चमत्कार घडायला एक संधी द्या

28
2012
Dec
बद अन्तोगस्त, जर्मनी
 तुम्ही अनेक गुरु कथा ऐकल्या आहेत, हो ना? म्हणून आता मी तुम्हाला एक शिष्य कथा सांगणार आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मी महाराष्ट्राच्या दूरवरच्या प्रदेशाचा दौरा करीत होतो. असे गाव आणि जिल्हे जिथे मी कधीही गेलेलो नव्हतो. मला भेटायला बरीच मंडळी आली होती.

एका गावात मी माझ्या सहाय्यकाला सांगितले, ' तिघाजणांचा भ्रमणध्वनी फोन हरवलेले आहे आणि ते तिघे अतिशय गरीब आहेत. म्हणून माझ्या पिशवीत तीन नवीन फोन ठेवा.'

जेव्हा मी तिथे पोहोचलो तर तिथे २,००० ते २,५०० कार्यकर्ते आणि २००,००० लोकांची मोठी गर्दी उसळली होती.

कार्यक्रमानंतर झालेल्या कार्यकर्त्यांच्या भेटीत मी म्हणालो,' तुमच्यापैकी तिघांचे भ्रमण ध्वनी फोन हरवले. मला ते माहिती आहे. तुमच्यापैकी ज्यांचे फोन हरवले आहेत त्यांनी उभे राहा', आणि केवळ तीनच लोक उभे राहिले.

उभे राहिलेल्यांमध्ये एक महिला होती, आणि मी तिला सांगितले,'बघ, गेल्या गुरुवारी तू माझ्या फोटोसमोर रडत होतीस. तुला कळत नव्हते की काय करावे, परिवारासमोर कोणत्या तोंडाने जावे कारण ज्याची किंमत दोन तीन महिन्याच्या मिळकती इतकी होती असा एकदम महागडा भ्रमण ध्वनी फोन हरवला आहे. हा घे नवीन फोन.'

जेव्हा मी हे करीत होतो तेव्हा घोळक्यातील एक मुलगा पुढे माझ्याकडे आला आणि त्याने त्याची गोष्ट सांगितली. तो अँडव्हान्स शिबीर ( दि आर्ट ऑफ लिविंगचे शिबीर दुसरे ) करीत होता आणि त्याची पत्नी घरी होती, आणि त्याला तिच्याबरोबर बोलायचे होते. त्याच्या भ्रमण ध्वनी फोनची बँटरी विद्युत प्रभारित नव्हती आणि प्रभारित करण्याचे यंत्र तो घरी विसरून आलेला होता. तेव्हा त्याने त्याचा फोन माझ्या फोटोसमोर ठेवला आणि ,'गुरुदेव, माझा फोन प्रभारित होऊ दे', अशी विनंती केली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो उठला तेव्हा त्याच्या फोनची बँटरी पूर्णपणे प्रभारित झालेली होती.

त्या मुलाने मला त्याचा फोन दाखवला आणि म्हणाला, ' हे पहा, सुमारे दीड वर्षापूर्वी मी माझा फोन प्रभारित करण्याचे यंत्र फेकून दिले आहे, आणि आता मी माझा फोन केवळ तुमच्या फोटोसमोर ठेवतो आणि तो प्रभारित होऊन जातो.'

त्याने फोन प्रभारित करण्याचे यंत्र फेकून दिले!

मी म्हणालो, ' हे तर काहीतरी नवीनच आहे. मला स्वतःला माझा फोन प्रभारित करण्याकरिता यंत्र लागते, आणि माझा भक्त त्याचा फोन केवळ माझ्या फोटोसमोर ठेवून प्रभारित करतो.'

भक्त किती सामर्थ्यवान असू शकतात ते बघितलात.

