खंबीरपणा, मृदुलता आणि प्रेम

13
2013
Apr
माँन्ट रियल, कँनडा
आज वैशाखी आहे (हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो, विशेषत: सिख लोक पंजाब मध्ये साजरा करतात). धर्माचे संरक्षण करण्यासाठी, राक्षसांचा नाश करण्यासाठी आणि मानवी मुल्यांचे उन्नती करण्यासाठी गुरु गोबिंद सिंह  यांनी आजच्या दिवशी खालसा हा वंश, कुळ चालू केला.

गुरु गोबिंद सिंह  यांचा उपदेश आज हि लागू पडतो.

त्यांनी म्हटले आहे कि, ‘ तुमच्यात चैतन्यपणा हवा, आणि तुमचा स्वभाव सौम्य हवा. तुम्ही अंतर्मनाने अध्यात्मिक असायला हवेत. तुम्ही संत आणि योद्धा दोन्ही असायला हवे.’

त्यांचे म्हणणे असे होते कि तुम्ही अन्याया विरुद्ध आवाज उठवायला हवा. तुम्ही संत बनून, ‘ ठीक आहे, जे काही झाले ते झाले,’ असे म्हणणे योग्य नाही. अन्याया विरुद्ध तुम्ही आवाज उठवायला हवा, आणि त्याचवेळी तुम्ही एका संता प्रमाणे तुम्ही दयाळू असायला हवे.

गुरु गोबिंद सिंह  हे दहावे सिख गुरु होते ज्यांनी दृढता आणि सौम्यता असे दुर्मिळ एकीकरण स्थापन केले.

जेव्हा गुरु गोबिंद सिंह यांनी देहत्याग केला, तेव्हा त्यांनी सांगितले कि, ‘माझ्यानंतर हे पुस्तक म्हणजे ग्रंथ तुमचे गुरु असतील. सर्व ज्ञान या ग्रंथा मध्ये आहे. हे पुस्तक तुम्हाला प्रकाशाकडे जाण्यासाठी मार्ग दाखवेल.

म्हणूनच सर्व गुरुद्वारा (सिख लोक जिथे पूजन करतात) मध्ये गुरु ग्रंथ साहिब एक धार्मिक ग्रंथ तुम्हाला आढळेल.

या धर्म ग्रंथा मुळे मानव जातीला जे ज्ञान मिळते ते अमूल्य आहे. गुरु ग्रंथ साहिब म्हणजे सोळा विविध प्रकारच्या संतांचे आणि त्यांच्या शिकवणीचा संग्रह आहे.

शीख धर्मात दहा गुरु आहेत. या सर्व दहा शीख धर्म गुरुची कथा हि हृदयाला भिडणारी आहे आणि उन्नती करणारी आहे. या सर्व गुरुंनी आपल्या सर्व वैभव संपत्तीचा, प्रामाणिकपणा, निष्पाप आणि चांगुलपणा चे संरक्षण करण्यासाठी त्याग केला. सर्वांना ज्ञान हे साध्या सरळ शब्दात सांगितले गेले.

गुरु नानक देव, शिखांचे पहिले गुरु यांच्या संदर्भात एक छानशी गोष्ट आहे.

जेव्हा त्यांचे पालक त्यांना काही गोष्टी विकायला सांगायचे तेव्हा ते तसे करत असत. ते जेव्हा मोजणी सुरु करीत तेव्हा ते १३ वर अडकायचे, तेरा म्हणजे तुमचा.

ते जेव्हा काम करीत असत तेव्हा त्यांचे लक्ष कामात नसायचे, ते नेहमी ईश्वरामध्ये मग्न असायचे.

गुरु नानक म्हणायचे, ‘मी तुमचा आहे, मी तुमचा आहे, मी तुमचा आहे’.

गुरु नानक यांचे संपूर्ण आयुष्य हे प्रेम, ज्ञान आणि पराक्रमाने भरलेले होते.

शीख धर्मात एक सुंदर अभिवादन आहे, ‘सत सरी अकाल’. हे जगातील सर्वात सुंदर अभिवादन आहे. सत म्हणजे सत्य, सरी म्हणजे वैभव आणि अकाल म्हणजे अनंत. खरे वैभव हे सत्य आहे, जे अनादी अनंत आहे.

सत्य हे अनादी अनंत श्रेष्ठ धर्म आहे आणि हेच खरे वैभव आहे.

