अस्पर्श रहा

21
2013
Jul
मोन्त्रेअल, कॅनडा

प्रश्न: गुरुदेव, मला असे सांगण्यात आले आहे कि, मानवी आत्म्यालामुक्ती मिळण्यासाठी एक ते दोन दश लक्ष वर्षे लागतात. रोज क्रिया आणि ज्ञान करून हि मुक्ती एका जन्मात मिळविता येते हे खरे आहे काय?

श्री श्री : प्रत्येक गोष्ट हि एका अदभूत कर्माने बांधलेली असते.तुम्ही डोळे वाट करून या कडे लक्ष देण्याची गरज आहे.

येथे मला एका सुंदर काव्य-पंक्तीची आठवत झाली आहे, त्यात असे म्हटले आहे कि , ' या जगात सर्व आवश्यक एवढी संपत्ती आहे, पण ज्याच्याकडे कर्माचे पुण्य नाही, त्याला ती मिळू शकत नाही'.

म्हणून, तुम्हाला येथे जे काही मिळते किंवा जे मिळत नाही , ते अदभूत कर्मावर अवलंबून असते.

प्रतिष्ठा, पैसा, सत्ता, नातेसंबंध, आरोग्य हे सर्व उत्पत्तीच्या काही कायद्यावर अवलंबून असते.

जेंव्हा चांगली वेळ येते तेंव्हा तुमचे कट्टर शत्रू तुम्हाला मदत करतात आणि जेंव्हा वाईट वेळ येते तेंव्हा तुमचे चांगले मित्र हे शत्रूसारखे वागायला लागतात. ह्या सर्व गोष्टी काही कर्मामुळे घडत असतात.

हुशार माणूस या सर्वात न अडकता, तो आपले काम चालू ठेवतो आणि पुढे जात राहतो.

या साठी जे काही आवश्यक श्रम लागतात ते करून तुम्ही ते सोडून द्यायला पाहिजे.

तुम्हाला हे माहित आहे काय कि भगवान श्रीकृष्ण यांनी तीन वेळेला महाभारतातील युद्ध थांबवायचा प्रयत्न केला होता ?

जेंव्हा कोणीतरी भगवान श्रीकृष्णांना म्हणाले कि, ' जेंव्हा काहीही झाले तरी हे युद्ध होणार हे तुम्हाला माहित होते , तरी तुम्ही ते थांबविण्याचा तीन वेळा प्रयत्न का केलात? तिन्हीवेळा तुमची शिष्टाई फसली तरी तुम्ही का गेलात? ' असा एक चांगला प्रश्न त्यांना केला गेला. 

भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ' जर मी गेलो नसतो तर असा प्रश्न उपस्थित झाला असते कि तुम्ही जर शांततेच्या वाटाघाटी करू शकत होता तर तुम्ही त्या का केल्या नाहीत?'

तुमची तुमच्या कर्माविषयी काही कर्तव्ये असतात आणि ती तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत पार पाडावी लागतात !

समजा जर भगवान श्रीकृष्णांची शिष्टाई सफल झाली असती तर, सारे महाभारत तिथेच संपले असते आणि मग गीता कधीच सांगितली गेली नसती ! भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेले ते दैवी गीत (भगवत गीता) मग कधीच या जगात अवतीर्ण झाली नसती ! 

म्हणजे, गीता सांगावी लागणार आहे हे माहित असून सुद्धा आणि हे युद्ध होणार आहे हे सुद्धा माहित असून सुद्धा भगवान श्रीकृष्ण हे शिष्टाई करायला गेले होते. कारण तो आमचा धर्म आहे, तो आमचा स्वभाव आहे. आपण आपले प्रयत्न करीत राहायला पाहिजे आणि त्याच्या परिणामाची पर्वा करता कामा नये.

मी काय म्हणतोय ते लक्षात येत आहे काय? हे महत्वाचे आहे कारण या न त्या कारणाने मनुष्य मायेच्या भ्रमात अडकत असतो.

