चांगल्या आणि वाईट गोष्टी एकत्र असणे हेच जीवन आहे

प्रश्न : गुरुजी ह्या विश्वात आत्म्यांची संख्या ठराविक आहे का कि संपूर्ण ब्रम्हांडात एकच अंतरात्मा आहे.
श्री श्री रवी शंकर : अनंत आत्मे. हे असे विचारण्यासारखे झाले कि आकाशात ठराविक संख्येने तारे आहेत का? वैदिक शास्त्र आणि आगम शास्त्र असे सांगते कि २२४ पृथ्वी आहेत , आपल्यासारखे जग आकाशगंगेत आहेत. तसे बघितले तर खूप आहेत पण महत्वाचे २२४ आहेत. हि आपल्या संतांची दूरदृष्टी आहे कि ज्यांनी ध्यानात गहिरे जाऊन ब्रम्हांडाचा शोध घेतला आहे.

प्रश्न : गुरुतत्त्व म्हणजे काय ,आणि गुरु कोण आहे?
श्री श्री रवी शंकर : विवेक, तारतम्य हे गुरुतत्त्व आहे. गुरु कोण आहे हे खरच महत्वाचे आहे का? तुम्ही फक्त ज्ञान घ्या आणि पुढे चला हेच पुरेसे आहे. गुरु कोण आहे ह्याची काळजी करू नका.

प्रश्न : गुरुजी आत्मबल कसे वाढवावे?
श्री श्री रवी शंकर : आत्मबल....प्रार्थना, प्राणायाम, आणि साधना करा.

प्रश्न : गुरुजी , हे जग स्थायी आहे कि बदलत आहे?
श्री श्री रवी शंकर : तुम्ही बघता आहात कि हे जग स्थायी नाही.

प्रश्न : जर शिष्याचेच निधन झाले तर सत्गुरूचा काय उपयोग?
श्री श्री रवी शंकर : सत्गुरुला माहित असते कि शिष्याला मरण नाही. कारण आत्मा अमर आहे. मरणानंतर सुद्धा त्याचा एका दिशेने प्रवास हा सुरूच असतो.

प्रश्न : गुरुजी अश्वमेध म्हणजे काय?
श्री श्री रवी शंकर : अश्वमेध म्हणजे शुद्ध. 'श्व' म्हणजे भूत किंवा भविष्य. 'अश्व' म्हणजे उपस्थित क्षण आहे. 'मेध' म्हणजे मार्जन होय. मनाचे आणि बुद्धीचे मार्जन जेव्हा आत्ताच्या म्हणजेच उपस्थित क्षणात होत असते तेव्हा त्याला अश्वमेध म्हणतात. बुद्धी आणि मन आत्ताच्या क्षणात ठेवा.

प्रश्न : गुरुजी कोदागणं कोळी नुन्गीथा (क्न्नादामाध्ले एक भजन)
श्री श्री रवी शंकर: ह्याचा अर्थ खूप अदभूत आहे.मी विचार करत होतो कि मी खूप मोठा माणूस आहे पण मी जेव्हा माझ्या गुरूच्या चरणांकडे पहिले तेव्हा उदार्चारीत , मोठ्या मनाचे दिसले .माझा अहंकार कि जो मला खूप मोठा वाटत होता तो गुरुचे चरण लहान वाटत होते. पण खरं तर त्याच्या अगदी विरुद्ध होत.
त्यांच्या चरणांनी माझा मोठा अहंकार गडप करून टाकला.

प्रश्न : आम्ही फक्त चांगल्या गोष्टी लक्षात ठेवून वाईट गोष्टी कश्या विसराव्यात?
श्री श्री रवी शंकर : हे खूप चांगले आहे कि वाईट गोष्टी विसराव्यात आणि चांगले आहे कि चांगल्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात. दोन्ही एकत्र असणे हेच जीवन आहे पण आपण त्याचा विसर पडतो आणि आपण फक्त वाईटच गोष्टी लक्षात ठेवतो. तुम्ही सत्संग मध्ये जे ऐकता ते लक्षात ठेवणे खूप महत्वाचे आहे. इतर लोकांच्या चुका विसरणे हि खूप महत्वाची बाब आहे. पुन्हा पुन्हा त्याच चुका करू नयेत हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. इतर लोकांच्या चुकांवरून आपण शिकणे हेही महत्वाचे आहे.

प्रश्न : गुरुजी स्त्री साठी एखादी गोष्ट नीट रचणे कठीण असते कारण तिला संपूर्ण घराला सांभाळायचे असते. हि गोष्ट ती इतक्या क्षमतेने कशी करू शकते?
श्री श्री रवी शंकर : कुठलीही गोष्ट कठीण आहे असा विचार करू नका. जरी ती कठीण असली तरी तुमच्या मनातल्या विचाराने ती आणखीन कठीण होते. जर तुम्हाला एखादे कठीण काम नेमून दिले तरी हे माना कि तुमच्यात खूप शक्ती आहे अगदी त्याच्याहीपेक्षा जास्त. आपल्यासाठी तेच काम उपलब्ध होते जे आपण करू शकतो.

प्रश्न : गुरुजी एक स्त्री ब्रह्मचर्याचे पालन करू शकते का?
श्री श्री रवी शंकर: ब्रह्मचर्य हि तुमची वैयक्तिक निवड आहे. जर तुम्हाला लग्न करायचे असेल तर करा, आणि जर लग्न करायचे नसेल तर करू नका. असे खूप लोक आहेत जे लग्न करून दुखी आहेत, आणि अशीही लोक आहेत जी लग्न न करता दुखी आहेत. मला फक्त पाहिजे आहे कि तुम्ही सुज्ञ व्हा . कुठल्याही एका गोष्टीत केंद्रित व्हा ते खूप महत्वाचे आहे.