तर, तुम्ही सर्वांनी इथे ध्यान करून हे वैभव प्राप्त केले आहे. आणि हेच सत्य आहे ते म्हणजे सत सरी अकाल.

सर्वजण ‘सत सरी अकाल’ असे म्हणतात पण त्यांना त्याचा अर्थ माहित नसतो. हे जगातील सर्वात सुंदर अभिवादन आहे, जे तुम्हाला आठवण करून देते कि सत्य हे अनादी अनंत वैभव आहे.

ज्या अभिवाद्नाची तुम्ही देवाण घेवाण करता, ते तुम्हाला आठवण करून देते कि खरे वैभव हे अध्यात्म, ज्ञान हेच आहे. किती सुंदर आहे ना हे!

‘जो बोले सो निहाल! सत सरी अकाल’ असे जो कोणी म्हणतो (सत सरी अकाल) त्याचा उत्कर्ष होतो.

निहाल म्हणजे अत्यानंद; उन्नती होणे. ‘सत सरी अकाल’ म्हणल्याने तुमचे मन शौर्यानेच भरत नाहीत तर ते अनादी अनंत तत्वाने भरून जाते.

भगवद्गीते मध्ये भगवान श्री कृष्ण म्हणतात, ‘ओम इते एकाक्श्र्म ब्रम्हा व्याहार्ण मम अनुस्म्रण य: प्रयाति त्याजन देहम परमं गतीम’ (अध्याय ८, श्लोक १३). ह्या ब्रह्मांडात सर्वत्र दैवत्व आहे आणि त्यालाच ओम म्हणतात.

‘एक ओमकार सत नाम’ असे गुरु ग्रंथ साहिब मध्ये म्हटले आहे, ओम एकच आहे,

जे ह्या अनंताचे खरे नाव आहे. ओम हे एखाद्याच्या अहंच्या सखोलता मध्ये अस्तित्वाच्या ध्वनी प्रमाणे आहे. तुम्ही समुद्र किनारी जाऊन जर लाटांचा आवाज ऐकला तर त्या मध्ये तुम्हाला ओम  ऐकू येईल. तुम्ही जर पर्वतावर जाऊन वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज ऐकला तर त्यामध्ये तुम्हाला ओम ऐकू येईल. आपल्या या जन्माच्या आधी आपण ओम मध्ये होतो. या जन्मात मरणानंतर आपण ओम मध्ये विलीन होणार आहोत. आता सुद्धा या सृष्टीच्या सखोला मध्ये ओम चा आवाज दुमदुमतो.

सर्व धर्मात म्हणजेच जैन, बुद्ध, शीख, हिंदू, ओमकार ला अत्यंत महत्व दिले आहे.

ख्रिश्चन मध्ये आमेन, इस्लाम मध्ये अमीन हे पण ओम चा एक प्रकार आहे. या अनंत विविध चेतनाचे नाव ओम आहे.

आज बंगाल, केरळ, तामिळनाडू मध्ये नवीन वर्ष साजरे केले जाते.

प्रश्न: गुरुदेव माझे पती माझ्यावर खूप प्रेम करतात, पण तरीही ते माझ्या नकारात्मक गुण दाखवायला एक संधी सोडत नाहीत आणि माझा उत्साहावर पाणी पडते. मी काय करावे?

श्री श्री: तुम्ही काहीतरी वेगळे करा. त्याला आश्चर्य चकित करा. जर तो तुमचे नकारात्मक गुण बघत असेल तर तुम्हीं त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करा, त्याची स्तुती करा. त्याला म्हणा. ‘बरोबर, तू म्हणलेले बरोबर आहे! मला हेच तर ऐकायचे होते!’.

प्रत्येक वेळेस एकाच पद्धतीने प्रतिक्रिया दाखवू नका. तुम्हाला ज्या पद्धतीने अभिनय करायचा आहे त्या पद्धतीने तुम्ही निवड करू शकता. हो कि नाही?

एखादे दिवशी त्याने जर तुमच्यासाठी फुले आणले आणि तुमची स्तुती केली तर तुम्ही तुमची नापसंती दर्शवत विचारा, ‘तुम्ही हे असे का केले?’ जेव्हा तो तुमच्यावर रागवेल तर त्या बद्दल आनंद दर्शवा.

