11
2012............................... Montereal, Canada
May
माँन्टरिअल कॅनडा,११ मे २०१२
भक्ती ही एक भेट आहे. तुमच्या स्वतःच्या भक्तीचे श्रेय तुम्ही स्वतःला घेऊ शकत नाही. ‘मी किती भक्तीवान आहे’, असे तुम्ही म्हणू शकत नाही. तुम्ही कोणत्याही प्रकारचे श्रेय घेऊ शकत नाही. जर तुम्ही इतके भक्तीवान आहात तर ती एक देणगी आहे, एक वरदान आहे.
भक्ती काय करते? भक्ती तुम्हाला अतोनात आनंद देते, सखोल प्रेम देते आणि अनेक सिद्धी
प्राप्त करून देते. सिद्धी म्हणजे तुम्ही जो विचार करता तसे घडते आणि तुम्हाला काय पाहिजे तसे घडते, तुम्ही जर कोणाला आशीर्वाद दिला तर तो सत्य होतो; हे सर्व घडते ते तुमच्या भावाच्या अस्तित्वाद्वारे. भक्ती म्हणजे आपल्या भावाचे अस्तित्व होय.
योग सूत्रांमध्ये ऋषी पतांजली म्हणतात,’संधी सिद्धीरीशवरप्रनिधानात,’ ईश्वरीय भक्ती ही समाधीत परिपूर्णता आणते. ती आपल्या ध्यानामध्ये इतकी शांतता आणते की तुम्ही अतिशय परिपूर्ण अवस्थेत पोचता.
म्हणून आपण असे कधी म्हणू शकत नाही की ,’अरे मी किती भक्तीवान आहे’, जर तुम्ही इतके भक्तीवान आहात तर ती एक देणगी आहे. तुम्ही केवळ प्रार्थना करा की ही माझ्या सोबत कायमची असू दे. कोणत्याही कारणाने ही खराब न होवो.
भक्ती ही हिऱ्याप्रमाणे आहे;मातीच्या बदल्यात तिचा सौदा करू नका. वाटीभर माती करिता हिऱ्याचा व्यापार होता कामा नये.
तुम्ही तुमची भक्ती कुठे हरवून बसता ते तुम्हाला माहिती आहे? क्षणभंगुर गोष्टी करण्यात, कोणाबरोबर भांडण्यात, कुठल्यातरी गरजेकरिता, उदाहरणार्थ नोकरीची गरज, किंवा तुमचे नातेसंबंध नीट नसले की मग तुमच्या भक्तीवर त्याचा वाईट परिणाम होतो.
तुम्ही नोकरी गमावून बसलात आणि भोगावे लागते तुमच्या भक्तीला. जर तुमच्यावर कोणी काही आळ घेतला तर तुमची भक्ती गेली. जर तुमचे काम होत नसेल तर तुमची भक्ती संपली. तर आपण आपली भक्ती हि काही डाँलर करिता अथवा छोट्या छोट्या गोष्टींकरिता गमावून बसतो आहे. हो की नाही?
आता असे बघा की तुम्ही जर औषध व्यावसायिक असाल आणि तुम्ही लोकांना औषध दिले आणि बऱ्याच वेळा ते योग्य लागू पडले पण काही वेळा ते लागू पडत नाही. ते अनेक गोष्टींवर अवलंबून असते. ते कर्मावर अवलंबून आहे.
त्याचप्रमाणे तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टी घडतात आणि बऱ्याच घडत नाहीत, पण निदान तुम्ही तुमच्या श्रद्धेला पकडून ठेवा.
मी पुन्हा सांगतो की काही वेळा ती गेलेली किंवा निघून जात आहे असा भास होतो,परंतु तेव्हा देखील तुम्ही काही करू शकत नाही. स्वथ बसा आणि तिच्यासाठी प्रार्थना करा.
तर भक्ती किंवा श्रद्धा ही भेट आहे, तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकत नाही आणि तसा घेता कामा नये. जर तुम्ही घेत असाल तर तुम्ही ध्यानातून घसरू लागता आणि भक्तीच्या बाहेर जाता. असेच होते जेव्हा आपण भक्तीला ओळखतो आणि त्याचा फायदा घेऊ बघतो,आणि ,’मी किती भक्तीवान आहे,’ याची शाहनिशा करून घेतो.
जर तुम्हाला याची जाणीव असेल तर लहान मुलाप्रमाणे असा आणि सोडून द्या. जर तुम्ही भक्त असाल तर भक्त असण्याबद्दल कृतज्ञता ठेवा, हाच सुरक्षित मार्ग आहे. आणि मग भक्ती दर क्षणाला वृद्धिगत होईल.
