04
2012
Aug
|
बंगलोर
|
प्रश्न: गुरुदेव, प्रेम, आदर, संबद्धता या तिन्ही गोष्टी एकमेकाशी कशाप्रकारे जोडलेले आहेत? आपल्या नातेसंबंधात याचा समतोल कसा राखता येईल?
श्री श्री: मला वाटतय कि तुमच्याकडे बराच रिकामा वेळ आहे. तुम्ही कामात मग्न असायला हवे. नुसते रिकामे बसून चिंता करू नका. प्रेम, आदर ह्या भावना तुमच्या मध्ये आहेतच. जेव्हा तुमचे मन आणि हृदय निर्मळ असेल तेव्हा योग्य भावना योग्य वेळी येतील. प्रेम, आदर या घटना आहेत. तुम्ही या घटना घडवू शकत नाही. तुम्ही आदराला तुमच्यामध्ये यायला आमंत्रण देवू शकत नाही. तुम्ही जर प्रेम, आदर या भावनांना जाणण्याचा प्रयत्न केला तर त्यात तुम्हाला अपयश येईल. तुम्ही फक्त तुमचे मन उदासीनते पासून मुक्त करून ज्ञानाने भरा. ज्ञान म्हणजे या जगाकडे पाहण्याचा मोठा दृष्टीकोन आहे. तुम्ही स्थायी काय आहे आणि अस्थायी काय आहे हे पहा. लोकांचे अभिप्राय हे अस्थायी असतात. ते येतात आणि जातात. हे तुम्ही फक्त लक्षात ठेवा. आदराची इच्छा ठेवू नका. काही लोक तुम्हाला आदर देतील काहीजण देणार नाहीत, ठीक आहे. तो त्यांचा प्रश्न आहे. जर तुमचे आयुष्य लोकांच्या आदरांवर अवलंबून असेल तर तुम्ही दुर्बल आहात. तुम्हाला दुर्बल असल्याची जाणीव होईल आणि जेव्हा हि जाणीव तुम्हाला होईल तेव्हा तुम्ही दु:खी व्हाल. तुम्ही हे जाणले पाहिजे कि तुम्हाला कोणाच्याही आदराची गरज नाही. ‘माझा आहे माझ्यापाशी आहे, मला कोण्याच्याही आदराची गरज नाही’ बस्स!!! याचा अर्थ असा नाही कि तुम्ही अनादराने वागावे. तुम्ही आदर करा पण बदल्यात कोणी तुमचा आदर करेल याची अपेक्षा करू नका. काही लोकांमध्ये थोडा सुध्दा आदर नसतो. ते तसेच असतात, त्या गोष्टीवर तुम्ही विचार करू नका. कोणी तुमचा आदर करत नसेल तर तुम्ही विचार करत बसू नका. या वरून त्यांच्यावर काय संस्कार काय आहेत हे दिसते. तुम्ही जर ज्ञानी असाल तर तुम्ही सर्वाचा आदर कराल, मग ते वेडे असोत कि शहाणे. तुम्ही मग वेड्यांचा हि आदर कराल कारण आदर करणे हे तुमच्या स्वभावात आहे. तुम्ही त्यांच्याकडे या सृष्टी निर्मितीचा एक भाग म्हणून पाहता. कारण ते या विश्व, सृष्टी निर्मात्या च्या मालकीचे आहेत. तुम्ही जर सगळ्यांचा आदर केलात तर तुम्ही किती ज्ञानी आहात हे दिसून येईल. आदराची अपेक्षा करणे हि आपली दुर्बलता दर्शविते, आणि आदर करणे मग तो कोणीही असो हे तुम्ही किती ज्ञानी आहात हे दर्शविते. प्रेम हे या सर्व सृष्टी निर्मितीचा मूलाधार आहे. तो कधीही अदृश्य होणार नाही. तो सदैव असणार आहे. तुम्ही जेवढे प्रेम द्याल, त्याच्या द्विगुणीत तुम्हाला परत मिळेल. प्रश्न: अनंतता हि निनावी का असते? श्री श्री: तुम्ही कधी शोधू नये म्हणून. तुम्हाला जर कोणत्या गोष्टी बद्दल उत्कंठा असेल तर तुम्ही ती शोधता. ही शोधण्याची प्रक्रिया खूप सुंदर असते. त्यासाठीच म्हणतात कि उत्कंठा म्हणजे राधा, आणि श्याम म्हणजे प्रेम. उत्कंठा आणि प्रेम हे एकत्र जातात. उत्कंठा नसेल तर तिथे प्रेम असणारच नाही. आणि जिथे प्रेम असते तिथे उत्कंठा असतेच. प्रश्न: गुरुदेव, कृपया असंगोहम् ( एक पद जे गुरुदेव अडव्हान्स कोर्स मध्ये वारंवार उच्चार करतात) चा अर्थ सांगा. श्री श्री: असंगोहम् म्हणजे - मी हे नाही. उदा: मी वस्त्र परिधान केले आहेत, पण मी वस्त्र नाही. हे शरीर माझे आहे पण मी शरीर नाही. मी मन नाही, विचार नाही. अशा प्रकारे तुम्ही विचार करत रहा आणि स्वत:च्या ओळखीच्या सर्व स्तर दूर करून टाका. आणि शेवटी ज्यावेळेस तुम्ही विचाराल कि, ‘मी कोण आहे?’ तुम्हाला काहीच मिळणार नाही! असंगोहम् म्हणजेच ‘मी कोणीच, काहीच नाही. मी फक्त या अवकाशातील मोकळी जागा आहे. असंगोहम् म्हणजे स्व: बरोबर असणे. जर मी विचार केला कि मी वस्त्र आहे तर ती एक समस्या आहे. मी या अस्तित्वाच्या सर्व स्तरांचा पलीकडे आहे. जर मी सारखा विचार करत बसलो कि मी विचार आहे, मी भावना आहे, मी संवेदना आहे तर मी माझ्या विस्तीर्ण स्वरुपा पासून भरकटत जाईन. जर तुम्हाला स्वत: च्या विस्तीर्ण स्वरुपाची परिपूर्ती करायची असेल तर, ‘मी कोणीच नाही’ असे वारंवार म्हणत रहा. (गुरुदेव गातात) मनो बुध्याहंकार चित्तानी नाह्म, ना चा श्रोत्रा जिव्हे न चा ग्राना नेत्रे ना चा व्योमा भूमीर ना तेजो ना वायू:, चिदानंद रूप: शिवोह्म शिवोह्म - श्री आदी शंकराचार्य यांच्या आत्माष्ट्कम मधून मी मन, बुद्धी, स्मृती किंवा अहंकार नाही. मी कोणीच नाही. अशा पद्धतीने विचारांना निष्प्रभ करून रिकामे आणि मोकळे व्हावे. हेच शिव तत्व आहे. हीच परिपूर्ती म्हणजे ध्यान ज्याला आपण समाधी म्हणतो. प्रश्न: गुरुदेव, काही दिवसापूर्वी तुम्ही गायत्री मंत्र चे महत्व सांगितले होते. गायत्री मंत्रोचचार करण्याआधी जी दिक्षा घेतली जाते त्याचे महत्व काय आहे? श्री श्री: हो, कोणताही मंत्र म्हणण्याआधी दिक्षा घेणे आवश्यक आहे. तरच तो मंत्र प्रभावी ठरतो. तुम्ही फक्त पुस्तकामध्ये बघून मंत्र म्हणू शकत नाही. तो अशा व्यक्ती कडून घेतला पाहिजे जो उद्घोष करत असेल. प्रश्न: गुरुदेव, तुमच्या प्रेमापोटी ज्या असह्य वेदना होतात त्यावर उपाय काय आहे? काय करावे? श्री श्री: लिखाण सुरु करा; त्याच्यातून काही कविता निर्माण होतील. काही उपक्रम हाती घ्या. सेवा करा; ज्ञान शिकवा आणि तुम्ही ज्ञानात रहा. ह्यामुळे तुमच्यातील सृजनशीलता दिसून येईल. प्रश्न: गुरुदेव, ज्यावेळेस मी माझ्या हृदयात पाहते मला तुम्हीच दिसता. मला तुमच्या शिवाय काहीच सुचत नाही, तुम्ही माझ्या आयुष्यात आमुलाग्र बदल घडवून आणले आहेत. तुम्ही माझ्या आयुष्याची नाव कोणत्या दिशेने नेण्याचे ठरविले आहे? श्री श्री: ऐका! तुम्ही अदभूत आहात, तुम्ही एवढे संपूर्ण आहात म्हणूनच तुम्ही तुमच्या तीव्र भावना अनुभवू शकता. ज्या व्यक्ती कडे भाव नाही तो व्यक्ती परमानंद कधीच अनुभवू शकणार नाही. जर कोणी व्यक्ती बुद्धीत अडकलेला असेल तर त्याचे आयुष्य शुष्क होते. ना तो शांती अनुभवू शकतो ना ईश्वरीय प्रेम अनुभवू शकतो. आयुष्यात ईश्वरीय प्रेम नसेल तर आकांक्षा आणि इच्छा माणसाच्या पाठी लागतात. म्हणून दोन्ही असणे म्हणजे सुदैवी मानले जाते. भगवद्गीते मध्ये भगवान श्री कृष्ण म्हणतात, ‘नसति बुद्धिर आयुक्त्स्य ना चायुक्तस्य भावना, ना चाभावयतः शांतीर अशांत्स्य कुत्: सुखम’ – (अध्याय २, श्लोक ६६). जो कोणी स्वत:च्या आत्म्याशी एकरूप होवू शकत नाही, त्याच्या कडे ना बुद्धी असते ना तीव्र भावना. आणि ज्याच्याकडे तीव्र भावना नाहीत तिथे ना शांती असते ना ईश्वरीय प्रेम. हे सत्य आहे. मी खात्रीने सांगू शकतो कि तुम्ही जर ज्ञानात असाल तर तुम्ही या विश्वासाठी एक खजाना आहात. तुम्ही सर्वासाठी एक उत्कृष्ट भेट वस्तू आहात. |
मनाचा क्षीरसागर ढवळून निघतो तेंव्हा आनंदाचे, प्रेमाचे अमृत बाहेर येते.
पूज्य गुरुजींच्या वाणीने समृद्ध असा हा ब्लॉग 'अमृत मंथन'