मला वाटते की ही फारच रोमांचकारक गोष्ट आहे. तर मी बंगलोरला परतलो होतो आणि जवळजवळ १५० लोक रशिया, पोलंड आणि पूर्ण युरोपभरातूनआलेले होते, आणि त्यांना मी ही गोष्ट सांगितली, ' हे बघा, मी माझा फोन प्रभारित करण्याच्या यंत्राशिवाय प्रभारित करू शकत नाही आणि हा भक्त पहा त्याने त्याचे प्रभारित करण्याचे यंत्र फेकून दिले आणि तो त्याचा फोन दररोज माझ्या फोटोसमोर ठेवून प्रभारित करतो.'

तर तिथे उपस्थित असलेले ते १५० लोकम्हणाले, 'होय, आमच्याबरोबरसुद्धा असे घडते.'

माझे असे सांगण्याने ते अजिबात आश्चर्यचकित झाले नाही.

एक रशियन म्हणाला, 'असे माझ्यासोबतसुद्धा घडले आहे. एके दिवशी, मीसुद्धा माझा फोन ठेवला आणि प्रार्थना केली की तो प्रभारित होऊ दे, आणि खरोखर तो प्रभारित झालेला होता!'

पोलंड आणि युरोपीय राष्ट्रांमधील इतर भक्तांनीसुद्धा असे अनुभव सांगितले.

आणखी एका व्यक्तीने त्यांचा अनुभव कथन केला आणि सांगितले, 'माझ्या गाडीतील पेट्रोल संपले होते आणि गाडीतील इंधन दर्शवणारी शून्यावर आलेली सुई मला सांगत होती की पेट्रोलची टाकी रिकामी आहे. परंतु मी गाडी चालवतच राहिलो, आणि रिकाम्या टाकीने मी गाडी ११७ किलोमीटर चालवली'.

हे कसे शक्य आहे? हे तर उघड उघड निसर्ग नियमांचे उल्लंघन आहे.

माझे तुम्हाला सांगणे आहे की,आपण जीवनात चमत्कार घडायला संधी दिली पाहिजे. कोणाचेही आयुष्य हे चमत्कार रहित नसते. आपण फक्त त्यावर विश्वास ठेवीत नाही.

या जगातील सर्व संस्कृती आणि तत्त्वज्ञान हे चमत्कारांवर आधारित आहे. खरे तर चमत्कारांमुळेच त्यांची भरभराट झाली.

बायबलमधील सर्व चमत्कार काढून टाका आणि तुम्हाला वाटेल की बायबलला अस्तित्वातच नाही.

त्याचप्रमाणे जर तुम्ही जगातील कोणतेही धर्मग्रंथ घ्या, ते चमत्कारांनी ओतप्रोत असतील. परंतु आपल्याला वाटते की चमत्कार ही भूतकाळातील गोष्ट आहे आणि वर्तमान काळाची नाही. मी तुम्हाला सांगतो की वर्तमानात आजसुद्धा ते घडू शकतात.

मी एकदा बोस्टन विमानतळावर होतो आणि एका भक्ताने माझ्याकरिता आणि माझ्यासोबत प्रवास करणाऱ्या इतर चौघांकरीता अन्न आणले. तुम्हाला माहिती आहे तेव्हा माझ्यासोबत किती माणसे होती? जवळ जवळ ६० ते ७० लोकांचा मोठा घोळका होता आणि चौघांकरीता असलेले अन्न ६० लोकांनी वाटून खाल्ले. सर्वांनी अन्नाचे सेवन केले.

तुम्हाला नवल वाटत असेल- हे कसे काय शक्य आहे?!

याकरितासुद्धा शास्त्रीय स्पष्टीकरण आहे.

हे संपूर्ण जग दुसरे तिसरे काही नसून केवळ कंपन आहे; सगळे काही कंपने आहे. द्रव्य हे इतर काही नसून फक्त कंपने आहे. द्रव्य आणि उर्जा हे सारखेच आहे, ते दोन्ही केवळ कंपने आहे.

