे आहे की, अगदी 
तुमच्यासारखाच विचार करणाऱ्या आणि वागणाऱ्या व्यक्तीला सहन करणे अवघड 
आहे. हे आर्ट ऑफ लिव्हिंगचे अगदी मूलभूत तत्व आहे. 
बघा, या जगात येशू एकच आहे पण, तुम्हाला माहित आहे, आज जागात 
क्रिश्चन 
धर्माच्या किती शाखा आहेत ? 
आज जगात क्रिश्चन धर्माच्या ७२ शाखा आहेत. 
आज इस्लामच्या किती शाखा आहेत ? पाच तर अगदी सर्वांना माहित आहेत. 
जसे, शिया, सुन्नी, अहेमदिया, सुफी, वगैरे.. गौतम बुद्ध एकाच होता पण 
आज बुद्ध धर्माच्या ३२ शाखा आहेत. आणि हिंदू धर्मात तर असंख्य शाखा आहेत. 
(हास्य) 
प्रत्येक महासंताचा एक पंथ आणि त्यांचे अनुयायी तयार होतात. शिख धर्मातही 
अनेक विचारधारा आहेत. काळा बरोबर अनेक संत,निरनिराळे धर्म, तत्वज्ञान आणि 
विचार प्रवाह तयार होतात. आपण या सर्व वैविध्यपूर्ण परंपरांना आणि पंथांना 
वाढू द्यायला हवे, विकसित होऊ द्यायला हवे.  
प्रत्येकाने आपल्या सारखेच वागावे आणि विचार करावा असे जेव्हा एखाद्याचा प्रयत्न 
असतो तेव्हा त्याचा काय परिणाम होतो हे आपण सिरीय, इजिप्त वगैरे ठिकाणी 
बघतो आहोत. हे देश खूप दुर्दैवी आहेत. इराक मध्ये युध्द सुरु होण्याच्या आधी की 
इथे काही तरी भयंकर संकट कोसळणार आहे. 