नेहमी लक्षात ठेवा तुमच्या आनंदासाठी तुम्ही जबाबदार आहात. काही झाले तरी कुणीही काहीही म्हणो, तुमच्या मनाची तुम्ही संरक्षण करा आणि तुम्ही आनंदी रहा. तुम्ही निश्चय करा कि, ‘मी माझे सुख कुणालाही हिरावू देणार नाही! जरी माझ्यासमोर देव आला तरी मी त्याला म्हणेन कि “धन्यवाद तुमचे हे मला भेट आहे.”

हा निश्चय आजच करा.

आज वैशाखी आहे. हि तुम्हाला एक चांगली भेट आहे. भेट काय आहे? काही झाले तरी मी या मोह जाळ्यात अडकणार नाही;या बदलत्या जगामध्ये. मी माझ्या सुख समाधानासाठी जबाबदार आहे. कुणीही मला निरुत्साही करू शकत नाही. 

तुम्ही हा निश्चय करा आणि पहा काय होते. असो, हे आश्रम तुमच्या साठी आहे, परत येत रहा.

आपण आपले कपडे मळल्यानंतर धुवायला देतो. हे आश्रम एक चांगले वॉशिंग मशीन आहे, हे सर्व काही धुवून काढते.

प्रश्न: मला प्रेममय रहायचे आहे, पण मला वाटते कि प्रेम आणि ज्ञान यांच्या मध्ये संघर्ष आहे. यांना एकत्र कसे करता येईल?

श्री श्री: तुम्ही ते आधीच केले आहे! तुमच्याकडे ज्ञानासाठी प्रेम नाही तर तुम्ही त्याच्यासाठी संघर्ष का करता. आणि तुम्हाला जर ते माहित आहे, तुम्ही प्रेममय असू शकत नाही. जाणून घेण्याने प्रेम वाढते आणि प्रेम वाढल्याने जाणण्याची उत्सुकता वाढते,

प्रश्न: पाच कोष कोणते आहेत? त्यांचा आध्यात्मिकदृष्ट्या अर्थ काय आहे?

श्री श्री: कोष म्हणजे संरक्षणार्थ असलेले आवरण.

पहिले आवरण म्हणजे पर्यावरण. जर वातावरणात विषारी वायू असेल तर तुमचे शरीर अस्तित्वात राहील का? नाही, कारण या हवे मुळे तुमचे शरीरचे अस्तित्व आहे. म्हणून पर्यावरण हे तुमचे पहिले शरीर आहे. अन्नरसमय कोष, अन्न म्हणजे खाद्य, रस म्हणजे रसदार. बाह्य पर्यावरण रसदार आहे; ते तुमचे डोळे आकर्षित करते, सुगंधित पणाने तुमचे नाक आकर्षित होते, आणि आवाजाने तुम्ही मंत्रमुग्ध होता. हे सर्व रस आहेत म्हणजे भुरळ पाडणारे आहेत. पर्यावरण संपूर्ण अन्न आणि रसांनी भरलेले आहे. शरीरासाठी पण अन्न आहे; उदा. डोळ्यासाठी दृष्टी हे खाद्य आहे.

म्हणून पर्यावरण, अन्नरसमय कोष हा पहिला कोष आहे. काहीजण शरीर हे पहिला कोष आहे असे म्हणतात पण मला वाटते पर्यावरण हाच पहिला कोष आहे.

दुसरे आवरण शरीर आहे. प्राणमय कोष.

तिसरे आवरण मनोमाया कोष, म्हणजेच मन, विचार आणि भावना.

चौथे आवरण म्हणजे विज्ञान माया कोष, जे मना पेक्षा हि सूक्ष्म आहे, अंतर्ज्ञानी भावना. हे असे काही आहे जे विचारा पलीकडे आहे. तुमच्या मध्ये एक शरीर आहे ज्याच्या मधून नवीन उपक्रम, सर्जनशील निर्मितीचे विचार येतात. विज्ञान माया कोष  मधूनच नवीन शोध, सर्जनशील निर्मितीचे विचार, नवीन कला, कविता येतात. मनोमाया कोष मधून नाही.

पाचवे आवरण म्हणजे आनंदमय कोष,  सुखी चेतना. खरे पाहता एक सुखी चेतना हे शारीरिक चेतने पेक्षा मोठी असते, म्हणूनच जेव्हा तुम्ही सुखी आनंदी असता त्यावेळी तुम्हाला जाणवेल कि तुमच्या चेतनेचा विस्तार होतो. हो कि नाही? तुम्ही ज्यावेळेस दु:खी असता त्या वेळेस तुम्हाला कसे वाटते? असे वाटते कि कुणीतरी तुम्हाला चिरडले आहे.

