क्षमाशीलता हे कमकुवतपणाचे लक्षण नाही !

30
2012
Jun
बून, नॉर्थ कॅरोलिना
प्रश्न: गुरुजी, कधी कधी मुलांबरोबर धीराने वागणे खूप अवघड होऊन जाते.रोज मी शांत राहण्याचे ठरवते, पण जेंव्हा कठीण परिस्थिती येते, तेंव्हा मला स्वत:ला आवरणे कठीण होते, मी काय करू?
श्री श्री: तुम्ही ‘आत्ता’ त्याबद्दल काहीच करू शकत नाही. तुम्हाला आयुष्य अंत:स्फुर्तीनेच जगावे लागते. लक्षात येतेय का मी काय म्हणतोय ते? कधीतरी राग येणेही ठीक आहे, काळजी करू नका. तुमच्या आयुष्यात ‘थोड्याश्या चुकीलाही’ जागा ठेवा आणि ते स्वीकार करा.
 तुम्ही, पार्ट १ कोर्स मध्ये काय शिकलात? माणसांना आणि परिस्थितीला आहे तसे स्वीकार करा. हि संपूर्ण आयुष्यभराची प्रक्रिया आहे. रोजच्या रोज तुम्ही स्वत:ला याची आठवण करून द्या मग जेंव्हा अशी परिस्थिती तुमच्यासमोर येऊन ठाकते, तेंव्हा तुम्हाला हे आपोआप आठवते, कि ‘ मला अमुक अमुक करायचे आहे’. आपण या अशा मार्गाने जात असतो. कधीतरी थोडेसे इकडेतिकडे घसरतो, पण त्याकडे लक्ष देऊ नका. पुढे चालत राहा. एक दिवशी नक्कीच तुम्हाला ‘बिनचूक’ वागायला जमेल.

एके दिवशी, एक शिक्षक, ज्यांनी २० वर्ष आर्ट ऑफ लिविंग बरोबर काढली आहेत, ते म्हणाले, “ गुरुजी, मी कायम आनंदी असतो हे खूप विचित्र वाटते. काहीही झाले तरी मी आनंदी असतो. आणि म्हणालो, “अखेरीस हे साध्य झाले तर! ” २० वर्ष हा काही कमी काळ नाही पण तरीही ठीक आहे. तुम्हालाही २० वर्ष लागली पाहिजेत असे नाही. मागे वळून पहा आणि तुमच्यामध्ये किती बदल झाला आहे, तुम्ही किती काय नवीन जाणून घेताले आहे आणि तुम्ही किती चांगले माणूस झाला आहात, याचा आढावा घ्या; याचसाठी हे उत्सव आहेत.गुरु पौर्णिमेचे उद्दिष्ट काय आहे? वर्षातून एकदा, तुमची किती प्रगती झाली आहे याची जाणीव करून घेणे, हाच उद्देश आहे. तुम्ही वेगवेगळया परिस्थितीमध्ये कशा प्रकारे प्रतिक्रिया देता, तुमचे अविचारी वागणे कसे कमी झाले आहे आणि विचारपूर्वक, समजुतीने वागणे कसे वाढले आहे, याकडे डोळसपणे बघा. आयुष्य म्हणजे एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे, हो कि नाही?
तुमच्यापैकी किती जणांना असे वाटते आहे कि तुमच्यामध्ये अमुलाग्र बदल झाला आहे.(खूप लोकांनी हात वर केले)

कोणी असे म्हणूच शकत नाही कि काही झाले नाही. कोणीही असे म्हणू शकत नाही कि ‘माझ्यामध्ये काहीच बदल झाला नाहीये. माझ्यामध्ये तसूभरही बदल झाला नाहीये. ‘ जर कोणी असे म्हणत असेल तर तुम्ही त्याचे पायच धरायला हवेत. कारण तो मनुष्य जन्मत:च साक्षात्कारी असला पाहिजे.