असे बघा,कृतीमध्ये कधीही परिपूर्णता नसते. कोणत्याही महान कृतीमध्ये तुम्हाला १% तरी चूक सापडेलच. निसर्ग तसाच आहे. कोणतीही कृती,कितीही चांगली असो,कितीही फायद्याची असो,त्यामध्ये थोडेफार दोष हे असणारच. समाधी ही भक्तीमुळेच परिपूर्ण होते.
आता जर तुम्हाला वाटले ,’अरे मला तर भक्ती वाटत नाही,मी काय करू?’ काही करू नका,स्वस्थ राहा!असा विचार करू नका की तुमच्याकडे नाही. तुमच्याकडे आहे फक्त ती अजूनपर्यंत आविष्कृत झालेली नाही,पण ती होणार. काही सेवा करा आणि थोड्याफार चांगल्या गोष्टी करण्याने थोडी जमेची बाजू होईल आणि मग ती आविष्कृत होईल. ज्ञानामध्ये राहा आणि ती उघड होईल.
नवशिक्यांच्या भक्तीवर सुरुवातीला फलज्योतिषाचा परिणाम होईल. जेव्हा एखाद्या ग्रहाची युती होईल,त्यावेळेस,सर्वात प्रथम भक्ती हि पार्श्वभूमीवर जाईल. तर मग जेव्हा गुरु ग्रह हा आठव्या घरात प्रवेश करतो तेव्हा त्याला अष्टम
गुरु संबोधितात.
असे म्हणतात की पंडितांना माहिती असते की माणसाला अष्टम गुरु आहे आणि त्याला त्या वर्षभरात अतिशय अशांततेचा सामना करावा लागत आहे.
आता काय होईल? मन सगळ्या जागी भटकते, मन अशांत रहाते, प्रत्येक निर्णय चुकीचा होतो, तो जे काही करतो ते निराशाजनकच होते, आणि याशिवाय तो त्याचा अध्यात्माचा रस संपूर्णपणे हरवून बसतो. हे प्रत्येक १२ वर्षातून एकदा घडते. हे दोन महिने,सहा महिने किंवा जास्तीत जास्त एक वर्ष टिकते.
जर ते दोन किंवा चार ते सहा महिने असेल तर ते अतिशय तीव्र असते. म्हणून जर कोणाला माहिती असेल, ’अरे हा तर माझा अष्टम गुरु आहे म्हणून माझे मन असे आहे’, म्हणजे तुम्ही रोगाचे निदान केले आहे आणि तुम्हाला माहिती आहे की तुमचे मन असे का जात आहे.
जर तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही विचार कराल,’अरे मी तर माझे उभे आयुष्य वाया घालवले. मी प्राणायाम का केले, मी या सर्व गोष्टी का केल्या. हे सर्व व्यर्थ आहे’, असेच घडते आणि तुम्ही सगळे करणे बंद करून टाकता.एका वर्षानंतर तुमच्या लक्षात येते, ’अरे देवा,मी केवढी घोडचूक केली, माझे मन कुठे गेले होते’. तुम्ही असा विचार करू लागता.
साडेसाती कशाला म्हणतात ते ज्योतिषींना आणि भारतातील लोकांना माहित आहे, शनीच्या साडेसातीचे साडे सात वर्ष. त्या काळात लोक खरोखरच त्यांचे नातेसंबंध, भौतिक मालमत्ता हरवून बसतात आणि काही लोकांसाठी तर हा अतिशय मुश्कील काळ असतो. जर माणसाचे मन बाहेरच्या दिशेने धावणारे असेल
तर आरोग्य आणि अशा इतर काळज्या उद्भवतात.
पण जर कोणी अध्यात्मिक असेल तर मग त्याच परिस्थितीत ती व्यक्ती अजून चांगली होईल. हे सर्व ती व्यक्ती कशी आहे यावर अवलंबून आहे.
‘अरे गले सात वर्षे माझे काहीच काम होत नाही. मी प्रयत्न करतो पण सगळेच अयशस्वी होते’. हे शनीच्या साडेसातीत घडते जी दर ३० वर्षातून एकदा येते. म्हणजे ती आयुष्यभरात केवळ दोनदाच येते, नेहमी नेहमी येत नाही. पण ती माणसाला हलवून टाकते; अगदी त्याचे तेल निघते.