इथे एक सरदारजी होता त्याचा तिकडे धंदा होता. तिकडे जाऊन त्यांच्याशी बोलण्यासाठी, 
मी दोन डॉक्टरांना त्याच्याबरोबर तिकडे पाठवले. त्यांना सद्दाम हुसेनच्या मंत्रिमंडळातील 
मंत्र्यांशी बोलायला सांगितले. ते गेले आणि एका मंत्राशी बोलले, जो आर्थ मंत्री होता. 
तर आम्ही सर्वांनी त्याला हे रक्तपात आणि दैन्यावस्था करणारे युद्ध थांबाविण्याविषयी 
सद्दाम हुसेनला सांगायला सांगितले. त्यानंतर काय झाले हे सर्वांनाच माहित आहे. 
दुर्दैवाने युद्ध झाले. त्यामुळे आम्ही तिथे एक पुनर्वसन केंद्र स्थापन केले, रेड क्रॉस 
सोसायटीच्या केंद्रा शेजारीच. युद्धाच्या दरम्यान रेड क्रॉस च्या इमारतीवर बॉम्ब पडला 
आणि इमारतीतील सर्व लोक पळून गेले. मी आमच्या अलोकाना बोलावले आणि 
त्यांना सुद्धा आसरा शोधून निघून जायला सांगितले. ते मला काय म्हणाले माहितीये ? 
ते म्हणाले, ‘ गुरुदेव, जर आम्हीही निघून गेलो तर जखमींची काळजी कोण घेणार ? 
इथे रोज ७०० लोकांना वैद्यकीय मदतिची गरज असल्याचे आम्ही बघतोय. आम्ही 
इथे राहून त्यांची काळजी घेऊ. तुम्ही आमच्यावर इतकं प्रेम कर्ता आणि देव आहेच, 
सदैव आमची काळजी घ्यायला. त्यामुळे आम्ही इथे राहूनया लोकांची काळजी घेऊ.  
या युद्धामुले सात लाख स्त्रिया विधवा झाल्या. तिथली परिस्थिती बघायला मी तीन 
वेळा तिथे गेलो. तिथल्या जागेचे भाग पाडण्यासाठी त्यांनी मोठ्या भिंती बांधल्या होत्या. 
शियांचा भाग वेगळा आणि सुन्नींचा भाग वेगळा केला होता. आम्ही एका सुन्नी 
इमामाला बरोबर घेतले आणि युद्धामुळे पळून गेलेले ८,००० लोक रहात असलेल्या 
त्या खेड्यात गेलो. आम्ही तिथल्या लोकांशी बोललो, आणि दुभाषा च्या मदतीने 
स्थानिक नेत्यांनाही भेटलो आणि त्यांना युध्द थांबवण्यासाठी विनंती केली. त्यांना 
कळले आणि त्यांनी आमचे खुल्या दिलाने स्वागत केले. हळू हळू शांतीचे वातावरण 
निर्माण होऊ लागले. इराक सरकारने ५० युवकांना प्रशिक्षणासाठी बंगलोरच्या 
आंतरराष्ट्रीय केंद्रात प्रशिक्षणासाठी पाठवले. त्या सर्वाच्या नोकर्या होत्या, कुटुंबीय 
होते तरीही ते त्यांच्या देशातल्या समाजाच्या उर्जितावस्थे साठी प्रशिक्षण घ्यायला आले.   
मी तुम्हाला सांगतो, आज बहुतेक सगळी युद्धे अमेरिकेच्या दारूगोळा, युध्दसामुग्री 
याच्या उद्योगामुळे होत आहेत. त्यांना त्यांची शस्त्रास्त्रे कुणाला तरी विकायची 
असतात नाहीतर त्यांचा त्यांची शस्त्रास्त्रे बव्न्याचा व्यवसाय बंद पडेल. ते बंदुकी 
आणि बॉम्ब तयार करतात आणि दोन्ही पक्षांना विकतात. आणि दोघानाही युध्द 
करण्यासाठी चिथावतात . 
भारतही असे करू शकतो. ते हिंदू आणि मुस्लिमांना एकमेकांच्या विरुध्द भांडायला 
चिथावू शकतात. पण असे नाहिये. मी सर्वच व्यवसायानबद्दल असे म्हणत नाहिये. 
सर्व जगभर पसरलेल्या बंदुकीच्या व्यवसायाबद्दल मी बोलतोय. हे कुणा एका देशापर्यंत 
मर्यादित नाहिये. तर सर्व दूर पसरले आहे. असे का ? कारण ते मानवी मूल्यांना 
महत्व देत नाहीत. ते फक्त पैसा बघतात आणि आणखी पैसा कसा मिळवायचा हे 
बघतात. सिरीय, इराण वगैरे देशात हेच होत आहे. हे सर्व बघून वाईट वाटते. हे 
आपल्या देशातही, आसाम, नागालँड आणि जम्मू आणि काश्मीर या राज्यांत होत आहे. 
आपण हे लक्षात ठेवायला हवे की जीवन क्षणभंगुर आहे. प्रेम करायला पुरेसा वेळ 
नाहिये तर मग द्वेष पसरवत आणि रक्तपात करत कां फिरायचे. आपण सर्वांनी 
हा प्रश्न स्वत:ला विचारायला हवा.  
यामुळेच आपल्या सभोवती एक नवीन जग तयार होईल जिथे प्रत्येक जण आपापला 
धर्म पाळायला मुक्त असतील आणि एकमेकात सलोख्याचे वातावरण असेल. भारतात 
खरे तर असेच आहे. काही लोक असे विचारतात की ‘ भारतीय लोक इतक्या साऱ्या 
देवी देवतांची पूजा कां करतात ?’  हा चुकीचा समज आहे. देव एकाच आहे पण
त्याच्याची व्यक्तिगत संबध जोडण्यासाठी आणि एकरूप होण्यासाठी, लोक त्यांच्या 
त्यांच्या पद्धतीनुसार पूजा करतात. त्यामुळेच आपल्याकडे इतकी रूपे आणि इतकी 
नावे आहेत. लोक जेव्हा मूर्ती पूजा करतात तेव्हा सुद्धा ते दगडाची पूजा करत नसतात. 
तर दिव्यत्वाची पूजा करत असतात. जसे आपण आपल्या आवडत्या व्यक्तींचे फोटो 
जाऊ तिथे जवळ बाळगतो तसेच.                 
आपण आपल्या मुलांचे फोटो जवळ बाळगतो. ते आपल्या जावल नसतील तरी त्यांचे 
फोटो बघितले की ती जवळीक जाणवते. मूर्तीचेही तसेच आहे. मूर्ती ही केवळ त्यां 
दिव्यत्वाशी संबंध जोडण्यासाठीच असते. 
सर्व धर्म सारखेच आहेत. 
कालच गणेश उत्सव पूर्ण झाला. लोक विचारतात की, ‘ तुम्ही आधी मूर्तीची पूजा 
करता आणि मग ती पाण्यात विसर्जित कां करता ?’ 
ही पद्धत ठेवण्यामागे ऋषींची अगदी छान कल्पना होती. ते म्हणत की, पूजा म्हणजे, 

