3
2012............................... Kive, Ukrain
May
कीव, युक्रेन
आपण
आपल्याला मिळालेला आनंद, परमानंद पसरवायचा आहे. आयुष्यात इतके काही आहे हे जास्तीत
जास्त लोकांना समजले पाहिजे. आपल्याला आयुष्याबद्दल खूप कमी माहित आहे, आणि खूप
काही समजावून घ्यायचे आहे. हे ज्ञान खूप मौलिक आहे, नाही का?
आपण
असा विचार करतो की मन (चेतना) ही शरीरात आहे, पण तसे नाही, शरीर चेतनेत आहे. शरीर
हे दिव्याच्या वाती सारखे आहे तर मन त्या भोवतीची ज्योत. तुम्ही जितके निवांत असाल
तितके मन प्रसारीत होते, मोठे होते. तुम्ही जितके समाधानी आणि परिपूर्ण असाल तितके
मोठे आणि तेजस्वी व्हाल.
प्रश्न:
गुरुजी, किव मध्ये १०० पेक्षा जास्त संतांची शरीरे आहेत. तुम्ही त्या बद्दल सांगाल
काय?
श्री श्री:
संत हे शरीर नव्हेत, तर ते चेतना आहेत. शरीर हे भाज्या, धान्य आणि अन्नापासून बनले
आहे. हे अनंत काळापासून इथे आहे, शरीराचा प्रत्येक अणु या धरतीचा भाग आहे.
धरतीपासून तयार होते आणि धरतीला जाऊन मिळते. पण चेतना खूप महत्वाची आहे, ती
सर्वव्यापी आहे.
प्रश्न:
ही शरीरे क्षय होत नाहीत. ती आहेत तशीच राहतात.
श्री श्री:
होय, हीच भक्ती आहे. जितकी जास्त भक्ती आणि प्रेम असेल तितक्या तुमच्या शरीरातील
पेशी तजेला तयार करतात. जिथे भक्ती असेल तिथे चमत्कार घडतात. चेतना ही फक्त
शरीराशी निगडीत आहे असे समजू नका. चेतना सर्वव्यापी आहे. तुम्ही कुठेही असाल,
जेंव्हा तुम्ही विचार करता तेंव्हा तुम्ही चेतनेशी जोडले जाता. आपली शरीरे टेलीव्हिजनच्या
डब्यांसारखी आहेत. खरी उर्जा ही त्या चॅनेलच्या लहरीमध्ये आहे. जेंव्हा तुम्ही
टीवी चालू करता, तेंव्हा जे चॅनेल दिसते ते फक्त टीव्ही वर नसते तर पूर्ण खोलीभर
असते.
प्रश्न:
मनातल्या नकारात्मक भावनांना कसे घालवावे?
श्री श्री:
चांगली संगत. ज्याच्या बरोबर बसून नकारात्मक बोलण्यानंतर जेंव्हा तुम्ही सकारात्मक
होता तोच खरा मित्र. ज्याच्या बरोबर बसून थोडे नकारात्मक बोलल्यानंतर जेंव्हा
तुमची नकारात्मकता अधिक मोठी होते तो वाईट मित्र. त्यामुळे पहिले म्हणजे चांगली
संगत. दुसरे, प्राणायाम, सुदर्शन क्रिया आणि ध्यान. तिसरे म्हणजे शरीर शुद्धी.
जेंव्हा
तुमचे पोट साफ होत नाही, यकृत कठीण असते तेंव्हा त्याचा डोक्यावर सुद्धा परिणाम
होतो. कधीकधी शरीराची शुद्धी सुद्धा जरुरी असते. जैवविष काढून टाका, किंवा पथ्य
आहार घ्या. आयुर्वेद, पंचकर्म या सगळ्याचा उपयोग होईल.
प्रश्न:
रोग आपल्या आयुष्यात का येतात? त्यांचे काय प्रयोजन आहे?
श्री श्री: कारण आपण निसर्गाचे नियम मोडत आहोत. आपण जे खायला नको ते
खातो आहोत किंवा खूप खात आहोत. आपण पर्यावरणाची योग्य काळजी घेत नाही. सगळीकडे
(टेलीकम्युनिकेशन) चे मनोरे आहेत, त्याने उत्सर्ग वाढतो आहे. या सगळ्याचा आपल्यावर
परिणाम होतो. त्याचबरोबर तेंव्हा मन तणावाखाली असते तेंव्हा प्रतिकारशक्ती कमी
होते.
प्रश्न:
आपण कशासाठी जगतो?
श्री श्री: प्रथम तुम्ही कशासाठी जगात नाही याची यादी करा. आयुष्याचा
उद्देश स्वतः दु:खीकष्टी राहून दुसऱ्याला सुद्धा दु:खी करणे हा नाही, बरोबर? मग
काय उद्देश असेल? आपण दुसऱ्याच्या आयुष्यात अधिक आनंद कसा आणू शकू? आपण आपल्या
अंतरंगाशी, आत्म्याशी कसे जोडले जाऊ? आपण कोण आहोत याचा शोध घेणे? यालाच अध्यात्म
म्हणतात आणि तुम्ही योग्य जागी आलेले आहात.
प्रश्न: दैवी मूल बनण्यासाठी मनाची आणि हृदयची कशी तयारी करावी?
श्री श्री: मुलाप्रमाणे, बालकासारखे बना. कुठलाही संकोच नाही,
पूर्वग्रह नाही. साधे आणि नैसर्गिक रहा.
प्रश्न: मला वाटते माझी नियती, संगीताद्वारे लोकांना आनंद देणे,
गायनाद्वारे लोकांची उन्नती करणे ही आहे.
श्री श्री: आयुष्य संगीताशिवाय अपूर्ण आहे, पण संगीत म्हणजे सर्व
नाही. संगीत हा एक भाग झाला. तुम्हाला आयुष्यात अजून गोष्टी करायच्या आहेत, त्या
करा. या सगळ्यात पहिली म्हणजे ज्ञान. ज्ञान, अध्यात्मीक ज्ञान खूप महत्वाचे आहे.
प्रश्न: माझा मुलगा जुगाराच्या व्यसनाधीन आहे, त्यामुळे मी खूप
अस्वस्थ आहे.
श्री श्री: तुम्हाला एक मुलगा आहे, मला अशी लाखो मुले आहेत, जी वाईट
गोष्टींच्या आहारी गेली आहेत. जागे व्हा आणि तुमच्या मुलासारख्या इतरांना कशी मदत
करता येईल ते पहा. तुम्हाला दुसऱ्यासाठी काही करता यावे यासाठी ही वेदना आहे;
समाजासाठी, इतर मुलांसाठी.