साधारणपणे जर व्यक्ती १५ ते २० वर्षाचे बालक असताना आली,तर त्याचा इतका परिणाम होत नाही. व्यक्ती ५० वर्षाची असताना जर आली तरी त्याचा जास्त परिणाम होत नाही.
तर या साडेसात वर्षाच्या कालावधीत उलथापालथ होते. ऐक प्रकारे ती माणसाला अंतराभिमुख करते. जर तुम्ही निरीक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की काही संकटांमुळे तुम्ही या अध्यात्मिक मार्गावर आलात. तुमच्यापैकी कितीजण संकटकाळामुळे आलात? शनिदेव हेच तर करतो. तो अशी परिस्थिती निर्माण करतो की तुम्हाला बाह्य जगाचा कंटाळा येतो आणि तुम्ही आतल्या दिशेने वळता. त्यादृष्टीने हे फार चांगले आहे.
पण अष्टम गुरु जो दर १२ वर्षांनी येतो तो भक्तीला हलवून जातो. देव आहे का नाही असे तुम्ही नवलदेखील करू लागता. काहीही उपयुक्त भासत नाही. सगळे दिशाहीन आणि बेचव भासू लागते आणि कंटाळा व गोंधळाच्या भावना निर्माण होतात. पण हे थोड्या अवधीकरिताच होते.
आणि ज्या क्षणी तुम्ही सत्संगामध्ये येता, त्याक्षणी तुमचे मन उत्थित होते. हे सगळे साफ होते. म्हणूनच गुरूच्या उपस्थितीत किंवा सत्संगामध्ये किंवा साधना करताना, हे ग्रहांचे परिणाम किमान असतात. त्यांचा तुमच्यावर तेवढा परिणाम होत नाही. लोकांना याचा पुनःपुन्हा, कितीतरी वेळा अनुभव आलेला आहे.
म्हणून या परंपरा अशा आहेत. त्यांची सांगड कशी घातली हे फार विस्मयकारक आहे आणि परंपरेने ज्ञान कसे टिकवून ठेवले हे आश्चर्यकारक आहे.
प्रश्न
: गुरुजी, काहीतरी वाटते ती भावना आहे की अंतःस्पुर्ती ते कसे ओळखावयाचे,
हे कृपा करून सांगाल?
श्री
श्री
रविशंकर
: काळ तुम्हाला सांगेल.
प्रश्न
: जर सृष्टीकर्ता खरा आहे तर मग त्याचाच भाग असलेले हे जग माया कसे काय आहे?
श्री
श्री
रविशंकर
: माया म्हणजे काय? माया म्हणजे आहे असे वाटणे. 3 D मध्ये सर्व कसे दिसते. 3 Dमध्ये किरण खरे असतात परंतु आकृत्या तात्पुरत्या असतात. त्यांचे अस्तित्व खरे नसते. तुम्हाला कळते आहे का मी काय म्हणतो आहे ते? माया शब्दाचा खरा अर्थ आहे जे बदलत राहते, जे मोजल्या जाऊ शकते. आणि मोजमाप सारखे नसते. जर एखाद्या वस्तूचे वजन एक किलो असेल तर उत्तर धृवावर त्याचे वजन वेगळेच भरेल आणि जर तुम्ही सिंगापूरला गेलात तर त्याच वस्तूचे वजन अजून वेगळे असेल. जर तुम्ही चंद्रावर गेलात तर त्याचे वजन इथल्या वजनाच्या १\६ असेल, भूतकाळात लोकांना याचे ज्ञान होते. म्हणूनच ते म्हणाले की या संपूर्ण विश्वाचे मोजमाप करता येईल आणि ते
देखील खरे नसेल.
प्रश्न
: आईन्स्टाईनचा उर्जा = वस्तुमान * प्रकाशाच्या वेगाचा वर्ग या सापेक्षतेचा खास सिद्धांत प्रकाशाचा वेग बदलत नाही या वस्तुस्थितीवर आधारित आहे. याबाबत तुमचे काही म्हणणे आहे का?