जे देव आपल्यासाठी करतो तेच आपण देवासाठी प्रेमभावाने आणि कृतज्ञतेने करायचे.
जसा देव आपल्यासोबत क्रिडा करत असतो तसेच आपण दिव्याताशी क्रिडा करतो. 
तर पूजा ही दिव्य क्रिडा आहे. त्यामुळे आम्ही गणेश ‘मूर्तीशी’ पूजा करून खेळतो 
आणि मग काही काळाने मूर्तीचे पाण्यात विसर्जन करतो. ही संपूर्ण प्रक्रिया म्हणजे 
देवाला असे सागत असतो की , ‘देवा, तू आमच्या हृदयात आत्म्याच्या रूपात 
आहेसच, मी तुझी प्रार्थना करतो की तू या मूर्तीमध्ये काही काळासाठी प्रस्थापित 
व्हावेस म्हणजे आम्ही काळ तुझ्याशी खेळू शकू, जसे तुम्ही आमच्याशी प्रेमाने खेळता. 
तसाच मलाही उत्सव करू द्या. मग पूजा करून झाली की आम्ही देवाला पुन्हा 
परत आमच्या हृदयात परत यायला सांगतो आणि मग मूर्ती पाण्यात विसर्जित करतो. 
आज आधायात्मिक शिक्षणाची गरज आहे. आध्यात्मिक शिक्षण सर्वांना एकत्र जोडते. 
आजपर्यंत अनेक संत होऊन गेले आणि त्यासार्वांचे हेच मत होते की सर्व एकाच आहे.  

श्री आदि शंकराचार्यांनी गणेशाचे जे वर्णं केले आहे ते ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 
ते म्हणतात, ‘अजं निर्विकल्पं निराकार एकं’, म्हणजे गणेश हा निराकार आहे, 
आकार हीन आहे. आदि शंकराचार्य म्हणतात, ‘ श्री गणेशा तू अनंत आहेस, निराकार 
आहेस, सर्वव्यापी आहेस. देवाचे असेच वर्णन तुम्हाला कुराणाच्या सुरवातीच्या 
कलमांमध्ये दिसेल.   
दुर्दैवाचा भाग हा आहे की आपल्याला आपल्या धर्माबद्दल आणि आपल्या धर्म ग्रंथांबद्दल 
खूपच कमी माहिती आहे. कोणत्याही धर्मात असे सांगितलेले नाही की तुम्ही दुसऱ्या 
माणसाला त्रास द्या किंवा जखमी करा. मग हे आज असे क होते आहे ? याचे कारण 
धर्माचे शिक्षण सर्वांना योग्य प्रकाराने दिले जात नाही. 

इराक मधल्या नेत्यांनी आम्हाला तीन गोष्टी मागितल्या. त्यांना हवी असलेली पहिली 
गोष्ट होती, भारतीय आध्यात्म. कारण ते हे बघतात की ही सर्वांना प्रेमाने आणि 
सलोख्याने एकत्र आणणारी एक खास गोष्ट आहे.  