प्रश्न: गुरुदेव, गुरु ग्रंथ साहिब समोर डोके झाकण्याचा काय संबंध आहे?

श्री श्री: हि एक परंपरा जी वर्षा नु वर्षे चालत आलेली आहे. शीख धर्मात पाच गोष्टी आहेत, न कापलेले केस (फेट्या खाली झाकलेले), कंगवा, खंजीर, हातातील कडे आणि विशेष पद्धतीचे पोशाख. हे शीख धर्माचे पाच प्रतीक आहेत. त्याचा आदर केला पाहिजे कारण हे गुरु ने करायला सांगितले आहे, त्याने तुमची एक ओळख होते.

पूर्वी प्रत्येक परिवार आपला सर्वात मोठा मुलगा हे गुरु कडे सोपवत असत. आणि गुरु त्या मुलाला प्रशिक्षण देत असत. हे प्रत्येकाच्या मुला बरोबर होत असत. ते सर्व योद्धा म्हणून प्रशिक्षित असत. धर्माचे संरक्षण करण्याचे त्यांना प्रशिक्षण दिलेले असते.

प्रश्न: गुरुदेव, जर देव आणि ईश्वरीयत्व न दिसणारे आकलन आहेत, तर तुम्ही कोण आहात?

श्री श्री: तुम्हीच शोधा! मी कोण आहे हे जाणण्या आधी तुम्ही कोण आहात हे जाणून घ्या. तुम्ही कुठे आहात इथून सुरुवात करा. जर तुम्ही स्व:तला जाणले तर तुम्ही मला सुद्धा जाणून घ्याल. तुम्ही स्वत:ला जाणले नाही तर मला समजू शकणार नाही.

प्रश्न: गुरुदेव, लोकांना त्यांच्या आजारपणाची जाण कशी करून द्यावी, किंवा त्यांच्या जवळ च्या नातलगाची, परिवारातील लोकांच्या आजारपणाची जाण कशी करून द्यावी?

श्री श्री: काही करू नका. शांत मनाने स्वीकार करा. आजारी माणसाला शब्दाने आराम मिळत नाही, आणि आजारी माणूस आजारी आहे याचा स्वीकार करत नाही. पण तरीही तुम्ही तुमच्या सकारात्मक कंपनाने वातावरण बदलू शकता.

प्रश्न: गुरुदेव, लोक तुमचे चरण स्पर्श का करतात? हे संस्कार आहेत का?

श्री श्री: हो, तो संस्कार आहे.

जपान मध्ये लोकांना अभिवादन करण्यासाठी खाली वाकतात, भारतामध्ये संपूर्ण वाकून नमस्कार करतात. असे मानले जाते कि उत्सर्जन, उर्जा पाया पासून येते. हि पूर्वीची श्रद्धा आहे, म्हणूनच ते करतात. कधी कधी त्याच्या मुळे मला चालण्यासाठी त्रास होतो.

एकदा मी असेच गर्दीत चालत असताना दोघांनी मागून येवून माझे पाय पकडले, मी वेदावेद्रासनात गेले, माझे हात हवेत लटकत होते. मी सुदैवाने पडलो नाही, नाही तर तुम्ही पाहिले असते तुमचे गुरु कुबडे घेवून चालत आहेत.

पहा, मी प्रत्येक परिस्थितीत समतोल राखतो. हे नेहमी घडत असते.

प्रश्न: प्रिय गुरुजी, मी तुमच्या सारखा कसा होवू शकतो? माझ्या खऱ्या स्वभावात मी जाण्यासाठी मला तुम्ही काय सूचना देवू शकता?

श्री श्री: फक्त एकदा आयुष्यात मागे वळून पहा कि तुमची किती उन्नती झाली आहे. जरा विचार करा, तुमच्या मनाची स्थिती बेसिक कोर्स करण्याआधी कशी होती आणि कोर्स झाल्यानंतर कशी आहे? तुम्ही कधीही ध्यान न केलेल्या व्यक्तीशी कसे हाताळू शकता. तुम्ही तो मोठा फरक पहा! आयुष्यात पुढे जाण्यासाठी हे पुरेसे आहे. स्मितहास्य करा, आराम करा, सेवा, साधना आणि सत्संग करत रहा.