श्री
श्री
रविशंकर
: गुढ द्रव्याच्या आणि गुढ उर्जेच्या शोधानंतर, आता ते म्हणत आहेत की खुपच मोठा फरक पडलेला आहे. प्रकाशाच्या वेगाचे परिमाणदेखील आता सापेक्ष आहे, निरपेक्ष नाही. याबाबतीत प्रेम, प्रकाश इत्यादी मोजता येत नाही, ते दिव्यत्वाचा भाग आहे, ते माया नाही. परंतु विज्ञानाने शोधलेले गुढ उर्जा आणि गुढ द्रव्य अतिशय रोचक आहे. ॠगवेदामध्ये त्याचा उल्लेख आहे. असे म्हणतात कि विश्वाच्या सुरुवातीला गुढ उर्जा हि तमाच्या आवरणाखाली होती. लोकांना हे समजत नव्हते; त्यांना हे फार विचित्र आणि अर्थहीन वाटायचे. पण नासदीय सुक्त (ज्याला निर्मितेचे सूत्र म्हणून ओळखतात) मध्ये असे म्हटले आहे, 'ना हे होते ना ते होते,केवळ पूर्ण गुढ उर्जा अंधःकाराच्या अच्छादनाखाली होती'. याबाबतचे अद्यावत संशोधन अतिशय उपयुक्त आहे. खरे तर असे वाटते की ते संस्कृतमधून भाषांतरच केले गेले आहे. तुम्ही ज्याला आकाशगंगा म्हणता ती, तारे आणि ग्रह कसे केवळ वायू आणि पाणी होते याबद्दल त्याच्यात कथन केले आहे. अवकाश तत्त्वातून वायू कसा आला आणि प्रकाश कसा आला. वायुच्या घर्षणाने प्रकाश निर्मिती झाली,
प्रकाशातून पाणी निर्माण झाले आणि पाण्यातून पृथ्वी निर्माण झाली. ब्रह्मांडाचे ते इतके सुंदर चित्रण आहे.
प्रश्न
: सर्वात प्रिय गुरुजी, आम्ही मंत्राचे ध्यान करण्याऐवजी तुमचे केले तर? तुमच्या ऊर्जेमध्ये मिसळून तुम्हीच बनण्याकरिता ध्यानाचा सर्वोत्तम मार्ग कोणता?
श्री
श्री
रविशंकर
: केवळ मंत्र घ्या आणि बाकीचे सोडून द्या,अजून काही करू नका.
प्रश्न
: माझ्या शाळेत,जवळ जवळ सगळीच मुले अपशब्द वापरतात, असे शब्द वापरण्यापासून मी स्वतःला कसे काय आवरू? आणि त्यांना असे शब्द वापरणे थांबवायला मी कशी काय मदत करू?
श्री
श्री
रविशंकर
: तुमच्यामध्ये ताकद आहे. मी तर म्हणतो की तुम्ही सुपरमॅन आहात. तुम्ही ठाम राहा,'मी कोणतेही अपशब्द वापरणार नाही'.
तुम्हाला माहिती आहे इतक्या वर्षात मी एकही अपशब्द वापरलेला नाही? जर मी हे करू शकतो तर तुम्ही देखील हे करू हे शकता. मी रागावलेलो असतानादेखील असे शब्द माझ्या तोंडून निघत नाही. सर्वात वाईट जर कोणता शब्द माझ्या तोंडून निघाला असेल तर तो आहे, 'खुळा',येवढेच मी म्हणालेलो आहे. त्याच्यापलीकडे काही नाही, शिव्या नाही, एकसुद्धा अपशब्द नाही,कधीच नाही.
प्रश्न
: अध्यात्माचा मार्ग इतका अवघड का आहे?
श्री
श्री
रविशंकर
: अवघड? अरे देवा! हा सर्वात सुकर,विनासायास आणि सहज सोपा आहे. बाकीच्या नोकऱ्या खूप कठीण आहेत. मी जगातील सर्वात सोप्या गोष्टींकडे जातो. हे आरामदायी आहे आणि एकदम सोपे, तुम्ही हसत, नाचत गात मार्गक्रमण करू शकता. जगातील या बाकीच्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला कराव्या लागतात त्या अवघड असतात. जेव्हा तुम्हाला तुमची एखादी इच्छा पूर्ण करावयाची असते, ते किती अवघड असते. पण अध्यात्मिक मार्गावर इच्छा त्यागणे किती सोपे असते आणि मग तुम्ही त्याबद्दल विसरून जाता.
प्रश्न
: जर कोणी व्यक्ति,जी तुमच्यावर प्रेम करते आणि तुमची काळजी घेते,ती आता ते प्रेम आणि काळजी दाखवत नाही,तर तुम्ही त्या व्यक्तीचे अजून तुमच्यावर प्रेम आहे यावर कसा विश्वास ठेवता आणि त्या व्यक्तीवर कसे काय रागावत नाही?
श्री
श्री
रविशंकर
: त्यांना थोडा अवधी द्या,त्यांना एक मधली सुट्टी द्या आणि त्यांना त्याचे प्रेम पुनः दर्शवण्याकरिता पुनःप्रभारित होऊ द्या. लोकांना थोडेफार पुनःप्रभारित होण्याची गरज असते.