काही मुले तुम्हाला खूप काही शिकवण्यासाठीच असतात. आणि आई वडिलांचे त्यांच्यावर नाराज होणेही ठीक आहे. तुम्ही त्यांच्याशी सतत गोड गोड, मधाळ वागणेही अपेक्षित नाही. तुम्ही त्यांना कमकुवत बनवाल. मी असे पालक पाहिले आहेत ज्यांनी कधीच आपल्या मुलांना ओरडले नाहीये. हि मुले जेंव्हा मोठी होतात, तेंव्हा ते कोणत्याही टीकेला तोंड देऊ शकत नाहीत. कोणाची थोडीशी टीका, थोडासा अपमान, थोडेसे अपयश त्यांना हादरवून टाकते. कारण त्यांनी असे काहीच कधी घरी अनुभव केलेले नसते. म्हणून घरी कधी कधी (नेहमी नाही) , मुलंवर नाराज होणे ठीक आहे. हे म्हणजे त्यांना ‘लस’ देण्यासारखे आहे, कि मोठे झाल्यावर बाहेरच्या जगात सक्षम आयुष्य जगू शकतील.पण म्हणून याचे निमित्त करून मुलांना सारखे रागावू नका, त्याचाही काही उपयोग होत नाही. त्याचाही अतिरेक वाईटच. तुम्ही तुमच्या मुलांना रोज ओरडत असाल तर ते कोडगे होतात आणि ते पूर्णपणे दुसऱ्या टोकाला जातात.हेही चांगले नाही. थोडीशी मात्राच ठीक राहील.


प्रश्न: आपला जीवांसाठी निवडताना ज्योर्विद्येला किती महत्त्व द्यावे?
श्री श्री: ते चांगले आहे. तुम्ही पत्रिकेवरून तुलना करू शकता कि तुमचे आपसूक किती गुण जुळतील आणि किती ठिकाणी तुम्हाला तडजोड करावी लागेल.
बऱ्याचदा, वेदिक ज्योतिष शास्त्रामध्ये असे म्हणतात, कि ‘ ३० गुणांपैकी २० गुण जुळतात आणि १० तुम्हाला तडजोड करून जुळवावे लागतात.’ म्हणूनच हे गणित आहे. हे माहीत असणे चांगले., म्हणजे जर एक नाराज झाला तर तुम्हाला आठवण येईल कि तुम्हाला अजून थोडी तडजोड करण्याची गरज आहे.
ग्रह ताऱ्यांचा प्रभाव नक्कीच असतो पण तो एकतर्फी नसतो. तुमचा सुद्धा या ग्रहावर प्रभाव पडतो. हे दुतर्फा आहे. या जगात सर्व काही दुतर्फा आहे.
मग तुम्ही काय करायला पाहिजे? तुम्ही नामजप करा, मंत्र पठण करा. म्हणूनच असे म्हणतात कि ‘ओम नम: शिवाय’ हा मंत्र सर्व ग्रहतार्यांचे नियमन करतो. सर्व ग्रहांच्याही वरती शिवतत्त्व आहे. तिथे नक्कीच उपाय उपलब्ध आहे. हा उपाय म्हणजे ‘ ओम नमः शिवाय’ या मंत्राचा जप. कारण त्यामध्ये सर्व पंचमहाभूतांचा समावेश आहे जे सर्व वाईट प्रभाव निकामी करतात. तुम्हाला माहिती आहे का कि १०८ हा आकडा कुठून आला ते? तुमच्यापैकी किती जणांना १०८ चे महत्त्व माहिती नाहीये? १०८ म्हणजे ९ ग्रह (नवग्रह) आणि त्यांची १२ घरे, राशी.जेंव्हा हे ९ ग्रह १२ राशिन्मधून फिरतात, तेंव्हा १०८ वेळा त्यांची स्थिती बदलते.म्हणून त्या परिस्थिती मुळे होणारे अपायकारक प्रभाव मिटवण्यासाठी आपण ‘ ओम नम: शिवाय’ चा जप करतो. ते म्हणजे एका कवच सारखे आहे. हा अत्यंत पवित्र असा मंत्र आहे. अगदी या सभामंडपा पर्यंत येणाऱ्या पायऱ्याही १०८ आहेत. म्हणजेच तुम्ही सर्व ग्रह ताऱ्यांचा प्रभाव मागे सोडून संपूर्ण चेतनेची अनुभूती करता. जर सर्व काही ग्रहगोलांचे परिणाम आहेत तर मग साधना, प्राणायाम, ध्यान, सत्संग, मंत्रजप, भजन हे सगळे करण्याचे काय प्रयोजन? हे त्याचा प्रभाव निष्प्रभ करते आणि तुम्हाला जास्त स्वातंत्र्य मिळते. नाहीतर आपली चेतना हि काळ आणि अवकाश यावर अवलंबून असते. साधनाही खूप प्रमाणात स्वातंत्र्य देते. मी अगदी १००% म्हणणार नाही, पण खूप प्रमाणात. हे म्हणजे, पाऊस पडतो आहे आणि तुम्ही बाहेर जात आहात, तर तुम्ही निवाडा करू शकता, तुम्ही बाहेर जाऊन भिजा किंवा रेनकोट घाला आणि भिजू नका.


