आनंद हा तुमच्या मनावर अवलंबून असतो

बंगलोर आश्रम , जान १७:

प्रश्न : जेंव्हा सगळे झोपलेले असतात तेंव्हा गुरुजी जागे असतात. तुम्हाला त्याचा काही त्रास होत नाही का?
श्री श्री रवी शंकर:
तुम्ही झोपलेले असताना तुमच्या घरासमोर एक चौकीदार असतो. ज्यांचापुढे मोठे प्रश्न असतात त्यांना लहान लहान प्रश्न काही वाटत नाही. सामान्य लोकांना ज्या गोष्टींची चिंता वाटते त्याची योगी पुरुषांना वाट्त नाही. योगी पुरुषासाठी सर्व काही शक्य आहे.

प्रश्न : भक्ती मिळवण्यासाठी मी कुठे जावे?
श्री श्री रवी शंकर
: भक्ती – प्रीती – भक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. केवळ स्मरण करून त्तुम्ही काहीही करू शकता. तुम्ही जिथे असाल तिथून भक्ती करू शकता. कोणी तुम्हाला थांबवू शकते का? चालताना, खाताना तुम्ही समर्पित राहू शकता.

प्रश्न : आर्ट ऑफ लिव्हिंग ने मला बरेच काही दिले आहे, मला काहीतरी द्यायचे आहे, सेवा करायची आहे. मी की करू शकतो?
श्री श्री रवी शंकर
: आश्रमात येऊन कधीही तुम्ही सेवा करू शकता.

(The person then tells Sri Sri Ravi Shankar: I’m very happy to have food with many people, with no differences between people and so much togetherness.)

प्रश्न : गुरुजी , मला माझ्या भूतकाळाचा त्रास होतो, मी काय करू?
श्री श्री रवी शंकर
: झाले ते जाऊ देत. क्षमेला पण विसरून जा. क्षमा करण्यासाठी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवावे लागते.त्याला एका स्वप्नासारखे बघा. कोणी स्वप्नाचा विचार करत बसते का? त्याच प्रमाणे आपला भूतकाळ पण सोडून द्या. एक भविष्य सांगणारा भक्त एक दिवस म्हणाला, "माझा पाय मोडला. मी रात्री झोपलो होतो. आणि मला मी एका वाघाशी लढत आहे असे स्वप्न पडले. मी भिंतीवर लाथ मारली आणि पाय मोडला. वाघ माझ्या स्वप्नात होता, मी स्वप्नात लाथ मारायला हवी होती" अडचणीमुळे थांबू नका, चालत राहा.

प्रश्न : मी जिथे जातो तिथे मला दुक्ख दिसते. मी कुठे जाऊ आणि की करू?
श्री श्री रवी शंकर
: अंतर्मुखी (आत जाणे). बाहेर बाजार आहे. गावातल्या बाजारात, पुलाखाली, लोक झोपलेले असतात. तुम्ही त्यांचाकडून शिका. ते भर बाजारात झोपू शकतात. तुम्ही पण ध्यान करा आणि शांत व्हा. किंवा इथे या. तुम्हाला शांतता मिळेल. २० अडचणी असतील पण १०० चांगल्या गोष्टी पण असतील. तरी सुद्धा मान त्या २० अडचणीतच अडकलेले असते.

प्रश्न : ध्यानाच्या सी डी मध्ये दिलेल्या सूचना मी पळू शकलो नाही .
श्री श्री रवी शंकर
: ध्यानात मला ऐकायचा प्रयत्न करू नका, जे होतंय ते होऊ द्यात.सल्ला जसे ऐकता त्याप्रमाणे करा. एका कानाने ऐका आणि दुसर्या कानाने सोडून द्या! तुम्ही नुसते बसलात तरी ओउरेसे आहे.

प्रश्न: समाजात सगळेजण शांतपणे राहत आहेत. तरी काही लोक अशांती निर्माण करतात. आपण की केले पाहिजे?
श्री श्री रवी शंकर
: काही गोष्टी करा आणि काही काही गोष्टी करू नका. अस्पृशाते (जातीयता) कुणालाही काहीही मदत करत नाही. कुणाचाही दुस्वास करू नका. मेलेल्या सापाला उगीच मारत बसतो, तेव्हा तुमचाच हाताला लागते. तरी सुधा काही ठिकाणी हातात काठी असणे जरुरी असते. कशाचाही द्वेष करू नका.

प्रश्न: तुम्ही जे टाळत आहात ते तुमच्या आयुष्यात घडेल हे तत्व मी पाळतो. तरीसुद्धा मी काही गोष्टी टाळतोच असे मला दिसते.
श्री श्री रवी शंकर:
मन आणि शरीराचे नियम वेग वेगळे आहेत. जे टाळत आहात ते मनात घडते, शरीराचे तसे नाही.