तुम्ही त्यांच्याकडून सगळे प्रेम आणि लक्ष्य आकृष्ट केले आहे आणि त्याला पुनःप्रभारित होण्याकरिता थोडा वेळ देण्याची गरज आहे. असे लक्षात घ्या की ते त्यांची बॅटरी पुनःप्रभारित करीत आहेत.
जर का तुम्ही अशी मागणी केली की त्यांनी त्यांचे प्रेम दाखवावे,तर याने काम होणार नाही. उलट याचा विरुद्ध परिणाम होईल.म्हणून मागण्या करू नका आणि ,'तू माझ्यावर प्रेम का करत नाही?',असे प्रश्न विचारू नका. असे कधीच म्हणू नका.
खर तर तुम्ही याच्या उलट बोलावे,'तुम्ही माझ्यावर एवढे प्रेम का करता? मी त्याच्या लायक नाही. तुम्ही माझ्यावर एवढे प्रेम का करता? तुम्ही माझ्यावर खुपच प्रेम करता,मी अजून ते घेऊ शकत नाही.' असे सांगून बघा आणि तुम्ही बघाल की सगळे बदलून जाईल. समोरच्या व्यक्तीला तुमच्यावरील आपले प्रेम सिद्ध करणे याचे इतके ओझे वाटते हे तुम्हाला माहिती आहे.
समजा कोणी तुम्हाला तीच गोष्ट म्हणाले,'मला नाही वाटत की तुमचे माझ्यावर प्रेम आहे,असेल तर चला,दाखवा मला'. तर तुम्ही विचार कराल,'अरे देवा,आता मी खरोखर प्रेम करतो ते मी कसे सिद्ध करू'. हे इतके जड ओझे आहे आणि असे ओझे कोणालाही कायम डोक्यावर घेऊन फिरायचे नसते.
दररोज घरी या आणि तुमचे तुमच्या जोडीदारावर प्रेम आहे हे रोज सिद्ध करा. नाही! ते गृहीत धारा आणि पुढे चालत राहा. त्यांचे प्रेम सिद्ध करण्याकरिता कोणालाही जबाबदार धरण्याचा प्रयत्न करू नका.
प्रश्न
: जेव्हा बुद्धांना ज्ञानोदय झाला,तेव्हा
इतर गुरूंना आलेला अनुभव त्यांना आला असेल परंतु बुद्ध कधीही देवाविषयी काहीही बोलले
नाही. या मुळेच काही लोक तर असेदेखील म्हणतात की बुद्ध
हे नास्तिक होते. याबाबत तुम्ही काही बोलू शकाल का?
श्री
श्री
रविशंकर
: बुद्धाच्या काळात देवाविषयीच्या अनेक संकल्पना होत्या. बऱ्याच
लोकांचे उपनिषद पूर्णपणे वाचून झाले होते.
बुद्धांचे अनुयायी
हे अतिशय
बुद्धिमान होते; ते जीझसच्या अनुयायींच्या परस्परविरुद्ध होते. जीझसचे
अनुयायी हे सगळे कोळी होते,
साधेसुधे होते. पण
बुद्धांचे अनुयायी हे पंडित,
प्रज्ञावंत आणि बुद्धिमान होते,म्हणून
त्यांना देवाबद्दल माहिती होते;त्यांना ब्रह्म विषयी माहिती होते,त्यांना
आत्म्य बद्दल माहिती होते,त्यांना सगळे माहिती
होते. आणि जेव्हा तुम्ही बोलणे किंवा चर्चा करणे सुरु करता
तेव्हा ते त्या पातळीवरच राहते.
पुन्हा इतक्या वैचारिक
शाखा होत्या,जर बुद्धांनी एखाद्या शाखेला पाठींबा दिला असता तर
बाकीच्या शाखांचे म्हणाले असते,'नाही,तो मार्ग नाही', आणि मग ते बुद्धांपासून दूर झाले असते. म्हणून
बुद्ध एकदम स्पष्ट होते,ते म्हणाले,'मी
या वेगवेगळया वैचारिक शाखांवर बोलता कामा नये.सगळे
लोक येतील आणि त्यांना आवडेल आणि ते स्वतःच सत्याचा शोध घेतील',कारण
ते सगळे मोठमोठ्या विश्वविद्यालयात अभ्यास करण्यात अडकलेले होते. त्या
काळी मोठी विश्वविद्यालये होती,
हजारो लोक तिथे अभ्यास करायचे, आणि
ते वेगवेगळया वैचारिक शाखांचा,
धर्मग्रंथ, औषधशास्त्र
आणि सर्व काही अभ्यास करायचे.