प्रश्न: जर तुम्हाला लग्न करण्याच्या निर्णयाबद्दल खात्री नसेल तर तुम्ही प्रवाहाबरोबर वाहत जाऊन लग्न करावे का तुम्ही खात्री होईपर्यंत थांबावे?
श्री श्री : तुम्ही ज्याच्याबरोबर लग्न करणार आहात त्याला विचारा. काही लोकांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता नसते., त्यांना सगळ्यासाठी कोणीतरी धक्का देण्याची गरज असते, अगदी लग्नासाठी सुद्धा. आणि एकीकडे दुसरे असतात जे क्वचित अशा परिस्थितीत सापडतात. मी निवाडा तुमच्यावर सोडतो. आणि एकीकडे हे दुसरे असतात, ज्यांना कधीही सुंदर मुलगी/मुलगा दिसले कि लग्न करायचे असत आणि जेंव्हा त्या दिशेने काही ठोस घडू लागते, त्यांच्या मनात शंका कुशंका येऊ लागतात, कि हे चांगले आहे का अजून कोणीतरी चांगले मिळेल. इथे मी पुन्हा सांगेन, कि तुमच्या साथीदाराचे मत विचारात घ्या, त्यांना तुमच्यासारख्या निर्णय न घेऊ शकणाऱ्या माणसाशी लग्न करायचे आहे का? तुम्हाला माहीत आहे ना या अशा प्रश्नांना माझे काय उत्तर असते ते? निवड तुमची, आशीर्वाद माझे ! Category: Confusion, Relationships, Marriage


प्रश्न: मला फ्लोरिडा येथील मायामी मध्ये ‘प्रीसन स्मार्ट प्रोग्राम’ करायचे आहेत. गुन्हेगारी प्रवृत्ती आणि मानसशास्त्र यांचा मी अभ्यास केला आहे. आमच्या राज्यात खूप पैसा हा तुरुंग, बिल्डिंग आणि शिक्षण यासाठी राखून ठेवला आहे. मी कशा प्रकारे मदत करू शकतो?
श्री श्री : हे चांगले आहे. जेंव्हा तुम्ही तुरुंगाच्या अधिकाऱ्यांना भेटायला जाल, तेंव्हा एकटे जाऊ नका. ४ ते ५ लोक एकत्र मिळून जा, त्यांच्याशी बोला आणि त्यांना आपले म्हणणे पटवून द्या. त्यांना व्हिदिओ दाखवा आणि दाखवून द्या कि ज्या लोकांनी हा प्रोग्राम केला आहे त्यांच्या आयुष्यामध्ये किती आणि काय बदल झाला आहे. मला माहितीये, कि हे अनुभव पाहिल्यावर कुठलाही शहाणा माणूस त्याला नाही म्हणू शकणार नाही. ते अनुभव फारच छान आणि कोणाच्याही थेट हृदयाला भिडणारे आहेत.
Category: Art of Living Courses

प्रश्न: मृत्यूला वय नसते. मग जेंव्हा एखादा माणूस मरण पावतो, लहान किंवा म्हातारा, त्यांचा आत्मा त्याच वयाचा असतो का?
श्री श्री : आत्म्याला वय नसते आणि तुम्ही म्हणालात तसे मृत्यूलाही वय नसते. मृत्यूला वेळ नसते आणि आत्म्याला वय नसते. बरोबर आहे! सगळे काही आरंभापासून सुरु होते. Category: Death.