प्रश्न: आयुष्याची व्याख्या काय? आनंदी आयुष्य कसे जगावे?
श्री श्री रवी शंकर:
आर्ट ऑफ लिव्हिंग त्याच्याच बद्दल आहे. आयुष्य व्याख्येच्या पलीकडे आहे. व्याख्या करणे किंवा पकडणे याच्या पलीकडे आयुष्य आहे. ते इतके मोठे आहे, व्यापक आहे की काही शब्दात त्याला बांधता येणे शक्य नाही. त्याची व्याख्या करायला जाताना तुम्ही त्याला खूपच छोटे करून टाकता. आनंद हि अशी गोष्ट आहे की ज्याचा आपण नेहमी मागोवा घेत राहिले पाहिजे. नकळत आपण सगळे आनंदी आहोत, पण कुठेतरी आनंदाचा मागोवा घेत असताना आपण अडकून बसतो आणि लक्ष्य चुकवतो. अध्यात्म म्हणजे की आहे - चेहेऱ्यावर एक हसू आणणे.

एकदा तुम्हाला प्रकाश दिसला, की सारा भूतकाळ एका स्वप्नासारखा वाटू लागतो, पुढे चला. जागे व्हा आणि वर्तमानात काय चालले आहे ते पहा, तुम्ही तिथे आनंदी असाल, कुठलीही अट न ठेवता. तेव्हा तुम्ही आनंदी असाल आणि तुमचा आनंद इतक कुणावरही अवलंबून नसेल. आनंद हा तुमच्या मनावर अवलंबून आहे. जेंव्हा मन भूतकाळातील कुठल्याही प्रभावापासून आणि भविष्यातल्या चिंतांपासून मुक्त असते, तेंव्हा तिथे आनंद असतो.

प्रश्न: देवाने त्याच्या अगाध हुशारीतून हे जग बनवले आहे, मी मांस का खाऊ नये हे मला कळत नाही? मी जन्मतःच मांसाहारी आहे आणि मी ते सोडू शकत नाही.
श्री श्री रवी शंकर:
ओके. मांस आवडीने का खावेसे वाटते? (त्या महिलेने उत्तर दिले चव आणि सुवास) सुवास आणि चव ज्याचापासून येते ते म्हणजे मसाले. ठीक आहे. चव आणि वासाबद्दल, अध्यात्मिकते बद्दल विसरून जा. तुम्हाला माहिती आहे, मांसाहारी पदार्थांबद्दल नवीन काय कळले आहे? १ किलो मांस हे ४०० लोकांच्या जेवणाइतके आहे. फक्त १०% लोक जरी शाकाहारी झाले. ग्लोबल वॉर्मिंग चा प्रश्न कमी होईल.

आत्ता आपल्याला आपला ग्रह वाचवायचा आहे. मांसाहारी पदार्थ आपल्याला कमीच केले पाहिजेत. आपल्या ग्रहासाठी, जेणेकरून सगळ्यांना अन्न मिळेल, आपल्याला त्याची काळजी असली पाहिजे. देवाने आपल्याला दुसऱ्याची आणि ग्रहांची काळजी घ्यायची बुद्धी दिली आहे! तुम्ही भरपूर खाल्ले आहे, त थोडे कमी ख म्हणजे ज्यांना खायला काहीच नाही त्यांना थोडेतरी मिळेल. जास्तीत जास्त लोकांना खायला मिळेल .

जेव्हडे आपण निर्माण करतो त्याचा ४०-५०% जास्त आपण खात आहोत. झाडे लावा, शाकाहारी बना, हे अध्यात्मिक होण्याचा एक भाग आहे. ध्यान म्हणजेच फक्त अध्यात्मिकता नव्हे. भारतामध्ये स्वातंत्र्य मिळाले तेंव्हा १००० लोकांमागे ४०० गायी होत्या. आता आपल्याकडे १००० लोकांमागे १०० गायी आहेत. २० वर्षांमध्ये १००० लोकांमागे फक्त २० गायी असतील. मुलांना दुध, दही, तूप यासारखा त्यांचा मुख्य आहार मिळणार नाही. आपल्याला प्राण्यांचे, आपल्या ग्रहाचे रक्षण केले पाहिजे.

प्रश्न: गुरुजी, माणूस कायम भांडतो. जगात कधी शांतात असेल का? जग कधी हिंसाचार रहित होईल का?
श्री श्री रवी शंकर:
हं. तेच आपले स्वप्न असले पाहिजे आणि त्यासाठीच आपण काम केले पाहिजे. संपूर्ण जड एक कुटुंब आहे. वसुधैव कुटुंबकम हे पुराणात सुद्धा सांगितले आहे