प्रश्न: प्रिय गुरुदेव, गेल्या ९ महिन्यापासून माझे अध्यात्मिक जगाशी संपर्क तुटल्या सारखा वाटतो. साधना करण्यात रस नाही, सेवा करण्यात रस नाही. हे खूपच दु:खदायक आहे. काही उपदेश?

श्री श्री: हे असे होत राहते, याला आत्म्याची काळी रात्र असे म्हटले जाते. अचानक तुमची अध्यात्मा मधली आवड कमी होते, किंवा चांगल्या गोष्टी नको वाटायला लागतात.तुमचे मन काहीतरी विनाशक गोष्टी कडे वळते.

अशा गोष्टी १२ किंवा ३० वर्षातून एकदा होतात, जर १२ वर्षात एकदा असेल तर ती १ वर्ष राहते आणि जर ३० वर्षात एकदा असेल तर ती अडीच वर्षे राहते.

याच्यावर सर्वात चागला उपाय म्हणजे तुम्ही तुमची साधना नित्य नियमाने करा, ओम नम: शिवाय  चा जप करत रहा. उदासीन मन आही कंपने या तून बाहेर पडण्यासाठी हा जप सर्वात उत्तम आहे.

प्रश्न: प्रिय गुरुदेव, मी आयुष्यात संपूर्णता कशी आर्कषित करू?

श्री श्री: जर तुम्ही संपूर्णता साठी इच्छा ठेवली नाही तर ते तुमच्या कडे येईल. जर तुम्ही त्या साठी आसुसलेले असाल आणि सारखे तुमच्या डोक्यात तेच विचार असतील कि, ‘देवा मला सर्व काही केव्हा मिळेल’ तर ते तुम्हाला कधीही मिळणार नाही. आराम करा! तुम्ही जाणून घ्या कि तुम्हाला जे काही हवे आहे ते तुम्हाला मिळणारच आहे.

जर सर्वकाही तुम्हाला आयुष्यात मिळवायचे असेल तर संस्कृत मध्ये एक म्हण आहे, ‘उद्योगिनं पुरुषासिंहं उपैति लक्ष्मी’ 

उद्योगिनं  म्हणजे तुम्ही जे काही काम कराल ते १०० प्रयत्न करून करा. पुरुषासिंहं उपैति लक्ष्मी’ म्हणजे सिंहा प्रमाणे आत्मविश्वास आणि मध्यांकित असणे.

हे पहा, सिंह काही कोंबडी सारखा फिरत नसतो; तुम्ही सिंहाला कधी बसलेला पहिले आहे का? तो आत्मविश्वास अंडी मध्यंकित तुमच्यात असणे महत्वाचे आहे. सिंह एकच गोष्ट करीत नाही, ती म्हणजे प्रयत्न. तो परिश्रम करीत नाही.

‘उद्योगिनं पुरुषासिंहं उपैति लक्ष्मी’. जर तुम्ही कष्टाळू आहात आणि तुमच्या मध्यांकितपणा असेल, जर तुम्ही तुमच्या अंतर्मनाशी अध्यात्मिक रूपाने संलग्न आहात, तर लक्ष्मी जी वैभव लक्ष्मी आहे ती तुमच्या कडे येईल.

जर जीवनात तुम्ही मध्यांकित आहात, तुमच्याकडे आत्मविश्वास आहे, आणि जर तूम्ही अंतर्मनाशी अध्यात्मिक रूपाने संलग्न आहात तर जीवनात संपूर्णता येईल.

प्रश्न: गुरुदेव, नकारात्मक भावना कधी नष्ट होतील?

श्री श्री: ते जाणार नाहीत. ते इथेच असतील! तुम्ही काय करू शकताल? तुम्हाला त्यांच्या बरोबरच जगायचे आहे! ते तुमच्या पासून दूर जाणे संभवच नाही. सगळ्यात चांगली गोष्ट तुम्ही करू शकता आणि ती म्हणजे त्याच्याशी मैत्री करा. त्यांच्याशी हात मिळवा, त्यांना तुमच्या शेजारी बसवा.

ते जर तुमच्या मांडी वर असतील तर त्यांना सांगा कि, ‘कृपया माझ्या शेजारी बसा, माझ्या डोकयावर किंवा मांडीवर बसू नका. तुम्ही फार जड आहात.’

ते तुमच्या पासून दूर जाणे संभवच नाही. तुम्ही काय कराल?