प्रश्न: जेंव्हा गोष्टी खूप न समजणाऱ्या, संदिग्ध असतात तेंव्हा मला त्याबद्दल ज्ञान कसे होईल?
श्री श्री: चायनिज भाषेमध्ये एक म्हण आहे, ‘जेंव्हा तुम्ही खूप गोंधळून जाता, तेंव्हा उशी घेऊन झोपून जा. दुसऱ्या दिवशी जेंव्हा तुम्ही उठाल, तेंव्हा तुम्ही खूप चांगले असाल.’ तुम्हाला माहितीये का, कि आपली महत्त्वाकांक्षा, आपली अति महात्त्वाकांक्षा आपल्याला निवाडा करू देत नाही. मला एक SMS आला होता. एक भक्त एका श्रीमंत माणसाच्या घरी गेला होता आणि त्यांनी विचारले कि ‘ तुम्ही काय घेणार? कॉफी, चहा, कोक, दुध, ओजास्वीता, आणि बरेच काही. मग त्या भक्ताने उत्तर दिले’ चहा’. मग तो म्हणाला, ‘कोणता चहा, सिलोन चहा, फळांच्या स्वादाचा, दर्जीलीन्ग्चा, भारतीय का बर्माचा चहा?’ तो म्हणाला ‘सिलोन चहा’.मग त्यांनी विचारले, ‘ तुम्हाला कला चहा, दुधाचा चहा, थंड चहा का लिंबू घातलेला चहा हवा आहे? तो म्हनला, ‘ दुधाचा चहा’. ‘कोणते दुध पाहिजे?’ प्रक्रिया केलेले, न प्रक्रिया केलेले, निरसे, २%, २.५% का १०% स्निग्धता असलेले? तो म्हणाला , ‘ अरे बापरे, मला काळा चहाच द्या’. ‘मग तुम्हाला त्यामध्ये साखर हवी आहे का? ‘ तो हो म्हणाला. मग ते म्हणाले, कोणती साखर? पंढरी साखर, ब्राऊन साखर का मध?’ तो म्हणाला, ‘ तहानेने माझा जीव चालला आहे.’ मग त्या माणसाने विचारले, ‘तुम्हाला कसे मरायचे आहे? आमच्या कंपनीचे भागीदार होऊन का आम्हाला माल पुरवून? ‘ तात्पर्य काय तर ,जर का निवड करायला खूप गोष्टी असतील, तर बुद्धीचा पार गुंता होऊन जातो. Category: Confusion, Choice Insert Text Box 2

प्रश्न: मी तुमच्या भोवताली खूप लोक बघतो, जे तुमच्या खूप जवळ असतात. मला असे वाटते कि मी काही खास नाही. मला तुमच्याबद्दल आपुलकी कशी वाटेल? या मार्गावर १००% झोकून देण्यासाठी ती आपलेपणाची भावना असणे गरजेचे आहे असे मला वाटते.
श्री श्री : काही गोष्टी तुम्हाला मानून चालाव्या लागतील आणि हि त्यातलीच एक गोष्ट आहे.--- आपल्यामध्ये खूप जिव्हाळा आहे, संपले.आता पुन्हा हा प्रश्न विचारू नका. तुमच्या संबंधाबद्दल शंका घेण्याचे कारण नाही. आपण नक्कीच जोडलेले आहोत.यामध्ये काही शंकाच नाही. ते तुझ्या किंवा माझ्या कोणाच्याच हातात नाहीये. म्हणून शांत राहा, हा प्रश्न जर तुला त्रास देत असेल तर सोडून दे तो विचार. असा विचार करू नकोस कि काही लोक माझ्या जवळचे आहेत आणि काही लांबचे. प्रत्येकजण वेगळा आणि खास आहे.
कोणत्यातरी प्रकल्पामध्ये स्वत:ला गुंतवून घे. तू हे जेवढे जास्त करशील, तेवढे आपल्याला एकमेकांशी संपर्कात राहावे लागेल. नाहीतर एकमेकांशी बोलण्यासारखे आहे तरी काय? काय, बरे आहे न? तुम्ही म्हणणार ‘हो बरे आहे’ आणि आपण वेगळे होणार. पण जर तुम्ही काहीतरी करत असाल, जसे सुशांत त्वितर वर करतो आहे, मी त्याला बोलावून विचारले, ‘ हे मलाही शिकायचे आहे.’ सुशांत ला पुरस्कार मिळाला आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? तो ओबामांच्या प्रचारात होता आणि त्याने काही कामहि केले आहे, त्याबद्दल २च दिवसांपूर्वी त्याला पुरस्कार मिळाला आहे. जेंव्हा सार्वजन विचारात पडले होते, तेंव्हा त्याने एक नवीन कल्पना मांडली. आणि त्याच्या या वेगळ्या दिशेने विचार करण्यामुळे कंपनी ने त्याला बक्षीस दिले आहे.