पहा, जेव्हा तुम्ही स्वयंचलित काचेच्या दाराजवळ येता तेव्हा ते दार त्वरित उघडते. ही घटना जर १०० ते २०० वर्षांपूर्वी घडली असती तर अशी कल्पना करून पहा. त्या काळच्या लोक चक्रावून गेले असते. त्यांना हे कसे काय घडत आहे याचे आश्चर्य वाटले असते. तुम्ही केवळ जाता आणि दार उघडते.

आज आपल्याला माहिती आहे की हे जैविक ऊर्जेमुळे होते. आपल्या शरीरातून उर्जा बाहेर पडत असते.

तुम्हाला माहिती आहे की अशी कुलुपे आहेत जी केवळ एकाच माणसाकडून उघडली जाऊ शकतात.

तुम्ही जैवसांखिक कुलपांबद्दल ऐकले असालच. जर का तुमची उर्जा त्या कुलुपामध्ये अन्तःस्थापित असेल तर इतर कुणीही ते उघडूच शकणार नाही. ते केवळ तुमच्याच स्पर्शाने उघडू शकते.

याचा अर्थ असा प्रत्येकजण उर्जा उत्सर्जित करीत आहे.

जेव्हा तुम्ही प्रेम आणि भक्तीच्या अवस्थेमध्ये असता तेव्हा तुमची उर्जा इतकी ताकदवान असते, इतकी मोठी असते की तेव्हा तुम्हाला तुमचा फोन प्रभारित करून पाहिजे असेल तर तो सहजपणे प्रभारित होतो.

ही जैवसांखिक कुलपांप्रमाणे तीव्र उर्जा असते. जेव्हा तुम्ही दाराजवळ पोहोचता तेव्हा दार उघडते कारण तुमची उर्जा ही दाराच्या वर असलेल्या छोट्या डब्यात पकडल्या जाते.

याचप्रकारे संपूर्ण विश्व हे केवळ उर्जेने बनलेले आहे. ही सगळी उर्जा आहे. म्हणून चमत्कार घडायला एक संधी द्या.

हे सगळे केव्हा शक्य आहे? हे तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही रिकामे आणि पोकळ व्हाल.

जेव्हा तुमचे हृद्य आणि मन हे दोन्ही स्वच्छ आणि शुद्ध असेल, तेव्हा तुमच्यात सकारात्मक उर्जेचा उदय होतो. परंतु तुमचे मन जर नकारात्मकतेने पुरेपूर युक्त असेल, आणि तुम्ही तणावग्रस्त असाल; किंवा जर तुम्ही अमक्या तमक्याबद्दल तक्रारीचा सूर लावीत असाल, आणि कटकट करीत असाल, तर मग चमत्कार घडणे शक्य नाही. जे नियमित काम व्हायचे तेसुद्धा होणार नाही. साध्यासाध्या गोष्टी होत नाहीत कारण उर्जा नकारात्मक आहे आणि खालच्या पातळीवर आहे.

जेव्हा उर्जेची पातळी उंचावते तेव्हा तुम्हाला अशक्य प्राय वाटणाऱ्या घटना घडू लागतात.

एका वैज्ञानिकाच्या दृष्टीकोनातूनसुद्धा, चमत्कार हे खरोखर शक्य आहेत.

काहीही अशक्य नाही. ते कसे काय होते याचे फक्त तंत्र आणि चेतनेच्या कोणत्या अवस्थेत हे सगळे घडते येवढे तुम्हाला माहिती असणे जरुरी आहे.

तुमच्यापैकी कितीजणांना अशा चमत्काराचा अनुभव आलेला आहे? ( अनेकजण त्यांचा हात वर करतात ). बघा! तुम्ही सगळ्यांनी कोणत्या ना कोणत्या चमत्काराचा अनुभव घेतलेला आहे. म्हणून जेव्हा आपल्याला ते खोल नाते जाणवते, जेव्हा आपल्याला प्रेम आणि भक्ती अनुभव येतो तेव्हा हे सगळे विनासायास घडते.