काल तुमच्यापैकी काही लोकांनी भिंतीवर काही चित्रे काढली होती. पाच ते सहा वर्षांनी या भिंतीला परत रंग द्यावा लागेल. त्यावेळी तुमच्या या चित्रांवर दुसरी चित्रे काढली जातील. 

त्याचप्रमाणे, तुम्ही जेंव्हा तुमच्या बगीच्यात काही झाडे लावता त्याबरोबर तेथे गवत पण वाढते. तुम्ही मग ते गवत काढून टाकता. आणि परत जेंव्हा तेथे गवत उगवते तेंव्हा तुम्ही असे म्हणू शकत नाही कि, 'अरे मी तर आताच बाग साफ केली होती पण परत गवत उगवले आहे! ' हे अगदी नैसर्गिक आहे.

मलीन होणे हा शरीराचा गुणधर्म आहे. आंघोळ केल्यावर तुम्ही असे म्हणू शकत नाही कि , ' बस, मी आता सर्व वर्षाची आंघोळ केली आहे.' तुम्ही परत, परत आंघोळ करायची गरज असते.

त्याप्रमाणे, तुमच्या मनाला सारखे मारून मुटकून ज्ञानाची कास धरायला लावली पाहिजे. ते ज्ञानाच्या चार खांबांमधून सहज सुटू शकते.ते चार खांब कोणते तर, विवेक, वैराग्य, आत्म-सैयम आणि जे आहे त्यात समाधानी असणे ( जे आपल्याकडे नाही त्याबद्धल दुखी न होणे) हे होय.आणि मग मोक्षाची अपेक्षा ठेवणे. म्हणून मनाला सारखे ज्ञानाची कस धरायला लावणे! अचानकपणे तुमच्या असे लक्षात येईल कि ज्ञान तर तेथेच आहे.

जेंव्हा तुमचे या कडे दुर्लक्ष होते, तेंव्हा ती एक पायरी असते.

हे सर्व समजून सुद्धा जेंव्हा तुम्ही मायेच्या भ्रमात फसता, तेंव्हा तुमच्या त्या फसण्याचे वाईट वाटून घेऊ नका कारण तसे फसणे अगदी साहजिक आहे. ' अरे, मी ज्ञानाचा उपयोग केला नाही' किंवा ' दुसरे कोणी तरी चूक असेल किंवा मी चूक असेल ! ' असे म्हणू नका.

हि प्रवृत्ती आपल्या समाजात, आपल्या देशात काही काळापासून दिसून येत आहे. आपल्याला त्यातून बाहेर पडणे आवश्यक आहे. काही वेळा तुम्ही त्यातून बाहेर पडता तर काही वेळा तुम्ही त्यात अडकून जाता, होय कि नाही? त्यातून बाहेर पडा आणि मग त्याकडे वस्तुनिष्ठ दृष्टीने पहा. ह्या क्षणाला हे असे आहे कारण आपल्याकडे फक्त हा क्षण आहे ! 

आता क्षणी काही अप्रिय गोष्ट घडत असेल किंवा काही चांगली गोष्ट घडत असेल , मी त्याचा एक केवळ एक साक्षीदार आहे. आणि जर माझे मन त्या मायेच्या भ्रमात अडकून जात असेल तर त्या घटनेचा पण मी केवळ साक्षीदार आहे.

आणि या पद्धतीने तुम्ही परिस्थितीवर मात करता !

योग-सूत्र सांगणारे महर्षी पतंजली म्हणतात, ' स तू दीर्घ काल नैरंताय्रा सत्कार्सेवितो दृढ भूमिय'.

 प्राणायाम, ध्यान आणि ज्ञान याचा तुम्ही दीर्घकाळ अभ्यास केला पाहिजे. संपूर्ण आयुष्य हाच एक अभ्यास आहे आणि जेंव्हा तुम्ही आदराने त्याचा अभ्यास करता, तेंव्हा तुमच्या आयुष्यात त्या ज्ञानाचा पाया घातला जातो.

प्रश्न: गुरुदेव, आतापर्यंत आम्ही ध्यान करताना डोळे मिटून घ्यायचो जेणेकरून आम्हाला अंतर्मुख होता यायचे. आता ध्यान करताना डोळे अर्धवट उघडे ठेवण्याचे काय कारण आहे? 