म्हणून, असा काहीतरी प्रकल्प हातात घ्या. तुम्हाला जे आवडेल ते करा. आत्ता मीनाक्षी एक खूपछान स्वयंपाक कलेचे पुस्तक घेऊन आली आहे. ते खरे तर पुस्तक नाहीये, तर वेगेवेगली पाने आहेत कि पदार्थ बनवताना ते समोर ठेवून सुरुवात करता येईल. हा एक प्रकल्प आहे. अशाच प्रकारे सर्वांनी एकत्र येऊन काही सुरु केले तर काहीतरी बसून बोलता येईल. नाहीतर मौन, ध्यान यामधून आपण जोडलेले आहोतच. आणि तुम्हाला कधीही मदत हवी असते, तेंव्हा ती तुम्हाला मिळते का नाही? किती जणांना मिळते? (सगळे जन जात वर करतात). बघा, सगळ्यांना मिळते. म्हणजे मी माझे काम नीटपणे करत आहे.
Category: Guru, Sri Sri Ravi Shankar, Spiritual Master, Doubt.


प्रश्न: माझ्या मानत खूप वेडेवाकडे विचार चालू असतात. त्यामुळे काही नुकसान होईल का?
श्री श्री : काळजी करू नका. ते विचार म्हणे स्वत:ची ओळख बनवू नका. विचार येतात आणि जातात. जोवर तुम्ही त्याकडे लक्ष देत नाही, त्यानुसार आचरण करत नाही, तोवर तुम्ही सुरक्षित आहात. संपूर्णपणे विरक्त होऊन सुखादुक्खाच्या पली कडे जाण्यासाठी, हे असे विचार मनातही न येण्यासाठी, तुमच्या चेतनेला वेळ लागेल. ते लगोलग होत नाही. मी सांगतो कि त्याला वेळ लागेल. तुम्हाला जाणवले असेल कि जशी तुमचे साधना चांगली होते, तसे अश्या प्रकारचे विचार कमी कमी होत जातात. वेडेवाकडे, विध्वंसक विचार कमी कमी होत.
Category: Thoughts, Lust, Sex, Sadhana

प्रश्न: या उद्घानाच्या दिवशी मला आशीर्वाद मिळाल्यान मी धन्य झालो आहे. हे खूप छान आहे. प्रत्येक वाक्याने माझे मन जिंकून घेतले आहे. माझी बहिण आणि पालक यांना मी धन्यवाद देतो, जे ध्यान आणि समर्पित वृत्ती आणि सेवा यांचे स्वरूप आहेत. मी कधी इथे येईन असे मला वाटले नव्हते. मला माझ्या आर्त ऑफ लीविग्न्च्या शिक्षकांना, बंधू आणि भगिनींना धन्यवाद द्यायचे आहेत. त्यांनी वेळोवेळी मला या मार्गावर राहण्यासाठी प्रेरणा दिली आहे. माझे आणि माझा मुलगा, यांनी मला खूप सहकार्य केले. त्यांना मी माझे प्रथम गुरु मानते. त्यांनी मला ‘साक्शिभावामधे जगणे शिकवले. या सगळ्यासाठी खूप खूप आभार.
श्री श्री : हे चांगले आहे. हेच आपण ओळखायला शिकले पाहिजे.आपली सांगत हि फार महत्त्वाची आहे. आपले मित्र, नातेवाईक, आपल्याला उंचीवर नेऊ शकतात किंवा आपल्याला पार तलागालात नेऊ शकतात. जर का कोणी जास्त नकारात्मक होत असेल तर त्याला वर उठवण्याचा प्रयत्न केला पाहिजेत. त्यांना या नकारात्मक वृत्तीन मधून बाहेर काढले पाहिजे. अशा नकारात्मक वृत्ती सहज बळावल्या जातात, दोषारोप करणे, तक्रार करणे हे सगळे त्यापाठोपाठ येते. पण हे ज्ञान जे आहे ते खूप मौल्यवान आहे. जेंव्हा आपण जास्तीत जास्त त्यामध्ये गढून जातो, आपल्याला वर उठण्याची शक्ती मिळते आणि आपल्याबरोबर दुसऱ्यांनहि आपण घेऊन चालतो.