आता जर तुम्ही मला विचारले , ' मी माझी भक्ती कशी काय वाढवू?'

माझे उत्तर असेल, ती वाढवायचा कोणताही मार्ग नाही. ते करण्याचा प्रयत्न करू नका, आराम करा.

खरे तर हीच एक समस्या होऊन बसते.

बरेच लोक मला विचारतात , ' मी शरण कसे जाऊ? मी माझी भक्ती कशी वाढवू? '

माझे उत्तर असेल, ती वाढवायचा कोणताही मार्ग नाही. परंतु तुम्ही जर मला विचारले , ' मी माझ्या नकारात्मकतेपासून सुटका कशी करून घेऊ? ' तर माझे उत्तर असेल , 'होय एक मार्ग आहे.' कसा? फक्त जागे व्हा आणि पहा! नकारात्मकतेला सोडून द्या. विचार करा, ' सोह् म आणि मग काय झाले!' या दोन गोष्टी आहेत.

जेव्हा कधी समस्या किंवा नकारात्मकता समोर उभी ठाकेल सर्वात प्रथम एवढाच विचार करा ,' मग काय झाले? जे आहे ते ठीक आहे.' आणि मग सोह् म(याचा शब्दशः अर्थ आहे ' मी ते आहे', इथे व्यक्तिगत मी दैवी परमात्म्यासोबत स्वतःला अभिन्न मानतो असा संदर्भ आहे)

याप्रकारे तुम्ही नकारात्मकतेपासून स्वतःची सुटका करून घेऊन आपली हिंमत वरच्या पातळीवर ठेवू शकता.

तुम्हाला माहिती आहे की जेव्हा कोणाला बरे वाटत नसते तेव्हा ते आपल्या आजूबाजूच्या सर्वाना खाली आणतात. आणि तुम्ही जर त्यांच्याबरोबर बोललात तर तुम्हाला दिसेल की त्यांना केवळ स्वतःबद्दल निराश वाटत असून ते आजूबाजूच्या सर्वाना निराशेच्या खाईत ढकलतात. त्यांचे हेच कार्य असते.

जर तुम्हाला कोणी व्यक्ती आवडत नसेल तर तुम्ही तिला दोष देणे चालू ठेवता आणि दुसऱ्या कोणाला जर ती व्यक्ती आवडली तर तुम्ही त्यांना सांगता, ' बघा ती व्यक्ती चांगली नाहीये ह.'

आणि हो, असेसुद्धा लोक आहेत की जे अशा निराळ्या प्रकारे बोलतात की तुम्ही त्यांच्या नकारात्मकतेच्या जाळ्यात सापडता. ते म्हणतात, 'पहा बर, मला त्या व्यक्ती विषयी वाईट मत निर्माण करायचे नाही, म्हणून मला त्यांच्याविषयी काही बोलायचे नाही. तुमची त्यांच्याबद्दलची कल्पना किंवा प्रभाव मला खराब करायचा नाहीये.' परंतु नुकसान तर अगोदरच करून झाले आहे.

तुम्ही पहिले का काय झाले ते? तुमच्या मनात शंकेचे बी आधीच पेरून झाले आहे.

म्हणून उच्च उर्जा नसलेले लोक हे बाकी सर्वाना खाली ओढतात जेव्हा त्यांना ठीक वाटत नसते, आणि मग जेव्हा सगळे उदास दिसू लागतात तेव्हा त्यांना आनंद होतो.

हे ते नकळतपणे करीत असतात. त्यांना हे करीत असल्याची जाणीव नसते, त्यांना ते असे करीत आहे हे माहितसुद्धा नसते.

रामायणा मध्ये एक कथा आहे.