दुसरी गोष्ट त्यांनी मागितली, ती म्हणजे शिक्षण क्षेत्रातील मदत. ते म्हणाले की 
भारतात आय आय ती मध्ये शिकणारी मुले खूप हुशार आणि तल्लख असतात. 
कृपया आमच्या मुलांनाही असेच आय आय टी मधील तांत्रिक शिक्षण उपलब्ध करा. 
तिसरी गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे भारतीय टीम नि येऊन इराक मधील 
तेलाच्या विहिरीतून तेल काढावे. बरेच पाश्चिमात्य हे खूप आधीपासून करत आहेत. 
पण आता आम्हाला भारतीयांनी येऊन आमच्या देशातील तेल साठ्यांचा उपयोग 
करून घ्यायला हवे आहे. 
मी तुम्हाला सांगतो, जर सर्व देशांनी त्यांच्या संरक्षण खर्चातील ०.१% इतका 
पैसा शांती आणि सलोखा पसरवण्यासाठी वापरला तरी संपूर्ण जग बदलून जाईल. 
द्वेष कुणालाच नको असतो. पण बरेचदा नकळत तसे होते. किंवा कधी कधी 
इतरांची भीती, असुरक्षितता यामुळे होते.  
आज जर आपल्याला जागतिक शांतता हवी असेल तर आपण प्रथम आपल्यापासून 
सुरवात कारायला हवी. एकदा तुमच्यात तो प्रकाश पडला की मग तुम्हाला कुणीच 
परका वाटणार नाही. सर्वजण जणूकाही आपलेच आहेत असे तुम्हाल वाटू लागेल. 
एक गोष्ट मला तुम्हा सर्वांना सांगायची आहे. आज इथे येण्या अगोदर, एखाद्या 
इस्लामिक विद्यापीठात भाषण देण्याची संधी फक्त पाकिस्तानातील लाहोर 
विद्यापीठात २०१२ मध्ये  मिळाली होती. त्यादिवशी तिथे हजारो विद्यार्थी जमले होते. 
मला आठवते आहे, त्यां कार्यक्रमाची तयारी त्यांनी इतकी उत्साहाने केली होती. 
तिथे देखील विचारले गेले होते की, तुम्ही भारतात इतक्या देवी देवतांची पूजा कां 
करता ? हे समजावण्यासाठी मी त्यांना एक साधेसे उदाहरण दिले. बघा एकाच 
कणकेपासून तुम्ही हलवा बनवता, पुऱ्या , समोसा बनवता. हो की नाही ? हीच 
कणिक तुम्ही पिझा बनवण्यासाठीही वापरता, नुडल्स साठीही वापरता. आपण असे 
कां करतो ? कारण आपल्याला जेवणात वैविध्य आवडते. त्याचप्रमाणे आम्ही भारतात 
एक देव आहे असेच मानतो. पण आम्ही त्या एका देवालाच वेगवेगळ्या वेशभूषेत 
सजवतो.  आम्ही त्यांना वेगवेगळे कपडे घालतो आणि प्रत्येकाला वेगवेगळे नाव देतो.   
हिंदू धर्मात देवाची १००८ नावे आहेत. आणि प्रत्येक नावाला एकेका रूपाशी जोडले 
आहे. असे आहे .
तिथल्या श्रोत्यांना हे स्पष्टीकरण आवडले. काही जण म्हणाले, ‘ गुरुदेव तुम्ही हे 
इतके छान समजावून सांगितले. आतापर्यंत माहीतच नव्हते की देव एकाच असून 
भारतीय लोक इतक्या देव देवतांची पूजा कां करतात.’ 

तर आपल्याला जर जागतिक शांतता हवी असेल तर आपल्याला स्वत:पासून 
सुरवात कारायला हवी. एकदा तुमच्यात तो प्रकाश पडला की मग तुम्हाला 
कुणीच परका वाटणार नाही. सर्वजण जणूकाही आपलेच आहेत असे तुम्हाल 
वाटू लागेल. जगातील प्रत्येक जण आपलाच असेल. पण हे सत्य तेव्हाच जाणवेल 
जेव्हा आपल्याला आपल्यातील प्रकाश कोणीही विझवू शकत नाहीई याची जाणीव 
होईल. तुमच्यातील प्रकाशाची तुम्हाला जाणीव व्हावी हाच प्राणायाम आणि ध्यानाचा 
उद्देश आहे. 
 