सर्वसाधारणपणे औपाचारिक समारंभ हे खूप कंटाळवाणे असतात., अर्धे लोक झोपून जातात तर उरलेले डुलक्या घेत असतात. पण आजचा कार्यक्रम मात्र छान झाला, सार्वजण एकदम उत्साही होते.आणि दुसरी गोष्ट म्हणजे, सगळे श्रेय वक्य्तांकडे जात नाही तर श्रोतेही तेवढेच महत्त्वाचे आहेत. चांगले श्रोते हे वक्त्या मधले चांगले गुण वर आणण्यासाठी प्रेरणादाई ठरतात. त्यामूळे जेंव्हा तुमच्यासारखे चैतन्यदायी, जागरूक, सहृदय श्रोते, अत्यंत चांगल्या उद्देशाने इथे जमा असताना वक्त्यांनी चांगले सुयोग्य भाषणे केली यात फारसे नवल नाही. नेहमीच वक्ते आणि श्रोते यांच्या मिलाफातून कार्यक्रम चांगला होत असतो. आणि कितीही चांगले वक्ते असले आणि तेवढे चांगले श्रोते नसतील, तर योग्य ते शब्द बाहेरच पडणार नाहीत. त्यांना अडथळा होईल.
Category: Gratitude, Overcoming negative emotions.

प्रश्न: ज्यांना आपण टाळू शकत नाही, अश्यांच्या प्रती जर राग आणि द्वेष असेल, तर काय करावे?आणि विशेषकरून जर दोघांच्यात खूप प्रमाणात मतांची भिन्नता असेल तर?
श्री श्री: प्रथम तुमच्यातील भव्यतेचा, विशालातेचा अनुभव करा. जर तुम्ही तुमच्या तल्या विशालातेवर आणि तुमच्या अंतरंगात असलेल्या सुंदरतेवर विश्वास ठेवलात, तर तुम्हाला अशा परिस्थितीचा सामना करणे सोप्पे जाईल. पण जर तुम्ही स्वता:च्या अंतरंगात न पाहता, फक्त दुसऱ्यांच्या वागण्यावारच लक्ष केंद्रित केलेत, तर नक्कीच तुम्हाला त्याचा त्रास होईल. मग तुम्ही समोरच्या माणसाला बदलण्याचा प्रयत्न करता आणि तुम्ही त्यामध्ये अपयशी होता. जी मनसे तुम्हाला वैतागून सोडतात, कुठल्या न कुठल्या प्रकारे ते तुमच्यातील चांगले गुण वर आणत असतात. त्यांच्यामुळे तुमच्यामधील हुशारी आणि कौशल्य पणास लागते. जेंव्हा तुमच्या आजूबाजूला सर्व काही उत्तम असते, तेंव्हा तुम्हाला कुठल्या कौशल्याची गरज नसते. पण जेंव्हा तुम्हाला वाटते कि तुमच्या सभोवतालची माणसे फारच अव्यवहार्य वागत आहेत, तेंव्हाच हे घडते. हा एक प्रकारे अभ्यास आहे, परीक्षा आहे.

मला माहीत आहे कि हे सोपे नाही पण कमीतकमी तुमचे चित्त तरी अविचलित राहील. मी “Celebrating Silence आणि Celebrating Love,या २ पुस्तकांमध्ये याबद्दल बोललो आहे. जेंव्हा तुमच्या आतमध्ये खोलवर तुम्हीत्या माणसाचा स्वीकार करता, तेंव्हा समोरचा माणूसही हळू हळू बदलू लागतो. हे विचित्र आहे, पण सत्य आहे. जेंव्हा आपण बदलतो, तेंव्हा ते बदलतात.
Category: Anger, Relationships

प्रश्न: मी माझ्या घरच्यांसाठी खूप काही करतो पण तरीही ते सतत मला नावे ठेवतात. मी काय करू?
श्री श्री : असे म्हणू नका ते कायम तुम्हाला चूक ठरवतात. जर ते नेहमीच तुम्हाला चुकीचे बोलत असले तर ते तुमच्या लक्षातही येणार नाही किंवा तुम्हाला त्याचा अजिबात त्रासही होणार नाही. तुम्ही तो त्यांचा स्वभावाच आहे म्हणून स्वीकार कराल. कधीतरी तुम्ही योग्य ते केले आहे, असे ते म्हणाले असतीलच न. जेंव्हा ते तुमचे कौतुक करतात, तेंव्हा जर का तुम्ही त्या कौतुकाचा स्वीकार करता, तर तुम्हाला त्यांच्या टीकेचाही स्वीकार करायला हवा. तुम्हाला कोणतातरी मधला मार्ग शोधायला हवा.