भगवान रामाच्या सैन्यातील माकडांना भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान पूल बांधायचा होता आणि संपूर्ण सैन्य त्याच्या तयारीमध्ये जुंपले होते. मग त्यांनी काय केले असेल तर ते प्रत्येक दगडावर 'श्री राम' असे लिहायचे आणि मग तो दगड पाण्यात टाकायचे, आणि तो दगड पाण्यावर तरंगायचा. आता, भगवान राम जेव्हा स्वतः आले, तेव्हा हे सगळे लोक दगडावर त्यांचे नाव लिहित आहेत आणि दगड पाण्यात टाकीत आहे हे बघून त्यांना आश्चर्य वाटले. म्हणून, त्यांनी एक दगड घेतला आणि त्यावर त्यांनी 'श्री राम' असे लिहिले आणि त्यांनी तो दगड पाण्यात टाकला, पण तो दगड बुडाला, तो दगड तरंगला नाही. तेव्हा भक्तांनी त्यांना सांगितले, 'तुम्हाला भक्ती काय ते माहित नाही. आम्ही जे करू शकतो ते तुम्हाला जमणार नाही.'

म्हणून असे म्हटले आहे की भक्त हे एक पायरी वर असतात, आणि त्यांच्यात अमाप शक्ती असते.

या ग्रहावर प्रेम हे सर्वात शक्तिमान आहे.  कोणामुळे, कोणत्याही प्रसंगामुळे, कोणत्याही कारणामुळे ते नष्ट होऊ देऊ नका.

आपले प्रेम इतके दुर्बल असते आणि आपण त्याला इतके नाजूक बनवून टाकतो की काही लोकांच्या नकारात्मक बोलण्यामुळे, त्यांची नकारात्मकता आपल्या डोक्यात घर करते आणि आपण आपली स्वतःची उच्च उर्जा आपल्या हाताने उध्वस्त करू लागतो.

आता याचा अर्थ असा नाही की आपण आंधळे प्रेम करावे. आपली बुद्धी कुशाग्र असायला पाहिजे आणि आपले तर्क योग्य असले पाहिजे, आणि त्याच वेळी आपल्याला मिळालेली सर्वात सुंदर भेट ज्याला प्रेम म्हणतात त्याला टिकवून ठेवले पाहिजे. एका लहान बालकाला आपण कसे जपतो त्या प्रमाणे याचे आपण रक्षण करणे जरुरी आहे.

तुम्ही लहान मुलाला पडण्यापासून आणि हरवण्यापासून कसे जपता? मुल कोणत्या दिशेने हालचाल करीत आहे, कुठे जात आहे आणि काय करते आहे अशा प्रकारे तुम्ही मुलावर संपूर्ण वेळ लक्ष ठेवून त्याचे रक्षण करता. याच प्रकारे आपण आपल्या आंतरिक खजिन्याचे रक्षण करणे जरुरी आहे. एकदा का ते आपल्याला मिळाले की मग आपण त्याचे रक्षण करायला पाहिजे. हे फार महत्वाचे आहे.

चमत्कार घडायला एक संधी द्या. हे असे नाही की तुम्ही बसल्याबसल्या असे म्हणत राहाल ,' मला आताच्या आत्ता चमत्कार घडून पाहिजे' , आणि चमत्कार घडेल. हे असे होत नाही.

माझे तुम्हाला हे सांगणे आहे की जेव्हा तुम्ही चमत्कार होण्याचा हट्ट धरून बसता तेव्हा ते तितकेच बालिशपणाचे जितके कोणी तुम्हाला चमत्कार दाखवून तुम्हाला प्रभावित करण्याचा प्रयत्न करतो.

तुम्हाला चमत्कार दाखवून प्रभावित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि 'मी आता हवेतून वस्तू बाहेर काढीन', असे म्हणणाऱ्या व्यक्तीकडे कधीही जाऊ नका. हे अजिबात योग्य नाही.