त्या काळी भारत परमसीमेवर होता.
म्हणून बुद्ध म्हणाले, 'मी
या विवादात पडणार नाही.
मला त्यांना केवळ एक सरल तंत्र द्यावयाचे आहे'. आम्हीदेखील
तेच करतो. आम्ही कोणत्याही विचार प्रणाली, धर्म
किंवा इतर काही कशाबद्दल बोलत नाही.
आम्ही इतकेच म्हणतो ,'केवळ
सुदर्शन क्रिया करा', आणि सगळे ती करतात-मुसलमान,ज्यू
लोक,ख्रिचन,हिंदू, बौद्ध, सगळे
सगळे ती करतात आणि त्यांना रिकामे आणि पोकळ होण्याचा खरा अनुभव येतो.
तर म्हणूनच बुद्ध म्हणाले,'नाही, मी
देवाबद्दल बोलणार नाही'.
त्यावेळी तसे करणे योग्य होते.
तर जीझस वेगळा होता, त्याच्या
काळात तेव्हा तो ज्या गावात शिकवत होता तिथे केवळ एकाच वैचारिक शाखा होती आणि त्या
सर्वांचा देवावर विश्वास होता.
यहुदी धर्म ही एकच वैचारिक शाखा होती आणि ते सर्व
केवळ एकाच पुस्तकावर अवलंबून होते.
म्हणून जीझस त्याच क्रमाने देवाबद्दल बोलला आणि त्याचा
नकार न करता त्याने त्यांना ज्ञानाची ओळख करून दिली.
तुम्हाला कळते आहे
का मी काय म्हणतो आहे ते?
शिवाय त्याचे अनुयायी
हे अतिशय साधेसुधे लोक होते.
त्यांचा धार्मिक ग्रंथांचा तेवढा गाढा अभ्यासदेखील
नव्हता. तर मग असे सोपे होते, देव
म्हणजे
प्रेम या साध्या संदेशाने ते आकर्षित झाले आणि ते अनुसरू
लागले.
भगवान बुद्धांनी तेच
केले जे त्यांना करणे भाग होते आणि ते बिलकुल बरोबर आहे. म्हणूनच
मग नंतर जेव्हा आदि शंकराचार्य आणि बाकीचे संत आले,तेव्हा
त्यांना दिसून आले कि बुद्ध जे म्हणाले आणि उपनिषदात जे आहे त्यात काहीही फरक नाही
आहे. म्हणूनच भारत हा कधीही बौद्ध झाला नाही कारण बुद्ध
जे म्हणाले ते भारतात आधीच उपलब्ध होते.
बुद्धांनी एका धर्माची
सुरुवात स्वतःहून कधीच केली नाही;ते एक हिंदू साधू म्हणूनच जगले. ते
हिंदू साधू झाले आणि हिंदू साधू म्हणूनच त्यांनी इहलोकाची यात्रा संपवली. परंतु
मागाहून बौद्ध एक वेगळा धर्म बनला.
ते सनातन हिंदू धर्माचे, प्राचीन
जीवन शैलीचे केवळ एक सुधारक होते.
धर्माला धर्म देखील म्हणत नव्हते तर केवळ एक जीवन
जगण्याची शैली. बुद्ध
हे त्या जीवन जगण्याच्या शैलीचा एक भाग होते,आणि
नंतर मग जेव्हा ती शैली भारताबाहेर गेली तेव्हा ती धर्म झाली.
भगवान बुद्धांचा प्रभाव
नंतर नंतर येवढा महान होता की लोक उपनिषद आणि सगळ काही विसरून गेले,आणि
मग परंपरेतून आदि शंकराचार्य आले आणि त्यांनी योग आणि वेदांत हे पुनर्प्रस्थापित
केले. आदि शंकराचार्यांनी केवळ एक गोष्ट बोलले,एक
हलकीशी टिचकी आणि हे असेच घडले सगळे.
बुद्ध म्हणाले सगळे
काही रिकामे आहे. 'मी गहन ध्यानामध्ये गेलो आणि मी शोध घेतला पण मला
कोणताही आत्मा अथवा स्वत्व मिळाले नाही'. हे त्यांचे शेवटचे
वाक्य होते.