तुम्हाला माहितीये, बऱ्याचदा आपण कुठलीही समस्या हि कायमच आहे असे ठामपणे मानून चालतो आणि बाहेरच्या(भौतिक) जगाशी त्याचा संबंध जोडतो. ‘काय हे, मी नेहमीच चुकीचे वागतो’, ‘ मी नेहमी बरोबरच असतो’, ‘ मी असाच आहे’, ‘सगळेजण वाईट आहेत’. हे अगदी सामान्यपणे आढळते. आपण त्याच्यातून बाहेर पडून त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. फक्त स्मित करा. तुम्हाला त्यांचे बोलणे अयोग्य वाटत असेल आणि ते जर सतत तुमच्यावर टीका करत असतील तर फक्त स्मित करा. त्याचा त्रास करून घेऊ नका. त्याना योग्य ती शिकवण द्या आणि विसरून जा आणि आपल्या मार्गावर चालत रहा. तुम्ही काय करू शकता? प्रत्येक वेळेला जेंव्हा तुम्ही ध्यानासाठी बसता, कोणीतरी येऊन म्हणते ‘ हे काय डोळे मिटून बसला आहेस. याने काही होत नाही. तू हे करू नकोस. ‘ त्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही उठा, स्मित करा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ध्यानाला बसा. बोलणारे लोकांमध्ये बदल घडून येईल.
Category: Blame, Right and Wrong. Insert Text Box 3


प्रश्न: जर प्रेम हा आपला स्वभाव आहे, तर आपल्याशी वाईट वागणाऱ्या माणसाला दुखावताना बरे का वाटते? दुसऱ्यांवर सूड उगवण्या पासून स्वत:ला कसे आवरू शकू?
श्री श्री : परत, तुम्ही ‘निस्सीम साधकाच्या अंतरंग वार्ता’ हे पुस्तक वाचा. मी या विषयावर खूप काही बोललो आहे.

तुम्हाला हि साखळी अशीच चालू राहायला हवीये का?ते तुम्हाला दुखावतात, मग तुम्ही त्यांना आणि ते परत त्याचा सूड घेतात. तुम्हाला असे आवडेल का? मी प्रश्न विचारतोय.

तुमच्याकडून चुकून चूक झालेली आहे. समजा, तुमच्याकडून काहीतरी चुकले आहे आणि कोणी सूडबुद्धीने तुमच्याशी वागायला सुरुवात केली. तुम्ही जे केले किंवा बोललात त्याने ते खोलवर दुखावले गेले आहेत, तुम्ही हजार वेळेला क्षमा मागितलीत आणि तरीही त्यांना बदला घ्यायचा आहे, तर तुमची मन:स्थिती कशी होईल? तुम्हाला ते आवडेल का? तुम्ही दुसऱ्या माणसाच्या ठिकाणी स्वत:ला ठेवून बघा. तुम्ही विचार कराल, “ नाही, मी माफी मागितली, मी क्षमायाचना केली.’. असा विचार करा कि कोणी तुम्हाला तुमच्या चुकून झालेल्या छोट्याश्या चुकीसाठी माफ केले नाही, तर तुम्हाला ते आवडेल का? जर तुम्हाला माफ केलेले आवडेल तर मग तुम्ही कसे माफ करू शकत नाही? आणि हे, दुसऱ्याला दुखावून मजा घेणे योग्य नाही. हे म्हणजे तुम्हाला तुमच्याकडे लक्ष वेधून घ्यायचे आहे, इतकेच. हे तुम्हाला सुधारायला हवे. हि आपल्या वृत्तीमधील विकृती आहे. दुसर्या कोणाला दु:ख्खी करून आपण मजा करणे हि एक विकृती आहे. “बघ, तू मला दु:ख्ख दिलेस मग मीही तुला दुख्खी करणार.’अशा प्रकारचा आनंद तुमच्यासाठी नाही. तो थोड्या काळा साठीचा आनंद आहे, जो तुम्हाला कितीतरी जास्त दु:ख्ख देऊन जातो, म्हणून त्याच्या मागे लागू नका. आनंद प्राप्तीचे याहून खूप चांगले मार्ग आहेत. जेंव्हा तुम्ही क्षमा करता, तेंव्हा त्यामधून किती मोठा आनंद आणि सौख्य मिळते ते. जेंव्हा कोणीतरी तुमच्या कडे येउन्माफी मागते, तेंव्हा त्याला क्षमा करणे हा तुमचा मोठेपणा आहे. मी तुम्हाला सांगतो, मोठेपणा हा माफ करण्यामध्ये आहे आणि तेच आपण करतो.