प्रश्नोत्तरे:
 
प्रश्न : पिढीतील अंतर आणि त्यामुळे येणाऱ्या प्रश्नांना कसे सोडवावे ? आमच्या 
वडीलधाऱ्यांबरोबर असलेल्या मतभेदांना  कसे हाताळावे ? 

श्री श्री : हे अतिशय कुशलतेने करावे लागेल. तुम्ही तुमचे म्हणणे त्यांना 
समजावून सांगावे पण त्यांचे म्हणणेही आदराने ऐकूनही घ्यायला हवे. लक्षात ठेवा 
की आपल्या वडीलधाऱ्यांच्या मनात नेहमी आपल्याबद्दलचे प्रेम आणि भलेच असते. 
म्हणूनच ते वेळोवेळी तुम्हाला सल्ला देत असतात. हे शक्य आहे की ते अजूनही 
त्यांच्या पिढीच्या जुन्या मतांचे असतील किंवा त्याना नवे विचार माहित नसतील. 
पण त्यांचा हेतू नेहमी चांगलाच असतो. कदाचित त्यांची सांगण्याची पद्धत आपल्या 
अपेक्षेपेक्षा वेगळी असेल. थोडेसे द्यावे , थोडे घावे आणि सहजपणे हा गुंता सोडवावा.
 
प्रश्न : सुरवातीला मला लोकांमधी चांगलेच दिसते. पण कालांतराने जसे मी त्यांना 
जवळून ओळखू लागतो तास तसे मला त्यांच्यातले वाईटच दिसू लागते. माझी त्यांच्या 
विषयीची भावना बदलते. असे कां होते ? आणि मी ही परिस्थिती कशी हाताळावी ?
 
श्री श्री : कधी कधी याच्या उलटही होते. सुरवातीला तुमचे एखाद्या 
व्यक्तीशी पटत नाही पण काही काळाने तुम्हाला ती व्यक्ती आवडू लागते. दोन्ही 
गोष्टी खऱ्या आहेत. जीवनात अशाप्रकारचे चक्र चालू असते. सुरवातीला तुम्हाला 
एखादी व्यक्ती आवडते आणि नंतर आवडेनाशी होते आणि पुन्हा काही दिवसांनी 
आवडायला लागते. तुमच्या आई बाबांना विचारा. (हास्य). त्यांचे लग्न आनंदात 
झाले. पण नंतर छोटी छोटी भांडणे आणि मतभेद होत गेले.  

प्रश्न : शांत आणि यशस्वी जीवनाचे रहस्य काय ? 
श्री श्री : मी तुम्हाला इतका वेळ तेच तर सांगतोय. लोक जसे आहेत तसा 
त्यांचा स्वीकार करा. नेहमी वर्मान क्षणात रहा.पूर्वी काय झाले आणि पुढे काय 
होणार याचा विचार करत बसू नका. 

प्रश्न : जागतिक शांती आणि सलोखा प्रस्थापित करण्यात धर्माची भूमिका काय आहे ?
 
श्री श्री: बुद्धीमां लोकांसाठी धर्म ही एक जमेची बाजू आहे. पण मूर्ख 
लोकांसाठी तो एक अडथळा आहे. प्रत्येक धर्मात काही खास गोष्टी आहेत, 
ज्याच्यामुळे आपले जीवन विकसित होऊ शकते. आपण जीवनात बहरून  येऊ 
शकतो. पण आपण जर मूर्ख असलो तर त्याचं गोष्टी लोकांमधील भेद आणि 
समस्यांचे मूळ बनू शकते. तर हे सर्व आपल्यावरच अवलंबून आहे. जगातल्या 
कोणत्याही धर्मात काही चूक नाहिये. तो धर्म पाळणाऱ्याच्या  समजण्यावर 
अवलंबून आहे. तुम्ही सुरीने भाजीही कापू शकता, लोणी लावू शकता किंवा 
तुम्हाला इहा पोहोचवू शकता. असे आहे ते .