आदि शंकराचार्यांनी
वेगळ्या प्रकारे सांगितले,
त्यांनी स्वत्वाला पदार्थ अथवा द्रव्य संबोधिले. तर
आदि शंकराचार्यांनी ते उलट फिरविले आणि ते म्हणाले, 'कोण
स्वत्वाला शोधू शकत नाही,तेच स्वत्व आहे,आणि
स्वत्व म्हणजे परमानंद आहे,
ते अवकाश आहे'.
आणि मग त्यांनी हे
संपूर्ण ज्ञान, हे तत्वज्ञान पुन्हा आणले. या
टोकापर्यंत बौद्ध धर्मामध्ये सांगितलेले सर्व समानच आहे-मी शरीर
नाही,मी मन नाही,मी हे नाही,मी ते नाही-आणि
जेव्हा तुम्ही गाभ्याच्या केंद्रापर्यंत पोहोचता तेव्हा बुद्ध म्हणता,'काहीच
नाही आहे', आणि आदि शंकराचार्य म्हणतात,'सकल
आहे.हा आत्मा आहे ,ही
चेतनाशक्ती आहे आणि चेतनाशक्ती ही एक जागी आहे, आणि
सगळीकडे आहे'.
तर थोडक्यात सांगायचे
तर जीझसप्रमाणेच आदि शंकराचार्य हे देखील केवळ ३२ वर्षेच जगले आणि त्या ३२ वर्षात ते
संपूर्ण भारतभर अनेकदा फिरले
त्या दिवसांमध्ये वाहने
नव्हती,भ्रमणध्वनी नव्हते,काहीच
नव्हते. तर असे म्हणतात की आदि शंकराचार्य ज्या कोणत्या दिशेने
निघत तिथे विजयश्री आणत असत,तिथे जल्लोष होत असे,कारण
बुद्धांच्या ५००
वर्षांनतर, लोक फार निराशावादी झाले होते, असे म्हणतात की लोकांना
जीवनात कसलाही रस वाटत नव्हता.
ते म्हणत, 'काही
झाले तरी जीवन म्हणजे दुःख,जीवन म्हणजे दैन्य,तर
मग आपल्याला काही करण्याची जरुरत नाही'.
सैन्य नव्हते, सर्व
राजे निरुत्साही होते, जल्लोषाचा पैलू हरवला होता. लोक
केवळ अनित्य विषयी-सगळे
काही अशाश्वत आहे तर मग केवळ रिकामे आणि पोकळ बना असे- बोलत. परंतु
आदि शंकराचार्य म्हणाले,
'ठीक आहे जर अशाश्वत आहे तर,पण
काही तरी शाश्वत]देखील आहे, तर
मग आपण सगळे जल्लोष करू या,
नाचू या, गाऊ
या'.
मग त्यांनी भज गोविंदम
सुरु केले आणि नंतर संगीत,नाच,संस्कृती आणि या सगळ्या
गोष्टींची आदि शंकराचार्यांनी पुन्हा ओळख करून दिली.
प्रश्न
: माझी संतापाच्या आणि अज्ञानाच्या भरात मी माझ्या मायाळू आणि प्रेमळ पत्नीचा आणि माझ्या मुलांचा छळ केला. मला आता जाणीव झाली आहे. मी त्यांच्या अंतःकरणांला बरे वाटण्याकरिता काय करू? मला कायम अपराध्यासारखे वाटते.
श्री
श्री
रविशंकर
: जेवढ करता येईल तेवढ करा आणि आराम करा. ठीक.
प्रश्न
: बऱ्याच
वर्षांपूर्वी माझी मुंज झाली पण त्यावेळी मी त्या समारंभाचे,ते जानवे आणि संध्यावंदन
यांचे महत्व समजू शकलो नाही.तुम्ही कृपा करून सांगू शकाल काय? क्रिया करणे पुरेसे
नाही का,संध्यावंदनची काय गरज?
श्री
श्री
रविशंकर
: होय,तुमचे क्रिया करणे पुरेसे आहे आणि नंतर जर तुम्हाला दीक्षा मिळत असेल तर
गायत्री जप करा.
गायत्री जपा चा अर्थ आहे-माझ्या
बुद्धीला देवाकडून स्फूर्ती मिळू दे.
अफाट देवत्वाला जीवनात पूर्णपणे व्यक्त होण्यापासून केवळ आपली बुद्धी आडवी
येते.
म्हणून प्रार्थना आहे की,’माझ्या बुद्धीला देवाकडून स्फूर्ती मिळू दे.माझ्या
जीवनात आणि माझ्या बुद्धीमध्ये परम उर्जा आविष्कृत होऊ दे.’