आणि नंतर तरीही जर का ते तसेच चुकीचे वागत राहिले, तर मग काठी हातात घ्या, त्यांना आव्हान द्या, कोर्टात जा काही करा. पण आधी एखाद्याला चूक सुधारण्याच्या बऱ्याच संधी दिल्या पाहिजेत. क्षमाशीलता हे कमकुवतपणाचे लक्षण नाही; त्याला आपण गृहीत धरता काम नाही. तसेच क्षमा न करण्याने तुम्ही चांगले बनणार नाही.
Category: Relationship, Forgiveness, Compassion


प्रश्न: २ मुले असलेल्या पण तणावपूर्ण लग्न संबंधाला कसे सामोरे जावे? या तणावपूर्ण परिस्थितीत अडकलेल्या २ छोट्या मुलींना कसे मार्गदर्शन करावे आणि कसा दिलासा द्यावा?
श्री श्री: जेंव्हा लग्न तुटतात, तुम्हाला मुलांच्या मानसिकतेशी फार काळजीपूर्वक सांभाळून घ्यावे लागेल. बऱ्याचदा पालक आपला राग त्या छोट्या मुलांवर काढतात. ते आपल्या जोडीदाराबद्दल मुलांशी वाईट बोलतात जेणेकरून मुले कायम त्यांच्याबरोबर राहतील. हे असे करू नका. त्यांना सांगू नका कि तुमची आई किंवा बाबा वाईट आहेत. त्यामूळे त्यांना काहीच मदत होणार नाही .

तूम्ही दोघांनी मिळून त्यांना समजवायला हवे कि, ‘ कि आम्ही वेगवेगळे रस्ते निवडले आहेत. पण आम्ही दोघे मिळून तुमची काळजी घेऊ.

‘ हि खूप नाजूक परिस्थिती असते, पण थोड्या काळापुरतीच असते. तुम्हाला माहीत आहे न कि हा अवघड काळ हि निघून जाईल; तुम्हाला हे नक्कीच माहीत असले पाहिजे. फक्त धीर धारा आणि भाकी करा. तुमची भाकी, ध्यान, तुमची साधना, या सगळ्याची तुम्हाला मदत होईल. ठीक आहे?

कधीकधी आपल्याला आयुष्यातले कटू सत्य पचवावे लागते पण त्यात अडकून न पडतात योग्य दृष्टीने त्याकडे पहावे लागते. तुमच्या मुलांना सुद्धा भविष्याचा विशाल दृष्टीकोन द्या. त्यांना भविष्यातील चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवलेत तर ते वर्तमानातील कटू क्षणांकडे लक्ष देणार नाहीत आणि दु:ख्खी हा होणार नाहीत.त्यांना चांगल्या भविष्याची स्वप्ने दाखवा, मोठे झाल्यावर त्यांनी काय करावे याबद्दल बोला किंवा देशाला कशाची गरज आहे याबद्दल बोला. जेंव्हा तुमच्यासमोर मोठ्ठी आव्हाने किंवा किंवा मोठ्ठ्या समस्या येतात तेंव्हा छोट्या वैयक्तिक घटना मागे पडतात. हि परिस्थिती हाताळण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. Category: Marriage, Relationships


प्रश्न: छोटी पूजा न करता मोठी पूजा करण्याचे काय प्रयोजन आहे?
श्री श्री : हे म्हणजे तुमचे रोजचे ध्यान आणि पार्ट २ कोर्स मधले मोठ्ठे ध्यान.. तसे आहे. प्रत्येकाचा आपला एक प्रभाव आहे. पूजा खूप मोठ्ठ्या असल्या पाहिजेत असे नाही, पण त्या खूप लोकांसाठी केलेल्या असतात, एका साठी नाही.

प्रश्न: आपण क्रिये नंतर उजव्या बाजूला का वळतो आणि डाव्या का नाही? मी हा प्रश्न खूप लोकांना विचारला, पण कोणीही याचे उत्तर दिले नाही.
श्री श्री: ओह, ते हुशार आहेत. त्यांची अपेक्षा आहे कि तुम्ही टीचर ट्रेनिंग कोर्स ला यावे. तिथेच आम्ही हे सर्व बोलतो. हि सगळी मोठी रहस्ये आहेत.