चमत्काराच्या मागे धावू नका, परंतु त्याचवेळेस त्यांना घडण्यापासून अडवू नका. जो कोणी केंद्रित आहे, ज्याला कोणाला साक्षात्कार झालेला आहे, ते चमत्कार घडवायचा प्रयत्न करणार नाही. चमत्कार बस्स घडतात; ते जीवनाचा भाग आहे. त्यांना केवळ घडू द्या. कोणालाही प्रभावित करण्याचा किंवा काही निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, हे चांगले नाही.

तुम्हाला कळते आहे का मी काय म्हणतो आहे ते?

त्यामुळे तुमची परिपक्वता आणि तुमच्या चैतन्याचे फुलून येणे दाखवत नाही.

आपल्याला कोणालाही प्रभावित करण्याची गरज नाही. जर कोणी तसे करण्याचा प्रयत्न करीत असेल तर ते तसे नाहीयेत जसे ते स्वतः असल्याचा विचार करीत आहे किंवा त्यांच्याकडून जी अपेक्षा होती तसे ते नाहीयेत.

प्रेम आणि भक्ती यांची शक्ती फार महान आहे. आणि हे सर्व ( सत्संग, सेवा आणि साधना ) ते घडण्यासाठी मदत करतात. सत्संगमध्ये बसा आणि पहा तुमच्यातील उर्जा कशी वृद्धिगत होते ते. प्रेरित करणाऱ्या अनेक गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील.

तुम्हाला सर्वाना किती प्रेरणा देणाऱ्या गोष्टी ऐकायला मिळाल्या, आणि तुम्ही त्या लिहून ठेवायला पाहिजे आणि इतरांसोबत त्या वाटून घेतल्या पाहिजेत कारण त्याने त्यांना प्रेरणा मिळेल.

मी असे का म्हणतो आहे कारण जेव्हा तुम्ही इतरांबरोबर काही चांगली घटना होताना ऐकता तेव्हा तुम्हालासुद्धा उन्नत झाल्याचे वाटते.

आजच्या जगात तुम्हाला सतत इतक्या नकारात्मक गोष्टी ऐकायला मिळतात. तुम्हाला चोरी झाल्याचे किंवा बलात्कार झाल्याचे ऐकु येते. कोणीतरी कोणाला तरी फसवल्याचे तुमच्या कानावर येते, आणि अनेक इतर गुन्हे तुमच्या सभोवती घडत आहे ते तुम्हाला कळते.

जेव्हा तुम्ही हे ऐकता तेव्हा तुमचा जीवनातील रस नष्ट होतो. अनेक तरुण लोकांचा जगण्यातील रस संपुष्टात येतो केवळ या नकारात्मक गोष्टी ऐकून.

उन्हाळ्यात मी कँनडा इथे होतो आणि एक जोडपे मला भेटायला आले.

ते म्हणाले,' गुरुदेव, आमच्या १८ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली. तो अतिशय बुद्धिमान तरुण होता. त्याने एक चिट्ठी सोडली ज्यात त्याने लिहिले ,' आई आणि बाबा, मला हे जग जगण्याकरिता योग्य वाटत नाही. दररोज इतके गुन्हे घडत आहेत. मला या जगात जगायची इच्छा नाही आणि मी या जगाला कांटाळलो आहे.'

त्याने हे मत कसे बनवले हे तुम्हाला माहिती आहे? केवळ बातम्या बघून.

त्याच्या चिट्ठीत त्या मुलाने पुढे लिहिले,'मी तुम्हाला दुःखी कष्टी करीत आहे त्याबद्दल मला माफ करा परंतु मला आता जिवंत राहण्याची इच्छा नाही.' अशी चिट्ठी लिहून त्याने नंतर आत्महत्या केली.

आपण सगळ्यांनी आपल्या सभोवती असलेल्या प्रत्येकाला सकारात्मक बातमी देण्याचा निश्चय केला पाहिजे कारण हे विश्व प्रेम आणि प्रकाश यानेच चालते.