आणि मुंजीत नेहमी जानवे घालतात आणि जानव्याचा अर्थ आहे की तुमची ज्ञानाच्या प्रती,
तुमच्या पालकांच्याप्रती आणि समाजाच्याप्रती जबाबदारी आहे. तर त्याचा अर्थ आहे
तुमची जबाबदारी तुम्ही तुमच्या खांद्यांवर घेणे.
तरुण मुलगा अभ्यासाकरिता निघून जाण्याआधी ते त्याला त्याच्या जबाबदारीची
जाणीव करून देतात की, ’तुझ्यावर जबाबदारी आहे’. आणि मग मुलगा अभ्यास करून परत
येतो.
जेव्हा तुम्ही तुमच्या जबाबदारीतून मुक्त होता, तेव्हा संन्यासात ते जानवे काढून
फेकून देतात. जर तुम्ही एकांतवासी असाल तर तुम्हाला जानवे घालावे लागत नाही. अशा
प्रकारची पद्धती खूप काळापासून पाळली जात आहे.
प्रश्न
: गुरुजी, शृंखला शास्त्र समांतर विश्वाबद्दल बोलते. यावर तुम्ही काही बोलू
शकाल?
श्री
श्री
रविशंकर
:
होय,समांतर विश्वाबद्दल बोलले जाते.१४ विश्वे आहेत आणि ती एकमेकांच्या आत अशी
समांतर आहेत. आता याक्षणी इथे खूप विश्वे असू शकतात.
पित्र लोक हे भलतीकडे कुठे नसून,इथेच आहे. म्हणूनच आपण थोड्याच गोष्टींचे,तानमात्रां चे विश्लेषण करू
शकतो.
आपल्या जाणिवांमध्ये थोड्याफार प्रमाणात सर्व पंचमहाभूते आहेत आणि त्यांच्या
उपस्थितीमुळेच आपण हे सर्व बघू आणि अनुभवू शकतो. आपली प्रकाशाची तानमात्रा ही
घुबडाच्या तानमात्रेपेक्षा वेगळी असते. म्हणून जेव्हा बाहेर अंधार असतो तेव्हा
तुम्ही पाहू शकत नाही परंतु घुबड बघू शकते.
वटवाघूळाची तानमात्रा ही अजून निराळी असते. जिथे तुम्हाला काहीही
दिसत नाही तिथे वटवाघूळ बघू शकतात. त्यांच्या चर्मचक्षुची क्षमता वेगळी असते.
अंधार असताना तुम्हाला तुमच्याच खोलीत वावर करण्यास विजेरीची गरज भासेल पण एका
मांजरीला त्याची जरुरत भासणार नाही,ते स्वतःचा रस्ता बरोबर शोधून घेते.तर,आपल्या
पाच संवेदनांचे प्रत्यक्ष ज्ञान हे तानमात्रा ज्याला म्हणतात त्यावर आधारित
असते. आपले सूर हे एखाद्या कंपन संख्येवर असतात तर हे एवढे अफाट मोठे विश्व आहे
त्याच्या अगणित कंपन संख्या आहेत.
प्रश्न
:
माझ्या विशिष्ट स्तिथी करिता मी नुकतेच मनोदुर्दशारोधी औषध सुरु केले आहे. मला
तुमच्याकडून आशेचा अगर स्फूर्तिदायक संदेश ऐकायला आवडेल. माझे तुमच्यावर प्रेम आहे
आणि मला वाटते की मी तुमचाच एक भाग आहे पण आता याक्षणी मला हरलेल्याची भावना
वाटते,आणि मला काळजी वाटते की मी माझी प्रतिभा परत मिळवू शकणार नाही. मी लढा देत
राहतो,पण तुमच्याकडून दोन शब्दांनी फार मदत होईल.
श्री
श्री
रविशंकर
: नाही,लढा देऊ नका. शरीराला औषधांची गरज आहे,त्यांना फक्त घ्या,आराम करा आणि
आनंदी राहा.
जर तुम्ही अध्यात्मात पाउल ठेवले असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा-कोणत्याही
परिस्थितीत मी आनंदी असू दे मग मी कुठेही असू दे,कसाही असू,मला खुशच राहायचे आहे.मी
आनंदी राहणार,मी प्रसन्नचित राहणार, आणि मला जरी कठीण परिस्थितीचा सामना करावा
लागला तरी मी त्याचा सामना हसत करेन-हा एक विचार,हा एक निर्धार तुम्ही केला
पाहिजे.