श्री श्री : बर्याच वेळा जेंव्हा तुम्ही डोळे मिटून घेता तेंव्हा सहजपणे मनाचे खेळ सुरु होतात, किंवा मग स्वप्नावस्था सुरु होते किंवा मग काही वेळा झोप पण लागते. योगाच्या परिभाषेत याला मनोराज्य असे म्हणतात.

मनोराज्य हि एक मनाची अशी एक अवस्था आहे कि ज्यात मन स्वतःचे एक राज्य तयार करते आणि सुखाने किंवा संभ्रमित होऊन त्यात विहार करू लागते. तुम्ही मनातल्या मनात विचार करून किंवा काही कल्पना करू लागता त्यात मग तुम्हाला सुख वाटू लागते किंवा मग तुम्ही दुखी होता.

मग तुम्हाला असे वाटते कि हे सर्व जग तुमच्या विरुद्ध आहे, तुमच्या सासूबाई, तुमचे सासरे, तुमचा पती किंवा पुरुष-मित्र हे सर्व तुमच्या मागे लागले आहेत. किंवा मग तुमचे मन तुम्ही कोणाला कसे पटवायचे किंवा जिंकायचे याचा विचार करू लागते. अश्या तर्हेच्या गोष्टी मग मनात सुरु होतात.

तुम्ही जेंव्हा ध्यानात डोळे मिटून घेता तेंव्हा अशा मनोराज्यात अडकायची शक्यता जास्ती असते.

ध्यान करताना तुम्ही जेंव्हा डोळे अर्धवट उघडे ठेवता, तेंव्हा अशा मनोराज्यात मश्गुल व्हायची शक्यता कमी होऊन एका वेगळ्या ध्यानाची अनुभूती होते.

प्रश्न: गुरुदेव, शिव-तत्व आणि कृष्ण चैतन्य यात काय फरक आहे? 

श्री श्री : शिव-तत्व हि एक संकल्पना आहे , त्याला भौतिक आकार नाही.

कृष्ण हे असे आहेत कि ज्यांनी मानवी रुपात शिव-तत्व आचरणात आणले. कृष्ण हि एक ऐतिहासिक व्यक्ती होती. ते ५११४ वर्षांपूर्वी होऊन गेले.

कृष्ण जरी या ग्रहावर वावरले होते तरी त्यांनी शिव-तत्व आचरणात आणले होते. ते सर्वार्थाने पोकळ आणि रिकामे होते आणि मग त्यांनी वेळो वेळी शिव-तत्वाचा उपयोग केला.

प्रश्न: मला माझे कुटुंब सोडून इतर सर्वत्र जगण्याच्या कलेचा अनुभव येतो. मी यातून का व कसे बाहेर पडावे हे कृपा करून समजावून द्याल काय?

श्री श्री : काही वेळेला, काही लोक काही ठिकाणी इतरांपेक्षा जास्त उपयोग करून घेतात. ती तुमची तपस्या , तुमची साधना आहे. तुम्ही तिथे ते तसे होऊद्यात, त्यापासून लांब पळून जाण्याचा विचार करू नका कारण ती तर तुमची परीक्षा आहे. ती एक परीक्षा आणि एक प्रयोग आहे. त्यापासून तुमची सुटका नाही.

हा ज्ञानाचा तिसरा स्तंभ आहे- शट-संपत्ती (सहा प्रकारच्या संपत्ती), त्यातून तुम्हाला आवश्यक ती शक्ती मिळेल.

प्रश्न: गुरुदेव, शक्ती क्रियेचे फायदे काय आहेत? ती फक्त शारीरिक पातळीवर काम करते कि तिचा मनावर पण परिणाम होतो ?

श्री श्री : दोन्हीकडे. ज्याचा तुमच्या आत्म्याला लाभ होतो, त्याचा तुमच्या शरीराला पण लाभ होतो. जर शरीर ताकतवान आणि आरोग्यपूर्ण असेल तर त्याचा बुद्धी आणि मनावर पण परिणाम होतो.