प्रकाश तुमच्याकरिता कितीतरी भेटी घेऊन येतो आणि अनेक चमत्कार त्याने शक्य होतात.

दररोज मला इंटरनेटद्वारे हजारो पत्रे मिळतात ज्यात जगभरातील लोक कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांच्या जीवनात घडलेल्या अचंभ्याविषयी ते सांगतात.

जर मी ही सर्व पत्रे तुमच्यासमोर काढून ठेवली तर ते चांगले दिसणार नाही, तुम्ही तुमच्या अनुभवाविषयी लिहून काढा आणि ते इतरांसोबत वाटून घ्या. ज्यांना अत्यावश्यक आहे अशांसाठी आशेचा किरण आणा.

तुम्हाला गोष्टी बनवून सांगायच्या नाहीयेत. खोट्या गोष्टी निर्माण करणे हे दुसरे टोक गाठणे होईल. हे चांगले नाही. परंतु तुमच्या आयुष्यात जे काही चांगले घडत आहे, निदान ते तरी इतरांच्या आयुष्यात आणा. तुम्ही लोकांना याबाबतीत जागरूक करणे जरुरी आहे.

तुमच्या जीवनात होणाऱ्या चांगल्या घटनाबद्दल तुम्ही लिहून काढा.

थोडक्यात लिहा, फार लांबण लावून लिहू नका. कित्येक वेळा लोक इतक्या मोठ्या गोष्टी लिहितात की तुम्हाला ते पूर्णपणे वाचण्याची इच्छा राहत नाही. केवळ पहिला परिच्छेद वाचल्यानंतर तुम्हाला ते बंद करून ठेवून द्यावे असे वाटते. म्हणून,तुमचे अनुभव अवश्य लिहा परंतु ते थोडक्यात आणि सुटसुटीत लिहा.

तुम्ही तुमच्या माहितीत असलेल्या कोणत्याही अस्सल अनुभवाबद्दल लिहू शकता जो तुम्हाला वाटून घेण्याची इच्छा आहे. याने खरोखर प्रेरणा प्राप्त होईल.

तुम्हाला माहिती आहे जेव्हा तुम्ही कोणतीही अस्सल खरी गोष्ट वाटून घेता तेव्हा त्याचा अतिशय सकारत्मक परिणाम इतरांच्या जीवनावर होतो. अशा प्रकारेच आपण लोकांना प्रकाशाकडे, जीवनाकडे, आणि प्रेमाकडे प्रेरित करणे जरुरी आहे. आधीपेक्षा यागोष्टीची आज फार म्हणजे फार आवशक्यता आहे.

दररोज मला लोकांकडून कितीतरी पत्रे मिळतात.

त्यात काही डॉक्टरांच्या गोष्टी आहेत ज्यांनी आशा सोडली होती आणि ज्यांनी सांगितले की रोगी सहा महिन्यात दगावणार आहे आणि या प्रकाराला अनेक वर्षे होऊन गेल्यानंतर तरीसुद्धा ते रोगी जिवंत आहेत.

अनेक रोगनिवारण झाले आहेत. याची हजारो पत्रे आहेत.

आज आपली मनःस्थिती अशी झाली आहे की आपण या उर्जेच्या क्षेत्रावर अजिबात विश्वास ठेवीत नाही. आता आपण डॉक्टरांनी लिहिलेल्या रासायनिक गोळ्यांवर जास्त विश्वास ठेवतो. तरीसुद्धा आपण कोणतेही टोक गटाने बरोबर नाही. असा विचार करू नका, 'अरे गुरुदेव उर्जेच्या क्षेत्राबद्दल बोलले,म्हणून मी आता कोणत्याही प्रकारचे औषध घेणार नाही. मी सगळी औषधे फेकून देणार.'

नाही! आपण असे वागता कामा नये.

आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, पण त्याच वेळी मी तुम्हाला काय सांगतो आहे चमत्कारांना घडायला एक संधी द्या.

हेच त्याचे सार आहे.